* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SEAWITCH
  • Availability : Available
  • Translators : ASHOK PADHYE
  • ISBN : 9788184981681
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 248
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :ALISTAIR MACLEAN COMBO SET- 14 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
LORD WORTH, RUTHLESS AND FABULOUSLY WEALTHY, HAS MADE A LOT OF ENEMIES IN THE OIL BUSINESS. HIS NEW OFFSHORE OIL RIG IN THE GULF OF MEXICO, NAMED SEAWITCH, IS ONE OF THE BIGGEST IN THE WORLD, AND WILL PUT HIS COMPETITORS OUT OF BUSINESS. TO DESTROY IT AND THEREFORE BE ABLE TO INFLATE THE PRICE OF OIL AT WILL, THE COMPETITORS GET TOGETHER AND SEND ONE MAN TO DEAL WITH LORD WORTH. THE VILLAIN HAS A PERSONAL SCORE TO SETTLE WITH WORTH AND KIDNAPS HIM AND HIS DAUGHTERS. FORTUNATELY FOR LORD WORTH, HIS TWO DAUGHTERS ARE BETROTHED TO THE PROTAGONISTS, MITCHELL AND ROOMER, TWO FORMER POLICE DETECTIVES/NOW PRIVATE INVESTIGATORS. THEY SET TRYING TO SAVE WORTH AND HIS DAUGHTERS FROM CERTAIN DEATH, AS THE VILLAIN INTENDS TO LEAVE THEM ON SEAWITCH WHEN HE DESTROYS IT WITH A STOLEN NUCLEAR WEAPON.
समुद्र म्हटला की संघर्ष! जीवन-मरणाचा संघर्ष! असा संघर्ष करून त्यातून संपत्ती मिळवणा-यांचा एक वर्ग तयार होतो. मग त्या वर्गात अंतर्गत संघर्षाला वेगळे धुमारे फुटतात. समुद्र म्हटला की साहस! प्राचीन काळापासून माणूस ते करीत आलेला आहे. ...त्या तेलसम्राटाची समुद्रातील तेलविहीर ही त्याच्या साम्राज्याचे केंद्र होते. त्याचा मालक हा कठोर होता. संपत्तीच्या जोरावर काहीही करणारा. त्याची दोनच मर्मस्थळे होती. ती तेलविहीर आणि त्याच्या दोन लाडक्या कन्या. शेवटी त्यांच्यावरच घाला पडला. केवळ सूडापोटी! संघर्ष, साहस, संपत्ती व सूड यांच्या साहाय्याने अ‍ॅलिस्टर मॅक्लीनने लिहिलेले हे समुद्रावरचे नाट्य.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #SOUTHBYJAVAHEAD #THEDARKCRUSADER #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #SEAWITCH #PUPPETONACHAIN #MADHAVKARVE #THE SATAN BUG # # THE LAST FRONTIER ##अलीस्टर मैकलिन # अशोकपाध्ये #ASHOK PADHYE # THE DARK CRUSADER #THEGOLDEN GATE #फिअरइजदकी #FEARISTHEKEY #
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 02-01-2011

    समुद्रसुंदरीचा विद्ध्वंस... समुद्रतळाशी असलेलं तेल शोधणं आणि बाहेर काढणं ही कामं करणारी काही विशिष्ट तांत्रिक क्षमतेची जहाजं असतात. समुद्रतळावर आपले अवाढव्य पार रोवून ती उभी राहतात. त्यामुळे त्या तरंगत्या फलाटांमध्ये होतं. त्याला ऑईल रिग असं म्हटलं ातं लॉर्ड वर्थ या अब्जाधीश तेलसम्राटाचा असाच एक ऑईल रिग अमेरिकेच्या दक्षिणेला मेक्सिकोच्या आखातात तेल उपसत असतो. विच म्हणजे चेटकीण, किंवा चेटूक करून मोहात पाडणारी सुंदरी. लॉड वर्थच्या अवाढव्य ऑईल रिगचं तेच नाव असतं - सीविच! व्यावसायिक स्पर्धेतून लॉर्ड वर्थला वठणीवर आणण्यासाठी त्याचे प्रतिस्पर्धी क्रॉन्काईट या खतरनाक माणसाला फार मोठ्या रकमेची सुपारी देतात. क्रॉन्काईट लॉर्ड वर्थच्या दोन मुलींचं अपहरण तर करतोच; पण सीविच उडवून देण्यासाठी अमेरिकन लष्कराच्या शस्त्रागारातून चक्क दोन अणुबॉम्ब चोरून आणतो. लॉर्ड वर्थही कमी नसतो. क्रॉन्काईचा सामना करण्यासाठी तो देखील अमेरिकन नौदल आणि वायुदलाच्या शस्त्रगारातून अत्याधुनिक शस्त्र चोरून आणतो. क्रॉन्काईटच्या योजनेनुसार सोवियात रशिया आणि व्हेनेझुएला या दोन देशांच्या सुसज्ज विनाशिकाही मेक्सिकन आखाताच्या म्हणजेच सीविचच्या दिशेने निघतात. आता अणुयुद्ध नि त्यातून तिसरं महायुद्धा पेटणार की काय, अशी भीती निर्माण होते. पण लॉर्ड वर्थला साहाय्य करणारे मिशेल आणि रूमर हे दोघे खासगी डिटेक्टिव्ह परिस्थिती हुशारीने हाताळतात आणि शेवट गोड होतो. सीविच हा अवाढव्य ऑईल रिग मात्र सर्व शस्त्रांसह नष्ट होतो. अ‍ॅलिस्टर मॅक्लीन या प्रख्यात स्कॉटिश कादंबरीकाराच्या ‘सीविच’ या कादंबरीचं कथानक थोडक्यात वरीलप्रमाणे आहे. मूळ कादंबरी १९७७ सालची असल्यामुळे तिच्याच सोवियात रशिया, शीतयुद्ध, तिसऱ्या महायुद्धाची शक्यता वगैरे गोष्टीचा उल्लेख आहेत. मेहता प्रकाशनाची निर्मिती, मुद्रण, मांडणी, मुखपृष्ठ इत्यादी तांत्रिक अंगे सुबक. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more