* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KRUSHNAYAN
  • Availability : Available
  • Translators : SUDHIR KAUTHALKAR
  • ISBN : 9788184982619
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 222
  • Language : Translated From GUJRATI to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AWESOME STORY OF GOD IN THE DISGUISE OF A HUMAN BEING: KRISHNA WAS LYING BENEATH THE HUGE TREE OF ASHWATTHA. HE HAD JUST ONE LAST QUESTION IN HIS MIND; ‘WHY IS THAT ALL THE WOMEN THINK ALIKE?’ HE HAD MANY THOUGHTS LINGERING IN HIS MIND, MANY INCIDENCES BEFORE HIS EYELIDS CLOSED GENTLY. BE IT ANY AGE, ANY ERA, ANY AGE, WOMEN ALWAYS THINK LIKEWISE. IT IS REALLY BEYOND ANYONE’S UNDERSTANDING TO FIND OUT THE CAUSE AND EFFECT OF THEIR BEHAVIOUR. WOMEN EXPERIENCE THINGS ALIKE, AGONY ALIKE, ANGER ALIKE TOO. THE WAY THEY REFLECT THEIR ANGER IS ALSO VERY TYPICAL. ALL THESE THOUGHTS MADE KRISHNA SMILE FOR A MOMENT. HE WAS SUFFERING FROM IMMENSE PAIN. HE WAS SHOT BY THE HUNTER. KRISHNA KNEW THAT THESE WERE HIS VERY FEW LAST HOURS IN THE FORM OF A HUMAN. IT WAS TIME TO LEAVE THE MORTAL BODY. HE HAD LIVED HIS LIFE FULLY, AS DESTINED. HE WAS PONDERING OVER THE MANY INCIDENCES THAT HAD TAKEN PLACE IN HIS LIFE. DURING THESE LAST FEW HOURS, HE HAD THOUGHTS OF ONLY THREE WOMEN, RADHA, RUKHMINI AND DRUAPADI. THEY WERE TIED UP TO HIM WITH A SEPARATE BOND EACH. ONE WAS HIS LOVER, ONE WAS HIS WIFE AND ONE WAS HIS FRIEND. EACH ONE HAD AN INTIMATE RELATIONSHIP WITH HIM. THEY ALL WERE UNIQUE YET COUNTERPARTS OF EACH OTHER. ONLY THEY HAD THE POWER TO CAPTIVATE KRISHNA. THEY HAD THE POWER TO MAKE HIM LINGER BEFORE LEAVING HIS MORTAL BODY. HE LINGERS AND HELPS THEM TO SET HIM FREE FROM THEIR BONDS, FOREVER…
‘‘स्त्रिया एकमेकींपेक्षा वेगळ्या का बरं नसतात....?’’ अश्वत्थाखाली बसलेल्या कृष्णाच्या मनात द्रौपदीच्या महालात घडलेली घटना डोळ्यांसमोर येऊन, अनेक विचार येत होते.... ‘‘कोणत्याही युगात, कोणत्याही वयाची स्त्री का बरं एकसारखाच विचार करते? एकसारखाच अनुभव घेते? समान बाबतीत वेदना अनुभवते? का बरं एकसारख्या गोष्टीबद्दल रागावते? राग व्यक्त करण्याची रीत पण का बरं एकसारखीच असते....?’’ कृष्णाच्या मनात प्रश्न आले आणि त्यावर तो स्वत:च हसलाही. या प्रश्नांना आता काही अर्थ होता का? आयुष्य जगून झालं होतं... ‘‘आपल्या जीवनात आलेल्या महत्त्वाच्या तीनही स्त्रिया आपल्याबद्दल का बरं एकसारख्याच संवेदना अनुभवत होत्या? का बरं एकाच पध्दतीनं दुःखी होत होत्या? आणि का एकसारख्याच तीव्रतेनं आपल्यावर प्रेम करत होत्या?...’’ खरं तर असा विचार करण्याची वेळही आता निघून गेली होती. आता होतं ते... केवळ स्मरण...! प्रत्यक्ष दृष्टीसमोर त्या स्त्रिया नव्हत्याच. तरीही त्या तिघींचे डोळे त्याच्याकडे बघत होते... आशेनं, अपेक्षेनं, उपहासानं आणि ... निखळ प्रेमानंही! तीन नद्यांचा प्रवाह मिळून त्याच्या दृष्टीसमोरुन सागराकडे जात होता. लाटांवर खाली-वर नाचणारे प्रकाश किरण जणू अस्पष्ट रेषांद्वारा त्या तिन्ही स्त्रियांचे चेहरे चितारीत होते.... प्रेयसी... पत्नी... आणि सखी... त्या तिघी जणी... खळाळणा-या प्रवाहाबरोबर वाहात जणू म्हणत होत्या... ‘‘तुझ्यात विलीन होण्यातच आमच्या जीवनाचं सार्थक आहे. तुझा खारटपणा स्वीकार्य आहे. कारण तूच आम्हाला विशालता दिलीस, अमर्याद पसरण्याचा तो अस्तित्वबोधही तूच दिलास... आमचं प्रखर तेज सामावून घेऊन आम्हाला शीतलता दिलीस तू... आमचं स्त्रीत्व स्वीकारून अखंड प्रेम दिलंस तू....’’

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KRUSHNAYAN #KRUSHNAYAN #कृष्णायन #FICTION #TRANSLATEDFROMGUJRATITOMARATHI #SUDHIRKAUTHALKAR #KAAJALOZAVAIDYA "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 25-12-2011

    काजल ओझा -वैद्य ज्येष्ठ गुजराथी लेखिका. साहित्य क्षेत्रात त्यांनी बराच लौकिक मिळविला आहे. त्यांनी `योग वियोग’, `राग-अनुराग’, मध्यबिंदू या कादंबऱ्या हातावेगळ्या केल्या आहेत. या साहित्यकृतीने साहित्यात मोलाची भर पडली आहे. प्रा. सुधीर कौठाळकर यांनीत्यांच्या `कृष्णायन’ या गुजराती कादंबरीच्या मूळ कथेला न दुखविता इमान राखून मराठीत स्वैर अनुवाद केला आहे. रामायण आणि महाभारत हे जगातील दोन महान काव्यग्रंथ. महाभारतात जे आहे ते सर्वत्र आहे व जे नाही ते अन्यत्र कोठेही नाही. या महाभारताचा नायक भगवान श्रीकृष्ण. गीतेत गुरु म्हणून तर भागवतात दैवी स्वरुपात दिसतो. हा देवावतार सर्वत्र व्यापून राहिला आहे. कुरुक्षेत्रावर कौरव-पांडवांचे घनघोर युद्ध झाले. सारे कौरव मृत्युमुखी पडले. गांधारीला शोक आवरला नाही. तिने कृष्णाला शाप दिला, `पशुच्या मरणानं मरशील तू... एकटा... असहाय, व्यथित... तुझ्या कुळाचा विनाश. स्वजन, पुत्र-पौत्र... तडफडून तडफडून मरण पावतील!’ हा शाप सत्य ठरला. कौरव पापी, पांडव पुण्यवान. पण यादव कुळही उन्मत्त झाले. मद्यपानमुळे साधू संतांची कुचेष्टा करु लागले. कृष्णाने स्वत:च्या डोळ्यांनी हे पाहिले. विनाश अटळ ठरला. कृष्ण हा एक मानव. तो एक पुरुष. पूर्ण पुरुष!! या युगंधराला मरण समाधीचे. पण ??? न येता त्याला मरण आले एका सामान्य माणसासारखं विजनात! एका अश्वत्थ वृक्षाखाली न झोपलेल्या, न बसलेल्या स्थितीत! जरा नावाच्या एका पारध्याचा बाण पायाच्या अंगठ्याला लागला. हे सारे वर्णन लेखकाने अतिशय समर्पक, रोचक व यथायोग्य शब्दात केले आहे. त्यांची भाषा प्रवाही, ओघवती आहे आणि खऱ्या अर्थाने इथूनच कादंबरीची सुरुवात होते. श्रीकृष्ण मुलगा, सवंगडी, भाऊ, वादक, प्रियकर, योद्धा, पती, राजा, राजकारणपटू वक्ता, तत्त्वज्ञ या साऱ्या भूमिकेत अपरंपार रस ओतला. शेवटी याला साऱ्यांची परमाधी साधा माणूस म्हणून मरण पत्करण्याचा योगायोग आला. मेघासारखा रिता होऊन तो गेला. कृष्णाचे तर काय राहिले फक्त जळत्या कापराचा वास! हे सारे कादंबरीकाराने परिणामकारकरित्या वर्णले आहे. कृष्णाच्या महानिर्वाण वेळी त्याच्या डोळ्यासमोर अनेक गतकालाचे प्रसंग, घटना, महान व्यक्ती उभ्या राहिल्या. त्यांच्याशी कृष्णाचा सुसंवाद झाला. तो अतिशय उत्तम साधला आहे. हीच एक भावुक कथा, दीर्घ कथा, नव्हे कादंबरीच! म्हणजेच कृष्णायन! राधा, रुक्मिणी व द्रौपदी या कृष्ण जीवनात अत्यंत प्रिय स्त्रिया. या तिघींचे चेहरे एकमेकांत मिसळून आर्द्र बनून कृष्णाच्या डोळ्यात तरळत होते. अर्जुन, उध्दव, दारुक, यशोदामाता हेही चुकले नव्हते. याचं सांत्वन कृष्णाने अतिशय सुंदर शब्दात केले आहे. हे लेखकाचे कौशल्य आहे. कादंबरीकार हा तत्त्वज्ञ, कवी, शास्त्रज्ञ यांच्याहून श्रेष्ठ असतो. कारण बाकीच्या सर्वांना मानवी जीवनाच्या एकेका अंगाचे दर्शन झालेले असते. परंतु कादंबरीकार मात्र समग्र जीवनाचा वेध घेऊ शकतो. यात कौठाळकर यशस्वी झाले आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more