* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: A PRISONER OF BIRTH
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9788184983159
  • Edition : 4
  • Publishing Year : JANUARY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 592
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :JEFFREY ARCHER COMBO - 32 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IF DANNY CARTWRIGHT HAD PROPOSED TO BETH WILSON THE DAY BEFORE, OR THE DAY AFTER, HE WOULD NOT HAVE BEEN ARRESTED AND CHARGED WITH THE MURDER OF HIS BEST FRIEND. AND WHEN THE FOUR PROSECUTION WITNESSES ARE A BARRISTER, A POPULAR ACTOR, AN ARISTOCRAT AND THE YOUNGEST PARTNER IN AN ESTABLISHED FIRM’S HISTORY, WHO IS GOING TO BELIEVE HIS SIDE OF THE STORY? DANNY IS SENTENCED TO TWENTY-TWO YEARS AND IS SENT TO BELMARSH PRISON, THE HIGHEST SECURITY JAIL IN THE LAND, FROM WHERE NO INMATE HAS EVER ESCAPED. BUT EVERYONE HAS UNDERESTIMATED DANNY’S DETERMINATION TO SEEK REVENGE AND BETH’S RELENTLESS QUEST TO WIN JUSTICE . . .
डॅनी कार्टराईटने बेथ विल्सनला लग्नाची मागणी आदल्या दिवशी किंवा दुस-या दिवशी घातली असती, तर त्याच्यावर आपल्या जिवलग मित्राचा खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला नसता आणि त्याला अटकसुद्धा झाली नसती. जेव्हा फिर्यादी पक्षाकडून चार नामांकित साक्षीदार आणण्यात येतात : एक बॅरिस्टर, एक लोकप्रिय अभिनेता, एक उच्चकुलीन प्रतिष्ठीत व्यक्ती आणि एक नावाजलेल्या फर्ममधला तरुण, धडाडीचा पार्टनर... तेव्हा तुमची बाजू कोर्टात कोण ऐकून घेणार? डॅनीला बावीस वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा होते. त्याला बेलमार्श तुरुंगात पाठवण्यात येतं. देशातल्या सर्वांत जास्त कडक सुरक्षाव्यवस्थेसाठी प्रसिद्ध असलेला हा तुरुंग! आजवर कोणताही कैदी तिथून पळून जाऊ शकलेला नाही. पण डॅनीच्या अंतर्यामी एक आग भडकलेली आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याची आग. ती आग त्याला जाळते आहे; पण याची किंचितही कल्पना स्पेन्सर क्रेग, लॉरेन्स डेवनपोर्ट, जेराल्ड पेन आणि टोबी र्मोिटमर यांना नाही. डॅनीला साथ आहे त्याच्या प्रेयसीची, बेथची. डॅनीच्या नावाला लागलेला कलंक धुवून काढण्यासाठी तिनेही न्यायालयाची दारं ठोठावलेली आहेत. सच्चा दिलाच्या या प्रेमिकांच्या अथक प्रयत्नांनी अखेर त्या चौघांना पळता भुई थोडी होते. जिवावर उदार होऊन अखेर रणांगणातून पळ काढावा लागतो. `केन आणि एबल` नंतरची तेवढीच जबरदस्त, वाचकांची मती गुंग करणारी, शेवटच्या पानापर्यंत वाचकांच्या मनाचा ताबा घेऊन त्यांना खिळवून टाकणारी ही कादंबरी!

No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #जेफ्रीआर्चर #JEFFREYARCHER #ANJANINARAVANE #AJITTHAKUR #SUDHAKARLAWATE #LEENASOHONI #NOTAPENNYMORENOTAPENNYLESS #नॉटअपेनीमोअरनॉटअपेनीलेस #SONSOFFORTUNE #सन्सऑफफॉर्च्युन #FALSEIMPRESSION #फॉल्सइम्प्रेशन #APRISONEROFBIRTH #अप्रिझनरऑफबर्थ #KANEANDABLE #केनअँडएबल #CATONINETALES #कॅटओनाइनटेल्स #TOCUTALONGSTORYSHORT #टूकटअलाँगस्टोरीशॉर्ट #ANDTHEREBYHANGSATALE #अ‍ॅण्डदेअरबायहँग्जअटेल PATHS OF GLORY पाथ्स् ऑफ ग्लॉरी "
Customer Reviews
  • Rating StarYogesh Khurd

    जेफ्री आर्चर लिखित `अ प्रिझनर ऑफ बर्थ` नुकतीच वाचून झाली. पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहिल्यावर वाचावे इतपत काही वाटले नाही. पण बऱ्याच ठिकाणी पुस्तकाबद्दल वाचल्याने उत्सुकता चाळवली गेली. आणि अखेर पुस्तक घेतले. घनिष्ठ मैत्री, पराकोटीचे शत्रुत्व, निर्व्याजप्रेम अशा भावनांनी भरलेली ही कादंबरी वाचकाला आपलेसे करून घेते. कथा युरोपातील इंग्लंड, स्कॉटलंड, स्वित्झर्लंड या देशांत घडते. अतिशय वेगवान घडामोडींनी कथानकातील थरार कायम ठेवत कथानक पुढे जाते. खुनाचा ठपका बसलेला नायक मुळात निर्दोष आहे. तो तुरुंगातून कसा निसटतो आणि आपल्या मित्राच्या खुन्यांचा बदला कसा घेतो हे वाचनीय आहे. ...Read more

  • Rating StarPranav Unhale

    __"ज्यांची नियत साफ असते, त्यांचा पराभव कधीही होत नाही !" - आयुष्यात अनुभवांस आलेले प्रसंग, प्रत्यक्ष पाहिलेल्या घटना आणि आजवर केलेल्या वाचनातून मिळालेले बोध ह्या निकषांच्या आधारांवर हा विश्वास माझ्या मनात निर्माण झाला होता; आणि या विश्वासाला अधिक दृ व बळकट करण्याचं कार्य प्रख्यात लेखक `जेफ्री आर्चर`द्वारा लिखित, `A Prisoner Of Birth !` या कादंबरीने केलं. "माणूस स्वतःशी प्रामाणिक असला, इतरांचं जाणणारा असला, आलेल्या संकटांना न घाबरता धैर्याने सामोरा जाणारा असला आणि जिद्द, चिकाटी, संयम व शिस्त यांना अंगी बाळगणारा गुणवंत असला की, नियती सुद्धा एखाद्या निष्ठावान प्रेमिकेसारखी त्याची साथ देते." हा बोध आपल्या सर्वांच्या मनामनांवर बिंबवणारी ही प्रतिशोधकथा ! ही कहाणी आहे, लंडनमधील ईस्ट-एंड भागांत राहणाऱ्या `डॅनिअल कार्टराईट` उर्फ डॅनी नामक एका बॉक्सर तरुणाची ! चरितार्थासाठी तो एका गॅरेजवर मेकॅनिक म्हणून कार्यरत होता. त्या गॅरेजचे मालक मि.जॉर्ज विल्सन यांची मुलगी एलिझाबेथ हिच्यावर डॅनीचं प्रेम होतं. १८ सप्टेंबर, १९९९ रोजी संध्याकाळी एका रेस्टॉरंटमध्ये डॅनीने गुडघ्यांवर खाली बसत बेथला लग्नाची मागणी घातली. या मागणीला बेथने होकारही दिला. त्या रात्री लग्नाची एंगेजमेंट साजरी करण्यासाठी डॅनी, बेथ व बेथचा भाऊ बर्नार्ड विल्सन उर्फ बर्नी हे तिघे एका बार मध्ये जमले. त्या तिघांची लहानपणापासून मैत्री होती. बारमधील एका टेबलाभोवती बसून हे तिघे मित्र आनंद साजरा करत असतांना, तिथे आलेल्या चार जणांच्या टोळक्यातील दोघांनी बेथची छेड काढत तिला शिवीगाळ केली. यामुळे संतप्त झालेला बर्नी व त्या चौघांमध्ये बाचाबाची झाली, त्याचं रूपांतर मारामारीत होऊन त्या चौघांमधील एकाने बर्नीच्या पोटात चाकू भोसकून त्याचा खून केला. टोळीतील संबंधित चौघांनी कोर्टासमोर स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी, समाजातील आपल्या प्रतिष्ठेचा वापर करत एक योजना आखली व या खुनाचा आरोप टाकला मृत बर्नीचा मित्र, बेथचा प्रियकर आणि या कादंबरीचा नायक असलेल्या निरपराध `डॅनिअल कार्टराईट` वर ! कोर्टाने डॅनीला दोषी ठरवत २२ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. व न्यायालयीन कोठडीमधून त्याची रवानगी ज्या कारागृहात झाली, त्याचं नाव होतं, `बेलमार्श प्रिझन !` अत्यंत कडक सुरक्षाव्यवस्थेसाठी ओळखला जाणारा हा तुरुंग ! कोणताही कैदी या तुरूंगातून निसटून जाऊ शकला नव्हता. अशा या तुरूंगातून अत्यंत आश्चर्यकारकपणे बाहेर येऊन खऱ्या गुन्हेगारांना धडा शिकवणाऱ्या `डॅनिअल कार्टराईट`ची ही प्रतिशोधकथा ! शिर्षकाप्रमाणेच ही कथा अन्याय, कारावास, षडयंत्र व प्रतिशोध यांच्या वलयामध्ये साकारलेली असली तरी, या कथानकात एक प्रकारची `Positivity` आहे. "आजही या जगात तत्वनिष्ठ, संवेदनशील व सत्यप्रिय लोक अस्तित्वात आहेत" यावर आपला विश्वास दृढ करणारी ही कथा आहे. ● डॅनीची ही कथा आपल्याला कोणकोणते बोध देते ? • We All Suffer In Our Own Different Ways From Being Prisoners Of Birth ! • या पृथ्वीवर जन्मास येणारा प्रत्येकजण त्याच्यासोबत त्याची सुखदुःख व संकटांना सोबत घेऊनच जन्माला येत असतो. याला कोणीही अपवाद असू शकत नाही. • अडचणींच्या वेळी पूर्वायुष्यातील आपला प्रामाणिकपणा व सद्य परिस्थितीविषयी आशावादी दृष्टिकोन या दोनच गोष्टी आपली साथ देतात. • आपल्या प्रत्येकाच्या जन्मामागे एक दैवी हेतू असतो, एकदा तो आपल्या लक्षात आला की, जीवन व मृत्यू या अवस्था आपल्याला कधीही शिक्षेप्रमाणे भासत नाहीत. • माणसाने भावनांच्या भरात आपल्या हातून कोणतेही अपकृत्य घडणार नाही याची काळजी सतत घ्यायला हवी. तसेच राग व्यक्त करण्याच्या आपल्या पद्धतीमध्येही एक प्रकारचा संयम व शांतता असायला हवी. रागाच्या भरातील आपले कोणतेही कृत्य `डॅनी कार्टराईट` प्रमाणे आपल्याला केव्हा आणि कसे गोत्यात आणू शकते याची आपण कल्पनाही करू शकत नाही. • जे लोक खोटं बोलतात, ते नेहमीच काहीतरी चूक नक्की करतात. त्यांची ही चूक त्यांना प्रगतीपथावर कधीही पुढे जाऊ देत नाही. असे लोक व त्यांच्या खोटेपणाला तोंड देण्याची वेळ आपल्यावर आल्यास, तिथे वाद न घालता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. नियती अशा लोकांचा अगदी योग्य वेळेवर न्याय करते. • कितीही वाईट वेळ आली तरी आपल्यासाठी अज्ञात असलेल्या गोष्टींचे शिक्षण घेण्यात, चांगल्या सवयी अंगिकारण्यात आपण कधीही काचकूच करता कामा नये. अशा वेळी आपण दर्शविलेली तयारी पुढे आपला मार्ग अधिक सोयीचा करत असते. कादंबरीच्या लेखनाविषयी सांगायचं झाल्यास, कोणीतरी म्हंटलंच आहे, "A Brilliant Mind Is Known By Its Ability To Communicate A Complicated Subject Matter In A Simple Manner And Without Losing The Essence." - हीच जेफ्री आर्चर यांच्या लेखन कौशल्यातील प्रशंसनीय बाब आहे. कथानक अर्ध्यातून पुढे किंचित गुंतागुंतीचं असलं तरी, वाचकाला ते सहज समजेल याची विशेष काळजी घेतली आहे. पुस्तकातील प्रत्येक प्रसंग, पात्र आणि पानापानांवर येणारे "Twist & Turns" तर इतक्या खुबीने रंगवले आहेत की, वाचतांना ती परिस्थिती प्रत्यक्षात अनुभवत असल्याचा आभास आपल्याला होतो. मुखपृष्ठ व हा अभिप्राय पाहता वाटते तितकी साधं-सरळ ही कहाणी नसून मधल्या मध्ये त्यात प्रचंड मोठ्ठं वळण आहे ! त्या वळणावर विशाल कलाटणी घेत ही कहाणी आपल्याला एका वेगळ्या दिशेला घेऊन जाते, आणि सरतेशेवटी तिथेच घेऊन येते, ज्याची प्रतीक्षा `डॅनी`, व अपेक्षा आपण करत असतो ! हे झालं समिक्षण ! वैयक्तिक मत सांगायचं झाल्यास, लेखक `जेफ्री आर्चर` यांच्या साहित्यातील मी वाचलेली ही पहिलीच कलाकृती; आणि केवळ या एकाच लेखनाने मी त्यांचा प्रशंसक झालो. या कादंबरीतून मिळालेले सर्व बोध माझ्यासाठी अमूल्य आहेत, मी ते आत्मसात करेन आणि एक गोष्ट तर मी कधीच विसरणार नाही - "ज्यांची नियत साफ असते; त्यांचा पराभव कधीही होत नाही ! ...Read more

  • Rating StarPranav Survase

    प्रत्येकाने नक्की वाचाव अशी कादंबरी. मित्राचा खून केल्याच्या आरोपावरून तुरुंगात जाणाऱ्या व आश्चर्यकारकरीत्या बाहेर येऊन खऱ्या गुन्हेगाराला धडा शिकवणाऱ्या डॅनीची उत्कंठावर्धक कथा.अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणारी कादंबरी.

  • Rating StarMADHAVI DESHPANDE

    मस्तच आहे . तीनवेळा वाचलं आहे मी.

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more