BAHAR DUTT

About Author

Birth Date : 21/06/1975


BAHAR DUTT IS AN INDIAN TELEVISION JOURNALIST AND ENVIRONMENTAL EDITOR AND COLUMNIST FOR CNN-IBN. SHE IS THE DAUGHTER OF SP DUTT AND PRABHA DUTT WHO WAS AMONGST INDIA’S FIRST FEMALE JOURNALISTS AND INFLUENCED BAHAR’S CAREER PATH. BAHAR DUTT IS THE SISTER OF WELL KNOWN JOURNALIST BARKHA DUTT. BAHAR DUTT HAS A POST GRADUATE DEGREE FROM UNIVERSITY OF DELHI AND UNIVERSITY OF KENT WITH SPECIALIZATION IN WILDLIFE CONSERVATION AND ECOLOGY. SHE HAS WORKED ON HER OWN CONSERVATION PROJECTS. SHE SPENT A DECADE WITH TRIBAL COMMUNITIES LIKE SNAKE CHARMERS AND BAWARIAS ACROSS HARYANA AND RAJASTHAN TO FIND THEM ALTERNATE EMPLOYMENT AS THESE COMMUNITIES WERE REQUIRED BY LAW TO GIVE UP THEIR TRADITIONAL PROFESSIONS. SINCE SHE BEGAN HER JOURNEY TOWARDS ENVIRONMENTAL CONSERVATION , SHE HAS TRAVELLED INTREPIDLY FROM RURAL PARTS OF INDIA TO FAR OFF PLACES LIKE THE NORTH POLE TO GIVE JUSTICE TO HER MISSION. HER REPORTAGE AS AN ENVIRONMENTAL JOURNALIST HAS INFLUENCED POLICY MAKERS AND LED TO THE STOPPAGE OF MANY ILLEGAL PROJECTS COMING UP ON WETLANDS AND FORESTS IN INDIA. MS.BAHAR DUTT HAS BEEN BESTOWED WITH PRESTIGIOUS AWARDS FOR HER SIGNIFICANT CONTRIBUTION IN THE FIELD OF ENVIRONMENTAL JOURNALISM SUCH AS RAMNATH GOENKA AWARD(2006),WILDSCREEN INTERNATIONAL AWARD(2006),YOUNG ENVIRONMENTAL JOURNALIST AWARD(2007)ETC. HER BOOK GREEN WARS IS A SELF EXPLANATORY ELABORATION OF HER ENORMOUS STRUGGLE FOR EXPOSING ILLEGALITIES THROUGHOUT THE WORLD AND DESCRIBES THE GRAVE SITUATION IN THE CONTEXT OF SAVING THIS PLANET IN DETAIL.

बहार दत्त या दहापेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेल्या निसर्गसंरक्षक जीवशास्त्रज्ञ आणि पर्यावरण पत्रकार आहेत. त्यांच्या बातमीपत्रांमुळे यमुना नदीकाठच्या बेकायदेशीर शॉिंपग मॉलचं आणि गोव्यातल्या बेकायदा खाणींचं काम थांबू शकलं. सारस पक्ष्यांच्या अस्तित्वाचा आणि नैसर्गिक निवासस्थानाचा बळी देऊन, सुपीक सखल जमिनीवर बांधण्यात येणाNया विमानतळाच्या धावपट्टीचं बेकायदेशीर काम थांबावं म्हणून त्यांनी उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यानाही सोडलं नाही (याबद्दल त्यांना सन्मानाचा वाइल्डस्क्रीन-ग्रीन ऑस्कर पुरस्कारही मिळाला.) जखमी वानरांसाठी बहार यांनी प्राणी-रुग्णवाहिका चालवली, आप्रिÂकेमधल्या कोलोबस माकडांसाठी दोरखंडांचे पूल बांधले, यूके मधल्या जगप्रसिद्ध जर्सी प्राणीसंग्रहालयात राहून त्यांनी अ‍ॅमेझॉनवासी माकडांच्या कळपाचा अभ्यास केला. गारुड्यांच्या पारंपारिक जमातीमध्ये दहा वर्षांपेक्षा अधिक काळ राहून, वन्यप्राण्यांशी संबंधित कायदे न मोडता, गारुड्यांना पर्यायी रोजगार कसा मिळेल या दृष्टीनं त्यांनी कार्य केलं. पर्यावरण पत्रकारितेच्या कक्षा त्यांच्या अहवालांमुळे रुंदावल्या आहेत. त्यांच्यामुळे एका बाजूला पडलेल्या आणि कमी महत्वाच्या समजल्या जाणाNया पर्यावरणविषयक बातम्यांना रोजच्या संध्याकाळच्या मुख्य आणि ठळक बातम्यांमध्ये स्थान मिळालं आहे.
Sort by
Show per page
Books not found in this category.

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more