ANNIE MURRAY

About Author

Birth Date : 01/01/1960


ANNIE MURRAY GRADUATED FROM OXFORD IN 1983. SHE HAS WORKED AS A JOURNALIST AND A NURSE, HAS HAD SHORT STORIES PUBLISHED IN SEVERAL MAGAZINES, AND WON THE SHE/GRANADA TELEVISION SHORT STORY COMPETITION IN 1991. SHE NOW LIVES IN READING WITH HER HUSBAND AND FOUR CHILDREN, BRUMMIES ALL. ANNIE MURRAY WAS BORN IN BERKSHIRE AND READ ENGLISH AT ST JOHNS COLLEGE, OXFORD. HER FIRST BIRMINGHAM NOVEL,BIRMINGHAM ROSE, HIT THE TIMES BESTSELLER LIST WHEN IT WAS PUBLISHED IN 1995. SHE HAS SUBSEQUENTLY WRITTEN MANY OTHER SUCCESSFUL NOVELS, INCLUDING A HOPSCOTCH SUMMER, SOLDIER GIRL AND THE BESTSELLING NOVELS CHOCOLATE GIRLS ANDWAR BABIES. NOW THE WAR IS OVER IS ANNIES TWENTIETH BOOK. ANNIE HAS FOUR CHILDREN AND LIVES NEAR READING.

अ‍ॅनी मरे यांचा जन्म बर्वÂशायरमध्ये झाला. १९८३मध्ये अ‍ॅनी यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून पदवी संपादन केली. त्यांनी पत्रकारिता केली आणि नर्स म्हणूनही काम केलं. बNयाच मासिकांमधून त्यांच्या लघुकथा प्रसिद्ध झाल्या. १९९१मध्ये एका टीव्ही वाहिनीच्या लघुकथा स्पर्धेत त्या विजयी ठरल्या. ‘बर्मिंगहॅम’वर लिहिलेल्या त्यांचच्या कादंबNयांमधील पहिली कादंबरी ‘बर्मिंगहॅम रोज’ १९५५ मध्ये प्रकाशित झाली आणि ‘टाइम्स’च्या सर्वोत्कृष्ट खपाच्या यादीत प्रथम क्रमांकावर आली. त्यानंतर त्यांनी अनेक कादंबNया लिहिल्या, ज्या यशस्वी ठरल्या. जसे, ‘ए हॉपस्कॉच समर,’ ‘सोल्जर गर्ल’ इ. ‘चॉकलेट गल्र्स’ आणि ‘वॉर बेबीज’ या त्यांच्या बेस्टसेलर ठरलेल्या आणखी दोन कादंबNया. ‘नाऊ द वॉर इज ओव्हर’ हे अ‍ॅनी यांचं विसावं पुस्तक. त्यांना चार मुले आहेत. त्या रीडिंग येथे राहतात.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
MY DAUGHTER MY MOTHER Rating Star
Add To Cart INR 495

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more