SUDHIR GADGIL

About Author

Birth Date : 24/11/1950


GRADUATES OF COMMERCE WITHOUT TAKING THE TRADITIONAL ROUTE; JOURNALISM, THEATER AND TV ARE THE MEDIUMS OF CHOICE FOR BUSINESS. MODERATOR CREATED A DISTINCT IDENTITY BY HOSTING PROGRAMS, TALK SHOWS, INTERVIEWS. FROM AMERICA TO MAURITIUS, HE BECAME KNOWN AS THE FIRST PROFESSIONAL IN MARATHI TO MODERATE VARIOUS INTERNATIONAL GATHERINGS TO LOCAL MEETINGS.

वाणिज्य शाखेचे पदवीधर असून पारंपरिक मार्ग न निवडता; पत्रकारिता, रंगमंच आणि टीव्ही या माध्यमांची व्यवसायासाठी निवड. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन, टॉक शो, मुलाखती घेणे यांद्वारे सूत्रसंचालक ही वेगळी ओळख निर्माण केली. अमेरिकेपासून मॉरिशसपर्यंत विविध आंतरराष्ट्रीय मेळाव्यांपासून स्थानिक सभा संमेलनापर्यंत सूत्रसंचालन करणारा मराठीतील पहिला व्यावसायिक अशी ओळख निर्माण केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंपासून उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, अभिनेत्री माधुरी दीक्षित ते चित्रकार मकबूल फिदा हुसेन, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले ते व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण अशा विविध क्षेत्रातील २८०० नामवंत व्यक्तींच्या रंगमंचावर, दूरदर्शनवर, टॉक शो-चॅट शोमध्ये मुलाखती घेण्याचा उच्चांक केला. सकाळ, सामना, केसरी, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, लोकमत, तरुण भारत, ऐक्य अशा विविध दैनिकांमधून तसेच साप्ताहिक मनोहर, तेजस्वी, चित्रलेखा, लोकप्रभा या नियतकालिकांमधून स्तंभलेखक, बातमीदार, पुरवणीसंपादक असा वृत्तपत्रक्षेत्रातला ३५ वर्षांचा अनुभव. मुक्काम , मुद्रा , लाइफस्टाइल , ताजंतवानं आणि झगमगती दुनिया या पुस्तकांचे लेखन. माध्यम रत्न पुरस्कार (२००१), आचार्य अत्रे पुरस्कार (२००२), दूरदर्शन सूत्रसंचालक, म.टा. सन्मान पुरस्कार (२००३), ग. दि. मा. पुरस्कार (२००४) अशांसारख्या अनेक पुरस्कारांचे मानकरी.
Sort by
Search by Discount
Show per page
Items 1 to 1 of 1 total
38 %
OFF
LIFE STYLE Rating Star
Add To Cart INR 220 INR 136

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more