* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WILD SWANS : THREE DAUGHTERS OF CHINA
  • Availability : Available
  • Translators : VIJAYA BAPAT
  • ISBN : 9788184984576
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 652
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Print Books:
BLENDING THE INTIMACY OF MEMOIR AND THE PANORAMIC SWEEP OF EYEWITNESS HISTORY, WILD SWANS HAS BECOME A BESTSELLING CLASSIC IN THIRTY LANGUAGES, WITH MORE THAN TEN MILLION COPIES SOLD. THE STORY OF THREE GENERATIONS IN TWENTIETH-CENTURY CHINA, IT IS AN ENGROSSING RECORD OF MAO`S IMPACT ON CHINA, AN UNUSUAL WINDOW ON THE FEMALE EXPERIENCE IN THE MODERN WORLD, AND AN INSPIRING TALE OF COURAGE AND LOVE.587~ DESCRIBES THE LIFE OF HER GRANDMOTHER, A WARLORD`S CONCUBINE; HER MOTHER`S STRUGGLES AS A YOUNG IDEALISTIC COMMUNIST; AND HER PARENTS` EXPERIENCE AS MEMBERS OF THE COMMUNIST ELITE AND THEIR ORDEAL DURING THE CULTURAL REVOLUTION. CHANG WAS A RED GUARD BRIEFLY AT THE AGE OF FOURTEEN, THEN WORKED AS A PEASANT, A "BAREFOOT DOCTOR," A STEELWORKER, AND AN ELECTRICIAN. AS THE STORY OF EACH GENERATION UNFOLDS, CHANG CAPTURES IN GRIPPING, MOVING X AND ULTIMATELY UPLIFTING X DETAIL THE CYCLES OF VIOLENT DRAMA VISITED ON HER OWN FAMILY AND MILLIONS OF OTHERS CAUGHT IN THE WHIRLWIND OF HISTORY.
ही कहाणी आहे हिंसाचार , अमानुष छळ, अनन्वित अत्याचार आणि जुलमी व्यवस्था यांच्या काळ्याकुट्ट गर्तेमध्ये सौंदर्याची आस धरणाऱ्या , नवनिर्मितीचा आणि आधुनिकतेचा ध्यास घेणाऱ्या स्त्रियांची, त्यांच्या आयुष्यांची. या कहाणीला पाश्र्वभूमी आहे चीनमधल्या राजकीय, सामाजिक स्थित्यंतरांची, बदलांची. यात क्रांतीमुळे चीनी जनतेच्या आयुष्यावर झालेले परिणाम आहेत; श्रीमंत-गरीब लोकांचं जीवन आहे; समाजजीवनातल्या कथा, मिथकं, चालीरीती यांचे संदर्भ आहेत; आदर्शवादाने भारलेले आणि तो आदर्शवाद फोल ठरल्यानंतर कोसळून गेलेले स्त्री-पुरुषही आहेत. ही कहाणी चीनच्या इतिहासातील एक व्यापक कालखंड तपशीलवारपणे डोळ्यांसमोर उभा करून आपल्याला अंतर्मुख करते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MUKTAVIHANGCHINCHYATEENKANYA #WILDSWANS:THREEDAUGHTERSOFCHINA #मुक्तविहंग:चीनच्यातीनकन्या #MEMOIRTRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VIJAYABAPAT #विजयाबापट #JUNGCHANG "
Customer Reviews
  • Rating StarKiran Borkar

    चीनच्या त्या जगप्रसिद्ध भिंतीमागे काय चालू आहे याची उत्सुकता सगळ्यांच असते. तेथे असलेली कम्युनिस्ट राजवट, राजकारण याची माहिती सर्वानाच हवी असते .या पुस्तकात लेखिका ,तिची आई,आणि तिची आजी अश्या तीन स्त्रियांची वेगवेगळ्या कलखंडातली कहाणी सांगितली आहे चीनमधल्या जुलमी राजवटीची ,अमानुष क्रौर्यची आणि क्रांतीची कहाणी आहे .या क्रांतीमुळे चिनी जनतेवर झालेले परिणाम ,श्रीमंत गरीब लोकांचे जीवन ,त्यांचे राहणीमान अतिशय सुंदर पद्धतीने मांडण्यात आले आहे .या पुस्तकास चीनमध्ये बंदी घातली आहे .पुस्तकाचे मूळ नाव वाइल्ड स्वान्स थ्री डॉटर्स ऑफ चायना हे आहे .यातील अमानुष हिंसाचार वाचून अंगावर काटा येतो. ...Read more

  • Rating StarLOKPRABHA 25-12-2015

    आरसा चीनचा लेखिका युंग चँग चीनमधल्या सेशुआन प्रांतातल्या यी बीन शहरात १९५२ मध्ये जन्मली. सरकारी आज्ञेनुसार शेतात तसंच कारखान्यात काम करत असताना सुरुवातीला चोरुनमारुन आणि नंतर उघडपणे ती इंग्रजी शिकली. नंतर सरकारच्याच एका शिष्यवृत्तीचा आधार घेऊन ती आणी शिकण्यासाठी १९७८ साली इंग्लडला गेली. तिथे तिने यॉर्क विद्यापीठातून भाषाशास्त्राची पीएच. डी. मिळवली. ब्रिटिश विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवणारी ती पहिली चिनी विद्यार्थिनी. एक स्त्री, तिची मुलगी आणि तिची नात या तीन पिढ्यांच्या प्रतिनिधींची ही कहाणी म्हणजे तेवढ्या वर्षांचा चीनचा राजकीय, सामाजिक इतिहासच आहे, पण तो इतिहासाच्या पटलावर कधीही न दिसणारा. गेल्या काही वर्षात चीनमधल्या जुलमी राजवटीच्या अमानुष छळाच्या, अत्याचारांच्या कहाण्या सांगणारी इतरही पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. त्यातली काही चिनी माणसांनीच लिहिली आहेत, पण त्या सगळ्यांपेक्षा या पुस्तकाचं वेगळेपण म्हणजे हे आई, मुलगी आणि नात अशा एकाच घरातल्या तीन पिढ्यांची कहाणी सांगत. मुख्य म्हणजे या पुस्तकावर चीनमध्ये बंदी आहे. चीनमध्ये त्या काळात असलेल्या हजारो कानकुबाईन्सपैकी एकीच्या आयुष्यापासून (कानकुबाईन्स अंगवस्त्र) सुरू झालेलं हे पुस्तक तिच्याच इंग्लंडमध्ये राहणाऱ्या, स्वतंत्र, निर्भय आयुष्य जगणाऱ्या नातीच्या आयुष्यापाशी येऊन संपतं. या तीन पिढ्यांच्या दरम्यान हेलकावत राहिलेली अनेक आयुष्य या पुस्तकातून भेटत राहतात, राजसत्तेचा, तिच्याशी संबंधित सगळ्या यंत्रणेचा जुलूम-जबरदस्ती, त्यानंतर माओच्या लहरीनुसार बदलत गेलेलं सगळ्या देशाचं जगणं, सत्तावर्तुळातल्या त्याच्यानंतरच्या उतरंडीतल्या लोकांचं वागणं, या सगळ्यामध्ये दडपली गेलेली चीनची जनता हे सगळं जसजसं आपण वाचत जातो तसतसा एक मोठा आलेख आपल्यासमोर उभा राहतो. चिनी विक्षिप्तपणाचे, अमानुषपणाचे एकच उदाहरण या पुस्तकानं मांडलेलं दाहक वास्तव देण्यासाठी पुरेसं आहे. ‘माओच्या राज्यात इंग्रजीचा अभ्यास’ या प्रकरणात लेखिका लिहिते. एका कापडाच्या गिरणीला आग लागली. सरकारी मालमत्ता वाचवण्याच्या प्रयत्नात तिथली एक वीणकर मुलगी गंभीर जखमी झाली. तिचे हातपाय कापावे लागले. पण तिचा चेहरा आणि बाकी शरीर मात्र नीट राहिलं. पक्षाने तिची इच्छा विचारली. तिला एखाद्या लष्करी अधिकाऱ्याशी लग्न करायचं होतं. लष्करातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याने लेखिकेच्या लष्करात असलेल्या भावाला तिच्याशी लग्न करायला सांगितलं. त्याचं म्हणणं होतं, त्या मुलीचं शरीर धड होतं आणि त्यामुळे ती मुलांना जन्म द्यायला सक्षम होती, म्हणून तिच्याशी लग्न केलं जावं. तिचे हात-पाय जाऊन ती अपंग झाल्याची करूणा वाटण्यापेक्षा ती मुलांना जन्म द्यायला सक्षम आहे असा विचार करणं आणि तो प्रत्यक्षात आणणं हे अंगावर काटा आणणारंच आहे. दर बदलत्या राजवटीमध्ये चीनमध्ये थोड्याफार फरकाने सामान्य माणसाच्या, स्त्रियांच्या वाट्याला चिरडलं जाण्याखेरीज दुसरं काहीच आलेलं नाही, हे आपल्या अगदी शेजारी असलेल्या चीनचं दाहक वास्तव आपल्या मनावर ओरखडे उमटवत राहतं, पण त्याबरोबरच चिनी समाजाची अशी अनेक अंग, वेगवेगळ्या सामाजिक प्रथा-कुप्रथा, चालीरीती, मिथकं या सगळ्यांत दर्शन या पुस्तकातून घडतं. पुस्तकाचे नाव : मुक्त विहंग चीनच्या तीन कन्या ...Read more

  • Rating StarSMITA PATWARDHAN, SANGLI

    हे पुस्तक वाचताना आपण भारतिय समाजाचेच चित्रण पहात आहोत असा भास होत रहातो . सुरुवातीला जपानी सैनिकांकडुन जनतेचा छळ , त्यानंतर रशियन सैन्याकडुन ,त्यानंतर क्वो-मिन-तॉंग आणि कम्युनिस्टांकडुन केली जाणारी ससे होलपट . त्यातही माओचा आत्मकेंद्रीत राज्यकारभार, कम्युनिझम आणि धार्मिक कट्टारतावाद यात काहीही फरक नाही याचे पुरावे अनेक ठिकाणी मिळतात . प्रत्येकवेळी माओ ’वर्गशत्रु ’म्हणुन कुणा समुहाकडॆ बोट दाखवी . की त्या समुहाचा छळ सुरु होत असे . त्यातुन शिक्षक ,पांढरपेशा वर्गाची भरपुर छळणुक झाली .कोणतेही विधायक काम न करता निव्वळ समाजात तेढ निर्माण केल्याने पडलेले दुष्काळ आणि त्यातुन ३० कोटी मनुष्यांचे मृत्यु माओच्या राज्यात झाले . माओच्या सांस्कृतीक क्रांतीमधे त्याने हुकुम दिला , पोलाद तयार करायचा . शिक्षण बाजुला ठेऊन शिक्षक आणि विद्यार्थी त्यात गुंतले ,नाही त्यांना गुंतावेच लागले .त्यांनी तसे केले नसते तर त्यांना वर्गशत्रु ठरवुन छळले गेले असते . शिक्षकांचे काम शेगडी पेटवायची आणि ती पेटती ठेवायची . विद्यार्थ्यांचे काम जे काही लोखंडाच्या वस्तु मिळतील त्या शेगडीत टाकणे आणि वितळवणे . अख्खा देश या वेडाचारात गुंतला . शेतकरी शेती पिकवण्याऐवजी पोलाद करण्यात गुंतले . शेगडी पेटती ठेवण्यासाठी लाकडे हवीत .त्यासाठी जंगले तोडली गेली . चिमण्या दाणे खातात म्हणुन माओला चिमण्या आवडत नसत . त्याने त्यासाठी सगळ्या जनतेला कामाला लावले . घरातील भांडी वाजवुन चिमण्यांना हाकलत बसण्याचे काम सगळे करु लागले . मोठमोठ्या सुंदर बागा , सरंजामदारीचे लक्षण म्हणुन उध्वस्त केल्या गेल्या . शिल्पे तोडली गेली . माओप्रती आपली निष्ठा दाखवायला लोकांना माओची वचने असलेले पुस्तक वाचावे लागे .माओची स्तुती करणारीच गाणी म्हणावी लागत . हे म्हणजे देवावरची श्रध्दा दाखवायला पोथ्या वाचाव्यात त्यातलाच प्रकार . कोणत्याही सुंदर गोष्टीचा आस्वाद घेणे ,कोणत्याही गोष्टीचा आनंद घेणे हे क्रांतीविरोधी ठरवले गेले . स्वच्छ कपडे घालणे ,रोज आंघोळ करणे हेहेी उजवे ठरवले गेले . एकुणच ,लोकांच्या आयुष्यातला आनंद नाहीसा केला गेला . त्यातुन मनोरुग्णांची संख्या वाढली . आरोग्यव्यवस्थेचे तीनतेरा वाजले . लेखिकेचे वडिल आणि आई दोघेही कम्युनिस्ट असले तरी आपले स्थान बळकट करण्यासाठी कुणाचा तरी बळी देण्याविरुध्द होते . त्याची शिक्षा दोघांनाही छळाला सामोरे जाऊन मिळाली . या सर्व प्रकाराने ५० वर्षांचे तिचे वडिल ७० वर्षांच्या वृध्दासारखे दिसु लागले . आपल्या देशातही पुढारी लोक ,शेतकरी आणि अशिक्षित जनतेची कड घेऊन ,पांढरपेशा समाजाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करत असतात . हे कोणीही पुढारी कुटुंब नियोजनाला महत्व देताना दिसत नाहीत . एकिकडे ते स्त्रिपुरुष समानतेची भाषा करतात आणि त्याच वेळी स्त्रिला बाळंतपणाच्या त्रासातुन मुक्त करण्यासाठी कुटुंब नियोजनाचा प्रसार करत नाहीत . हाच प्रकार चीन मधे दिसतो . कुटुंब नियोजनाचा प्रसार करणार्‍या मा यीन चुन या अर्थतद्न्याला उजवा ठरवले गेले . आपल्या व्यक्तीगत स्वातंत्र्यावर असलेला सरकारी हस्तक्षेप पाहुन लोक मेंढरासारखे वागु लागले .नवे विचार ,सर्जनशिलतेला काहीही महत्व राहिले नाही . वर्गशत्रु ठरवुन छळ केला जाई .पण नक्की वर्गशत्रु कोण याबाबत जनतेच्या मनात संभ्रमही निर्माण होत असे . आपल्या शेतात जेव्हढे धान्य पिकणे अशक्य आहे तितके धान्य पिकते असा खोटा दावा करायला लोकांना शिकवले गेले . समाजात अवाच्या सव्वा दावे करण्याची चढाओढ लागली . खरे चित्र कधीही समोर येत नव्हते . अडाणी जनता सरकारला प्रश्न विचारत नाही .पण सुशिक्षितांना सरकारची धोरणे समाजविघातक आहेत का ते समजते .म्हणुन माओला सुशिक्षित समाजाबद्दल राग होता . परिक्षा म्हणजे भांडवलशाहीला उजाळा देण्यासारखे आहे अशी मुक्ताफळे उधळणारे महाभाग होते .माओ पत्नी व तिचे साथिदार यांनी शैक्षणिक दर्जावर असलेल्या भराचा ,पांढरपेशी जुलुमशाही असे म्हणत निषेध केला . ’सारा देश अशिक्षित झाला तर काय बिघडले ?सांस्कृतिक क्रांतीचा विजय होणे महत्वाचे ’ असे ते म्हणाले . सांस्कृतिक क्रांतीने समाजसुधारणेकडे काहीही लक्ष दिले नाही . लेखिकेला शेतीचे प्रशिक्षण देण्यासाठी दुरच्या प्रांतात पाठवले गेले . तेथे काही लोकांनी तिच्याकडचे भांडे , नुडल्स शिजवण्यासाठी घेतले . काही कारणाने नुडल्सचा गोळा झाला .यावरुन ते सर्व तिच्याकडे रागाने बघु लागले . त्या रागाचे कारण होते त्यांची अंधश्रध्दा . त्यांनी अशी समजुत करुन घेतली की मासिक पाळीच्या काळात लेखिकेने ते भांडे आंघोळीसाठी वापरल्याने त्या नुडल्स बिघडल्या . असाच दुसरा प्रकार म्हणजे एकदा कावड घेऊन काही तरुण रस्त्याकडेला बसलेले होते .रस्ता अरुंद असल्याने लेखिकेला ती कावड ओलांडुन जावे लागते . तिने कावड ओलांडताच एक तरुण रागारागाने तिच्यासमोर येऊन उभा रहातो .तो तिला मारणार आहे असे तिला वाटते . तो असे करण्यामागची अंधश्रध्दा असते की बाईने कावडीच्या काठीला ओलांडले तर ती वाहुन नेणार्‍याच्या खांद्यावर फोड येतात . अशा परिस्थितीत चांगले शिक्षण मिळणे अशक्य झाले होते . जगणे हे एक ओझे झाले होते . यातुन सुटका नाही हे पक्के झाले होते .पण तरीही लेखिकेची सुटकेची इच्छा होतीच . योगायोगाने तिला इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली . हे पुस्तक लिहिले तेंव्हा लेखिका इंग्लंडमधेच रहात होती . लेखिकेची आई तिला भेटायला इंग्लंडला गेली होती तेंव्हा तिने लेखिकेला ,स्वत:च्या आईबद्दल आणि स्वत:बद्दल माहिती दिली आणि लिहिण्यास प्रवृत्त केले . या पुस्तकावर चीनमधे बंदी आहे . लेखिका चीनमधे गेली तरी लोकांबरोबर या विषयावर बोलु शकत नाही . ज्या भारतियांना कम्युनिझमचे आकर्षण आहे त्यांनी हे पुस्तक आवश्य वाचावे . समाजाचे काही भले करायची प्रामाणिक इच्छा असणार्‍या व्यक्तीला कम्युनिझमचे कधीही आकर्षण वाटणे अशक्य आहे . लोकशाहीला पर्याय नाही हेच खरे . ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more