* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IT IS A FICTIONAL WORK BY DHRUV BHATT, IN THE FORM OF MEMOIRS OF A YOUNG CIVIL ENGINEER DEPUTED TO SURVEY AN ARID COASTAL PART OF SAURASHTRA. THE NOVEL HAS AT ITS CENTRE THE QUEST FOR A FINE BALANCE BETWEEN A TRADITIONAL, NON-SCIENTIFIC, FAITH-DRIVEN SOCIETY AND CYNICAL, PROFIT DRIVEN ECONOMY. WEAVING TOGETHER THE CHARACTERS, REAL AND IMAGINARY, EVENTS AND LEGENDS FROM THE FOLKLORE OF THE REGION, DHRUV BHATT HAS IMPARTED HIS OWN SENSITIVITY TO THE LEADING CHARACTERS AND AT THE SAME TIME NARRATED A GRIPPING STORY.
रात्री त्या शेतकर्‍याच्या कुटुंबात मी राहिलो. खुल्या आकाशाखाली काथ्याच्या खाटेवर पडल्या पडल्या मी विचार करत होतो. दोन-तीन दिवसांपूर्वी तर मी माझ्या परिचित वातावरणात माझ्या आप्तेष्टांबरोबर होतो. आज या अगदी नवख्या जागेची ओळख झाली. एका संध्याकाळच्या या ओळखीत असं काही अनुभवलं जे माझ्या आयुष्याचा न विसरणारा भाग बनून गेलं. छोटी जानकी माझी जणू खूप वर्षांच्या ओळखीची वाटू लागली! उद्या मी इथून पुढे जाईन, पुन्हा कधी
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#SAGARTEERI # DHRUV BHAT# ANJANI NARAVANE# SAMUDRA# BHARATI# KHADAK# SHANKHSHIMPALE# KHADI# KINARA# BANDAR# KHADAK# OHOTI# RETI# KHARAT# NARALI# DARIYA# SAGAR# DIVADANDI# SABUR# NOORABHAI# KRISHNA# SHYAMJI SARPANCH# HADABHATT# BANGALI BABAJI# AVAL
Customer Reviews
  • Rating StarRavindra Ogale

    સમુદ્રાન્તિકે या ध्रुव भट्ट यांच्या मूळ गुजराथी पुस्तकाचा अंजनी नरवणे यांनी केलेला मराठी अनुवाद - `सागरतीरी` - वाचला. त्याबद्दल थोडंसं. भट्ट यांनी विविध पुस्तकांतून गुजरातच्या निरनिराळ्या भागांचं, तिथल्या-तिथल्या समाजजीवनाचं अत्यंत प्रगल्भ दर्शन घवलेलं आहे. तत्त्वमसि, अकूपार या कथा अनुक्रमे नर्मदा खोरं आणि गीर अभयारण्याच्या परिसरात घडतात तर सागरतीरीमध्ये भट्ट आपल्याला सौराष्ट्राच्या दक्षिण किनाऱ्यावर नेतात. त्यांच्या या कादंबरींमध्ये काही समान दुवे आहेत. `सागरतीरी`तही कथानायकाचं नाव शेवटपर्यंत आपल्याला कळत नाही. या निनावीपणामुळे ती कथा प्रथमपुरूषातूनच वाचली जाते आणि vicariously ती कथा आपण आपोआपच जगतो. संपन्न अनुभव म्हणजे काय याचा प्रत्यय या कथा वाचताना येतो. ती कथा तुमची, माझी प्रत्येक वाचणाऱ्याचीच होऊन जाते. भट्टांच्या इतर कथांप्रमाणेच `सागरतीरी`तही ‌निसर्गाप्रति सदैव कृतज्ञता बाळगून, त्यातल्या समस्त जैवविविधतेसह आनंदानं एकत्र जगणाऱ्या, साध्या पण उदात्त, रूढार्थाने आर्थिकदृष्ट्या गरीब पण सुखासमाधानाच्या बाबतीत अतिशय संपन्न राहणीमान असलेल्या लोकांच्या आयुष्याचे फार जवळून आणि सुंदर दर्शन त्यांनी घडवलं आहे. अकूपारची सांसाई, तत्त्वमसिची सुप्रिया आणि सागरतीरीची अवल. मुक्त-निर्बंध, खंबीर, स्वाभिमानी, निःस्वार्थी आणि स्पष्ट विचारांची नायिका हेही भट्ट यांच्या कादंबरींचं लक्षण. अवल अशीच आहे, पुस्तकी शिक्षण थोडंफारच झालेली पण व्यवहार, धर्म, भावना, नैतिकता या साऱ्या गोष्टींची तिला व्यवस्थित जाण आहे. तसं पाहायला गेलं तर जेमतेम सव्वाशे पानांच्या या कथेत अवल मोजक्याच वेळी आपल्याला भेटते पण त्यातही तिचं पात्र लेखकाने इतकं सुबक रेखाटलं आहे की हिला तर आपण नीटच ओळखतो असा भास होत राहतो. त्यांच्या इतर कथांप्रमाणेच `सागरतीरी`तही नायक-नायिकेमध्ये असणारं एक अव्यक्त, गूढ, आदरणीय नातं दिसून येतं. म्हटलं तर ठसठशीतपणे जाणवणारं, नि काही प्रसंगात हळुवारपणे काळजाला हात घालणारं असं. या नात्याचं वर्णन इतकं प्रभावशाली आहे की अवल नि नायकाचा शेवटचा संवाद संपताना, हा अवलचा कथेतला शेवटचा सहभाग आहे हे जाणवत असल्याने हुरहूर लावून जातो. कथेची सुरुवात तिथल्या परिसराप्रमाणे थोडी रूक्ष (कथानायकाच्या त्यापरिसराप्रति सुरूवातीला असणाऱ्या भावनांमुळे कदाचित) भासते. पण जसजसे नायकाचे त्या परिसराशी, तिथल्या लोकांशी बंध जुळत जातात तसा वाचकही अलगद बांधला जातो. आणि हळूहळू चाललेली कथा शेवटच्या वादळाच्या प्रकरणात सुरेख वेग घेते आणि वाचकाला crescendo चा अनुभव होतो. आणि शेवटाला या वादळी अनुभवातून निसर्गाची, तिथल्या लोकांची, त्यांच्या जाणिवांची आणि या सगळ्यांच्या एकसामायिक जगण्याची नायकाला पटलेली ओळख व त्यातून आपणही इथलेच होऊन गेल्याची त्याची भावना अशा समतोलानं कथेचा शेवट करत लेखकाने हा काहीसा Ascending storytelling (which has a rather scholarly name of `Fichtean curve`) परिणाम फार सुंदर साधला आहे. बाकी सबूरिया, सर्वण, किष्ना तांडेल, बेली, मुखिया, हादाभट्ट, बंगालीबाबा आणि मुख्य `अनंतमहाराज` दर्या या लोभस पात्रांना भेटण्याकरता पुस्तक वाचा. सागरतीरी मूळ पुस्तक સમુદ્રાન્તિકે : ध्रुव भट्ट मराठी अनुवाद: अंजनी नरवणे जाता जाता: ध्रुव भट्ट हे गुजराथी साहित्याचा शाश्वत, पथदर्शी ध्रुवतारा आहेत. त्यांची तत्त्वमसि, अकूपार, अतरापि आणि आता हे सागरतीरी ही सगळी मराठीत अनुवादित पुस्तके वाचल्यामुळे त्यांचं इतर साहित्य वाचण्याची प्रबळ इच्छा होते आहे. पण इतर पुस्तके तिमिरपंथी, कर्णलोक, अग्निकन्या इ. मराठीत अनुवादित सापडत नाहीत. कुणाला कल्पना असल्यास कळवावे. अन्यथा गुजराथीतच वाचावी लागतील. ...Read more

  • Rating StarMANISH UGALE

    इंजिनिअर असलेल्या नायकाचं बोट पकडून आपण सौराष्ट्राच्या प्रवासाला निघतो. सागर किनाऱ्यावरच्या एका अत्यंत विरळ लोकवस्तीच्या मागासलेल्या प्रदेशात नायकाची नियुक्ती झालेली आहे. रासायनिक कारखाने उभे करण्यासाठी सरकारी जमिनींची मोजणी करायला तो आलाय. दूरवरच्याएका गजबजलेल्या शहरातून एकदम या वैराण प्रदेशात येऊन पडल्यावर तो काहीसा निराश आणि अस्वस्थ झाला आहे. या भूमीत पाऊल टाकल्यापासून जसा अभावग्रस्त जीवनाला तो सामोरा जातो आहे, त्याच जोडीला त्याला भेटत आहेत ती इथली अनोळखी माणसावर सुद्धा जीवापाड प्रेम करणारी माणसं. ज्यांच्या घरात खायला दाना नाही, अंगावर पुरेसे कपडे नाहीत, आरोग्याच्या सोयी तर सोडाच पण होड्या, गाढवं आणि एखादा घोडा याशिवाय वाहतुकीची साधनं नाहीत अशी वंचित माणसं इतकी आनंदी आणि उदार मनाची कशी? हे पाहून नायक चकित होतो. नायकाला रहाण्यासाठी आणि ऑफिस थाटण्यासाठी एक सरकारी हवेली मिळाली आहे. समुद्रकिनारी इतक्या उजाड परिसरात उभ्या असलेल्या या एकमेव वास्तूच्या पोटात अनेक रहस्यं दडलेली आहेत. हवेलीवर साहेबाला (नायकाला) मदत करण्यासाठी काही स्थानिक स्टाफ नेमलेला आहे. अफाट मेहनत करण्याची क्षमता असलेला नोकर सबूर, या वैराण प्रदेशात निगुतीनं वाढवलेल्या बाभळींवर आणि पक्ष्यांवर प्रेम करणारा जंगलअधिकारी नूरभाई, दर्यादेव येऊन राहतो त्या एका भेंसल्यावर की जिथे कोणीही जायची हिंमत करत नाही अशा ठिकाणी जाऊन येणारा शूर तांडेल किष्ना अशी काही इंटरेस्टिंग पात्रं साहेबाला या प्रदेशात भेटतात. सगळ्यात रोचक पात्रं आहेत ती म्हणजे बंगालीबाबा आणि अवल. किड्यामुंग्यांपासून समुद्रासोबत सुद्धा बोलू शकणारा बंगालीबाबा हा एक गूढ मनुष्य आहे. निसर्गाची भाषा त्याला अवगत आहे. अवल ही स्वाभिमानी आणि तत्त्वनिष्ठ स्त्री आहे, ती कोण आहे, हवेलीशी तिचा काय संबंध आहे हे जाणून घेणं फार रंजक आहे. स्थानिक जीवनाशी जुळवून घेताना साहेब हळूहळू इथलाच एक होऊन जातो. या भूमीवर, समुद्रावर आणि माणसांवर त्याचा जीव जडतो. ही भावनाशीलता त्याला `नेमून दिलेलं काम करू नकोस` असा आंतरिक साद घालू लागते. निसर्ग आणि मनुष्यजीवन यांचा सहसंबंध कथानकातून हळुवारपणे उलगडताना लेखकाने केलेलं सुरेख चिंतन या कादंबरीतून आढळतं. हे केवळ कथेसाठी कथा सांगणं नाही. घटनांतल्या `मधल्या` जागांतून जीवनाकडे बघण्याचा लेखकाचा व्यापक दृष्टिकोन आपल्याला दिसतो. काम पुढे नेऊ की राजीनामा देऊ या द्वंद्वात सापडलेला साहेब पुढे काय करतो? समुद्री वादळाबद्दल बंगालीबाबाने वर्तवलेल्या भाकिताचं पुढे काय होतं? साहेबाची गूढ भेंसल्यावर जाण्याची इच्छा पूर्ण होते का? कादंबरी वाचताना ही सारी रहस्ये उलगडत जातात. बुद्धी आणि मनगटाच्या जोरावर भव्य निर्मिती करण्याची महत्त्वाकांक्षा माणूसप्राणी बाळगून असतो. पण सर्वव्यापी, सर्वपोषी आणि सर्वनाशी क्षमता बाळगून असलेल्या निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर, त्याला समजून घेतल्यावर माणसाच्या वृत्तीत, विचारांत कसा बदल होत जातो याची ही गोष्ट आहे. थोर गुजराती लेखक ध्रुव भट्ट यांच्या `समुद्रान्तिके` या गुजराती साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीचा अनुवाद अंजली नरवणे यांनी `सागरतीरी` नावाने केला आहे. साहित्य अकादमी मिळण्यासारखं या कादंबरीत काय विशेष आहे हे ती वाचायला घेतल्यावर लगेचच लक्षात येतं. ध्रुव भट्ट हे गुजरातीतले फार महत्त्वाचे लेखक आहेत. कथासूत्राला व्यक्तीकडून समष्टीकडे नेण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. कथानक `प्रेडिक्टेबल` नसणं हे त्यांच्या लेखनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. आणखी गंमत तर यात आहे की ध्रुव भट्टांच्या कादंबरीतील नायकाचं नाव आपल्याला शेवटपर्यंत समजत नाही आणि तरीही तो आपल्याला आपल्यातलाच एक वाटत राहतो. आपल्याला माणूस म्हणून समृद्ध करणारी आणि जीवनाची भव्यता दाखवणारी ही कादंबरी आवर्जून वाचावी अशीच आहे. - मनीषा उगले (एका सन्मित्राने ध्रुव भट्ट यांच्या पुस्तकांची ओळख करून दिली, त्याच्या ऋणात रहायला मला आवडेल.) ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 20-07-1997

    अनवट वाटेवरचा अनुभव… गुजराती लेखक ध्रुव भट्ट यांची ‘समुद्रान्तिके’ ही लेखाकृती रुढार्थाने कुठल्याच साहित्यप्रकारात न मोडणारी. कथेचा एकजिनसी अनुभवतीत नाही आणि कादंबरीचं बहुआयामित्वही तीत आढळत नाही, त्यामुळेच असेल बहुधा सोय म्हणून तिला ‘कादंबरी’ प्रकरात समाविष्ट केलं गेलं आहे. ‘सागरतीरी’ या नावाने अंजली नरवणे यांनी तिचा मराठी अनुवाद केला आहे. ‘सागरतीरी’त सलग असं कथानक नाही. आहेत ते विलक्षण अनुभव आणि विविध व्यक्तिरेखांचे तुकडे ! ज्यांची कधी सुसंगत वाटणारी, पण बरीचशी विस्कळीत अशी सांधेजोड करण्यात आली आहे. इंजिनियरिंगची पदवी पदरात असूनही दोन वर्षे बेकारीत काढलेल्या एका तरुण, संवेदनशील इंजिनियरच्या वाट्याला आलेल्या अकल्पित अनुभवांचं हे संचित आहे. बेकारीने संत्रस्त झालेल्या या तरुणाला एके दिवशी अनपेक्षितपणे एका सरकारी प्रकल्पात काम मिळते. लाभ-हानीचा यत्किंचितही विचार न करता तो ही नोकरी स्वीकारतो आणि त्या बिंदूपासून त्याच्या आयुष्यातील एका अज्ञाताच्या प्रवासाची सुरुवात होते. सौराष्ट्राच्या किनाऱ्यावरील विरळ लोकवस्ती असलेल्या अत्यंत मागास प्रदेशात सरकारला एक रासायनिक कारखाना उभारावयाचा असतो त्यावर प्रकल्प अभियंता म्हणून त्यांची नेमणूक होते. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी करुन ती संपादन करणं आणि प्रकल्प अहवाल तयार करणं हे त्याचं काम असतं. शहरी संस्कृती, सोयी-सुविधांपासून शेकडो मैल दूर आणि पदोपदी येणाऱ्या असंख्य अडचणींचा सामना करत त्याला ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. याची जाणीव तिथे रुजू होण्यापूर्वीच त्याला होते. प्रारंभी तर, या अशा सर्व तऱ्हेच्या अभावांशी दोन हात करत आपण आपलं विहित काम कसं पुरं करणार, असा प्रश्न त्याला पडतो, त्यापेक्षा ‘नको हे काम’ म्हणून आपल्या जीवाभावाच्या माणसांत परतलेलं काय वाईट, असा टोकाचा विचारही क्षणभर त्याच्या मनात आपली बेकारीतील दोन वर्षे आठवतात आणि भरकटणारं त्याचं मन ताळ्यावर येतं. शहरी कोलाहलापासून दूर शांत निसर्गात, कोणतीही तक्रार न करता जगणारी तिथली आनंदी वृत्तीची माणसं पाहिल्यावर तर त्याचं कुतूहल भरलं मन मागे न फिरता पुढं पुढंच जायला त्याला भाग पाडतं. कळत-नकळत तोही त्यांच्यात गुंतत जातो. नोकरीवर रुजू होण्याचा प्रवासातच त्याला इथल्या प्रदेशाची, साध्या - सरळ जीवनपद्धतीची, वैचित्र्याचा परिचय देणाऱ्या माणसांची, त्यांच्या निरपेक्ष प्रेमाची ओळख होते. नंतर तीन वर्षांच्या तिथल्या वास्तव्यात त्याला माणसांचे असंख्य नमुने पाहायला, अनुभवायला मिळतात. कोणत्याही पाशांत स्वत:ला अडकवून न घेता काहीसं दिशाहीन आयुष्य जगणाऱ्या सबूरची एकमात्र इच्छा आहे ती - स्वत:च्या मालकीच्या (लहानशा का होईना) जमिनीच्या तुकड्याची ! पण तोही त्याच्या नशिबी नाही. या एकाच जीवनध्यासाने पछाडलेला सबूर कथनायकाकडून मिळालेल्या नापीक, ओसाड जमिनीच्या तुकड्यानेही कृतार्थ होतो. तीच गोष्ट नूरभार्इंची. जंगल खात्यातला हा माणूस ! सर्वार्थाने पशु-पक्ष्यांच्या जगातच ते वावरतात. त्यांच्याच भाषेत बोलतात. बंगाली बाबाजी ही आणखी एक वल्ली. निसर्गाशी त्यांची अतूट नाळ जोडली गेली आहे. त्यांच्या फटकळपणातूनही माणुसकीचा निर्मळ झराच वाहात असतो. बेटावरचा धाडशी खलाशी किष्ना हे तर अजबच रसायन. ‘भीती, अशक्य’ असले फालतू शब्द त्याच्या शब्दकोशात नाहीतच. तुफानाला सामोरं जातानाही त्याचं अप्रूप त्याला वाटत नाही. तो त्याच्या जगण्याचाच एक भाग आहे जणू ! इथले शामजी सरपंच हे या मातीतच घडलेलं एक धीरोदात्त व्यक्तिमत्व. इथल्या माणसांचं ते खरंखुरं प्रतिनिधित्व करतात. गावात सरपंच म्हणून प्रतिष्ठित जीवन जगणारे शामजी उन्हाळ्यात मात्र इतरांबरोबर मोलमजुरीसाठी वणवण भटकतात, त्यात त्यांना कोणताही कमीपणा वाटत नाही. ‘सागरतीरी’ त एक व्यक्ती मात्र प्रत्यक्ष अस्तित्वात नसूनही सर्वव्यापी होऊन राहिलीय. ती म्हणजे हादा भट्ट! संपूर्ण कथानकभर हादा भट्टांबद्दल जाणून घ्यायला आपण उत्सुक राहतो. तीच गोष्ट अवलची! या लोकविलक्षण स्त्रीचं वागणं-बोलणं-व्यवहार वाचकाचं कुतूहल जागृत करतं. ती नेमकी कोण, कुठली या आडगावात ती कशी रुजली, तिच्या या अलिप्त जगण्याचा मतलब काय, अशा असंख्य प्रश्नांचं मोहोळ वाचकाच्या मनात उठतं, त्याची उत्तरं जरी कादंबरीच्या शेवटी मिळत असली तरी ती मिळेपर्यंत उगीचच बेचैन व्हायला होतं. निसर्गाशी एकरुप झालेल्या या निरनिराळया मुशीतील वाटाव्यात अशा पण अंतर्यामी निर्झरासारख्या निर्मळ व्यक्तींचा कथानायकाला परिचय होत जातो. त्यांच्याशी वेळोवेळी झालेल्या संवाद-विसंवादातून आपणही हळुहळू अंतर्बाह्य बदलत चाललो आहोत, याची जाणीव त्याला होते. ‘माणूस’या शब्दाला अर्थ देणाऱ्या खऱ्याखुऱ्या माणसांना भौतिक प्रगतीच्या वरवंटयाखाली आपण उद्वस्त करायचं का, हा प्रश्न त्याचा पिच्छा पुरवतो. कामातलं लक्ष उडतं. मन द्विधा होतं. बंगाली बाबा त्याची मन:स्थिती ओळखतात. त्याचं वस्तुस्थितीकडे लक्ष वेधतात. त्यांच्याशी बोलल्यावर त्याच्या मनात घोंघावणारं वादळ शांत होतं आणि निश्चिंत होऊन तो आपल्या कामाला लागतो. चाकोरीबद्ध कथानकाची अपेक्षा ठेवून ‘सागरतीरी’ हाती घेणाऱ्यांच्या पदरी निराशाच येईल. कारण ‘सागरतीरी’ हा एक अनवट वाटेवरचा अनुभव आहे. कथानकच नसल्याने यातल्या व्यक्तिरेखाही अचानक येतात आणि गायब होतात. या व्यक्तिरेखा स्वतंत्रपणे मात्र मनावर ठसतात. अपरिचित प्रदेश, तिथली लोकसंस्कृती आणि विलक्षण माणसं यांचं दर्शन घडवणारी ‘सागरतीरी’ कोणताही पूर्वग्रह मनी न बाळगता वाचल्यास वाचकाला अनोख्या जगात निश्चितच नेईल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more