* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KRUSHNAYAN
  • Availability : Available
  • Translators : SUDHIR KAUTHALKAR
  • ISBN : 9788184982619
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 222
  • Language : TRANSLATED FROM GUJARATI TO MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AWESOME STORY OF GOD IN THE DISGUISE OF A HUMAN BEING: KRISHNA WAS LYING BENEATH THE HUGE TREE OF ASHWATTHA. HE HAD JUST ONE LAST QUESTION IN HIS MIND; ‘WHY IS THAT ALL THE WOMEN THINK ALIKE?’ HE HAD MANY THOUGHTS LINGERING IN HIS MIND, MANY INCIDENCES BEFORE HIS EYELIDS CLOSED GENTLY. BE IT ANY AGE, ANY ERA, ANY AGE, WOMEN ALWAYS THINK LIKEWISE. IT IS REALLY BEYOND ANYONE’S UNDERSTANDING TO FIND OUT THE CAUSE AND EFFECT OF THEIR BEHAVIOUR. WOMEN EXPERIENCE THINGS ALIKE, AGONY ALIKE, ANGER ALIKE TOO. THE WAY THEY REFLECT THEIR ANGER IS ALSO VERY TYPICAL. ALL THESE THOUGHTS MADE KRISHNA SMILE FOR A MOMENT. HE WAS SUFFERING FROM IMMENSE PAIN. HE WAS SHOT BY THE HUNTER. KRISHNA KNEW THAT THESE WERE HIS VERY FEW LAST HOURS IN THE FORM OF A HUMAN. IT WAS TIME TO LEAVE THE MORTAL BODY. HE HAD LIVED HIS LIFE FULLY, AS DESTINED. HE WAS PONDERING OVER THE MANY INCIDENCES THAT HAD TAKEN PLACE IN HIS LIFE. DURING THESE LAST FEW HOURS, HE HAD THOUGHTS OF ONLY THREE WOMEN, RADHA, RUKHMINI AND DRUAPADI. THEY WERE TIED UP TO HIM WITH A SEPARATE BOND EACH. ONE WAS HIS LOVER, ONE WAS HIS WIFE AND ONE WAS HIS FRIEND. EACH ONE HAD AN INTIMATE RELATIONSHIP WITH HIM. THEY ALL WERE UNIQUE YET COUNTERPARTS OF EACH OTHER. ONLY THEY HAD THE POWER TO CAPTIVATE KRISHNA. THEY HAD THE POWER TO MAKE HIM LINGER BEFORE LEAVING HIS MORTAL BODY. HE LINGERS AND HELPS THEM TO SET HIM FREE FROM THEIR BONDS, FOREVER…
‘‘स्त्रिया एकमेकींपेक्षा वेगळ्या का बरं नसतात....?’’ अश्वत्थाखाली बसलेल्या कृष्णाच्या मनात द्रौपदीच्या महालात घडलेली घटना डोळ्यांसमोर येऊन, अनेक विचार येत होते.... ‘‘कोणत्याही युगात, कोणत्याही वयाची स्त्री का बरं एकसारखाच विचार करते? एकसारखाच अनुभव घेते? समान बाबतीत वेदना अनुभवते? का बरं एकसारख्या गोष्टीबद्दल रागावते? राग व्यक्त करण्याची रीत पण का बरं एकसारखीच असते....?’’ कृष्णाच्या मनात प्रश्न आले आणि त्यावर तो स्वत:च हसलाही. या प्रश्नांना आता काही अर्थ होता का? आयुष्य जगून झालं होतं... ‘‘आपल्या जीवनात आलेल्या महत्त्वाच्या तीनही स्त्रिया आपल्याबद्दल का बरं एकसारख्याच संवेदना अनुभवत होत्या? का बरं एकाच पध्दतीनं दुःखी होत होत्या? आणि का एकसारख्याच तीव्रतेनं आपल्यावर प्रेम करत होत्या?...’’ खरं तर असा विचार करण्याची वेळही आता निघून गेली होती. आता होतं ते... केवळ स्मरण...! प्रत्यक्ष दृष्टीसमोर त्या स्त्रिया नव्हत्याच. तरीही त्या तिघींचे डोळे त्याच्याकडे बघत होते... आशेनं, अपेक्षेनं, उपहासानं आणि ... निखळ प्रेमानंही! तीन नद्यांचा प्रवाह मिळून त्याच्या दृष्टीसमोरुन सागराकडे जात होता. लाटांवर खाली-वर नाचणारे प्रकाश किरण जणू अस्पष्ट रेषांद्वारा त्या तिन्ही स्त्रियांचे चेहरे चितारीत होते.... प्रेयसी... पत्नी... आणि सखी... त्या तिघी जणी... खळाळणा-या प्रवाहाबरोबर वाहात जणू म्हणत होत्या... ‘‘तुझ्यात विलीन होण्यातच आमच्या जीवनाचं सार्थक आहे. तुझा खारटपणा स्वीकार्य आहे. कारण तूच आम्हाला विशालता दिलीस, अमर्याद पसरण्याचा तो अस्तित्वबोधही तूच दिलास... आमचं प्रखर तेज सामावून घेऊन आम्हाला शीतलता दिलीस तू... आमचं स्त्रीत्व स्वीकारून अखंड प्रेम दिलंस तू....’’

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KRUSHNAYAN #KRUSHNAYAN #कृष्णायन #FICTION #TRANSLATEDFROMGUJRATITOMARATHI #SUDHIRKAUTHALKAR #KAAJALOZAVAIDYA "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 25-12-2011

    काजल ओझा -वैद्य ज्येष्ठ गुजराथी लेखिका. साहित्य क्षेत्रात त्यांनी बराच लौकिक मिळविला आहे. त्यांनी `योग वियोग’, `राग-अनुराग’, मध्यबिंदू या कादंबऱ्या हातावेगळ्या केल्या आहेत. या साहित्यकृतीने साहित्यात मोलाची भर पडली आहे. प्रा. सुधीर कौठाळकर यांनीत्यांच्या `कृष्णायन’ या गुजराती कादंबरीच्या मूळ कथेला न दुखविता इमान राखून मराठीत स्वैर अनुवाद केला आहे. रामायण आणि महाभारत हे जगातील दोन महान काव्यग्रंथ. महाभारतात जे आहे ते सर्वत्र आहे व जे नाही ते अन्यत्र कोठेही नाही. या महाभारताचा नायक भगवान श्रीकृष्ण. गीतेत गुरु म्हणून तर भागवतात दैवी स्वरुपात दिसतो. हा देवावतार सर्वत्र व्यापून राहिला आहे. कुरुक्षेत्रावर कौरव-पांडवांचे घनघोर युद्ध झाले. सारे कौरव मृत्युमुखी पडले. गांधारीला शोक आवरला नाही. तिने कृष्णाला शाप दिला, `पशुच्या मरणानं मरशील तू... एकटा... असहाय, व्यथित... तुझ्या कुळाचा विनाश. स्वजन, पुत्र-पौत्र... तडफडून तडफडून मरण पावतील!’ हा शाप सत्य ठरला. कौरव पापी, पांडव पुण्यवान. पण यादव कुळही उन्मत्त झाले. मद्यपानमुळे साधू संतांची कुचेष्टा करु लागले. कृष्णाने स्वत:च्या डोळ्यांनी हे पाहिले. विनाश अटळ ठरला. कृष्ण हा एक मानव. तो एक पुरुष. पूर्ण पुरुष!! या युगंधराला मरण समाधीचे. पण ??? न येता त्याला मरण आले एका सामान्य माणसासारखं विजनात! एका अश्वत्थ वृक्षाखाली न झोपलेल्या, न बसलेल्या स्थितीत! जरा नावाच्या एका पारध्याचा बाण पायाच्या अंगठ्याला लागला. हे सारे वर्णन लेखकाने अतिशय समर्पक, रोचक व यथायोग्य शब्दात केले आहे. त्यांची भाषा प्रवाही, ओघवती आहे आणि खऱ्या अर्थाने इथूनच कादंबरीची सुरुवात होते. श्रीकृष्ण मुलगा, सवंगडी, भाऊ, वादक, प्रियकर, योद्धा, पती, राजा, राजकारणपटू वक्ता, तत्त्वज्ञ या साऱ्या भूमिकेत अपरंपार रस ओतला. शेवटी याला साऱ्यांची परमाधी साधा माणूस म्हणून मरण पत्करण्याचा योगायोग आला. मेघासारखा रिता होऊन तो गेला. कृष्णाचे तर काय राहिले फक्त जळत्या कापराचा वास! हे सारे कादंबरीकाराने परिणामकारकरित्या वर्णले आहे. कृष्णाच्या महानिर्वाण वेळी त्याच्या डोळ्यासमोर अनेक गतकालाचे प्रसंग, घटना, महान व्यक्ती उभ्या राहिल्या. त्यांच्याशी कृष्णाचा सुसंवाद झाला. तो अतिशय उत्तम साधला आहे. हीच एक भावुक कथा, दीर्घ कथा, नव्हे कादंबरीच! म्हणजेच कृष्णायन! राधा, रुक्मिणी व द्रौपदी या कृष्ण जीवनात अत्यंत प्रिय स्त्रिया. या तिघींचे चेहरे एकमेकांत मिसळून आर्द्र बनून कृष्णाच्या डोळ्यात तरळत होते. अर्जुन, उध्दव, दारुक, यशोदामाता हेही चुकले नव्हते. याचं सांत्वन कृष्णाने अतिशय सुंदर शब्दात केले आहे. हे लेखकाचे कौशल्य आहे. कादंबरीकार हा तत्त्वज्ञ, कवी, शास्त्रज्ञ यांच्याहून श्रेष्ठ असतो. कारण बाकीच्या सर्वांना मानवी जीवनाच्या एकेका अंगाचे दर्शन झालेले असते. परंतु कादंबरीकार मात्र समग्र जीवनाचा वेध घेऊ शकतो. यात कौठाळकर यशस्वी झाले आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो