* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: EUTHANASIA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184982145
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 232
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :SWATI CHANDORKAR COMBO SET-15 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DR. GHAISAS SET UP A HOSPITAL AT A PLACE POORLY DEVELOPED THOUGH CLOSE TO MUMBAI A FEW DECADES AGO. HE SOON BECAME A WELL KNOWN FIGURE IN THE VICINITY AS A DOCTOR, AS A FATHERLY FIGURE, AND A PHILOSOPHER. HE LED AN UNHAPPY PERSONAL LIFE: HIS DAUGHTER HAD AN INTER RELIGIOUS MARRIAGE IN THE USA, AND HIS WIFE PASSED AWAY AS A RESULT OF THE SHOCK. DR. GHAISAS LED A LONELY LIFE. HE ADOPTED AN ORPHAN, LENT SUPPORT TO A YOUNG RAPE VICTIM AND ENCOURAGED THE TWO TO STUDY MEDICINE. HE RECEIVED A BOLT FROM THE BLUE WHEN HE CAME TO KNOW THAT HIS DAUGHTER AND HIS SON-IN-LAW MET WITH A FATAL ACCIDENT. HE NOW TOOK THE GRANDSON UNDER HIS WINGS. EUTHANASIA HAS ALWAYS BEEN A HOT TOPIC OF DEBATE. WHILE IN PRINCIPLE ONE MAY AGREE TO OBLIGE TO END THE LIFE OF A TERMINALLY ILL PERSON TO RELIEVE HIM OF LEADING A PAINFUL LIFE, THERE ARE ETHICAL, LEGAL AND PRACTICAL CONSTRAINTS IN PERMITTING EUTHANASIA. IT IS THUS UNEXPECTED THAT IN SPITE OF AN EXCELLENT PROFESSIONAL CAREER, A HOLISTIC VIEW TO LIFE AND FULL KNOWLEDGE OF THE FACT THAT THE LAW OF THE LAND DOES NOT PERMIT EUTHANASIA, DR. GHAISAS OCCASIONALLY ADVOCATES USE OF EUTHANASIA TO THOSE FOR WHOM LIFE WAS MEANINGLESS.
मृत्यू म्हटलं कि भय,दुःख,वेदना काही टाळत नाही. जगण्यावरन आरपार प्रेम, मोह सुटत नाही. `आयुष्य नको आता` अस म्हणणारी माणस जास्तीत जास्त काळ जगतात. हे अस चित्र सर्वत्र दिसत. विकलांग झालेली शरीरही घितपत पडतात. ते आंतर्मनाच्या जगण्याच्या हव्यासापोटीच. नकोसी झालेली हि शरीर, त्रास , अपमान सहन करतात आणि मग अशाना शांत-चित्त मरण हाच अशा विचाराना प्राधान्य दिल जात.... आपणहूनच निर्णय घेतला जातो. मुक्ती दिली जाते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#EUTHANASIA #SWATICHANDORKAR #MARATHIBOOKS #MEHTAPUBLISHINGHOUSE
Customer Reviews
  • Rating StarPratik Kambale

    या दिवसांत वाचलेलं दुसरं पुस्तक! मुळात विषयच वेगळा असल्याने मन कथेत गुंतून राहतं. उगाचचा अतिरंजितपणा नाही. दयामरण असावं की नसावं? या प्रश्नाचं उत्तर शोधताना जो प्रवास घडतो, तो प्रवास म्हणजे #युथनेशिया. Swati Chandorkar यांचं वाचनात आलेलं हे पहिलंच पस्तक. विविध नात्यांबद्दल त्यांच्या संकल्पना, त्यांची वास्तविकता अगदी स्पष्ट आहे. खरंच! नाती ही आपुलकीवर टिकतात. रक्त वगैरे सगळ्या बाबी गौण आहेत. रक्ताची नाती फक्त वारसा सांगण्यासाठीच असावीत कदाचित. कदाचित एवढ्यासाठीच म्हंटल, कारण. सगळीच रक्ताची नातीदेखील स्वार्थाने ओतप्रेत भरलेली नसतात. ❤️ ...Read more

  • Rating StarSuneeta Joshi

    दयामरण किंवा इच्छामरण हे शब्द आपल्याला नविन नाहीत.तरीही या शब्दामागे एक गूढता आहे.याचा उघडपणे कोणत्याही डॉक्टर नी पुरस्कार केलेला नाही,किंवा कितीही पटत असले तरी ते व्यक्त करू शकत नाहीत असे वाटते,कारण डॉक्टर हे जीव वाचवण्यासाठी असतात,कोणालाही ते जाणूनबुजून मृत्यू देऊ शकत नाहीत.... याच नैतिक तत्त्वावर अवलंबून असणारी ," युथेनेशिया" ही स्वाती चांदोरकर यांची हृदयस्पर्शी कादंबरी वाचली. यात dr.घैसास यांच्या बरोबरच त्यांचे कुटुंबीय,त्यांचे सहकारी,त्यांचा दत्तक मुलगा आणि त्यांचा सख्खा नातू ह्यांच्यातील अनेक ताने बाणे सुंदर रित्या गुंफले आहेत. मला स्वतः ला ही कादंबरी खूप पटली आहे,तुम्हालाही नक्कीच पटेल.अवश्य वाचा....! ...Read more

  • Rating StarDAINIK PUNYANAGARI 13-03-2011

    ‘युथनेशिया’च्या निमित्ताने… अरुणा शानबाग या परिचारिकेला गेली ३७ वर्षे अंथरुणाला खिळून रहावे लागले आहे. तिच्या दयामरणाचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच स्वाती चांदोरकरलिखित ‘युथनेशिया’ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. या कादंबरीत लेखिकेने दयामरणाचा मुद्दा कथमध्ये गुंफून प्रभावीपणे मांडला आहे. गेल्या आठवड्यात अरुणा शानबागच्या निमित्ताने दयामरण आणि इच्छामरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. याच काळात प्रसिद्ध कथाकार व. पु. काळे यांच्या कन्या स्वाती चांदोरकर यांनी लिहिलेली ‘युथनेशिया’ ही कादंबरीही दयामरणाच्याच प्रश्नावर बेतली आहे. पण, अरुणा शानबागच्या प्रश्नावर चर्चा सुरू होण्यापूर्वीच ही कादंबरी लिहून पूर्ण झाली होती. सुमारे दोन-अडीच वर्षांपूर्वीच स्वाती चांदोरकर यांनी ही कादंबरी लिहायला घेतली होती. या कादंबरीतील नायक डॉ. घैसास हे जगणे नको असल्या रुग्णांना दयामरण देऊन त्यांची सुटका करतात. इच्छामरण मागणे हे रुग्णाच्या हातात असते. कारण हा रुग्ण अंथरुणावर खितपत पडला असला तरी तो कोमात गेलेला नसतो. त्याची विचार करण्याची क्षमता आणि काही वेळा बोलणेही सुरू असते. आपण या आजारातून बरे होणे तर दूरच पण यापुढेही असेच अंथरुणाला खिळून राहू, सगळ्या उपचारांचा आणि व्याधीचा शरीराला त्रास होईलच पण आपली सेवा करणाऱ्यांनाही त्याचा त्रास होईल असे विचार त्या रुग्णाच्या मनात येत असतात. संपूर्ण आयुष्य सन्मानाने जगलेल्या या रुग्णाला आयुष्याच्या अखेरीस संपूर्ण परावलंबित्व पत्करणे मान्य होत नाही. त्यामुळे अशा रुग्णाने इच्छामरणाची मागणी केल्यास त्याला ते देता येते. परंतु कोमात गेलेल्या, सर्व भावना आणि संवेदना नष्ट झालेल्या रुग्णाला दयामरण देण्याचा निर्णय नातेवाईक आणि डॉक्टरांनाच घ्यावा लागतो. अशा वेळी रुग्णाच्या संपूर्ण परिस्थितीचे अवलोकन करून घेणे, रुग्णाची आणि नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती, रुग्णालयातून घरी नेल्यानंतर नातेवाईकांकडून होऊ शकणारा सांभाळ, रुग्ण बरा होण्याची शक्यता अशा सर्व गोष्टींचा सारासार विचार करून हा निर्णय घ्यावा लागतो. अनेकदा अशा रुग्णाला दयामरण दिल्याने त्याच्या नातेवाईकांच्या मनातही तो सुटल्याचीच भावना निर्माण होते. स्वाती चांदोरकर यांच्या युथनेशियाचा नायक रुग्णांच्या आणि नातेवाईकांच्या हालअपेष्टा कमी होण्यासाठी दयामरण देतो. पण, समाजविघातक प्रवृत्तींकडून त्याचा गैरवापरही केला जातो. ही कादंबरी सत्य परिस्थितीवर आधारित असली तरी त्यातील पात्रे आणि घटना काल्पनिक आहेत. या कादंबरीबद्दल बोलताना स्वाती चांदोरकर म्हणता, ‘कादंबरीतील पात्रे मला प्रत्यक्षात जशीच्या तशी भेटली नाहीत. पण, आपल्यावर चारही बाजूंनी सतत अशा प्रकारच्या बातम्यांचे ‘हॅमरिंग’ सुरू असते. कादंबरीत घडणाऱ्या घटना कोणाच्याही आयुष्यात घडू शकतात. अशाच कोणाच्याही आयुष्यात घडू शकणाऱ्या सत्य घटनांचे आणि काही काल्पनिक घटनांचे ‘कोलाज’ या कादंबरीत दिसते.’ चांदोरकर यांच्या आई अशाच खितपत पडल्या होत्या. त्या कोणाला ओळखतही नव्हत्या. केवळ हृदय सुरू आहे म्हणून त्या जिवंत आहेत अशीच परिस्थिती होती. त्यावेळी आईच्या शरीराला यातना होण्यापेक्षा ती यातून सुटली तर अधिक बरे होईल असा विचार लेखिकेच्या मनात कित्येकदा यायचा. धडधाकट असताना संपूर्ण कुटुंबाला आधार देणाऱ्या आईची ही अवस्था त्यांना पाहवत नव्हती. रस्त्यावरून चालताना अनेक भिकारी दिसतात. परंतु, त्यातील एक भिकारी लेखिकेच्या विशेष लक्षात राहिला. हा भिकारी अतिशय लाचार अवस्थेत जगत होता. इतरही काही उदाहरणे त्यांच्यासमोर होती. अशा व्यक्तींना यातनांमधून सोडवण्यासाठी दयामरणाचा मार्ग योग्य असल्याचे त्यांना जाणवले आणि यातूनच युथनेशियाने आकार घेतला. खरे तर सुरुवातीला या लोकांना योग्य उपचार कसे मिळतील असा विचार त्यांच्या मनात आला होता आणि त्यावरच कादंबरीचे लेखन सुरू झाले होते. परंतु हळूहळू हा विषय विस्तारत गेला आणि पुन्हा स्वत:च्या पायावर उभे राहू न शकणाऱ्या मरणासन्न रुग्णांना दयामरण कसे देता येईल या विचाराच्या दिशेने कादंबरीचा प्रवास सुरू झाला. दयामरण देण्यासाठी नातेवाईकांबरोबरच डॉक्टरांच्याही मनाची तयारी व्हावी लागते. तशी मनोवृत्ती तयार होणे सोपे नाही. दयामरण देणारा डॉक्टर अतिशय खंबीर असावा लागतो. यातूनच मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजन प्रभू यांची भेट घेऊन लेखिकेने यातील मानसिक आंदोलनांचा अभ्यास केला. शिवाय इतरही अनेक डॉक्टरांशी बोलून या प्रकरणातील तात्त्विक आणि वैद्यकीय बाबी समजून घेतल्या. या सर्वांशी बोलल्यानंतर त्यांच्या काही संकल्पना बदलून विचार अगदी प्रगल्भ झाले आणि त्यांचा कथेच्या प्रवासावरही परिणाम झाला. इच्छामरण आणि दयामरणात परिस्थितीचा फायदा उठवणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तींचे हितसंबंध गुंतलेले असू शकतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने धडधाकट असतानाच अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आपल्याला दयामरण द्यावे असे सर्वांसमक्ष लिहून ठेवायला हवे. लेखिकेने तसे स्वत:च्या बाबतीत लिहून ठेवले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more