BAHAR DUTT

About Author

Birth Date : 21/06/1975


BAHAR DUTT IS AN INDIAN TELEVISION JOURNALIST AND ENVIRONMENTAL EDITOR AND COLUMNIST FOR CNN-IBN. SHE IS THE DAUGHTER OF SP DUTT AND PRABHA DUTT WHO WAS AMONGST INDIA’S FIRST FEMALE JOURNALISTS AND INFLUENCED BAHAR’S CAREER PATH. BAHAR DUTT IS THE SISTER OF WELL KNOWN JOURNALIST BARKHA DUTT. BAHAR DUTT HAS A POST GRADUATE DEGREE FROM UNIVERSITY OF DELHI AND UNIVERSITY OF KENT WITH SPECIALIZATION IN WILDLIFE CONSERVATION AND ECOLOGY. SHE HAS WORKED ON HER OWN CONSERVATION PROJECTS. SHE SPENT A DECADE WITH TRIBAL COMMUNITIES LIKE SNAKE CHARMERS AND BAWARIAS ACROSS HARYANA AND RAJASTHAN TO FIND THEM ALTERNATE EMPLOYMENT AS THESE COMMUNITIES WERE REQUIRED BY LAW TO GIVE UP THEIR TRADITIONAL PROFESSIONS. SINCE SHE BEGAN HER JOURNEY TOWARDS ENVIRONMENTAL CONSERVATION , SHE HAS TRAVELLED INTREPIDLY FROM RURAL PARTS OF INDIA TO FAR OFF PLACES LIKE THE NORTH POLE TO GIVE JUSTICE TO HER MISSION. HER REPORTAGE AS AN ENVIRONMENTAL JOURNALIST HAS INFLUENCED POLICY MAKERS AND LED TO THE STOPPAGE OF MANY ILLEGAL PROJECTS COMING UP ON WETLANDS AND FORESTS IN INDIA. MS.BAHAR DUTT HAS BEEN BESTOWED WITH PRESTIGIOUS AWARDS FOR HER SIGNIFICANT CONTRIBUTION IN THE FIELD OF ENVIRONMENTAL JOURNALISM SUCH AS RAMNATH GOENKA AWARD(2006),WILDSCREEN INTERNATIONAL AWARD(2006),YOUNG ENVIRONMENTAL JOURNALIST AWARD(2007)ETC. HER BOOK GREEN WARS IS A SELF EXPLANATORY ELABORATION OF HER ENORMOUS STRUGGLE FOR EXPOSING ILLEGALITIES THROUGHOUT THE WORLD AND DESCRIBES THE GRAVE SITUATION IN THE CONTEXT OF SAVING THIS PLANET IN DETAIL.

बहार दत्त या दहापेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेल्या निसर्गसंरक्षक जीवशास्त्रज्ञ आणि पर्यावरण पत्रकार आहेत. त्यांच्या बातमीपत्रांमुळे यमुना नदीकाठच्या बेकायदेशीर शॉिंपग मॉलचं आणि गोव्यातल्या बेकायदा खाणींचं काम थांबू शकलं. सारस पक्ष्यांच्या अस्तित्वाचा आणि नैसर्गिक निवासस्थानाचा बळी देऊन, सुपीक सखल जमिनीवर बांधण्यात येणाNया विमानतळाच्या धावपट्टीचं बेकायदेशीर काम थांबावं म्हणून त्यांनी उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यानाही सोडलं नाही (याबद्दल त्यांना सन्मानाचा वाइल्डस्क्रीन-ग्रीन ऑस्कर पुरस्कारही मिळाला.) जखमी वानरांसाठी बहार यांनी प्राणी-रुग्णवाहिका चालवली, आप्रिÂकेमधल्या कोलोबस माकडांसाठी दोरखंडांचे पूल बांधले, यूके मधल्या जगप्रसिद्ध जर्सी प्राणीसंग्रहालयात राहून त्यांनी अ‍ॅमेझॉनवासी माकडांच्या कळपाचा अभ्यास केला. गारुड्यांच्या पारंपारिक जमातीमध्ये दहा वर्षांपेक्षा अधिक काळ राहून, वन्यप्राण्यांशी संबंधित कायदे न मोडता, गारुड्यांना पर्यायी रोजगार कसा मिळेल या दृष्टीनं त्यांनी कार्य केलं. पर्यावरण पत्रकारितेच्या कक्षा त्यांच्या अहवालांमुळे रुंदावल्या आहेत. त्यांच्यामुळे एका बाजूला पडलेल्या आणि कमी महत्वाच्या समजल्या जाणाNया पर्यावरणविषयक बातम्यांना रोजच्या संध्याकाळच्या मुख्य आणि ठळक बातम्यांमध्ये स्थान मिळालं आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
HARIT YUDDHE Rating Star
Add To Cart INR 250

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more