* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHAI, CHAI : TRAVELS IN PLACES WHERE YOU STOP BUT NEVER GET OFF
  • Availability : Available
  • Translators : POORNIMA KUNDETKAR
  • ISBN : 9788184982909
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Print Books:
SOME YEARS AGO, A JOURNALIST EXPERIENCED SOMETHING OF AN EPIPHANIC MOMENT. BISHWANATH GHOSH HAD ALIGHTED ...FROM HIS TRAIN AT ITARSI STATION IN MADHYA PRADESH - TO STRETCH HIS LEGS AND GRAB A CUP OF TEA - BEFORE HE RESUMED HIS JOURNEY WHICH HAD BEGUN AT KANPUR AND WOULD END IN MADRAS. IT OCCURRED TO HIM, THEN, THAT MILLIONS OF PASSENGERS HAD KILLED PROBABLY BILLIONS OF HOURS AT RAILWAY JUNCTIONS SUCH AS ITARSI IN ORDER TO TAKE THE CONNECTING TRAIN TO THEIR DESTINATIONS. BUT NO ONE BOTHERED TO WONDER ABOUT WHAT LAY BEYOND THE PLATFORM. AND SO, GHOSH RESOLUTELY ROAMED THE TOWNS BEYOND THE STATION YARD — TOWNS SUCH AS MUGHAL SARAI, JHANSI, ITARSI, GUNTAKAL, JOLARPETTAI, ARAKKONAM AND SHORANUR — TO DISCOVER THE LIVES OF PEOPLE WHO MAY HAVE GROWN INURED TO THE CONSTANT WHISTLE OF PASSING TRAINS. IN CHAI, CHAI: TRAVELS IN PLACES WHERE YOU STOP BUT NEVER GET OFF BISHWANATH GHOSH COMBINES DESCRIPTIVE SKILLS WITH PERSONAL HISTORY AND HUMOUR TO BRILLIANTLY ILLUMINATE THESE OTHERWISE OBSCURE SMALL TOWNS – TOWNS THAT DENOTE THE REAL INDIA.
काही वर्षांपूर्वी एका पत्रकाराने काही वेगळेच क्षण अनुभवले होते.कानपूर ते मद्रास प्रवासादरम्यान इटारसी स्थानकावर विश्वनाथ घोष पाय मोकळे करायला आणि एक कप चहा प्यायला उतरले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, लाखो प्रवासी त्यांच्या मुक्कामाकडे जाणारी पुढची गाडी येण्यापूर्वी इटारसीसारख्या जंक्शनवर कदाचित करोडो तासांचा वेळ घालवत असतील. पण स्थानकापलीकडचे शहर कसे आहे हे शोधण्याची कधी कोणी तसदी घेत नाही. लेखक म्हणतो, ``भारतातील रेल्वे स्थानके ही शहरांना आणि गावांना जोडणा-या प्रदेशातील उत्कंठावर्धक अशी स्वतंत्र राज्ये आहेत. ती स्थानिक जीवनाच्या स्वादापासून पूर्णपणे भिन्न असतात. जणू दिल्लीतील एकाच अधिकाऱ्याच्या अखत्यारीतील तो एक वेगळाच प्रदेश असतो, रेल्वेच्या शिट्ट्यांच्या सहवासात लहानाचे मोठे झालेले लोक आणि त्यांचे जीवन याबद्दल जाणून घेण्यासाठी घोष मुद्दाम ह्या शहरांमध्ये फिरले. इटारसी, मुघलसराई, अरक्कोनम, जोलारपेटाई, झाशी, शोरानूर आणि गुंटाकल अशा विविध उत्कंठावर्धक नावांच्या शहरांमधून त्यांनी केलेला हा प्रवास....!``
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #CHAICHAI #CHAICHAI:TRAVELSINPLACESWHEREYOUSTOPBUTNEVERGETOFF #चायचाय #MEMOIR #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #POORNIMAKUNDETKAR BISHWANATH GHOSH "
Customer Reviews
  • Rating Starसाप्ताहिक सकाळ ६-२-२०२१

    अनोखा प्रवास दोन वस्तूंना एकत्र बांधण्यासाठी जशी गाठ बांधलेली असते. तशी दोन रेल्वे मार्गांना गाठीने एकत्र बांधून ठेवायची जागा म्हणजे रेल्वे जंक्शन. भारतासारख्या खंडप्राय देशात मोठ्या शहरांना रेल्वेने जोडायचे काम या रेल्वे जंक्शनरूपी गाठी करतात. रल्वे जंक्शनच्या बाहेर पडून त्या गावाचे दर्शन घडवणारे `Chai, Chai` हे विश्वनाथ घोष यांचे पुस्तक. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून चहाने भरलेल्या मातीच्या कुल्लडचे चित्र व रेल्वेरुळांचा फोटो पुस्तकांबद्दल खूप काही सांगतो. लेखक विश्वनाथ घोष यांनी या पुस्तकात उत्तरेतल्या मुघलसराई, झाशी व मध्य भारतातल्या इटारसीबद्दल, तर दक्षिणेतल्या गुंटकल, अरक्कोणम व जोलरपेट आणि शोरणूर या ठिकाणांबद्दल लिहिले आहे. मुघलसराई म्हटले कि डोळयांसमोर येते आशिया खंडातील सर्वात मोठे रेल्वे यार्ड किंवा बनारसला जाण्यासाठी उतरायचे ठिकाण पण स्टेशनबाहेरचे मुघलसराई विश्वनाथ घोष आपल्याला या पुस्तकातून दाखवतात.मुघलसराई स्टेशन जेवढे मोठे तेवढेच गाव मात्र लहान. मुघलसराई हे भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे जन्म ठिकाण लेखक विश्वनाथ घोष त्या रेल्वे कॉलनीतील शास्त्रीजींचे जन्मस्थान व त्यांची शाळा बघून येतात. या व्यतिरिक्त स्थानिक लोकांशी बोलताना लेखकाला मुघलसराई स्टेशनचे नामांतर `पंडित दीनदयाळ उपाध्याय` कसे झाले याचीही माहिती मिळते. पुस्तकाच्या पुढच्या प्रकरणात विश्वनाथ घोष आपल्याला घेऊन जातात झाशीला. ऐतिहासीक दृष्टया झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंमुळे झाशीला विशेष महत्व आहे. पण या झाशीचे आणखीन एक वैशिष्ट्य विश्वनाथ घोष लिहितात, ते म्हणजे झाशीमधला एलिट चौराहा (चौक). त्या चौकाला त्याचे नाव कसे मिळाले आणि चौकाची वैशिष्ट्ये पुस्तकामध्ये वाचायला मिळतात. झाशीजवळील ओरछा येथील जहांगीर महाल बघून विश्वनाथ घोष जातात जगप्रसिद्ध खजुराहो व ओरछा हे मध्यप्रदेशात, तर झाशी उत्तरप्रदेशात आहे. भारताच्या नाभी स्थानी असलेले जंक्शनचे ठिकाण म्हणजे इटारसी. उत्तर भारताला दक्षिण भारतापासून वेगळे करणारी विंध्य पर्वतरांग ओलांडून होशंगाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणचा थांबा घेऊन गाडी पोहोचते इटारसीला. इटारसीतून फिरताना विश्वनाथ घोष यांना एखाद्या रेल्वे जंक्शनमुळे गावात चालणारे अर्थकारण समजते. आंध्रप्रदेशातील गुंटकल हे पश्चिम भारत व दक्षिण भारताला जोडणारे जंक्शन. मुंबईहून चेन्नई , बेंगरूळला जाणाऱ्या गाड्यांसाठी गुंटकल हे महत्वाचे जंक्शन. गुंटकल गावात एक स्थानिक रिक्षावाला त्यांना गुंटकलजवळच्या सैद मस्तान अली बाबा दर्ग्यात घेऊन जातो. या दर्ग्यात आलेल्या लोकांशी बोलताना त्यांना गुंटकलबद्दल आणखीनच माहिती मिळते. यानंतर विश्वनाथ घोष आपल्याला घेऊन जातात तामिळनाडूतल्या अरक्कोणम व जोलारपेट या रेल्वे जंक्शन असलेल्या गावांमध्ये. अरक्कोणम हे स्वतःची ओळख नसलेले ठिकाण. चेन्नईचे उपनगर असलेले, रेल्वेच्या दृष्टीने महत्वाचे. विश्वनाथ घोष जेव्हा अरक्कोणम स्टेशनच्या बाहेर पडतात, तेव्हा इथे रेल्वेस्टेशन शिवाय दुसरे बघण्यासारखे काहीच नाही हे त्यांच्या लक्षात येते. अधिक चौकशी केल्यावर त्यांना समजते कि अरक्कोणमला एक नाविक तळ आहे व या तळावरची विमानाची धावपट्टी हि जगातील सर्वात मोठी आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत होणाऱ्या संचलनात प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी विमान याच धावपट्टीवरून आकाशात झेपावतात. जोलारपेट हे चेन्नई व बेंगरूळ या रेल्वे मार्गावरचे मध्यावरचे जंक्शनचे ठिकाण. कर्नाटक व दक्षिण तामिळनाडूत जाणाऱ्या गाड्यांसाठी हे महत्वाचे जंक्शनचे ठिकाण. आर के नारायण यांच्या `मालगुडी डेज` मधल्या एका कथेत जोलारपेट जंक्शनचा उल्लेख येतो. जोलारपेट गावाजवळ रेल्वे स्टेशन व्यतिरिक्त बघण्याचे आणखीन एक ठिकाण म्हणजे `येलागिरी` हिल स्टेशन. येलागिरीची तुलना उटी किंवा कोडाईकॅनॉलशी होऊ शकत नाही. कारण तेवढी या हिल स्टेशनची `उंची` च नाही. रेल्वेच्या दृष्टीने जोलारपेट जंक्शनचे महत्व म्हणजे सालेम, चेन्नई व बेगरूळ या तीन विभागांना एकत्र आणणारे हे ठिकाण. या ठिकाणी रेल्वेचा चालकदल बदलतो. पुस्तकाच्या शेवटाकडे आपण पोहोचतो केरळातल्या शोरणुर जंक्शनला. केरळहून मुंबईला जाणाऱ्या गाड्यांसाठी हे जंक्शनचे ठिकाण. एकेकाळचे केरळचे मुघलसराई जणू काही. स्वांतत्र्य पूर्व काळात साऊथ इंडियन रेल्वे कंपनीने मद्रास व मँगलोर दरम्यान लांब पल्ल्याच्या गाड्या सुरु करेपर्यंत शोरणुरला फारसे महत्व नव्हते. मद्रास (आता चेन्नई) ते मँगलोर (आता मंगरुळ ) दरम्यान रेल्वेसेवा सुरु झाल्यावर कोचीच्या राजाने साऊथ इंडिया रेल्वे कंपनीला विनंती करून हि रेल्वे कोचीपर्यंत नेली व शोरणुर स्टेशनला महत्व आले. शोरणुर हे गाव केरळची गंगा समजल्या जाणाऱ्या `भारतपूझा` नदीच्या काठावर वसले आहे. भारतपूझा नदीच्या पलीकडे १९३० साली मल्याळी भाषेतील कवी वल्लाथोल नारायण मेनन यांनी स्थापन केलेल्या `केरळ कलामंडलम` या प्रायोगिक कला केंद्राला विश्वनाथ घोष भेट देतात. मुघलसराई पासून शोरणुरपर्यंतचा प्रवास विश्वनाथ घोष यांनी रेल्वे जंक्शन बाहेरचे गाव बघणे या उद्देशाने केलेला, पण शोरणुर ते नीलांबुर हा रेल्वे प्रवास मात्र प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी केला. हिरव्या कांच झाडांमधून वाट काढणारा रेल्वे मार्ग, आजूबाजूला उंचच उंच सागवानी झाडे. एखाद्याच प्रवाशाची चढउतार असेल अशी छोटी छोटी स्टेशने. असा दोन तासाचा प्रवास करत गाडी पोहोचते.नीलांबुर या शेवटच्या स्टेशनला. स्टेशनवर उतरल्यावर जवळपास कुठलेही गाव असेल अशी शक्यताही वाटणार नाही एवढ्या दाट जंगलातले हे स्टेशन. याच गाडीने विश्वनाथ घोष शोरणुरपर्यंतचा परतीचा प्रवास करतात. `चाय चाय` या पुस्तकाचा प्रवास खरे तर इथेच संपतो. पण वाचकाच्या मानत या जंक्शन बद्दल उत्सुकता निर्माण करून एका नवीन प्रवासाची सुरुवात होते एवढे मात्र नक्की. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more