* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHAI, CHAI : TRAVELS IN PLACES WHERE YOU STOP BUT NEVER GET OFF
  • Availability : Available
  • Translators : POORNIMA KUNDETKAR
  • ISBN : 9788184982909
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Print Books:
SOME YEARS AGO, A JOURNALIST EXPERIENCED SOMETHING OF AN EPIPHANIC MOMENT. BISHWANATH GHOSH HAD ALIGHTED ...FROM HIS TRAIN AT ITARSI STATION IN MADHYA PRADESH - TO STRETCH HIS LEGS AND GRAB A CUP OF TEA - BEFORE HE RESUMED HIS JOURNEY WHICH HAD BEGUN AT KANPUR AND WOULD END IN MADRAS. IT OCCURRED TO HIM, THEN, THAT MILLIONS OF PASSENGERS HAD KILLED PROBABLY BILLIONS OF HOURS AT RAILWAY JUNCTIONS SUCH AS ITARSI IN ORDER TO TAKE THE CONNECTING TRAIN TO THEIR DESTINATIONS. BUT NO ONE BOTHERED TO WONDER ABOUT WHAT LAY BEYOND THE PLATFORM. AND SO, GHOSH RESOLUTELY ROAMED THE TOWNS BEYOND THE STATION YARD — TOWNS SUCH AS MUGHAL SARAI, JHANSI, ITARSI, GUNTAKAL, JOLARPETTAI, ARAKKONAM AND SHORANUR — TO DISCOVER THE LIVES OF PEOPLE WHO MAY HAVE GROWN INURED TO THE CONSTANT WHISTLE OF PASSING TRAINS. IN CHAI, CHAI: TRAVELS IN PLACES WHERE YOU STOP BUT NEVER GET OFF BISHWANATH GHOSH COMBINES DESCRIPTIVE SKILLS WITH PERSONAL HISTORY AND HUMOUR TO BRILLIANTLY ILLUMINATE THESE OTHERWISE OBSCURE SMALL TOWNS – TOWNS THAT DENOTE THE REAL INDIA.
काही वर्षांपूर्वी एका पत्रकाराने काही वेगळेच क्षण अनुभवले होते.कानपूर ते मद्रास प्रवासादरम्यान इटारसी स्थानकावर विश्वनाथ घोष पाय मोकळे करायला आणि एक कप चहा प्यायला उतरले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, लाखो प्रवासी त्यांच्या मुक्कामाकडे जाणारी पुढची गाडी येण्यापूर्वी इटारसीसारख्या जंक्शनवर कदाचित करोडो तासांचा वेळ घालवत असतील. पण स्थानकापलीकडचे शहर कसे आहे हे शोधण्याची कधी कोणी तसदी घेत नाही. लेखक म्हणतो, ``भारतातील रेल्वे स्थानके ही शहरांना आणि गावांना जोडणा-या प्रदेशातील उत्कंठावर्धक अशी स्वतंत्र राज्ये आहेत. ती स्थानिक जीवनाच्या स्वादापासून पूर्णपणे भिन्न असतात. जणू दिल्लीतील एकाच अधिकाऱ्याच्या अखत्यारीतील तो एक वेगळाच प्रदेश असतो, रेल्वेच्या शिट्ट्यांच्या सहवासात लहानाचे मोठे झालेले लोक आणि त्यांचे जीवन याबद्दल जाणून घेण्यासाठी घोष मुद्दाम ह्या शहरांमध्ये फिरले. इटारसी, मुघलसराई, अरक्कोनम, जोलारपेटाई, झाशी, शोरानूर आणि गुंटाकल अशा विविध उत्कंठावर्धक नावांच्या शहरांमधून त्यांनी केलेला हा प्रवास....!``
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #CHAICHAI #CHAICHAI:TRAVELSINPLACESWHEREYOUSTOPBUTNEVERGETOFF #चायचाय #MEMOIR #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #POORNIMAKUNDETKAR BISHWANATH GHOSH "
Customer Reviews
  • Rating Starसाप्ताहिक सकाळ ६-२-२०२१

    अनोखा प्रवास दोन वस्तूंना एकत्र बांधण्यासाठी जशी गाठ बांधलेली असते. तशी दोन रेल्वे मार्गांना गाठीने एकत्र बांधून ठेवायची जागा म्हणजे रेल्वे जंक्शन. भारतासारख्या खंडप्राय देशात मोठ्या शहरांना रेल्वेने जोडायचे काम या रेल्वे जंक्शनरूपी गाठी करतात. रल्वे जंक्शनच्या बाहेर पडून त्या गावाचे दर्शन घडवणारे `Chai, Chai` हे विश्वनाथ घोष यांचे पुस्तक. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून चहाने भरलेल्या मातीच्या कुल्लडचे चित्र व रेल्वेरुळांचा फोटो पुस्तकांबद्दल खूप काही सांगतो. लेखक विश्वनाथ घोष यांनी या पुस्तकात उत्तरेतल्या मुघलसराई, झाशी व मध्य भारतातल्या इटारसीबद्दल, तर दक्षिणेतल्या गुंटकल, अरक्कोणम व जोलरपेट आणि शोरणूर या ठिकाणांबद्दल लिहिले आहे. मुघलसराई म्हटले कि डोळयांसमोर येते आशिया खंडातील सर्वात मोठे रेल्वे यार्ड किंवा बनारसला जाण्यासाठी उतरायचे ठिकाण पण स्टेशनबाहेरचे मुघलसराई विश्वनाथ घोष आपल्याला या पुस्तकातून दाखवतात.मुघलसराई स्टेशन जेवढे मोठे तेवढेच गाव मात्र लहान. मुघलसराई हे भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे जन्म ठिकाण लेखक विश्वनाथ घोष त्या रेल्वे कॉलनीतील शास्त्रीजींचे जन्मस्थान व त्यांची शाळा बघून येतात. या व्यतिरिक्त स्थानिक लोकांशी बोलताना लेखकाला मुघलसराई स्टेशनचे नामांतर `पंडित दीनदयाळ उपाध्याय` कसे झाले याचीही माहिती मिळते. पुस्तकाच्या पुढच्या प्रकरणात विश्वनाथ घोष आपल्याला घेऊन जातात झाशीला. ऐतिहासीक दृष्टया झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंमुळे झाशीला विशेष महत्व आहे. पण या झाशीचे आणखीन एक वैशिष्ट्य विश्वनाथ घोष लिहितात, ते म्हणजे झाशीमधला एलिट चौराहा (चौक). त्या चौकाला त्याचे नाव कसे मिळाले आणि चौकाची वैशिष्ट्ये पुस्तकामध्ये वाचायला मिळतात. झाशीजवळील ओरछा येथील जहांगीर महाल बघून विश्वनाथ घोष जातात जगप्रसिद्ध खजुराहो व ओरछा हे मध्यप्रदेशात, तर झाशी उत्तरप्रदेशात आहे. भारताच्या नाभी स्थानी असलेले जंक्शनचे ठिकाण म्हणजे इटारसी. उत्तर भारताला दक्षिण भारतापासून वेगळे करणारी विंध्य पर्वतरांग ओलांडून होशंगाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणचा थांबा घेऊन गाडी पोहोचते इटारसीला. इटारसीतून फिरताना विश्वनाथ घोष यांना एखाद्या रेल्वे जंक्शनमुळे गावात चालणारे अर्थकारण समजते. आंध्रप्रदेशातील गुंटकल हे पश्चिम भारत व दक्षिण भारताला जोडणारे जंक्शन. मुंबईहून चेन्नई , बेंगरूळला जाणाऱ्या गाड्यांसाठी गुंटकल हे महत्वाचे जंक्शन. गुंटकल गावात एक स्थानिक रिक्षावाला त्यांना गुंटकलजवळच्या सैद मस्तान अली बाबा दर्ग्यात घेऊन जातो. या दर्ग्यात आलेल्या लोकांशी बोलताना त्यांना गुंटकलबद्दल आणखीनच माहिती मिळते. यानंतर विश्वनाथ घोष आपल्याला घेऊन जातात तामिळनाडूतल्या अरक्कोणम व जोलारपेट या रेल्वे जंक्शन असलेल्या गावांमध्ये. अरक्कोणम हे स्वतःची ओळख नसलेले ठिकाण. चेन्नईचे उपनगर असलेले, रेल्वेच्या दृष्टीने महत्वाचे. विश्वनाथ घोष जेव्हा अरक्कोणम स्टेशनच्या बाहेर पडतात, तेव्हा इथे रेल्वेस्टेशन शिवाय दुसरे बघण्यासारखे काहीच नाही हे त्यांच्या लक्षात येते. अधिक चौकशी केल्यावर त्यांना समजते कि अरक्कोणमला एक नाविक तळ आहे व या तळावरची विमानाची धावपट्टी हि जगातील सर्वात मोठी आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत होणाऱ्या संचलनात प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी विमान याच धावपट्टीवरून आकाशात झेपावतात. जोलारपेट हे चेन्नई व बेंगरूळ या रेल्वे मार्गावरचे मध्यावरचे जंक्शनचे ठिकाण. कर्नाटक व दक्षिण तामिळनाडूत जाणाऱ्या गाड्यांसाठी हे महत्वाचे जंक्शनचे ठिकाण. आर के नारायण यांच्या `मालगुडी डेज` मधल्या एका कथेत जोलारपेट जंक्शनचा उल्लेख येतो. जोलारपेट गावाजवळ रेल्वे स्टेशन व्यतिरिक्त बघण्याचे आणखीन एक ठिकाण म्हणजे `येलागिरी` हिल स्टेशन. येलागिरीची तुलना उटी किंवा कोडाईकॅनॉलशी होऊ शकत नाही. कारण तेवढी या हिल स्टेशनची `उंची` च नाही. रेल्वेच्या दृष्टीने जोलारपेट जंक्शनचे महत्व म्हणजे सालेम, चेन्नई व बेगरूळ या तीन विभागांना एकत्र आणणारे हे ठिकाण. या ठिकाणी रेल्वेचा चालकदल बदलतो. पुस्तकाच्या शेवटाकडे आपण पोहोचतो केरळातल्या शोरणुर जंक्शनला. केरळहून मुंबईला जाणाऱ्या गाड्यांसाठी हे जंक्शनचे ठिकाण. एकेकाळचे केरळचे मुघलसराई जणू काही. स्वांतत्र्य पूर्व काळात साऊथ इंडियन रेल्वे कंपनीने मद्रास व मँगलोर दरम्यान लांब पल्ल्याच्या गाड्या सुरु करेपर्यंत शोरणुरला फारसे महत्व नव्हते. मद्रास (आता चेन्नई) ते मँगलोर (आता मंगरुळ ) दरम्यान रेल्वेसेवा सुरु झाल्यावर कोचीच्या राजाने साऊथ इंडिया रेल्वे कंपनीला विनंती करून हि रेल्वे कोचीपर्यंत नेली व शोरणुर स्टेशनला महत्व आले. शोरणुर हे गाव केरळची गंगा समजल्या जाणाऱ्या `भारतपूझा` नदीच्या काठावर वसले आहे. भारतपूझा नदीच्या पलीकडे १९३० साली मल्याळी भाषेतील कवी वल्लाथोल नारायण मेनन यांनी स्थापन केलेल्या `केरळ कलामंडलम` या प्रायोगिक कला केंद्राला विश्वनाथ घोष भेट देतात. मुघलसराई पासून शोरणुरपर्यंतचा प्रवास विश्वनाथ घोष यांनी रेल्वे जंक्शन बाहेरचे गाव बघणे या उद्देशाने केलेला, पण शोरणुर ते नीलांबुर हा रेल्वे प्रवास मात्र प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी केला. हिरव्या कांच झाडांमधून वाट काढणारा रेल्वे मार्ग, आजूबाजूला उंचच उंच सागवानी झाडे. एखाद्याच प्रवाशाची चढउतार असेल अशी छोटी छोटी स्टेशने. असा दोन तासाचा प्रवास करत गाडी पोहोचते.नीलांबुर या शेवटच्या स्टेशनला. स्टेशनवर उतरल्यावर जवळपास कुठलेही गाव असेल अशी शक्यताही वाटणार नाही एवढ्या दाट जंगलातले हे स्टेशन. याच गाडीने विश्वनाथ घोष शोरणुरपर्यंतचा परतीचा प्रवास करतात. `चाय चाय` या पुस्तकाचा प्रवास खरे तर इथेच संपतो. पण वाचकाच्या मानत या जंक्शन बद्दल उत्सुकता निर्माण करून एका नवीन प्रवासाची सुरुवात होते एवढे मात्र नक्की. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more