* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MY JOURNEY TRANSFORMING DREAMS INTO ACTIONS
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788184985634
  • Edition : 5
  • Publishing Year : SEPTEMBER 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
  • Available in Combos :DR. A. P. J. ABDUL KALAM COMBO SET - 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MY JOURNEY: TRANSFORMING DREAMS INTO ACTIONS IS THE LIFE STORY OF INDIA`S ELEVENTH PRESIDENT, DR. A. P. J. ABDUL KALAM, WHO STARTED OFF AS AN INSIGNIFICANT LITTLE BOY RAMESWARAM, BUT ENDED UP BECOMING THE PRESIDENT OF THE COUNTRY, BESIDES BEING A BRILLIANT SCIENTIST AS WELL. THE BOOK PORTRAYS THE STRUGGLE THAT DR. KALAM HAD TO ENDURE, AS HE CLIMBED THE LADDER OF SUCCESS IN LIFE. HE SPEAKS AT LENGTH ABOUT EACH AND EVERY INDIVIDUAL WHO IMPACTED HIS LIFE, DURING HIS FORMATIVE YEARS AS A CHILD AND EVEN WHEN HE WAS A YOUNG ADULT. HE SPEAKS ABOUT THOSE WHO WERE THE CLOSEST TO HIM, SUCH AS HIS FATHER, WHO LOVED GOD DEEPLY. HE ALSO TALKS ABOUT HIS MOTHER AND HER KINDNESS. APART FROM HIS PARENTS, HE SPEAKS ABOUT HIS MENTORS, WHO MOLDED HIS THOUGHTS AND DIRECTED HIS ACTIONS. MY JOURNEY: TRANSFORMING DREAMS INTO ACTIONS IS A BOOK THAT OFFERS YOU MANY EMOTIONAL ACCOUNTS BY DR. KALAM, WHICH SPEAK OF HIS LIFE IN A SMALL TOWN BY THE BAY OF BENGAL. HE TELLS HIS READERS ABOUT THE MANY TIMES WHEN HE WOULD FEEL DEJECTED IN LIFE AND WAS ON THE VERGE OF GIVING UP. HE MENTIONS THAT HE GAINED STRENGTH IN THOSE TIMES FROM SPIRITUALITY AND CERTAIN BOOKS. ALL IN ALL, THE BOOK GIVES YOU VALUABLE AND FIRST-HAND INFORMATION ON LIFE ITSELF.
देशातील नामवंत शास्त्रज्ञ व ज्येष्ठ विचारवंत डॉ. कलाम यांच्या जीवनयात्रेतील स्फूर्तिदायी आठवणी... रामेश्वरमच्या सागरतीरावरील अल्लडवयीन मुलगा ते भारताच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होणारा बुद्धिमान शास्त्रज्ञ व थोर विचारवंत... या दरम्यानची डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जीवनयात्रा म्हणजे दृढनिश्चय, धाडस, चिकाटी आणि सर्वोत्कृष्टतेचा ध्यास यांचा विलक्षण मिलाफ आहे. या जीवनयात्रेदरम्यानच्या आठवणी, भेटलेली माणसं, ठळक प्रसंग त्यांनी या पुस्तकातून वाचकांसमोर उलगडले आहेत. त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणार्‍या व्यक्ती, त्यांचे जिवलग, मार्गदर्शक, गुरू या सगळ्यांबद्दल त्यांनी अतिशय प्रेमानं व आपुलकीनं लिहीलं आहे. आयुष्यात या स्थानावर पोहोचताना त्यांनी केलेला त्याग, संघर्ष आणि जिद्द यांच्या वाटचालीची कहाणी वाचताना वाचक भारावून जातो. ही विलक्षण जीवनयात्रा मार्गदर्शक, स्फूर्तिदायी आणि प्रेरक आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #INDOMITABLE SPIRIT#A.P. J.ABDULKALAM #ADAMYAJIDDA #SUPRIYA VAKIL #सुप्रियावकील #अदम्य जिद्द #MAZI JIVAN YATRA# MY JOURNEY TRANSFORMING DREAMS INTO ACTIONS #TURNING POINTS #अंजनी नरवणे #ANJANI NARAWANE"
Customer Reviews
  • Rating Starसुनील वळसे-दुबई

    मित्रहो, अपयश हा यशाचा पहिला मार्ग आहे हें आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलो आहोत. टॉम वॅटसन म्हणतात कि तुमचे प्रयत्न असफल होत असतील तर तुम्ही दुप्पट वेगाने प्रयत्न करा. प्रत्येक थोर व्यक्तींची कथा ही अपयशाचीही कथा असते. मग ह्या थोर लोकांचे वेगळेपण काय सते? ही माणसे प्रत्येक अपयशातून बोध घेऊन पुन्हा जोमाने उभी राहतात. माणसाला दोन गोष्टी हुशार बनवतात वाचलेली पुस्तके आणि भेटलेली माणसे. आज पहिल्याच पुष्पामध्ये मी परिचय करून देणार आहे माझ्या सगळ्यात आवडत्या पुस्तकाचे आणि ते म्हणजे डॉ.एपी जे अब्दुल कलाम यांनी लिहिलेले "माय जर्नी " या पुस्तकाविषयी. हे पुस्तक पहिले घेण्याचे कारण म्हणजे जेव्हा जेव्हा मी आयुष्यामध्ये नाउमेद झालो किंवा आपला ट्रॅक सुटतो आहे असे मला वाटायला लागले, त्यावेळी या पुस्तकाने मला नेहमी जगण्याची ऊर्जा आणि स्वप्न पाहण्याची ताकद दिली. आणि म्हणून हे पुस्तक मला नेहमी जीवनाचा साथीदार वाटते. लेखिका सुप्रिया वकील यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद खूप सुंदर भाषाशैलीमध्ये केलेला आहे. चला तर जाणून घेऊ, या पुस्तका विषयी. भारताचे अकरावे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे नाव अवघ्या जगाला सुपरिचित आहे. भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील आपल्या अतुल्य योगदानाद्वारे त्यांना जगाच्या क्षितिजावर नावारूपाला आणलं. “ माझी जीवन यात्रा “ हे एपीजे अब्दुल कलाम यांचे जीवन चरित्र आहे. डॉक्टर अबुल पाकिर जैनुलब्दीन कलाम यांचा जन्म तामिळनाडूतील रामेश्वर येथे झाला. मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये त्यांनी “एरोनॉटिकल इंजीनियरिंग” चा अभ्यास केला. भारताचा पहिला उपग्रह अंतराळात पाठवण्यासाठी चा प्रक्षेपक “SLV-3” तयार करण्यात त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली आणि त्या प्रक्षेपकाद्वारा १९८० मध्ये "रोहिणी" उपग्रह प्रक्षेपित केला. या त्यांच्या कामगिरीमुळे भारताचा "स्पेस क्लब" मध्ये प्रवेश झाला . त्यानंतर भारताची महत्वाची क्षेपणास्त्रे तयार करून ती कार्यान्वित करण्यात आली आणि १९९८ मध्ये भारतात अणू चाचण्या घडविण्यात ही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. देशातील अग्रणी शास्त्रज्ञ तसेच "टेक्नोलॉजी इन्फोर्मेशन आणि फॉरकास्टिंग अँड असेसमेंट कौन्सिल"चे अध्यक्ष म्हणून पाचशे तज्ञांच्या मदतीने टेक्नॉलॉजी विजन २०२०, तयार करून एक प्रगत राष्ट्र म्हणून भारतामध्ये बदल घडवून आणण्यात त्यांचा पुढाकार होता. १९८१ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने , १९९० मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. २५ जुलै २००२ रोजी डॉक्टर कलाम भारताचे राष्ट्रपती बनले, ते देशाचे अकरावे राष्ट्रपती होते. "माझी जीवन यात्रा" मध्ये अब्दुल कलाम यांनी त्यांच्या ऐंशी वर्षांच्या आयुष्यातील, अगदी बालपणापासून ते वयाचा ऐंशीच्या टप्पा पार करेपर्यंतच्या काळातील काही खास आठवणी जागवल्या आहेत. या सगळ्या प्रवासात अनुभवांचे हे सगळे खंड वेचताना मी एक महत्त्वाची गोष्ट शिकलो आणि ती म्हणजे प्रत्येकाने आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर स्वप्न उराशी बाळगली पाहिजेत आणि मग ती साकार करण्यासाठी कठोर मेहनत घेतली पाहिजे. असं केल्यास यश दूर नाही. अब्दुल कलाम सांगतात ही स्वप्न म्हणजे आपल्याला झोपेत पडतात ती नव्हेत ही स्वप्न अशी असली पाहिजेत जी आपल्याला झोपच येऊ देणार नाहीत. या पुस्तकात त्यांनी आयुष्यात आजवर न लिहिलेल्या छोट्या छोट्या फारशा परिचित नसलेल्या गोष्टी लिहिल्या आहेत. त्यांच्या आई वडिलांच्या आठवणी लिहिल्या आहेत. ते सांगतात, त्यांच्या आई वडिलांनी जी मूल्य व नीतिमत्तेची जाणीव रुजवली ती त्यांनी शेवटपर्यंत आत्मसात केली. एकदा अब्दुल कलाम यांचे स्नेही प्रोफेसर अरुण तिवारी यांनी त्यांना एक वेगळाच प्रश्न केला, कलाम साहेब तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रवास एका वाक्यात कसे सांगाल ? त्यांच्या या प्रश्नावर त्यांनी काही वेळ विचार केला आणि म्हणाले, माझ्या आयुष्याबद्दल म्हणता येईल की भरभरून प्रेम लाभले लहान मुल...... संघर्ष.... आणखी संघर्ष.... दुःखाचे कढत अश्रू ..... मग आनंदाश्रू ........ आणि अखेर सुंदर व सुफल आयुष्य ..... पूर्ण चंद्रबिंब उमटताना पहावं तसं..... ! या पुस्तकाचा शेवट करताना कलाम साहेब म्हणतात कठोर परिश्रम, निष्ठा, अभ्यास आणि ज्ञान उपासना अनुकंपा आणि क्षमाशीलता या गोष्टी माझ्या जीवनात पायाभूत आहेत. या वैशिष्ट्यांची कहाणी मी जगाला अगदी मुळापासून सांगितली आहे. खरंतर कोणाचेही आयुष्य इतरांना सांगणे म्हणजे विचार व भावना यांचा खजिना खुला करणं असतं, जीवन नामक आश्चर्याला हे विचार व भावना झळाळी देत असतात या प्रक्रियेमध्ये जर या गोष्टींनी माझ्या वाचकांना स्वप्नांना पंख दिले त्यांच्या मनात स्वप्नांचे स्फुल्लिंग चेतवले तर देवाने मला जे आयुष्य दिलं त्यातही माझी छोटीशी भूमिका मी बजावली असे मी समजेल. माझी खात्री आहे हे पुस्तक प्रत्येकाला त्यांची स्वप्न जाणून घेण्यास व ती साकार करण्यासाठी परिश्रम करण्यास भाग पाडेल, आणि हे स्वप्नच त्यांना जागृत ठेवतील. धन्यवाद .... ...Read more

  • Rating StarSachin

    This book was very that do our inspire

  • Rating StarNEWS PAPAR REVIEW

    सर्जनशील आणि चिंतनगर्भ दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या तीन पुस्तकांचा मराठी अनुवाद करण्याची संधी मिळाली. अनुवादाच्या निमित्ताने डॉ. कलाम यांचे उत्तुंग व्यक्तिमत्व समजून घेताना आलेले अनुभव विलक्षण आनंददायी आणि तितकेच प्रेरणादायी ोते... सन २००८ मध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचं Indomitable Spirit हे पुस्तक पुण्याच्या मेहता पब्लिशिंग हाऊस यांच्याकडून मराठी अनुवादासाठी माझ्याकडे आलं. डॉ. कलाम यांनी विविध प्रसंगी, विविध ठिकाणी केलेली भाषणे, संवाद, चर्चा यांचं हे संकलन वाचताना मी अतिशय भारावून गेले होते. रामेश्वराच्या सागरतीरापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या त्यांच्या प्रवासाचं लख्खं प्रतिबिंब असणाऱ्या या पुस्तकात त्यांच्या जीवनविषयक दृष्टिकोनाचे आणि चिंतनाचे सार आहे. या चिंतनशील विचारवंताच्या लेखणीतून उमटलेले शब्द मराठीत अनुवादित करणं हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचं असलं तरी त्यासोबत अर्थातच मोठी जबाबदारीही होती. विकसित भारताचे स्वप्न पाहणारा थोर द्रष्टा नेता, मूल्यप्रेमी, देशभक्त, सच्चा ज्ञानोपासक आणि कवीमनाचा शास्त्रज्ञ अशा अनेक रूपांत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम Indomitable Spirit या पुस्तकाच्या पानापानातून उलगडत गेले, भेटत गेले. त्यांचा साधेपणा, ऋजुता, त्याग, संघर्ष, जिद्द सारंच मनाला भिडत गेलं. त्यांच्या साध्या वाटणाऱ्या शब्दांच्या आशयघनतेमुळे आणि नेमकेपणामुळे अनुवादाचं काम अधिकच आव्हानात्मक होतं. त्यांच्या तळमळीच्या शब्दांना मी माझ्या कुवतीनुसार मराठीत आकार देत गेले आणि मराठी ‘अदम्य जिद्द’ तयार झालं. या पुस्तकाच्या आजवर सात आवृत्त्या झाल्या असून वाचकांचा या पुस्तकाला खूप चांगला प्रतिसाद लाभतो आहे. या पुस्तकासाठी वाचकांची बरीच पत्रे, फोन, मेसेज आले आहेत. अनेकजण प्रत्यक्ष भेटल्यावरही अभिप्राय देत असतात. अशावेळी त्यांचे भारावलेले शब्द ऐकले किंवा वाचले की डॉ. कलाम आणि मराठी वाचक यांच्यातील दुवा बनण्याचं भाग्य मला लाभलं आहे, याचा मला प्रत्येकवेळी नव्यानं आनंद होतो, अपार समाधान लाभतं. ‘अदम्य जिद्द’ नंतर २०१४ मध्ये त्यांचं ‘माय जर्नी’ हे दुसरं पुस्तक माझ्याकडं अनुवादासाठी आले. ‘अदम्य जिद्द’मुळं त्यांच्या लेखनशैली, विचारांशी आणि त्यांच्या कार्याशी परिचय घडलाच होता, त्यामुळे या अनुवादाला मी आनंदानं सुरुवात केली. सप्टेंबर २०१४ मध्ये ‘माझी जीवनयात्रा’, ‘स्वप्ने साकारताना’ या शिर्षकानं हे पुस्तक मराठीत आलं. डॉ. कलाम यांनी वयाच्या ऐंशीचा टप्पा पार करेपर्यंतच्या काळातील काही खास आठवणी या पुस्तकात जागवल्या आहेत. ‘या पुस्तकातील आठवणी माझ्या सर्व वाचकांना त्यांची स्वप्नं जाणून घेण्यास व ती साकार करण्यासाठी परिश्रम करण्यास भाग पाडतील. ही स्वप्नंच त्यांना जागृत ठेवतील’, असा त्यांना आशावाद होता. त्यांचं बालपण, तेव्हाची परिस्थिती, रामेश्वरम, सागराची गाज, आई-वडिलांची माया, बहिणीचं आणि तिच्या पतीचं निःस्वार्थी प्रेम, आईच्या हातचं साधंसं, पण अमृततुल्य भोजन, तिच्या हातची गुळगुळीत वाटलेली मऊ, मलईदार चटणी, चक्रीवादळाचं तडाखे, अभ्यासात रुंदावू लागलेल्या कक्षा, स्टार विद्यार्थी, आठव्या वर्षापासून सुरू झालेले कष्ट आणि त्यानंतर एकेक टप्पा पार करीत राष्ट्रपती पदापर्यंतची वाटचाल. हे सगळं वाचताना आपण भारावून नाही गेलो तरच नवल! ‘अदम्य जिद्द’मध्ये त्यांनी त्यांचे शिक्षक, स्फुर्तिदायीदायी व्यक्तित्वं याच बरोबर विकसित भारताची उभारणी, चिरंतन मूल्ये, सर्जनशीलता, सुजाण नागरिकत्व अशा अनेक विषयांना अभ्यासपूर्ण स्पर्श करत त्यांच्यातील रसिक कवीमनाचे आणि अत्यंत संवेदनशील मूल्यनिष्ठ व्यक्तीचे दर्शन घडवले आहे. त्यांच्या या तळमळीचा, उत्साहाचा आणि सकारात्मकतेचा आपल्यालाही स्पर्श घडतो. डॉ. कलाम ‘बोले तैसा चाले’ चे मूर्तिमंत उदाहरण आहेत, असं ही पुस्तकं वाचताना पानोपानी जाणवत राहतं. त्यांनी ‘माझी जीवनयात्रा’मध्ये म्हटलंय, ‘आपण जेव्हा अडथळ्यांवर मात करायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला आपल्यात दडून असलेलं धैर्य आणि लवचिकता लक्षात येते. तोवर कधीही आपल्याला आपल्यातलेच हे गुण कळलेले नसतात. ज्यावेळी आपल्याला अपयशाचा सामना करावा लागतो, त्याचवेळी आपल्यामध्ये हे गुण नेहमीच होते, हे लक्षात येतं. गरज असते ती फक्त हे गुण शोधण्याची आणि आयुष्यात पुढे वाटचाल करत राहण्याची!’ या दोन्ही पुस्तकात त्यांनी त्यांच्या यशापयशाची कहाणी, त्यातून शिकलेले धडे याबद्दल सांगताना विकसित भारताचं स्वप्नही रूजवलं आहे. अध्यात्म आणि विज्ञानाचा उत्तम मिलाफ घडवणारे चिंतनशील विचारवंत व शास्त्रज्ञ डॉ. कलाम या पुस्तकात म्हणतात ‘मी या सगळ्या गोष्टी का सांगतोय? माझा खूप वेगवेगळ्या विषयांशी व लोकांशी संबंध आला आहे. त्यामध्ये आयुष्याचा जवळपास प्रत्येक पैलू मी पाहिला आहे. हे मती गुंग करणारं आहे. कदाचित त्यामुळे हे सांगावं असं वाटत असेल की, मी या साऱ्यातून माझा रस्ता शोधला आहे आणि माझ्या या स्मरणयात्रेतून जर कुणा अशाच परिस्थितीतून जाणाऱ्या माणसांना जीवनातली लहरी वाटा-वळणं समजून घेण्यास मदत झाली, तर मला आपण फक्त स्वत:साठी जगलो असं न वाटता इतर असंख्य लोकांसाठी जगलो असं वाटेल.’ ‘माझी जीवनयात्रा’चा समारोप करताना त्यांनी म्हटलं आहे, ‘जर या गोष्टींनी माझ्या वाचकांच्या स्वप्नांना पंख दिले. त्यांच्या मनात स्वप्नांचे स्फल्लिंग चेतवले तर दैवाने मला जे आयुष्य दिलंय त्यामधली माझी छोटीशी भूमिका मी बजावली असं मी समजेन’ किती साधं, निगर्वी व्यक्तिमत्त्व आणि सर्वांनाच विचारप्रवृत्त करणारे व आदर्शवत असे अनमोल विचारधन! कलामसाहेब, तुमच्या कार्यातून, तुमच्या शब्दातून आणि विचारातून तुम्ही आमच्या मनात स्वप्ने, आदर्श आणि मूल्ये रूजवली आहेत. या साऱ्यातून तुम्ही सदैव आमच्यासोबत राहात असा मला विश्वास आहे. कलाम साहेब, सलाम!!! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more