MOHAN NARENDRA

About Author

Birth Date : 30/07/1935
Death Date : 11/05/2021


NARENDRA MOHAN WAS BORN IN LAHORE (PAKISTAN). WITH COLLECTIONS OF POEMS, PLAYS, LITERARY CRITICISM, EDITED BOOKS ON VARIOUS THEMES, DIARY WRITING AND AUTOBIOGRAPHY TO HIS CREDIT, THE NUMEROUS WORKS BY THIS VISIONARY AUTHOR HAVE BEEN TRANSLATED INTO ENGLISH, URDU AND OTHER INDIAN LANGUAGES. HIS COMPLETE WORKS IN POETRY – NARENDRA MOHAN RANCHAVALI IN TWELVE VOLUMES IS A SIGNIFICANT CONTRIBUTION TO INDIAN LITERATURE. ; MAKING HIM A TREND-SETTER OF TWO MOVEMENTS IN HINDI POETRY CALLED VICHAR KAVITA AND LAMBI KAVITA. APART FROM HIS TWELVE COLLECTIONS OF POEMS; HE HAS TO HIS CREDIT NINE PLAYS, THIRTEEN BOOKS OF LITERARY CRITICISM AND TWENTY EDITED BOOKS IN VARIOUS GENRE, TO MENTION A FEW. HE WAS HONOURED BY MANY AWARDS AND ACCOLADES BY EMINENT LITERARY INSTITUTIONS.

नरेन्द्र मोहन यांचा जन्म लाहोर (पाकिस्तान ) इथे झाला. कविता, नाटक, समीक्षा इ. विविधांगी लेखन त्यांनी केलं. त्याचबरोबर संपादनही केलं. एक हादसे में सामना होने पर इ. कवितासंग्रह, कहै कबीर सुनो भाई साधो, सींगधारी इ. नाटकं, साथ साथ मेरा साया, साये से अलग या दैनंदिनी, या त्यांच्या विविधांगी साहित्याने वेगळी वाट चोखाळली. आपल्या समीक्षात्मक लेखनातून आणि संपादनकार्यातून सृजन आणि चिंतनाच्या नव्या पैलूंचा शोध घेणे शक्य झाले. दीर्घ कवितेबद्दल केलेल्या मूलभूत विवेचनाद्वारा त्यांनी हिंदी साहित्यविचारात मोलाची भर घातली. विभाजन : भारतीय भाषाओं की कहानियाँचे दोन खंड आणि मंटो की कहानियाँ त्यांच्या संपादन प्रतिभेची साक्ष देतात. नरेन्द्र मोहन रचनावलीचे आठ खंडही प्रकाशित झाले आहेत. त्यांची नाटके आणि कविता विभिन्न भारतीय भाषा आणि इंग्लिशमध्ये अनुवादित झाल्या आहेत. अनेक राष्ट्रीय आणि प्रादेशिक पुरस्कारांनी सन्मानित झालेले हे व्यक्तिमत्व होते.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
KAMBAKTH NINDAR Rating Star
Add To Cart INR 250
KYA HAAL SUNAVA Rating Star
Add To Cart INR 450

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more