* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PRATIKSHA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663341
  • Edition : 8
  • Publishing Year : JANUARY 1994
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 104
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
YOUNG MILIND SETS OUT IN SEARCH OF SOMETHING. WHAT IS IT? HE DOES NOT KNOW WHAT IS HE LOOKING FOR TILL HE COMES ACROSS IT. "PRATIKSHA` IS A NOVEL BASED ON THE WAITING. "MILIND, EVERY SINGLE HUMAN BEING IS SCARED OF BEING INTROSPECTIVE. WE CAN LOOK AT THE SORROW IN OTHERS LIFE WITHOUT ANY CONCERN, WE CAN REMAIN ALOOF WHILE DOING SO, BUT WHEN WE ARE ASKED TO JUDGE OURSELVES, TO EXAMINE OUR FEELINGS, THEN WE ARE TREMENDOUSLY HURT. WE ARE AGONIZED BY OUR OWN SORROW. WE CAN VERY EASILY HURT OTHERS, BUT WE ARE EVER TENDER TOWARDS OURSELVES. WHY SO? JUST ONE REASON... WE HAVE NO FAITH IN OUR LIVES. ALL THESE YEARS WHEN WE LIVE, WE DO IT UNFAITHFULLY. EVERYTHING WE DO IS WITH ONE SOLE PURPOSE, TREMENDOUS SELFISHNESS. WE COME ALONE AND PASS ALONE, STILL THROUGHOUT OUR LIVES WE CONTINUOUSLY NEED COMPANY, THOUGH WE KNOW THAT NOTHING LASTS FOREVER WE COUNT ON COMPANY. WE SEARCH FOR IT. THOUGH LIFE IS TRANSIENT WE LOOK FOR EVERLASTING COMPANY TRYING TO KEEP US SAFE. YOU GAIN SOMETHING ONLY WHEN YOU OFFER SOMETHING. SOMETIMES, YOU HAVE TO OFFER YOURSELF TO FIND SOMETHING WHICH IS ETERNAL. UNLESS, THIS IS DONE YOU CANNOT FIND TRANQUILITY AND EACH ONE HAS TO FIND ON HIS OWN...`
लहानपणापासूनच आई-वडिलांच्या मायेला पारखा झालेला, पोरका मिलिंद प्रेमाच्या, मनःशांतीच्या ओलाव्याचा शोध घेत प्रवासी म्हणून निसर्गाच्या अंगा-खांद्यावर भटकत जंगलानं वेढलेल्या राधेकृष्ण मंदिराच्या आसऱ्याला क्षणिक विसाव्यासाठी येतो. तिथं त्याला ऋषितुल्य बाबा, त्यांच्या मुलीसारखी असणारी, त्यांच्यासोबत राहून मंदिरात सेवा देणारी नंदिनी व तिचा ७-८ वर्षांचा मुलगा भेटतात. विसाव्याच्या काही क्षणांसाठी आलेला मिलिंद या तिघांच्या सहवासात चार-सहा दिवस घालवतो. नंदिनीही आपल्या आयुष्यात जवळच्या माणसांना पारखी झालेली असते. आपल्या मुलाची जबाबदारी तिच्यावर असते. बाबांच्या प्रेमळ संरक्षक कवचात ती क्वचित येणाऱ्या वाटसरूंचीही बाबांबरोबर सेवा करत असते. तिच्या सात्त्विक, सुंदर व्यक्तिमत्त्वाचं आकर्षण मिलिंदला भुरळ पाडतं. तशात बाबा परिसरातील गावकऱ्यावर निसर्गातील जडीबुटींचे वैद्यकीय उपचार करण्यासाठी मदत करत असल्यानं, २-३ दिवस मिलिंदकडे नंदिनी-राहुलला सोपवून जातात; पण आधीच दुःखानं पोळलेली नंदिनी त्याला प्रतिसाद देण्यास घाबरते. पुन्हा एकदा वैवाहिक आयुष्याचा डाव मांडावा की नाही, याबद्दल तिची द्विधा अवस्था होते. अखेर मिलिंद तिची मनोवस्था जाणून, आपल्या पुढच्या वाटचालीकरता एकटाच निघण्याची तयारी करतो. ...पण बाबा येईपर्यंत त्याला थांबावे लागते. काय होते बाबा परत आल्यावर? बाबा त्या दोघांच्या मनाची उलघाल ओळखतात आणि सांगतात- ‘‘परिचय अल्प आणि दीर्घ नसतोच मुळी! दोन मनांची पुरी ओळख जिथं होते, तिथं मी एकमेकांकडे आकर्षिली जातातच मुळी! ही शक्ती अफाट सामर्थ्यदायी आहे. नदी सागराला मिळते, ती कोणत्या परिचयानं? वीस वर्षांपूर्वी मी इथं फिरत फिरत आलो. या मूर्तीपेक्षा अनेक सुंदर मूर्ती, अनेक सुंदर जागा मी पाहिल्या; पण तिथं माझं मन रमलं नाही. ही मूर्ती पाहिली आणि मी जिंकलो गेलो. हे का घडलं?`` अखेर बाबांच्या आशीर्वादानं दोघांची एकत्र वाटचाल सुरू होते.

No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarSmita Narayan

    प्रतीक्षा - रणजित देसाई ग्रुप वर मी प्रथमच पोस्ट करत आहे म्हणून माझ्या आवडत्या लेखकाचे पुस्तक निवडले, पण सर्वात प्रथम याच लघुकादंबरी बद्दल लिहावेसे वाटले..देसाईंच्या अनेक पुस्तक पैकी हे मला खूप जवळचे आहे, देसाईंची जी ठराविक लिखाण शैली आहे त्याहून हीमला थोडी वेगळी वाटली थोडी अनपेक्षित अशी ही कथा आहे, परंतु बाज तोच.. व्यक्त न झालेल्या भावना, पात्रांची दुःखे त्यांचा भूतकाळ या बद्दल ते असे लिहतात की डोळयांत सहज पाणी उभे राहते, त्यांच्या कथा ह्रदयाचा ठाव घेतात.. ही एक प्रेमकथा म्हणण्यापेक्षा भावकथा म्हणू शकता.कमी शब्दात ही कादंबरी त्यांनी मांडली आहे. कथेतील मिलिंद दुःखी आहे, प्रवासी आहे कशाच्या तरी शोधात तो एक हिमालयतील आश्रमात येतो. तिथे त्याची भेट बाबा, नंदिनीं, लहान राहुल यांच्याशी होते. त्यांच्या प्रेमळ वागण्याने तो सुखावून जातो आणि काही दिवस तिथे राहतो, नंदिनी ला पाहताक्षणी दोघांनाही एकमेकां बदल ओढ जाणवते, बाबांना या सर्व गोष्टी जाणवतात पुढे काय होते ते तुम्हाला कादंबरी वाचूनच कळेल..मला असे वाटते या कथेचा शेवट काय आहे यापेक्षा त्यांनी पुस्तकातून जीवना बदल, प्रेमबद्दल जे काही विचार मांडले आहेत ते खूप काही देऊन जातात मला या कथेत जर कोणते पात्र आवडले असेल तर ते आहेत बाबा..बाबा संन्यासी आहेत, परंतु त्यांच्या गतायुष्यात ते देखील प्रेम ,वैवाहिक जीवन यातून गेले आहेत..ते नंदिनी वर मुलीसारखे प्रेम करतात. स्वतःच्या वयाचा विचार न करता रुग्ण सेवा करतात. ते खूप प्रेमळ करुण आहेत. भटकलेल्या मिलिंद ला समजावून घेतात, त्यांच्यात आणि मिलिंद मधले सवांद म्हणजे कथेतला आत्मा आहेत आवर्जून सारखे सारखे वाचावे असे. निस्वार्थी प्रेम, वैवाहिक सुख, ईश्वर भक्ती, श्रद्धा, मृत्यू या बद्दल बाबा खूप भरभरून बोलतात. प्रेमाचा विशुद्ध ,सात्विक, तरल भाव या कथेत आहे जो मला खूप प्रिय आहे, असाच "अभोगी" मध्ये जाणवतो आणि खांडेकरांच्या `अमृतवेल` मध्ये पण...For me it`s a philosophical feast, we are looking for something and I hope we will find that someday.. मला आवडलेला एक परिच्छेद खाली देत आहे तुम्ही वाचा आणि तुम्हाला यामधील कोणता संवाद आवडला किंवा कोणत्या ओळी आवडल्या ते नक्की सांगा.. धन्यवाद. "ही बघ ना गौरंगी! कसल्या ओढीनं ती या पर्वतकड्यावरून झेप घेते आहे? ज्या ओढीननं ती या प्रचंड नगाधिराजाच्या मस्तकावरून झेपावत आहे, ती सागरतृष्णा खरोखरच एवढी श्रेष्ठ आहे का? जेव्हा ती सागराला मिळेल, तेव्हा या तपश्चर्येचं सार्थक होईल का? ह्यालाच का आपण प्रेम म्हणतो? हे प्रेम नव्हे. हे वासनेचं प्रतीक आहे. वासना प्रबळ आहे; पण त्याहीपेक्षा प्रेमाचा ओघ शतपटीनं प्रबळ असूनही त्यात रौद्रता नाही. त्यात समाधान आहे. सुख आहे आणि आज प्रमत्त्त होऊन पर्वतशिखरावरून झेपावणारी कर्पूरगंगा तन्वंगी प्रेमाचा अर्थ कळू लागल्यावर पुढे अधिक शांत, गंभीर होत असावी... ...Read more

  • Rating StarTushar Kute

    #पुस्तक_परीक्षण 📖 प्रतीक्षा ✍️ रणजित देसाई 📚 मेहता पब्लिशिंग हाऊस `पाहिलंस, मिलिंद, माणूस अंतर्मुख होण्याला केवढा भितो, ते ? दुसर्याच्या दुःखाकडे तो निर्विकारपणे पाहू शकतो. त्याच्या दुःखाची छाननी करू शकतो; पण स्वत:चं परीक्षण करताना मात्र तो वयाकूळ होतो. दुसऱ्याच्या जखमेवरची पट्टी चारचौघात त्याला बेदरकारपणे काढता येते; पण स्वत:च्या जखमेवरची पट्टी दूर करण्याच्या कल्पनेनंही तो कासावीस होतो... `याचं कारण?` कारण एकच... जीवनावर श्रद्धा. जीवन जगण्यात असलेला प्रामाणिकपणाचा अभाव. सारेच व्यवहार स्वार्थप्रेरित. मानव एकटाच जन्माला येतो आणि त्याला शेवटी एकटाच जावं लागतं, तरीही त्याला आयुष्यभर सोबतीची आवश्यकता असते ही सोबत तो शोधीत असतो. आयुष्य क्षणभंगुर आहे, हे माहीत असूनही, चिरंतन, शाश्वत प्रेमाचे ठिकाण त्याला हवं असतं; पण हे सारं स्वत:ला सुरक्षित राखून.... `दिल्याखेरीज काहीच मिळू शकत नाही. स्वतः हरवल्याखेरीज काही गवसत नाही. हे हरवण जो शिकला, त्यालाच ती शांती, ते समाधान मिळू शकेल. मात्र ते ठिकाण प्रत्येकानं शोधायला हवं... हिमालयाच्या कुशीमध्ये एक प्रवासी भटकत चालला आहे. वाटेत त्याची भेट एका संन्याशाची होते. तो एका तरुण स्त्री व तिच्या मुलासोबत राहत आहे. प्रवासी एका रात्रीसाठी त्याठिकाणी थांबतो. परंतु नंतर मात्र त्याचा पाय तेथून निघत नाही. तो त्या तरुण स्त्रीच्या प्रेमात पडतो. तिचा एक भूतकाळ आहे. त्यालाही तो सहजपणे स्वीकारतो व दोघांचे मिलन घडते. अशी साधी सरळ प्रेमकथा असलेली कादंबरी म्हणजे "प्रतीक्षा" होय. रणजीत देसाईंनी सुटसुटीतपणे घटनांची व प्रसंगांची मांडणी करून ही वाचकांसमोर सादर केलेली आहे. ती वाचत असताना आपण सतत हिमालयाच्या कुशीत वावरत राहतो. शिवाय संवादांची रचना मोठ्या प्रमाणात असल्याने तिच्याशी सातत्याने बोलतही राहतो, हे या कादंबरीची वैशिष्ट्ये होय. https://www.tusharkute. net/2021/04/pratiksha-ranjit-desai.html ...Read more

  • Rating StarPrashant Joshi

    अनेक वर्षांपूर्वी वाचली होती ही कादंबरी पण अजूनही सर्व घटना तशाच डोळ्यासमोर आहेत. मिलिंद जेव्हा थकून मठात येतो तेव्हा नंदिनी त्याच्यासाठी जेवणाची थाळी आणते, मात्र तोपर्यंत मिलिंद झोपी गेलेला असतो. त्यावेळचे बाबांचे वाक्य, `थकल्या शरीराला अन्नापेक्षा रामाची जास्त गरज आहे` हे मी अजूनही आचरणात आणतो😀 ...Read more

  • Rating StarPritam Katkar

    आज रणजित देसाई ह्यांची #प्रतीक्षा ही कादंबरी वाचून पूर्ण झाली. एक वेगळ्याच विश्वात ही कादंबरी घेऊन गेली.... कथेचा विषय असा... कादंबरीचा नायक मिलिंद अतृप्त आणि असफल प्रेमजीवणातून आलेल्या निराशेपोटी भटकत असतो. खऱ्या प्रेमाच्या शोधत तो फिरत फिरत हिालयातील एका मठात येतो. आणि तेथेच त्याची नंदिनी ह्या नायिकेशी गाठ पडते. मिलिंद अतिशय हलक्या व भावपूर्ण अंतःकरणचा आहे. तर नंदिनी सुंदर, सत्वशील, प्रेमळ, संयमी, कर्तव्यदक्ष आणि विचारी आहे. अतिशय अलगदपणे त्या दोघांनमधील भावबंध विणले जातात. ती हळूहळू घट्ट होणारी वीण वाचकाला मंत्रमुग्ध करते. तिसरी व्यक्तिरेखा ह्या कादंबरीतील बाबा (मठातील अध्यात्मिक गुरू) ही आहे. बाबाच्या व्यक्तीरेखेतून पाप, पुण्य, प्रेम जीवन परमेश्वर इत्यादी विषयांची वेगळी पण ठाम मते वाचकांसमोर येतात. कादंबरीतील वातावरण निर्मिती ही लक्षणीय आहे. कादंबरी वाचताना आपण देखील हिमालयात वावरत आहोत असा भास होतो. निसर्गवर्णनाबरोबरच लोकजीवणाचेही चित्रण येते आढळते. एखाद्या चित्रपटात शोभेल अशा प्रकारचे रहस्यपुर्ण कथानक रंगवून लेखकाने ही छोटेखानी कादंबरी वाचकांच्या मनाला भिडवण्याचा प्रयत्न केला आहे. ©प्रितम र. कातकर ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more