* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MY JOURNEY TRANSFORMING DREAMS INTO ACTIONS
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788184985634
  • Edition : 4
  • Publishing Year : SEPTEMBER 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
  • Available in Combos :DR. A. P. J. ABDUL KALAM COMBO SET - 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MY JOURNEY: TRANSFORMING DREAMS INTO ACTIONS IS THE LIFE STORY OF INDIA`S ELEVENTH PRESIDENT, DR. A. P. J. ABDUL KALAM, WHO STARTED OFF AS AN INSIGNIFICANT LITTLE BOY RAMESWARAM, BUT ENDED UP BECOMING THE PRESIDENT OF THE COUNTRY, BESIDES BEING A BRILLIANT SCIENTIST AS WELL. THE BOOK PORTRAYS THE STRUGGLE THAT DR. KALAM HAD TO ENDURE, AS HE CLIMBED THE LADDER OF SUCCESS IN LIFE. HE SPEAKS AT LENGTH ABOUT EACH AND EVERY INDIVIDUAL WHO IMPACTED HIS LIFE, DURING HIS FORMATIVE YEARS AS A CHILD AND EVEN WHEN HE WAS A YOUNG ADULT. HE SPEAKS ABOUT THOSE WHO WERE THE CLOSEST TO HIM, SUCH AS HIS FATHER, WHO LOVED GOD DEEPLY. HE ALSO TALKS ABOUT HIS MOTHER AND HER KINDNESS. APART FROM HIS PARENTS, HE SPEAKS ABOUT HIS MENTORS, WHO MOLDED HIS THOUGHTS AND DIRECTED HIS ACTIONS. MY JOURNEY: TRANSFORMING DREAMS INTO ACTIONS IS A BOOK THAT OFFERS YOU MANY EMOTIONAL ACCOUNTS BY DR. KALAM, WHICH SPEAK OF HIS LIFE IN A SMALL TOWN BY THE BAY OF BENGAL. HE TELLS HIS READERS ABOUT THE MANY TIMES WHEN HE WOULD FEEL DEJECTED IN LIFE AND WAS ON THE VERGE OF GIVING UP. HE MENTIONS THAT HE GAINED STRENGTH IN THOSE TIMES FROM SPIRITUALITY AND CERTAIN BOOKS. ALL IN ALL, THE BOOK GIVES YOU VALUABLE AND FIRST-HAND INFORMATION ON LIFE ITSELF.
देशातील नामवंत शास्त्रज्ञ व ज्येष्ठ विचारवंत डॉ. कलाम यांच्या जीवनयात्रेतील स्फूर्तिदायी आठवणी... रामेश्वरमच्या सागरतीरावरील अल्लडवयीन मुलगा ते भारताच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होणारा बुद्धिमान शास्त्रज्ञ व थोर विचारवंत... या दरम्यानची डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जीवनयात्रा म्हणजे दृढनिश्चय, धाडस, चिकाटी आणि सर्वोत्कृष्टतेचा ध्यास यांचा विलक्षण मिलाफ आहे. या जीवनयात्रेदरम्यानच्या आठवणी, भेटलेली माणसं, ठळक प्रसंग त्यांनी या पुस्तकातून वाचकांसमोर उलगडले आहेत. त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणार्‍या व्यक्ती, त्यांचे जिवलग, मार्गदर्शक, गुरू या सगळ्यांबद्दल त्यांनी अतिशय प्रेमानं व आपुलकीनं लिहीलं आहे. आयुष्यात या स्थानावर पोहोचताना त्यांनी केलेला त्याग, संघर्ष आणि जिद्द यांच्या वाटचालीची कहाणी वाचताना वाचक भारावून जातो. ही विलक्षण जीवनयात्रा मार्गदर्शक, स्फूर्तिदायी आणि प्रेरक आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #INDOMITABLE SPIRIT#A.P. J.ABDULKALAM #ADAMYAJIDDA #SUPRIYA VAKIL #सुप्रियावकील #अदम्य जिद्द #MAZI JIVAN YATRA# MY JOURNEY TRANSFORMING DREAMS INTO ACTIONS #TURNING POINTS #अंजनी नरवणे #ANJANI NARAWANE"
Customer Reviews
  • Rating Starसुनील वळसे-दुबई

    मित्रहो, अपयश हा यशाचा पहिला मार्ग आहे हें आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलो आहोत. टॉम वॅटसन म्हणतात कि तुमचे प्रयत्न असफल होत असतील तर तुम्ही दुप्पट वेगाने प्रयत्न करा. प्रत्येक थोर व्यक्तींची कथा ही अपयशाचीही कथा असते. मग ह्या थोर लोकांचे वेगळेपण काय सते? ही माणसे प्रत्येक अपयशातून बोध घेऊन पुन्हा जोमाने उभी राहतात. माणसाला दोन गोष्टी हुशार बनवतात वाचलेली पुस्तके आणि भेटलेली माणसे. आज पहिल्याच पुष्पामध्ये मी परिचय करून देणार आहे माझ्या सगळ्यात आवडत्या पुस्तकाचे आणि ते म्हणजे डॉ.एपी जे अब्दुल कलाम यांनी लिहिलेले "माय जर्नी " या पुस्तकाविषयी. हे पुस्तक पहिले घेण्याचे कारण म्हणजे जेव्हा जेव्हा मी आयुष्यामध्ये नाउमेद झालो किंवा आपला ट्रॅक सुटतो आहे असे मला वाटायला लागले, त्यावेळी या पुस्तकाने मला नेहमी जगण्याची ऊर्जा आणि स्वप्न पाहण्याची ताकद दिली. आणि म्हणून हे पुस्तक मला नेहमी जीवनाचा साथीदार वाटते. लेखिका सुप्रिया वकील यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद खूप सुंदर भाषाशैलीमध्ये केलेला आहे. चला तर जाणून घेऊ, या पुस्तका विषयी. भारताचे अकरावे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे नाव अवघ्या जगाला सुपरिचित आहे. भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील आपल्या अतुल्य योगदानाद्वारे त्यांना जगाच्या क्षितिजावर नावारूपाला आणलं. “ माझी जीवन यात्रा “ हे एपीजे अब्दुल कलाम यांचे जीवन चरित्र आहे. डॉक्टर अबुल पाकिर जैनुलब्दीन कलाम यांचा जन्म तामिळनाडूतील रामेश्वर येथे झाला. मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये त्यांनी “एरोनॉटिकल इंजीनियरिंग” चा अभ्यास केला. भारताचा पहिला उपग्रह अंतराळात पाठवण्यासाठी चा प्रक्षेपक “SLV-3” तयार करण्यात त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली आणि त्या प्रक्षेपकाद्वारा १९८० मध्ये "रोहिणी" उपग्रह प्रक्षेपित केला. या त्यांच्या कामगिरीमुळे भारताचा "स्पेस क्लब" मध्ये प्रवेश झाला . त्यानंतर भारताची महत्वाची क्षेपणास्त्रे तयार करून ती कार्यान्वित करण्यात आली आणि १९९८ मध्ये भारतात अणू चाचण्या घडविण्यात ही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. देशातील अग्रणी शास्त्रज्ञ तसेच "टेक्नोलॉजी इन्फोर्मेशन आणि फॉरकास्टिंग अँड असेसमेंट कौन्सिल"चे अध्यक्ष म्हणून पाचशे तज्ञांच्या मदतीने टेक्नॉलॉजी विजन २०२०, तयार करून एक प्रगत राष्ट्र म्हणून भारतामध्ये बदल घडवून आणण्यात त्यांचा पुढाकार होता. १९८१ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने , १९९० मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. २५ जुलै २००२ रोजी डॉक्टर कलाम भारताचे राष्ट्रपती बनले, ते देशाचे अकरावे राष्ट्रपती होते. "माझी जीवन यात्रा" मध्ये अब्दुल कलाम यांनी त्यांच्या ऐंशी वर्षांच्या आयुष्यातील, अगदी बालपणापासून ते वयाचा ऐंशीच्या टप्पा पार करेपर्यंतच्या काळातील काही खास आठवणी जागवल्या आहेत. या सगळ्या प्रवासात अनुभवांचे हे सगळे खंड वेचताना मी एक महत्त्वाची गोष्ट शिकलो आणि ती म्हणजे प्रत्येकाने आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर स्वप्न उराशी बाळगली पाहिजेत आणि मग ती साकार करण्यासाठी कठोर मेहनत घेतली पाहिजे. असं केल्यास यश दूर नाही. अब्दुल कलाम सांगतात ही स्वप्न म्हणजे आपल्याला झोपेत पडतात ती नव्हेत ही स्वप्न अशी असली पाहिजेत जी आपल्याला झोपच येऊ देणार नाहीत. या पुस्तकात त्यांनी आयुष्यात आजवर न लिहिलेल्या छोट्या छोट्या फारशा परिचित नसलेल्या गोष्टी लिहिल्या आहेत. त्यांच्या आई वडिलांच्या आठवणी लिहिल्या आहेत. ते सांगतात, त्यांच्या आई वडिलांनी जी मूल्य व नीतिमत्तेची जाणीव रुजवली ती त्यांनी शेवटपर्यंत आत्मसात केली. एकदा अब्दुल कलाम यांचे स्नेही प्रोफेसर अरुण तिवारी यांनी त्यांना एक वेगळाच प्रश्न केला, कलाम साहेब तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रवास एका वाक्यात कसे सांगाल ? त्यांच्या या प्रश्नावर त्यांनी काही वेळ विचार केला आणि म्हणाले, माझ्या आयुष्याबद्दल म्हणता येईल की भरभरून प्रेम लाभले लहान मुल...... संघर्ष.... आणखी संघर्ष.... दुःखाचे कढत अश्रू ..... मग आनंदाश्रू ........ आणि अखेर सुंदर व सुफल आयुष्य ..... पूर्ण चंद्रबिंब उमटताना पहावं तसं..... ! या पुस्तकाचा शेवट करताना कलाम साहेब म्हणतात कठोर परिश्रम, निष्ठा, अभ्यास आणि ज्ञान उपासना अनुकंपा आणि क्षमाशीलता या गोष्टी माझ्या जीवनात पायाभूत आहेत. या वैशिष्ट्यांची कहाणी मी जगाला अगदी मुळापासून सांगितली आहे. खरंतर कोणाचेही आयुष्य इतरांना सांगणे म्हणजे विचार व भावना यांचा खजिना खुला करणं असतं, जीवन नामक आश्चर्याला हे विचार व भावना झळाळी देत असतात या प्रक्रियेमध्ये जर या गोष्टींनी माझ्या वाचकांना स्वप्नांना पंख दिले त्यांच्या मनात स्वप्नांचे स्फुल्लिंग चेतवले तर देवाने मला जे आयुष्य दिलं त्यातही माझी छोटीशी भूमिका मी बजावली असे मी समजेल. माझी खात्री आहे हे पुस्तक प्रत्येकाला त्यांची स्वप्न जाणून घेण्यास व ती साकार करण्यासाठी परिश्रम करण्यास भाग पाडेल, आणि हे स्वप्नच त्यांना जागृत ठेवतील. धन्यवाद .... ...Read more

  • Rating StarSachin

    This book was very that do our inspire

  • Rating StarNEWS PAPAR REVIEW

    सर्जनशील आणि चिंतनगर्भ दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या तीन पुस्तकांचा मराठी अनुवाद करण्याची संधी मिळाली. अनुवादाच्या निमित्ताने डॉ. कलाम यांचे उत्तुंग व्यक्तिमत्व समजून घेताना आलेले अनुभव विलक्षण आनंददायी आणि तितकेच प्रेरणादायी ोते... सन २००८ मध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचं Indomitable Spirit हे पुस्तक पुण्याच्या मेहता पब्लिशिंग हाऊस यांच्याकडून मराठी अनुवादासाठी माझ्याकडे आलं. डॉ. कलाम यांनी विविध प्रसंगी, विविध ठिकाणी केलेली भाषणे, संवाद, चर्चा यांचं हे संकलन वाचताना मी अतिशय भारावून गेले होते. रामेश्वराच्या सागरतीरापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या त्यांच्या प्रवासाचं लख्खं प्रतिबिंब असणाऱ्या या पुस्तकात त्यांच्या जीवनविषयक दृष्टिकोनाचे आणि चिंतनाचे सार आहे. या चिंतनशील विचारवंताच्या लेखणीतून उमटलेले शब्द मराठीत अनुवादित करणं हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचं असलं तरी त्यासोबत अर्थातच मोठी जबाबदारीही होती. विकसित भारताचे स्वप्न पाहणारा थोर द्रष्टा नेता, मूल्यप्रेमी, देशभक्त, सच्चा ज्ञानोपासक आणि कवीमनाचा शास्त्रज्ञ अशा अनेक रूपांत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम Indomitable Spirit या पुस्तकाच्या पानापानातून उलगडत गेले, भेटत गेले. त्यांचा साधेपणा, ऋजुता, त्याग, संघर्ष, जिद्द सारंच मनाला भिडत गेलं. त्यांच्या साध्या वाटणाऱ्या शब्दांच्या आशयघनतेमुळे आणि नेमकेपणामुळे अनुवादाचं काम अधिकच आव्हानात्मक होतं. त्यांच्या तळमळीच्या शब्दांना मी माझ्या कुवतीनुसार मराठीत आकार देत गेले आणि मराठी ‘अदम्य जिद्द’ तयार झालं. या पुस्तकाच्या आजवर सात आवृत्त्या झाल्या असून वाचकांचा या पुस्तकाला खूप चांगला प्रतिसाद लाभतो आहे. या पुस्तकासाठी वाचकांची बरीच पत्रे, फोन, मेसेज आले आहेत. अनेकजण प्रत्यक्ष भेटल्यावरही अभिप्राय देत असतात. अशावेळी त्यांचे भारावलेले शब्द ऐकले किंवा वाचले की डॉ. कलाम आणि मराठी वाचक यांच्यातील दुवा बनण्याचं भाग्य मला लाभलं आहे, याचा मला प्रत्येकवेळी नव्यानं आनंद होतो, अपार समाधान लाभतं. ‘अदम्य जिद्द’ नंतर २०१४ मध्ये त्यांचं ‘माय जर्नी’ हे दुसरं पुस्तक माझ्याकडं अनुवादासाठी आले. ‘अदम्य जिद्द’मुळं त्यांच्या लेखनशैली, विचारांशी आणि त्यांच्या कार्याशी परिचय घडलाच होता, त्यामुळे या अनुवादाला मी आनंदानं सुरुवात केली. सप्टेंबर २०१४ मध्ये ‘माझी जीवनयात्रा’, ‘स्वप्ने साकारताना’ या शिर्षकानं हे पुस्तक मराठीत आलं. डॉ. कलाम यांनी वयाच्या ऐंशीचा टप्पा पार करेपर्यंतच्या काळातील काही खास आठवणी या पुस्तकात जागवल्या आहेत. ‘या पुस्तकातील आठवणी माझ्या सर्व वाचकांना त्यांची स्वप्नं जाणून घेण्यास व ती साकार करण्यासाठी परिश्रम करण्यास भाग पाडतील. ही स्वप्नंच त्यांना जागृत ठेवतील’, असा त्यांना आशावाद होता. त्यांचं बालपण, तेव्हाची परिस्थिती, रामेश्वरम, सागराची गाज, आई-वडिलांची माया, बहिणीचं आणि तिच्या पतीचं निःस्वार्थी प्रेम, आईच्या हातचं साधंसं, पण अमृततुल्य भोजन, तिच्या हातची गुळगुळीत वाटलेली मऊ, मलईदार चटणी, चक्रीवादळाचं तडाखे, अभ्यासात रुंदावू लागलेल्या कक्षा, स्टार विद्यार्थी, आठव्या वर्षापासून सुरू झालेले कष्ट आणि त्यानंतर एकेक टप्पा पार करीत राष्ट्रपती पदापर्यंतची वाटचाल. हे सगळं वाचताना आपण भारावून नाही गेलो तरच नवल! ‘अदम्य जिद्द’मध्ये त्यांनी त्यांचे शिक्षक, स्फुर्तिदायीदायी व्यक्तित्वं याच बरोबर विकसित भारताची उभारणी, चिरंतन मूल्ये, सर्जनशीलता, सुजाण नागरिकत्व अशा अनेक विषयांना अभ्यासपूर्ण स्पर्श करत त्यांच्यातील रसिक कवीमनाचे आणि अत्यंत संवेदनशील मूल्यनिष्ठ व्यक्तीचे दर्शन घडवले आहे. त्यांच्या या तळमळीचा, उत्साहाचा आणि सकारात्मकतेचा आपल्यालाही स्पर्श घडतो. डॉ. कलाम ‘बोले तैसा चाले’ चे मूर्तिमंत उदाहरण आहेत, असं ही पुस्तकं वाचताना पानोपानी जाणवत राहतं. त्यांनी ‘माझी जीवनयात्रा’मध्ये म्हटलंय, ‘आपण जेव्हा अडथळ्यांवर मात करायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला आपल्यात दडून असलेलं धैर्य आणि लवचिकता लक्षात येते. तोवर कधीही आपल्याला आपल्यातलेच हे गुण कळलेले नसतात. ज्यावेळी आपल्याला अपयशाचा सामना करावा लागतो, त्याचवेळी आपल्यामध्ये हे गुण नेहमीच होते, हे लक्षात येतं. गरज असते ती फक्त हे गुण शोधण्याची आणि आयुष्यात पुढे वाटचाल करत राहण्याची!’ या दोन्ही पुस्तकात त्यांनी त्यांच्या यशापयशाची कहाणी, त्यातून शिकलेले धडे याबद्दल सांगताना विकसित भारताचं स्वप्नही रूजवलं आहे. अध्यात्म आणि विज्ञानाचा उत्तम मिलाफ घडवणारे चिंतनशील विचारवंत व शास्त्रज्ञ डॉ. कलाम या पुस्तकात म्हणतात ‘मी या सगळ्या गोष्टी का सांगतोय? माझा खूप वेगवेगळ्या विषयांशी व लोकांशी संबंध आला आहे. त्यामध्ये आयुष्याचा जवळपास प्रत्येक पैलू मी पाहिला आहे. हे मती गुंग करणारं आहे. कदाचित त्यामुळे हे सांगावं असं वाटत असेल की, मी या साऱ्यातून माझा रस्ता शोधला आहे आणि माझ्या या स्मरणयात्रेतून जर कुणा अशाच परिस्थितीतून जाणाऱ्या माणसांना जीवनातली लहरी वाटा-वळणं समजून घेण्यास मदत झाली, तर मला आपण फक्त स्वत:साठी जगलो असं न वाटता इतर असंख्य लोकांसाठी जगलो असं वाटेल.’ ‘माझी जीवनयात्रा’चा समारोप करताना त्यांनी म्हटलं आहे, ‘जर या गोष्टींनी माझ्या वाचकांच्या स्वप्नांना पंख दिले. त्यांच्या मनात स्वप्नांचे स्फल्लिंग चेतवले तर दैवाने मला जे आयुष्य दिलंय त्यामधली माझी छोटीशी भूमिका मी बजावली असं मी समजेन’ किती साधं, निगर्वी व्यक्तिमत्त्व आणि सर्वांनाच विचारप्रवृत्त करणारे व आदर्शवत असे अनमोल विचारधन! कलामसाहेब, तुमच्या कार्यातून, तुमच्या शब्दातून आणि विचारातून तुम्ही आमच्या मनात स्वप्ने, आदर्श आणि मूल्ये रूजवली आहेत. या साऱ्यातून तुम्ही सदैव आमच्यासोबत राहात असा मला विश्वास आहे. कलाम साहेब, सलाम!!! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more