* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KALYANI WAS BORN IN THIS UNDIVIDED NATION. INDIA SUCCEEDED IN DRIVING AWAY THE BRITISH, BUT AT THE COST OF ITS DIVISION. WHY DID THE HINDU GO OUT OF THEIR OWN COUNTRY WHILE SENDING AWAY THE MUSLIMS FOREVER FROM IT? THIS LAND NEVER BECAME THE MOTHERLAND OF THE MUSLIMS, IT ALWAYS REMAINED THE MOTHERLAND OF THE BENGALIS. THIS NATION WAS RAISED FROM THE BLOOD OF 30 MILLION PEOPLE. THE WAR AGAINST PAKISTAN IN THE YEAR 1971 TAUGHT A LESSON TO THAT COUNTRY WHO DIVIDED INDIA, WHO MADE BANGLADESH THE MOTHERLAND OF THE MUSLIMS, WHO WAS SO TREACHEROUS THAT MANY HAD TO LEAVE THEIR MOTHERLAND. THE WAR BROUGHT FORWARD THE TRUTH; THIS COUNTRY IS OF BENGALIS, NOT OF MUSLIMS. THE LANGUAGE IS IMPORTANT HERE, NOT THE RELIGION. KALYANI FELT LIKE STOPPING THE RICKSHAW AT ONCE. SHE WANTED TO SHOW AWAY THE SOIL STICKING ALL OVER HER BODY. THE LOVE FOR IT WAS NOT GOING TO ALLOW HER TO LOVE ANY OTHER LAND NOW. MAN LOVES ONLY ONE SOIL, IT IS SO OBVIOUS. KALYANI HAS COME TO HER MOTHERLAND. SHE WANTS TO FEEL THE SOIL, SMELL IT SHE WAS BORN FROM THAT SOIL, SHE WAS NOT BORN FROM ANY WOMB…..
.... या अखंड देशातच कल्याणीचा जन्म झाला होता. भारतानं ब्रिटिशांना हाकललं, पण स्वत:चे तुकडे करून हाकललं .... ह्या देशातून उर्दू बोलणाऱ्या मुसलमानांना हाकलताना हिंदूंना सर्व गाशा गुंडाळून स्वत:च्याच देशातून बाहेर का जावं लागलं? मुसलमानांची मायभूमी न होता, हा देश तर शेवटपर्यंत बंगल्यांचाच राहिला. तीस लाख बंगाल्यांनी स्वत:च्या रक्तातून हा देश उभं केलाय. ज्यांनी भारताचे तुकडे केले आणि या देशाला मुसलमानांची मायभूमी केली, ज्यांच्या दुष्टपणामुळे या देशातील लोकांना आपला देश सोडावा लागला, त्यांना एकाहत्तरच्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात चांगलीच चपराक बसली. हा देश बंगाल्यांचा आहे, मुसलमानांचा नाही; इथं भाषा महत्वाची आहे, धर्म नाही; हेच या युद्धानं सिद्ध केलं. कल्याणीला वाटलं, रिक्षा थांबवून खाली उतरावं, सर्व अंगावर माती माखावी. ह्या मातीचं प्रेम तिला दुसऱ्या कुठल्याच मातीत आपलं म्हणू देत नव्हतं. माणूस एकाच मातीवर प्रेम करू शकतो, तर! कल्याणी आज तिच्या जन्मगावच्या मातीचा वास घ्यायला आली होती. ह्या मातीतूनच तिचा जन्म झाला होता कोण स्त्रीच्या गर्भातून नाही, तर ह्या मातीतून.....
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TASLIMANASRIN #PHERA #NIRBACHITKALAM #NIRBACHI #LEENASOHONI #MEHTAPUBLISHINGHOUSE #TRANSLATEDBOOKS #MARATHIBOOKS#
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW 15-09-1996

    उत्कट अनुभूतीचा जिवंत आविष्काराचा फेरा... ‘लज्जा’ या कादंबरीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशझोतात आलेल्या तस्लिमा नासरिन या बंगाली लेखिकेची ‘फेरा’ ही लघुकादंबरी मानवी भावविश्वाचे प्रत्ययकारी चित्रण करण्यात मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली आहे. मानवी भाभावानांच्या सूक्ष्म छटा या कादंबरीत समर्थपणे टिपलेल्या आहेत. मायभूमीपासून तुटलेल्या माणसाची जीवघेणी परवड, मायभूमीच्या मातीशी असलेले त्याचे नाते, त्या मातीची ओढ उत्कटपणे चित्रित करण्यात ही कादंबरी निश्चित यशस्वी ठरलेली आहे. फाळणीच्या पार्श्वभूमी या कादंबरीला आहे. मानवी मूल्यांचा होणारा ऱ्हास, धार्मिक विद्वेषांची माणसाच्या मनावर चढणारी पुटे, त्यातून लोप पावत जाणारी माणुसकी याचेही सुन्न करणारे दर्शन या कादंबरीतून घडते. माझ्या आवडत्या, सुंदर देशाची मूलतत्त्ववाद्यांनी केलेली भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक पातळीवरील अधोगती पाहून आक्रोशणारे लेखिकेचे मन वाचकांना अस्वस्थ करते. त्याचबरोबर अंतर्मुख होऊन विचार करायलाही प्रवृत्त करते. बांगला देशातील मयमनसिंह येथे (पूर्वीच्या अखंड भारतात) एका हिंदू कुटुंबात जन्माला आलेली कल्याणी ही या कादंबरीची नायिका आहे. ‘आनंद मोहन’ या महाविद्यालयात शिकणाऱ्या कल्याणीचे तिच्याच वर्गातील एका गावंढळ तरुणावर बादल) प्रेम बसते. आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या जातात. सुखी जीवनाची सुंदर स्वप्नं पाहण्यातच तिचे दिवस जात असतानाच तिच्या जीवनात भयंकर वादळ येते. भारत-पाकिस्तानची फाळणी होणार, येथे आपल्या कुटुंबाला जगणे कठीण होणार म्हणून एके दिवशी अचानकपणे कल्याणीचे वडील (हरिनारायण राय) आपल्या मुलांना कलकत्त्याला पाठविण्याचा निर्णय घेतात. आपले गाव, तेथील निसर्ग, जीवलग मित्र-मैत्रिणी यांना सोडून जाणे कल्याणीच्या जीवावर आलेले असते. ती दडून बसण्याचा प्रयत्न करते, पण तिला तेथून पाठविले जाते. ती आपल्या भावंडांसह मामा-मामीकडे कलकत्त्याला येते येथे तिला मोलकरणीसारखी वागणूक मिळते. नातेवाईकांच्या वासनेने बरबटलेल्या नजरांना सामोरे जावे लागते. तिथे ती घरची काम करून महाविद्यालयात शिक्षण घेते. खासगी नोकरी करते. कलकत्त्यामध्ये तिचा परिचय अनिर्वाण या भारतीय तरुणाबरोबर होतो. परिचयाचे रूपांतर प्रेमात होते. बादल आणि आपले गाव, तेथील ब्रह्मपुत्रा नदी, तळे, विविध फळांची झाडं, हे तिच्या संवेदनशील मनावर कोरलेलेच असते. ते विसरणे तिला अशक्य होते. मामा-मामींच्या जाचातून सुटण्यासाठी, नातेवाईकांच्या वासनांध नजरातून बचाव करण्यासाठी एक उपचाराचा भाग म्हणून कोर्टात जाऊन ती अनिर्वाणबरोबर लग्न करते. त्यांचा संसार सुरू होतो. मात्र तिच्या डोक्यातून आपला देश, आपला गाव, तेथील माती, मित्र-मैत्रिणी यांच्या आठवणी तीव्रतेने येत असतात. तीस वर्षे ती या आठवणीवरच दिवस ढकलत असते. तिला दोन मुलं होतात. दरम्यान तिचे आई-वडील दोघेही मरण पावतात. आता तेथे आपले कोणीही राहिले नाही याची खंत तिला दिवसेंदिवस अस्वस्थ करते. आपल्या मैत्रिणींकडे जावे, जुन्या आठवणींना उजाळा द्यावा, असा विचार करून ती कशीतरी पतीची परवानगी घेऊन सहा-सात वर्षांच्या दीपनला सोबत घेऊन तीस वर्षानंतर ती बांगला देशातील मयमनसिंहला येते. पूर्वीचे वैभव तसेच असेल, आपले धर, ब्रह्मपुत्रा नदी, तळो, नारळ, पेरू, जांभळाची झाडं, मैत्रिणी पाहायला मिळतील. आपल्या मातीत काही दिवस तरी विसावता येईल अशी कितीतरी स्वप्नं घेऊन ती आलेली असते. मयमनसिंहला आल्यानंतर मात्र तिची घोर निराशा होते. तिचे घर सरकारने जप्त केलेले असते. ते घर पाडून तेथे सिंमेटची इमारत उभी केलेली असते. झाडं तोडलेली असतात. नदी आटलेली असते. नदीचे रूपांतर नाल्यात झालेले असते. तिला तेथे कोणी ओळखत नाही. तिचे म्हणून तिथे काहीच नसते. आपले घर असलेल्या जागेवर ती व्याकूळ मनान रेंगाळते. मूठभर माती उचलून घेते. तिच्या घरासमोरचे जांभळाचे झाड मात्र अद्याप असते. असंख्य आठवणी दाटून येतात. ती त्या झाडाला कवटाळून ओक्साबोक्सी रडते. जमलेली माणसं वेडी म्हणून मिला हिणवतात. तिची टिंगल करतात. तिची बालमैत्रीण शरिफदेखील तिला ओळखत नाही. तिला भेटण्यासाठी तर ती एका देशातून दुसऱ्या देशात आलेली असते. तिच्या सर्व स्वप्नांचा चुराडा होतो. ब्रह्मपुत्रा नदीप्रमाणे या माणसांची मनंही आटलेली आहेत, असे तिला वाटते. ती हिंदू आहे म्हणून तेथील माणसं तिच्याकडे तिरस्काराने पाहतात. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी झपाटल्यासारखे ती तिच्या आवडत्या गावातून भटकते. ‘आनंद मोहन’ महाविद्यालयात आल्यानंतर तेथील सर्वच बदललेलं तिला दिसतं. तिचा प्रियकर बादल मुक्ती लढ्यात एक पाय घालवून अपंग झाल्याचे तिला समजते. बादलने आपल्या देशासाठी काही तरी केले याचा तिला अभिमान वाटतो. त्याचबरोबर त्याच देशाचा होणारा ऱ्हास पाहूनही ती खंतावते. तेथील लहान मुलांना, तरुणांना हिंदूद्वेषाचे आणि नमाजपठणाचे शिक्षण कसे दिले जाते. ते पाहून तिचे अंत:करण तीळ तीळ तुटते. पंधरा दिवसांसाठी आपल्या देशात राहायला गेलेली कल्याणी दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच निराश मनाने आणि भरल्या अंत:करणाने परत येण्यासाठी निघते. या कादंबरीत लेखिकेने कल्याणीच्या भावजीवनाचे विविध छटांसह चित्रण केलेले आहे. हे भावविश्व त्या नायिकेपुरतेच मर्यादित राहात नाही तर मायभूमीपासून, मातीपासून तुटलेल्या माणसाचे ते प्रातिनिधक चित्रण बनते. मानवी भावभावानांचा जिवंत आणि ज्वलंत आविष्कार या कादंबरीचा गाभा आहे. सरळ, साध्या अंत:करणाला भिडणाऱ्या निवेदनामुळे या कादंबरीचा परिणामकारकता वाढते. आठवणीच्या रूपाने निवेदन तंत्र वापरल्याने कथानकात काही ठिकाणी अवरोध निर्माण झाल्यासारखे वाटते. लहान लहान उदाहरणांमधून लेखिकेने मानवी मनाच्या बदलांचे प्रभावी चित्रण केलेले आहे. लहान मुलांच्या मनावर हिंदू लोकांविषयी द्वेष कसा बिंबविला जातो. त्याचे अतिशय समर्पक उदाहरण लेखिकेने दिलेले आहे. काळ्या मुंग्या म्हणजे मुसलमान आणि तांबड्या मुंग्या म्हणजे हिंदू. काळ्या मुंग्यांना सोडून द्यायचे आणि तांबड्या मुंग्यांना मारायचे. या लहान मुलांच्या मुंग्या-मुंग्याच्या खेळाचे उदाहरण सूचकपणे आणि मार्मिकपणे दिलेले आहे. फाळणीमुळे केवळ भूप्रदेशच विभागला गेला नाही तर माणसा-माणसांची मनेही विभागली गेली आहेत, याचे विदारक चित्रण या कादंबरीत केलेले आहे. देश, प्रांत, प्रदेश येथील समानपणे बदलत जाणाऱ्या आणि वाह्यात बनत चाललेल्या तरुण पिढीसंबंधीचे वास्तव निरीक्षणही लेखिकेने स्पष्टपणे नोंदविलेले आहे. या कादंबरीतील नायिकेने उपस्थित केलेले, माणसांपेक्षा धर्म, देश, भाषा यालाच अधिक महत्त्व द्यावे का? माणूस धर्माचा गुलाम का बनतो? माणुसकीपासून दूर का जातो? यासारखे प्रश्न वाचकांना अस्वस्थ तर करतातच पण विचार करायलाही भाग पाडतात. उत्कट अनुभव आणि मानवतेला केंद्रस्थानी ठेवून घेतलेल्या बदलत्या वास्तवाचा वेध यामुळे या कादंबरीला कलात्मक उंची प्राप्त झालेली आहे. ही छोटीशी कादंबरी प्रांताच्या धर्माच्या, भाषेच्या आणि देशाच्या सीमा ओलांडून व्यापक मानवतेचा विचार करते म्हणूनच तिचे महत्त्व अनन्य साधारण आहे. या कादंबरीचा मृणालिनी गडकरी यांनी केलेला मराठी अनुवादही सहज ओषवत्या भाषेत आहे. हा अनुवाद लेखिकेच्या भूमिकेला, कथानकाला न्याय देणारा असाच झाला आहे. जेथे आवश्यकता आहे आणि आशयाची गरज आहे, तेथे तेथे मूळ बंगाली शब्द जसेच्या तसे ठेवलेले आहेत. त्यांचा मराठी अर्थही दिलेला आहे. त्यामुळे ही कादंबरी वाचनीय झालेली आहे. बदलते वास्तव प्रसंग चित्रणातून साकार करण्याचे लेखिकेचे कौशल्ये वाखाणण्यासारखे आहे या कादंबरीच्या अनुवादाने मराठी साहित्यात निश्चितच महत्त्वाची भर टाकलेली आहे. -प्रा. दादासाहेब मोरे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो