* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AMBIGUOUS LOSS
  • Availability : Available
  • Translators : SUNANDA AMRAPURKAR
  • ISBN : 9788184980608
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 152
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
FROZEN SADNESS THIS IS WHAT WE HAVE WHEN WE CANNOT REALLY KNOW WHAT WE HAVE LOST. AND THIS IS WHAT PAULINE BOSS ILLUMINATES, AND HELPS TO EASE, IN AMBIGUOUS LOSS, AN ORIGINAL AND HUMANE ACCOUNT OF THE RAVAGES OF UNCERTAINTY FACED WHEN WE LOSS A LOVED ONE THROUGH DIVORCE, ADOPTION, ADDICTION, CHRONIC MENTAL ILLNESS, IMMIGRATION, OR ALZHEIMER’S. WITH SENSITIVITY AND LUCIDIRY, BOSS EXPLORES THE RUMULRUOUS EMOTIONS STIRRED UP BY SUCH LOSSES, ESPECIALLY THE WIDE FLUSTUATION BETWEEN HOPE AND HOPELESSNESS. DRAWING ON HER RESEARCH AND CLINICAL EXPERIENCE, BOSS SUGGESTS STRATEGIES THAT CAN CUSHION THE PAIN AND OFFERS HEARTENING NARRATIVES OF THOSE WHO COPE WITH AMBIGUOUS LOSSES AND MANAGE TO MOVE ON. “A COMPASSIONATE EXPLOTATION OF THE EFFECTS OF AMBIGUOUS LOSS AND HOW THOSE EXPERIENCING IT HANDLE THIS MOST DEVAS TATING OF LOSSES... BOSS’S APPROACH IS TO ENCOURAGE FAMILIES TO TALK TOGETHER, TO REACH A CONSENSUS ABOUT HOW TO MOURN THAT WHICH HAS BEEN LOST AND HOW TO CELEBRATE THAT WHICH REMAINS. HER SIMPLE STORIES OF FAMILIES DOING JUST THAT CONTAIN LESSONS FOR ALL. INSIGHTFUL. PRACTICAL, AND REFRESHINGLY FREE OF PSYCHOBABBLE.’’ KIRKUS REVICTUS “COMBINING HER TALENTA AS A COMPASSIONATE FAMILY THERAPIST AND A CREATIVE RESEARCHER, PAULINE BOSS ELOQUENTLY SHOWS THE MANY AND COMPLEX WAYS THAT PEOPLE CAN COPE WITH THE INEVITABLE LOSSES IN CONTEMPORARY FAMILY LIFE. A WISE BOOK, AND CERTAIN TO BECOME A CLASSIC.’’ CONSTANCE R. AHRONS, AUTHOR OF THE GOOD DIVORCE PAULINE BOSS IS PROFESSOR OF FAMILY SOCIAL AT THE UNIVERSITY OF MINNESOTA, PAST PRESIDENT OF THE NATIONAL COUNCIL ON FAMILY RELATIONS, AND A PSYCHOTHERAPIST IN PRIVATE PRACTICE.
जीवन जगत असताना दु:ख आणि हानी कुणाच्या वाट्याला येत नाही? प्रत्येकाला ते भोगावंच लागतं. या हानीचे आणि दु:खाचेही कितीतरी प्रकार असतात. काही शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर त्रासदायक; तर काही निव्वळ शारीरिक वेदनेच्या रूपात. काही दु:खे तर अशी, की बराच काळ भोगून झाल्यानंतर माणसाला कळतं, की इतकी वर्ष आपण कोणत्या काळ्या छायेत वावरत आहोत ते! तोपर्यंत त्याच्या बऱ्याच किमती मोजून झालेल्या असतात! अशा या छुपेपणाने माणसाचं मन आणि जीवन ग्रासून टाकणा-या नकळत होणा-या, किती काळ भोगावं लागणार तेही नक्की नसलेल्या अटळ दु:खासंबंधी डॉ. पॉलिन बॉस या अमेरिकन विदुषीने अनेक वर्षं शोध अभ्यास केला. त्याचं फलित म्हणजे तिचा ‘AMBIGUOUS LOSS’चा शोध. या शोधबद्दल जनसामान्यांना सांगण्याच्या जिव्हाळ्यातून साकारलेलं हे सोप्या भाषेतलं पुस्तक. ‘LOSS’ म्हणजे काहीतरी गमावणं आणि ‘AMBIGUITY’ म्हणजे अनिश्चितता ही दोन्ही, माणसाच्या अनुभवाची प्रमुख अंगे आहेत. ‘AMBIGUOUS LOSS’ मध्ये ती सहजपणे एकमेकांत मिसळली जातात. प्रत्येकाला आयुष्यात केव्हा ना केव्हा ‘AMBIGUOUS LOSS’ अनुभवावा लागतो. त्यावेळेला काहीतरी निश्चित, स्पष्टपणे कळायला हवं, असं आपल्याला वाटत असतं. तसं नाही झालं, तर हे विचित्र, धूसर, उलगडा न होणारं नुकसान; हे दु:ख घेऊन जगावं तरी कसं? असा प्रश्न माणसांना अस्वस्थ करून सोडतो. आपल्या परीने शोधतांना, प्रत्येकाची उत्तरे वेगळीच येत असतात; पण ‘AMBIGUOUS LOSS’ पुस्तक वाचल्यानंतर येणारी उत्तरे ही प्रश्नांपेक्षा सोपी असतील एवढं निश्चित!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #AMBIGUOUSLOSS #AMBIGUOUSLOSS #अँबिग्युअसलॉस #FICTIONTRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUNANDAAMRAPURKAR #सुनंदाअमरापूरकर #DR.PAULINEBOSS
Customer Reviews
  • Rating Starसौ. शारदाताई दाते

    कालच आपले `अँबिग्युअस लॉस` हे अनुवादित पुस्तक वाचनात आले. खूप आवडले. एवढेच नव्हे तर मनाला एक वेगळेपण जाणवले. आपण खूप सुंदर अनुवाद केलेला आहे. मानवी मनाची रचना आणि जीवनातले भलेबुरे अनुभव जगभरातल्या माणसांच्या बाबतीत सारखेच असतात. माणसांची नावे बदलती, गावे बदलतील, विचार बदलतील, संस्कार बदलतील, पण येणारे भलेबुरे अनुभव सारखेच असतील. मानवी मनाची रचना ही खरोखरीच एकसारखी असते. मला हे अगदी तंतोतंत पटले. कोठेही जा पळसाला पाने तीन असे म्हणतात ते खरेच आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK GOADOOT 7-2-2010

    वर्षांनुवर्षे कुरतडत राहणारी आठवण, जीव जाळत राहणाऱ्या मानसिक व्यथा, दूरदेशी गेलेल्यांच्या आठवणी, जीवघेण्या आजारामुळे डोळ्यांसमोर दिसत असूनही वास्तवात हरवलेली नाती... अशा सर्व गोष्टींचा या यातना भोगणाऱ्या व्यक्तींवर कळत न कळत परिणाम होत असतो. वरवर सुवयवस्थित चाललेले जीवन कमतरतेच्या जाणिवेने पोखरत जाण्याची भावना त्या व्यक्तींमध्ये आढळते. तिचा केवळ त्या व्यक्तीवरच नव्हे तर कुटुंबातील इतर व्यक्तींवरही परिणाम होत राहतो. ते कुटुंब जर त्यातून सावरले नाही तर कुटुंब उद्धवस्तेकडे झुकते. कौटुंबिक सल्लागाराचे काम करणाऱ्या डॉ. पॉलिन बॉस यांना त्यांच्या बालपणापासूनच या प्रकारच्या कौटुंबिक प्रश्नांना सामोरे जावे लागले. त्यांची आजी मूळची स्वित्झर्लंडमधली. नवऱ्याबरोबर ती अमेरिकेत स्थलांतरित झाली. दशके लोटली तरी तिचे मन मायदेश आणि माहेरच्या नातेवाईकांपासून सुटू शकले नाही. घरच्या गरिबीमुळे एकदाही परत स्वित्झर्लंडला तिला जाता आले नाही. जन्मभर मुलांबाळात व संसारात राहूनही ती त्यात नसल्यासारखी होती. लेखिकेच्या आईला बालपणापासून स्वतःच्या विश्वात हरविलेल्या व मातृसुख देऊ न शकणाऱ्या आईला व नंतर झालेल्या भावंडांना सांभाळून घ्यावे लागले. स्वतःच्या घरातच अशा स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या संदिग्धतेच्या फेऱ्यात अडकलेल्या आजीच्या अनुभवाची पार्श्वभूमी लाभलेल्या लेखिकेने आपल्या आयुष्यात त्याच प्रकारच्या कौटुंबिक प्रश्नाचा अभ्यास करण्यास वाहून घेतले. या पुस्तकात वाहून गेलेल्या तीन मुलांच्या आठवणीने व्यावूâळ होऊन ४० वर्षांनंतर त्यांना परतीची हाक देणाऱ्या जोडप्याची व्यथा आहे. कायदा झुगारून रस्त्यावर उतरलेल्या व्हिएतनाममध्ये लुप्त झालेल्या अमेरिकेच्या सैनिकांच्या बायका आहेत, अलझायमर होऊन स्वतःचे व्यक्तिमत्व हरविलेल्या कुटुंबियांच्या नातेवाईकांच्या व्यथा आहेत, घटस्फोट झाल्यानंतरही सोडून गेलेल्या नवऱयांची घरगुती प्रश्नांमध्ये आधार घेणाऱ्या महिला आहेत. घटस्फोट व पुनर्विवाह केलेल्या जोडप्यांच्या मुलांच्या मानसिक कुतरओढीच्या समस्या आहेत, एकत्र कुटुंब पद्धतीतून एकाएकी वेगळ्या, छोट्या स्वकेंद्रित कुटुंब व्यवस्थेत गेलेल्यांच्या व्यथा आहेत. जीवनमान वाढल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्येला सामोरे जाण्यासाठी योग्य मनोभूमिका स्वीकारण्याचे मार्गदर्शनही या पुस्तकात मिळते. दुसरी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे अमेरिकेतील आदिवासी विशेषतः महिला या प्रकारच्या कौटुंबिक प्रश्नांना अधिक सकारात्मक मनोभूमिकेतून सामोरे जाताना दिसतात. ती ताकद खिश्चन कुटुंबात कमी दिसते. भारतातही यापुढे अशा द्विधा मनःस्थितीत असणाऱ्या लोकांची संख्या वाढणार आहे. तेव्हा त्यांच्या कुटुंबियांना मार्गदर्शक ठरेल असे हे पुस्तक आहे. त्यात दिलेली उत्तरे व मानसिक भूमिका आपल्या समाजालाही लागू होतील. ...Read more

  • Rating StarDAINIK SAGAR 15-3-2010

    न उमजलेलं दु:ख घेऊन जगायचं कसं, त्याची शिकवण ‘अँबिग्युअस लॉस’ असं या पुस्तकावर लिहिलंय. खऱ्या अर्थाने वाचकांना दु:ख घेऊन जगायचं कसं हे या पुस्तकातून कळतं. संशोधक म्हणून नावलौकिक असणाऱ्या डॉ. पॉलिन बॉस यांच्या पुस्तकाचा हा अनुवाद. त्यांनी अनिश्चित दु: घेऊन जी माणसे जगत आहेत, त्यांच्यावर उपचार करणारे आणि त्यांचे नातेवाईक यांनी त्या दु:खी माणसांना पूर्वस्थितीत कसे आणावे, याच्या काही पद्धती या पुस्तकात त्यांनी दिल्या आहेत, जे या पुस्तकाचे मुख्य सूत्र आहे. हे पुस्तक स्पॅनिश, जर्मन, मेनलँड, चायनीज, तैवान, चायनीज आणि जपानी भाषेत अनुवादित झाले आहे. सुनंदा अमरापूरकर यांनी मराठीत याचा अनुवाद करून मराठी वाचकांपर्यंत ही शिकवण पोहोचवली आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे मुखपृष्ठ लक्षवेधी ठरले आहे. काही शब्दांचे अर्थ वाचकांना उमजले नाहीत, तर त्याचे अर्थ सांगणाऱ्या टिपा शेवटच्या पानावर देण्यात आल्या आहेत. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 15-11-2009

    न उमजलेलं दु:ख घेऊन जगायचं कसं, त्याची शिकवण देणारं पुस्तक म्हणून ‘अँबिग्युअस लॉस’चा उल्लेख करण्यात आला आहे. डॉ. पॉलिन बॉस यांच्या या पुस्तकाचा अनुवाद सुनंदा अमपूरकर यांनी केला आहे. छुपेपणाने माणसाचं मन आणि जीवन ग्रासून टाकणाऱ्या, नकळत होणाऱ्या, कितीकाळ भोगावं लागणार तेही नक्की नसणाऱ्या, अटळ अशा दु:खासंबंधी डॉ. पॉलिन बॉस या अमेरिकन विदुषीने अनेक वर्षे संशोधन, अभ्यास केला. त्याचं फलित म्हणजे तिचा ‘अँबिग्युअस लॉस’चा शोध. या शोधाबद्दल जनसामान्यांना सांगण्याच्या जिव्हाळातून हे पुस्तक आकाराला आलं आहे. अत्यंत सोप्या भाषेत लिहिण्यात आलेल्या या पुस्तकाचा मराठी अनुवादही तेवढ्याच सोप्या पद्धतीने करण्यात आला आहे. ‘अँबिग्युइटी’ म्हणजे अनिश्चितता आणि लॉस म्हणजे काही तरी गमवाणं. अँबिग्युअस लॉस’ या नावामध्ये ती सहजपणे एकमेकांमध्ये मिसळली आहे. प्रत्येकाला आयुष्यात केव्हा ना केव्हा अँबिग्युअस लॉस अनुभवावा लागतो. त्यावेळी काही तरी निश्चित, स्पष्टपणे कळायला हवं, असं आपल्याला वाटत राहतं. तसं झालं नाही तर हे विचित्र, धूसर, उलगडा न झालेलं नुकसान, हे दु:ख घेऊन जगावं तरी कसं असा प्रश्न माणसांना अस्वस्थ करुन सोडतो. आपल्या परीने शोधताना प्रत्येकाची उत्तरं वेगळीच असतात. पण अँबिग्युअस लॉस पुस्तक वाचल्यानंतर येणारं उत्तरंही प्रश्नांपेक्षा सोपी वाटतात. हेच या पुस्तकाचं यश म्हणता येईल. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more