* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KALYANI WAS BORN IN THIS UNDIVIDED NATION. INDIA SUCCEEDED IN DRIVING AWAY THE BRITISH, BUT AT THE COST OF ITS DIVISION. WHY DID THE HINDU GO OUT OF THEIR OWN COUNTRY WHILE SENDING AWAY THE MUSLIMS FOREVER FROM IT? THIS LAND NEVER BECAME THE MOTHERLAND OF THE MUSLIMS, IT ALWAYS REMAINED THE MOTHERLAND OF THE BENGALIS. THIS NATION WAS RAISED FROM THE BLOOD OF 30 MILLION PEOPLE. THE WAR AGAINST PAKISTAN IN THE YEAR 1971 TAUGHT A LESSON TO THAT COUNTRY WHO DIVIDED INDIA, WHO MADE BANGLADESH THE MOTHERLAND OF THE MUSLIMS, WHO WAS SO TREACHEROUS THAT MANY HAD TO LEAVE THEIR MOTHERLAND. THE WAR BROUGHT FORWARD THE TRUTH; THIS COUNTRY IS OF BENGALIS, NOT OF MUSLIMS. THE LANGUAGE IS IMPORTANT HERE, NOT THE RELIGION. KALYANI FELT LIKE STOPPING THE RICKSHAW AT ONCE. SHE WANTED TO SHOW AWAY THE SOIL STICKING ALL OVER HER BODY. THE LOVE FOR IT WAS NOT GOING TO ALLOW HER TO LOVE ANY OTHER LAND NOW. MAN LOVES ONLY ONE SOIL, IT IS SO OBVIOUS. KALYANI HAS COME TO HER MOTHERLAND. SHE WANTS TO FEEL THE SOIL, SMELL IT SHE WAS BORN FROM THAT SOIL, SHE WAS NOT BORN FROM ANY WOMB…..
.... या अखंड देशातच कल्याणीचा जन्म झाला होता. भारतानं ब्रिटिशांना हाकललं, पण स्वत:चे तुकडे करून हाकललं .... ह्या देशातून उर्दू बोलणाऱ्या मुसलमानांना हाकलताना हिंदूंना सर्व गाशा गुंडाळून स्वत:च्याच देशातून बाहेर का जावं लागलं? मुसलमानांची मायभूमी न होता, हा देश तर शेवटपर्यंत बंगल्यांचाच राहिला. तीस लाख बंगाल्यांनी स्वत:च्या रक्तातून हा देश उभं केलाय. ज्यांनी भारताचे तुकडे केले आणि या देशाला मुसलमानांची मायभूमी केली, ज्यांच्या दुष्टपणामुळे या देशातील लोकांना आपला देश सोडावा लागला, त्यांना एकाहत्तरच्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात चांगलीच चपराक बसली. हा देश बंगाल्यांचा आहे, मुसलमानांचा नाही; इथं भाषा महत्वाची आहे, धर्म नाही; हेच या युद्धानं सिद्ध केलं. कल्याणीला वाटलं, रिक्षा थांबवून खाली उतरावं, सर्व अंगावर माती माखावी. ह्या मातीचं प्रेम तिला दुसऱ्या कुठल्याच मातीत आपलं म्हणू देत नव्हतं. माणूस एकाच मातीवर प्रेम करू शकतो, तर! कल्याणी आज तिच्या जन्मगावच्या मातीचा वास घ्यायला आली होती. ह्या मातीतूनच तिचा जन्म झाला होता कोण स्त्रीच्या गर्भातून नाही, तर ह्या मातीतून.....
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TASLIMANASRIN #PHERA #NIRBACHITKALAM #NIRBACHI #LEENASOHONI #MEHTAPUBLISHINGHOUSE #TRANSLATEDBOOKS #MARATHIBOOKS#
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW 15-09-1996

    उत्कट अनुभूतीचा जिवंत आविष्काराचा फेरा... ‘लज्जा’ या कादंबरीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशझोतात आलेल्या तस्लिमा नासरिन या बंगाली लेखिकेची ‘फेरा’ ही लघुकादंबरी मानवी भावविश्वाचे प्रत्ययकारी चित्रण करण्यात मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली आहे. मानवी भाभावानांच्या सूक्ष्म छटा या कादंबरीत समर्थपणे टिपलेल्या आहेत. मायभूमीपासून तुटलेल्या माणसाची जीवघेणी परवड, मायभूमीच्या मातीशी असलेले त्याचे नाते, त्या मातीची ओढ उत्कटपणे चित्रित करण्यात ही कादंबरी निश्चित यशस्वी ठरलेली आहे. फाळणीच्या पार्श्वभूमी या कादंबरीला आहे. मानवी मूल्यांचा होणारा ऱ्हास, धार्मिक विद्वेषांची माणसाच्या मनावर चढणारी पुटे, त्यातून लोप पावत जाणारी माणुसकी याचेही सुन्न करणारे दर्शन या कादंबरीतून घडते. माझ्या आवडत्या, सुंदर देशाची मूलतत्त्ववाद्यांनी केलेली भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक पातळीवरील अधोगती पाहून आक्रोशणारे लेखिकेचे मन वाचकांना अस्वस्थ करते. त्याचबरोबर अंतर्मुख होऊन विचार करायलाही प्रवृत्त करते. बांगला देशातील मयमनसिंह येथे (पूर्वीच्या अखंड भारतात) एका हिंदू कुटुंबात जन्माला आलेली कल्याणी ही या कादंबरीची नायिका आहे. ‘आनंद मोहन’ या महाविद्यालयात शिकणाऱ्या कल्याणीचे तिच्याच वर्गातील एका गावंढळ तरुणावर बादल) प्रेम बसते. आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या जातात. सुखी जीवनाची सुंदर स्वप्नं पाहण्यातच तिचे दिवस जात असतानाच तिच्या जीवनात भयंकर वादळ येते. भारत-पाकिस्तानची फाळणी होणार, येथे आपल्या कुटुंबाला जगणे कठीण होणार म्हणून एके दिवशी अचानकपणे कल्याणीचे वडील (हरिनारायण राय) आपल्या मुलांना कलकत्त्याला पाठविण्याचा निर्णय घेतात. आपले गाव, तेथील निसर्ग, जीवलग मित्र-मैत्रिणी यांना सोडून जाणे कल्याणीच्या जीवावर आलेले असते. ती दडून बसण्याचा प्रयत्न करते, पण तिला तेथून पाठविले जाते. ती आपल्या भावंडांसह मामा-मामीकडे कलकत्त्याला येते येथे तिला मोलकरणीसारखी वागणूक मिळते. नातेवाईकांच्या वासनेने बरबटलेल्या नजरांना सामोरे जावे लागते. तिथे ती घरची काम करून महाविद्यालयात शिक्षण घेते. खासगी नोकरी करते. कलकत्त्यामध्ये तिचा परिचय अनिर्वाण या भारतीय तरुणाबरोबर होतो. परिचयाचे रूपांतर प्रेमात होते. बादल आणि आपले गाव, तेथील ब्रह्मपुत्रा नदी, तळे, विविध फळांची झाडं, हे तिच्या संवेदनशील मनावर कोरलेलेच असते. ते विसरणे तिला अशक्य होते. मामा-मामींच्या जाचातून सुटण्यासाठी, नातेवाईकांच्या वासनांध नजरातून बचाव करण्यासाठी एक उपचाराचा भाग म्हणून कोर्टात जाऊन ती अनिर्वाणबरोबर लग्न करते. त्यांचा संसार सुरू होतो. मात्र तिच्या डोक्यातून आपला देश, आपला गाव, तेथील माती, मित्र-मैत्रिणी यांच्या आठवणी तीव्रतेने येत असतात. तीस वर्षे ती या आठवणीवरच दिवस ढकलत असते. तिला दोन मुलं होतात. दरम्यान तिचे आई-वडील दोघेही मरण पावतात. आता तेथे आपले कोणीही राहिले नाही याची खंत तिला दिवसेंदिवस अस्वस्थ करते. आपल्या मैत्रिणींकडे जावे, जुन्या आठवणींना उजाळा द्यावा, असा विचार करून ती कशीतरी पतीची परवानगी घेऊन सहा-सात वर्षांच्या दीपनला सोबत घेऊन तीस वर्षानंतर ती बांगला देशातील मयमनसिंहला येते. पूर्वीचे वैभव तसेच असेल, आपले धर, ब्रह्मपुत्रा नदी, तळो, नारळ, पेरू, जांभळाची झाडं, मैत्रिणी पाहायला मिळतील. आपल्या मातीत काही दिवस तरी विसावता येईल अशी कितीतरी स्वप्नं घेऊन ती आलेली असते. मयमनसिंहला आल्यानंतर मात्र तिची घोर निराशा होते. तिचे घर सरकारने जप्त केलेले असते. ते घर पाडून तेथे सिंमेटची इमारत उभी केलेली असते. झाडं तोडलेली असतात. नदी आटलेली असते. नदीचे रूपांतर नाल्यात झालेले असते. तिला तेथे कोणी ओळखत नाही. तिचे म्हणून तिथे काहीच नसते. आपले घर असलेल्या जागेवर ती व्याकूळ मनान रेंगाळते. मूठभर माती उचलून घेते. तिच्या घरासमोरचे जांभळाचे झाड मात्र अद्याप असते. असंख्य आठवणी दाटून येतात. ती त्या झाडाला कवटाळून ओक्साबोक्सी रडते. जमलेली माणसं वेडी म्हणून मिला हिणवतात. तिची टिंगल करतात. तिची बालमैत्रीण शरिफदेखील तिला ओळखत नाही. तिला भेटण्यासाठी तर ती एका देशातून दुसऱ्या देशात आलेली असते. तिच्या सर्व स्वप्नांचा चुराडा होतो. ब्रह्मपुत्रा नदीप्रमाणे या माणसांची मनंही आटलेली आहेत, असे तिला वाटते. ती हिंदू आहे म्हणून तेथील माणसं तिच्याकडे तिरस्काराने पाहतात. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी झपाटल्यासारखे ती तिच्या आवडत्या गावातून भटकते. ‘आनंद मोहन’ महाविद्यालयात आल्यानंतर तेथील सर्वच बदललेलं तिला दिसतं. तिचा प्रियकर बादल मुक्ती लढ्यात एक पाय घालवून अपंग झाल्याचे तिला समजते. बादलने आपल्या देशासाठी काही तरी केले याचा तिला अभिमान वाटतो. त्याचबरोबर त्याच देशाचा होणारा ऱ्हास पाहूनही ती खंतावते. तेथील लहान मुलांना, तरुणांना हिंदूद्वेषाचे आणि नमाजपठणाचे शिक्षण कसे दिले जाते. ते पाहून तिचे अंत:करण तीळ तीळ तुटते. पंधरा दिवसांसाठी आपल्या देशात राहायला गेलेली कल्याणी दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच निराश मनाने आणि भरल्या अंत:करणाने परत येण्यासाठी निघते. या कादंबरीत लेखिकेने कल्याणीच्या भावजीवनाचे विविध छटांसह चित्रण केलेले आहे. हे भावविश्व त्या नायिकेपुरतेच मर्यादित राहात नाही तर मायभूमीपासून, मातीपासून तुटलेल्या माणसाचे ते प्रातिनिधक चित्रण बनते. मानवी भावभावानांचा जिवंत आणि ज्वलंत आविष्कार या कादंबरीचा गाभा आहे. सरळ, साध्या अंत:करणाला भिडणाऱ्या निवेदनामुळे या कादंबरीचा परिणामकारकता वाढते. आठवणीच्या रूपाने निवेदन तंत्र वापरल्याने कथानकात काही ठिकाणी अवरोध निर्माण झाल्यासारखे वाटते. लहान लहान उदाहरणांमधून लेखिकेने मानवी मनाच्या बदलांचे प्रभावी चित्रण केलेले आहे. लहान मुलांच्या मनावर हिंदू लोकांविषयी द्वेष कसा बिंबविला जातो. त्याचे अतिशय समर्पक उदाहरण लेखिकेने दिलेले आहे. काळ्या मुंग्या म्हणजे मुसलमान आणि तांबड्या मुंग्या म्हणजे हिंदू. काळ्या मुंग्यांना सोडून द्यायचे आणि तांबड्या मुंग्यांना मारायचे. या लहान मुलांच्या मुंग्या-मुंग्याच्या खेळाचे उदाहरण सूचकपणे आणि मार्मिकपणे दिलेले आहे. फाळणीमुळे केवळ भूप्रदेशच विभागला गेला नाही तर माणसा-माणसांची मनेही विभागली गेली आहेत, याचे विदारक चित्रण या कादंबरीत केलेले आहे. देश, प्रांत, प्रदेश येथील समानपणे बदलत जाणाऱ्या आणि वाह्यात बनत चाललेल्या तरुण पिढीसंबंधीचे वास्तव निरीक्षणही लेखिकेने स्पष्टपणे नोंदविलेले आहे. या कादंबरीतील नायिकेने उपस्थित केलेले, माणसांपेक्षा धर्म, देश, भाषा यालाच अधिक महत्त्व द्यावे का? माणूस धर्माचा गुलाम का बनतो? माणुसकीपासून दूर का जातो? यासारखे प्रश्न वाचकांना अस्वस्थ तर करतातच पण विचार करायलाही भाग पाडतात. उत्कट अनुभव आणि मानवतेला केंद्रस्थानी ठेवून घेतलेल्या बदलत्या वास्तवाचा वेध यामुळे या कादंबरीला कलात्मक उंची प्राप्त झालेली आहे. ही छोटीशी कादंबरी प्रांताच्या धर्माच्या, भाषेच्या आणि देशाच्या सीमा ओलांडून व्यापक मानवतेचा विचार करते म्हणूनच तिचे महत्त्व अनन्य साधारण आहे. या कादंबरीचा मृणालिनी गडकरी यांनी केलेला मराठी अनुवादही सहज ओषवत्या भाषेत आहे. हा अनुवाद लेखिकेच्या भूमिकेला, कथानकाला न्याय देणारा असाच झाला आहे. जेथे आवश्यकता आहे आणि आशयाची गरज आहे, तेथे तेथे मूळ बंगाली शब्द जसेच्या तसे ठेवलेले आहेत. त्यांचा मराठी अर्थही दिलेला आहे. त्यामुळे ही कादंबरी वाचनीय झालेली आहे. बदलते वास्तव प्रसंग चित्रणातून साकार करण्याचे लेखिकेचे कौशल्ये वाखाणण्यासारखे आहे या कादंबरीच्या अनुवादाने मराठी साहित्यात निश्चितच महत्त्वाची भर टाकलेली आहे. -प्रा. दादासाहेब मोरे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more