* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE HELEN KELLER STORY
  • Availability : Available
  • Translators : SHANTA J SHELAKE
  • ISBN : 9788177666663
  • Edition : 7
  • Publishing Year : OCTOBER 1963
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 160
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :SHANTA SHELKE COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HELEN KELLER, THE NAME IS VERY FAMILIAR TO ALL. SHE REPRESENTS THE PERFECT IMAGE OF CONFIDENCE AND AMBITION; SHE WAS DETERMINED TO FACE THE DESTINY, HER WILL WAS NEVER DEFEATED BY DESTINY. WE ARE LUCKY THAT THE NATURE HAS BESTOWED US WITH 5 SENSES. IT IS THROUGH THIS SENSES THAT WE CONTACT EVERYBODY AND EVERYTHING. HELEN KELLER WAS NOT AMONG THOSE LUCKY ONE. SHE HAD ONLY TWO SENSE ORGANS. NATURE HAD DEPRIVED HER FROM HER ABILITY TO HEAR, TO SEE AND TO SPEAK. TOUCH WAS THE ONLY MEDIUM THROUGH WHICH SHE COULD ESTABLISH CONTACTS WITH ANYBODY. BUT APART FROM TOUCH, SHE HAD ONE MORE QUALITY. SHE WAS EXTREMELY OPTIMISTIC. SHE HAD IMMENSE DETERMINATION, AND SHE HAD AN ABILITY TO WORK EFFORTLESSLY FOR HOURS TOGETHER. WITH THE HELP OF THESE DISTINGUISHED CHARACTER SHE CONQUERED OVER ALL HER DISABILITIES, SHE GAVE A MEANING TO HER LIFE. WHILE DOING SO SHE DID REMEMBER THE OTHER MEMBERS OF HER COMMUNITY. SHE OPENED A DOOR TO KNOWLEDGE, ADVANCEMENT, PROGRESS FOR THE BLINDS, DEAFS AND DUMBS ALL OVER THE WORLD. THE STORY OF HELEN KELLER, STRIKING, THRILLING AND INSPIRING.
हेलन केलर हे आजच्या जगाला सर्वपरिचित असलेले केवळ एक व्यक्तिनाम नाही. माणसाच्या अदम्य आत्मविश्वासाचे आणि अपराजित, विजिगीषु वृत्तीचे ते एक सुंदर प्रतीक आहे. निसर्गाने दिलेल्या पंचेंद्रियांच्या साह्याने माणूस परस्परांशी, भोवतालच्या जगाशी संवाद साधतो. हेलनची तर तीन ज्ञानेंद्रिये निसर्गाने हिरावून घेतली होती. ती आंधळी होती. बहिरी होती. मुकीही होती. परस्परांशी संपर्क जोडण्याचे स्पर्श हे एकमेव साधन तिला लाभले होते. पण आशावादी मनोवृत्ती, विलक्षण जिद्द आणि अपरंपार परिश्रमशीलता यांच्या बळावर तिने या साया उणिवांवर मात केली. आपले स्वत:चे जीवन तर तिने अर्थपूर्ण केलेच; पण जगातील सर्व अंध, मूकबधिर यांनाही तिने प्रगतीच्या, विकासाच्या वाटा खुल्या करून दिल्या. त्या हेलन केलरची ही जीवनगाथा. जितकी वेधक, रोमांचकारक, तितकीच स्फूर्तिदायक...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#HELLENKELLER #SHANTASHELKE #MARATHITRANSLATION #CHAUGHIJANI #BLINDDEAFDUMB
Customer Reviews
  • Rating StarDhanesh Dangat

    अपराजिता... वैगुण्यावर मात करून जीवन अर्थपूर्ण बनवणाऱ्या व्यक्ती या स्वत:बरोबर इतरांचंही जीवन सार्थ करून जातात. जगाच्या इतिहासात जिचं नाव अमर झालं आहे, अशी हेलन केलर याच दुर्दम्य आशेचं प्रतीक होती. हेलन केलर आंधळी, बहिरी आणि मुकी होती. पण आपल्या नाील जिद्दीच्या बळावर आणि कष्टांच्या मदतीने तिने आयुष्यातल्या सर्व उणिवांवर मात केली. जगातल्या सर्वच अपंगांना तिने जगण्याची खरी वाट खुली करून दिली. तिचं चरित्र कादंबरीच्या रूपाने कॅथरिन ओवेन्स पिअर्स हिने लिहिलं. याचा अनुवाद शांता शेळके यांनी ‘आंधळी’ या नावाने केला होता. हेलन केलरच्या जीवनाच प्रेरक आलेखच ही छोटेखानी कादंबरी मांडते. दोन वर्षांची असताना आलेल्या तापामुळे हेलनच्या दृष्टीवर आणि श्रवणशक्तीवर परिणाम झाला. तिला बोलताही आलं नाही. अशा मुलीचं पालनपोषण करणं ही सोपी गोष्ट नव्हती. आसपासचे लोकही तिच्या आईला भविष्याबद्दल नाउमेद करीत. आई हाच हेलनच्या जगाशी असलेल्या संपर्काचा दुवा होता. हेलन सहा वर्षांची झाली तरी, तिला काहीच करता येत नसे. या मुलीला योग्य पद्धतीने शिकवलं तर ती चारचौघांसारखी जगू शकेल अशी आशा तिच्या आईला वाटत राहिली. कार्ल्स डिकन्सच्या एका पुस्तकात बोस्टनमधील ‘पार्किन्सन अंधशाळा’ हा संदर्भ वाचून, म्हणजे हेलनच्या आईला कुठेतरी आशेचा किरण दिसल्याप्रमाणे वाटलं. तिथल्या लॉरा खिस्तमन या अंध आणि मूक-बधिर मुलीबद्दल तिने वाचलं आणि आपल्या हेलनलाही स्पर्शाच्या भाषेची ओळख असल्याने तीही लॉराप्रमाणे शिकेल असा विचार तिच्या मनात चमकून गेला. हेलनला घेऊन केलर पतिपत्नी मग थेट वॉशिग्टनला डॉ. अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलना भेटून आले. ब्रेल लिपीचा शोध लावणारे हेच डॉ. बेल. लॉराला ज्यांनी शिकवलं त्या डॉ. गिंडले यांच्या जागी आलेल्या मायकेल अ‍ॅनॅग्नॉस यांनी हेलनसाठी अ‍ॅन रुलिव्हन या चोवीस वर्षांच्या मुलीची निवड केली. ती स्वत: एक अंध बालिका म्हणून पार्किन्स शाळेत आली होती. पुढे शस्त्रक्रियेनंतर तिला थोडंफार दिसूही लागलं होतं. हेलनला शिकवण्यासाठी म्हणून अ‍ॅन तिच्या गावी येऊन दाखल झाली व आयुष्यभराचं नातंच या दोघींमध्ये जडून गेलं. मात्र हेलनला हाताळणं सोपं नव्हतं. तरीपण अ‍ॅननं हे आव्हान स्वीकारलं आणि एका तुसड्या, रागीट बालिकेला तिने स्पर्शाच्या भाषेची गोडी लावली. तिला जगाचा चेहरा माहीत करून दिला. या पुस्तकात हेलन आणि अ‍ॅन दोघींच्या नात्याचा सुंदर वेध घेण्यात आला आहे. शब्द म्हणजे काय हे समजल्यावर हेलनला नवेनवे शब्द शिकून घेण्याचा ध्यासच लागला. मग भाषा, गणित, वेगवेगळे विषय तिला खुणावू लागले. हेलनला शिकायची ओढ लागली. एका टप्प्यानंतर तिला बोलायचा ध्यास लागला. एका मर्यादेपर्यंत त्यात ती यशस्वीही झाली. हेलन हा एक चमत्कार होता. रंगभूमीवर कार्यक्रम करून ती जगासमोर गेली. देशोदेशी फिरून तिने अंधत्वाबद्दल आणि मुकेपणा, बहिरेपणा याबद्दल समाजात जागृती करण्याचा प्रयत्न केला. ही कादंबरी हेलन केलरच्या या कष्टांबरोबरच तिच्या शिक्षिकेचा, अ‍ॅनचा तिला शिकवण्याचा ध्यासही समोर ठेवते. या दोघींमधलं नातं आणि अ‍ॅनच्या मृत्यूपर्यंत हेलनने तिला दिलेलं प्रेम हा सगळा सुंदर प्रवास ही कादंबरी चित्रित करते. हेलनने अ‍ॅनचं चरित्रही पुढे लिहिलं आणि स्वत:च्या वैगुण्यावर तिने कशी मात केली होती हे जगापुढे आणलं. हेलन केलर आणि अ‍ॅन सलिव्हन यांची ही कहाणी प्रेरक आहे आणि मानवी जीवनातील एक रोमांचकारी पर्वच उलगडून दाखवणारी आहे. ...Read more

  • Rating StarPrasaad Phatak

    `आंधळी` : फिटे अंधाराचे जाळे... ------------------------------------------------------ जन्मापासून माणूस काही ना काही ग्रहण करत असतो, आपल्या पंचेंद्रियांनी विश्वाचे तपशील प्राशून घेत असतो. प्रत्येक इंद्रिय त्याच्याकडे पोहोचवत असणाऱ्या ज्ञानबिंदूंच जुळवाजुळव करत तो आपल्या मेंदूत चित्रं रेखाटत असतो. जसजसे त्याचे अनुभव वाढत जातात तसतशी त्याच्या डोक्यातल्या विचार आणि धारणांची दिशा पक्की होत जाते. म्हणजेच, माणसाचं जे काही व्यक्तिमत्व तयार होतं ते असं अनेक गोष्टी ग्रहण करत करतच झालेलं असतं. दुर्दैवाने काही व्यक्तींना जन्मतः किंवा एखाद्या आजार/अपघातामुळे एखादं ज्ञानेंद्रिय गमवावं लागतं आणि त्यांच्या ग्रहणक्षमतेवर परिणाम होतो. त्यांचं त्यांचं भवतालाचं आकलन सर्व इंद्रियं कार्यरत असणाऱ्या माणसांच्या तुलनेत अपुरं राहतं. पण हेलन केलरसारख्या व्यक्तीकडून नियतीने एक, दोन नव्हे तर तीन ज्ञानेंद्रियं हिरावून घेतली होती असं जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा तिच्या समोर आलेल्या अडचणी या आपल्या कल्पनेच्या कित्येक योजने पुढे असतात. पण हेलन सामान्य स्त्री नव्हती. अंधार, निःशब्दता आणि सुन्नता यांच्याशी तिने एकाच वेळी दोन हात केले आणि इतिहासपुरुष आपल्या पुस्तकात ठळक नोंद करून ठेवेल असं आयुष्य जगून गेली. `आंधळी` हे पुस्तक वाचून तोंडात बोटं गेलं नाही तरच नवल… आभाळ कोसळलं हेलन लहानपणी खूप दंगेखोर होती. पण तिची बागडणारी पावले आणि चिमखडे बोल विधात्याला का बघवले नाहीत ते त्यालाच ठाऊक ! हेलन २ वर्षांची असताना पोटात आणि मेंदूत तापामुळे रक्त साकळून तिचं आयुष्यच धोक्यात आलं होतं, पण आईच्या अथक सुश्रुषेमुळे ती कशीबशी वाचली. पण मोठा आघात हा होता की तिची दृष्टी व श्रवणशक्ती मात्र नष्ट झाली होती. ऐकण्याची क्षमता नष्ट झाल्यामुळे तिच्या वाचेच्या आकलनावरही परिणाम झाला आणि ती वाचेलाही पारखी झाली. दिसतही नाही, ऐकूही येत नाही म्हटल्यावर हेलनला काहीच कळेनासं झालं. त्यामुळे हेलन सैरभर झाली, गोंधळून जाऊ लागली आणि अगदी स्वाभाविकपणे अत्यंत हट्टी बनली. हेलनसमोर आख्खं आयुष्य `आ` वासून उभं होतं. तिच्या आईवडिलांसमोर यक्षप्रश्न उभा राहिला. तिला यातून बाहेर कसं काढायचं हे त्यांना कळेना. काय करावं या विचारविनिमयातच काही काळ गेला. हेलन ६ वर्षांची असताना तिची आई चार्ल्स डिकन्सचे `काही अमेरिकन टिपणे` हे पुस्तक वाचत असताना तिला बोस्टन अंधशालेविषयी माहिती मिळाली. अंध-मूक-बधिर असूनही आपापले काम करू शकणाऱ्या लॉरा ब्रिजमनबद्दल कळलं. हेलनच्या आईवडिलांनी सर्वप्रथम टेलिफोनचे जनक अॅलेक्झांडर ग्रॅहम बेल यांची भेट घेतली. त्यांनी हेलनच्या आई-वडिलांच्या मनातली नैराश्याची जळमटे दूर केली. त्यांनी पर्किन्स अंधशाळेशी संपर्क साधला. त्यांच्याकडून अॅन सलीव्ह्न या शिक्षिकेची नेमणूक झाली. अॅनची स्वतःची दृष्टीही आधी काम करत नव्हती पण नंतर शस्त्रक्रियेमुळे तिला विशिष्ट मर्यादेपर्यंत दृष्टी प्राप्त झाली होती. अॅन : एक आधारस्तंभ अॅन जणू हेलनचे भविष्य उजळून टाकायलाच या जगात आली होती. तिने अत्यंत कुशलपणे हेलनला समजवायला सुरुवात केली. सुरुवातीला तिचा तिरस्कार करणारी हेलन तिच्या मायेत गुंतत गेली. खूप लहानपणी हेलनच्या प्रमुख संवेदनांचे दरवाजे बंद झाले असल्याने शब्द म्हणजे काय, स्वर म्हणजे काय याबद्दलच्या तिच्या संकल्पनाच विकसित झाल्या नव्हत्या. निरनिराळ्या संवेदना आणि संकल्पना यांचं आकलन करून देण्यासाठी अॅनने अनोख्या क्लृप्त्या वापरायला सुरुवात केली. बागेतल्या पंपातून धो धो पडणाऱ्या पाण्यात हेलनचा हात धरला आणि मग तिच्या तळहातावर खूण केली. पाणी आणि तळहातावर केली जाणारी विशिष्ट खूण याचा यांचं काहीतरी नातं हेलनच्या असल्याचं लक्षात आलं. `शब्द म्हणजे काय` याची अनुभूती हेलनला कशी झाली हे दर्शवणारा हा प्रसंग मुळातूनच वाचण्यासारखा आहे. अॅनमुळे हेलनचे मातीच्या गोळ्यासारखे आकारहीन आयुष्य सुबक आकार धारण करू लागलं आणि जात्याच कुशाग्र असलेली हेलन पाहता पाहता एका ज्ञानकुंभात परिवर्तित झाली. हेलन अविश्वसनीय गतीने शिकत गेली. तळहातावरच्या खुणा, ब्रेल लिपी यांच्या सहाय्याने ती कल्पनेच्या भराऱ्या घेऊ लागली. संपूर्णपणे अज्ञात असणाऱ्या रंगांविषयी तिने स्वतःचे संकेत बांधले आणि चक्क वरुणराजाची सुंदर कथा लिहिली ! शिकता शिकता तिने फ्रेंच आणि जर्मन भाषाही अवगत केल्या. अंध-बधिर लोकांच्या समस्या तिला स्वानुभवाने कळल्याच होत्या पण त्यांच्यासमोरच्या आणखी अडचणींची माहिती तिने स्वतःहून वाचन आणि पत्रलेखन करून मिळवली. जगातल्या अनेकांशी पत्रमैत्री केली. या सगळ्यात अॅनचा सिंहाचा वाट होता. स्वतःच्या अधू दृष्टीची पर्वा न करता तिने आपले आयुष्य हेलनसाठी अक्षरशः समर्पित करून टाकले होते. हेलन : एक दीपस्तंभ हेलनच्या प्रयत्नांमुळे अंधांच्या समस्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोचल्या. `अमेरिकन फाऊंडेशन फॉर ब्लाइंड` ही देशव्यापी संस्था उदयाला आली. हेलनने रॅडक्लिफ कॉलेजमध्ये जिद्दीने प्रवेश घेतला. जे कॉलेज तिला प्रवेश नाकारत होते त्याच कॉलेजातून तिने सर्वसाधारण मुलींप्रमाणे चार वर्षात चांगल्या गुणांनी परीक्षा उत्तीर्ण केली. हेलनने अस्पष्ट का होईना पण ऐकता येऊ शकेल अशा आवाजात बोलण्यात यश मिळवले. बोलणाऱ्याच्या गळ्याची कंपने, जीभ व ओठांची हालचाल यांना स्पर्श करून त्यातून शिकण्याचा थक्क व्हावा असा प्रयोग करून तो यशस्वी करून दाखवला ! तिच्या भाषणाला नेहमीप्रमाणेच अॅनचे मोलाचे सहकार्य लाभले. हेलनने स्वतः वरच्या चित्रपटात व रंगभूमीवरही कामे केले. जगभर फिरून जागृती केली. अंध-बधिरांचे प्रश्न सर्वपरिचित झाले. अनेक मदत संस्था उभ्या राहिल्या. एका आयुष्यात एवढे सगळे केले हेलनने ! या पुस्तकाची भाषा सोपी पण प्रवाही आहे. पण फार मोठे नसल्यामुळे हेलनच्या बालपणीच्या प्रगतीची धावती ओळखच करून घ्यावी लागते. त्यामुळे तिची प्रगती फारच भरभर झाल्याची भावना होऊ शकते. त्यातल्या त्यात हीच एक उणीव या पुस्तकात आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी चितारलेले पुस्तकाचे मुखपृष्ठ अगदी अर्थपूर्ण आहे. अंधांच्या लाल-पांढऱ्या काठीला हिरवी पालवी फुटलेली दाखवली आहे . जिद्द आणि आशेचं प्रतीक! एका सर्वाथाने पराधीन स्त्रीचा स्वयंपूर्णतेकडे झालेला हा प्रवास वाचून अक्षरशः निःशब्द आणि नतमस्तक व्हायला होतं. तिच्या जिद्दीला आणि अॅन सालीव्हानच्या जिद्दीला करू तेवढा कुर्निसात कमीच ठरेल. गुरुपौर्णिमेला आपण जेव्हा गुरू-शिष्यांचं स्मरण करतो तेव्हा आधुनिक जगातल्या अॅन आणि हेलन या जोडगोळीला विसरून चालणारच नाही ! ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 18-06-2004

    अपराजिता... वैगुण्यावर मात करून जीवन अर्थपूर्ण बनवणाऱ्या व्यक्ती या स्वत:बरोबर इतरांचंही जीवन सार्थ करून जातात. जगाच्या इतिहासात जिचं नाव अमर झालं आहे, अशी हेलन केलर याच दुर्दम्य आशेचं प्रतीक होती. हेलन केलर आंधळी, बहिरी आणि मुकी होती. पण आपल्या मनाील जिद्दीच्या बळावर आणि कष्टांच्या मदतीने तिने आयुष्यातल्या सर्व उणिवांवर मात केली. जगातल्या सर्वच अपंगांना तिने जगण्याची खरी वाट खुली करून दिली. तिचं चरित्र कादंबरीच्या रूपाने कॅथरिन ओवेन्स पिअर्स हिने लिहिलं. याचा अनुवाद शांता शेळके यांनी ‘आंधळी’ या नावाने केला होता. हेलन केलरच्या जीवनाच प्रेरक आलेखच ही छोटेखानी कादंबरी मांडते. दोन वर्षांची असताना आलेल्या तापामुळे हेलनच्या दृष्टीवर आणि श्रवणशक्तीवर परिणाम झाला. तिला बोलताही आलं नाही. अशा मुलीचं पालनपोषण करणं ही सोपी गोष्ट नव्हती. आसपासचे लोकही तिच्या आईला भविष्याबद्दल नाउमेद करीत. आई हाच हेलनच्या जगाशी असलेल्या संपर्काचा दुवा होता. हेलन सहा वर्षांची झाली तरी, तिला काहीच करता येत नसे. या मुलीला योग्य पद्धतीने शिकवलं तर ती चारचौघांसारखी जगू शकेल अशी आशा तिच्या आईला वाटत राहिली. कार्ल्स डिकन्सच्या एका पुस्तकात बोस्टनमधील ‘पार्किन्सन अंधशाळा’ हा संदर्भ वाचून, म्हणजे हेलनच्या आईला कुठेतरी आशेचा किरण दिसल्याप्रमाणे वाटलं. तिथल्या लॉरा खिस्तमन या अंध आणि मूक-बधिर मुलीबद्दल तिने वाचलं आणि आपल्या हेलनलाही स्पर्शाच्या भाषेची ओळख असल्याने तीही लॉराप्रमाणे शिकेल असा विचार तिच्या मनात चमकून गेला. हेलनला घेऊन केलर पतिपत्नी मग थेट वॉशिग्टनला डॉ. अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलना भेटून आले. ब्रेल लिपीचा शोध लावणारे हेच डॉ. बेल. लॉराला ज्यांनी शिकवलं त्या डॉ. गिंडले यांच्या जागी आलेल्या मायकेल अ‍ॅनॅग्नॉस यांनी हेलनसाठी अ‍ॅन रुलिव्हन या चोवीस वर्षांच्या मुलीची निवड केली. ती स्वत: एक अंध बालिका म्हणून पार्किन्स शाळेत आली होती. पुढे शस्त्रक्रियेनंतर तिला थोडंफार दिसूही लागलं होतं. हेलनला शिकवण्यासाठी म्हणून अ‍ॅन तिच्या गावी येऊन दाखल झाली व आयुष्यभराचं नातंच या दोघींमध्ये जडून गेलं. मात्र हेलनला हाताळणं सोपं नव्हतं. तरीपण अ‍ॅननं हे आव्हान स्वीकारलं आणि एका तुसड्या, रागीट बालिकेला तिने स्पर्शाच्या भाषेची गोडी लावली. तिला जगाचा चेहरा माहीत करून दिला. या पुस्तकात हेलन आणि अ‍ॅन दोघींच्या नात्याचा सुंदर वेध घेण्यात आला आहे. शब्द म्हणजे काय हे समजल्यावर हेलनला नवेनवे शब्द शिकून घेण्याचा ध्यासच लागला. मग भाषा, गणित, वेगवेगळे विषय तिला खुणावू लागले. हेलनला शिकायची ओढ लागली. एका टप्प्यानंतर तिला बोलायचा ध्यास लागला. एका मर्यादेपर्यंत त्यात ती यशस्वीही झाली. हेलन हा एक चमत्कार होता. रंगभूमीवर कार्यक्रम करून ती जगासमोर गेली. देशोदेशी फिरून तिने अंधत्वाबद्दल आणि मुकेपणा, बहिरेपणा याबद्दल समाजात जागृती करण्याचा प्रयत्न केला. ही कादंबरी हेलन केलरच्या या कष्टांबरोबरच तिच्या शिक्षिकेचा, अ‍ॅनचा तिला शिकवण्याचा ध्यासही समोर ठेवते. या दोघींमधलं नातं आणि अ‍ॅनच्या मृत्यूपर्यंत हेलनने तिला दिलेलं प्रेम हा सगळा सुंदर प्रवास ही कादंबरी चित्रित करते. हेलनने अ‍ॅनचं चरित्रही पुढे लिहिलं आणि स्वत:च्या वैगुण्यावर तिने कशी मात केली होती हे जगापुढे आणलं. हेलन केलर आणि अ‍ॅन सलिव्हन यांची ही कहाणी प्रेरक आहे आणि मानवी जीवनातील एक रोमांचकारी पर्वच उलगडून दाखवणारी आहे. -नंदिनी आत्मसिद्ध ...Read more

  • Rating StarPayal Surpam‎

    काही दिवसांपूर्वी `आंधळी` हे हेलन केलर वर लिहिलेल्या; कॅथरिन ओवेन पिअर्स हिने लिहिलेल्या पुस्तकाचा शांता शेळके लिखित मराठी अनुवाद वाचला. `चिकन सुप फॉर द सोल` यातील पुस्तकात एकदा हेलन केलर हिचा एक कोट वाचण्यात आला. फार भावला तो. तिच्या जीवनावरीलच ुस्तक हे अस मी हाती घेईल याची कल्पना नव्हती. तिचं जीवन फार मस्त रेखाटल आहे. शांता शेळके चा अनुवाद म्हटल्यावर तसेही काही बोलायची वेळच येत नाही. इतक्या समर्थपणे स्वतःची शारिरीक व्यंगे पेलुन समोर येणार्‍या हेलन केलरचं कौतुक वाटत राहत. आयुष्यात जिद्द आणि महत्त्वकांक्षा असेल तर काहीच अशक्य नाहीए हे परत एकदा जाणवून गेलं. आता पुढे तिचे स्वलिखित साहित्य `टू बी रिड` या लिस्ट मधे ठेवलेय. :) नक्की वाचाव अस पुस्तक. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more