* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KRUSHNAYAN
  • Availability : Available
  • Translators : SUDHIR KAUTHALKAR
  • ISBN : 9788184982619
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 222
  • Language : TRANSLATED FROM GUJARATI TO MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AWESOME STORY OF GOD IN THE DISGUISE OF A HUMAN BEING: KRISHNA WAS LYING BENEATH THE HUGE TREE OF ASHWATTHA. HE HAD JUST ONE LAST QUESTION IN HIS MIND; ‘WHY IS THAT ALL THE WOMEN THINK ALIKE?’ HE HAD MANY THOUGHTS LINGERING IN HIS MIND, MANY INCIDENCES BEFORE HIS EYELIDS CLOSED GENTLY. BE IT ANY AGE, ANY ERA, ANY AGE, WOMEN ALWAYS THINK LIKEWISE. IT IS REALLY BEYOND ANYONE’S UNDERSTANDING TO FIND OUT THE CAUSE AND EFFECT OF THEIR BEHAVIOUR. WOMEN EXPERIENCE THINGS ALIKE, AGONY ALIKE, ANGER ALIKE TOO. THE WAY THEY REFLECT THEIR ANGER IS ALSO VERY TYPICAL. ALL THESE THOUGHTS MADE KRISHNA SMILE FOR A MOMENT. HE WAS SUFFERING FROM IMMENSE PAIN. HE WAS SHOT BY THE HUNTER. KRISHNA KNEW THAT THESE WERE HIS VERY FEW LAST HOURS IN THE FORM OF A HUMAN. IT WAS TIME TO LEAVE THE MORTAL BODY. HE HAD LIVED HIS LIFE FULLY, AS DESTINED. HE WAS PONDERING OVER THE MANY INCIDENCES THAT HAD TAKEN PLACE IN HIS LIFE. DURING THESE LAST FEW HOURS, HE HAD THOUGHTS OF ONLY THREE WOMEN, RADHA, RUKHMINI AND DRUAPADI. THEY WERE TIED UP TO HIM WITH A SEPARATE BOND EACH. ONE WAS HIS LOVER, ONE WAS HIS WIFE AND ONE WAS HIS FRIEND. EACH ONE HAD AN INTIMATE RELATIONSHIP WITH HIM. THEY ALL WERE UNIQUE YET COUNTERPARTS OF EACH OTHER. ONLY THEY HAD THE POWER TO CAPTIVATE KRISHNA. THEY HAD THE POWER TO MAKE HIM LINGER BEFORE LEAVING HIS MORTAL BODY. HE LINGERS AND HELPS THEM TO SET HIM FREE FROM THEIR BONDS, FOREVER…
‘‘स्त्रिया एकमेकींपेक्षा वेगळ्या का बरं नसतात....?’’ अश्वत्थाखाली बसलेल्या कृष्णाच्या मनात द्रौपदीच्या महालात घडलेली घटना डोळ्यांसमोर येऊन, अनेक विचार येत होते.... ‘‘कोणत्याही युगात, कोणत्याही वयाची स्त्री का बरं एकसारखाच विचार करते? एकसारखाच अनुभव घेते? समान बाबतीत वेदना अनुभवते? का बरं एकसारख्या गोष्टीबद्दल रागावते? राग व्यक्त करण्याची रीत पण का बरं एकसारखीच असते....?’’ कृष्णाच्या मनात प्रश्न आले आणि त्यावर तो स्वत:च हसलाही. या प्रश्नांना आता काही अर्थ होता का? आयुष्य जगून झालं होतं... ‘‘आपल्या जीवनात आलेल्या महत्त्वाच्या तीनही स्त्रिया आपल्याबद्दल का बरं एकसारख्याच संवेदना अनुभवत होत्या? का बरं एकाच पध्दतीनं दुःखी होत होत्या? आणि का एकसारख्याच तीव्रतेनं आपल्यावर प्रेम करत होत्या?...’’ खरं तर असा विचार करण्याची वेळही आता निघून गेली होती. आता होतं ते... केवळ स्मरण...! प्रत्यक्ष दृष्टीसमोर त्या स्त्रिया नव्हत्याच. तरीही त्या तिघींचे डोळे त्याच्याकडे बघत होते... आशेनं, अपेक्षेनं, उपहासानं आणि ... निखळ प्रेमानंही! तीन नद्यांचा प्रवाह मिळून त्याच्या दृष्टीसमोरुन सागराकडे जात होता. लाटांवर खाली-वर नाचणारे प्रकाश किरण जणू अस्पष्ट रेषांद्वारा त्या तिन्ही स्त्रियांचे चेहरे चितारीत होते.... प्रेयसी... पत्नी... आणि सखी... त्या तिघी जणी... खळाळणा-या प्रवाहाबरोबर वाहात जणू म्हणत होत्या... ‘‘तुझ्यात विलीन होण्यातच आमच्या जीवनाचं सार्थक आहे. तुझा खारटपणा स्वीकार्य आहे. कारण तूच आम्हाला विशालता दिलीस, अमर्याद पसरण्याचा तो अस्तित्वबोधही तूच दिलास... आमचं प्रखर तेज सामावून घेऊन आम्हाला शीतलता दिलीस तू... आमचं स्त्रीत्व स्वीकारून अखंड प्रेम दिलंस तू....’’

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KRUSHNAYAN #KRUSHNAYAN #कृष्णायन #FICTION #TRANSLATEDFROMGUJRATITOMARATHI #SUDHIRKAUTHALKAR #KAAJALOZAVAIDYA "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 25-12-2011

    काजल ओझा -वैद्य ज्येष्ठ गुजराथी लेखिका. साहित्य क्षेत्रात त्यांनी बराच लौकिक मिळविला आहे. त्यांनी `योग वियोग’, `राग-अनुराग’, मध्यबिंदू या कादंबऱ्या हातावेगळ्या केल्या आहेत. या साहित्यकृतीने साहित्यात मोलाची भर पडली आहे. प्रा. सुधीर कौठाळकर यांनीत्यांच्या `कृष्णायन’ या गुजराती कादंबरीच्या मूळ कथेला न दुखविता इमान राखून मराठीत स्वैर अनुवाद केला आहे. रामायण आणि महाभारत हे जगातील दोन महान काव्यग्रंथ. महाभारतात जे आहे ते सर्वत्र आहे व जे नाही ते अन्यत्र कोठेही नाही. या महाभारताचा नायक भगवान श्रीकृष्ण. गीतेत गुरु म्हणून तर भागवतात दैवी स्वरुपात दिसतो. हा देवावतार सर्वत्र व्यापून राहिला आहे. कुरुक्षेत्रावर कौरव-पांडवांचे घनघोर युद्ध झाले. सारे कौरव मृत्युमुखी पडले. गांधारीला शोक आवरला नाही. तिने कृष्णाला शाप दिला, `पशुच्या मरणानं मरशील तू... एकटा... असहाय, व्यथित... तुझ्या कुळाचा विनाश. स्वजन, पुत्र-पौत्र... तडफडून तडफडून मरण पावतील!’ हा शाप सत्य ठरला. कौरव पापी, पांडव पुण्यवान. पण यादव कुळही उन्मत्त झाले. मद्यपानमुळे साधू संतांची कुचेष्टा करु लागले. कृष्णाने स्वत:च्या डोळ्यांनी हे पाहिले. विनाश अटळ ठरला. कृष्ण हा एक मानव. तो एक पुरुष. पूर्ण पुरुष!! या युगंधराला मरण समाधीचे. पण ??? न येता त्याला मरण आले एका सामान्य माणसासारखं विजनात! एका अश्वत्थ वृक्षाखाली न झोपलेल्या, न बसलेल्या स्थितीत! जरा नावाच्या एका पारध्याचा बाण पायाच्या अंगठ्याला लागला. हे सारे वर्णन लेखकाने अतिशय समर्पक, रोचक व यथायोग्य शब्दात केले आहे. त्यांची भाषा प्रवाही, ओघवती आहे आणि खऱ्या अर्थाने इथूनच कादंबरीची सुरुवात होते. श्रीकृष्ण मुलगा, सवंगडी, भाऊ, वादक, प्रियकर, योद्धा, पती, राजा, राजकारणपटू वक्ता, तत्त्वज्ञ या साऱ्या भूमिकेत अपरंपार रस ओतला. शेवटी याला साऱ्यांची परमाधी साधा माणूस म्हणून मरण पत्करण्याचा योगायोग आला. मेघासारखा रिता होऊन तो गेला. कृष्णाचे तर काय राहिले फक्त जळत्या कापराचा वास! हे सारे कादंबरीकाराने परिणामकारकरित्या वर्णले आहे. कृष्णाच्या महानिर्वाण वेळी त्याच्या डोळ्यासमोर अनेक गतकालाचे प्रसंग, घटना, महान व्यक्ती उभ्या राहिल्या. त्यांच्याशी कृष्णाचा सुसंवाद झाला. तो अतिशय उत्तम साधला आहे. हीच एक भावुक कथा, दीर्घ कथा, नव्हे कादंबरीच! म्हणजेच कृष्णायन! राधा, रुक्मिणी व द्रौपदी या कृष्ण जीवनात अत्यंत प्रिय स्त्रिया. या तिघींचे चेहरे एकमेकांत मिसळून आर्द्र बनून कृष्णाच्या डोळ्यात तरळत होते. अर्जुन, उध्दव, दारुक, यशोदामाता हेही चुकले नव्हते. याचं सांत्वन कृष्णाने अतिशय सुंदर शब्दात केले आहे. हे लेखकाचे कौशल्य आहे. कादंबरीकार हा तत्त्वज्ञ, कवी, शास्त्रज्ञ यांच्याहून श्रेष्ठ असतो. कारण बाकीच्या सर्वांना मानवी जीवनाच्या एकेका अंगाचे दर्शन झालेले असते. परंतु कादंबरीकार मात्र समग्र जीवनाचा वेध घेऊ शकतो. यात कौठाळकर यशस्वी झाले आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more