* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666472
  • Edition : 8
  • Publishing Year : APRIL 1996
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 84
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHEKARA IS AN EXCELLENT AND THE LAST SPECIMEN OF RANJIT DESAI`S NOTEWORTHY INGENUITY. SHEKARA IS A KIND OF SQUIRREL, GREY COLOURED, WITH A BLACK FURRY TAIL. IT IS FAMOUS FOR JUMPING FROM ONE TREE TO ANOTHER. THE MAIN CHARACTER OF THIS NOVEL IS A LONELY SQUIRREL. THIS STORY TAKES PLACE IN THE MIDST OF A DENSE FOREST. SHEKARA ROAMS THROUGHOUT THE JUNGLE FOR ITS FOOD, THROUGH ALL THE REGIONS AND SEASONS. WHILE DOING SO IT OBSERVES OTHER ANIMALS, THEIR HABITS, THEIR EFFORTS TO FIND FOOD, THEIR HELPLESSNESS WHILE STRUGGLING TO STAY ALIVE. SHEKARA OFTEN WITHESSES THIS, AND ITSELF BECOMES THE PREY TO HELPLESSNESS. RANJIT DESAI HAS PICTURED THE WHOLE STORY THROUGH SHEKARA`S EYES AND MIND. AFTER READING THE THE BOOK READER ALSO FEELS THAT HE/SHE IS AS LONELY AS THE SHEKARA. IT COMPELLS A DISCREET READER TO INTROSPECT ONCE AGAIN.
शेकरा हा खारीच्या जातीचा विशेषत: जंगलात आढळणारा, झाडावर राहाणारा, या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारत मुक्तपणे फिरणारा व आवश्यकतेप्रमाणे जमिनीवर येणारा प्राणी. शेकरा खारीसारखाच दिसणारा, पण खारीहून कितीतरी मोठा, झुबकेदार शेपटी असलेला शाकाहारी प्राणी आहे. वेगवेगळ्या झाडांवरची फळे खात हिंडण्याबरोबरच जंगलातील वन्य पशुंचे जीवननाट्य तो बिटबिट्या, लालबुंद डोळ्यांनी दुरून पाहात असतो. या निरीक्षणात तटस्थता नसते. खूप उत्सुकता असते; जमेल तेथे सहभाग आणि पलायनही असते. शेकराच्या नजरेतून लेखकाने जंगलातले जीवन दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. शेकराला दिसलेला निसर्ग, ऋतुमानानुसार त्यामध्ये होणारे विविध बदल तसेच अनेक पशु-पक्ष्यांच्या स्वाभाविक प्रेरणा, त्यांचा जीवनसंघर्ष यामध्ये चित्रित केला आहे. यामध्ये शेकराच्या दैनंदिन जीवनाबरोबरच त्याने पाहिलेल्या इतर नानाविध प्राण्यांच्या आयुष्यातील घटना-प्रसंगांचे हुबेहुब वर्णन आहे. शेकरा एका डोहाकाठी असलेल्या वडाच्या झाडावर बसून निसर्गाचे, तेथे पाणी पिण्यास येणार्या विविध पशु-पक्ष्यांचे निरीक्षण करतो. यामध्ये काळतोंड्या हुप्प्यांचं दात विचकून, भीती दाखवत अंगावर येणं, अस्वलाचं जमिनीवर पालापाचोळा हुंगत जाणं, मधमाश्यांच्या चाव्याची पर्वा न करता पोळं पाडून त्यातला मध पिणं आणि पिलांना मागे सारून वारुळात तोंड खुपसून अधाशासारखी एकट्यानेच वाळवी खाणं, वाघाची शिकारीला जाताना झाडाच्या सालीमध्ये नखांनी ओरबाडून ती साफ करण्याची सवय, मादी गव्याच्या प्रसूतीच्या वेळी खुद्द गवा आणि इतर माद्यांनी केलेले तिचे आणि वासराचे संरक्षण, सुसरीचं डोहाच्या काठावर येऊन ऊन अंगावर घेताना तोंडाचा आ वासून पक्ष्यांकडून दात साफ करून घेणं आणि डोहात शिरल्यावर किंचित डोके वर काढून पाणी पिण्यास आलेल्या भेकरास अलगद पाण्यात ओढून नेणं, प्रणयभंगास कारणीभूत ठरणार्या गजेंद्राच्या सोंडेला महाभुजंगाने घेतलेला चावा आणि त्यात झालेला दोघांचाही मृत्यू, नाग उंदराला खाण्याच्या पवित्र्यात तर झाडाच्या ढोलीतून बाहेर आलेले घुबड नागाला पकडण्याच्या तयारीत, भुकेलेल्या अजगराने सशाला लक्ष्य करणं; हे सारे प्रसंग अधूनमधून शेकराच्या डोळ्यांसमोर घडत असतात. दरम्यान, जंगलाला लागलेल्या आगीमध्ये सारे भस्मसात होते; साहजिकपणे बहुतेक सारे पशु-पक्षी हे जंगल सोडून आपल्या वाटेने दुसर्या जंगलात आश्रयास जातात. शेकरा मात्र या जागेने आजवर दिलेले सुख लक्षात घेऊन हे जंगल सोडून इतरत्र जात नाही; तर अशा प्रसंगातही तो बिळात असलेल्या सशाच्या दोन पिलांना कोवळे गवत देतो आणि त्यांच्याशी खेळतो तसेच तो सुतारपक्ष्याने चोचीने झाडामध्ये तयार केलेल्या पोकळीतील पिलांशी खेळण्याचा प्रयत्न करतो. अखेर एका दुर्दैवी क्षणी वाढत्या वयानुसार चपलताहीन झालेले शरीर आणि खचलेल्या मनाचा शेकरा पाणी पिण्यास येतो आणि बेसावधपणे खोकडाची शिकार होतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक #शेकरा#रणजीत#देसाई
Customer Reviews
  • Rating StarDAINIK PUDHARI 20-10-1996

    अंतर्मुख करणारी एक विलक्षण लघु कादंबरी… रणजित देसाई यांची अखेरची अभिव्यक्ती म्हणजे सुजाण वाचकास अंतर्मुख करणारी एक विलक्षण लघु कादंबरी म्हणजे ‘शेकरा’ असे म्हणावे लागेल. या कादंबरीचा नायक शेकरा हा खारीसारखा दिसणारा पण खारीहून मोठा असलेला शाकाहारी प्रणी. कादंबरीकारांनी शेकराद्वारे केलेले निवेदन हे मनोवेधक असून कादंबरीभर जंगल जीवनाचे चित्रण अगदी हुबेहूब केले आहे, त्यामुळे कादंबरीची मांडणी सुरेख झाली आहे. वाचक ही कादंबरी वाचताना शेकराच्या जीवनाशी एकरूप तर होतोच शिवाय शेकराच्या निवेदनाबरोबर जंगलातून फेरफटका मारूनही येतो. अनोळखी प्राणी जगत पाहून आल्याचा वास्तव पातळीसारखा अनुभव या कादंबरीतून येतो. रणजित देसाई हे लेखक भूतकाळात रमणाऱ्या प्रवृत्तीचे असून वाचक जेव्हा ही कादंबरी वाचतो, तेव्हा प्राणी जीवनाशी तो आपल्या जीवनाची तुलना सहजच करतो. पशुत्वापासून मानवतापर्यंत केलेला भुतकाळातील प्रवास आहे. आदिमकाळातील जीवनाचे जिवंत अवशेष म्हणजे ‘शेकरा’तील जंगली जीवनाचा आलेख आहे. मानवाच्या केलेल्या प्रदीर्घ प्रवासाचा आरंभ बिंदू मानता येईल इतके प्रभावी कलात्मक लेखन शेकरा या कादंबरीत आकारास आले आहे. शेकरा जंगलात भटकंती एकाकी जीवन जगत असतो. त्याच्या आसपास अनेक वन्य पशुपक्षीही जीवन जगत असतात. ‘बळी तो कान पिळी’प्रमाणे जंगलातील मोठे प्राणी लहान प्राण्यांना खाऊन जीवन जगत असतात. जंगलनियमाप्रमाणे चाललेल्या घडामोडीत अनेक दुबळे प्राणी सशक्तपणाचे भक्ष्य ठरतात. त्याचे जीवननाट्य तो शेकरा आपल्या बिटबिट्या डोळ्यांनी सतत पाहात असतो. या पाहण्यातही थंड अलिप्तता असते. भरपूर उत्कंठा असते. जमेल तिथं सहभाग असतो. काही ठिकाणी पलायनाच्या शारीरिक प्रतिक्रियाही भरपूर आहेत. सबंध कादंबरीभर सगळं जंगलातील प्राणीविश्व नैसर्गिकपणे पसरलेले आहे. यात शेकरा, काळतोंडे हुप्पे, माकड, वाघ, हरीण, हत्ती, सांबर, भेकरं, अस्वलं, रानडुक्करं, गवे, घारी, गिधाडे, ससाणे, सुसर, खोकड, मोर इतर पशुपक्षी, वनस्पती, पाऊस, पाणी, कडे, पहाड, डोंगर पाण्याचे विविध प्रवाह सर्व नाट्यपूर्ण, कौशल्यपूर्ण आणि जिवंतपणे त्यांच्या सहज हालचालीसह आपल्यासमोर फिरत आहे असे दृश्य दिसते. पशु-पक्षांतील जीवनाचे अनेक बारकावे असणारे प्रसंग सिनेमासारखे पाहून सुज्ञ वाचक थक्क होऊन जातो. जंगली प्राणी जीवनाचे भक्ष्य-भक्षक संबंध त्यातील क्रौर्य, रौद्र रूप, निष्पाप, निरागसता वाचकास खिळवून ठेवते. नीतीनियम, कायदे, परंपरा, पापपुण्य, उचित-अनुचित, रुढी, संस्कृती यांनी बंदिस्त असलेला आपला मानवी समाज जंगली प्राणी जीवनापेक्षा बरा सुसह्य आहे. अशा विरोधात्मक कल्पना वाचकास सुखावतात व सुरक्षितही वाटतात. शेकरा हा ससा, हरीण यांच्याप्रमाणे निष्पाप निरागस शाकाहारी चिमुकला खारीसारखा दिसणारा भाग्यवान प्राणी असावा असा आहे. तो सुरक्षित निरागसपणे जंगल अनुभवणारा प्राणी आहे असे वाटत न वाटत तोपर्यंत तो एका खोडकाचा भक्ष्य ठरतो. प्रतिकार करायला जवळ एकही साधन नाही. असेल तर ते फक्त पलायन पण तेही करण्यास तो फसतो. असह्यपणं जंगल कायद्याचा बळी ठरतो. याचा प्रत्यय कादंबरीच्या शेवटी येतो. मानवी जीवनातही निष्पाप, निरागस, निरुपद्रवता हे सांभाळून ठेवण्याचे गुण मानले जातात. ते कोणीही कुस्करू नये अशी भावना वाचकाच्या हृदयात ठासून बसते व जीवनातील अर्थही कळतो. या कादंबरीचे लेखन एका बाजूला वास्तव, वस्तुनिष्ठ, कलात्मक अलिप्ततेने कलेले आहे. मानवी जीवनावर किंवा जंगली जीवनावर भाष्य न करताही एकाकी शेकराच्या निवेदनातून सत्य सूचित प्रतिकाचे रूप मात्र स्पष्ट हृदयाशी जाऊन भिडते. मराठीत जसे लेखन दुर्मिळ असून कादंबरीकार रणजित देसाई यांच्या दिपस्तंभासारख्या उज्ज्वल प्रतिभेला शोभणारी अशीच आहे. निरुपद्रवी, निरागस व निष्पाप अशा लोकांना व्यवहारी जगात कोणीही शेकऱ्याप्रमाणे छळू नये. असेच जणू जगाचा निरोप घेताना शेकराच्या निवेदनातून त्यांनी सांगितले असावे असे वाटून जीवाला चटका लागून राहतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more