ASHOK BIRBAL JAIN

About Author


NA

अशोक बिरबल जैन हे वर्धा येथील प्रथितयश डॉक्टर दाम्पत्य आहे. आपले अद्यायावात ज्ञान व ‘जैन हॉस्पिटल’ या आधुनिक उपकरणांनी सुसज्ज व विविध सुविधा पुरविणाNया रुग्णालयाच्या माध्यमातून ते गेली ३० वर्षे गरजू रुग्णांना आपली सेवा पुरवित आहेत. डॉ. अरुणा या मूळच्या पुण्याच्या असून त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीत झाले आहे तर डॉ. अशोक हे मूळचे दिल्लीचे असून त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण देशाच्या राजधानीत झाले आहे. महात्मा गांधींच्या आशीर्वादाने स्वातंत्र्यसेनानी डॉ. सुशिला नायर यांनी सुरू केलेल्या सेवाग्राम येथील मेडिकल कॉलेजमध्ये दोघांनीही आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले व पदव्युत्तर शिक्षणानंतर गांधी - विनोबांची पवित्र कर्मभूमी वर्धा येथे आपले रुग्णालय सुरू केले. योगाभ्यास, निसर्गोपचार व वैकल्पिक चिकित्सा यामध्ये दोघांनाही गती आहे. गरजेनुसार रोगनिदान व रोगनिवारणाकरिता ते योग्य उपचारप्रणाली निवडतात. तसेच अनेक शासकीय व अशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाNयांकरिता व शाळा कॉलेजमधील अध्यापक व विद्याथ्र्यांकरिता वैद्यकीय उपचारांसोबत आध्यात्मिक जोड देणारे उपक्रम व कार्यशाळा राबवितात. मधुमेह, हृदयरोग व अस्थमा निवारण वेंÂद्राचे ते संचालक असून या विषयांवरील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ते सहभागी झालेले आहेत. आजपर्यंत विविध वैद्यकीय विषयांवर त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग केवळ अर्थाजनासाठी न करता सामाजिक ऋणातून मुक्त होण्यासाठी करणारे डॉ. जैन दाम्पत्य आजच्या पिढीसमोर रुग्णसेवेचे आदर्श उदाहरण ठरावे. अधिक माहितीसाठी : E-MAIL - ABJ@LIVE.IN
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
MADHUMEHA : EK AAVHAN Rating Star
Add To Cart INR 180

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ. मिना जोशी, नागपूर.

`छाटितो गप्पा` वाचताना असे वाटते की रोजच्या जीवनातील साधे साधे प्रसंग अतिशय नेटक्या शब्दात गुंफलेले आहेत. छाटितो गप्पांची सहज सुलभ मांडणी खूपच भावली.

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ. पद्मा घरोटे, बंगळुरू.

पुस्तकाचे शीर्षक एकदम छान. `करतो गप्पा`, `मारतो गप्पा` सुद्धा चाललं असतं पण `छाटितो गप्पा` एकदम चपखल . साधी सोपी सरळ मराठी/वर्हाडी भाषा मनाला भावली आणि भूतकाळात घेऊन गेली. लेखकाच्या अनगळ बाईंना वाचून मला माझे नववीतले ईंग्रजी शिकवणारे बडवे मास्र आठवले जे आम्हाला डस्टरनी डोक्यावर मारायचे. `गव्हातले खडे` कथेतील मराठी चौथ्या वर्गातला श्रावण बाळ डोळे ओले करुन गेला. जोशी साहेबांची खाला १९८५ मधिल चन्द्रपूरची आठवण करवून गेली. जून्या पूस्तकात ठेवलेल्या मोरपिसा सारख्या आठवणी बाहेर आल्या आणि पुन्हा पुस्तकात गेल्या. प्रत्येक माणसाच्या जीवनात अनेक बरे वाईट लोक येतात, पण त्यांना असं पुस्तकात रेखाटणं प्रत्येकालाच जमत नाही ते आवघड काम लेखकानं केलं, म्हणून लेखकाचं खूप खूप अभिनंदन आणि असंच छान छान लिहित राहण्याकरीता शुभेच्छा. ...Read more