* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TYANCHYA SINDROMCHI KATHA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184980417
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A TRUE STORY. IT DESCRIBES THE G. B. SYNDROME IN DETAIL. THIS SYNDROME HAS ATTACKED THE BHAGWAT FAMILY TWICE, FIRST THE MOTHER OF THE FAMILY AND THEN THE SON OF THE FAMILY. THE DAUGHTER-IN-LAW OF THE FAMILY HAS DESCRIBED THE SIGNS OF THE SYNDROME IN DETAIL WITH WHOLE AND SOLE INTENTION OF INFORMING PEOPLE, PRESENTING THE PERFECT PICTURE OF THIS CRITICAL ILLNESS. G.B. SYNDROME IS AN ILLNESS WHICH ATTACKS THE IMMUNITY POWER OF THE PATIENT MAKING IT DISASTROUS FOR THE PATIENT. THE VIRUS OF THIS DISEASE STARTS WITH THE NERVES, SLOWLY TURNING ITS ATTENTION TOWARDS VICTIM`S TOES, LEGS, FINGERS, HANDS, LUNGS AND THEN THE TRACHEA ITSELF. THIS DISEASE IS VERY RARE. ONE PERSON IN 2-3 LAC PEOPLE IS AFFECTED WITH THIS DISEASE. THIS BOOK DESCRIBES THE EXPERIENCE OF THE BHAGWAT COUPLE. EVEN THOUGH, IT WAS MR. BHAGWAT WHO WAS THE VICTIM, MRS. BHAGWAT WAS THE SILENT PARTICIPANT OF ALL THAT WAS GOING AROUND. SHE WAS SEEING HIS PAIN, AND SUFFERING ALONG WITH HIM. TOGETHER, THEY BOTH FACED THE UPS AND DOWNS OF THE DISEASE, THE MENTAL AND PHYSICAL STRESSES, THEIR EVERLASTING BOND, THE STRENGTHENING OF THEIR RELATIONSHIP.... MRS. BHAGWAT HAS VERY SENSIBLY DESCRIBED ALL THIS IN HER WORDS, IN A NARRATIVE MANNER.THIS BOOK DOES NOT JUST GIVE DETAILS OF THE DISEASE; ON THE CONTRARY, IT GIVES US AN INSIGHT, COMPELLING US TO THINK MORE ABOUT OUR SELF, INWARDLY AND OUTWARDLY.
स्वत:ची रोगप्रतिकारक शक्ती स्वत:साठीच घातक ठरवणारा आजार म्हणजे जीबी सिंड्रोम! मज्जातंतू हळूहळू निकामी करून या आजाराचा विषाणू बोटं, पाय, हात आणि पुढेपुढे फुफ्फुसं आणि श्वासनलिकेवरही हल्ला करतो. लाखामागे केवळ दोन-तीन जणांना होणारा असा हा आजार! चारुदत्त भागवतांना अशा आजाराने पछाडल्यानंतर त्याच्याशी झगडताना ते व त्यांची पत्नी कल्पना यांना आलेले अनुभव, तीव्र मानसिक चढ-उतार आणि त्यातून वाढीला लागलेली श्रद्धा यांचे संवेदनक्षम चित्रण कल्पना चारुदत्त भागवत यांनी या कथनातून केले आहे. म्हणूनच निव्वळ भयंकर आजाराच्या पुढे जाऊन हे कथन वाचकाला शरीर-मनाबद्दल अधिकाधिक प्रगल्भ करते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #KALPANACHARUDATTA #TYANCHYASYNDROMCHIKATHA #MEMOIR #त्यांच्यासिंड्रोमचीकथा"
Customer Reviews
  • Rating StarSAPTAHIK SAKAL 10-4-2010

    ‘एका लढाईतील अनुभव’… अलीकडे प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकांकडे नजर टाकल्यास आरोग्यविषयावरील अनेक पुस्तके सध्या येत आहेत, हे जाणवते. आरोग्याची काळजी, विशिष्ट रोगाची माहिती, उपचारपद्धती, एखाद्या रोगावर मात केलेल्या रुग्णाचे अनुभवकथन, हॉस्पिटलची माहिती, डॉकटरांचे अनुभवकथन, डॉक्टरांनी राबविलेल्या एखाद्या प्रकल्पाची माहिती, शारीरिक व्याधींचा मनाशी असलेला संबंध, मनोविकार, मानसोपचार इत्यादी. अशा अनेक पुस्तकांद्वारा आरोग्याची काळजी, आरोग्याबद्दलची जाण, निरोगी जगण्याचे महत्व पटवून देण्याचे काम होत असल्याचे दिसते. ‘त्यांच्या सिंड्रोमची कथा’ हे कल्पना चारुदत्त यांनी लिहिलेले पुस्तक ‘जीबी सिंड्रोम’ या आजारावर आधारित आहे. मज्जातंतू हळूहळू निकामी करणारे या आजारातील विषाणू बोटं, पाय, हात आणि पुढे-पुढे फुप्फुसं आणि श्वासनलिकेवर हल्ला करतात. स्वत:ची रोगप्रतिकारक शक्ती स्वत:साठीच घातक ठरविणे, हे ‘जीबी सिंड्रोम’चे लक्षण! चारुदत्त भागवतांना अशा आजाराने पछाडल्यानंतर त्यांच्याशी झगडताना ते व त्यांच्या पत्नी कल्पना यांना आलेले अनुभव या पुस्तकात सांगितले आहेत. जरा, व्याधी आणि मृत्यू यांचे दर्शन झाल्यानंतर राजपुत्र सिद्धार्थाला सत्य शोधण्याचा, शाश्वताचा शोध घेण्याचा ध्यास लागला. संसारातून मुक्त होऊन तो कठोर साधना करु लागला. या साधनेतूनच त्याला संसारातील क्षणभंगुरता, क्षणिकता, सुख-दु:खे समे कृत्वा या ‘सम्यक दृष्टी’चा प्रत्यय आला, परंतु तो गौतम बुद्ध होता. सर्वसामान्य माणूस त्याच्या घरामध्ये आप्त-मित्रांमध्ये, अवती-भवती ‘जरा-व्याधी-मृत्यू’चे अनुभव घेतो. त्यातली सारी अनिश्चतता, रोकडा व्यवहार, तऱ्हेवाईक माणसे, भावनांचे चढते-उतरते आवेग, मनावरील प्रचंड ताण, रोजचे सुरळीत व्यवहार बिघडवून टाकणारी धावपळ, छोट्या-साध्या गोष्टींसाठीसुद्धा प्रसंगी वंचित राहणे, यांचा अनुभव घेतो. त्यातून त्याची जगण्याची समज वाढते. मनाचा कमकुवतपणा कमी होतो. जगण्याची अनिश्चितता, अर्थपूर्णता आणि निरर्थकता पाहण्यासाठी त्याचे मन सरावते. अखेरीस आपण आपल्यासहित इतरही ‘माणसंच’ आहोत याचा प्रत्यय आल्यानंतरची करुणा निर्माण होते. मग एका वेगळ्या संदर्भात महाभारताने कुंतीने श्रीकृष्णाकडे दु:ख का मागितले, याचे महत्व पटते. कल्पना चारुदत्त यांच्या अनुभव कथनामधून हे सारे आठवत राहते. ‘माझ्या मना बन दगड’ हे म्हणण्याआधी ‘मेणाहून मऊ’ असणारे वितळणारे, पाघळणारे मन स्वत:लाच सांभाळावे लागते. ओळखावे लागते. स्वत:च्या मनातील भावना-विचारांकडे त्रयस्थपणे पाहण्याची, स्वत:ला शोधण्याची गरज कल्पना चारुदत्त यांच्या कथनामधून ठळकपणे पुढे येते. रुग्ण आणि रुग्णाची काळजी घेणारे आप्त-मित्र यांच्या नात्याची कसाटी लागणे, रुग्णाचे जगणेच पणाला लागणे, डॉक्टरांचे निदान, हलगर्जीपणा, रुग्णाबददलचे डॉक्टरांनी आणि त्याच्या आप्त-सोबत्यांनी लावलेले अंदाज चुकवून रुग्णाचे प्रकृतीमान बिघडणे-सुधारणे हा साराच प्रकार जीवघेणा असतो. ‘येथे मनुष्यमात्राचे काय आहे’, असा निराशावादी सुरही मनात डोकावून जातो, पण साऱ्यावर मात करीत मनोबल, आत्मविश्वास स्वत:लाच प्राप्त करावा लागतो. आत्मबळ प्राप्तीचा मनाचा प्रवास कल्पना चारुदत्त यांच्या अनुभवातून उलगडतो. मानवी नात्यांचे कोवळे धागे, मानवी शरीराचे आजारपणात येणारे वेगळे ‘शरीरभान’, शरीराचे महत्वपूर्ण अस्तित्व जाणवणे, आपल्याकडून एरवी आपल्या शरीराची होणारी प्रचंड हेळसांड, आपल्या शरीराचा-मनाचा परस्परांशी होणारा अर्थपूर्ण संवाद ही सारी वैशिष्ट्ये या अनुभवकथनातून व्यक्त होतात. स्वमदत करण्यासाठी पुढे सरसावणे, आत्मबळ, आत्मसंरक्षण प्राप्तीसाठी स्वत:लाच कठोर, कणखर करणारे अनुभवकथन असे त्याचे वर्णन करता येईल. -रुपाली शिंदे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more