* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TYANCHYA SINDROMCHI KATHA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184980417
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A TRUE STORY. IT DESCRIBES THE G. B. SYNDROME IN DETAIL. THIS SYNDROME HAS ATTACKED THE BHAGWAT FAMILY TWICE, FIRST THE MOTHER OF THE FAMILY AND THEN THE SON OF THE FAMILY. THE DAUGHTER-IN-LAW OF THE FAMILY HAS DESCRIBED THE SIGNS OF THE SYNDROME IN DETAIL WITH WHOLE AND SOLE INTENTION OF INFORMING PEOPLE, PRESENTING THE PERFECT PICTURE OF THIS CRITICAL ILLNESS. G.B. SYNDROME IS AN ILLNESS WHICH ATTACKS THE IMMUNITY POWER OF THE PATIENT MAKING IT DISASTROUS FOR THE PATIENT. THE VIRUS OF THIS DISEASE STARTS WITH THE NERVES, SLOWLY TURNING ITS ATTENTION TOWARDS VICTIM`S TOES, LEGS, FINGERS, HANDS, LUNGS AND THEN THE TRACHEA ITSELF. THIS DISEASE IS VERY RARE. ONE PERSON IN 2-3 LAC PEOPLE IS AFFECTED WITH THIS DISEASE. THIS BOOK DESCRIBES THE EXPERIENCE OF THE BHAGWAT COUPLE. EVEN THOUGH, IT WAS MR. BHAGWAT WHO WAS THE VICTIM, MRS. BHAGWAT WAS THE SILENT PARTICIPANT OF ALL THAT WAS GOING AROUND. SHE WAS SEEING HIS PAIN, AND SUFFERING ALONG WITH HIM. TOGETHER, THEY BOTH FACED THE UPS AND DOWNS OF THE DISEASE, THE MENTAL AND PHYSICAL STRESSES, THEIR EVERLASTING BOND, THE STRENGTHENING OF THEIR RELATIONSHIP.... MRS. BHAGWAT HAS VERY SENSIBLY DESCRIBED ALL THIS IN HER WORDS, IN A NARRATIVE MANNER.THIS BOOK DOES NOT JUST GIVE DETAILS OF THE DISEASE; ON THE CONTRARY, IT GIVES US AN INSIGHT, COMPELLING US TO THINK MORE ABOUT OUR SELF, INWARDLY AND OUTWARDLY.
स्वत:ची रोगप्रतिकारक शक्ती स्वत:साठीच घातक ठरवणारा आजार म्हणजे जीबी सिंड्रोम! मज्जातंतू हळूहळू निकामी करून या आजाराचा विषाणू बोटं, पाय, हात आणि पुढेपुढे फुफ्फुसं आणि श्वासनलिकेवरही हल्ला करतो. लाखामागे केवळ दोन-तीन जणांना होणारा असा हा आजार! चारुदत्त भागवतांना अशा आजाराने पछाडल्यानंतर त्याच्याशी झगडताना ते व त्यांची पत्नी कल्पना यांना आलेले अनुभव, तीव्र मानसिक चढ-उतार आणि त्यातून वाढीला लागलेली श्रद्धा यांचे संवेदनक्षम चित्रण कल्पना चारुदत्त भागवत यांनी या कथनातून केले आहे. म्हणूनच निव्वळ भयंकर आजाराच्या पुढे जाऊन हे कथन वाचकाला शरीर-मनाबद्दल अधिकाधिक प्रगल्भ करते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #KALPANACHARUDATTA #TYANCHYASYNDROMCHIKATHA #MEMOIR #त्यांच्यासिंड्रोमचीकथा"
Customer Reviews
  • Rating StarSAPTAHIK SAKAL 10-4-2010

    ‘एका लढाईतील अनुभव’… अलीकडे प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकांकडे नजर टाकल्यास आरोग्यविषयावरील अनेक पुस्तके सध्या येत आहेत, हे जाणवते. आरोग्याची काळजी, विशिष्ट रोगाची माहिती, उपचारपद्धती, एखाद्या रोगावर मात केलेल्या रुग्णाचे अनुभवकथन, हॉस्पिटलची माहिती, डॉकटरांचे अनुभवकथन, डॉक्टरांनी राबविलेल्या एखाद्या प्रकल्पाची माहिती, शारीरिक व्याधींचा मनाशी असलेला संबंध, मनोविकार, मानसोपचार इत्यादी. अशा अनेक पुस्तकांद्वारा आरोग्याची काळजी, आरोग्याबद्दलची जाण, निरोगी जगण्याचे महत्व पटवून देण्याचे काम होत असल्याचे दिसते. ‘त्यांच्या सिंड्रोमची कथा’ हे कल्पना चारुदत्त यांनी लिहिलेले पुस्तक ‘जीबी सिंड्रोम’ या आजारावर आधारित आहे. मज्जातंतू हळूहळू निकामी करणारे या आजारातील विषाणू बोटं, पाय, हात आणि पुढे-पुढे फुप्फुसं आणि श्वासनलिकेवर हल्ला करतात. स्वत:ची रोगप्रतिकारक शक्ती स्वत:साठीच घातक ठरविणे, हे ‘जीबी सिंड्रोम’चे लक्षण! चारुदत्त भागवतांना अशा आजाराने पछाडल्यानंतर त्यांच्याशी झगडताना ते व त्यांच्या पत्नी कल्पना यांना आलेले अनुभव या पुस्तकात सांगितले आहेत. जरा, व्याधी आणि मृत्यू यांचे दर्शन झाल्यानंतर राजपुत्र सिद्धार्थाला सत्य शोधण्याचा, शाश्वताचा शोध घेण्याचा ध्यास लागला. संसारातून मुक्त होऊन तो कठोर साधना करु लागला. या साधनेतूनच त्याला संसारातील क्षणभंगुरता, क्षणिकता, सुख-दु:खे समे कृत्वा या ‘सम्यक दृष्टी’चा प्रत्यय आला, परंतु तो गौतम बुद्ध होता. सर्वसामान्य माणूस त्याच्या घरामध्ये आप्त-मित्रांमध्ये, अवती-भवती ‘जरा-व्याधी-मृत्यू’चे अनुभव घेतो. त्यातली सारी अनिश्चतता, रोकडा व्यवहार, तऱ्हेवाईक माणसे, भावनांचे चढते-उतरते आवेग, मनावरील प्रचंड ताण, रोजचे सुरळीत व्यवहार बिघडवून टाकणारी धावपळ, छोट्या-साध्या गोष्टींसाठीसुद्धा प्रसंगी वंचित राहणे, यांचा अनुभव घेतो. त्यातून त्याची जगण्याची समज वाढते. मनाचा कमकुवतपणा कमी होतो. जगण्याची अनिश्चितता, अर्थपूर्णता आणि निरर्थकता पाहण्यासाठी त्याचे मन सरावते. अखेरीस आपण आपल्यासहित इतरही ‘माणसंच’ आहोत याचा प्रत्यय आल्यानंतरची करुणा निर्माण होते. मग एका वेगळ्या संदर्भात महाभारताने कुंतीने श्रीकृष्णाकडे दु:ख का मागितले, याचे महत्व पटते. कल्पना चारुदत्त यांच्या अनुभव कथनामधून हे सारे आठवत राहते. ‘माझ्या मना बन दगड’ हे म्हणण्याआधी ‘मेणाहून मऊ’ असणारे वितळणारे, पाघळणारे मन स्वत:लाच सांभाळावे लागते. ओळखावे लागते. स्वत:च्या मनातील भावना-विचारांकडे त्रयस्थपणे पाहण्याची, स्वत:ला शोधण्याची गरज कल्पना चारुदत्त यांच्या कथनामधून ठळकपणे पुढे येते. रुग्ण आणि रुग्णाची काळजी घेणारे आप्त-मित्र यांच्या नात्याची कसाटी लागणे, रुग्णाचे जगणेच पणाला लागणे, डॉक्टरांचे निदान, हलगर्जीपणा, रुग्णाबददलचे डॉक्टरांनी आणि त्याच्या आप्त-सोबत्यांनी लावलेले अंदाज चुकवून रुग्णाचे प्रकृतीमान बिघडणे-सुधारणे हा साराच प्रकार जीवघेणा असतो. ‘येथे मनुष्यमात्राचे काय आहे’, असा निराशावादी सुरही मनात डोकावून जातो, पण साऱ्यावर मात करीत मनोबल, आत्मविश्वास स्वत:लाच प्राप्त करावा लागतो. आत्मबळ प्राप्तीचा मनाचा प्रवास कल्पना चारुदत्त यांच्या अनुभवातून उलगडतो. मानवी नात्यांचे कोवळे धागे, मानवी शरीराचे आजारपणात येणारे वेगळे ‘शरीरभान’, शरीराचे महत्वपूर्ण अस्तित्व जाणवणे, आपल्याकडून एरवी आपल्या शरीराची होणारी प्रचंड हेळसांड, आपल्या शरीराचा-मनाचा परस्परांशी होणारा अर्थपूर्ण संवाद ही सारी वैशिष्ट्ये या अनुभवकथनातून व्यक्त होतात. स्वमदत करण्यासाठी पुढे सरसावणे, आत्मबळ, आत्मसंरक्षण प्राप्तीसाठी स्वत:लाच कठोर, कणखर करणारे अनुभवकथन असे त्याचे वर्णन करता येईल. -रुपाली शिंदे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.