KHUSHWANT SINGH

About Author

Birth Date : 02/02/1915
Death Date : 20/03/2014


A LAWYER, JOURNALIST, NOVELIST AND POLITICIAN, KHUSHWANTINSAG WAS BORN IN HADALI, PUNJAB (NOW IN PAKISTAN). HE STUDIED LAW FROM DELHI AND LONDON. AFTER EIGHT YEARS AS A LAWYER IN THE LAHORE COURT, HE WORKED AS A JOURNALIST AT THE INDIAN EMBASSY IN 1947 AND AT THE ALL INDIA RADIO IN 1951.

वकील, पत्रकार, कादंबरीकार व राजकारणी अशी विविध क्षेत्रे गाजविणाऱ्या खुशवंतिंसग यांचा जन्म पंजाबमधील हदाली (आता पाकिस्तानात) येथे झाला. त्यांनी आपले कायद्याचे शिक्षण दिल्ली व लंडन येथून घेतले. लाहोर कोर्टात आठ वर्षे वकिली केल्यावर १९४७ मध्ये भारतीय दूतावासात, तर १९५१ मध्ये ऑल इंडिया रेडिओ येथे पत्रकार म्हणून कामगिरी बजावली. त्यानंतर युनेस्कोच्या मास कम्युनिकेशन विभागातही त्यांना पाठविण्यात आले. वरील दोन विभागांतील कामाने त्यांना साहित्य क्षेत्राकडे-लेखनाकडे जाण्यास उद्युक्त केले. १९५६ मध्ये भारत सरकारतर्फे योजना नावाचे नियतकालिक सुरू करून त्याचे संपादकत्वदेखील निभावले. यानंतर द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, नॅशनल हेरल्ड व हिदुस्थान टाइम्स ही नियतकालिकेही त्यांनी बाजारात आणली. भारत सरकारतर्पेÂ पद्मभूषण देऊन (१९७४) त्यांना गौरविले गेले; परंतु (१९७८) ऑपरेशन ब्लू स्टार अंतर्गत लष्करी फौजा अमृतसरच्या गुरुद्वारात घुसविल्याच्या निषेधार्थ त्यांनी तो पुरस्कार परत केला. त्यांना २००७ मध्ये पद्मविभूषण देऊन नावाजले गेले. वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. उपरोधपूर्ण, विनोदी, धर्मनिरपेक्ष; परंतु झोंबणारे थेट भाष्य असणाऱ्या लेखनासाठी, व कवितेविषयी प्रेम असणारे म्हणून ते कायम लक्षात राहतात.
Sort by
Show per page
Items 1 to 5 of 5 total
KHUSHWANT SINGH COMBO SET - 4 BOOKS Rating Star
Add To Cart INR 875
MAZYA AAYUSHYAAT AALELYA STRIYA ANI ... Rating Star
Add To Cart INR 180
MRUTYU MAZYA UMBARTHYASHI Rating Star
Add To Cart INR 195
SEX, SCOTCH & SCHOLARSHIP Rating Star
Add To Cart INR 250
THE COMPANY OF WOMEN Rating Star
Add To Cart INR 250

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more