* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: RACING WITH DEATH : DOUGLAS MAWSON - ANTARCTIC EXPLORER
  • Availability : Available
  • Translators : PRASADDATTA GADGIL
  • ISBN : 9788184985146
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 204
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IN RACING WITH DEATH, BEAU RIFFENBURGH REDISOVERS THE ALMOST FORGOTTEN STORY OF MAWSON - WITH SHACKLETON AND SCOTT, ONE OF THE THREE `GREATS` OF ANTARCTIC EXPLORATION. IT IS A BREATHTAKING STORY OF RAW COURAGE AND ESCAPE FROM THE VERY JAWS OF DEATH
ही कथा आहे, सर डग्लस मॉसन यांच्या अन्टार्टिक खंडावरच्या साहसी मोहिमांची... त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी अनुभवलेल्या थरारांची... आणि मृत्यूच्या कराल दाढेतून जिवलगांची जिद्दीने केलेल्या सुटकेची... ही कथा आहे, मानवी स्वभावातील कंगो-यांची... राज्यविस्तारासाठीच्या संघर्षाची... आणि पृथ्वीवरचे जैववैविध्य राखण्यासाठी झटणा-यांची... ही कथा आहे, अथक मानवी प्रयत्नांची... ज्ञानलालसेची... आणि कल्पनेपलीकडे असलेल्या निसर्गाच्या विलोभनीय; पण अकराळ रूपाची; त्याच्या दर्शनाची; त्याच्या साक्षात्काराची!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MRUTYUSHISHARYAT #RACINGWITHDEATH:DOUGLASMAWSON-ANTARCTICEXPLORER #मृत्यायुषी #MEMOIR #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #PRASADDATTAGADGIL #BEAU RIFFENBURGH "
Customer Reviews
  • Rating Starसर्वांचे आभार

    एका अद्वितीय माणसाने आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आखलेल्या साहसमोहिमा, त्यामधे आलेल्या अनंत अडचणी, अडथळे, संकटं यांचं वर्णन या पुस्तकात आहे. या साहसमोहिमा ध्रुवीय प्रदेशातल्या होत्या. मुळात तो एक भूगर्भशास्सत्रज्ञ होता , युनिव्हर्सिटीत कामकरत होता. पण त्याच्या आतला साहसी बाणा दुष्कर , दुर्गम स्थानांवर जाण्यास बाध्य करत होता. याचं नाव “डग्लस मॅासन”. धाडस, साहस, महत्त्वाकांक्षा, विजीगीषू वृत्ती, परििस्थतीला शरण न जाणे, परिस्थितीचे भान ठेवणे, भविष्याचा अंदाज घेणे, कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढणे या आणि अशा असंख्य गुणांचे प्रदर्शन त्याने मोहिमेच्या वेगवेगळ्या वेळी केले. तो जागतिक वैज्ञानिक समाजात, जनतेमधे आणि अॅास्ट्रेलियन वीरांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय होता. “अन्टार्क्टिक विज्ञानातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती “ म्हणून त्याची ओळख आहे. मॅासन ची पहिली मोहिम होती १९०७-०९ ची ब्रिटिश अॅन्टार्क्टिक एक्सपिडिशन. यामधे तो इतिहासातील सर्वांत मोठ्या आणि कठीण स्लेजिंग प्रवासाचा लीडर होता. या मोहिमेत शॅकलटन आणि वाईल्ड यांच्या भूमिका महत्त्वाच्या असल्या तरी मॅासनचे गुरू प्रो.डेव्हिस यांनी मॅासनच्या कामाबद्दल त्याचे जाहीर कौतुक केले. या मोहिमेत त्यांनी दक्षिण ध्रुव जवळजवळ सर केला आणि आपल्या खुणा मागे ठेवल्या. या मोहिमेतच दुसऱ्या मोहिमेच्या आखणीची पायाभरणी झाली होती. पहिल्या मोहिमेत “निमरॅाड” बोट वापरली गेली होती. ॲास्ट्रेलियाच्या दक्षिणेला असलेलली अन्टार्क्टिका किनारपट्टी त्याला खुणावत होती.खूप धडपडीनंतर १९११-१४ मधे “””अॅास्ट्रेलेशियन अन्टार्क्टिक एक्सपिडिशन “””या नावाची मोहिम आखली गेली. आता “ॲारोरा “नावाची बोट या मोहिमेसाठी मिळवण्यात आली. बर्फाळ प्रदेशातील मोहिमांसाठी प्रत्येक छोट्या , बारीक, लहानसहान गोष्टींचा विचार केला जातो. योग्य , सशक्त, धाडसी विविध टॅलेन्ट्स असलेल्या लोकांची टीम तयार करणे , पैशाची तजवीज करणे , परवानग्या मिळवणे , वैज्ञानिक साहित्य मिळवणे, शिधा जमवणे आणि असंच खूप काही यामधे त्याची दमछाक झाली तरी उत्साह कमी झाला नव्हता. तो त्याच्या विचारांमधे क्लीअर होता. त्याच्या सहकारयांशी त्याचे भावबंध चांगले होते. नाहीतर सर्वदूर बर्फ , वादळ वारे , जिवंत राहण्याची आव्हाने अशा कठीण परिस्थितीत ते मॅासनचं नेतेपण झुगारू शकले असते. ही मोहिम कठीण ,,खूप जणांना परलोकी पोहोचवणारी व राहिलेल्यांचा पुनर्जन्म करणारी हेाती. मोहिमेच्या मध्यावर निन्निस आणि मर्ट्झ या त्याच्या जीवाभावाच्या मित्रांना तो अंतरला. ज्या हिवाळी तळावर त्यांनी अतिशय शांत जागा समजून तळ ठोकला होता तीच जागा सर्वाधिक वेगाने वाहणारया वारयाची निघाली. त्याचा त्यांना पूर्ण मोहिमेभर त्रास झाला. चुकीला क्षमा च नाही आहे या वातावरणात . त्यांचा प्रवास, घळींचे प्रदेश, सामान किंवा अन्न मधेच सोडून देणे, केबिन बर्फात लपून जाणे ,कुत्र्यांच्या समस्या ,जगण्यासाठी त्यांना ही खावे लागणे , ते खाल्ल्यामुळे तब्येतीला झालेला त्रास हे सगळं आपला वाचताना पुतळा होतो आपला! तसंच कळतं की आंघोळ करायला मिळणे, दोन वेळचं खायला मिळणं , घराबाहेर पडता येणं या किती सुखाच्या क्रिया आहेत. या सर्वाला तोंड देताना त्यांनी मनोधैर्य कसं टिकवून ठेवलं असेल??? धन्य ते लोक. !!! युनियन जॅक फडकवत देशभक्ती ही दाखवत होते. त्याची तिसरी मोहिम होती,१९२९-३१ ची ब्रिटिश, अॅास्ट्रेलियन,न्यूझीलंड अन्टार्क्टिक रिसर्च एक्सपिडिशन . या मोहिमेसाठी डिस्कव्हरी नावाची बोट वापरण्यात आली. या मोहिमेच्या शेवटी “अॅास्ट्रेलियन अन्टार्क्टिक टेरिटेरी “ अस्तित्वात आली. अशा रीतीने अन्टार्क्टिकाच्या महाकाय भूप्रदेशावर अॅास्ट्रेलियाचे अधिपत्य स्थापित झाले; ज्याचे स्वप्न प्रथम पाहणारयांमधे होता मॅासन डग्लस. त्याच्या नावे एक स्टेशन उभारण्यात आले जे अजून कार्यरत आहे. कधीही त्याने हार मानली नाही ,अविरत प्रयत्न करत आशेला जिवंत ठेवले. शब्द थिटे आहेत त्याच्या खंबीर मानसिक शक्तीपुढे!!!!! मृत्यूशी शर्यत त्याची १४ अॅाक्टोबर १९५८ पर्यंत सुरू होती. अशा व्यक्तिमत्त्वाला अभिवादन!! ...Read more

  • Rating StarMASIK LOKPRABHA 26-6-2015

    अ‍ॅन्टाक्र्टिक मोहिमांचा थरार अ‍ॅन्टाक्र्टिक मोहिमांची सुरुवात झाली ती मुख्यत: अज्ञाताचा शोध घेण्याच्या साहसी वृत्तीतून. पण त्याला वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड असल्यामुळे त्या केवळ साहसी मोहिम नव्हत्या. तेथील प्रतिकूल वातावरणामुळे तेथे जाणाऱ्या, राहणा्या सर्वांनाच साहसाचा थरार अनुभवायला लागत असे. अशाच थरारक वैज्ञानिक मोहिमांचा नेता असणारा डग्लस मॉसनचे नाव आजही अ‍ॅन्टाक्र्टिकाच्या संदर्भात आदराने घेतलं जातं. अ‍ॅन्टाक्र्टिक विज्ञानातील सर्वश्रेष्ठ व्यक्तींमध्ये त्याची गणना होते. १९०७ ते १९३१ या काळात त्याने तीन मोहिमा केल्या. दुसऱ्या मोहिमेचा कर्ताधर्ताकरविता मॉसनच होता. या मोहिमेत सर्वाधिक भूभागावर संशोधन करण्यात आलं. ही मोहिम साहसविरहित संशोधन मोहिम म्हणून अपेक्षित असली तरी या मोहिमेवर सर एडमंड हिलरी यांनी भाष्य करताना संशोधन प्रवासाच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ बचावकथा असा उल्लेख केला आहे. त्याच मोहिमेची ही चित्तरकथा. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more