KHUSHWANT SINGH

About Author

Birth Date : 02/02/1915
Death Date : 20/03/2014


A LAWYER, JOURNALIST, NOVELIST AND POLITICIAN, KHUSHWANTINSAG WAS BORN IN HADALI, PUNJAB (NOW IN PAKISTAN). HE STUDIED LAW FROM DELHI AND LONDON. AFTER EIGHT YEARS AS A LAWYER IN THE LAHORE COURT, HE WORKED AS A JOURNALIST AT THE INDIAN EMBASSY IN 1947 AND AT THE ALL INDIA RADIO IN 1951.

वकील, पत्रकार, कादंबरीकार व राजकारणी अशी विविध क्षेत्रे गाजविणाऱ्या खुशवंतिंसग यांचा जन्म पंजाबमधील हदाली (आता पाकिस्तानात) येथे झाला. त्यांनी आपले कायद्याचे शिक्षण दिल्ली व लंडन येथून घेतले. लाहोर कोर्टात आठ वर्षे वकिली केल्यावर १९४७ मध्ये भारतीय दूतावासात, तर १९५१ मध्ये ऑल इंडिया रेडिओ येथे पत्रकार म्हणून कामगिरी बजावली. त्यानंतर युनेस्कोच्या मास कम्युनिकेशन विभागातही त्यांना पाठविण्यात आले. वरील दोन विभागांतील कामाने त्यांना साहित्य क्षेत्राकडे-लेखनाकडे जाण्यास उद्युक्त केले. १९५६ मध्ये भारत सरकारतर्फे योजना नावाचे नियतकालिक सुरू करून त्याचे संपादकत्वदेखील निभावले. यानंतर द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, नॅशनल हेरल्ड व हिदुस्थान टाइम्स ही नियतकालिकेही त्यांनी बाजारात आणली. भारत सरकारतर्पेÂ पद्मभूषण देऊन (१९७४) त्यांना गौरविले गेले; परंतु (१९७८) ऑपरेशन ब्लू स्टार अंतर्गत लष्करी फौजा अमृतसरच्या गुरुद्वारात घुसविल्याच्या निषेधार्थ त्यांनी तो पुरस्कार परत केला. त्यांना २००७ मध्ये पद्मविभूषण देऊन नावाजले गेले. वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. उपरोधपूर्ण, विनोदी, धर्मनिरपेक्ष; परंतु झोंबणारे थेट भाष्य असणाऱ्या लेखनासाठी, व कवितेविषयी प्रेम असणारे म्हणून ते कायम लक्षात राहतात.
Sort by
Show per page
Items 1 to 5 of 5 total
KHUSHWANT SINGH COMBO SET - 4 BOOKS Rating Star
Add To Cart INR 875
MAZYA AAYUSHYAAT AALELYA STRIYA ANI ... Rating Star
Add To Cart INR 180
MRUTYU MAZYA UMBARTHYASHI Rating Star
Add To Cart INR 195
SEX, SCOTCH & SCHOLARSHIP Rating Star
Add To Cart INR 250
THE COMPANY OF WOMEN Rating Star
Add To Cart INR 250

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more