* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WANDER WOMAN
  • Availability : Available
  • Translators : SUMITA BORSE
  • ISBN : 9788184986211
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 239
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AFTER YEARS OF COACHING HIGH-ACHIEVING WOMEN, MASTER COACH AND PERSONAL DEVELOPMENT EXPERT MARCIA REYNOLDS STARTED NOTICING SOMETHING TROUBLING: MANY OF THE CLIENTS WITH WHOM SHE WORKED WERE PLAGUED BY ANXIETY OVER THEIR OWN RESTLESS RESPONSES TO THE WORLD. THESE WOMEN WERE JUMPING JOBS REGULARLY, DEFINING AND REDEFINING THEIR RELATIONSHIP WITH THE MARKETPLACE, CONSTANTLY QUESTIONING THEIR ROLES AS WIVES AND MOTHERS AND SISTERS. DUBBING HER SUBJECTS "WANDER WOMEN," REYNOLDS FOUND THAT THE MENTORING AND PERSONAL DEVELOPMENT RESOURCES CURRENTLY AVAILABLE DON`T ADDRESS THIS AUDIENCE`S NEEDS. THEY DON`T WANT TO BALANCE THEIR LIVES; THEY WANT TO FIND PEACE OF MIND IN THE CHAOS. THEY DON`T NECESSARILY WANT TO LEARN HOW TO GAIN A SEAT IN THE BOARDROOM; THEY WANT PROJECTS THEY CAN RUN WITH OR BUSINESSES THEY CAN RUN ON THEIR OWN. THE PROBLEM ISN`T THEIR LEVEL OF STRESS; IT`S ABOUT KNOWING WHO THEY ARE AND WHAT THEY WANT TO ACCOMPLISH IN THIS ONE LIFETIME. WANDER WOMAN EXPLORES HOW GENERATIONAL SHIFTS AND CHANGING EXPECTATIONS OF WORKING WOMEN HAVE FOSTERED A NEW KIND OF RESTLESSNESS AMONG MANY. THROUGH REAL-LIFE STORIES SHE REVEALS THE HOPES AND DREAMS, DISAPPOINTMENTS AND CHALLENGES THIS GROUP OF HIGH-ACHIEVING WOMEN ARE FACING. AND, MOST IMPORTANTLY, SHE PROVIDES EXERCISES AND DEVELOPMENT STRATEGIES FOR READERS AS THEY MAKE THEIR JOURNEY TO PEACE AND FINALLY COME TO REST WITH A STRONG SENSE OF IDENTITY AND PURPOSE.
या प्रश्नांचा शोध घेताना मार्शिया यांच्या असं लक्षात आलं की, मुळातच या स्त्रिया त्यांच्या आत अशांत असल्याने त्या आतल्या कोलाहलातच धडपडत राहतात. त्यामुळे त्यांच्या तणावाचं व्यवस्थापन हा मुख्य प्रश्न नसून त्या कोण आहेत, आणि त्यांना आयुष्यात काय करायचं आहे, हे प्रश्न त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत. या शोधातूनच या पुस्तकाची र्नििमती झाली आहे. या पुस्तकामध्ये अशा स्त्रियांच्या आशा-आकांक्षा-इच्छा यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच खरी उदाहरणं देऊन त्यांच्या आधारे, स्त्रीदेखील कशी यशस्वी होऊ शकते हे पटवून दिलं आहेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, आपल्या आतली शांतता आणि स्व-ओळख प्राप्त करण्यासाठी वेगवेगळे मानसिक व्यायाम आणि प्रत्यक्ष करून बघायचे कृती-कार्यक्रमही यात दिले आहेत. त्यामुळे हे पुस्तक स्त्रियांना उद्देशून लिहिलं असलं, तरी ते पुरुषांनीही मर्मदृष्टी देईल, हे नक्की.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #NAVINYACHYASHODHAT #WANDERWOMAN #नावीन्याच्याशोधात #MEMOIRTRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUMITABORSE #MARCIAREYNOLDS "
Customer Reviews
  • Rating StarPANJI, SUNDAY 19-07-2015

    उत्तम दिशादर्शक - वाँडर वूमन … कर्तबगार महिलांना शाप असतो अस्वस्थतेचा आंतरिक कोलाहलाचा. त्यांचे एक मन सतत कामाचा विचार करत असते, तर दुसरे सतत आपण नक्की कोण आहोत? आपली भूमिका, आपले महत्त्व, आपली किंमत घरात किती आहे या प्रश्नांवर झगडत असते. ‘वाँडर वून’ या मार्शिया रेनॉल्डस, लिखित व सुमती बोरसे यांनी त्यांच्या केलेल्या ‘नाविन्याच्या शोधात!’ या अनुवादात, लेखिकेने अनेक सत्ये उदाहरणे देऊन अशा अशांत स्त्रियांच्या आशा-आकांक्षा-इच्छा-प्रेरणा उद्देश यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. व्यक्तिमत्व विकास असे आपण ज्याला म्हणतो ते सर्व कार्यक्रम त्यात सामावलेले आहेत. हा ‘स्व’चा शोध काही सोपे काम नाही. अनेक आयामांतून या प्रश्नाकडे लेखिकेने पाहिले आहे. अनेक कर्तबगार स्त्रियांच्या मुलाखती, हकिकतीतून मिळवलेले हे ज्ञान उच्चपदस्थ पुरुषांसाठी, कंपन्यांच्या सीईओंसाठी अर्थपूर्ण व अत्यंत उपयोगी असे आहे. कॉर्पोरेट जगताच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या लिखाणात प्रशिक्षणतंत्र, मानसिक स्वाध्याय यांची रेलचेल आहे. कर्तबगार स्त्रियांसोबत काम करणाऱ्यांनी, कायम अतृप्त असणाऱ्यांसाठी आपली ऊर्जा मार्गी लावू इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक एक उत्तम मार्गदर्शक ठरेल. यातील संशोधने सखोल व प्रामाणिक आहे. कुठेही उपदेशाचा आव आणला असे नाही, परंतु प्रत्येक कहाणी, अनुभवाचा, इच्छेच्या अंती एक-एक बोध दिला गेला आहे. कामाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांकडेच भव्यदिव्य स्वप्न व इच्छा असतात. वास्तवाशी सामना होताच पदरी अनेकदा केवळ निराशाच येते. परंतु स्वत:कडेच भिन्न दृष्टिकोनातून बघता यावे, म्हणून केलेली मदत असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. तुम्हाला काहीतरी शिकवणे हा या पुस्तकाचा उद्देश नसून, तुमच्यात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणे हा खरा हेतू त्यामागे आहे. आयुष्यात जे शिकलात त्यांची अंमलबजावणी कशी करायची. आयुष्यातील काळोख्या कालखंडातून बाहेर कसे पडायचे. संधीच्या खिडकीचा उपयोग कसा करायचा. बरोबर मार्गाची निवड कशी करायची... अशा सर्व प्रश्नांची यथा योग्य उत्तरे सोदाहरण इथे मिळतील. महिलांवर लिहिलेले हे पुस्तक फक्त महिलांकरताच मात्र नाही. अनेक उच्चपदस्थ महिलांची फौज आपल्या उद्योगात बाळगणाऱ्या सर्व पुरुषांनी देखील हे पुस्तक जरूर वाचावे असा लेखिकेचा आग्रह आहे. त्यामुळे पुरुषांना मर्मदृष्टी मिळेल असेही ती म्हणते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more