* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE NO.1 LADIES` DETECTIVE AGENCY INTRODUCED THE WORLD TO THE ONE AND ONLY PRECIOUS RAMOTSWE - THE ENGAGING AND SASSY OWNER OF BOTSWANA`S ONLY DETECTIVE AGENCY. TEARS OF THE GIRAFFE, MCCALL SMITH`S SECOND BOOK, TAKES US FURTHER INTO THIS WORLD AS WE FOLLOW MAMA RAMOTSWE INTO MORE DARING SITUATIONS ... AMONG HER CASES THIS TIME ARE WAYWARD WIVES, UNSCRUPULOUS MAIDS, AND THE CHALLENGE TO RESOLVE A MOTHER`S PAIN FOR HER SON WHO IS LONG LOST ON THE AFRICAN PLAINS. INDEED, MMA RAMOTSWE`S OWN IMPENDING MARRIAGE TO THE MOST GENTLEMANLY OF MEN, MR J.L.B. MATEKONI, THE PROMOTION OF MMA`S SECRETARY TO THE DIZZY HEIGHTS OF ASSISTANT DETECTIVE, AND THE ARRIVAL OF NEW MEMBERS TO THE MATEKONI FAMILY, ALL BREW UP THE MOST HUMOROUS AND CHARMINGLY ENTERTAINING OF TALES. * TEARS OF THE GIRAFFE WAS SELECTED AS ONE OF THE GUARDIAN`S TOP TEN
दहा वर्षांपूर्वी घडलेल्या एका अपघाती मृत्यूसंबंधीची केस–प्रेश्यसच्या आत्तापर्यंतच्या कारकीर्दीतील सर्वांत कठीण, गुंतागुंतीची केस... एक विशीतला अमेरिकन तरुण बोट्स्वानातून अचानक, काहीही मागमूस न ठेवता नाहीसा होतो. सर्व प्रकारे शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागत नाही. हे समजल्यानंतर पोलीस ती केस कायमची बंद करून टाकतात. प्रेश्यस ती का आणि कशी उलगडते हे वाचूनच पाहायला हवं... व्यावसायिक आघाडीवर यशस्वीपणे, दमदारपणे पुढे जात असताना तिच्या वैयक्तिक जीवनातही काही खळबळजनक घटना घडत असतात... नव्या जबाबदा-या अनपेक्षितपणे अंगावर कोसळत असतात. अर्थात, तिच्या मदतीसाठी दोन हक्काचे हात, नव्हे जीवनभराची साथ तिला लाभणार असते, ती जे. एल. बी. मातेकोनींच्या रूपात... व्यवसायानं मेकॅनिक ! त्यांचा नेहमी संबंध येतो तो निर्जीव गाड्यांशी, त्यातील यंत्रभागांशी, इंजिनांशी! ...पण प्रेश्यसमध्ये आणि त्यांच्यात एक मोठं साम्य असते. दोघांच्या हृदयात माणुसकीचा ओलावा आहे... त्यामुळेच कधीकधी ते गोत्यातही येत असतात. प्रेश्यसची व्यावसायिक वाटचाल वाचकांना कधी हसवते, कधी अंतर्मुख करते, तर काही वेळा वाचकांची मनं हेलावून सोडते. गुंतागुंतीच्या केसेसचा उलगडा नेहमीच २±२·४ या पद्धतीनं करता येत नाही. त्यासाठी वेगळ्या अंगानं विचार करावा लागतो. `सापभी मरे और लाठीभी ना टूटे...` अशी हुशारी प्रेश्यस वापरते, तेव्हा तिच्यातील नैतिक सामर्थ्याची, तिच्यावर केल्या गेलेल्या संस्कारांची मनापासून दाद द्यावीशी वाटते. शीर्षकापासूनच या पुस्तकाचं वेगळेपण जाणवतं... ही गोष्ट आहे त्या वेगळ्या स्त्रीची, जिच्यात क्वचित प्रसंगी तुम्हाला तुमचं प्रतिबिंबही दिसेल...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TEARSOFTHEGIRAFFE #TEARSOFTHEGIRAFFE #टिअर्सऑफजिराफ #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #NEELACHANDORKAR #नीलाचांदोरकर #ALEXANDERMCCALLSMITH #अलेक्झांडरमॅक्कॉलस्मिथ
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKPRABHA 17-04-2015

    फोटोवरून घेतलेला रहस्याचा शोध… एडिनबर्ग येथील ‘वैद्यकीय कायदा’ विषयाचे प्राध्यापक असलेल्या अलेक्झांडर मॅक्काल स्मिथ या स्कॉटिश लेखकाची ‘नंबर वन लेडिज डिटेक्टिव्ह एजन्सी’ ही अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. ‘टिअर्स ऑफ द जिराफ’ हे याच मालिकेतील नीला चांदोकर यांनी अनुवाद केलेलं दुसरं पुस्तक होय. जगभरातील चाळीस भाषांमध्ये अनुवाद झालेली ही मालिका, आपल्याला आफ्रिका खंडातील बोट्स्वाना या जगावेगळ्या देशात नेऊन तेथील जीवनाचं दर्शन घडवते. वेगळया देशातील वेगवेगळी पात्रे आणि कथांमधील विषय वैविध्यामुळे ही कथामालिका वाचकांना विशेष आवडते. गुप्तहेरगिरीविषयी काहीही व्यावसायिक ज्ञान नसलेली प्रेश्यस रामोत्स्वे तिच्यातील अंगभूत हुशारीच्या जोरावर अनेक गुंतागुंतीच्या केसेस सोडवते. तिच्यातील अंतःप्रेरणा लोकांना बोलतं करण्याची कला आणि त्यांच्यावर मनापासून प्रेम करण्याची वृत्ती या स्वभावामुळे तिला कोणत्याही प्रकारच्या क्लिष्ट केसेस सोडवण्यास मदत होते. या पुस्तकातील कथानक दक्षिण आफ्रिकेतील बोट्स्वाना या भागात घडते. एक विशीतील अमेरिकन तरुण अचानकपणे नाहीसा होतो. अनेक प्रकारे शोध घेऊनही त्याचा काहीच ठावाठिकाणा लागत नाही. शेवटी हताश होऊन पोलीस ती केस बंद करतात, परंतु त्यांची आई मिसेस कार्टिन ही खूप अस्वस्थ असते. त्याच्या मृत्यूची बातमी समजल्यापासून ती सतत माहिती काढून त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करते, परंतु काहीच हाताला लागत नाही. त्याचा मृतदेह बघेपर्यंत तो मेला आहे या ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवायला तिचे मन तयार नसते. खरंतर ही घटना दहा वर्षांपूर्वी घडलेली असते, पण केवळ मुलगा मायकल हा अचानक नाहीसा झाला म्हणजेच तो मेलाच असेल असे कसे काय समजावे? हा एकच प्रश्न तिला सतत सतावत असतो. म्हणून या घटनेची उकल करण्याची विनंती मिसेस कार्टिन प्रेश्यस रामोत्स्वेकडे करते. दहा वर्षांपूर्वी घडून गेलेल्या घटनेचे धागेदोरे शोधून काढणे ही खरोखर अशक्यप्राय गोष्ट असते. तरी पण एका आईचे दुःख ऐकून प्रेश्यस रामोत्स्वे यांचे काळीज हेलावते आणि भिडस्तपणाच्या स्वभावापायी मिसेस कार्टिनना काहीतरी मदत करायला हवी असे वाटून प्रेश्यस भावनेच्या भरात केस स्वीकारते. जे. एल. बी. मातेकोनी या गॅरेज मालकाशी प्रेश्यस रामोत्वेचे लग्न ठरते. मातेकोनींच्या घरातील दुष्ट प्रवृत्तीची लबाड स्वार्थी कामवाली बाई लॉरेन्स पेको हिला हे लग्न होऊ द्यायचे नसते. कारण या लग्नानंतर कामवालीची गरज नसल्यामुळे तिला हे काम सोडून दुसरीकडे जावे लागणार असते. त्याचबरोबर मातेकोनींच्या गैरहजेरीत मित्रांबरोबर चालणारी तिची ऐयाशी बंद पडणार असते. यासाठी खूप विचारांती ही पेको बाई पे्रश्यसविरुद्ध एक कट रचते; परंतु या कटात ती ज्या मित्राची मदत घेते तो तिचा डाव तिच्यावरच उलटवतो, त्यामुळे तिला पोलीस कोठडीची हवा खावी लागते. अश प्रकारे मातेकोनी आणि प्रेश्यस यांच्यातील पेकोबाईचा अडसर दूर होतो. अनेक ठिकाणी चौकशी करत, त्या-त्या गावी जाऊन बराच प्रवास करत एक एक दुवा शोधून दुसऱ्या दुव्यापर्यंत पोचत, प्रेश्यस रामोत्स्वे मायकेलच्या मृत्यूचा छडा लावते. ती त्याच्या घराला भेट देते, तेव्हा तिला एक जुना फोटो तिथे सापडतो. त्या फोटोच्या आधारे घटनेची उकल करत, फोटोतील माणसापर्यंत पोचते. त्याला शाब्दिक धमकी देऊन त्याच्याकडून गुन्हा वदवून घेते. त्यावर विश्वास न ठेवता पुन्हा घटनास्थळाला भेट देते. त्यानंतर त्याने सांगितलेल्या कथेतील दुसऱ्या स्त्रीला ही प्रत्यक्ष जाऊन भेटते. तिच्याकडूनही त्याने सांगितल्या प्रकाराची खात्री करून घेते. केवळ इथपर्यंत प्रकरणाचा छडा लागला म्हणून केस सोडून न देता माणुसकीच्या नात्याने त्या स्त्रीला मिसेस कार्टिनला भेटण्यास येण्याची विनंती करते. त्या स्त्रीचे नाव कार्ला असते. तिचे मायकेलवर प्रेम असते व तिला मायकेलपासून एक मुलगा झाला असतो. सरतेशेवटी मिसेस कार्टिन व कार्ला यांची प्रेश्यसच्या ऑफिसमध्ये भेट होते. कार्ला मायकेलच्या बाबतीत घडलेली घटना सविस्तर रूपाने मिसेस कार्टिनना सांगते. आता आपल्या मुलाच्या मृत्यूवर त्यांचा विश्वास बसतो, पण त्याचबरोबर छोटासा मायकेल जो त्यांचा नातू असतो, त्याला पाहून आनंदही होतो. प्रेश्यस तिची अशील असलेल्या मिसेस कार्टिनला देण्यासाठी एका गरीब बाईकडून एक वेतकामाची टोपली विकत घेते. या टोपलीत ‘जिराफांच्या अश्रूंचे’ रहस्य दडले आहे. ज्याच्यामुळे पुस्तकाला ‘टिअर्स ऑफ द जिराफ’ असे नाव दिले गेले आहे. हे नाव देण्यामागे काय कल्पना आहे व त्यामध्ये काय भाव आहे हे वाचकांनी स्वतःच वाचावे. जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी मनुष्य स्वभावातील साधर्म्य आढळते. त्यामुळेच या कथेतील नावे, गावे, प्रांत वेगवेगळे असले तरी या वेगळेपणाच्या भिंती आपोआप गळून पडतात व ही गोष्ट कधी आपली होऊन जाते ते कळतच नाही. अतिशय शिताफीने उलगडलेली या कथेतील रहस्य खरंतर प्रत्यक्ष वाचण्यात जास्त मजा आहे. प्रेश्यसची या कथेतील वाटचाल वाचकाला शेवटपर्यंत कथानकाशी खिळवून ठेवते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more