* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KATHA KATHANACHI KATHA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668452
  • Edition : 9
  • Publishing Year : SEPTEMBER 1988
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 192
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
    V.P. KALE BIRTHDAY OFFER
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
STORY TELLING A NON-STOP PROCESS; ONE CANNOT TAKE A PAUSE IN BETWEEN. THE STORY-TELLER HAS TO KEEP THE SPECTATORS BUSY THROUGHOUT. HE HAS TO CREATE AN ATMOSPHERE FOR THEM, SO TRULY THAT THEY SHOULD FEEL THE EXISTENCE OF THE CHARACTERS AND INCIDENTS APPEARING OR HAPPENING IN FRONT OF THEM; AND WHILE DOING SO, THE STORY-TELLER HAS TO DIPLOMATICALLY ACT AS IF HE IS MEETING THE PEOPLE OR WITNESSING THE EXPERIENCES FOR THE FIRST TIME. HE SHOULD NEVER LOSE THE FRESHNESS IN IT. STORY-TELLING IS AN ART. IT HAS TO BE EFFECTIVE, NARRATIVE AND FLOWING. THIS ART HAS TO BE PRACTICED VERY WELL. THIS PRESENT BOOK REVEALS THE HISTORY OF THIS ART ALONG WITH EXPLANATIONS AND ANALYSIS BY THE AUTHOR HIMSELF.
‘कथाकथनात विश्रांती नसते. श्रोत्यांना एक क्षणही रिकामं ठेवता येत नाही. कथेत घडणारे प्रसंग, भेटणाया व्यक्ती, श्रोत्यांप्रमाणेच कथाकथनकारालाही त्याच क्षणी भेटत असल्याचा भास निर्माण करावा लागतो.’ कथा परिणामकारकतेनं कथन करता येणं ही एक कला आहे. ही कला एखाद्या व्रतासारखी जोपासताना आलेल्या अनुभवांचं कथन म्हणजेच कथाकथनाची कथा. या अनुभवांवरील वपुंचं मार्मिक विश्लेषणही लाजवाब आहे. ‘कथाकथनात विश्रांती नसते. श्रोत्यांना एक क्षणही रिकामं ठेवता येत नाही. कथेत घडणारे प्रसंग, भेटणाया व्यक्ती, श्रोत्यांप्रमाणेच कथाकथनकारालाही त्याच क्षणी भेटत असल्याचा भास निर्माण करावा लागतो.’ कथा परिणामकारकतेनं कथन करता येणं ही एक कला आहे. ही कला एखाद्या व्रतासारखी जोपासताना आलेल्या अनुभवांचं कथन म्हणजेच कथाकथनाची कथा. या अनुभवांवरील वपुंचं मार्मिक विश्लेषणही लाजवाब आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarAshwini Surve

    कथा परिणामकारकतेनं कथन करता येणं ही एक कला आहे. ही कला एखाद्या व्रतासारखी जोपासताना आलेल्या अनुभवांचं कथन म्हणजेच वपुंच ‘कथाकथनाची कथा’ हे पुस्तक. प्रसिद्ध कवी ‘प्रवीण दवणे’ यांनी त्यांच्या फेसबुक वॉल वर सांगितलेला हा ‘वपुं’चा एक किस्सा.. कॉलेजमध्ये असताना एका वर्षाला, ‘प्रवीण दवणे’ सर, त्यांच्या कॉलेजच्या मराठी वाङमय मंडळाचे प्रमुख होते; तेव्हा सर्व मुलांनी ‘वपुं’ना कार्यक्रमाला आणण्याचा आग्रह धरला. कथाकार आणि कथाकथनकार म्हणून वपुंनी लोकप्रियतेचे शिखर काबीज केले होते (अर्थात, अजूनही वपु तितकेच लोकप्रिय आहेत आणि राहतील). तर, दवणे सरांनी, वपुंना कार्यक्रमाला बोलविण्यासाठी प्रयत्न करायचे ठरवले. त्यांनी वपुंना फोन करून कार्यक्रमाबद्दल सांगितलं. वपुंचे मानधन कॉलेजला परवडणारे नसेल याची त्यांना भीती होतीच; आणि ती भीती खरी ठरली. मानधन अपेक्षेपेक्षा १० पटीने अधिक होते! कॉलेजला तर ते अशक्यच होते! दवणे सर वपुंना एवढेच म्हणाले, “वपु, विद्यार्थ्यांना मला लेखकातील हिमालय दाखवायचेत, आपण नाही आलात तर ते स्पीडब्रेकरला हिमालय समजतील!” १० सेकंदांचा विराम गेला; नि एकदम वपु म्हणाले, “मी येतो! तयारीला लागा”. दवणे सर पुढे लिहितात, मित्रहो; त्या दिवशी आम्ही वपूर्वाई अनुभवली! खरंच, काय लिहिलंय प्रवीण सरांनी! “स्पीडब्रेकर ला हिमालय समजतील”! अगदी, सर्वांच्या मनातले भाव व्यक्त केलेत. ‘वपु आहेतच हिमालय!’ असे अनुभव वाचताना, अंगावर काटा येतो! आपल्या आवडत्या लेखकाला भेटणं, त्यांचे अनुभव ऐकता येणं, ही खरंच भाग्याची गोष्ट आहे. इथे सांगायचं मुद्दा हा की, प्रत्यक्षरित्या नाही पण वपुंच्या ‘कथाकथनाची कथा’ या पुस्तकामधून असाच अनुभव मला ही मिळाला. अगदी योगायोगाने हे पुस्तक हाती आलं आणि एखादा खजिना सापडल्यासारख झालं. आमचा ‘येथे कविता लिहून मिळतील‘ हा कार्यक्रम सादर करण्यासाठी या पुस्तकामुळेच बळ मिळालंय. या पुस्तकात वपुंनी, त्यांच्या ‘कथाकथन’ कार्यक्रमानिमित्त त्यांना आलेले चांगले वाईट-अनुभव अगदी दिलखुलासपणे मांडले आहेत. त्यानिमित्ताने, वपुंच्या आयुष्यातील मोठमोठ्या व्यक्तींची, त्या व्यक्तींच्या विचारांशी आपलीही ओळख होते; आणि एखाद्या कलेसाठी स्वतःला “झोकून देणे” म्हणजे काय, हे कळतं. तुम्ही कथाकथनकार, कवी, लेखक किंवा कलाकार असाल, तर हे पुस्तक एकदा तरी वाचाच. सामान्य वाचक म्हणून देखील आपल्या आवडत्या लेखकाच्या आयुष्यातील हे अनुभव तुम्हाला हसवतील, अंतर्मुख करतील, कलाकाराने स्टेजमागे खाल्लेल्या टक्केटोणप्यांची जाणीव करून देतील आणि तुमचं अनुभवविश्व समृद्ध करतील. कलेच्या क्षेत्रात काम करताना येणाऱ्या विविध परिस्थितींना कसं सामोरं जायचं, वातावरणनिर्मिती कशी करावी, एखादा कार्यक्रम करताना काय खबरदारी घ्यावी, कथा कशी निवडावी, ती सादर कशी करावी अशा अनेक प्रश्नांची उत्तरं उदाहरणांसहित यात मिळतील. त्यांच्या पहिल्याच तिकीट लावून झालेल्या प्रयोगाला, ‘वसंताचा कार्यक्रम रुपया देऊन कसला ऐकायचा?’ असं म्हणत मित्रमंडळी आली. त्यातल्या एका मित्राने रुपया दिला पण दोन दिवसांनी, “परवा काही एवढी मजा नाही आली बुवा; रुपया वाया गेला” म्हणत तो रुपया पण परत घेतला. गावोगावी प्रवास करताना, तिकीटांच्या सोयीपासून, राहण्याची व्यवस्था, बुडवलेले मानधन, काही आयोजकांचा तर्हेवाईकपणा, फुकटात प्रयोग करत नाहीत म्हणून किंवा असूयेने पसरवलेल्या अफवा यांबद्दल सांगतानाच, श्रोत्यांकडून भरभरून मिळालेल्या दानाबद्दलही ते मोकळेपणाने लिहितात. वपु म्हणतात, “आपला श्रोता हाच आपला देव. बालगंधर्वांप्रमाणे मी जरी ‘मायबाप हो’ अशी हाक मारली नाही, तरी मनात भाव तोच आहे”. ‘कथाकथनाने काय दिलं?, असं विचारलं की वपु म्हणतात, ते शब्दात कसं मोजता येईल ?’ पण कृष्णामाईच्या चार हजारांवर श्रोत्यांची उपस्थिती असलेल्या उत्सवात, ‘आपण प्रचंड मोठा मंडप उभारू शकतो, हा इथल्या कार्यकर्त्यांचा गर्व तुम्ही उतरवलात’, असे सांगत एका वृद्ध गृहस्थाने व्यक्त केलेला आनंद, वपुंची ‘गार्गी’ कथा ऐकल्यानंतर, ‘माझ्या मुलाला मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं, ह्याचा मला अभिमान वाटतो’, हे सांगताना एक डॉक्टरच्या चेहऱ्यावरचा आनंद ,’तुम्ही स्त्रीला ज्या उंचीवर नेऊन ठेवलंय, तसं इतर कोणीच करू शकत नाही’, हा एका स्त्रीचा अभिप्राय, एका टॅक्सीवाल्याने दिवसभर ऐकवलेल्या वपुंच्याच कथा, एका दुकानदाराने वपुंसमोरच, त्यांना न ओळखता, “तुम्ही अगदी वपुंसारखे बोलता’ ही दिलेली दाद त्याचसोबत थोरामोठ्यांची संगत, त्यांनी दिलेली शाबासकीची थाप, अशा अनेक आठवणी या पुस्तकातून आपल्याला भेटतात आणि दवणे सरांना वपु ‘हिमालय’ का वाटले हे कळतं. जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती, हे म्हणतात ते खरंच आहे. एखादी व्यक्ती कशी आहे, हे फक्त वरवर पाहून कसं कळणार? वपुंच्या शब्दात सांगायचं तर, ‘माणूस जन्माला येतो तो कोरी पानं घेऊन. त्या पुस्तकाला रॅपर्स चढवली जातात. एकदा हे बुक-जॅकेट चढलं की पोशाखी जगात मुखपृष्ठाकडे पाहूनच ग्रह करून घेतले जातात. पुस्तकाची पुष्कळशी पानं इतरांसाठीच राखून ठेवलेली असतात. स्वतःला हवा तोच मजकूर लिहिण्याचं भाग्य कोट्यवधी माणसांत एखाद्याचंच’. अशाच अनेक पुस्तकांपैकी ‘वपु’ एक पुस्तक. आपल्याला त्यांना वाचता येतंय हे आपलं भाग्यच म्हणायचं,नाही का? तुमच्या आहेत का अशा, आवडत्या लेखकांच्या भेटीच्या आठवणी? जमलं तर खाली कॉमेंटमध्ये सर्वांसोबत शेयर करा. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more