SUPRIYA VAKIL

About Author

Birth Date : 12/04/1969


SUPRIYA VAKIL HAILS FROM KOLHAPUR, HOLDS DEGREES IN CIVIL ENGINEERING AND JOURNALISM AND MASS COMMUNICATION. SHE IS ACTIVELY INVOLVED IN THE THREE MEDIUMS OF RADIO, TELEVISION AND LITERATURE. SHE IS CURRENTLY WORKING IN THE FIELD OF INDEPENDENT WRITING AND TRANSLATION. SHE HAS WORKED AS A NEWS CORRESPONDENT FOR A LOCAL TELEVISION CHANNEL IN KOLHAPUR FOR 13 YEARS AND IS AN ACCLAIMED POETESS OF ALL INDIA RADIO. SHE IS ACTIVELY INVOLVED IN VARIOUS LITERARY AND CULTURAL ACTIVITIES. MAIFAL AND UTSAV ARE HER COLLECTIONS OF POETRY AND POPCORN IS HER COLLECTION OF PROSE. HIS MARATHI TRANSLATION OF ENGLISH LITERARY WORKS BY INDIAN AND FOREIGN AUTHORS HAVE BEEN PUBLISHED. (INCLUDING LITERATURE BY HILLARY CLINTON, ARUN SHOURIE, JRD TATA, DR. APJ ABDUL KALAM, KIRAN BEDI, KHUSHWANT SINGH, TASLIMA NASREEN, CHETAN BHAGAT, ETC.) SHE HAS RECEIVED GOVERNMENT OF MAHARASHTRA BEST LITERARY AWARD, SWAMI KAR RANJIT DESAI BEST TRANSLATION AWARD, APTE READING MANDIR, ICHALKARANJIS BEST TRANSLATED LITERARY AWARD, TUKA MHANE AWARD, ASHIRWAD AWARD, SPECIAL AWARD FROM DAKSHIN MAHARASHTRA SAHITYA PARISHAD. SHE HAS BEEN HONORED WITH MANY AWARDS LIKE YUVA GAURAV PURASKAR, PATRAKAR PURASKAR AND MUKTAI PRAKASHAN (KOLHAPUR) SAI SAMRADNNI PURASKAR 2018.

कोल्हापूर येथे वास्तव्य असलेल्या सुप्रिया वकील यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग व वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका प्राप्त केल्या आहेत. आकाशवाणी, दूरचित्रवाणी व साहित्य या तिन्ही माध्यमांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. सध्या त्या स्वतंत्र लेखन व अनुवाद या क्षेत्रांत कार्यरत आहेत.कोल्हापुरातील स्थानिक दूरचित्रवाहिनीवर वृत्तनिवेदिक म्हणून १३ वर्षे काम केले तसेच त्या आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कवयित्री आहेत. विविध साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. मैफल व उत्सव हे काव्यसंग्रह आणि पॉपकॉर्न या ललितगद्य संग्रहासह त्यांचे भारतीय व परदेशी लेखकांच्या इंग्रजी साहित्यकृतींचे मराठी अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत. (ज्यामध्ये हिलरी क्लिंटन, अरुण शौरी, जेआरडी टाटा, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, किरण बेदी, खुशवंतसिंग, तसलिमा नसरीन, चेतन भगत इत्यादी मान्यवरांच्या साहित्याचा समावेश आहे.)महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मिती पुरस्कार, स्वामी कार रणजित देसाई उत्कृष्ट अनुवाद पुरस्कार, आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी यांचा उत्कृष्ट अनुवादित साहित्यकृती पुरस्कार, तुका म्हणे पुरस्कार, आशीर्वाद पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषद यांचा विशेष पुरस्कार. युवा गौरव पुरस्कार, पत्रकार पुरस्कार व मुक्ताई प्रकाशनातर्फे (कोल्हापूर) सई सम्राज्ञी पुरस्कार 2018 अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मान प्राप्त झाला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 50 total
25 %
OFF
12TH APRIL SUPRIYA VAKIL BIRTHDAY OFFER Rating Star
Add To Cart INR 740 INR 555
ADAMYA JIDDA Rating Star
Add To Cart INR 330
ANUP Rating Star
Add To Cart INR 250
ASAMANYA YASHPRAPTISATHI DAHA SAMANY... Rating Star
Add To Cart INR 120
BE THE CHANGE BHRASHTACHARASHI LADHA Rating Star
Add To Cart INR 250
25 %
OFF
CHETAN BHAGAT COMBO SET- 3 BOOKS Rating Star
Add To Cart INR 900 INR 675
CHICKEN SOUP FOR THE FATHERS SOUL PART 1 Rating Star
Add To Cart INR 150
CHICKEN SOUP FOR THE FATHERS SOUL PART 2 Rating Star
Add To Cart INR 150
CHICKEN SOUP FOR THE MOTHERS SOUL Rating Star
Add To Cart INR 200
CHICKEN SOUP FOR THE TEENAGE SOUL Rating Star
Add To Cart INR 195
CURED Rating Star
Add To Cart INR 595
CUTTING FREE Rating Star
Add To Cart INR 500
12345

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more