* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TURNING POINTS
  • Availability : Available
  • Translators : ANJANI NARAVANE
  • ISBN : 9788184984408
  • Edition : 9
  • Publishing Year : NOVEMBER 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 152
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
  • Available in Combos :DR. A. P. J. ABDUL KALAM COMBO SET - 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IT WAS LIKE ANY OTHER DAY ON THE ANNA UNIVERSITY CAMPUS IN CHENNAI. I HAD DELIVERED A LECTURE VISION TO MISSION AND THE SESSION GOT EXTENDED FROM ONE HOUR TO TWO. I HAD LUNCH WITH A GROUP OF RESEARCH STUDENTS AND WENT BACK TO CLASS. AS I WAS RETURNING TO MY ROOMS IN THE EVENING THE VICE- CHANCELLOR, PROF. A. KALANIDHI, FELL IN STEP WITH ME. SOMEONE HAD BEEN FRANTICALLY TRYING TO GET IN TOUCH WITH ME THROUGH THE DAY, HE SAID. INDEED, THE PHONE WAS RINGING WHEN I ENTERED THE ROOM. WHEN I ANSWERED, A VOICE AT THE OTHER END SAID, THE PRIME MINISTER WANTS TO TALK WITH YOU ... SOME MONTHS EARLIER, I HAD LEFT MY POST AS PRINCIPAL SCIENTIFIC ADVISER TO THE GOVERNMENT OF INDIA, A CABINET-LEVEL POST, TO RETURN TO TEACHING. NOW, AS I SPOKE TO THE PM, ATAL BIHARI VAJPAYEE, MY LIFE WAS SET FOR AN UNEXPECTED CHANGE. TURNING POINTS TAKES UP THE INCREDIBLE KALAM STORY FROM WHERE WINGS OF FIRE LEFT OFF. IT BRINGS TOGETHER DETAILS FROM HIS CAREER AND PRESIDENCY THAT ARE NOT GENERALLY KNOWN AS HE SPEAKS OUT FOR THE FIRST TIME ON CERTAIN POINTS OF CONTROVERSY. IT OFFERS INSIGHT NOT ONLY INTO AN EXTRAORDINARY PERSONALITY BUT ALSO A VISION OF HOW A COUNTRY WITH A GREAT HERITAGE CAN BECOME GREAT IN ACCOMPLISHMENT, SKILLS AND ABILITIES THROUGH EFFORT, PERSEVERANCE AND CONFIDENCE. IT IS A CONTINUING SAGA, ABOVE ALL, OF A JOURNEY, INDIVIDUAL AND COLLECTIVE, THAT WILL TAKE INDIA TO 2020 AND BEYOND AS A DEVELOPED NATION.
चेन्नईतील अण्णा विद्यापीठाच्या आवारातला नेहमीसारखाच एक दिवस. माझे ‘संकल्पना ते ध्येय’ ह्या विषयावरचे व्याख्यान संपले होते आणि ते एक ऐवजी दोन तास चालले होते. संशोधनाचे काम करत असणा-या काही विद्याथ्र्यांबरोबर मी दुपारचे जेवण घेतले आणि परत वर्गाकडे गेलो. संध्याकाळी माझ्या खोलीवर परत जात होतो, तेव्हा विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रो. ए. कलानिधी बरोबरच आले. ते म्हणाले की, ‘कोणी तरी फोनवरून दिवसभर तुमच्याशी तातडीने संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते.’ आणि खरोखरीच; मी खोलीत पाऊल टाकले, तर फोन वाजतच होता. मी फोन उचलला, तेव्हा पलीकडच्या व्यक्तीने सांगितले, ‘‘पंतप्रधानांना आपल्याशी बोलायचे आहे.’’ काही महिन्यांपूर्वी ‘भारत सरकारचा प्रमुख शास्त्रीय सल्लागार’ ह्या केंद्रीय मंत्रिपदाच्या समकक्ष जागेचा राजीनामा देऊन मी अध्यापनाच्या कामावर परत रुजू झालो होतो. आत्ता जेव्हा मी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींशी बोलत होतो, तेव्हा माझे आयुष्य एका अनपेक्षित बदलाच्या टप्प्यावर होते. ‘टर्निंग पॉइंट्स’मधील कलाम यांची अशक्य वाटणारी कथा, ‘विंग्ज ऑफ फायर’ जेथे संपते, तेथून पुढे सुरू होते. ह्या कथेत त्यांच्या कारकिर्दीतल्या आणि राष्ट्रपतिपदाच्या कालावधीतल्या कोणाला फारशा ठाऊक नसलेल्या, काही विवादास्पद घटनांबद्दलच्या अनेक बारीकसारीक गोष्टी प्रथमच समोर येतात. यातून एका असामान्य व्यक्तिमत्त्वाचे अंतरंग तर समजतेच; पण प्रयत्न केले, चिकाटी ठेवली आणि आत्मविश्वास असला, तर अनेक सिद्धी मिळवून, कौशल्ये आणि सामथ्र्ये मिळवून महान वारसा असलेला हा देश पुन्हा महान कसा होऊ शकेल, त्याची संकल्पनाही मिळते. सर्वांत विशेष म्हणजे, ही गाथा आहे एका व्यक्तीने स्वत: आणि इतरांना बरोबर घेऊन केलेल्या प्रवासाची – जो प्रवास भारताला २०२०पर्यंत आणि नंतरही एक ‘विकसित राष्ट्र’ म्हणून उभे करेल.

No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #INDOMITABLE SPIRIT#A.P. J.ABDULKALAM #ADAMYAJIDDA #SUPRIYA VAKIL #सुप्रियावकील #अदम्य जिद्द #MAZI JIVAN YATRA# MY JOURNEY TRANSFORMING DREAMS INTO ACTIONS #TURNING POINTS #अंजनी नरवणे #ANJANI NARAWANE"
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 23-12-2012

    राष्ट्रपतीपदाची वाटावळणे!... ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना २००५ साली अनपेक्षितपणे राष्ट्रपतीपदाची संधी चालून आली. या पाच वर्षांच्या काळात त्यांनी देशातल्या कितीतरी तरुणांशी संवाद साधला. त्या काळातले काही अनुभव, भाषणे यांचा समावेश ‘टर्निंग पॉइंट्स’ पुस्कामध्ये करण्यात आला आहे. कलाम यांनी आपल्या एक पानी प्रस्तावनेत म्हटले आहे, ‘माझ्या आयुष्याबद्दलच्या लेखनातून अनेक भारतीयांच्या चिंता, अडचणी, आणि आकांक्षा यांचा प्रतिध्वनी उमटतो. मीही त्यांच्यासारखेच शिडीच्या अगदी खालच्या पायरीपासून आयुष्य सुरू केले.’ पण हे अनुभवपर पुस्तक त्यापुढेही जाते. या पुस्तकात एकंदर चौदा प्रकरणे आहेत. परिशिष्टामध्ये कलाम यांची एक मुलाखत आणि त्यांनी ध्येयसिद्धीसाठी मांडलेली एक योजना यांचा समावेश आहे. हे सर्व लेखन कलाम यांनी राष्ट्रपती असतानाच्या काळात केले आहे. ‘भारताचे गुणगान मी केव्हा गाऊ शकेन?’ या पहिल्याच लेखात कलाम यांनी राष्ट्रपती भवनातील शेवटच्या दिवसाविषयी लिहिले आहे. त्यानंतर अण्णा विद्यापीठात केलेले एक भाषण आहे. तिसऱ्या प्रकरणाचे शीर्षक आहे, ‘माझ्या आयुष्यात बदल घडविणारे सात महत्त्वाचे टप्पे’. ‘एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट’मध्ये वरिष्ठ साहाय्यक, ‘डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी’मध्ये संचालक, १९९८ मध्ये केलेल्या अणुचाचण्या, भारत सरकाचा शास्त्रीय विषयांचा सल्लागार, अण्णा विद्यापीठामध्ये तंत्रज्ञानाचा प्राध्यापक आणि राष्ट्रपती हे ते सात टप्पे. राष्ट्रपती असतानाच्या काळात कलाम यांना काही निर्णय घ्यावे लागले, त्या अनुभवावर आधारित लेखाला त्यांनी ‘विवादास्पद निर्णय’ असे शीर्षक दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेले कैदी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करतात. त्यावर कलाम यांनी कसा निर्णय घेतला याचा अनुभव वाचण्यासारखा आहे. याशिवाय युपीए-१ च्या वेळी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रपती भवनात कलाम यांच्याकडे गेल्या, तेव्हा त्यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करण्याला कलाम यांची तयारी होती, पण सोनिया गांधींनीच डॉ. मनमोहनसिंग यांचे नाव पंतप्रधानपदासाठी सुचवले. ही आपल्यासाठी चकित करणारी बाब होती असा खुलासा कलाम यांनी केला आहे. या विषयावर आजवर खूप उलटसुलट मते व्यक्त झाली आहेत. अनेक आक्षेप घेतले गेले आहेत. पण प्रत्यक्षात काय घडले ते पहिल्यांदाच या पुस्तकाच्या माध्यमातून कलाम यांनी जाहीर केले आहे. हा खुलासा खूपच महत्त्वाचा आहे. आपल्याला राष्ट्रपतीपदाच्या काळात दोन गोष्टींनी समाधान दिले, असे कलाम यांनी ‘राष्ट्रपतीपदानंतर...’ या प्रकरणात लिहिले आहे. ती म्हणजे आपण विद्यार्थ्यांमध्ये असलेली निराशा आणि उदासिनता काही प्रमाणात घालवली आणि त्यांना प्रोत्साहित केले. त्यामुळे भारताच्या प्रगतीचा वेग उंचावण्यास मदत झाली, असे त्यांनी लिहिले आहे. शिकवणे आणि संशोधन करणे या दोन्ही गोष्टी कलाम यांना आवडतात. ते राष्ट्रपतीपदी होते तेव्हा त्यांनी आपल्यापरीने मुलांना शिकवण्याचे काम केले. संशोधन हा तर त्यांचा जीवनधर्मच आहे. या सर्व लेखांमध्येही कलाम यांची दृष्टी, देशाविषयीची तळमळ, नम्रता, ऋजुता आणि त्यांची सचोटी जाणवते. कलाम यांचा दुर्दम्य आशावाद आणि तरुणांविषयीचा विश्वास हे पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. राष्ट्रपतीपदी असताना कलाम यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी जो संवाद साधला, चिकाटीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले आणि त्यांच्यापुढे मोठी स्वप्ने ठेवली, त्याची ही कहाणी आहे. पण याचबरोबर राष्ट्रपती असताना काळात घडलेल्या काही विवादास्पद घटनांबद्दलचे त्यांच्या बाजूचे तपशील त्यांनी या पुस्तकातून पहिल्यांदाच जाहीरपणे व्यक्त केले आहेत. ते तपशीलच इतके बोलके आहेत की त्यावर वेगळ्या भाष्याची गरजच राहत नाही. ते जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे. -प्रतिनिधी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more