* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WANDER WOMAN
  • Availability : Available
  • Translators : SUMITA BORSE
  • ISBN : 9788184986211
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 239
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AFTER YEARS OF COACHING HIGH-ACHIEVING WOMEN, MASTER COACH AND PERSONAL DEVELOPMENT EXPERT MARCIA REYNOLDS STARTED NOTICING SOMETHING TROUBLING: MANY OF THE CLIENTS WITH WHOM SHE WORKED WERE PLAGUED BY ANXIETY OVER THEIR OWN RESTLESS RESPONSES TO THE WORLD. THESE WOMEN WERE JUMPING JOBS REGULARLY, DEFINING AND REDEFINING THEIR RELATIONSHIP WITH THE MARKETPLACE, CONSTANTLY QUESTIONING THEIR ROLES AS WIVES AND MOTHERS AND SISTERS. DUBBING HER SUBJECTS "WANDER WOMEN," REYNOLDS FOUND THAT THE MENTORING AND PERSONAL DEVELOPMENT RESOURCES CURRENTLY AVAILABLE DON`T ADDRESS THIS AUDIENCE`S NEEDS. THEY DON`T WANT TO BALANCE THEIR LIVES; THEY WANT TO FIND PEACE OF MIND IN THE CHAOS. THEY DON`T NECESSARILY WANT TO LEARN HOW TO GAIN A SEAT IN THE BOARDROOM; THEY WANT PROJECTS THEY CAN RUN WITH OR BUSINESSES THEY CAN RUN ON THEIR OWN. THE PROBLEM ISN`T THEIR LEVEL OF STRESS; IT`S ABOUT KNOWING WHO THEY ARE AND WHAT THEY WANT TO ACCOMPLISH IN THIS ONE LIFETIME. WANDER WOMAN EXPLORES HOW GENERATIONAL SHIFTS AND CHANGING EXPECTATIONS OF WORKING WOMEN HAVE FOSTERED A NEW KIND OF RESTLESSNESS AMONG MANY. THROUGH REAL-LIFE STORIES SHE REVEALS THE HOPES AND DREAMS, DISAPPOINTMENTS AND CHALLENGES THIS GROUP OF HIGH-ACHIEVING WOMEN ARE FACING. AND, MOST IMPORTANTLY, SHE PROVIDES EXERCISES AND DEVELOPMENT STRATEGIES FOR READERS AS THEY MAKE THEIR JOURNEY TO PEACE AND FINALLY COME TO REST WITH A STRONG SENSE OF IDENTITY AND PURPOSE.
या प्रश्नांचा शोध घेताना मार्शिया यांच्या असं लक्षात आलं की, मुळातच या स्त्रिया त्यांच्या आत अशांत असल्याने त्या आतल्या कोलाहलातच धडपडत राहतात. त्यामुळे त्यांच्या तणावाचं व्यवस्थापन हा मुख्य प्रश्न नसून त्या कोण आहेत, आणि त्यांना आयुष्यात काय करायचं आहे, हे प्रश्न त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत. या शोधातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. या पुस्तकामध्ये अशा स्त्रियांच्या आशा-आकांक्षा-इच्छा यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच खरी उदाहरणं देऊन त्यांच्या आधारे, स्त्रीदेखील कशी यशस्वी होऊ शकते हे पटवून दिलं आहेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, आपल्या आतली शांतता आणि स्व-ओळख प्राप्त करण्यासाठी वेगवेगळे मानसिक व्यायाम आणि प्रत्यक्ष करून बघायचे कृती-कार्यक्रमही यात दिले आहेत. त्यामुळे हे पुस्तक स्त्रियांना उद्देशून लिहिलं असलं, तरी ते पुरुषांनीही मर्मदृष्टी देईल, हे नक्की.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #NAVINYACHYASHODHAT #WANDERWOMAN #नावीन्याच्याशोधात #MEMOIRTRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUMITABORSE #MARCIAREYNOLDS "
Customer Reviews
  • Rating StarPANJI, SUNDAY 19-07-2015

    उत्तम दिशादर्शक - वाँडर वूमन … कर्तबगार महिलांना शाप असतो अस्वस्थतेचा आंतरिक कोलाहलाचा. त्यांचे एक मन सतत कामाचा विचार करत असते, तर दुसरे सतत आपण नक्की कोण आहोत? आपली भूमिका, आपले महत्त्व, आपली किंमत घरात किती आहे या प्रश्नांवर झगडत असते. ‘वाँडर वून’ या मार्शिया रेनॉल्डस, लिखित व सुमती बोरसे यांनी त्यांच्या केलेल्या ‘नाविन्याच्या शोधात!’ या अनुवादात, लेखिकेने अनेक सत्ये उदाहरणे देऊन अशा अशांत स्त्रियांच्या आशा-आकांक्षा-इच्छा-प्रेरणा उद्देश यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. व्यक्तिमत्व विकास असे आपण ज्याला म्हणतो ते सर्व कार्यक्रम त्यात सामावलेले आहेत. हा ‘स्व’चा शोध काही सोपे काम नाही. अनेक आयामांतून या प्रश्नाकडे लेखिकेने पाहिले आहे. अनेक कर्तबगार स्त्रियांच्या मुलाखती, हकिकतीतून मिळवलेले हे ज्ञान उच्चपदस्थ पुरुषांसाठी, कंपन्यांच्या सीईओंसाठी अर्थपूर्ण व अत्यंत उपयोगी असे आहे. कॉर्पोरेट जगताच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या लिखाणात प्रशिक्षणतंत्र, मानसिक स्वाध्याय यांची रेलचेल आहे. कर्तबगार स्त्रियांसोबत काम करणाऱ्यांनी, कायम अतृप्त असणाऱ्यांसाठी आपली ऊर्जा मार्गी लावू इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक एक उत्तम मार्गदर्शक ठरेल. यातील संशोधने सखोल व प्रामाणिक आहे. कुठेही उपदेशाचा आव आणला असे नाही, परंतु प्रत्येक कहाणी, अनुभवाचा, इच्छेच्या अंती एक-एक बोध दिला गेला आहे. कामाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांकडेच भव्यदिव्य स्वप्न व इच्छा असतात. वास्तवाशी सामना होताच पदरी अनेकदा केवळ निराशाच येते. परंतु स्वत:कडेच भिन्न दृष्टिकोनातून बघता यावे, म्हणून केलेली मदत असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. तुम्हाला काहीतरी शिकवणे हा या पुस्तकाचा उद्देश नसून, तुमच्यात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणे हा खरा हेतू त्यामागे आहे. आयुष्यात जे शिकलात त्यांची अंमलबजावणी कशी करायची. आयुष्यातील काळोख्या कालखंडातून बाहेर कसे पडायचे. संधीच्या खिडकीचा उपयोग कसा करायचा. बरोबर मार्गाची निवड कशी करायची... अशा सर्व प्रश्नांची यथा योग्य उत्तरे सोदाहरण इथे मिळतील. महिलांवर लिहिलेले हे पुस्तक फक्त महिलांकरताच मात्र नाही. अनेक उच्चपदस्थ महिलांची फौज आपल्या उद्योगात बाळगणाऱ्या सर्व पुरुषांनी देखील हे पुस्तक जरूर वाचावे असा लेखिकेचा आग्रह आहे. त्यामुळे पुरुषांना मर्मदृष्टी मिळेल असेही ती म्हणते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.