* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: A TIME TO KILL
  • Availability : Available
  • Translators : BAL BHAGWAT
  • ISBN : 9788184989441
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 572
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :JOHN GRISHAM COMBO- 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE LIFE OF A TEN-YEAR-OLD GIRL IS SHATTERED BY TWO DRUNKEN AND REMORSELESS YOUNG MEN. THE MOSTLY WHITE TOWN OF CLANTON IN FORD COUNTY, MISSISSIPPI, REACTS WITH SHOCK AND HORROR AT THE INHUMAN CRIME. UNTIL HER BLACK FATHER ACQUIRES AN ASSAULT RIFLE AND TAKES JUSTICE INTO HIS OWN OUTRAGED HANDS. FOR TEN DAYS, AS BURNING CROSSES AND THE CRACK OF SNIPER FIRE SPREAD THROUGH THE STREETS OF CLANTON, THE NATION SITS SPELLBOUND AS YOUNG DEFENSE ATTORNEY JAKE BRIGANCE STRUGGLES TO SAVE HIS CLIENT’S LIFE–AND THEN HIS OWN.
क्लॅन्टन, मिसिसिपी, दोन दारूड्या आणि अत्यंत वाईट प्रवृत्तीच्या माणसांमुळे दहा वर्षांच्या एका छोट्या मुलीचे आयुष्य पार उद्ध्वस्त होते. गोरे लोक बहुसंख्येने असणा-या शहरातल्या लोकांना या भयानक घटनेमुळे मोठाच धक्का बसतो. मग त्या मुलीचा कृष्णवर्णीय पिता अ‍ॅसॉल्ट रायफल मिळवतो आणि त्या पाशवी गुन्हेगारांना ठार मारतो. पण हे मिसिसिपी राज्य असते. घृणास्पद अत्याचार करणारे गोरे लोक कितीही नादान असले तरी एका काळ्या माणसाने त्यांचा खून करणे तिथे मान्य होत नाही. पुढले दहा दिवस कु क्लस क्लान, जळते क्रूस, खून, धाकदपटशा, स्नायपर रायफल्स या गोष्टी क्लॅन्टनच्या रस्त्यांवर जबरदस्त दहशत निर्माण करतात. स्वत:च्या अशिलाचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असलेला बचाव पक्षाचा तरुण अ‍ॅटर्नी ब्रिगॅन्स याला स्वत:चा आणि कुटुंबाचा जीव वाचवायचीही धडपड करायला लागते.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ATIMETOKILL #ATIMETOKILL #अटाइमटूकिल #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BALBHAGWAT #बाळभागवत #JOHNGRISHAM #जॉनग्रिशॅम "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 10-04-2016

    क्लॅन्टन, मिसिसिपी; दोन दारुड्या आणि अत्यंत वाईट प्रवृत्तीच्या माणसांमुळे दहा वर्षांच्या एका छोट्या मुलीचे आयुष्य पार उद्ध्वस्त होते. गोरे लोक बहुसंख्येने असणाऱ्या शहरातल्या लोकांना या भयानक घटनेमुळे मोठाच धक्का बसतो. मग त्या मुलीचा कृष्णवर्णीय पिता ‍ॅसॉल्ट रायफल मिळवतो आणि त्या पाशवी गुन्हेगारांना ठार मारतो. पण हे मिसिसिपी राज्य असतो; घृणास्पद अत्याचार करणारे गोरे लोक कितीही नादान असले तरी एका काळ्या माणसाने त्यांचा खून करणे तिथे मान्य होत नाही. पुढचे दहा दिवस कु क्लस क्लान, जळते क्रूस, खून धाकदपटशा, स्नायपर रायफल्स या गोष्टी क्लॅन्टनच्या रस्त्यांवर जबरदस्त दहशत निर्माण करतात. स्वत:च्या अशिलाचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असलेला बचाव पक्षाचा तरुण अ‍ॅटर्नी ब्रिगॅन्स याला स्वत:चा आणि कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठीही धडपड करावी लागते. ...Read more

  • Rating StarAparna Ranade Deo

    Yesss changli ahe kadambari

  • Rating Star‎Kiran Borkar

    अंमली पदार्थ विकणाऱ्या त्या दोन गोऱ्या तरुणांनी दहा वर्षाच्या काळ्या मुलीवर पाशवी बलात्कार करून ,गंभीर मारहाणहि केली .मिसीसिपी राज्य ह्या घटनेमुळे हादरून जाते .मग मुलीचा बाप त्या गुन्हेगारांना गोळ्या घालून ठार मारतो .पण हे राज्य गोऱ्यांचे आहे ,त्यांन काही केले तरी चालेल ,पण काळ्या लोकांनी असे कृत्य केले तर त्यांना मान्य नाही .आणि मग सुरु होत जाळपोळ ,दंगल ,गोरे विरुद्ध काळे . बचाव पक्षाच्या वकिलालाहि स्वतःचा आणि कुटुंबियांचा जीव वाचविण्यासाठी धडपड करावी लागते . नेहमीप्रमाणेच जॉन ग्रिशम यांची कोर्ट खटल्यावर आधारित थरारक कादंबरी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more