JAYASHREE KULKARNI

About Author

Birth Date : 02/11/1946


JAYASHREE KULKARNI HAS WRITTEN IN VARIOUS GENRES. HE HAD A LOVE AND KNOWLEDGE OF WRITING FROM AN EARLY AGE. A STORY FOR A GIRL AT THE AGE OF TEN WAS PUBLISHED IN THE WEEKLY GAVKARI. AT THE AGE OF ELEVEN, IN FIFTH GRADE, HE WROTE A TABLEAU AND PRESENTED IT IN A SCHOOL REUNION. AFTER THAT, WRITING HAS BEEN PUBLISHED CONTINUOUSLY FOR MORE THAN FOUR DECADES TILL DATE.

जयश्री कुलकर्णी यांनी विविध प्रकारचे लेखन केले आहे. त्यांना लहान वयापासून लेखनाची आवड व जाण होती. वयाच्या दहाव्या वर्षीच एक मुलीसाठीची कथा साप्ताहिक गावकरी तून प्रसिद्ध झाली. अकराव्या वर्षी पाचवी इयत्तेत असताना एक टॅब्लो लिहून तो शाळेच्या स्नेहसंमेलनात सादर केला. त्यानंतर आजपर्यंत गेल्या चार दशकाहून अधिक काळ सातत्याने लेखन प्रसिद्ध होत आहे. वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके आणि विविध नामवंत दिवाळी अंकांतून त्यांनी निरनिराळ्या प्रकारचे लेखन केले आहे. बालवाङ्मय, सामाजिक आणि कौटुंबिक कथा, रहस्यकथा, गूढकथा, भयकथा, प्रवासवृत्तांत, आकाशवाणीसाठी श्रुतिका, वास्तुविषयक माहितीपूर्ण सचित्र लेख इ. विभागांमध्ये त्यांच्या लेखणीने संचार केला आहे. त्यांच्या नावावर विविध विषयांवरची २२ पुस्तके आहेत. १९७४ साली मॅजेस्टिक गप्पा या कार्यक्रमात एकमेव स्त्री रहस्यकथाकार म्हणून त्यांचा खास उल्लेख केला गेला आणि त्यांची मुलाखत घेण्यात आली. लेखनासाठीचे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. १९६८च्या सुमारास पु.ल. देशपांडे यांच्या हस्ते मिळालेला मराठी नाट्य परिषदेचा निबंध पुरस्कार, २०१६ साली मुंबई मराठी साहित्य संघाचा, अद्भुत गोष्टी पुस्तकासाठी उत्कृष्ट बालवाङ्मयासाठीचा मिलिंद गाडगीळ पुरस्कार हे त्यांपैकी काही पुरस्कार. आजही हंस , नवल , मोहिनी इत्यादी मराठीतल्या नामवंत मासिकांतून त्यांचे लेखन सातत्याने प्रकाशित होत असते.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
MANJARACHI SAVALI Rating Star
Add To Cart INR 180
VISHVALLI Rating Star
Add To Cart INR 160

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more