* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: EUTHANASIA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184982145
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 232
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :SWATI CHANDORKAR COMBO SET - 18 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DR. GHAISAS SET UP A HOSPITAL AT A PLACE POORLY DEVELOPED THOUGH CLOSE TO MUMBAI A FEW DECADES AGO. HE SOON BECAME A WELL KNOWN FIGURE IN THE VICINITY AS A DOCTOR, AS A FATHERLY FIGURE, AND A PHILOSOPHER. HE LED AN UNHAPPY PERSONAL LIFE: HIS DAUGHTER HAD AN INTER RELIGIOUS MARRIAGE IN THE USA, AND HIS WIFE PASSED AWAY AS A RESULT OF THE SHOCK. DR. GHAISAS LED A LONELY LIFE. HE ADOPTED AN ORPHAN, LENT SUPPORT TO A YOUNG RAPE VICTIM AND ENCOURAGED THE TWO TO STUDY MEDICINE. HE RECEIVED A BOLT FROM THE BLUE WHEN HE CAME TO KNOW THAT HIS DAUGHTER AND HIS SON-IN-LAW MET WITH A FATAL ACCIDENT. HE NOW TOOK THE GRANDSON UNDER HIS WINGS. EUTHANASIA HAS ALWAYS BEEN A HOT TOPIC OF DEBATE. WHILE IN PRINCIPLE ONE MAY AGREE TO OBLIGE TO END THE LIFE OF A TERMINALLY ILL PERSON TO RELIEVE HIM OF LEADING A PAINFUL LIFE, THERE ARE ETHICAL, LEGAL AND PRACTICAL CONSTRAINTS IN PERMITTING EUTHANASIA. IT IS THUS UNEXPECTED THAT IN SPITE OF AN EXCELLENT PROFESSIONAL CAREER, A HOLISTIC VIEW TO LIFE AND FULL KNOWLEDGE OF THE FACT THAT THE LAW OF THE LAND DOES NOT PERMIT EUTHANASIA, DR. GHAISAS OCCASIONALLY ADVOCATES USE OF EUTHANASIA TO THOSE FOR WHOM LIFE WAS MEANINGLESS.
मृत्यू म्हटलं कि भय,दुःख,वेदना काही टाळत नाही. जगण्यावरन आरपार प्रेम, मोह सुटत नाही. `आयुष्य नको आता` अस म्हणणारी माणस जास्तीत जास्त काळ जगतात. हे अस चित्र सर्वत्र दिसत. विकलांग झालेली शरीरही घितपत पडतात. ते आंतर्मनाच्या जगण्याच्या हव्यासापोटीच. नकोसी झालेली हि शरीर, त्रास , अपमान सहन करतात आणि मग अशाना शांत-चित्त मरण हाच अशा विचाराना प्राधान्य दिल जात.... आपणहूनच निर्णय घेतला जातो. मुक्ती दिली जाते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#EUTHANASIA #SWATICHANDORKAR #MARATHIBOOKS #MEHTAPUBLISHINGHOUSE
Customer Reviews
  • Rating StarPratik Kambale

    या दिवसांत वाचलेलं दुसरं पुस्तक! मुळात विषयच वेगळा असल्याने मन कथेत गुंतून राहतं. उगाचचा अतिरंजितपणा नाही. दयामरण असावं की नसावं? या प्रश्नाचं उत्तर शोधताना जो प्रवास घडतो, तो प्रवास म्हणजे #युथनेशिया. Swati Chandorkar यांचं वाचनात आलेलं हे पहिलंच पस्तक. विविध नात्यांबद्दल त्यांच्या संकल्पना, त्यांची वास्तविकता अगदी स्पष्ट आहे. खरंच! नाती ही आपुलकीवर टिकतात. रक्त वगैरे सगळ्या बाबी गौण आहेत. रक्ताची नाती फक्त वारसा सांगण्यासाठीच असावीत कदाचित. कदाचित एवढ्यासाठीच म्हंटल, कारण. सगळीच रक्ताची नातीदेखील स्वार्थाने ओतप्रेत भरलेली नसतात. ❤️ ...Read more

  • Rating StarSuneeta Joshi

    दयामरण किंवा इच्छामरण हे शब्द आपल्याला नविन नाहीत.तरीही या शब्दामागे एक गूढता आहे.याचा उघडपणे कोणत्याही डॉक्टर नी पुरस्कार केलेला नाही,किंवा कितीही पटत असले तरी ते व्यक्त करू शकत नाहीत असे वाटते,कारण डॉक्टर हे जीव वाचवण्यासाठी असतात,कोणालाही ते जाणूनबुजून मृत्यू देऊ शकत नाहीत.... याच नैतिक तत्त्वावर अवलंबून असणारी ," युथेनेशिया" ही स्वाती चांदोरकर यांची हृदयस्पर्शी कादंबरी वाचली. यात dr.घैसास यांच्या बरोबरच त्यांचे कुटुंबीय,त्यांचे सहकारी,त्यांचा दत्तक मुलगा आणि त्यांचा सख्खा नातू ह्यांच्यातील अनेक ताने बाणे सुंदर रित्या गुंफले आहेत. मला स्वतः ला ही कादंबरी खूप पटली आहे,तुम्हालाही नक्कीच पटेल.अवश्य वाचा....! ...Read more

  • Rating StarDAINIK PUNYANAGARI 13-03-2011

    ‘युथनेशिया’च्या निमित्ताने… अरुणा शानबाग या परिचारिकेला गेली ३७ वर्षे अंथरुणाला खिळून रहावे लागले आहे. तिच्या दयामरणाचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच स्वाती चांदोरकरलिखित ‘युथनेशिया’ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. या कादंबरीत लेखिकेने दयामरणाचा मुद्दा कथमध्ये गुंफून प्रभावीपणे मांडला आहे. गेल्या आठवड्यात अरुणा शानबागच्या निमित्ताने दयामरण आणि इच्छामरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. याच काळात प्रसिद्ध कथाकार व. पु. काळे यांच्या कन्या स्वाती चांदोरकर यांनी लिहिलेली ‘युथनेशिया’ ही कादंबरीही दयामरणाच्याच प्रश्नावर बेतली आहे. पण, अरुणा शानबागच्या प्रश्नावर चर्चा सुरू होण्यापूर्वीच ही कादंबरी लिहून पूर्ण झाली होती. सुमारे दोन-अडीच वर्षांपूर्वीच स्वाती चांदोरकर यांनी ही कादंबरी लिहायला घेतली होती. या कादंबरीतील नायक डॉ. घैसास हे जगणे नको असल्या रुग्णांना दयामरण देऊन त्यांची सुटका करतात. इच्छामरण मागणे हे रुग्णाच्या हातात असते. कारण हा रुग्ण अंथरुणावर खितपत पडला असला तरी तो कोमात गेलेला नसतो. त्याची विचार करण्याची क्षमता आणि काही वेळा बोलणेही सुरू असते. आपण या आजारातून बरे होणे तर दूरच पण यापुढेही असेच अंथरुणाला खिळून राहू, सगळ्या उपचारांचा आणि व्याधीचा शरीराला त्रास होईलच पण आपली सेवा करणाऱ्यांनाही त्याचा त्रास होईल असे विचार त्या रुग्णाच्या मनात येत असतात. संपूर्ण आयुष्य सन्मानाने जगलेल्या या रुग्णाला आयुष्याच्या अखेरीस संपूर्ण परावलंबित्व पत्करणे मान्य होत नाही. त्यामुळे अशा रुग्णाने इच्छामरणाची मागणी केल्यास त्याला ते देता येते. परंतु कोमात गेलेल्या, सर्व भावना आणि संवेदना नष्ट झालेल्या रुग्णाला दयामरण देण्याचा निर्णय नातेवाईक आणि डॉक्टरांनाच घ्यावा लागतो. अशा वेळी रुग्णाच्या संपूर्ण परिस्थितीचे अवलोकन करून घेणे, रुग्णाची आणि नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती, रुग्णालयातून घरी नेल्यानंतर नातेवाईकांकडून होऊ शकणारा सांभाळ, रुग्ण बरा होण्याची शक्यता अशा सर्व गोष्टींचा सारासार विचार करून हा निर्णय घ्यावा लागतो. अनेकदा अशा रुग्णाला दयामरण दिल्याने त्याच्या नातेवाईकांच्या मनातही तो सुटल्याचीच भावना निर्माण होते. स्वाती चांदोरकर यांच्या युथनेशियाचा नायक रुग्णांच्या आणि नातेवाईकांच्या हालअपेष्टा कमी होण्यासाठी दयामरण देतो. पण, समाजविघातक प्रवृत्तींकडून त्याचा गैरवापरही केला जातो. ही कादंबरी सत्य परिस्थितीवर आधारित असली तरी त्यातील पात्रे आणि घटना काल्पनिक आहेत. या कादंबरीबद्दल बोलताना स्वाती चांदोरकर म्हणता, ‘कादंबरीतील पात्रे मला प्रत्यक्षात जशीच्या तशी भेटली नाहीत. पण, आपल्यावर चारही बाजूंनी सतत अशा प्रकारच्या बातम्यांचे ‘हॅमरिंग’ सुरू असते. कादंबरीत घडणाऱ्या घटना कोणाच्याही आयुष्यात घडू शकतात. अशाच कोणाच्याही आयुष्यात घडू शकणाऱ्या सत्य घटनांचे आणि काही काल्पनिक घटनांचे ‘कोलाज’ या कादंबरीत दिसते.’ चांदोरकर यांच्या आई अशाच खितपत पडल्या होत्या. त्या कोणाला ओळखतही नव्हत्या. केवळ हृदय सुरू आहे म्हणून त्या जिवंत आहेत अशीच परिस्थिती होती. त्यावेळी आईच्या शरीराला यातना होण्यापेक्षा ती यातून सुटली तर अधिक बरे होईल असा विचार लेखिकेच्या मनात कित्येकदा यायचा. धडधाकट असताना संपूर्ण कुटुंबाला आधार देणाऱ्या आईची ही अवस्था त्यांना पाहवत नव्हती. रस्त्यावरून चालताना अनेक भिकारी दिसतात. परंतु, त्यातील एक भिकारी लेखिकेच्या विशेष लक्षात राहिला. हा भिकारी अतिशय लाचार अवस्थेत जगत होता. इतरही काही उदाहरणे त्यांच्यासमोर होती. अशा व्यक्तींना यातनांमधून सोडवण्यासाठी दयामरणाचा मार्ग योग्य असल्याचे त्यांना जाणवले आणि यातूनच युथनेशियाने आकार घेतला. खरे तर सुरुवातीला या लोकांना योग्य उपचार कसे मिळतील असा विचार त्यांच्या मनात आला होता आणि त्यावरच कादंबरीचे लेखन सुरू झाले होते. परंतु हळूहळू हा विषय विस्तारत गेला आणि पुन्हा स्वत:च्या पायावर उभे राहू न शकणाऱ्या मरणासन्न रुग्णांना दयामरण कसे देता येईल या विचाराच्या दिशेने कादंबरीचा प्रवास सुरू झाला. दयामरण देण्यासाठी नातेवाईकांबरोबरच डॉक्टरांच्याही मनाची तयारी व्हावी लागते. तशी मनोवृत्ती तयार होणे सोपे नाही. दयामरण देणारा डॉक्टर अतिशय खंबीर असावा लागतो. यातूनच मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजन प्रभू यांची भेट घेऊन लेखिकेने यातील मानसिक आंदोलनांचा अभ्यास केला. शिवाय इतरही अनेक डॉक्टरांशी बोलून या प्रकरणातील तात्त्विक आणि वैद्यकीय बाबी समजून घेतल्या. या सर्वांशी बोलल्यानंतर त्यांच्या काही संकल्पना बदलून विचार अगदी प्रगल्भ झाले आणि त्यांचा कथेच्या प्रवासावरही परिणाम झाला. इच्छामरण आणि दयामरणात परिस्थितीचा फायदा उठवणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तींचे हितसंबंध गुंतलेले असू शकतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने धडधाकट असतानाच अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आपल्याला दयामरण द्यावे असे सर्वांसमक्ष लिहून ठेवायला हवे. लेखिकेने तसे स्वत:च्या बाबतीत लिहून ठेवले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो