* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BRÛLÉE VIVE (FRENCH), BURNED ALIVE (ENGLISH)
  • Availability : Available
  • Translators : GAURI KELKAR
  • ISBN : 9788184985269
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 212
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHEN SOUAD WAS SEVENTEEN SHE FELL IN LOVE. IN HER WEST BANK VILLAGE, AS IN SO MANY OTHERS, SEX BEFORE MARRIAGE IS CONSIDERED A GRAVE DISHONOR TO ONE`S FAMILY AND IS PUNISHABLE BY DEATH. THIS WAS HER CRIME. HER BROTHER-IN-LAW WAS GIVEN THE TASK OF METING OUT HER PUNISHMENT. ONE MORNING WHILE SOUAD WAS WASHING THE FAMILY`S CLOTHES, HE POURED GASOLINE OVER HER AND SET HER ON FIRE. MIRACULOUSLY, SHE SURVIVED, RESCUED BY WOMEN OF HER VILLAGE, WHO PUT OUT THE FLAMES AND TOOK HER TO A LOCAL HOSPITAL. HORRIBLY BURNED OVER SEVENTY PERCENT OF HER BODY AND STILL DENOUNCED BY HER FAMILY, SOUAD WAS ABLE TO RECEIVE THE CARE SHE NEEDED ONLY AFTER THE INTERVENTION OF A EUROPEAN AID WORKER. NOW IN PERMANENT EXILE FROM HER HOMELAND, SHE HAS DECIDED TO TELL HER STORY AND REVEAL THE BARBARITY OF A PRACTICE THAT CONTINUES TO THIS DAY. BURNED ALIVE ...IS THE FIRST TRUE ACCOUNT EVER PUBLISHED BY A VICTIM OF AN "HONOR CRIME." SOUAD`S INSPIRING TESTIMONY IS A SHOCKING, MOVING, AND HARROWING STORY OF CRUELTY AND INCOMPARABLE COURAGE...AND AN INSPIRING CALL TO ACTION TO END A HEINOUS TRADITION.
बन्र्ड अलाइव्ह ही सुआद नावाच्या पॅलोस्टिनी तरुणीची कहाणी आहे. एखाद्या मुलाकडे नुसतं पाहिलं किंवा त्याच्याशी बोललं म्हणून नावं ठेवणा-या संकुचित आणि पुरोगामी पॅलोस्टिनी समाजात एक तरुण सुआदला लग्नाचं वचन देऊन फसवतो. याची कठोर शिक्षा सुआदला मिळते आणि तिच्या पोटात वाढत असलेल्या बाळासह तिला जिवंत पेटवून दिलं जातं. ऑनर क्राइमच्या या क्रूर अनुभवातून सुआद वाचते. समाजसेवी संघटनेच्या एका कार्यकर्तीमुळे सुआदला जीवनदान मिळतं आणि युरोपात तिचं नवं आयुष्य सुरू होतं. बालपणी सोसलेला कमालीचा छळ, गुरासारखा खाल्लेला मार, मरेस्तोवर केलेलं काम आणि दुसरीकडे, युरोपातल्या पुढारलेल्या समाजातलं जीवन, आगीच्या खाणाखुणा अंगावर वागवत जिणं, नवरा-मुलांकडून प्रेम, मानसिक आधार मिळालेली सुआद डोंगराएवढं धाडस करून तिची कथा सगळ्या जगासमोर मांडते. तिच्यासारखा प्रसंग ओढवलेल्या मुलींना धीर देण्याचा प्रयत्न करते. हा तिचा प्रवास काळजाला घरं पाडणारा, त्रासदायक आहे पण त्याला धैर्याची, माणुसकीची, इच्छाशक्तीची, सहनशक्तीची प्रेरक झालरही आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #SOUAD #GAURIKELKAR #TARIHIJIVANTME #BRÛLÉE VIVE (FRENCH)# BURNED ALIVE (ENGLISH)
Customer Reviews
  • Rating StarDhanesh Dangat

    फिनिक्स भरारी… पॅलस्टाइनमधील पुराणमतवादी, परंपरावादी संस्कृतीचा बळी ठरलेली एक कोवळी मुलगी- सुआद परपुरुषाबरोबर बोलते, त्याच्या प्रेमात पडते म्हणून घरच्यांच्या अनन्वित छळाला सामोरी जाते. पुरुषसत्ताक व्यवस्थेचा पगडा असणाऱ्या घरात तिच्या उमलत्या भावनांा अक्षरश: पायदळी तुडवले जाते. तिचा मित्र लग्नाचे वचन देऊन तिला फसवतो. तिच्यामुळे घराण्याची अब्रू चव्हाट्यावर येईल, या भीतीने घरातील कर्त्या पुरुषाकडून तिला जिवंत पेटवून दिले जाते. पोटात चार महिन्यांचा गर्भ असताना, अग्नीच्या ज्वालांच्या लपेट्यात अडकलेली सुआद, तिची कहाणी अंगावर काटा आणणारी आहे. ऑनर किलिंगच्या या घटनेमुळे उन्मळून पडलेली सुआद केवळ नशीब बलवत्तर म्हणून वाचते. जॅकलिन नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्तीमुळे नवे आयुष्य सुरू करते. पण ऑनर किलिंगच्या अशा पेटवून दिल्या गेलेल्या घटनांमधून वाचलेली, जिवंत असलेली एकमेव साक्षीदार म्हणून सुआद तिची कहाणी लिहण्यासाठी प्रवृत्त होते हा पुस्तकाचा गाभा आहे. मात्र जिवंत पेटवून दिल्याने तिच्या शरीरावर असलेल्या जखमा, तिची विद्रुपता, ती कुणालाच नकोशी झाली आहे ही भावना या सगळ्या अनुभवांचे गंभीर, शारीरिक व मानसिक परिणाम तिच्यावर होतात. इतके की तिच्या भूतकाळातील जखमा, त्यांचे व्रण यांच्यात अडकलेली तिची मानसिकता पदोपदी, क्षणोक्षणी तिचा पिच्छा पुरवते, तिचा आत्मविश्वास पार धुळीस मिळवते. भाजलेल्या त्वचेमुळे ती कुरूप दिसायला लागते, पण ही कुरुपता तिच्या मनावर पुटं धारण करू लागते. पण त्यातूनही तग धरणारी, सामान्य स्त्रीप्रमाणे आयुष्य जगण्यासाठी आसुसलेली सुआद, एक प्रेयसी, एक पत्नी, एक आई ते एक समाजसेवी व्यक्ती अशा विविध भूमिकांमधून वाचकांना भेटते आणि तिच्या आयुष्याचा प्रवास उलगडताना, तिच्यावरच्या अत्याचाराचे- छळाचे वाचक जणू साक्षीदार असल्याचा प्रत्यय पुस्तकाच्या पानापानांतून येतो. सुआद तिची शोकांतिका मांडते आहे, अशा प्रथमपुरुषी स्वरातून पुस्तकाची सुरुवात होते आणि अगदी सहज, सोप्या भाषेत तिच्या पॅलेस्टिनी घराचे, गावाचे, तिथल्या समाजाचे चित्र आपल्यापुढे उभे राहते. भूतकाळातील तपशील, घटनांची सुसंगती लावण्यात गोंधळात पडलेली सुआद, तिची ही केविलवाणी मन:स्थिती पाहिल्यावर या आठवणी तिच्यासाठी इतक्या वर्षांनंतरही किती नकोशा, जीवघेण्या आहेत याची खात्री पटते. नूरा, कैनात, सुआद आणि... तिच्या चौथ्या बहिणीने नाव काही केल्या तिला लक्षात येत नाही. काही प्रसंग सोडले तर तिला तिच्याविषयी काहीच आठवत नाही. तिच्या घरातला अंधार, मुलींनी पायघोळ, गळाबंद करड्या वा मळकट रंगाचे झगे घालावे हा वेष, मुलीसाठी शिक्षण निषिद्ध, परक्या पुरुषाशी सोडाच अनोळखी स्त्रीशीसुद्धा संभाषण करायचे नाही हा शिरस्ता, दिवसभर कष्ट करून, राबूनही मुलीपेक्षा घरातील शेळ्या-मेंढ्यांची पत जास्त चांगली अशा मताचे वडील व हिंसक वृत्तीचा तिचा भाऊ या वर्णनामुळे तत्कालीन पुरुषसत्ताक व्यवस्थेचे चित्र आपल्यासमोर स्पष्ट होते. सुआदच्या आईला एकूण १४ मुले झाली. मात्र त्यातली ५ जगली, मात्र उरलेल्यांना जन्माला आल्या आल्या आईनेच अंथरुणात लपेटून संपवून टाकले होते. मुली जन्माला अलया तर त्यांचे काय करायचे, हा धडा इथूनच तिच्या मोठ्या बहिणीला मिळाल्याचे सुआद म्हणते. बाहेरख्याली मुलीला ‘चारमुटा’ म्हणत व त्यांच्या या कृत्याची शिक्षा म्हणून त्यांना जिवे मारले जाई, याचीच तर सुआद साक्षीदार होती. जॅकलिन ही कार्यकर्ती, कर्तव्यभावनेपेक्षा माणुसकीच्या दृष्टीने सुआदला व तिच्या बाळाला वाचवते. तिला युरोपात घेऊन जाते. नव्याने आयुष्य जगण्यासाठी सुआदला किती मानसिक व शारीरिक दिव्यातून जावं लागलं. तिच्या मुलाशी तिचे विभक्त होणे, नव्याने प्रेमात पडून संसार थाटणे, दोन कन्या रत्नांच्या प्राप्तीनंतर, आपली कहाणी जगासमोर मांडायला तयार झालेली सुआद इतक्या वळणांवर असहाय, केविलवाणी झालेली दिसते की आता ही संपलीच आहे असे वाटत असताना नवऱ्याच्या, मुलींच्या व आप्तेष्टांच्या प्रेमामुळे पाठिंब्यामुळे ती पुन्हा उभी राहते. मुलगा मारूआनचा तिच्या आयुष्यात झालेला पुनप्रवेश तिला पूर्णत्वाकडे घेऊन जातो. मात्र या सगळ्यात सुआदचा एक गुण अधोरेखित करावा असा वाटतो, अन्यायला सामोरी गेल्यावरही तिच्यातील माणुसकी संपत नाही. तिच्या आठ आणि दहा वर्षांच्या मुलींना ती तिच्या भूतकाळाबद्दल अत्यंत संवेदनशीलपणे माहिती देते, त्यांना कळेल, समजेल अशा स्वरूपात तिच्या जखमांची ओळख करून देते. पण मुलींनी, तिच्यावरच्या अन्यायचा सूड उगवावा असा तिचा सूर नाही. मुलींनी सगळ्याच अरबी पुरुषांचा तिरस्कार करावा असे तिला वाटत नाही. हा तिचा समजूतदारपणा कौतुकास्पद आहे. सुआदच्या धैर्याची, दुर्दम्य इच्छाशक्तीची, जगण्याच्या चिवट महत्त्वाकांक्षेची व पॅलेस्टिनी भूमीतील स्त्रियांच्या जगण्याच्या आलेखाची कल्पना येण्यासाठी ‘...तरीही जिवंत मी’ हे पुस्तक वाचावयास हवे. एकूण ३९ भाषांमध्ये अनुवादित झालेली ही कहाणी अत्यंत प्रेरक आहे. ...Read more

  • Rating StarZEE MARATHI DISHA 23 FEB - 1 MAR 2019

    आजच्या काळातही ऑनर किलिंगसारखे क्रूर प्रकार घडतात. जॉर्डन, येमेन, तुर्की, इस्रायल इत्यादी देशांत घडतात. जातपंचायतीचे बळीही होतात. जगातील कितीतरी महिलांचे मानवाधिकार कसे पायदळी तुडवले जातात, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ‘बर्न्ड अलाइव्ह’ ही सुआदची आत्मकथाआहे. सुआद नावाच्या तरुणीची ही कहाणी आहे. एखाद्या मुलाकडे नुसतं पाहिलं तरी किंवा त्याच्याशी बोललं म्हणून नावं ठेवणाऱ्या संकुचित पॅलेस्टिनी समाजात एक तरुण सुआदला लग्नाचं वचन देऊन फसवतो. याची कठोर शिक्षा सुआदला मिळते आणि तिच्या पोटात वाढत असलेल्या बाळासह तिला पेटवून दिलं जातं. ऑनर क्राइमच्या या क्रूर अनुभवातून सुआद वाचते. समाजसेवी संघटनेच्या एका कार्यकर्तीमुळे सुआदला जीवनदान मिळतं आणि युरोपात तिचं नवं आयुष्य सुरू होतं. आजही सुरू आहे. बालपणी सोसलेल्या कमालीचा छळ, गुरासारखा खाल्लेला मार, मरेस्तोवर केलेलं काम आणि दुसरीकडे युरोपातील पुढारलेल्या समाजातलं जीवन, आगीत भाजल्याच्या खाणाखुणा अंगावर वागवत, नवरा व मुलांकडून मिळणारं प्रेम, मानसिक आधार मिळालेली सुआद अफाट धाडस करून तिची कथा सगळ्या जगासमोर मांडते. तिच्यासारखा प्रसंग ओढावलेल्या मुलींना धीर देण्याचा प्रयत्न करते. तिच्या जीवनाचा, काळजाला घरं पाडणारा त्रासदायक प्रवास शब्दबद्ध करते. त्यामुळे तिचं पुस्तक म्हणजे ऑनर क्राइमच्या विरोधातील एक साक्षीदार ठरलं आहे. पॅलेस्टाइनसारख्या धार्मिक पगडा असलेल्या देशात संकुचित विचारांचा समाज असून महिलांवर प्रचंड बंधनं लादलेली आहेत. त्यामुळे त्यांना पशुतुल्य आयुष्य भोगावं लागतं. अशा वातावरणात एका छोट्याशा खेड्यात १९५७-५८ च्या सुमारास जन्मलेल्या सुआद या तरुण, सुंदर, मुस्लीम मुलीची ही विलक्षण कहाणी आहे. ऑनर किलिंगच्या प्रकाराचं उदाहरण म्हणून सुआद जॅकलिनबरोबर सर्वत्र फिरते. लोकांना माहिती देते. हे अत्याचार, या प्रथा बंद व्हाव्यात ही तिची इच्छा आहे. आपल्याला जिवंतपणी जाळणाऱ्यांना अद्याप आपण जिवंत असून आपल्या संसारात मुलांसह सुखात जगत असल्याचं दाखवण्याची तिची इच्छा आहे. पण, तसं झालं तर आपल्याला, आपल्या मुलांनाही धोका असल्याचं ती जाणून आहे. कारण ऑनर किलिंगमधून फार स्त्रिया वाचलेल्या नाहीत. अशा ‘चारमुटा’ मुलीनं मरून जावं असंच घरच्यांना वाटतं. ती मेली नाही तर तिच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेला लागलेला डाग पुसला जात नाही. या कुटुंबांना वाळीत टाकलं जातं. त्यांच्या नशिबी हलाखीचं, अपमानाचं जिणं येतं म्हणून या क्रूर प्रथा या देशात पाळल्या जातात. त्यामुळे सुआदच्या मनावरही भीतीचं सावट आहेच. तरीही हा धोका पत्करूनही तिनं लिहिलं, कारण ती अशा दुर्दैवी, क्रूर प्रथेची साक्षीदार आहे. या साऱ्याचं गांभीर्य जाणून, ‘मला हे सांगितलंच पाहिजे’ या भावनेतून तिनं लिहिलं आहे. तरीही मनात भीती आहेच. म्हणून स्वत:ची ओळख लपवून, नेमका पत्ता न देता, तिनं लिहिलं आहे, युरोपात कुठेतरी... ‘तरीही जिवंत मी!’ – मंगला गोखले ...Read more

  • Rating StarRahul Gotawale

    खरच वाचण्या सारख अस हे पुस्तक,पुस्तक वाचताना अंगावर अक्षरशः काटे येतात...

  • Rating StarDAINIK SAMANA 16-11-2014

    सुआद ही एक पॅलेस्टिनी तरुणी तिचं उभं जीवन म्हणजे महाकादंबरीच. महिलांच्या हक्कांची पायमल्ली कशी काय करण्यात येते त्याची थरारकथा यात चांगली चित्रीत केलीय. प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने वाचावं असे हे पुस्तक मूळ लेखिका सुआद आणि गौरी केळकर यांनी केलेला सहजुंदर अनुवाद. मेहता प्रकाशनने हाती घेतलेल्या अनुवाद प्रकल्पातील ही नोंद घेण्याजोगी आत्मकथा. जगातील कितीतरी देशांत महिलांचे मानवाधिकार कसे चिरडून टाकतात याचे ज्वलंत उदाहरणच यात आहे. पॅलेस्टिनी भागातील गाव. मुस्लिम कुटुंब आणि तरुणीची परवड. सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी भोगलेल्या यातनांचे यात प्रभावी चित्रण आहे. ३९ भाषांमध्ये अनुवादित ही सत्यकथा मराठीत आलीय. तरीही जिवंत मी! (आत्मकथा) ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.