KHUSHWANT SINGH

About Author

Birth Date : 02/02/1915
Death Date : 20/03/2014


A LAWYER, JOURNALIST, NOVELIST AND POLITICIAN, KHUSHWANTINSAG WAS BORN IN HADALI, PUNJAB (NOW IN PAKISTAN). HE STUDIED LAW FROM DELHI AND LONDON. AFTER EIGHT YEARS AS A LAWYER IN THE LAHORE COURT, HE WORKED AS A JOURNALIST AT THE INDIAN EMBASSY IN 1947 AND AT THE ALL INDIA RADIO IN 1951.

वकील, पत्रकार, कादंबरीकार व राजकारणी अशी विविध क्षेत्रे गाजविणाऱ्या खुशवंतिंसग यांचा जन्म पंजाबमधील हदाली (आता पाकिस्तानात) येथे झाला. त्यांनी आपले कायद्याचे शिक्षण दिल्ली व लंडन येथून घेतले. लाहोर कोर्टात आठ वर्षे वकिली केल्यावर १९४७ मध्ये भारतीय दूतावासात, तर १९५१ मध्ये ऑल इंडिया रेडिओ येथे पत्रकार म्हणून कामगिरी बजावली. त्यानंतर युनेस्कोच्या मास कम्युनिकेशन विभागातही त्यांना पाठविण्यात आले. वरील दोन विभागांतील कामाने त्यांना साहित्य क्षेत्राकडे-लेखनाकडे जाण्यास उद्युक्त केले. १९५६ मध्ये भारत सरकारतर्फे योजना नावाचे नियतकालिक सुरू करून त्याचे संपादकत्वदेखील निभावले. यानंतर द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, नॅशनल हेरल्ड व हिदुस्थान टाइम्स ही नियतकालिकेही त्यांनी बाजारात आणली. भारत सरकारतर्पेÂ पद्मभूषण देऊन (१९७४) त्यांना गौरविले गेले; परंतु (१९७८) ऑपरेशन ब्लू स्टार अंतर्गत लष्करी फौजा अमृतसरच्या गुरुद्वारात घुसविल्याच्या निषेधार्थ त्यांनी तो पुरस्कार परत केला. त्यांना २००७ मध्ये पद्मविभूषण देऊन नावाजले गेले. वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. उपरोधपूर्ण, विनोदी, धर्मनिरपेक्ष; परंतु झोंबणारे थेट भाष्य असणाऱ्या लेखनासाठी, व कवितेविषयी प्रेम असणारे म्हणून ते कायम लक्षात राहतात.
Sort by
Show per page
Items 1 to 5 of 5 total
KHUSHWANT SINGH COMBO SET - 4 BOOKS Rating Star
Add To Cart INR 875
MAZYA AAYUSHYAAT AALELYA STRIYA ANI ... Rating Star
Add To Cart INR 180
MRUTYU MAZYA UMBARTHYASHI Rating Star
Add To Cart INR 195
SEX, SCOTCH & SCHOLARSHIP Rating Star
Add To Cart INR 250
THE COMPANY OF WOMEN Rating Star
Add To Cart INR 250

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more