AGNI SRIDHAR

About Author

Birth Date : 01/01/1955


AGNI SHRIDHAR IS A KANNADA FORMER GANGSTER, WRITER, CRITIC AND ARTIST. HE FOUNDED KARUNADA SENE. LATER HE FOUNDED THE WEEKLY KANNADA NEWSPAPER AGNI, AND TURNED A PROFESSIONAL WRITER. HE HAS WRITTEN A BOOK CALLED "DAADAGIRIYA DINAGALU", MEANING THE DAYS OF GOONDAISM. HE HAILS FROM KANAKAPURA AND STUDIED IN BANGALORE.

‘अग्नी’ श्रीधर हे बंगलोरच्या गुन्हेगारी विश्वातले एके काळचे कुविख्यात व्यक्तिमत्त्व. गुन्हेगारी जगतातील अनेक ‘डॉन’ त्यांचे साथीदार होते आणि ते स्वत:ही काही काळ बंगलोरचे ‘डॉन’ होते. कालांतराने गुन्हेगारी सोडल्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ले झाले, पण पुन्हा ते त्या जगाकडे वळले नाहीत. आज ते कन्नड चळवळीचे कार्यकर्ते आहेत. हिंदू मूलतत्ववाद, वर्णव्यवस्था आणि ब्राह्मण्याचे कठोर टीकाकार आहेत. आता ते विद्वान व आधुनिक विचारसरणीचे लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पूर्वायुष्यातील घटनांवर आधारित ‘दादागिरिय दिनगळु’ हे पुस्तक त्यांनी लिहिले. या पुस्तकावर आधारित ‘आ दिनगळु’ या चित्रपटाच्या पटकथेचे लेखनही त्यांनी केले आहे. एक चित्रपट निर्माता म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. ‘एदेगारिके’ या त्यांच्या कलाकृतीचा ‘जिगर’ हा अनुवाद. ‘अग्नी’ या नावाने ते एक कन्नड साप्ताहिक चालवतात. त्यावरूनच त्यांचे नाव ‘अग्नी’ श्रीधर असे पडले. आज बंगलोरच्या प्रतिष्ठित विश्वात त्यांना स्थान आहे. दोन भिन्न प्रकारची आयुष्यं जगल्यामुळे त्यांचे अनुभव रोमांचकारी आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
JIGAR Rating Star
Add To Cart INR 60

Latest Reviews

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more