* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SHEKARA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666472
  • Edition : 8
  • Publishing Year : APRIL 1996
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 84
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHEKARA IS AN EXCELLENT AND THE LAST SPECIMEN OF RANJIT DESAI`S NOTEWORTHY INGENUITY. SHEKARA IS A KIND OF SQUIRREL, GREY COLOURED, WITH A BLACK FURRY TAIL. IT IS FAMOUS FOR JUMPING FROM ONE TREE TO ANOTHER. THE MAIN CHARACTER OF THIS NOVEL IS A LONELY SQUIRREL. THIS STORY TAKES PLACE IN THE MIDST OF A DENSE FOREST. SHEKARA ROAMS THROUGHOUT THE JUNGLE FOR ITS FOOD, THROUGH ALL THE REGIONS AND SEASONS. WHILE DOING SO IT OBSERVES OTHER ANIMALS, THEIR HABITS, THEIR EFFORTS TO FIND FOOD, THEIR HELPLESSNESS WHILE STRUGGLING TO STAY ALIVE. SHEKARA OFTEN WITHESSES THIS, AND ITSELF BECOMES THE PREY TO HELPLESSNESS. RANJIT DESAI HAS PICTURED THE WHOLE STORY THROUGH SHEKARA`S EYES AND MIND. AFTER READING THE THE BOOK READER ALSO FEELS THAT HE/SHE IS AS LONELY AS THE SHEKARA. IT COMPELLS A DISCREET READER TO INTROSPECT ONCE AGAIN.
शेकरा हा खारीच्या जातीचा विशेषत: जंगलात आढळणारा, झाडावर राहाणारा, या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारत मुक्तपणे फिरणारा व आवश्यकतेप्रमाणे जमिनीवर येणारा प्राणी. शेकरा खारीसारखाच दिसणारा, पण खारीहून कितीतरी मोठा, झुबकेदार शेपटी असलेला शाकाहारी प्राणी आहे. वेगवेगळ्या झाडांवरची फळे खात हिंडण्याबरोबरच जंगलातील वन्य पशुंचे जीवननाट्य तो बिटबिट्या, लालबुंद डोळ्यांनी दुरून पाहात असतो. या निरीक्षणात तटस्थता नसते. खूप उत्सुकता असते; जमेल तेथे सहभाग आणि पलायनही असते. शेकराच्या नजरेतून लेखकाने जंगलातले जीवन दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. शेकराला दिसलेला निसर्ग, ऋतुमानानुसार त्यामध्ये होणारे विविध बदल तसेच अनेक पशु-पक्ष्यांच्या स्वाभाविक प्रेरणा, त्यांचा जीवनसंघर्ष यामध्ये चित्रित केला आहे. यामध्ये शेकराच्या दैनंदिन जीवनाबरोबरच त्याने पाहिलेल्या इतर नानाविध प्राण्यांच्या आयुष्यातील घटना-प्रसंगांचे हुबेहुब वर्णन आहे. शेकरा एका डोहाकाठी असलेल्या वडाच्या झाडावर बसून निसर्गाचे, तेथे पाणी पिण्यास येणार्या विविध पशु-पक्ष्यांचे निरीक्षण करतो. यामध्ये काळतोंड्या हुप्प्यांचं दात विचकून, भीती दाखवत अंगावर येणं, अस्वलाचं जमिनीवर पालापाचोळा हुंगत जाणं, मधमाश्यांच्या चाव्याची पर्वा न करता पोळं पाडून त्यातला मध पिणं आणि पिलांना मागे सारून वारुळात तोंड खुपसून अधाशासारखी एकट्यानेच वाळवी खाणं, वाघाची शिकारीला जाताना झाडाच्या सालीमध्ये नखांनी ओरबाडून ती साफ करण्याची सवय, मादी गव्याच्या प्रसूतीच्या वेळी खुद्द गवा आणि इतर माद्यांनी केलेले तिचे आणि वासराचे संरक्षण, सुसरीचं डोहाच्या काठावर येऊन ऊन अंगावर घेताना तोंडाचा आ वासून पक्ष्यांकडून दात साफ करून घेणं आणि डोहात शिरल्यावर किंचित डोके वर काढून पाणी पिण्यास आलेल्या भेकरास अलगद पाण्यात ओढून नेणं, प्रणयभंगास कारणीभूत ठरणार्या गजेंद्राच्या सोंडेला महाभुजंगाने घेतलेला चावा आणि त्यात झालेला दोघांचाही मृत्यू, नाग उंदराला खाण्याच्या पवित्र्यात तर झाडाच्या ढोलीतून बाहेर आलेले घुबड नागाला पकडण्याच्या तयारीत, भुकेलेल्या अजगराने सशाला लक्ष्य करणं; हे सारे प्रसंग अधूनमधून शेकराच्या डोळ्यांसमोर घडत असतात. दरम्यान, जंगलाला लागलेल्या आगीमध्ये सारे भस्मसात होते; साहजिकपणे बहुतेक सारे पशु-पक्षी हे जंगल सोडून आपल्या वाटेने दुसर्या जंगलात आश्रयास जातात. शेकरा मात्र या जागेने आजवर दिलेले सुख लक्षात घेऊन हे जंगल सोडून इतरत्र जात नाही; तर अशा प्रसंगातही तो बिळात असलेल्या सशाच्या दोन पिलांना कोवळे गवत देतो आणि त्यांच्याशी खेळतो तसेच तो सुतारपक्ष्याने चोचीने झाडामध्ये तयार केलेल्या पोकळीतील पिलांशी खेळण्याचा प्रयत्न करतो. अखेर एका दुर्दैवी क्षणी वाढत्या वयानुसार चपलताहीन झालेले शरीर आणि खचलेल्या मनाचा शेकरा पाणी पिण्यास येतो आणि बेसावधपणे खोकडाची शिकार होतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक #शेकरा#रणजीत#देसाई
Customer Reviews
  • Rating StarDAINIK PUDHARI 20-10-1996

    अंतर्मुख करणारी एक विलक्षण लघु कादंबरी… रणजित देसाई यांची अखेरची अभिव्यक्ती म्हणजे सुजाण वाचकास अंतर्मुख करणारी एक विलक्षण लघु कादंबरी म्हणजे ‘शेकरा’ असे म्हणावे लागेल. या कादंबरीचा नायक शेकरा हा खारीसारखा दिसणारा पण खारीहून मोठा असलेला शाकाहारी प्रणी. कादंबरीकारांनी शेकराद्वारे केलेले निवेदन हे मनोवेधक असून कादंबरीभर जंगल जीवनाचे चित्रण अगदी हुबेहूब केले आहे, त्यामुळे कादंबरीची मांडणी सुरेख झाली आहे. वाचक ही कादंबरी वाचताना शेकराच्या जीवनाशी एकरूप तर होतोच शिवाय शेकराच्या निवेदनाबरोबर जंगलातून फेरफटका मारूनही येतो. अनोळखी प्राणी जगत पाहून आल्याचा वास्तव पातळीसारखा अनुभव या कादंबरीतून येतो. रणजित देसाई हे लेखक भूतकाळात रमणाऱ्या प्रवृत्तीचे असून वाचक जेव्हा ही कादंबरी वाचतो, तेव्हा प्राणी जीवनाशी तो आपल्या जीवनाची तुलना सहजच करतो. पशुत्वापासून मानवतापर्यंत केलेला भुतकाळातील प्रवास आहे. आदिमकाळातील जीवनाचे जिवंत अवशेष म्हणजे ‘शेकरा’तील जंगली जीवनाचा आलेख आहे. मानवाच्या केलेल्या प्रदीर्घ प्रवासाचा आरंभ बिंदू मानता येईल इतके प्रभावी कलात्मक लेखन शेकरा या कादंबरीत आकारास आले आहे. शेकरा जंगलात भटकंती एकाकी जीवन जगत असतो. त्याच्या आसपास अनेक वन्य पशुपक्षीही जीवन जगत असतात. ‘बळी तो कान पिळी’प्रमाणे जंगलातील मोठे प्राणी लहान प्राण्यांना खाऊन जीवन जगत असतात. जंगलनियमाप्रमाणे चाललेल्या घडामोडीत अनेक दुबळे प्राणी सशक्तपणाचे भक्ष्य ठरतात. त्याचे जीवननाट्य तो शेकरा आपल्या बिटबिट्या डोळ्यांनी सतत पाहात असतो. या पाहण्यातही थंड अलिप्तता असते. भरपूर उत्कंठा असते. जमेल तिथं सहभाग असतो. काही ठिकाणी पलायनाच्या शारीरिक प्रतिक्रियाही भरपूर आहेत. सबंध कादंबरीभर सगळं जंगलातील प्राणीविश्व नैसर्गिकपणे पसरलेले आहे. यात शेकरा, काळतोंडे हुप्पे, माकड, वाघ, हरीण, हत्ती, सांबर, भेकरं, अस्वलं, रानडुक्करं, गवे, घारी, गिधाडे, ससाणे, सुसर, खोकड, मोर इतर पशुपक्षी, वनस्पती, पाऊस, पाणी, कडे, पहाड, डोंगर पाण्याचे विविध प्रवाह सर्व नाट्यपूर्ण, कौशल्यपूर्ण आणि जिवंतपणे त्यांच्या सहज हालचालीसह आपल्यासमोर फिरत आहे असे दृश्य दिसते. पशु-पक्षांतील जीवनाचे अनेक बारकावे असणारे प्रसंग सिनेमासारखे पाहून सुज्ञ वाचक थक्क होऊन जातो. जंगली प्राणी जीवनाचे भक्ष्य-भक्षक संबंध त्यातील क्रौर्य, रौद्र रूप, निष्पाप, निरागसता वाचकास खिळवून ठेवते. नीतीनियम, कायदे, परंपरा, पापपुण्य, उचित-अनुचित, रुढी, संस्कृती यांनी बंदिस्त असलेला आपला मानवी समाज जंगली प्राणी जीवनापेक्षा बरा सुसह्य आहे. अशा विरोधात्मक कल्पना वाचकास सुखावतात व सुरक्षितही वाटतात. शेकरा हा ससा, हरीण यांच्याप्रमाणे निष्पाप निरागस शाकाहारी चिमुकला खारीसारखा दिसणारा भाग्यवान प्राणी असावा असा आहे. तो सुरक्षित निरागसपणे जंगल अनुभवणारा प्राणी आहे असे वाटत न वाटत तोपर्यंत तो एका खोडकाचा भक्ष्य ठरतो. प्रतिकार करायला जवळ एकही साधन नाही. असेल तर ते फक्त पलायन पण तेही करण्यास तो फसतो. असह्यपणं जंगल कायद्याचा बळी ठरतो. याचा प्रत्यय कादंबरीच्या शेवटी येतो. मानवी जीवनातही निष्पाप, निरागस, निरुपद्रवता हे सांभाळून ठेवण्याचे गुण मानले जातात. ते कोणीही कुस्करू नये अशी भावना वाचकाच्या हृदयात ठासून बसते व जीवनातील अर्थही कळतो. या कादंबरीचे लेखन एका बाजूला वास्तव, वस्तुनिष्ठ, कलात्मक अलिप्ततेने कलेले आहे. मानवी जीवनावर किंवा जंगली जीवनावर भाष्य न करताही एकाकी शेकराच्या निवेदनातून सत्य सूचित प्रतिकाचे रूप मात्र स्पष्ट हृदयाशी जाऊन भिडते. मराठीत जसे लेखन दुर्मिळ असून कादंबरीकार रणजित देसाई यांच्या दिपस्तंभासारख्या उज्ज्वल प्रतिभेला शोभणारी अशीच आहे. निरुपद्रवी, निरागस व निष्पाप अशा लोकांना व्यवहारी जगात कोणीही शेकऱ्याप्रमाणे छळू नये. असेच जणू जगाचा निरोप घेताना शेकराच्या निवेदनातून त्यांनी सांगितले असावे असे वाटून जीवाला चटका लागून राहतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHIKASANTVANAM
RADHIKASANTVANAM by MUDDUPALANI Rating Star
केदार मारुलकर

एक डॉक्टर काय काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या पुस्तक परिचयासाठी निवडलेल्या पुस्तकाचे लेखक (खरे तर अनुवादक) *डॉ. शंतनू अभ्यंकर.* पुण्याच्या बीजे मेडिकल मधून एमबीबीएस. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण. आयएमए तसेच इतर संघटनेत विविध पदांवर काम. अनक परिषदांमध्ये शास्त्रीय विषयावर शुद्ध मराठीत व्याख्याने. २५ वर्षाहून अधिक काळ ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा. लोकविज्ञान संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा संघटनांमध्ये काम. विज्ञान लेखक, भाषांतरकार, ब्लॉगर आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे समाजात सर्वसाधारणपणे *न बोलल्या जाणाऱ्या विषयांवर लेखन* आणि प्रसंगी *प्रचलित समजाला तडा देणारे परखड भाष्य* करण्याची धमक. *पुस्तक परिचय* मुद्दूपलनी ही अठराव्या शतकातील राजे प्रतापसिंह यांची भोगपत्नी. अनुपम सौंदर्य, बुद्धिमत्ता, चातुर्य, शृंगारनिपुणता बहुभाषाकोविद अशी देवदासी स्त्री. राधिकासांत्वनमु हे तेलगू भाषेतील काव्य तिने रचले. परंतु नंतरच्या काळात अश्लील ठरवून त्यावर बंदी घालण्यात आली. देश स्वतंत्र झाल्यानंतर पुन्हा एकदा या काव्याला प्रकाशित होण्याचे भाग्य लाभले. गेल्याच वर्षी हे काव्य मराठीत अनुवादित करून डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी मराठी रसिकांना हा सांस्कृतिक ठेवा उपलब्ध करून दिला आहे. तंजावरच्या तत्कालीन मराठी राजवटीचं एक वेगळंच वैशिष्ट्य होतं. मराठी राजे आणि तमिळ प्रजा. या राज्याची प्रसिद्धी इतर कलांइतकीच कलावंतिणींसाठीही होती. देवदासी, देवरंडीयल, कलावती, गुडिसानी, भोगदासी, नगरशोभिनी, राजगणिका अशी, काही आज आपल्याला खळबळजनक वाटतील अशी, नावं होती. एक समृद्ध परंपरा होती. तिथे गणिकांनाही प्रतिष्ठा होती. अशीच एक गणिका-मुद्दूपलनी. तिची एक रचना म्हणजेच राधिकासांत्वनमु. तेलुगूमध्ये सांत्वन म्हणजे रुसवा काढणे. अतिशय शृंगारिक, भावनाप्रधान, बिनधास्त आणि प्रसंगी अश्लील म्हणावं असं हे काव्य. अर्थात श्लिलाश्लिलतेच्या कल्पना कालसापेक्ष असतात. राधा-कृष्ण आणि इलाची गोष्ट सांगतासांगता ती राजे राजवाड्यांच्या राज्याचीच नाही, तर स्त्रियांच्या अंत:करणाचीही दारे सताड उघडून दाखवते. मराठीमध्ये इतकं शृंगारीक काव्य लिहिलं गेलं नाही.त्यात शृंगारीक लेखन म्हणजे लिहिलंच तर पुरुषांनी लिहावं, असा अलिखित नियम. शृंगार आणि अश्लीलता याच्या सीमारेषेवर असलेलं हे काव्य एका स्त्रीने लिहावं हे म्हणूनच आगळंवेगळं ठरतं. राधा-कृष्णाच्या कथेने भल्याभल्यांना मोहात पाडले आहे. पण राधाकृष्णाची बहुतेक प्रेमकाव्ये कितीही सुंदर आणि शृंगारिक वर्णनांनी भरलेली असली तरी अखेरीस राधाकृष्णाचे मिलन म्हणजे; पुरुष आणि प्रकृतीचे मिलन, असा शोध लावून त्याला एकदम अध्यात्मिक रूप दिलं जातं. राधिका सांत्वनम् मध्ये कृष्ण आणि राधा, कृष्ण आणि या काव्यातील प्रेमत्रिकोणाचा तिसरा कोन- इला, यांचे नाते अगदी सर्वसाधारण स्त्रीपुरुषांसारखे रेखाटले आहे. आपली पार्श्वभूमी सांगून ही गणिका राधिकासांत्वनमची मुख्य कथा सुरू करते. राधा-कृष्णाच्या प्रणयलीला तर सगळ्यानाच माहीत आहेत. या काव्यातील प्रौढ राधा, तरुण कृष्णाचे आणि नुकत्याच यौवनात आलेल्या इलाचे लग्न लावून देते. कृष्ण इलेवर असा काही भाळतो की राधा रहाते बाजूला. आता राधेला पश्चात्ताप होतो. विरहाने पोळलेली राधा, कृष्णाला विनवून परत बोलवते. तो येतो. पण दुखावली गेलेली राधा त्याला फार महत्व देत नाही. त्याला राधेची आर्जवं करायला लागतात. तरीही राधा त्याला बधत नाही. मग कृष्ण आपले हुकूमी अस्त्र काढतो. आपल्या कामलीलांनी तिला घायाळ करतो, राधा पुन्हा आकृष्ट होते, दोघांचे मिलन होतं. इथे राधिकासांत्वन सुफळ संपूर्ण होतं, अशी ही काव्यरुप कथा. यातील दोन्ही नायिका अगदी मुद्दूपलनी सारख्याच आहेत. रुपगर्विता, हुशार तितक्याच हट्टी. इला नवथर तरुणी; तर राधा प्रौढ, प्रेमस्वरूप कृष्णसखी आणि दोघींचा नायक कृष्णसखा. पण सारा भर आहे तो ह्या दोन नायिकांच्या मनतरंगांवर. यातल्या दोन्ही नायिका कृष्णावर वर्चस्व गाजवणाऱ्या आहेत. प्रेमासाठी आसुसलेल्या आहेत. अनुभूती मोकळेपणानी व्यक्त करणाऱ्या आहेत. वयात येणे, विरह,असूया, प्रेम-द्वेष अशी भावनांची लपाछपी, असं बरंच काही हे काव्य उलगडून दाखवते आणि तेही एक स्त्रीच्या नजरेतून. हा नजारा थक्क करणारा आहे. हे शृंगारीक असलं तरी उत्कट आणि रसाळ काव्य आहे. या काव्याचा इंग्रजीतही अनुवाद झाला आहे. डॉ. शंतनू यांनी छंदोबद्ध भाषांतर करण्याचा निर्णय घेतला. छंदोबद्ध असल्याशिवाय भाषांतर त्या काळातील वाटणारच नाही. मूळ छंद/वृत्त काय आहे याचा अंदाज अर्थातच इंग्लिश ओळी वाचून येत नाही. मग काही ओळी वाचायच्या, एखादी ओळ सुचेल तशी लिहायची आणि मग कारागिरी करत करत इतर ओळी जुळवायच्या; असा प्रकार करत भाषांतर केल्याचे मनोगतात लिहिले आहे. मराठीत हे सगळे काव्य लिहिताना पुणेरी भाषा वापरली असली,तरी त्यात दुर्बोधता नाही. अभंग, मंदाक्रांता, मालिनी, दिंडी, हरिभगिनी आणि लावणीसदृश ठेक्यात बसणाऱ्या काही चाली यात वापरल्या आहेत. काही ठिकाणी पद्यमय संवाद लिहिले आहेत. पुस्तक परिचय लिहिताना यातील काही ओळी उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही. काव्याची सुरवातच राधेच्या बहारदार वर्णनाने होते. _थोरांनी नावाजली, गौरांगी सर्वांहुनी, शकुंतला, शुकभाषिणी, नंदाक्का राधा ही. आणि तिचे ते डोळे, नसते जर कृष्णकळे; का हरी कटाक्ष पुरे, चमकाया नयनदले?_ यानंतर षोडशा इलेचं वर्णन या शब्दांत _कृशांगा, नाजुकांगा, वेणीसंभार सोसवेना; मुखमोती दिव्य ज्योती, देवी इला, यौवना ही_ कृष्णावर भाळलेल्या इलाचे मनतरंग रेखाटताना म्हटले आहे- _लपंडावी डोळे झाकाया, फक्त मुरारी हवा इलेला. शिवशिवीचा खेळ रंगता,हिचे इशारे पळता पळता. नदीकिनारी साधून मौका, इला झोंबते हरीच्या अंगा. सदैव हरी-सह, हरीच सहचर, खेळ मिषे सुखस्पर्श अनावर. सख्यांस कौतुक सखिचे नवथर उधळून यौवन, धीट, खोडकर इला भाळली श्री कृष्णावर!_ कृष्ण आणि राधेचा प्रणय तिच्या नजरेतून सुटत नाही... _ओठ आरक्तही देता राधा, इला तुळीतसे ओष्ठ सौष्ठवा; दंतपंक्ती त्या सहज चमकता, फिके जाणी स्मित आपुले इला, शेजघरी ने कृष्णा, राधा; म्हणे ‘आले मी’, इला बाला!! मजेत हसती श्रीकृष्ण-राधा!_ राधेलाही इला मोठी होण्याची आतुरता, उत्सुकता आहेच... _कधी म्हणे विनोदे राधा, ‘ही मला सवत होई का?’ पण पाहताच इलेला, उरी उधाण ये मायेला, कुस्करी मग वारंवार, चुंबीते गोबरे गाल._ पण लग्नानंतर राधाने इलेला दिलेला संदेश आणि कृष्णाला दिलेला `दम` बहारदार आहे. इलेला संदेश _दे विश्वास अन् दे प्रोत्साहन. जाण असे तो प्रीत पुरुषोत्तम काम निपुण तो प्रेमिक उत्तम ...दे, कोमल तन, कोमल दे मन, प्रीत मनस्वी, तुझाच प्रीतम.’_ कृष्णाला `दम` _‘कठोर कांचन माझी काया, लता जणू ती, तनू कोमला, धिटाई हळू, बुजेल इला, सांभाळा तुम्ही गोपाळा!’_ काही ओळी मात्र आजही सर्वसामान्य पुरुषांनाही लागू पडतील की काय, इतक्या चपखल झाल्या आहेत. _नाही कशी मुळी लाज ;हवी मजा, वरती माज ; पुरूषांचे नीत्य काज ; बाईच्या मनीची आस कोणी ना पुसे त्यास_ चार भाग आणि ५८४ पदं असलेलं हे काव्य शृंगारीक असेलही, नव्हे आहेच. पण स्त्रीसन्मानाचा, प्रतिष्ठेचा आणि संवेदनशील मनाचा ठाव घेणारा तो एक ठेवा आहे. _इतिश्री शंतनूविरचितम् राधिका सांत्वनम् भावानुवादस्य केदारकृतपरिचयम् संपूर्णम् ...Read more

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
अक्षरनामा

https://www.aksharnama.com/client/article_detail/7120?fbclid=IwZXh0bgNhZW0CMTAAAR06UVpU4k8DLSaBDkgmglzUuRMuX2XQ3OKxRAdL-tQo1-DZwHV7_Q3uLE4_aem_ATgHVeQrpR7vbtSsdHKWSXs5EHm0mPjS_5lEI-n3B5uorlbUPMjKGOX9doFKfROrOtk