* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE WEIGHT OF A MUSTARD SEED
  • Availability : Available
  • Translators : ASHOK PATHARKAR
  • ISBN : 9788184985252
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 227
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
TELLS THE STORY OF GENERAL KAMEL SACHET, A DECORATED HERO OF THE LONG IRAN-IRAQ WAR AND A FAVOURITE OF SADDAM HUSSEIN`S. THIS BOOK REVEALS THE EMOTIONAL AND PSYCHOLOGICAL SCARS THE SACHET FAMILY SUFFER AS A RESULT OF DECADES SPENT LIVING WITH WAR AND REPRESSION. IF YOU ARE UNABLE TO PROTECT YOURSELF FROM A TYRANT, HOW CAN YOU PROTECT YOUR FAMILY? AND HOW DOES A PROUD MAN LIVE WITH THAT KNOWLEDGE? REMINISCENT IN PART OF "STASILAND" AND "THE BOOKSELLER OF KABUL", THIS IS THE STORY OF ONE FAMILY`S STRUGGLE TO SURVIVE THE INIQUITIES OF SADDAM HUSSEIN`S SAVAGE DICTATORSHIP. IT IS A CAREER-DEFINING BOOK FOR WENDELL STEAVENSON. IN "THE WEIGHT OF A MUSTARD SEED", WENDELL STEAVENSON TELLS THE STORY OF GENERAL KAMEL SACHET, A DECORATED HERO OF THE LONG IRAN-IRAQ WAR AND A FAVOURITE OF SADDAM HUSSEIN`S. AS STEAVENSON REVEALS THE EMOTIONAL AND PSYCHOLOGICAL SCARS THE SACHET FAMILY SUFFER AS A RESULT OF DECADES SPENT LIVING WITH WAR AND REPRESSION, SHE REACHES TOWARDS THE HEART OF A PREVIOUSLY UNSPOKEN STORY OF IRAQ: A ONCE PROSPEROUS NATION, REDUCED BY HUSSEIN`S MEGALOMANIA AND PARANOIA TO BANKRUPTCY, CORRUPTION AND IMPOTENCE. THE RESULT IS AN INTIMATE, STARTLING AND GRIPPING ACCOUNT OF THE SLOW DESTRUCTION OF SACHET, HIS FAMILY AND HIS COUNTRY.
‘प्रतिभावान कथालेखिका वेंडेल स्टीव्हन्सन यांनी इराकबद्दल अतिशय वेगळे असे पुस्तक लिहिले आहे. त्यांनी कौशल्याने आणि सुंदरपणे रंगविलेल्या जनरल कमेल सचेत यांच्या व्यक्तिरेखेत सद्दाम हुसेनच्या कारकिर्दीत इराकी जनतेला ज्या नैतिक संकटे, दडपशाहीची विकृत पद्धत आणि लहरीपणे केली जाणारी मेहेरनजर आणि भीतीचे वातावरण यांचा सामना करावा लागला, त्याचे सुंदर चित्रण आहे. हे एक उत्कट असे चरित्र आहे – एका व्यक्तीचे, त्याच्या कुटुंबाचे, त्याच्या देशाचे – पण आजही लागू होईल अशी ही कथा असून ती वाचल्यावर अनेक इराकी लोक शस्त्र का उचलतात, तडजोड का स्वीकारत नाहीत, भूतकाळातील हेवेदावे आणि दु:ख विसरायला ते तयार का नसतात आणि त्यांचा देश अशांत का आहे, याचे आकलन व्हायला मदत होते. ‘द वेट ऑफ ए मस्टर्ड सीड’ हे आतापर्यंत इराकवर आलेल्या पुस्तकांमधले सर्वांत जास्त अस्सल आणि विचारप्रवर्तक पुस्तक आहे. ते सद्दामच्या राजवटीतील एका जनरलच्या नैतिक प्रवासाचे वर्णन आहेच; पण ही मानवी सदसद्विवेकबुद्धीचा मागोवा घेण्यासाठी लेखिकेने युद्धकाळात केलेल्या प्रवासाची कथाही आहे. हे खरोखरीच एक असामान्य पुस्तक आहे. या कथेतून वेंडेल स्टीव्हन्सनकडे लिहिण्याची असाधारण क्षमता आहे, हे अगदी स्पष्ट दिसते. वेंडेल स्टीव्हन्सनचे हे सुंदरपणे लिहिलेले पुस्तक म्हणजे दुष्टपणा किती सार्वत्रिक आहे याचा डोळे उघडणारा, हृदय पिळवटून टाकणारा वृत्तान्त आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #HUKUMSHAHICHYASAVLIT #THEWEIGHTOFAMUSTARDSEED #हुकुमशाहीच्यासावलीत #MEMOIR #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #ASHOKPATHARKAR #WENDELLSTEAVENSON "
Customer Reviews
  • Rating StarAnil Udgirkar

    सद्दाम हुसेन ईराक व तेथील त्याची व त्याची मुलं ऊदय आणि क्युसे यांची हुकुमशाही व बेबंदशाही आपल्याला माहितीच आहे.या पुस्तकामधुन एक लष्करी अधिकारी कामेल साचेत याचे शौर्य व निष्ठा माहिती असुनही सद्दाम च्या जवळ च्या चौकडी मुळे त्याला कधी जेलयात्रा आणि शेवी तर द्रोही ठरवून दोन तीन महिने एकांतवासात छळ करुन हत्या केली जाते.अंत्यक्रिया चुपचाप करविली जाते. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW 18-5-2014

    अरबी देशांमध्ये गेल्या काही वर्षांत खूप उलथापालथी झाल्या. सद्दाम, ओसामा असे अनेक हुकूमशहा काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या अत्याचाराच्या, त्यातून बचावलेल्यांच्या अनेक कहाण्या पुस्तकं, डॉक्युमेंटरी स्वरूपात उपलब्ध आहेत. मात्र स्वतः त्यांच्या सैन्याती लोकांना याविषयी काय वाटतं, याविषयी फारशी पुस्तकं दिसत नाही. हाच विषय `हुकुमशाहीच्या सावलीत` या पुस्तकात घेण्यात आला आहे. सद्दामच्या सैन्यातील कमेल सचेत या जनरलचं आयुष्य, त्याच्यासोबतच्या इतर काही सहकाऱ्यांच्या आठवणी प्रत्यक्ष भेटून लेखिकेने जाणून घेऊन त्यावर हे पुस्तक लिहिलं आहे. यात त्या सर्वांचे लष्करातील अनुभव, करियरमधील चढ-उतार, लष्करात वरिष्ठ पदावर असूनही असलेली मृत्यूची भीती, सद्दामचा विचित्र स्वभाव, वशिलेबाजी यांचे तपशील यामध्ये देण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more