* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TIMIRPANTHI
  • Availability : Available
  • Translators : SUSHMA SHALIGRAM
  • ISBN : 9789387789951
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 268
  • Language : Translated From GUJRATI to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :DHRUV BHATT COMBO SET - 7 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE NOVEL IS BASED ON A PARTICULAR TRIBE OF THIEVES-TIMIRAPANTHI. SATI IS THE TRIBAL GIRL AND A BORN ARTIST. SHE IS EXTREMELY CLEVER. THIS NOVEL REVOLVES AROUND HER. SHE HAS THE INBORN SKILLS OF A THIEF-PROFESSIONAL SKILLS COMBINED WITH UTTER CAUTION AND WISDOM. SHE IS FAIR LIKE HER MOTHER AND EXPERT LIKE HER FATHER. SHE IS INQUISITIVE AND HAS AN URGE TO EXCEL. SHE HAS PRESENCE OF MIND AND CAN THINK CALMLY IN DRASTIC SITUATION. SHE IS ABLE TO THINK INDEPENDENTLY. HER OPINIONS ARE BASED ON HER STRONG COMMON SENSE. SHE EXTENDS A HELPING HAND FOR THE ORPHAN CHILDREN OF HER TRIBE. SHE REALISES THE IMPORTANCE OF EDUCATION AND DECIDES TO GIVE THEM A STEADY, SAFE AND CULTURED LIFE. SHE BELIEVES IN EDUCATING THEM AT A TENDER AGE SO AS TO SHAPE THEM PROPERLY.
‘तिमिरपंथी’ ही कादंबरी चौर्य या कलेच्या आधारे आयुष्य कंठणाऱ्या जमातीतील कलाकारांवर बेतली आहे. पोटापाण्यासाठी गावोगावी वसती (दंगा) हलवणाऱ्या भटक्या जमातीतील मुख्यत्वे सती आणि तिच्या अनुषंगाने येणाNया व्याQक्तरेखांभोवती ही कादंबरी फिरते. ही सती उपजत कलाकार आहे. ‘ही’ कला अंगी घेऊनच ती जन्माला आली आहे. आईकडून गौरवर्णी लावण्य आणि पित्याकडून कामगिरीतलं कसब तिला लाभलं आहे. ती जिज्ञासू, चौकस आहे. धाडसी तर आहेच. समयसूचकता आणि प्रसंगावधानही तिच्याकडे आहे. ऐकलेल्या गोष्टींवर स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता तिच्यात आहे. तिची मतं तर्कसंगत असतात. वस्तीतल्या अपंग मुलीवर मायेचा पदर पसरणारा कनवाळूपणा तिच्यात आहे. शिक्षणाच्या अभावामुळे आपला समाज उपेक्षित आहे, शोषित आहे, भटका आहे, याची तिला जाणीव आहे. स्थिर समाजाच्या प्रवाहात येण्यासाठी संस्कारक्षम शैशवात शिक्षणाची रुजुवात व्हायला पाहिजे अशी तिची धारणा होते. अशा या सतीची कहाणी वाचूनच अनुभवायला हवी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#TIMIRPANTHI# DHRUV BHATT# SUSHMA SHALIGRAM# SATI (SARASWATI) # VITTHAL# RAGHU# TAPI# FOI# NANAKI AAJI# RADHI# TENDRA# VABI# BHAGA# PARMAR# KHATRI# RAMABEN# RASILAPEN# BHEDA# KOSHA# DANGA# PAL# SANDHI# DAFER# JARDA DAROGA# VIDYA# KAVERI# SHALA#तिमिरपंथी# ध्रुव भट्ट# सुषमा शाळिग्राम# सती (सरस्वती) # विठ्ठल# रघू# तापी# फोई# नानकी आजी# राधी# तेंद्रा# वस्याक# वाबी# भागा# झुंज्या# परमार# खत्री# रमाबेन# रसिलापेन# भेडा# कोशा# दंगा# पालं# अडोडिया# संधी# डफेर# जर्दा दरोगा# विद्या# कावेरी# शाळा...
Customer Reviews
  • Rating StarSandeep Jadhav

    एक वेगळीच दुनिया आणि वेगळीच दुनियादारी.....ध्रुव भट यांची आणखी एक उत्तम रचना...born criminals म्हणवल्या जाणाऱ्या लोकांकडे कला व विद्या या दृष्टिकोनातून पाहाताना आपण वेगळ्याच जगात जातो. प्राचीन भारतात कोणत्याही गोष्टीला विद्येचा दर्जा देऊन त्यात हि नीी तत्व सांभाळल्याने पिढ्या न पिढ्या तोच चालणार वारसा वावगा वाटत नाही..... ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS
FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS by PAULETTE BOURGEOIS Rating Star
रश्मी मुसळे-साळगांवकर

लहानग्यांच्या विश्वातल्या छोट्या छोट्या गमतीजमती या पुस्तकांच्या मालिकेतून अगदी मजेशीर पद्धतीने मुलांसमोर येतात..त्या गोष्टी ऐकताना, वाचताना मूलं यात अगदी रमून जातात... शिवाय आजवर ससा आणि कासव यांव्यतिरिक्त इतर कथाविश्वात काहीसा दुर्लक्षित राहिलेलया कासवाच्या जगातही अनेक गंमती घडू शकतात ही नवखी कल्पना मुलांना भारीच आवडते... ...Read more

MARATHI DAULATICHE NARI SHILP
MARATHI DAULATICHE NARI SHILP by GOPAL DESHMUKH Rating Star
लोकसत्ता २२ जानेवारी २०२३.

बाईचे विश्व हे चूल आणि मूल एवढय़ापुरतेच मर्यादित नसते याची उदाहरणे आपल्याला इतिहासातसुद्धा पाहायला मिळतात. इतिहासात डोकावून पाहिले तर स्त्रियांचे आयुष्य हजार बंधनांनी जखडलेले होते. लहान वयातच मुलींची लग्नं केली जात असत. सतीची चाल, विधवांना केशपनाची सक्ती, सती जाणाऱ्या स्त्रियांच्या मरणाइतकेच सती न जाणाऱ्या विधवांचे जगणे भयंकर होते. अशा समाजातच काही स्त्रिया अशासुद्धा होऊन गेल्या ज्यांनी आपल्या कार्याने, आपल्या धाडसाने, शौर्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची भर टाकली. समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशाच काही निवडक स्त्रियांचे चरित्र रेखाटन गोपाळ देशमुख यांनी ‘मराठी दौलतीचे नारी शिल्प’ या पुस्तकात केले आहे. जिजाऊमातेने बालशिवाजींची जडणघडण केली. अशा कर्तृत्ववान जिजाबाईंचे व्यक्तिचरित्र ‘राजमाता जिजाऊ’ या प्रकरणामध्ये सारांशरूपाने रेखाटण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. तसेच शिवरायांच्या जीवनात ज्या आठ राण्या आल्या त्यांच्या जीवनकार्याचे वर्णन ‘राणीवसा’ या प्रकरणात येते. ‘महाराणी येसूबाई’ या प्रकरणात त्यांची स्वराज्यनिष्ठा व दूरदृष्टी कशी दिसून येते याचे वर्णन केले आहे. संकटसमयी संभाजी राजांना दिलेल्या सल्ल्यामुळे त्यांच्या कार्यात मदत कशी झाली याचेही वर्णन आले आहे. ताराबाई, उमाबाई दाभाडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी युद्धभूमीवर शत्रूला तोंड कसे दिले. दर्याबाई निंबाळकर, पेशवा पत्नी गोपिकाबाई, रमाबाई, गंगाबाई यांनाही व्यक्तिगत सुखदु:खाबरोबरच मराठी दौलतीच्या वाटचालीत आपली भूमिका कशी पार पाडावी लागली याचीही माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. दौलतीचा कारभार करताना अहिल्याबाईंना तीस वर्षे वैयक्तिक दु:खांना सामोरे जावे लागले. या साऱ्या दु:खांना बाजूला सारून उत्कृष्ट कार्य करून त्या ‘साध्वी पुण्यश्लोक अहिल्या’ कशा झाल्या याचा थोडक्यात आढावा घेतला आहे ‘अहिल्याबाई होळकर’ या प्रकरणात. तसेच पुतळाबाई आणि रमाबाई यांचे पतिनिष्ठेचे वर्णनही वाचायला मिळते. या सर्व व्यक्तिचरित्रांपैकी ‘राणी लक्ष्मीबाई’ यांचे चरित्र वाचताना त्यांची धाडसी वृत्ती, चिकाटी, येईल त्या प्रसंगाला न घाबरता शौर्याने सामोरे जाण्याची वृत्ती व शेवटी त्यांचा झालेला शोकात्मक शेवट आपल्या मनाला चटका लावून गेल्याशिवाय राहात नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी गंगाधरराव यांच्याशी विवाह झाल्यानंतर आपल्या मुलाच्या आणि पतीच्या निधनानंतर शोक करत न बसता ही वीरांगना आपला दत्तक मुलगा दामोदर याला घेऊन ब्रिटिशांच्या कटू कारस्थानांना तोंड देण्यास सज्ज झाली होती. यातच तिला वीरमरण आले. हे वीरमरण येतानासुद्धा ती मोठय़ा शौर्याने अखेरच्या क्षणापर्यंत लढली आणि जेव्हा आपला देह आपल्याला साथ देत नाही हे लक्षात आले तेव्हा तिने आपल्या अनुयायांना आपला देह शत्रूच्या हातात पडता कामा नये, त्याला अग्नी द्या, असे सांगितले. अशा या वीरांगनेची गर्जना ‘मै मेरी झांसी नही दूंगी’ ही आजही अनेक स्त्रियांना आपल्या कामात प्रेरणा देणारी अशी आहे. राणी लक्ष्मीबाईच्या मरणाविषयी अनेक हकीकती उपलब्ध आहेत. त्यांचा उल्लेखही या पुस्तकात आला आहे. या पुस्तकातील स्त्रिया इतिहासकालीन असल्याने काही ठिकाणी ऐतिहासिक संदर्भाची पुनरावृत्ती झाल्यासारखे वाटते; पण ते येणेसुद्धा गरजेचे आहे. साध्या सोप्या भाषेत ही स्त्री चरित्रे आपल्याला वाचायला मिळतात. थोडक्यात असे म्हणता येईल की, इतिहासकाळातील थोर महिला विभूतींच्या जीवनकार्याचा अल्पांशाने सार वाचकांपुढे मांडण्याचा प्रयत्न लेखक गोपाळ देशमुख यांनी केला आहे, तो कौतुकास्पद आहे. ...Read more