* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: EKDA VAGAR NA MINDA
  • Availability : Available
  • Translators : ANJANI NARAVANE
  • ISBN : 9788184982077
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : Translated From GUJRATI to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :DINKAR JOSHI COMBO BOOKS - 19 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
VRAJMOHAN, A VERY YOUNG MAN FROM A VILLAGE IN SAURASHTRA, COMES TO MUMBAI, IN SEARCH OF LIVELIHOOD. HE HAS NO ACQUAINTENCES, NO MONEY, NO PLACE TO STAY AND CAN AFFORD VERY LITTLE FOOD. THE ONLY PLUS POINT ARE HIS WILLINGNESS TO WORK EXTREMELY HARD, VERY HONEST NATURE AND AN INBORN SHREWD BUSINESS SENSE. STARTING ON THIS ‘CAPITAL’, WITHIN A FEW YEARS, VRAJMOHAN BECOMES SHETH VRAJMOHANDAS. HE NOW HAS MANY PLUS POINTS IN HIS LIFE A VERY CARING AND GOODNATURED WIFE, TWO CHILDREN VEENA & AVINASH AND OWNS THREE BIG BUSINESS FIRMS. BUT THERE IS ONE THING WHICH IS ALWAYS PRICKING HIS CONSCIENCE. UNKNOWN TO HIS WIFE, HE HAS GIVEN SOLACE AND SHELTER TO A SENSITIVE, GOOD HEARTED WOMAN, WHO HAS SUFFERED UNTOLD MISERY BECAUSE OF HER MAGNIFICENT BEAUTY. WHEN AVINASH GROWS UP, HE HURTS HIS FATHER’S FEELINGS BY CHEATING HIM AND LYING TO HIM, BECAUSE HE WANTS A LARGER SHARE OF THE FATHER’S ESTATE. THE HURT FATHER START WITHDRAWING HIMSELF FROM THE BUSINESS. THE FATHER AND SON HAVE DIFFERENT IDEAS ABOUT WHAT REAL HAPPINESS LIES IN. PRATEEP AND PURVI, WHO ARE THE CHILDREN OF AVINASH & RUPA, HAVE IDEAS ABOUT WEALTH AND MORALITY WHICH ARE IMMENSELY SHOCKING TO THEIR PARENTS ALSO. THEY DO NOT BELIEVE IN HAVING A SENSE OF MORALITY IN ORDER TO ACHIEVE HUGE FORTUNES. WHAT HAPPENS IN THE END? THE ZEROES GO ON INCREASING IN THE FIGURE OF WEALTH AS IT GROWS, BUT WHAT ABOUT THE NUMBER OF ONE, WHICH PRECEDES THE ZEROES? DO THE ZEROES MEAN ANYTHING IF THAT NUMBER VANISHES?
सौराष्ट्रातल्या एका खेड्यातून व्रजमोहन नावाचा एक अल्पवयीन तरुण नोकरीधंद्यांच्या शोधात मुंबईला येऊन पोचतो. कोणाची ओळखपाळख नाही. हातात पैसा नाही, खाण्यापिण्याची ददात, राहायला जागा नाही. जमेची बाजू एकच असते– अपार कष्ट करण्याची तयारी, प्रामाणिक स्वभाव आणि उपजत अशी असलेली धूर्त व्यापारी दृष्टी. एवढ्या भांडवलावर मिळेल ते काम करायला लागून थोड्याच वर्षात व्रजमोहनचे शेठ व्रजमोहनदास होतात. सालस, जीव लावणारी पत्नी, वीणा आणि अविनाश ही दोन अपत्यं आणि भरभराटीला आलेले दोनतीन मोठाले उद्योग या सर्व जमेच्या बाजू असल्या तरी एक बोच त्यांच्या मनात कायम असते. अप्रतिम रूपापायी दुर्भाग्यानं नरकात लोटल्या गेलेल्या एका भावनाशील हळव्या मनाच्या स्त्रीला आधार देऊन सुख देण्याचं पाप करून भोळ्याभाबड्या पत्नीशी केलेली प्रतारणा! अविनाश जास्त इस्टेट आपल्याला मिळावी म्हणून वडिलांशी खोटेपणानं वागून त्यांना दुखावतो, ते मनानं दुरावतात, हळूहळू धंद्यातून अंग काढून घेऊ लागतात. खरं सुख कशात आहे याबद्दलच्या बापलेकांच्या कल्पना वेगळ्या असतात! अविनाशची मुलं प्रतीप आणि पूर्वी यांच्या संपत्ती आणि नीतिमत्ता यांबद्दलच्या कल्पना आईवडिलांनाही प्रचंड धक्का देणाया असतात. त्यांच्या मते प्रचंड कमाई करणं हे एकमेव ध्येय गाठण्यासाठी सर्व नीतिमत्तेचं थोतांड झुगारून द्यावं! शेवटी काय होतं? जितकी संपत्ती जास्त, तितकी शून्यं वाढत जातात, पण या शून्यांच्या आधीचा जो एकाचा आकडा असतो, तोच नाहीसा झाला, तर काय अर्थ राहतो त्या शून्यांना?
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #ANKRAHITSHUNYANCHIBERIJ #RAMAYANATILPATRAVANDANA #ANJANINARAVANE
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more