CHRIS TURNEY

About Author

Birth Date : 10/07/1973


CHRISTIAN S. M. TURNEY FRSA FGS FRMETSOC FRGS FHEA IS PROFESSOR OF CLIMATE CHANGE AND EARTH SCIENCE AND DIRECTOR OF THE EARTH AND SUSTAINABILITY SCIENCE RESEARCH CENTRE AND THE CHRONOS 14CARBON-CYCLE FACILITY AT THE UNIVERSITY OF NEW SOUTH WALES.[1] TURNEY WAS EDUCATED AT ST BEDES SCHOOL, GRADUATED FROM THE UNIVERSITY OF EAST ANGLIA WITH A BSC IN ENVIRONMENTAL SCIENCE AND COMPLETED HIS PHD AT ROYAL HOLLOWAY, UNIVERSITY OF LONDON. HE WAS PREVIOUSLY PROFESSOR OF PHYSICAL GEOGRAPHY AT THE UNIVERSITY OF EXETER. HE WAS AWARDED THE J.G. RUSSELL AWARD (2004) BY THE AUSTRALIAN ACADEMY OF SCIENCE, THE INAUGURAL SIR NICHOLAS SHACKLETON MEDAL BY THE INTERNATIONAL UNION FOR QUATERNARY RESEARCH IN 2007, A PHILIP LEVERHULME PRIZE IN 2008, THE BIGSBY MEDAL OF THE GEOLOGICAL SOCIETY OF LONDON IN 2009, AND THE FREDERICK WHITE PRIZE BY THE AUSTRALIAN ACADEMY OF SCIENCE IN 2014.[2] IN 2010, TURNEY WAS AWARDED A FIVE-YEAR AUSTRALIAN RESEARCH COUNCIL LAUREATE FELLOWSHIP. HE HAS PUBLISHED FOUR BOOKS[3][4][5][6] AND MORE THAN 180 SCIENTIFIC RESEARCH PAPERS.[7]

प्रोफेसर खिस टर्नी हे ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटिश भूवैज्ञानिक आहेत. जे न्यू साऊथ वेल्स विद्यापीठामध्ये हवामान बदलासंबंधी ARC चे मानद सदस्यपण आहेत. त्यांनी ICE, AND BLOOD : LESSONS FROM CLIMATES PAST & BONES, ROCKS & STARS : THE SCIENCE OF WHEN THINGS HAPPENED, ही पुस्तके लिहिली आहेत.- अनेक शास्त्रीय मालिकांतून त्यांचे संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. इ.स. २००७ मध्ये त्यांना, हुशार तरुण अशा वनस्पती आणि प्राणी जीवशास्त्रज्ञाला दिला जाणारा SIR NICHOLAS SHACKLETON पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे भूगर्भशास्त्रातील त्यांच्या योगदानाबद्दल २००९ मध्ये त्यांना GEOLOGICAL SOCIETY OF LONDONS BIGSBY या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
1912 ANTARCTICACHYA SHODHAT Rating Star
Add To Cart INR 450

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more