ANNIE MURRAY

About Author

Birth Date : 01/01/1960


ANNIE MURRAY GRADUATED FROM OXFORD IN 1983. SHE HAS WORKED AS A JOURNALIST AND A NURSE, HAS HAD SHORT STORIES PUBLISHED IN SEVERAL MAGAZINES, AND WON THE SHE/GRANADA TELEVISION SHORT STORY COMPETITION IN 1991. SHE NOW LIVES IN READING WITH HER HUSBAND AND FOUR CHILDREN, BRUMMIES ALL. ANNIE MURRAY WAS BORN IN BERKSHIRE AND READ ENGLISH AT ST JOHNS COLLEGE, OXFORD. HER FIRST BIRMINGHAM NOVEL,BIRMINGHAM ROSE, HIT THE TIMES BESTSELLER LIST WHEN IT WAS PUBLISHED IN 1995. SHE HAS SUBSEQUENTLY WRITTEN MANY OTHER SUCCESSFUL NOVELS, INCLUDING A HOPSCOTCH SUMMER, SOLDIER GIRL AND THE BESTSELLING NOVELS CHOCOLATE GIRLS ANDWAR BABIES. NOW THE WAR IS OVER IS ANNIES TWENTIETH BOOK. ANNIE HAS FOUR CHILDREN AND LIVES NEAR READING.

अ‍ॅनी मरे यांचा जन्म बर्क शायरमध्ये झाला. १९८३मध्ये अ‍ॅनी यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून पदवी संपादन केली. त्यांनी पत्रकारिता केली आणि नर्स म्हणूनही काम केलं. बऱ्याच मासिकांमधून त्यांच्या लघुकथा प्रसिद्ध झाल्या. १९९१मध्ये एका टीव्ही वाहिनीच्या लघुकथा स्पर्धेत त्या विजयी ठरल्या. ‘बर्मिंगहॅम’वर लिहिलेल्या त्यांचच्या कादंबऱ्यामधील पहिली कादंबरी ‘बर्मिंगहॅम रोज’ १९५५ मध्ये प्रकाशित झाली आणि ‘टाइम्स’च्या सर्वोत्कृष्ट खपाच्या यादीत प्रथम क्रमांकावर आली. त्यानंतर त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या, ज्या यशस्वी ठरल्या. जसे, ‘ए हॉपस्कॉच समर,’ ‘सोल्जर गर्ल’ इ. ‘चॉकलेट गल्र्स’ आणि ‘वॉर बेबीज’ या त्यांच्या बेस्टसेलर ठरलेल्या आणखी दोन कादंबऱ्या ‘नाऊ द वॉर इज ओव्हर’ हे अ‍ॅनी यांचं विसावं पुस्तक. त्यांना चार मुले आहेत. त्या रीडिंग येथे राहतात.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
MY DAUGHTER MY MOTHER Rating Star
Add To Cart INR 495

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more