* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PUPPET ON A CHAIN
  • Availability : Available
  • Translators : MADHAV KARVE
  • ISBN : 9788177669244
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 228
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :ALISTAIR MACLEAN COMBO SET- 14 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
PAUL SHERMAN IS ONE OF THE HEROES COLOURED BY ALISTER MACLEAN. HE IS A VERY RESPONSIBLE OFFICER IN THE INTERPOL, WORKING IN THE ANTI-DRUGS DEPARTMENT. HE IS ASSIGNED WITH THE TASK OF FINDING OUT THE DETAILS ABOUT THE SUSPICIOUS DRUG OPERATION IN AMSTERDAM, IN HOLLAND. THE MOMENT HE AND HIS COLLEAGUE LAND ON THE AIRPORT OF AMSTERDAM, HIS COLLEAGUE GETS KILLED FURTHER LEADING INTO A SERIES OF DISASTERS. PAUL FINDS HIS CLUES ON THE ROADS, CANALS, CHURCHES, BUILDINGS OF AMSTERDAM, EACH SUGGESTING SOMETHING. HE GETS ATTRACTED TOWARDS THE SHADOWS, EQUALLY MYSTERIOUS. EVERY SINGLE LINE WILL BRING FORWARD THE ADVENTURES OF PAUL, HIS MISSION, HIS ATTACKS, A THRILLING SUSPENSE WITH ALL THE CHARACTERISTIC FEATURES OF ALISTER MACLEAN.
अ‍ॅलिस्टर मॅक्लीन यांच्या मर्दुमकी गाजवणार्‍या अनेक नायकांपैकी ’पपेट ऑन ए चेन’ चा नायक, पॉल शेर्मन. इंटरपोलच्या अंमली द्रव्य विरोधी विभागाचा एक दमदार अधिकारी... पॉलवर हॉलंडमध्ये जाऊन अ‍ॅमस्टरडॅममधल्या संशयास्पद अंमली द्रव्यांच्या व्यवहाराचा वेध घेण्याची कामगिरी सोपवली जाते. पॉल अ‍ॅमस्टरमध्ये विमानातून उतरताक्षणीच त्याच्या एका सहकार्‍याची हत्या होते. आणि त्यानंतर संकटांची मालिकाच सुरू होते. अ‍ॅमस्टरडॅममधले अंधार्‍या रात्री पॉलला नकळत काहीकाही सुचवू लागतात. त्याच्या आजूबाजूच्या जगाचे मुखवटे आणि चेहरे उघड होऊ लागतात. अंधारातल्या गूढसावल्या त्याला खुणावत राहतात. अखेरच्या पानापर्यंत खिळवून ठेवणारी खास मॅक्लीन शैलीतली ही कादंबरी वाचकाला सहजपणे एका अद्भूत गूढ वातावरणात घेऊन जाते. पॉलच्या आक्रमक कामगिरीची ही थरारकथा वाचताना रक्त गोठेल, काळजाचा ठोका नक्कीच चुकेल....

No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #SOUTHBYJAVAHEAD #THEDARKCRUSADER #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #SEAWITCH #PUPPETONACHAIN #MADHAVKARVE #THE SATAN BUG # # THE LAST FRONTIER ##अलीस्टर मैकलिन # अशोकपाध्ये #ASHOK PADHYE # THE DARK CRUSADER #THEGOLDEN GATE #फिअरइजदकी #FEARISTHEKEY #
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    साहसकथा… अनेक नायक रंगविणारा अ‍ॅलिस्टर मॅक्लिन थरारकथा वाचकांना नक्कीच ठाऊक असेल. त्यातील पॉल शेर्मन हा इंटरपोलच्या अमली पदार्थ विरोधी विभागाचा अधिकारी. त्याची साहसकथा ‘पपेट ऑन ए चेन’ मेहता पब्लिशिंग हाऊसने मराठीत आणली आहे. अनुवाद माधव कर्वे यांनी कला आहे. हॉलंडमधील अ‍ॅमस्टरडॅममध्ये चालणाऱ्या अमली पदार्थांच्या व्यवहाराचा शोध घेण्याची कामगिरी पॉलवर सोपविली जाते. म्हातारा पियानोवादक, खुणावणाऱ्या अंधाऱ्या गल्ल्या, सुंदर तरीही काहीतरी सांगू पाहणाऱ्या बाहुल्या, झालेले हल्ले, शहारातील कालवे, चर्च, काहीतरी हाताशी येत आहे असे वाटत असतानाच आणखी एका सहकाऱ्याचा समोरच झालेला खून आणि उलगडलेले धक्कादायक रहस्य यात वाचक शेवटपर्यंत गुंगून जातो, यात शंका नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more