* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AWA MARU - TITANIC OF JAPAN
  • Availability : Available
  • Translators : CHARULATA PATIL
  • ISBN : 9788184981636
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 248
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :REI KIMURA COMBO SET - 8 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ON THE 1ST OF APRIL 1945, A JAPANESE HOSPITAL SHIP THAT HAD BEEN GIVEN SAFE PASSAGE BY THE ALLIES, IN THE DEAD OF NIGHT, WAS MISTAKEN FOR A MILITARY VESSEL AND TORPEDOED BY THE AMERICAN SUBMARINE QUEENFISH.IT SANK WITHIN MINUTES TAKING ALMOST ALL OF THE 2007 PASSENGERS TO THEIR WATERY GRAVES. THIS IS THE GRIPPING STORY OF THE AWA MARU, THE LITTLE KNOWN TITANIC OF JAPAN.FOLLOW THE JOURNEY OF KYOKO TANAKA, WHOSE PARENTS AND BROTHER HAD BEEN PASSENGERS ON THE AWA MARU AS SHE SET SAIL ON HER OWN VOYAGE OF DISCOVERY. SHE TRAVELS FROM JAPAN TO SINGAPORE IN SEARCH OF THE TRUTH AND A PIECE OF HER HISTORY AND MAKES POIGNANT AND TOUCHING DISCOVERIES OF THE LIVES OF HER PARENTS AND SOME OF THE OTHER FAMILIES AS THEY PREPARED TO BOARD THE AWA MARU. THE LIVES OF THE DOOMED PASSENGERS OF THE AWA MARU AND THE EVENTS OF THAT HORRIFIC NIGHT WHEN THEY PERISHED ARE ALL TOLD IN THIS BOOK AS NEVER BEFORE.
जगात दुस-या महायुद्धाचा वणवा पेटलेला... जपाननं सिंगापूरमधली ब्रिटिशांची सत्ता उलथवून तिथे आपले हातपाय पसरलेले... परंतु अल्पावधीतच जपानी साम्राज्याच्या सत्तेचा हा सूर्य ढळू लागला. सिंगापूरमधले सारे जपानी पराजयाच्या कल्पनेनं, त्यानंतर उसळणा-या सुडाग्नीच्या दहशतीनं प्रचंड हादरले! जीव वाचवण्यासाठी, जपानला पळण्यासाठी जिवाचा आटापिटा करू लागले. जपाननं सिंगापूरमधल्या जपानी नागरिकांना परत आणण्यासाठी ‘आवा मारू’ नावाची बोट पाठवली. या बोटीला अमेरिकेकडून सुरक्षित प्रवासाची हमी मिळालेली होती. परंतु एकच बोट आणि जपानी असंख्य! बोटीत जागा मिळवण्यासाठी सारे जिवाच्या आकांतानं धडपडू लागले. अखेर, दोन हजार ‘निवडक भाग्यवंतां’ना घेऊन बोटीनं २८ मार्च १९४५ या दिवशी सिंगापूर सोडलं. परंतु १ एप्रिलच्या त्या भयाण रात्री काही वेगळंच घडलं!... कुठे गेले हे सारे लोक?... तीन दशकांनंतर क्योको तानाका झपाटल्यासारखी कुठे गेली? कुठे गुंतले होते तिच्या आयुष्याचे अदृश्य धागे?... आजवर साहित्यकृतीत शब्दबद्ध न झालेली दुस-या महायुद्धाच्या काळातली ही सत्य घटना आणि काळजाचा थरकाप उडवणारे त्यातले तपशील वाचकांनीही अनुभवावेत... रेई किमुरांनी ‘आवा मारू’ या बोटीच्या वास्तव घटनेभोवती इतक्या कसबीपणानं कल्पित कथानकाचा एक दुपेडी गोफ विणला आहे, की ती घट्ट वीण वाचकालाही त्यात ओढून घेते. अतिशय उत्कंठावर्धक रहस्यमयतेनं गतिमान होत जाणारं हे लेखन, पुस्तक वाचून संपवलं तरी वाचकाला पकडून ठेवतं!

No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #JAPANESEMAGNOLIA(MARATHI) #JAPANESEMAGNOLIA #जॅपनीजमॅग्नोलिया #FICTION TRANSLATED FROM ENGLISH TO MARATHI NIRMALA MONE निर्मला मोने REI KIMURA रेई किमुरा #JAPANESEORCHID(MARATHI) #AWAMARUTITANICOFJAPAN(MARATHI) #JAPANESEROSE #MIERIC #"
Customer Reviews
  • Rating Starसई (पुस्तकप्रेमी समूह)

    दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान अमेरिकेच्या पाणबुडीने जपानी प्रवासी असलेले एक निमलष्करी जहाज हलगर्जीपणाने नष्ट केले होते व २५०० निष्पाप जीवांना जलसमाधी मिळाली होती. ही एक खरी घटना. त्याभोवती या जपानी लेखिकेने एक कथा चपखलपणे गुंफली. पण खरंचकिती कुटुंबांची होरपळ झाली असेल. एक जपानी मुलगी , क्योको. तिची आई चिएको शेवटच्या क्षणी तिला एक रहस्य सांगण्याचा प्रय्तन करते. मुलीला एक जुना फोटो मिळतो . तो सिंगापुरचा असतो. प्रचंड उतसुकतेपोटी ती पती च्या पाठिंब्यामुळे सिंगापूरला रवाना होते. एक जुनापुराणा फोटो या व्यतिरिक्त तिच्याकडे काही असत नाही. सिंगापूरच्या जपानी समिती मध्ये ती जाते. तिथे शोध घेताना काही धागेदोरे हाती लागतात . त्यातून तिला समजतं की जिला ती इतकी वर्षे तिची आई समजत होती ती तिची आई नाही आहे. आता मात्र तिला धक्का बसतो. मग पुढचा प्रश्न कि ती कोणाची मुलगी आहे ? तिचे आई वडिल कोण ? आता ते कुठे आहेत? टॅक्सीमधून प्रवास करताना तिला दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान सिंगापूरमधे असलेल्या “जपानी वसाहती बद्दल कळतं,, ती तिथे पोहोचते आणि नवीनच कोडी तसेच धूसर आठवणी सोबत घेऊन येते. अजून काही खटपटीनंतर जपानी समिती कडून तिला एक यादी मिळते,,, ती यादी असते,,,,, अशा लोकांची कि जे दुसऱ्या महायुद्ध शेवटच्या टप्प्यात असताना सिंगापुरहून जपानला आपल्या मायदेशी परतण्याच्या आशेने एका “आवा मारू” नावाच्या जहाजावर चढले होते. या जहाजाला चीनच्या जवळ समुद्रात जलसमाधी मिळते. या यादीमुळे तिला कळतं कि आपल्याला एक भाऊ ही आहे. आता ती पुन्हा एकदा आपल्या जुन्या जपानी वसाहतीतल्या घराला भेट देते. तिथे तिची बालमैत्रीण जी या सर्व इतिहासाची साक्षीदार आहे. ती (मेइलिन) कथा सांगते , तेव्हा तिला सर्व उलगडा होतो..,,,,,, तिचे वडिल (शिगे) जपानी सेनेमधील गुप्तहेर असतात. त्यांना सिंगापूरमधे पाठवल्यावर ते गरोदर पत्नीसहित येतात , जिला आपला थंड जपान सोडून यायचे नसते. तिथे येताना प्रवासात त्यांची एका जपानी कुटुंबासोबत ( तनाका कुटुंब) मैत्री होतो ती कायम टिकते. सिंगापूरच्या उष्ण हवामानाशी जुळवून घेत, जपानच्या आठवणीत झुरत इतर अनेक जपानी लोकांना सोबत घेऊन वसाहत वसवतात. कुटुंब वाढवतात. सवादा आणि तनाका कुटुंबीय यांचे संबंध दिवसेंदिवस गहिरे होतात.वसाहतीला ते अगदी जपानचं प्रतिरूप करतात. हे करताना चिनी वंशाचा स्थानिक कल्पक हुशार सुतार या कुटुंबाच्या संपर्कात येतो. वसाहतीसाठी मदत करताना तो त्यांचाच होऊन जातो. त्याची मुलगी मेइलिन या मुलांसोबत वाढते , खेळते. क्योको , तिचा भाऊ आणि मेइलिन हे कायम एकत्र खेळतात. चिएको आणि मोरी क्योको ला आपल्या मुलासारखेच प्रेम करतात. कारण तिला मूल नाही. ४ वर्षांनी दोस्त राष्ट्रांची सरशी व जपानची पिछेहाट सुरू होते मासाको (शिगेची पत्नी )कुटुंबाची चिंता करत जपानला जाण्यासाठी पाठपुरावा करत राहते. अचानक एके दिवशी बातमी कळते कि “आवा मारू“बोट जपानी लोकांना घेऊन जपानला चालली आहे.या बोटीला दोस्त राष्ट्रांचे अभय आहे व ती बोट सुखरूपपणे जपानला पोहोचणार आहे . जीवाचे रान करून मासाको तिथे सावादा आणि तानाका या कुटुंबांसाठी जागा मिळवते. मेइलिन व तिच्या सुतार वडिलांना हे लोक परत जाणार म्हणून अपरिमित दुःख होते. ( नंतरच्या आयुष्यात पण त्यांना वाटत राहते कि हे लोक कधीतरी परततील.) असंख्य आशा , स्वप्नं घेऊन दोन हजारांहून अधिक माणसे बोटीवर चढतात. प्रवास सुरू होतो. सर्व आलबेल असताना दूरवर एक धडाका होतो, अमेरिकी पाणबुड्या सर्वत्र असतात. त्यामुळे जीव मुठीत धरून सगळे प्रवास करत असतात.त्यांचा आशेचा किरण एकच असतो. त्यांचा कॅप्टन , ज्याची यशस्वी सफरींची नोंद आहे. एक गरोदर स्त्री जिचा नवरा आर्मीत आहे ती निराशावादी बोलत राहते. मासाको अजून घाबरते पण मुळची ती खंबीर आहे. अचानक काही कारणाने बोटीचा ठरलेला रस्ता बदलतो. जपानी आर्मीवाला आणि शिगे दोन्ही घाबरतात. इथेच फासे फिरतात. अमेरिकी पाणबुडीकडून निष्काळजीपणा प्रदर्शित होतो. संदेश चुकीचा वाचला जातो. आणि जे नको व्हायला होतं ते होतं,,, पाणतीर डागले जातात. ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, एक भयानक शेवट!!!! आशाआकांक्षा, स्वप्नं, वर्तमान , भविष्य सगळ्यांचा चक्काचूर! या विनाशातून क्योको (मासाको शिगेची मुलगी)आणि चिएको वाचतात. चिएको तिला मुलीप्रमाणे वाढवून मोठी करते,,, पण एक भळभळणारी जखम उराशी घेऊन. क्योको ऐकून सुन्न होते,, स्वतः ला सावरते,, मेइलिन ला उराउरी भेटते परत आपल्या आधीचे आयुष्य सुरू करते. आपल्या पतीला हे काही न सांगण्याचा निर्णय घेते. दरवर्षी टोकियोतील झोजोजी मंदिराच्या आवाजातील एका कोपरयात विसावलेल्या स्मारकाला मात्र नित्य भेट देते. एक प्रकरण वर्तमान आणि एक प्रकरण भूतकाळ लिहिला आहे. वर्तमानात क्योको चे आताचं जीवन तिचा सिंगापुरमधील शोधप्रवास दाखवलाय. भूतकाळात शिगे , मासाको सवादा ( क्योको चे खरे आई वडिल)आणि चिएको,मोरी तनाका यांचा सिंगापूर निवास, जहाजगमन , जलसमाधी हा प्रवास दाखवला आहे. बोटीवर जे काही घडते ते कोणालाच माहिती नाही. चिएको क्योको ला जपानमध्ये वाढवते. मेइलिन ला उशीरा कळतं बोट बुडल्याचं. तिचे वडील घराची काळजी घेतात. सिंगापूरवासियांचा जपानवर रोष असल्यामुळे मेइलिन व तिच्या वडिलांना समाजरोष सहन करावा लागतो. जपानी समिती ने मात्र शक्य तेवढी माहिती , कागदपत्रे जपून ठेवली आहेत. (((((((((सवादा कुटुंब—- शिगे व मासाको. त्यांची दोन मुले क्योको व तिचा भाऊ तनाका कुटुंब—- मोरी व चिएको जी क्योको ला आयुष्यभर सांभाळते. चिनी सुतार व मुलगी मेइलिन))))) पाणबुडीच्या कॅप्टन वर काही विशेष कारवाई झाली नाही. युद्धाचे असे किती साइडइफेक्ट्स असतील आणि युद्ध संपल्यानंतर कितीकाळ अस्तव्यस्त असेल सर्व! ‘विनाशकाले विपरीत बुदधी ‘हेच खरं पूर्वकाळातील राक्षसांचा पुनर्जन्म होतो की काय जाणे? सर्वांचे आभार!! ...Read more

  • Rating StarUttara Bhadkamkar Pandit

    ही कादंबरी, छान आहे

  • Rating StarMauli Pandhare

    aplya purvajachi kahani shodhnare pustak ahe .read everyone

  • Rating StarNeelakshi M Patil

    Apratim pustak

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more