* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE NO.1 LADIES` DETECTIVE AGENCY INTRODUCED THE WORLD TO THE ONE AND ONLY PRECIOUS RAMOTSWE - THE ENGAGING AND SASSY OWNER OF BOTSWANA`S ONLY DETECTIVE AGENCY. TEARS OF THE GIRAFFE, MCCALL SMITH`S SECOND BOOK, TAKES US FURTHER INTO THIS WORLD AS WE FOLLOW MAMA RAMOTSWE INTO MORE DARING SITUATIONS ... AMONG HER CASES THIS TIME ARE WAYWARD WIVES, UNSCRUPULOUS MAIDS, AND THE CHALLENGE TO RESOLVE A MOTHER`S PAIN FOR HER SON WHO IS LONG LOST ON THE AFRICAN PLAINS. INDEED, MMA RAMOTSWE`S OWN IMPENDING MARRIAGE TO THE MOST GENTLEMANLY OF MEN, MR J.L.B. MATEKONI, THE PROMOTION OF MMA`S SECRETARY TO THE DIZZY HEIGHTS OF ASSISTANT DETECTIVE, AND THE ARRIVAL OF NEW MEMBERS TO THE MATEKONI FAMILY, ALL BREW UP THE MOST HUMOROUS AND CHARMINGLY ENTERTAINING OF TALES. * TEARS OF THE GIRAFFE WAS SELECTED AS ONE OF THE GUARDIAN`S TOP TEN
दहा वर्षांपूर्वी घडलेल्या एका अपघाती मृत्यूसंबंधीची केस–प्रेश्यसच्या आत्तापर्यंतच्या कारकीर्दीतील सर्वांत कठीण, गुंतागुंतीची केस... एक विशीतला अमेरिकन तरुण बोट्स्वानातून अचानक, काहीही मागमूस न ठेवता नाहीसा होतो. सर्व प्रकारे शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागत नाही. हे समजल्यानंतर पोलीस ती केस कायमची बंद करून टाकतात. प्रेश्यस ती का आणि कशी उलगडते हे वाचूनच पाहायला हवं... व्यावसायिक आघाडीवर यशस्वीपणे, दमदारपणे पुढे जात असताना तिच्या वैयक्तिक जीवनातही काही खळबळजनक घटना घडत असतात... नव्या जबाबदा-या अनपेक्षितपणे अंगावर कोसळत असतात. अर्थात, तिच्या मदतीसाठी दोन हक्काचे हात, नव्हे जीवनभराची साथ तिला लाभणार असते, ती जे. एल. बी. मातेकोनींच्या रूपात... व्यवसायानं मेकॅनिक ! त्यांचा नेहमी संबंध येतो तो निर्जीव गाड्यांशी, त्यातील यंत्रभागांशी, इंजिनांशी! ...पण प्रेश्यसमध्ये आणि त्यांच्यात एक मोठं साम्य असते. दोघांच्या हृदयात माणुसकीचा ओलावा आहे... त्यामुळेच कधीकधी ते गोत्यातही येत असतात. प्रेश्यसची व्यावसायिक वाटचाल वाचकांना कधी हसवते, कधी अंतर्मुख करते, तर काही वेळा वाचकांची मनं हेलावून सोडते. गुंतागुंतीच्या केसेसचा उलगडा नेहमीच २±२·४ या पद्धतीनं करता येत नाही. त्यासाठी वेगळ्या अंगानं विचार करावा लागतो. `सापभी मरे और लाठीभी ना टूटे...` अशी हुशारी प्रेश्यस वापरते, तेव्हा तिच्यातील नैतिक सामथ्र्याची, तिच्यावर केल्या गेलेल्या संस्कारांची मनापासून दाद द्यावीशी वाटते. शीर्षकापासूनच या पुस्तकाचं वेगळेपण जाणवतं... ही गोष्ट आहे त्या वेगळ्या स्त्रीची, जिच्यात क्वचित प्रसंगी तुम्हाला तुमचं प्रतिबिंबही दिसेल...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TEARSOFTHEGIRAFFE #TEARSOFTHEGIRAFFE #टिअर्सऑफजिराफ #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #NEELACHANDORKAR #नीलाचांदोरकर #ALEXANDERMCCALLSMITH #अलेक्झांडरमॅक्कॉलस्मिथ
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKPRABHA 17-04-2015

    फोटोवरून घेतलेला रहस्याचा शोध… एडिनबर्ग येथील ‘वैद्यकीय कायदा’ विषयाचे प्राध्यापक असलेल्या अलेक्झांडर मॅक्काल स्मिथ या स्कॉटिश लेखकाची ‘नंबर वन लेडिज डिटेक्टिव्ह एजन्सी’ ही अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. ‘टिअर्स ऑफ द जिराफ’ हे याच मालिकेतील नीला चांदोकर यांनी अनुवाद केलेलं दुसरं पुस्तक होय. जगभरातील चाळीस भाषांमध्ये अनुवाद झालेली ही मालिका, आपल्याला आफ्रिका खंडातील बोट्स्वाना या जगावेगळ्या देशात नेऊन तेथील जीवनाचं दर्शन घडवते. वेगळया देशातील वेगवेगळी पात्रे आणि कथांमधील विषय वैविध्यामुळे ही कथामालिका वाचकांना विशेष आवडते. गुप्तहेरगिरीविषयी काहीही व्यावसायिक ज्ञान नसलेली प्रेश्यस रामोत्स्वे तिच्यातील अंगभूत हुशारीच्या जोरावर अनेक गुंतागुंतीच्या केसेस सोडवते. तिच्यातील अंतःप्रेरणा लोकांना बोलतं करण्याची कला आणि त्यांच्यावर मनापासून प्रेम करण्याची वृत्ती या स्वभावामुळे तिला कोणत्याही प्रकारच्या क्लिष्ट केसेस सोडवण्यास मदत होते. या पुस्तकातील कथानक दक्षिण आफ्रिकेतील बोट्स्वाना या भागात घडते. एक विशीतील अमेरिकन तरुण अचानकपणे नाहीसा होतो. अनेक प्रकारे शोध घेऊनही त्याचा काहीच ठावाठिकाणा लागत नाही. शेवटी हताश होऊन पोलीस ती केस बंद करतात, परंतु त्यांची आई मिसेस कार्टिन ही खूप अस्वस्थ असते. त्याच्या मृत्यूची बातमी समजल्यापासून ती सतत माहिती काढून त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करते, परंतु काहीच हाताला लागत नाही. त्याचा मृतदेह बघेपर्यंत तो मेला आहे या ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवायला तिचे मन तयार नसते. खरंतर ही घटना दहा वर्षांपूर्वी घडलेली असते, पण केवळ मुलगा मायकल हा अचानक नाहीसा झाला म्हणजेच तो मेलाच असेल असे कसे काय समजावे? हा एकच प्रश्न तिला सतत सतावत असतो. म्हणून या घटनेची उकल करण्याची विनंती मिसेस कार्टिन प्रेश्यस रामोत्स्वेकडे करते. दहा वर्षांपूर्वी घडून गेलेल्या घटनेचे धागेदोरे शोधून काढणे ही खरोखर अशक्यप्राय गोष्ट असते. तरी पण एका आईचे दुःख ऐकून प्रेश्यस रामोत्स्वे यांचे काळीज हेलावते आणि भिडस्तपणाच्या स्वभावापायी मिसेस कार्टिनना काहीतरी मदत करायला हवी असे वाटून प्रेश्यस भावनेच्या भरात केस स्वीकारते. जे. एल. बी. मातेकोनी या गॅरेज मालकाशी प्रेश्यस रामोत्वेचे लग्न ठरते. मातेकोनींच्या घरातील दुष्ट प्रवृत्तीची लबाड स्वार्थी कामवाली बाई लॉरेन्स पेको हिला हे लग्न होऊ द्यायचे नसते. कारण या लग्नानंतर कामवालीची गरज नसल्यामुळे तिला हे काम सोडून दुसरीकडे जावे लागणार असते. त्याचबरोबर मातेकोनींच्या गैरहजेरीत मित्रांबरोबर चालणारी तिची ऐयाशी बंद पडणार असते. यासाठी खूप विचारांती ही पेको बाई पे्रश्यसविरुद्ध एक कट रचते; परंतु या कटात ती ज्या मित्राची मदत घेते तो तिचा डाव तिच्यावरच उलटवतो, त्यामुळे तिला पोलीस कोठडीची हवा खावी लागते. अश प्रकारे मातेकोनी आणि प्रेश्यस यांच्यातील पेकोबाईचा अडसर दूर होतो. अनेक ठिकाणी चौकशी करत, त्या-त्या गावी जाऊन बराच प्रवास करत एक एक दुवा शोधून दुसऱ्या दुव्यापर्यंत पोचत, प्रेश्यस रामोत्स्वे मायकेलच्या मृत्यूचा छडा लावते. ती त्याच्या घराला भेट देते, तेव्हा तिला एक जुना फोटो तिथे सापडतो. त्या फोटोच्या आधारे घटनेची उकल करत, फोटोतील माणसापर्यंत पोचते. त्याला शाब्दिक धमकी देऊन त्याच्याकडून गुन्हा वदवून घेते. त्यावर विश्वास न ठेवता पुन्हा घटनास्थळाला भेट देते. त्यानंतर त्याने सांगितलेल्या कथेतील दुसऱ्या स्त्रीला ही प्रत्यक्ष जाऊन भेटते. तिच्याकडूनही त्याने सांगितल्या प्रकाराची खात्री करून घेते. केवळ इथपर्यंत प्रकरणाचा छडा लागला म्हणून केस सोडून न देता माणुसकीच्या नात्याने त्या स्त्रीला मिसेस कार्टिनला भेटण्यास येण्याची विनंती करते. त्या स्त्रीचे नाव कार्ला असते. तिचे मायकेलवर प्रेम असते व तिला मायकेलपासून एक मुलगा झाला असतो. सरतेशेवटी मिसेस कार्टिन व कार्ला यांची प्रेश्यसच्या ऑफिसमध्ये भेट होते. कार्ला मायकेलच्या बाबतीत घडलेली घटना सविस्तर रूपाने मिसेस कार्टिनना सांगते. आता आपल्या मुलाच्या मृत्यूवर त्यांचा विश्वास बसतो, पण त्याचबरोबर छोटासा मायकेल जो त्यांचा नातू असतो, त्याला पाहून आनंदही होतो. प्रेश्यस तिची अशील असलेल्या मिसेस कार्टिनला देण्यासाठी एका गरीब बाईकडून एक वेतकामाची टोपली विकत घेते. या टोपलीत ‘जिराफांच्या अश्रूंचे’ रहस्य दडले आहे. ज्याच्यामुळे पुस्तकाला ‘टिअर्स ऑफ द जिराफ’ असे नाव दिले गेले आहे. हे नाव देण्यामागे काय कल्पना आहे व त्यामध्ये काय भाव आहे हे वाचकांनी स्वतःच वाचावे. जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी मनुष्य स्वभावातील साधर्म्य आढळते. त्यामुळेच या कथेतील नावे, गावे, प्रांत वेगवेगळे असले तरी या वेगळेपणाच्या भिंती आपोआप गळून पडतात व ही गोष्ट कधी आपली होऊन जाते ते कळतच नाही. अतिशय शिताफीने उलगडलेली या कथेतील रहस्य खरंतर प्रत्यक्ष वाचण्यात जास्त मजा आहे. प्रेश्यसची या कथेतील वाटचाल वाचकाला शेवटपर्यंत कथानकाशी खिळवून ठेवते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more