* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHAI, CHAI : TRAVELS IN PLACES WHERE YOU STOP BUT NEVER GET OFF
  • Availability : Available
  • Translators : POORNIMA KUNDETKAR
  • ISBN : 9788184982909
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Print Books:
SOME YEARS AGO, A JOURNALIST EXPERIENCED SOMETHING OF AN EPIPHANIC MOMENT. BISHWANATH GHOSH HAD ALIGHTED ...FROM HIS TRAIN AT ITARSI STATION IN MADHYA PRADESH - TO STRETCH HIS LEGS AND GRAB A CUP OF TEA - BEFORE HE RESUMED HIS JOURNEY WHICH HAD BEGUN AT KANPUR AND WOULD END IN MADRAS. IT OCCURRED TO HIM, THEN, THAT MILLIONS OF PASSENGERS HAD KILLED PROBABLY BILLIONS OF HOURS AT RAILWAY JUNCTIONS SUCH AS ITARSI IN ORDER TO TAKE THE CONNECTING TRAIN TO THEIR DESTINATIONS. BUT NO ONE BOTHERED TO WONDER ABOUT WHAT LAY BEYOND THE PLATFORM. AND SO, GHOSH RESOLUTELY ROAMED THE TOWNS BEYOND THE STATION YARD — TOWNS SUCH AS MUGHAL SARAI, JHANSI, ITARSI, GUNTAKAL, JOLARPETTAI, ARAKKONAM AND SHORANUR — TO DISCOVER THE LIVES OF PEOPLE WHO MAY HAVE GROWN INURED TO THE CONSTANT WHISTLE OF PASSING TRAINS. IN CHAI, CHAI: TRAVELS IN PLACES WHERE YOU STOP BUT NEVER GET OFF BISHWANATH GHOSH COMBINES DESCRIPTIVE SKILLS WITH PERSONAL HISTORY AND HUMOUR TO BRILLIANTLY ILLUMINATE THESE OTHERWISE OBSCURE SMALL TOWNS – TOWNS THAT DENOTE THE REAL INDIA.
काही वर्षांपूर्वी एका पत्रकाराने काही वेगळेच क्षण अनुभवले होते.कानपूर ते मद्रास प्रवासादरम्यान इटारसी स्थानकावर विश्वनाथ घोष पाय मोकळे करायला आणि एक कप चहा प्यायला उतरले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, लाखो प्रवासी त्यांच्या मुक्कामाकडे जाणारी पुढची गाडी येण्यापूर्वी इटारसीसारख्या जंक्शनवर कदाचित करोडो तासांचा वेळ घालवत असतील. पण स्थानकापलीकडचे शहर कसे आहे हे शोधण्याची कधी कोणी तसदी घेत नाही. लेखक म्हणतो, ``भारतातील रेल्वे स्थानके ही शहरांना आणि गावांना जोडणा-या प्रदेशातील उत्कंठावर्धक अशी स्वतंत्र राज्ये आहेत. ती स्थानिक जीवनाच्या स्वादापासून पूर्णपणे भिन्न असतात. जणू दिल्लीतील एकाच अधिकाऱ्याच्या अखत्यारीतील तो एक वेगळाच प्रदेश असतो, रेल्वेच्या शिट्ट्यांच्या सहवासात लहानाचे मोठे झालेले लोक आणि त्यांचे जीवन याबद्दल जाणून घेण्यासाठी घोष मुद्दाम ह्या शहरांमध्ये फिरले. इटारसी, मुघलसराई, अरक्कोनम, जोलारपेटाई, झाशी, शोरानूर आणि गुंटाकल अशा विविध उत्कंठावर्धक नावांच्या शहरांमधून त्यांनी केलेला हा प्रवास....!``
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #CHAICHAI #CHAICHAI:TRAVELSINPLACESWHEREYOUSTOPBUTNEVERGETOFF #चायचाय #MEMOIR #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #POORNIMAKUNDETKAR BISHWANATH GHOSH "
Customer Reviews
  • Rating Starसाप्ताहिक सकाळ ६-२-२०२१

    अनोखा प्रवास दोन वस्तूंना एकत्र बांधण्यासाठी जशी गाठ बांधलेली असते. तशी दोन रेल्वे मार्गांना गाठीने एकत्र बांधून ठेवायची जागा म्हणजे रेल्वे जंक्शन. भारतासारख्या खंडप्राय देशात मोठ्या शहरांना रेल्वेने जोडायचे काम या रेल्वे जंक्शनरूपी गाठी करतात. रल्वे जंक्शनच्या बाहेर पडून त्या गावाचे दर्शन घडवणारे `Chai, Chai` हे विश्वनाथ घोष यांचे पुस्तक. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून चहाने भरलेल्या मातीच्या कुल्लडचे चित्र व रेल्वेरुळांचा फोटो पुस्तकांबद्दल खूप काही सांगतो. लेखक विश्वनाथ घोष यांनी या पुस्तकात उत्तरेतल्या मुघलसराई, झाशी व मध्य भारतातल्या इटारसीबद्दल, तर दक्षिणेतल्या गुंटकल, अरक्कोणम व जोलरपेट आणि शोरणूर या ठिकाणांबद्दल लिहिले आहे. मुघलसराई म्हटले कि डोळयांसमोर येते आशिया खंडातील सर्वात मोठे रेल्वे यार्ड किंवा बनारसला जाण्यासाठी उतरायचे ठिकाण पण स्टेशनबाहेरचे मुघलसराई विश्वनाथ घोष आपल्याला या पुस्तकातून दाखवतात.मुघलसराई स्टेशन जेवढे मोठे तेवढेच गाव मात्र लहान. मुघलसराई हे भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे जन्म ठिकाण लेखक विश्वनाथ घोष त्या रेल्वे कॉलनीतील शास्त्रीजींचे जन्मस्थान व त्यांची शाळा बघून येतात. या व्यतिरिक्त स्थानिक लोकांशी बोलताना लेखकाला मुघलसराई स्टेशनचे नामांतर `पंडित दीनदयाळ उपाध्याय` कसे झाले याचीही माहिती मिळते. पुस्तकाच्या पुढच्या प्रकरणात विश्वनाथ घोष आपल्याला घेऊन जातात झाशीला. ऐतिहासीक दृष्टया झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंमुळे झाशीला विशेष महत्व आहे. पण या झाशीचे आणखीन एक वैशिष्ट्य विश्वनाथ घोष लिहितात, ते म्हणजे झाशीमधला एलिट चौराहा (चौक). त्या चौकाला त्याचे नाव कसे मिळाले आणि चौकाची वैशिष्ट्ये पुस्तकामध्ये वाचायला मिळतात. झाशीजवळील ओरछा येथील जहांगीर महाल बघून विश्वनाथ घोष जातात जगप्रसिद्ध खजुराहो व ओरछा हे मध्यप्रदेशात, तर झाशी उत्तरप्रदेशात आहे. भारताच्या नाभी स्थानी असलेले जंक्शनचे ठिकाण म्हणजे इटारसी. उत्तर भारताला दक्षिण भारतापासून वेगळे करणारी विंध्य पर्वतरांग ओलांडून होशंगाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणचा थांबा घेऊन गाडी पोहोचते इटारसीला. इटारसीतून फिरताना विश्वनाथ घोष यांना एखाद्या रेल्वे जंक्शनमुळे गावात चालणारे अर्थकारण समजते. आंध्रप्रदेशातील गुंटकल हे पश्चिम भारत व दक्षिण भारताला जोडणारे जंक्शन. मुंबईहून चेन्नई , बेंगरूळला जाणाऱ्या गाड्यांसाठी गुंटकल हे महत्वाचे जंक्शन. गुंटकल गावात एक स्थानिक रिक्षावाला त्यांना गुंटकलजवळच्या सैद मस्तान अली बाबा दर्ग्यात घेऊन जातो. या दर्ग्यात आलेल्या लोकांशी बोलताना त्यांना गुंटकलबद्दल आणखीनच माहिती मिळते. यानंतर विश्वनाथ घोष आपल्याला घेऊन जातात तामिळनाडूतल्या अरक्कोणम व जोलारपेट या रेल्वे जंक्शन असलेल्या गावांमध्ये. अरक्कोणम हे स्वतःची ओळख नसलेले ठिकाण. चेन्नईचे उपनगर असलेले, रेल्वेच्या दृष्टीने महत्वाचे. विश्वनाथ घोष जेव्हा अरक्कोणम स्टेशनच्या बाहेर पडतात, तेव्हा इथे रेल्वेस्टेशन शिवाय दुसरे बघण्यासारखे काहीच नाही हे त्यांच्या लक्षात येते. अधिक चौकशी केल्यावर त्यांना समजते कि अरक्कोणमला एक नाविक तळ आहे व या तळावरची विमानाची धावपट्टी हि जगातील सर्वात मोठी आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत होणाऱ्या संचलनात प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी विमान याच धावपट्टीवरून आकाशात झेपावतात. जोलारपेट हे चेन्नई व बेंगरूळ या रेल्वे मार्गावरचे मध्यावरचे जंक्शनचे ठिकाण. कर्नाटक व दक्षिण तामिळनाडूत जाणाऱ्या गाड्यांसाठी हे महत्वाचे जंक्शनचे ठिकाण. आर के नारायण यांच्या `मालगुडी डेज` मधल्या एका कथेत जोलारपेट जंक्शनचा उल्लेख येतो. जोलारपेट गावाजवळ रेल्वे स्टेशन व्यतिरिक्त बघण्याचे आणखीन एक ठिकाण म्हणजे `येलागिरी` हिल स्टेशन. येलागिरीची तुलना उटी किंवा कोडाईकॅनॉलशी होऊ शकत नाही. कारण तेवढी या हिल स्टेशनची `उंची` च नाही. रेल्वेच्या दृष्टीने जोलारपेट जंक्शनचे महत्व म्हणजे सालेम, चेन्नई व बेगरूळ या तीन विभागांना एकत्र आणणारे हे ठिकाण. या ठिकाणी रेल्वेचा चालकदल बदलतो. पुस्तकाच्या शेवटाकडे आपण पोहोचतो केरळातल्या शोरणुर जंक्शनला. केरळहून मुंबईला जाणाऱ्या गाड्यांसाठी हे जंक्शनचे ठिकाण. एकेकाळचे केरळचे मुघलसराई जणू काही. स्वांतत्र्य पूर्व काळात साऊथ इंडियन रेल्वे कंपनीने मद्रास व मँगलोर दरम्यान लांब पल्ल्याच्या गाड्या सुरु करेपर्यंत शोरणुरला फारसे महत्व नव्हते. मद्रास (आता चेन्नई) ते मँगलोर (आता मंगरुळ ) दरम्यान रेल्वेसेवा सुरु झाल्यावर कोचीच्या राजाने साऊथ इंडिया रेल्वे कंपनीला विनंती करून हि रेल्वे कोचीपर्यंत नेली व शोरणुर स्टेशनला महत्व आले. शोरणुर हे गाव केरळची गंगा समजल्या जाणाऱ्या `भारतपूझा` नदीच्या काठावर वसले आहे. भारतपूझा नदीच्या पलीकडे १९३० साली मल्याळी भाषेतील कवी वल्लाथोल नारायण मेनन यांनी स्थापन केलेल्या `केरळ कलामंडलम` या प्रायोगिक कला केंद्राला विश्वनाथ घोष भेट देतात. मुघलसराई पासून शोरणुरपर्यंतचा प्रवास विश्वनाथ घोष यांनी रेल्वे जंक्शन बाहेरचे गाव बघणे या उद्देशाने केलेला, पण शोरणुर ते नीलांबुर हा रेल्वे प्रवास मात्र प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी केला. हिरव्या कांच झाडांमधून वाट काढणारा रेल्वे मार्ग, आजूबाजूला उंचच उंच सागवानी झाडे. एखाद्याच प्रवाशाची चढउतार असेल अशी छोटी छोटी स्टेशने. असा दोन तासाचा प्रवास करत गाडी पोहोचते.नीलांबुर या शेवटच्या स्टेशनला. स्टेशनवर उतरल्यावर जवळपास कुठलेही गाव असेल अशी शक्यताही वाटणार नाही एवढ्या दाट जंगलातले हे स्टेशन. याच गाडीने विश्वनाथ घोष शोरणुरपर्यंतचा परतीचा प्रवास करतात. `चाय चाय` या पुस्तकाचा प्रवास खरे तर इथेच संपतो. पण वाचकाच्या मानत या जंक्शन बद्दल उत्सुकता निर्माण करून एका नवीन प्रवासाची सुरुवात होते एवढे मात्र नक्की. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.