DR. ARVIND VAMAN KULKARNI

About Author

Birth Date : 04/07/1933
Death Date : 29/10/2003


DR. ARVIND VAMAN KULKARNI WAS A RENOWNED CRITIC, WRITER, POET. HIS DEVELOPMENT OF MARATHI PLAYWRITING TECHNIQUE - ETC. S. 1843 TO ETC. S. IN 1950, HIS PH.D. THESIS WAS AWARDED THE PARANJAPE PRIZE OF THE UNIVERSITY OF PUNE. HE TAUGHT MARATHI AT BRIHANMAHARASHTRA COLLEGE, PUNE, FERGUSSON COLLEGE AND JSM COLLEGE, ALIBAUG.

डॉ. अरविंद वामन कुळकर्णी हे नामवंत समीक्षक, लेखक, कवी होते. त्यांच्या ’मराठी नाट्यलेखन तंत्राचा विकास - इ. स. 1843 ते इ. स. 1950’ या पीएच.डी.च्या प्रबंधाला पुणे विद्यापीठाचे परांजपे पारितोषिक प्राप्त झाले होते. त्यांनी पुण्याच्या बृहन्महाराष्ट्र महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि अलिबागच्या जेएसएम महाविद्यालयात मराठीचे अध्यापन केले. अनेक विद्यार्थ्यांना एम.फिल./पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले. अनेक विद्यापीठांमध्ये ते निमंत्रित प्राध्यापक म्हणून जात असत. विविध मासिकांतून त्यांनी साहित्यविषयक लेख लिहिले. विविध मंचांवरून त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने दिली. त्यांच्या नावावर सुमारे सतरा ठांथ आहेत. इतस्तत:, कविता तायाच्या, वाटेच्या, रूप अव्यक्ता फुटले यांसारखे कवितासंठाह, साहित्यविचार सारखा भारतीय साहित्यशास्त्राबरोबरच साहित्याचा विविधांगाने अभ्यासपूर्ण वेध घेणारा ठांथ, मराठी नाट्यलेखन तंत्राची वाटचाल, विस्मरणात गेलेली नाटके यांसारखे नाट्यविषयक ठांथ इ. त्यांची ठांथसंपदा त्यांच्या लेखनाची वैविध्यपूर्णता दर्शवते. शरद जोशींबरोबर पंजाबात, भारतीय अर्थवादाचा क्रियाशील जनक, इ. पुस्तके हे त्यांच्या शेतकरी चळवळीतील सहभागाचे फलित होते. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्याबरोबर त्यांनी काम केले होते. ठाामीण साहित्य चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. साहित्यकृतीची गरज ओळखून त्याप्रमाणे समीक्षा करणे आणि साहित्यकृतीतील दोषही परखडपणे दाखवून देणे, ही त्यांच्या समीक्षात्मक लेखनाची वैशिष्ट्ये होती. मानसशास्त्रीय समीक्षेला अधिक उपयोजित करण्यात ते अठास्थानी होते. इतस्तत:, कविता तायाच्या, वाटेच्या या त्यांच्या कवितासंठाहांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला. उपयोजित समीक्षा : लक्षणे आणि पडताळणी या ठांथासाठी त्यांना साहित्य परिषदेच्या रा. श्री. जोग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनी त्यांच्या नावाने नवोदितांना समीक्षेसाठी आणि कवितेसाठी आलटूनपालटून पुरस्कार दिला जातो. पाच हजार रुपयांचा हा पुरस्कार आहे. या वर्षीपासून कशिश या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी त्यांच्या नावाचा पुरस्कार दिला जाणार आहे. पंधरा हजार रुपयांचा हा पुरस्कार असेल. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे ते संस्थापक सदस्य होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या साहित्य पत्रिका या मासिकाचे काही काळ ते संपादक होते. त्यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल त्यांचे नाव 1983च्या इंडियाज हूज हूमध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यांच्या घराजवळील चौकाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. 1975च्या आणीबाणीला उघड उघड विरोध दर्शवणार्या मोजक्या साहित्यिकांपैकी ते एक होते. समाजाशी नाळ जोडलेले ते एक व्यासंगी समीक्षक-कवी होते.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
UPYOJIT SAMIKSHA : LAKSHANE ANI PADT... Rating Star
Add To Cart INR 160

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more