* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: A PRISONER OF BIRTH
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9788184983159
  • Edition : 4
  • Publishing Year : JANUARY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 592
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :JEFFREY ARCHER COMBO - 27 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IF DANNY CARTWRIGHT HAD PROPOSED TO BETH WILSON THE DAY BEFORE, OR THE DAY AFTER, HE WOULD NOT HAVE BEEN ARRESTED AND CHARGED WITH THE MURDER OF HIS BEST FRIEND. AND WHEN THE FOUR PROSECUTION WITNESSES ARE A BARRISTER, A POPULAR ACTOR, AN ARISTOCRAT AND THE YOUNGEST PARTNER IN AN ESTABLISHED FIRM’S HISTORY, WHO IS GOING TO BELIEVE HIS SIDE OF THE STORY? DANNY IS SENTENCED TO TWENTY-TWO YEARS AND IS SENT TO BELMARSH PRISON, THE HIGHEST SECURITY JAIL IN THE LAND, FROM WHERE NO INMATE HAS EVER ESCAPED. BUT EVERYONE HAS UNDERESTIMATED DANNY’S DETERMINATION TO SEEK REVENGE AND BETH’S RELENTLESS QUEST TO WIN JUSTICE . . .
डॅनी कार्टराईटने बेथ विल्सनला लग्नाची मागणी आदल्या दिवशी किंवा दुस-या दिवशी घातली असती, तर त्याच्यावर आपल्या जिवलग मित्राचा खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला नसता आणि त्याला अटकसुद्धा झाली नसती. जेव्हा फिर्यादी पक्षाकडून चार नामांकित साक्षीदार आणण्यात येतात : एक बॅरिस्टर, एक लोकप्रिय अभिनेता, एक उच्चकुलीन प्रतिष्ठीत व्यक्ती आणि एक नावाजलेल्या फर्ममधला तरुण, धडाडीचा पार्टनर... तेव्हा तुमची बाजू कोर्टात कोण ऐकून घेणार? डॅनीला बावीस वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा होते. त्याला बेलमार्श तुरुंगात पाठवण्यात येतं. देशातल्या सर्वांत जास्त कडक सुरक्षाव्यवस्थेसाठी प्रसिद्ध असलेला हा तुरुंग! आजवर कोणताही कैदी तिथून पळून जाऊ शकलेला नाही. पण डॅनीच्या अंतर्यामी एक आग भडकलेली आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याची आग. ती आग त्याला जाळते आहे; पण याची किंचितही कल्पना स्पेन्सर क्रेग, लॉरेन्स डेवनपोर्ट, जेराल्ड पेन आणि टोबी र्मोिटमर यांना नाही. डॅनीला साथ आहे त्याच्या प्रेयसीची, बेथची. डॅनीच्या नावाला लागलेला कलंक धुवून काढण्यासाठी तिनेही न्यायालयाची दारं ठोठावलेली आहेत. सच्चा दिलाच्या या प्रेमिकांच्या अथक प्रयत्नांनी अखेर त्या चौघांना पळता भुई थोडी होते. जिवावर उदार होऊन अखेर रणांगणातून पळ काढावा लागतो. `केन आणि एबल` नंतरची तेवढीच जबरदस्त, वाचकांची मती गुंग करणारी, शेवटच्या पानापर्यंत वाचकांच्या मनाचा ताबा घेऊन त्यांना खिळवून टाकणारी ही कादंबरी!

No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #जेफ्रीआर्चर #JEFFREYARCHER #ANJANINARAVANE #AJITTHAKUR #SUDHAKARLAWATE #LEENASOHONI #NOTAPENNYMORENOTAPENNYLESS #नॉटअपेनीमोअरनॉटअपेनीलेस #SONSOFFORTUNE #सन्सऑफफॉर्च्युन #FALSEIMPRESSION #फॉल्सइम्प्रेशन #APRISONEROFBIRTH #अप्रिझनरऑफबर्थ #KANEANDABLE #केनअँडएबल #CATONINETALES #कॅटओनाइनटेल्स #TOCUTALONGSTORYSHORT #टूकटअलाँगस्टोरीशॉर्ट #ANDTHEREBYHANGSATALE #अ‍ॅण्डदेअरबायहँग्जअटेल PATHS OF GLORY पाथ्स् ऑफ ग्लॉरी "
Customer Reviews
  • Rating StarYogesh Khurd

    जेफ्री आर्चर लिखित `अ प्रिझनर ऑफ बर्थ` नुकतीच वाचून झाली. पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहिल्यावर वाचावे इतपत काही वाटले नाही. पण बऱ्याच ठिकाणी पुस्तकाबद्दल वाचल्याने उत्सुकता चाळवली गेली. आणि अखेर पुस्तक घेतले. घनिष्ठ मैत्री, पराकोटीचे शत्रुत्व, निर्व्याजप्रेम अशा भावनांनी भरलेली ही कादंबरी वाचकाला आपलेसे करून घेते. कथा युरोपातील इंग्लंड, स्कॉटलंड, स्वित्झर्लंड या देशांत घडते. अतिशय वेगवान घडामोडींनी कथानकातील थरार कायम ठेवत कथानक पुढे जाते. खुनाचा ठपका बसलेला नायक मुळात निर्दोष आहे. तो तुरुंगातून कसा निसटतो आणि आपल्या मित्राच्या खुन्यांचा बदला कसा घेतो हे वाचनीय आहे. ...Read more

  • Rating StarPranav Unhale

    __"ज्यांची नियत साफ असते, त्यांचा पराभव कधीही होत नाही !" - आयुष्यात अनुभवांस आलेले प्रसंग, प्रत्यक्ष पाहिलेल्या घटना आणि आजवर केलेल्या वाचनातून मिळालेले बोध ह्या निकषांच्या आधारांवर हा विश्वास माझ्या मनात निर्माण झाला होता; आणि या विश्वासाला अधिक दृ व बळकट करण्याचं कार्य प्रख्यात लेखक `जेफ्री आर्चर`द्वारा लिखित, `A Prisoner Of Birth !` या कादंबरीने केलं. "माणूस स्वतःशी प्रामाणिक असला, इतरांचं जाणणारा असला, आलेल्या संकटांना न घाबरता धैर्याने सामोरा जाणारा असला आणि जिद्द, चिकाटी, संयम व शिस्त यांना अंगी बाळगणारा गुणवंत असला की, नियती सुद्धा एखाद्या निष्ठावान प्रेमिकेसारखी त्याची साथ देते." हा बोध आपल्या सर्वांच्या मनामनांवर बिंबवणारी ही प्रतिशोधकथा ! ही कहाणी आहे, लंडनमधील ईस्ट-एंड भागांत राहणाऱ्या `डॅनिअल कार्टराईट` उर्फ डॅनी नामक एका बॉक्सर तरुणाची ! चरितार्थासाठी तो एका गॅरेजवर मेकॅनिक म्हणून कार्यरत होता. त्या गॅरेजचे मालक मि.जॉर्ज विल्सन यांची मुलगी एलिझाबेथ हिच्यावर डॅनीचं प्रेम होतं. १८ सप्टेंबर, १९९९ रोजी संध्याकाळी एका रेस्टॉरंटमध्ये डॅनीने गुडघ्यांवर खाली बसत बेथला लग्नाची मागणी घातली. या मागणीला बेथने होकारही दिला. त्या रात्री लग्नाची एंगेजमेंट साजरी करण्यासाठी डॅनी, बेथ व बेथचा भाऊ बर्नार्ड विल्सन उर्फ बर्नी हे तिघे एका बार मध्ये जमले. त्या तिघांची लहानपणापासून मैत्री होती. बारमधील एका टेबलाभोवती बसून हे तिघे मित्र आनंद साजरा करत असतांना, तिथे आलेल्या चार जणांच्या टोळक्यातील दोघांनी बेथची छेड काढत तिला शिवीगाळ केली. यामुळे संतप्त झालेला बर्नी व त्या चौघांमध्ये बाचाबाची झाली, त्याचं रूपांतर मारामारीत होऊन त्या चौघांमधील एकाने बर्नीच्या पोटात चाकू भोसकून त्याचा खून केला. टोळीतील संबंधित चौघांनी कोर्टासमोर स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी, समाजातील आपल्या प्रतिष्ठेचा वापर करत एक योजना आखली व या खुनाचा आरोप टाकला मृत बर्नीचा मित्र, बेथचा प्रियकर आणि या कादंबरीचा नायक असलेल्या निरपराध `डॅनिअल कार्टराईट` वर ! कोर्टाने डॅनीला दोषी ठरवत २२ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. व न्यायालयीन कोठडीमधून त्याची रवानगी ज्या कारागृहात झाली, त्याचं नाव होतं, `बेलमार्श प्रिझन !` अत्यंत कडक सुरक्षाव्यवस्थेसाठी ओळखला जाणारा हा तुरुंग ! कोणताही कैदी या तुरूंगातून निसटून जाऊ शकला नव्हता. अशा या तुरूंगातून अत्यंत आश्चर्यकारकपणे बाहेर येऊन खऱ्या गुन्हेगारांना धडा शिकवणाऱ्या `डॅनिअल कार्टराईट`ची ही प्रतिशोधकथा ! शिर्षकाप्रमाणेच ही कथा अन्याय, कारावास, षडयंत्र व प्रतिशोध यांच्या वलयामध्ये साकारलेली असली तरी, या कथानकात एक प्रकारची `Positivity` आहे. "आजही या जगात तत्वनिष्ठ, संवेदनशील व सत्यप्रिय लोक अस्तित्वात आहेत" यावर आपला विश्वास दृढ करणारी ही कथा आहे. ● डॅनीची ही कथा आपल्याला कोणकोणते बोध देते ? • We All Suffer In Our Own Different Ways From Being Prisoners Of Birth ! • या पृथ्वीवर जन्मास येणारा प्रत्येकजण त्याच्यासोबत त्याची सुखदुःख व संकटांना सोबत घेऊनच जन्माला येत असतो. याला कोणीही अपवाद असू शकत नाही. • अडचणींच्या वेळी पूर्वायुष्यातील आपला प्रामाणिकपणा व सद्य परिस्थितीविषयी आशावादी दृष्टिकोन या दोनच गोष्टी आपली साथ देतात. • आपल्या प्रत्येकाच्या जन्मामागे एक दैवी हेतू असतो, एकदा तो आपल्या लक्षात आला की, जीवन व मृत्यू या अवस्था आपल्याला कधीही शिक्षेप्रमाणे भासत नाहीत. • माणसाने भावनांच्या भरात आपल्या हातून कोणतेही अपकृत्य घडणार नाही याची काळजी सतत घ्यायला हवी. तसेच राग व्यक्त करण्याच्या आपल्या पद्धतीमध्येही एक प्रकारचा संयम व शांतता असायला हवी. रागाच्या भरातील आपले कोणतेही कृत्य `डॅनी कार्टराईट` प्रमाणे आपल्याला केव्हा आणि कसे गोत्यात आणू शकते याची आपण कल्पनाही करू शकत नाही. • जे लोक खोटं बोलतात, ते नेहमीच काहीतरी चूक नक्की करतात. त्यांची ही चूक त्यांना प्रगतीपथावर कधीही पुढे जाऊ देत नाही. असे लोक व त्यांच्या खोटेपणाला तोंड देण्याची वेळ आपल्यावर आल्यास, तिथे वाद न घालता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. नियती अशा लोकांचा अगदी योग्य वेळेवर न्याय करते. • कितीही वाईट वेळ आली तरी आपल्यासाठी अज्ञात असलेल्या गोष्टींचे शिक्षण घेण्यात, चांगल्या सवयी अंगिकारण्यात आपण कधीही काचकूच करता कामा नये. अशा वेळी आपण दर्शविलेली तयारी पुढे आपला मार्ग अधिक सोयीचा करत असते. कादंबरीच्या लेखनाविषयी सांगायचं झाल्यास, कोणीतरी म्हंटलंच आहे, "A Brilliant Mind Is Known By Its Ability To Communicate A Complicated Subject Matter In A Simple Manner And Without Losing The Essence." - हीच जेफ्री आर्चर यांच्या लेखन कौशल्यातील प्रशंसनीय बाब आहे. कथानक अर्ध्यातून पुढे किंचित गुंतागुंतीचं असलं तरी, वाचकाला ते सहज समजेल याची विशेष काळजी घेतली आहे. पुस्तकातील प्रत्येक प्रसंग, पात्र आणि पानापानांवर येणारे "Twist & Turns" तर इतक्या खुबीने रंगवले आहेत की, वाचतांना ती परिस्थिती प्रत्यक्षात अनुभवत असल्याचा आभास आपल्याला होतो. मुखपृष्ठ व हा अभिप्राय पाहता वाटते तितकी साधं-सरळ ही कहाणी नसून मधल्या मध्ये त्यात प्रचंड मोठ्ठं वळण आहे ! त्या वळणावर विशाल कलाटणी घेत ही कहाणी आपल्याला एका वेगळ्या दिशेला घेऊन जाते, आणि सरतेशेवटी तिथेच घेऊन येते, ज्याची प्रतीक्षा `डॅनी`, व अपेक्षा आपण करत असतो ! हे झालं समिक्षण ! वैयक्तिक मत सांगायचं झाल्यास, लेखक `जेफ्री आर्चर` यांच्या साहित्यातील मी वाचलेली ही पहिलीच कलाकृती; आणि केवळ या एकाच लेखनाने मी त्यांचा प्रशंसक झालो. या कादंबरीतून मिळालेले सर्व बोध माझ्यासाठी अमूल्य आहेत, मी ते आत्मसात करेन आणि एक गोष्ट तर मी कधीच विसरणार नाही - "ज्यांची नियत साफ असते; त्यांचा पराभव कधीही होत नाही ! ...Read more

  • Rating StarPranav Survase

    प्रत्येकाने नक्की वाचाव अशी कादंबरी. मित्राचा खून केल्याच्या आरोपावरून तुरुंगात जाणाऱ्या व आश्चर्यकारकरीत्या बाहेर येऊन खऱ्या गुन्हेगाराला धडा शिकवणाऱ्या डॅनीची उत्कंठावर्धक कथा.अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणारी कादंबरी.

  • Rating StarMADHAVI DESHPANDE

    मस्तच आहे . तीनवेळा वाचलं आहे मी.

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more