* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IT WAS LIKE ANY OTHER DAY ON THE ANNA UNIVERSITY CAMPUS IN CHENNAI. I HAD DELIVERED A LECTURE VISION TO MISSION AND THE SESSION GOT EXTENDED FROM ONE HOUR TO TWO. I HAD LUNCH WITH A GROUP OF RESEARCH STUDENTS AND WENT BACK TO CLASS. AS I WAS RETURNING TO MY ROOMS IN THE EVENING THE VICE- CHANCELLOR, PROF. A. KALANIDHI, FELL IN STEP WITH ME. SOMEONE HAD BEEN FRANTICALLY TRYING TO GET IN TOUCH WITH ME THROUGH THE DAY, HE SAID. INDEED, THE PHONE WAS RINGING WHEN I ENTERED THE ROOM. WHEN I ANSWERED, A VOICE AT THE OTHER END SAID, THE PRIME MINISTER WANTS TO TALK WITH YOU ... SOME MONTHS EARLIER, I HAD LEFT MY POST AS PRINCIPAL SCIENTIFIC ADVISER TO THE GOVERNMENT OF INDIA, A CABINET-LEVEL POST, TO RETURN TO TEACHING. NOW, AS I SPOKE TO THE PM, ATAL BIHARI VAJPAYEE, MY LIFE WAS SET FOR AN UNEXPECTED CHANGE. TURNING POINTS TAKES UP THE INCREDIBLE KALAM STORY FROM WHERE WINGS OF FIRE LEFT OFF. IT BRINGS TOGETHER DETAILS FROM HIS CAREER AND PRESIDENCY THAT ARE NOT GENERALLY KNOWN AS HE SPEAKS OUT FOR THE FIRST TIME ON CERTAIN POINTS OF CONTROVERSY. IT OFFERS INSIGHT NOT ONLY INTO AN EXTRAORDINARY PERSONALITY BUT ALSO A VISION OF HOW A COUNTRY WITH A GREAT HERITAGE CAN BECOME GREAT IN ACCOMPLISHMENT, SKILLS AND ABILITIES THROUGH EFFORT, PERSEVERANCE AND CONFIDENCE. IT IS A CONTINUING SAGA, ABOVE ALL, OF A JOURNEY, INDIVIDUAL AND COLLECTIVE, THAT WILL TAKE INDIA TO 2020 AND BEYOND AS A DEVELOPED NATION.
चेन्नईतील अण्णा विद्यापीठाच्या आवारातला नेहमीसारखाच एक दिवस. माझे ‘संकल्पना ते ध्येय’ ह्या विषयावरचे व्याख्यान संपले होते आणि ते एक ऐवजी दोन तास चालले होते. संशोधनाचे काम करत असणा-या काही विद्याथ्र्यांबरोबर मी दुपारचे जेवण घेतले आणि परत वर्गाकडे गेलो. संध्याकाळी माझ्या खोलीवर परत जात होतो, तेव्हा विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रो. ए. कलानिधी बरोबरच आले. ते म्हणाले की, ‘कोणी तरी फोनवरून दिवसभर तुमच्याशी तातडीने संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते.’ आणि खरोखरीच; मी खोलीत पाऊल टाकले, तर फोन वाजतच होता. मी फोन उचलला, तेव्हा पलीकडच्या व्यक्तीने सांगितले, ‘‘पंतप्रधानांना आपल्याशी बोलायचे आहे.’’ काही महिन्यांपूर्वी ‘भारत सरकारचा प्रमुख शास्त्रीय सल्लागार’ ह्या केंद्रीय मंत्रिपदाच्या समकक्ष जागेचा राजीनामा देऊन मी अध्यापनाच्या कामावर परत रुजू झालो होतो. आत्ता जेव्हा मी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींशी बोलत होतो, तेव्हा माझे आयुष्य एका अनपेक्षित बदलाच्या टप्प्यावर होते. ‘टर्निंग पॉइंट्स’मधील कलाम यांची अशक्य वाटणारी कथा, ‘विंग्ज ऑफ फायर’ जेथे संपते, तेथून पुढे सुरू होते. ह्या कथेत त्यांच्या कारकिर्दीतल्या आणि राष्ट्रपतिपदाच्या कालावधीतल्या कोणाला फारशा ठाऊक नसलेल्या, काही विवादास्पद घटनांबद्दलच्या अनेक बारीकसारीक गोष्टी प्रथमच समोर येतात. यातून एका असामान्य व्यक्तिमत्त्वाचे अंतरंग तर समजतेच; पण प्रयत्न केले, चिकाटी ठेवली आणि आत्मविश्वास असला, तर अनेक सिद्धी मिळवून, कौशल्ये आणि सामथ्र्ये मिळवून महान वारसा असलेला हा देश पुन्हा महान कसा होऊ शकेल, त्याची संकल्पनाही मिळते. सर्वांत विशेष म्हणजे, ही गाथा आहे एका व्यक्तीने स्वत: आणि इतरांना बरोबर घेऊन केलेल्या प्रवासाची – जो प्रवास भारताला २०२०पर्यंत आणि नंतरही एक ‘विकसित राष्ट्र’ म्हणून उभे करेल.

No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #INDOMITABLE SPIRIT#A.P. J.ABDULKALAM #ADAMYAJIDDA #SUPRIYA VAKIL #सुप्रियावकील #अदम्य जिद्द #MAZI JIVAN YATRA# MY JOURNEY TRANSFORMING DREAMS INTO ACTIONS #TURNING POINTS #अंजनी नरवणे #ANJANI NARAWANE"
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 23-12-2012

    राष्ट्रपतीपदाची वाटावळणे!... ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना २००५ साली अनपेक्षितपणे राष्ट्रपतीपदाची संधी चालून आली. या पाच वर्षांच्या काळात त्यांनी देशातल्या कितीतरी तरुणांशी संवाद साधला. त्या काळातले काही अनुभव, भाषणे यांचा समावेश ‘टर्निंग पॉइंट्स’ पुस्कामध्ये करण्यात आला आहे. कलाम यांनी आपल्या एक पानी प्रस्तावनेत म्हटले आहे, ‘माझ्या आयुष्याबद्दलच्या लेखनातून अनेक भारतीयांच्या चिंता, अडचणी, आणि आकांक्षा यांचा प्रतिध्वनी उमटतो. मीही त्यांच्यासारखेच शिडीच्या अगदी खालच्या पायरीपासून आयुष्य सुरू केले.’ पण हे अनुभवपर पुस्तक त्यापुढेही जाते. या पुस्तकात एकंदर चौदा प्रकरणे आहेत. परिशिष्टामध्ये कलाम यांची एक मुलाखत आणि त्यांनी ध्येयसिद्धीसाठी मांडलेली एक योजना यांचा समावेश आहे. हे सर्व लेखन कलाम यांनी राष्ट्रपती असतानाच्या काळात केले आहे. ‘भारताचे गुणगान मी केव्हा गाऊ शकेन?’ या पहिल्याच लेखात कलाम यांनी राष्ट्रपती भवनातील शेवटच्या दिवसाविषयी लिहिले आहे. त्यानंतर अण्णा विद्यापीठात केलेले एक भाषण आहे. तिसऱ्या प्रकरणाचे शीर्षक आहे, ‘माझ्या आयुष्यात बदल घडविणारे सात महत्त्वाचे टप्पे’. ‘एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट’मध्ये वरिष्ठ साहाय्यक, ‘डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी’मध्ये संचालक, १९९८ मध्ये केलेल्या अणुचाचण्या, भारत सरकाचा शास्त्रीय विषयांचा सल्लागार, अण्णा विद्यापीठामध्ये तंत्रज्ञानाचा प्राध्यापक आणि राष्ट्रपती हे ते सात टप्पे. राष्ट्रपती असतानाच्या काळात कलाम यांना काही निर्णय घ्यावे लागले, त्या अनुभवावर आधारित लेखाला त्यांनी ‘विवादास्पद निर्णय’ असे शीर्षक दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेले कैदी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करतात. त्यावर कलाम यांनी कसा निर्णय घेतला याचा अनुभव वाचण्यासारखा आहे. याशिवाय युपीए-१ च्या वेळी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रपती भवनात कलाम यांच्याकडे गेल्या, तेव्हा त्यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करण्याला कलाम यांची तयारी होती, पण सोनिया गांधींनीच डॉ. मनमोहनसिंग यांचे नाव पंतप्रधानपदासाठी सुचवले. ही आपल्यासाठी चकित करणारी बाब होती असा खुलासा कलाम यांनी केला आहे. या विषयावर आजवर खूप उलटसुलट मते व्यक्त झाली आहेत. अनेक आक्षेप घेतले गेले आहेत. पण प्रत्यक्षात काय घडले ते पहिल्यांदाच या पुस्तकाच्या माध्यमातून कलाम यांनी जाहीर केले आहे. हा खुलासा खूपच महत्त्वाचा आहे. आपल्याला राष्ट्रपतीपदाच्या काळात दोन गोष्टींनी समाधान दिले, असे कलाम यांनी ‘राष्ट्रपतीपदानंतर...’ या प्रकरणात लिहिले आहे. ती म्हणजे आपण विद्यार्थ्यांमध्ये असलेली निराशा आणि उदासिनता काही प्रमाणात घालवली आणि त्यांना प्रोत्साहित केले. त्यामुळे भारताच्या प्रगतीचा वेग उंचावण्यास मदत झाली, असे त्यांनी लिहिले आहे. शिकवणे आणि संशोधन करणे या दोन्ही गोष्टी कलाम यांना आवडतात. ते राष्ट्रपतीपदी होते तेव्हा त्यांनी आपल्यापरीने मुलांना शिकवण्याचे काम केले. संशोधन हा तर त्यांचा जीवनधर्मच आहे. या सर्व लेखांमध्येही कलाम यांची दृष्टी, देशाविषयीची तळमळ, नम्रता, ऋजुता आणि त्यांची सचोटी जाणवते. कलाम यांचा दुर्दम्य आशावाद आणि तरुणांविषयीचा विश्वास हे पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. राष्ट्रपतीपदी असताना कलाम यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी जो संवाद साधला, चिकाटीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले आणि त्यांच्यापुढे मोठी स्वप्ने ठेवली, त्याची ही कहाणी आहे. पण याचबरोबर राष्ट्रपती असताना काळात घडलेल्या काही विवादास्पद घटनांबद्दलचे त्यांच्या बाजूचे तपशील त्यांनी या पुस्तकातून पहिल्यांदाच जाहीरपणे व्यक्त केले आहेत. ते तपशीलच इतके बोलके आहेत की त्यावर वेगळ्या भाष्याची गरजच राहत नाही. ते जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे. -प्रतिनिधी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more