MADHAV KARVE

About Author

Birth Date : 05/08/1956


MADHAV KARVE – BIRTH DATE 5TH AUGUST 1956 WITH BACKGROUND OF ENGLISH LITERATURE GRADUATION AND FURTHER POST-GRADUATION IN MARATHI, STARTED WRITING ALL KINDS OF CONTENT FROM SHORT STORIES TO BOOK REVIEWS IN DAILIES LIKE `SAKAL’, ‘KESARI’ ETC. VERY SOON, HE STARTED WORKING AS A JOURNALIST. FURTHER, HE EDITED A PERIODICAL FOR THE DISABLED, CALLED ‘APANG VARTA’ FOR ‘APANG SAHAYYAKARI SANSTHA’ FOUNDED BU DR. W. N. TUNGAR. AFTER INTRODUCTION WITH BENGALI, HE TRANSLATED SHORT STORIES BY AUTHOR FROM O. HENRY TO ERNEST HEMINGWAY AS WELL. MEANWHILE, HE TRANSLATED SOME BESTSELLERS OF MEHTA PUBLISHING HOUSE’ LIKE DISCLOSURE (MICHAEL CRICHTON), GOLDFINGER (IAN FLEMING), ‘THE CLIENT’ (JOHN GRISHAM), ‘SAVING FAITH (DAVID BALDACCI), WHERE EAGLES DARE (ALLASTAIR MACLEAN) ETC. HE HAS TO HIS CREDIT, TRANSLATION OF SOME BESTSELLERS BY SYDNEY SHELDON AND DAVID BALDACCI AS WELL AS AUTOBIOGRAPHICAL BOOK BY HELEN KELLER (THE STORY OF MY LIFE) PUBLISHED BY ITHER PUBLISHERS. HE HAS WORDED TWO BOOKS, I.E. AUTOBIOGRAPHY OF DR. W. N. TUNGAR (KAHANI ATHAK JIDDICHI) AND ADVENTUROUS SCOOTER-BIKE EXPEDITION TO KHARDUNGLA BY RAJENDRA KHANDELWAL ( GADUDBHARARI)

माधव कर्वे यांचं इंग्लिश साहित्याचं पदवी पर्यंतच शिक्षण आणि पुढे मराठी भाषेतल्या पदव्युत्तर शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर दै . सकाळ, केसरी आणि इतरत्र कथांपासून पुस्तक परिचयापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या लेखनाने शुभारंभ झाला. पुढे स्वतः पत्रकार म्हणून काम करताना दुसरीकडे अपंगांच्या क्षेत्रातले अपंग पुनर्वसन तज्ज्ञ डॉ. वा. ना. तुंगार ह्यांच्या अपंग साहाय्यकारी संस्थेच्या अपंगवार्ता या त्रैमासिकाचं दीर्घकाळ संपादन केलं. दरम्यान बंगाली भाषेची ओळख झाल्यानंतर बंगाली साहित्यातील कथांचे अनुवाद प्रसिद्ध झाले. इंग्लिश साहित्यातल्या ओ हेन्री पासून अर्नेस्ट हेमिंग्वे सारख्या कथाकारांच्या कथांचे अनुवादही प्रसिद्ध होत राहिले. ह्याचवेळी दुसरीकडे मेहता पब्लिशिंग हाऊससाठी डिस्क्लोजर (मायकेल क्रिश्टन ), द क्लायंट (जॉन ग्रिशॅम ), गोल्डफिंगर (इयान फ्लेमिंग ), सेव्हिंग फेथ (डेव्हिड बलडासी ) इ. बेस्टसेलर कादंबऱ्यांचे आणि अन्य काही पुस्तकांचे अनुवाद केले. आत्तापर्यंत अन्य प्रकाशकांनी सिडने शेल्डन आणि डेव्हिड बलडासी ह्या नामवंत बेस्टलेखकांच्या कादंबऱ्यांच्या अनुवादाबरोबरच अपंगांचं स्फूर्तिस्थान असलेल्या हेलन केलर ह्यांच्या द स्टोरी ऑफ माय लाईफ ह्या आत्मकथनाचा अनुवाद अशी पुस्तक प्रसिद्ध केली आहेत. ह्याशिवाय अपंगांच्या प्रश्नासंबंधी आत्त्तापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखनामध्ये डॉ. वा. ना. तुंगार ह्यांचं आत्मचरित्र (कहाणी अथक जिद्दीची ) तसंच राजेंद्र खंडेलवाल ह्यांनी अपंग बांधवाना प्रेरित करण्याच्या हेतूने स्कूटर वरून केलेल्या खारदूंगला साहस सफारीसंबंधित गरुडभरारी ह्या पुस्तकांच्या शब्दांकनाचा समावेश होतो.
Sort by
Show per page
Items 1 to 10 of 10 total
DHYANSUTRA Rating Star
Add To Cart INR 240
DISCLOSURE Rating Star
Add To Cart INR 450
TBC Classic Book
GOLD FINGER Rating Star
Add To Cart INR 180
TBC Classic Book
KATHA SWATANTRYALADHYACHYA Rating Star
Add To Cart INR 120
PUPPET ON A CHAIN Rating Star
Add To Cart INR 220
TBC Classic Book
SAVING FAITH Rating Star
Add To Cart INR 400
TBC Classic Book
SPYMASTER Rating Star
Add To Cart INR 800
STILL LIFE Rating Star
Add To Cart INR 400
TBC Classic Book
THE CLIENT Rating Star
Add To Cart INR 350
TBC Classic Book
WHERE EAGLES DARE Rating Star
Add To Cart INR 350
TBC Classic Book

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more