DR. ARVIND VAMAN KULKARNI

About Author

Birth Date : 04/07/1933
Death Date : 29/10/2003


DR. ARVIND VAMAN KULKARNI WAS A RENOWNED CRITIC, WRITER, POET. HIS DEVELOPMENT OF MARATHI PLAYWRITING TECHNIQUE - ETC. S. 1843 TO ETC. S. IN 1950, HIS PH.D. THESIS WAS AWARDED THE PARANJAPE PRIZE OF THE UNIVERSITY OF PUNE. HE TAUGHT MARATHI AT BRIHANMAHARASHTRA COLLEGE, PUNE, FERGUSSON COLLEGE AND JSM COLLEGE, ALIBAUG.

डॉ. अरविंद वामन कुळकर्णी हे नामवंत समीक्षक, लेखक, कवी होते. त्यांच्या ’मराठी नाट्यलेखन तंत्राचा विकास - इ. स. 1843 ते इ. स. 1950’ या पीएच.डी.च्या प्रबंधाला पुणे विद्यापीठाचे परांजपे पारितोषिक प्राप्त झाले होते. त्यांनी पुण्याच्या बृहन्महाराष्ट्र महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि अलिबागच्या जेएसएम महाविद्यालयात मराठीचे अध्यापन केले. अनेक विद्यार्थ्यांना एम.फिल./पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले. अनेक विद्यापीठांमध्ये ते निमंत्रित प्राध्यापक म्हणून जात असत. विविध मासिकांतून त्यांनी साहित्यविषयक लेख लिहिले. विविध मंचांवरून त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने दिली. त्यांच्या नावावर सुमारे सतरा ठांथ आहेत. इतस्तत:, कविता तायाच्या, वाटेच्या, रूप अव्यक्ता फुटले यांसारखे कवितासंठाह, साहित्यविचार सारखा भारतीय साहित्यशास्त्राबरोबरच साहित्याचा विविधांगाने अभ्यासपूर्ण वेध घेणारा ठांथ, मराठी नाट्यलेखन तंत्राची वाटचाल, विस्मरणात गेलेली नाटके यांसारखे नाट्यविषयक ठांथ इ. त्यांची ठांथसंपदा त्यांच्या लेखनाची वैविध्यपूर्णता दर्शवते. शरद जोशींबरोबर पंजाबात, भारतीय अर्थवादाचा क्रियाशील जनक, इ. पुस्तके हे त्यांच्या शेतकरी चळवळीतील सहभागाचे फलित होते. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्याबरोबर त्यांनी काम केले होते. ठाामीण साहित्य चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. साहित्यकृतीची गरज ओळखून त्याप्रमाणे समीक्षा करणे आणि साहित्यकृतीतील दोषही परखडपणे दाखवून देणे, ही त्यांच्या समीक्षात्मक लेखनाची वैशिष्ट्ये होती. मानसशास्त्रीय समीक्षेला अधिक उपयोजित करण्यात ते अठास्थानी होते. इतस्तत:, कविता तायाच्या, वाटेच्या या त्यांच्या कवितासंठाहांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला. उपयोजित समीक्षा : लक्षणे आणि पडताळणी या ठांथासाठी त्यांना साहित्य परिषदेच्या रा. श्री. जोग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनी त्यांच्या नावाने नवोदितांना समीक्षेसाठी आणि कवितेसाठी आलटूनपालटून पुरस्कार दिला जातो. पाच हजार रुपयांचा हा पुरस्कार आहे. या वर्षीपासून कशिश या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी त्यांच्या नावाचा पुरस्कार दिला जाणार आहे. पंधरा हजार रुपयांचा हा पुरस्कार असेल. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे ते संस्थापक सदस्य होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या साहित्य पत्रिका या मासिकाचे काही काळ ते संपादक होते. त्यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल त्यांचे नाव 1983च्या इंडियाज हूज हूमध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यांच्या घराजवळील चौकाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. 1975च्या आणीबाणीला उघड उघड विरोध दर्शवणार्या मोजक्या साहित्यिकांपैकी ते एक होते. समाजाशी नाळ जोडलेले ते एक व्यासंगी समीक्षक-कवी होते.
Sort by
Search by Discount
Show per page
Items 1 to 1 of 1 total
38 %
OFF
UPYOJIT SAMIKSHA : LAKSHANE ANI PADT... Rating Star
Add To Cart INR 160 INR 99

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more