* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WILD SWANS : THREE DAUGHTERS OF CHINA
  • Availability : Available
  • Translators : VIJAYA BAPAT
  • ISBN : 9788184984576
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 652
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Print Books:
BLENDING THE INTIMACY OF MEMOIR AND THE PANORAMIC SWEEP OF EYEWITNESS HISTORY, WILD SWANS HAS BECOME A BESTSELLING CLASSIC IN THIRTY LANGUAGES, WITH MORE THAN TEN MILLION COPIES SOLD. THE STORY OF THREE GENERATIONS IN TWENTIETH-CENTURY CHINA, IT IS AN ENGROSSING RECORD OF MAO`S IMPACT ON CHINA, AN UNUSUAL WINDOW ON THE FEMALE EXPERIENCE IN THE MODERN WORLD, AND AN INSPIRING TALE OF COURAGE AND LOVE.587~ DESCRIBES THE LIFE OF HER GRANDMOTHER, A WARLORD`S CONCUBINE; HER MOTHER`S STRUGGLES AS A YOUNG IDEALISTIC COMMUNIST; AND HER PARENTS` EXPERIENCE AS MEMBERS OF THE COMMUNIST ELITE AND THEIR ORDEAL DURING THE CULTURAL REVOLUTION. CHANG WAS A RED GUARD BRIEFLY AT THE AGE OF FOURTEEN, THEN WORKED AS A PEASANT, A "BAREFOOT DOCTOR," A STEELWORKER, AND AN ELECTRICIAN. AS THE STORY OF EACH GENERATION UNFOLDS, CHANG CAPTURES IN GRIPPING, MOVING X AND ULTIMATELY UPLIFTING X DETAIL THE CYCLES OF VIOLENT DRAMA VISITED ON HER OWN FAMILY AND MILLIONS OF OTHERS CAUGHT IN THE WHIRLWIND OF HISTORY.
ही कहाणी आहे हिंसाचार , अमानुष छळ, अनन्वित अत्याचार आणि जुलमी व्यवस्था यांच्या काळ्याकुट्ट गर्तेमध्ये सौंदर्याची आस धरणाऱ्या , नवनिर्मितीचा आणि आधुनिकतेचा ध्यास घेणाऱ्या स्त्रियांची, त्यांच्या आयुष्यांची. या कहाणीला पाश्र्वभूमी आहे चीनमधल्या राजकीय, सामाजिक स्थित्यंतरांची, बदलांची. यात क्रांतीमुळे चीनी जनतेच्या आयुष्यावर झालेले परिणाम आहेत; श्रीमंत-गरीब लोकांचं जीवन आहे; समाजजीवनातल्या कथा, मिथकं, चालीरीती यांचे संदर्भ आहेत; आदर्शवादाने भारलेले आणि तो आदर्शवाद फोल ठरल्यानंतर कोसळून गेलेले स्त्री-पुरुषही आहेत. ही कहाणी चीनच्या इतिहासातील एक व्यापक कालखंड तपशीलवारपणे डोळ्यांसमोर उभा करून आपल्याला अंतर्मुख करते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MUKTAVIHANGCHINCHYATEENKANYA #WILDSWANS:THREEDAUGHTERSOFCHINA #मुक्तविहंग:चीनच्यातीनकन्या #MEMOIRTRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VIJAYABAPAT #विजयाबापट #JUNGCHANG "
Customer Reviews
  • Rating StarKiran Borkar

    चीनच्या त्या जगप्रसिद्ध भिंतीमागे काय चालू आहे याची उत्सुकता सगळ्यांच असते. तेथे असलेली कम्युनिस्ट राजवट, राजकारण याची माहिती सर्वानाच हवी असते .या पुस्तकात लेखिका ,तिची आई,आणि तिची आजी अश्या तीन स्त्रियांची वेगवेगळ्या कलखंडातली कहाणी सांगितली आहे चीनमधल्या जुलमी राजवटीची ,अमानुष क्रौर्यची आणि क्रांतीची कहाणी आहे .या क्रांतीमुळे चिनी जनतेवर झालेले परिणाम ,श्रीमंत गरीब लोकांचे जीवन ,त्यांचे राहणीमान अतिशय सुंदर पद्धतीने मांडण्यात आले आहे .या पुस्तकास चीनमध्ये बंदी घातली आहे .पुस्तकाचे मूळ नाव वाइल्ड स्वान्स थ्री डॉटर्स ऑफ चायना हे आहे .यातील अमानुष हिंसाचार वाचून अंगावर काटा येतो. ...Read more

  • Rating StarLOKPRABHA 25-12-2015

    आरसा चीनचा लेखिका युंग चँग चीनमधल्या सेशुआन प्रांतातल्या यी बीन शहरात १९५२ मध्ये जन्मली. सरकारी आज्ञेनुसार शेतात तसंच कारखान्यात काम करत असताना सुरुवातीला चोरुनमारुन आणि नंतर उघडपणे ती इंग्रजी शिकली. नंतर सरकारच्याच एका शिष्यवृत्तीचा आधार घेऊन ती आणी शिकण्यासाठी १९७८ साली इंग्लडला गेली. तिथे तिने यॉर्क विद्यापीठातून भाषाशास्त्राची पीएच. डी. मिळवली. ब्रिटिश विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवणारी ती पहिली चिनी विद्यार्थिनी. एक स्त्री, तिची मुलगी आणि तिची नात या तीन पिढ्यांच्या प्रतिनिधींची ही कहाणी म्हणजे तेवढ्या वर्षांचा चीनचा राजकीय, सामाजिक इतिहासच आहे, पण तो इतिहासाच्या पटलावर कधीही न दिसणारा. गेल्या काही वर्षात चीनमधल्या जुलमी राजवटीच्या अमानुष छळाच्या, अत्याचारांच्या कहाण्या सांगणारी इतरही पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. त्यातली काही चिनी माणसांनीच लिहिली आहेत, पण त्या सगळ्यांपेक्षा या पुस्तकाचं वेगळेपण म्हणजे हे आई, मुलगी आणि नात अशा एकाच घरातल्या तीन पिढ्यांची कहाणी सांगत. मुख्य म्हणजे या पुस्तकावर चीनमध्ये बंदी आहे. चीनमध्ये त्या काळात असलेल्या हजारो कानकुबाईन्सपैकी एकीच्या आयुष्यापासून (कानकुबाईन्स अंगवस्त्र) सुरू झालेलं हे पुस्तक तिच्याच इंग्लंडमध्ये राहणाऱ्या, स्वतंत्र, निर्भय आयुष्य जगणाऱ्या नातीच्या आयुष्यापाशी येऊन संपतं. या तीन पिढ्यांच्या दरम्यान हेलकावत राहिलेली अनेक आयुष्य या पुस्तकातून भेटत राहतात, राजसत्तेचा, तिच्याशी संबंधित सगळ्या यंत्रणेचा जुलूम-जबरदस्ती, त्यानंतर माओच्या लहरीनुसार बदलत गेलेलं सगळ्या देशाचं जगणं, सत्तावर्तुळातल्या त्याच्यानंतरच्या उतरंडीतल्या लोकांचं वागणं, या सगळ्यामध्ये दडपली गेलेली चीनची जनता हे सगळं जसजसं आपण वाचत जातो तसतसा एक मोठा आलेख आपल्यासमोर उभा राहतो. चिनी विक्षिप्तपणाचे, अमानुषपणाचे एकच उदाहरण या पुस्तकानं मांडलेलं दाहक वास्तव देण्यासाठी पुरेसं आहे. ‘माओच्या राज्यात इंग्रजीचा अभ्यास’ या प्रकरणात लेखिका लिहिते. एका कापडाच्या गिरणीला आग लागली. सरकारी मालमत्ता वाचवण्याच्या प्रयत्नात तिथली एक वीणकर मुलगी गंभीर जखमी झाली. तिचे हातपाय कापावे लागले. पण तिचा चेहरा आणि बाकी शरीर मात्र नीट राहिलं. पक्षाने तिची इच्छा विचारली. तिला एखाद्या लष्करी अधिकाऱ्याशी लग्न करायचं होतं. लष्करातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याने लेखिकेच्या लष्करात असलेल्या भावाला तिच्याशी लग्न करायला सांगितलं. त्याचं म्हणणं होतं, त्या मुलीचं शरीर धड होतं आणि त्यामुळे ती मुलांना जन्म द्यायला सक्षम होती, म्हणून तिच्याशी लग्न केलं जावं. तिचे हात-पाय जाऊन ती अपंग झाल्याची करूणा वाटण्यापेक्षा ती मुलांना जन्म द्यायला सक्षम आहे असा विचार करणं आणि तो प्रत्यक्षात आणणं हे अंगावर काटा आणणारंच आहे. दर बदलत्या राजवटीमध्ये चीनमध्ये थोड्याफार फरकाने सामान्य माणसाच्या, स्त्रियांच्या वाट्याला चिरडलं जाण्याखेरीज दुसरं काहीच आलेलं नाही, हे आपल्या अगदी शेजारी असलेल्या चीनचं दाहक वास्तव आपल्या मनावर ओरखडे उमटवत राहतं, पण त्याबरोबरच चिनी समाजाची अशी अनेक अंग, वेगवेगळ्या सामाजिक प्रथा-कुप्रथा, चालीरीती, मिथकं या सगळ्यांत दर्शन या पुस्तकातून घडतं. पुस्तकाचे नाव : मुक्त विहंग चीनच्या तीन कन्या ...Read more

  • Rating StarSMITA PATWARDHAN, SANGLI

    हे पुस्तक वाचताना आपण भारतिय समाजाचेच चित्रण पहात आहोत असा भास होत रहातो . सुरुवातीला जपानी सैनिकांकडुन जनतेचा छळ , त्यानंतर रशियन सैन्याकडुन ,त्यानंतर क्वो-मिन-तॉंग आणि कम्युनिस्टांकडुन केली जाणारी ससे होलपट . त्यातही माओचा आत्मकेंद्रीत राज्यकारभार, कम्युनिझम आणि धार्मिक कट्टारतावाद यात काहीही फरक नाही याचे पुरावे अनेक ठिकाणी मिळतात . प्रत्येकवेळी माओ ’वर्गशत्रु ’म्हणुन कुणा समुहाकडॆ बोट दाखवी . की त्या समुहाचा छळ सुरु होत असे . त्यातुन शिक्षक ,पांढरपेशा वर्गाची भरपुर छळणुक झाली .कोणतेही विधायक काम न करता निव्वळ समाजात तेढ निर्माण केल्याने पडलेले दुष्काळ आणि त्यातुन ३० कोटी मनुष्यांचे मृत्यु माओच्या राज्यात झाले . माओच्या सांस्कृतीक क्रांतीमधे त्याने हुकुम दिला , पोलाद तयार करायचा . शिक्षण बाजुला ठेऊन शिक्षक आणि विद्यार्थी त्यात गुंतले ,नाही त्यांना गुंतावेच लागले .त्यांनी तसे केले नसते तर त्यांना वर्गशत्रु ठरवुन छळले गेले असते . शिक्षकांचे काम शेगडी पेटवायची आणि ती पेटती ठेवायची . विद्यार्थ्यांचे काम जे काही लोखंडाच्या वस्तु मिळतील त्या शेगडीत टाकणे आणि वितळवणे . अख्खा देश या वेडाचारात गुंतला . शेतकरी शेती पिकवण्याऐवजी पोलाद करण्यात गुंतले . शेगडी पेटती ठेवण्यासाठी लाकडे हवीत .त्यासाठी जंगले तोडली गेली . चिमण्या दाणे खातात म्हणुन माओला चिमण्या आवडत नसत . त्याने त्यासाठी सगळ्या जनतेला कामाला लावले . घरातील भांडी वाजवुन चिमण्यांना हाकलत बसण्याचे काम सगळे करु लागले . मोठमोठ्या सुंदर बागा , सरंजामदारीचे लक्षण म्हणुन उध्वस्त केल्या गेल्या . शिल्पे तोडली गेली . माओप्रती आपली निष्ठा दाखवायला लोकांना माओची वचने असलेले पुस्तक वाचावे लागे .माओची स्तुती करणारीच गाणी म्हणावी लागत . हे म्हणजे देवावरची श्रध्दा दाखवायला पोथ्या वाचाव्यात त्यातलाच प्रकार . कोणत्याही सुंदर गोष्टीचा आस्वाद घेणे ,कोणत्याही गोष्टीचा आनंद घेणे हे क्रांतीविरोधी ठरवले गेले . स्वच्छ कपडे घालणे ,रोज आंघोळ करणे हेहेी उजवे ठरवले गेले . एकुणच ,लोकांच्या आयुष्यातला आनंद नाहीसा केला गेला . त्यातुन मनोरुग्णांची संख्या वाढली . आरोग्यव्यवस्थेचे तीनतेरा वाजले . लेखिकेचे वडिल आणि आई दोघेही कम्युनिस्ट असले तरी आपले स्थान बळकट करण्यासाठी कुणाचा तरी बळी देण्याविरुध्द होते . त्याची शिक्षा दोघांनाही छळाला सामोरे जाऊन मिळाली . या सर्व प्रकाराने ५० वर्षांचे तिचे वडिल ७० वर्षांच्या वृध्दासारखे दिसु लागले . आपल्या देशातही पुढारी लोक ,शेतकरी आणि अशिक्षित जनतेची कड घेऊन ,पांढरपेशा समाजाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करत असतात . हे कोणीही पुढारी कुटुंब नियोजनाला महत्व देताना दिसत नाहीत . एकिकडे ते स्त्रिपुरुष समानतेची भाषा करतात आणि त्याच वेळी स्त्रिला बाळंतपणाच्या त्रासातुन मुक्त करण्यासाठी कुटुंब नियोजनाचा प्रसार करत नाहीत . हाच प्रकार चीन मधे दिसतो . कुटुंब नियोजनाचा प्रसार करणार्‍या मा यीन चुन या अर्थतद्न्याला उजवा ठरवले गेले . आपल्या व्यक्तीगत स्वातंत्र्यावर असलेला सरकारी हस्तक्षेप पाहुन लोक मेंढरासारखे वागु लागले .नवे विचार ,सर्जनशिलतेला काहीही महत्व राहिले नाही . वर्गशत्रु ठरवुन छळ केला जाई .पण नक्की वर्गशत्रु कोण याबाबत जनतेच्या मनात संभ्रमही निर्माण होत असे . आपल्या शेतात जेव्हढे धान्य पिकणे अशक्य आहे तितके धान्य पिकते असा खोटा दावा करायला लोकांना शिकवले गेले . समाजात अवाच्या सव्वा दावे करण्याची चढाओढ लागली . खरे चित्र कधीही समोर येत नव्हते . अडाणी जनता सरकारला प्रश्न विचारत नाही .पण सुशिक्षितांना सरकारची धोरणे समाजविघातक आहेत का ते समजते .म्हणुन माओला सुशिक्षित समाजाबद्दल राग होता . परिक्षा म्हणजे भांडवलशाहीला उजाळा देण्यासारखे आहे अशी मुक्ताफळे उधळणारे महाभाग होते .माओ पत्नी व तिचे साथिदार यांनी शैक्षणिक दर्जावर असलेल्या भराचा ,पांढरपेशी जुलुमशाही असे म्हणत निषेध केला . ’सारा देश अशिक्षित झाला तर काय बिघडले ?सांस्कृतिक क्रांतीचा विजय होणे महत्वाचे ’ असे ते म्हणाले . सांस्कृतिक क्रांतीने समाजसुधारणेकडे काहीही लक्ष दिले नाही . लेखिकेला शेतीचे प्रशिक्षण देण्यासाठी दुरच्या प्रांतात पाठवले गेले . तेथे काही लोकांनी तिच्याकडचे भांडे , नुडल्स शिजवण्यासाठी घेतले . काही कारणाने नुडल्सचा गोळा झाला .यावरुन ते सर्व तिच्याकडे रागाने बघु लागले . त्या रागाचे कारण होते त्यांची अंधश्रध्दा . त्यांनी अशी समजुत करुन घेतली की मासिक पाळीच्या काळात लेखिकेने ते भांडे आंघोळीसाठी वापरल्याने त्या नुडल्स बिघडल्या . असाच दुसरा प्रकार म्हणजे एकदा कावड घेऊन काही तरुण रस्त्याकडेला बसलेले होते .रस्ता अरुंद असल्याने लेखिकेला ती कावड ओलांडुन जावे लागते . तिने कावड ओलांडताच एक तरुण रागारागाने तिच्यासमोर येऊन उभा रहातो .तो तिला मारणार आहे असे तिला वाटते . तो असे करण्यामागची अंधश्रध्दा असते की बाईने कावडीच्या काठीला ओलांडले तर ती वाहुन नेणार्‍याच्या खांद्यावर फोड येतात . अशा परिस्थितीत चांगले शिक्षण मिळणे अशक्य झाले होते . जगणे हे एक ओझे झाले होते . यातुन सुटका नाही हे पक्के झाले होते .पण तरीही लेखिकेची सुटकेची इच्छा होतीच . योगायोगाने तिला इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली . हे पुस्तक लिहिले तेंव्हा लेखिका इंग्लंडमधेच रहात होती . लेखिकेची आई तिला भेटायला इंग्लंडला गेली होती तेंव्हा तिने लेखिकेला ,स्वत:च्या आईबद्दल आणि स्वत:बद्दल माहिती दिली आणि लिहिण्यास प्रवृत्त केले . या पुस्तकावर चीनमधे बंदी आहे . लेखिका चीनमधे गेली तरी लोकांबरोबर या विषयावर बोलु शकत नाही . ज्या भारतियांना कम्युनिझमचे आकर्षण आहे त्यांनी हे पुस्तक आवश्य वाचावे . समाजाचे काही भले करायची प्रामाणिक इच्छा असणार्‍या व्यक्तीला कम्युनिझमचे कधीही आकर्षण वाटणे अशक्य आहे . लोकशाहीला पर्याय नाही हेच खरे . ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more