* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MAGARDOHA
  • Availability : Available
  • ISBN : 9789353172480
  • Edition : 1
  • Publishing Year : JUNE 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Sub Category : CRIME & MYSTERY, THRILLER / SUSPENSE
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
‘MAGARDOH’ IS A COLLECTION OF ELEVEN STORIES REVOLVING AROUND THE MENTAL-PHYSICAL METAMORPHOSIS THAT HAPPENS IN A WHIRLPOOL OF MYSTERIOUS AND MYTHOLOGICAL REALMS. THE FIRST OF THESE STORIES, ‘GHATCHAKRA’, DEALS WITH THE CONCEPT OF REBIRTH. SHAMKANT IS TRAVELLING ON A TRAIN WITH HIS WIFE, AND THE CONVERSATION BRINGS UP JULIE PARERA, HIS ERSTWHILE SECRETARY. SHAMKANT IS DISTURBED BY THE MEMORY AND EVENTUALLY GOES MISSING DURING THE JOURNEY. ‘GHATCHAKRA’ DEPICTS THE MYSTERY BEHIND HIS SUDDEN DISAPPEARANCE AND THE EVENTFUL SEARCH FOR HIM. THE PROTAGONIST OF THE STORY ‘SUN 1860CHAA RUPAYA’ ACCIDENTALLY FALLS INTO A DITCH, AND WHEN HE COMES TO HIS SENSES, HE FINDS HIMSELF IN THE YEAR 1860. THE STORY NAMED ‘CHAKVAA’ TALKS ABOUT SANJAY GITE WHO HAS LEFT HIS HOMETOWN VERY EARLY IN HIS LIFE. HE COMES BACK TO HIS HOME IN THE TWILIGHT OF HIS LIFE, AND GETS A FEELING THAT HIS HOUSE IS STILL BEING INHABITED BY HIS FAMILY MEMBERS. BUT UPON NOT SEEING A SINGLE HUMAN BEING, HE DECIDES THAT HIS VENGEFUL NATURE HAS CAUSED HIS FAMILY TO BECOME INVISIBLE. THE DEPTH OF THIS MYSTERY HOLDS THE READERS SPELLBOUND. THE STORIES ‘REKHACHA AARSA’ AND ‘RANJANACHI PRATIMA’ TOO PORTRAY THEIR HEROINES ENTANGLED WITH SOME INEXPLICABLE VIBES. THE VERY IDEA OF REKHA GIFTING A MIRROR TO HER BOYFRIEND, AND THEN MATERIALIZING OUT OF THE SAME MIRROR EVERY NIGHT TO MEET HIM, GIVES GOOSE-BUMPS. AND RANJANA, FROM ‘RANJANACHI PRATIMA’ TOO HOLDS YOU WONDERSTRUCK WITH HER MYSTERIOUS PERSONA. FINALLY ABOUT ‘MAGARDOH’, THE STORY THAT FORMS THE TITLE OF THE COLLECTION. IT TAKES YOU TO THE SHEER CRESCENDO OF SUSPENSE. THIS STORY IS ALL ABOUT THE MYSTERIOUS AURA THAT A PARTICULAR PAINTING APPEARS TO CREATE AROUND ITSELF. THE OTHER STORIES, NAMELY ‘PAHELI’, ‘ARUNDHATICHA DABA’, ‘BAND PAAKIT’, ‘DOKEDUKHI’, ‘UJAALI’ TOO WEAVE AN ENIGMATIC WEB OF HUMAN PSYCHE, ITS MYSTERIES AND THE MERCURIAL NATURE OF LIFE ITSELF. THE AUTHOR LOOKS AT THE DAY-TO-DAY, ROUTINE INCIDENTS AND TURNS THEM INTO A MAZE OF PUZZLES WITH HIS IMAGINATION. THE WHOLE EFFECT, GIVES THE READER A READING EXPERIENCE TO REMEMBER.
रहस्यं आणि मिथकांच्या चक्रव्यूहात बदलणारी मनोदैहिकता टिपणाऱ्या अकरा गूढकथांचा संग्रह म्हणजे मगरडोह होय. पुनर्जन्मावर आधारित पहिलीच कथा ‘घातचक्र’..पत्नीसह रेल्वेप्रवासाला निघालेल्या श्यामकांतच्या गप्पांमध्ये त्याची गतकाळातील स्टेनो कम सेक्रेटरी असलेल्या ज्यूली परेराचा विषय निघतो आणि श्यामकांत अस्वस्थ होतो. त्याच प्रवासात श्यामकांत अचानक गायब होतो..श्यामकांतच्या या गायब होण्यामागचं रहस्यं आणि त्याच्या शोधाचा थरार यांची विलक्षण गुंफण ‘घातचक्र’मध्ये अनुभवास येते. ‘सन १८६०चा रुपया’ या कथेतील नायक एका लहानशा अपघातात एका खड्ड्यात पडतो. पण त्याला जाग येते तेंव्हा तो थेट १८६० सालात पोहोचलेला असतो. तर ‘चकवा’ ही कथा आहे घरदार सोडलेल्या संजय गितेची. हा गिते उतारवयात आपल्या मूळ गावी भेट देतो, त्या घरात माणसांच्या वावराच्या खुणा असतात; पण एकही माणूस त्याच्या दृष्टीला पडत नाही. त्यामुळे ते आपल्या मनाची अशी समजूत करून घेतात, की आपल्या मनातील सूड भावनेमुळे आपलं कुटुंब नाहीसं झालं आहे. संजय गितेभोवतीचं हे गूढवलय वाचकांनाही गुंगवून सोडतं. ‘रेखाचा आरसा’ आणि ‘रंजनाची प्रतिमा’ या कथांच्या नायिकाही अशाच विस्मयकारक जाणिवांशी जोडलेल्या आहेत. आपल्या मित्राला आरसा भेट देणारी रेखा, त्या आरशातूनच रोज रात्री त्याला भेटायला येते ही कल्पनाच थरारक वाटते. तर ‘रंजनाची प्रतिमा’ कथेतली रंजना एखाद्या गूढ नायिकेसारखी स्तंभित करते. कथासंग्रहाचं शीर्षक असणारी ‘मगरडोह’ही कथाही उत्कंठेचा शिरोबिंदू गाठायला लावणारी आहे. एका चित्राभोवती फिरणारी गूढता या कथेत रहस्यमयरीत्या साकारलेली आहे. ‘पहेली’, ‘अरुंधतीचा डबा’, ‘बंद पाकीट’, ‘डोकेदुखी’, ‘उजाली’या कथाही माणसाचे मनोव्यापार...त्या मनोव्यापारांतील गूढता...मानवी जीवनातील अतर्क्यता...याचं रंजकतेने चित्रण करतात. लेखक दैनंदिन जीवनातील साधे प्रसंग घेऊन अशा प्रसंगांनाही एका अनामिक गूढवलयाशी जोडतो. आणि वाचकाला नवी वाचनानुभूती देतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MAGARDOHA #WHODUNITS #MYSTERY #SHASHIKANTWAMANKALE #RATNAKARMATKARI #MARATHIBOOKS #BABURAOARNALKAR #GURUNATHNAIK #MARATHILITERATURE #मगरडोह #शशिकांतवामनकाळे #रहस्यकथा #गूढकथा #मराठीसाहित्य #रत्नाकरमतकरी #मराठीपु्स्तके #बाबूरावअर्नाळकर #गुरूनाथनाईक
Customer Reviews
  • Rating StarEknath Marathe

    ईबुक वाचायला लागलेला एकूण वेळ 3 तास. .... लेखकाचा हा गूढकथा संग्रह आहे. या सर्वच गोष्टी आधी प्रकाशित झाल्या आहेत व या पुस्तकात संकलित केल्या गेल्या आहेत. यातले गूढ अगदी साध्या साध्या गोष्टीतून आकार घेवू लागते व सावकाश उकल करून गोष्ट संपते. धक्का ंत्र,कलाटणी, प्रसंगाचे भयानक वर्णन .. असे साचेबद्ध गूढ कथानक कोठेही नाही पण सर्वच कथा परिणाम मात्र करतात. गोष्टीत असलेली पात्रे सुद्धा अगदी साधी, रोज भेटणारी आहेत. भूताशी किंवा भयाशी थेट लढत नाही. भूत इथे तुम्हाला घाबरवण्यासाठी येत नाही. मुद्दाम वाचकांना भूतावर विश्वास ठेवा असे सुद्धा सांगितलेले नाही. अनेक गोष्टीत मानसशास्त्र सुद्धा विचारात घेतले आहे. कथेत तीव्र चढ उतार नाहीत. पण गूढ प्रत्येक ओळी बरोबर पकड घेत जाते, अगदी संथपणे ! वेगळ्या बाजाच्या या गूढकथा जरूर वाचायला हव्यात. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 01-08-2019

    गूढकथांच्या डोहातला थरार... हुलकावण्या, चकवा, उत्कंठा, नाट्यमयता, अनाकलनीय, अमानवी पात्र, भयावह प्रसंग यांच्या समग्र भट्टीत जन्म घेते ती एखादी रहस्यमय, गूढ कथा. दृश्यमाध्यमातून ते प्रेक्षकांसमोर मांडताना संगीत, कॅमेरा यांची भूमिका विशेष असते. मात्र ुस्तकातून ज्यावेळी एखादी कथा तुम्ही वाचकांच्या हाती सोपवली जाते ते काम कर्मकठीण. कारण प्रसंग, संवाद, पात्र यांची पकड मजबूत असावीच लागते, पण तुमची कल्पनेची बैठकदेखील तितकी मजबूत असणे गरजेचे असते. लेखक शशिकांत काळे यांनी ‘मगरडोह’ या कथासंग्रहात गूढ कथेच्या सर्व कक्षांना सामावण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. यातील घातचक्र, मगरडोह, अरुंधतीचा डबा, बंद पाकीट, उजाली यांसारख्या कथा वाचकांना थरार आणि भीतीच्या प्रांतात मुक्त संचार करून आणतात. ...Read more

  • Rating StarSHIVMARG - AUGUST 2019

    रंजक गूढकथांचा वाचनीय संग्रह... कथा हा वाङ्मय प्रकार सर्वसाधारणपणे वाचकाच्या आवडीचा असतो. गूढकथा हाही तसा वाचकप्रिय प्रकार. ‘मगरडोह’ या कथासंग्रहातून शशिकांत काळे यांनी एकूण अकरा गूढकथा वाचकांच्या भेटीला आणल्या आहेत. रत्नाकर मतकरींची अभ्यासपूर्ण प्स्तावना या गूढकथासंग्रहाला लाभली आहे. ‘घातचक्र’ ही कथा पुनर्जन्मावर आधारित आहे. श्यामकांत हा एका कंपनीचा मालक आपली पत्नी सुमनसह अमावस्येच्या दिवशी रेल्वेतून प्रवास करत असतो. त्यावेळी बोलता बोलता सहज त्याच्या कंपनीत पूर्वी (श्यामकांत व सुमनच्या विवाहापूर्वी) स्टेनो कम सेक्रेटरी असलेल्या ज्यूली परेराचा विषय निघतो आणि श्यामकांत अस्वस्थ होतो. त्यानंतर श्यामकांत त्या प्रवासात सुमनच्या नकळत मध्येच कुठेतरी उतरतो. सुमन पोलिसांच्या साह्याने त्याच्यापर्यंत पोहोचते. कुठे गेलेला असतो श्यामकांत? तिथे गेल्यावर त्याच्या पूर्वजन्माचं स्मरण त्याला कोण करून देतं? पूर्वजन्मात ज्यूलीशी आणि सुमनशी त्याचा काय संबंध असतो? ‘सन १८६०चा रुपया’ या कथेतील प्रल्हाद घाटगे त्याची पत्नी अरुणाबरोबर लोणावळ्याला वर्षासहलीसाठी गेलेला असतो. लोणावळ्यात एका ठिकाणी ते दोघं फिरायला गेलेले असताना अचानक तो एका खड्ड्यात पडतो आणि त्याच्या अंगावर बरीच माती पडते. त्याला जेव्हा जाग येते तेव्हा तो एका तंबूत असतो. काही दिवसांनी त्याच्या असं लक्षात येतं, की त्या अपघातानंतर तो २००७ सालातून १८६० सालामध्ये पोचला आहे. आता त्याच्यासमोर प्रश्न असतो, २००७मध्ये कसं परतायचं? ‘चकवा’ ही कथा आहे संजय गिते ऊर्फ S.G. ची. S.G. नी लहानपणीच आई-वडिलांवर रागावून त्यांच्या नकळत जुनापाडा येथील त्यांचं घर सोडलेलं असतं. त्यानंतर त्यांचा घराशी काहीच संपर्क नसतो. आता डहाणूत बायको आणि बावीस वर्षाचा मुलगा रंजन याच्यासह ते सुखनैव जगत असतात; पण रंजनच्या आग्रहावरून आपलं गाव, आपले कुटुंबीय याविषयी ते रंजनला सांगतात. रंजन त्यांच्या गावी जाऊन येतो आणि आजी, काका-काकू यांचे फोटो काढून आई-वडिलांना दाखवायला आणतो; पण S.G. ना त्या फोटोत एका मध्यमवयीन अनोळखी बाईशिवाय कोणीच दिसत नाही. एकदा ते कुणाला न सांगता आपल्या गावी स्वत:च्या घरी जातात. त्या घरात माणसांच्या वावराच्या खुणा असतात; पण एकही माणूस त्यांच्या दृष्टीला पडत नाही. त्यामुळे ते आपल्या मनाची अशी समजूत करून घेतात, की आपल्या मनातील सूड भावनेमुळे आपलं कुटुंब नाहीसं झालं आहे. काय असतो हा प्रकार? ‘रेखाचा आरसा’ या कथेत एक तरुण मुंबईहून कारवारला ‘आयनापूर’ नावाच्या गावात ऑफिसच्या कामासाठी गेलेला असतो. त्याच्या प्रकाश नावाच्या मित्राच्या घरी त्याची राहायची सोय केलेली असते. प्रकाश स्वत: नोकरीनिमित्त बाहेरगावी असतो. त्याच्या अनुपस्थितीत त्याची बहीण रेखा आणि त्याची आई या तरुणाचा पाहुणचार करतात. त्या वास्तव्यात त्या तरुणाची आणि रेखाची चांगली मैत्री होते. रेखाने त्याला एक मोठा आरसा भेट म्हणून दिलेला असतो. तो मुंबईला आल्यावर आपल्या बेडरूममध्ये तो आरसा लावतो. त्या आरशातून रेखा रोज रात्री त्याला भेटायला यायला लागते. पुढे काय होतं? ‘रंजनाची प्रतिमा’ या कथेतील तरुण चंदनपूर या गावी त्याच्या वडिलांनी बांधलेलं घर विकण्याच्या दृष्टीने गेलेला असतो. त्याच्या त्या घरात रंजना सामंत नावाची विधवा तरुणी एकटीच राहत असते. त्या तरुणाच्या वडिलांकडून विकत घेतलेली शेती ती कसत असते. हा तरुण तिच्यासमोर घर विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवतो, तेव्हा ती दोन-तीन वर्षांची मुदत मागून घेते. पहिल्या वेळेस त्याच्याशी मोकळेपणाने वागलेल्या रंजनाबाबत नंतरच्या दोन-तीन वर्षांत त्याच्या मनात एका बाबतीत शंका उत्पन्न होते. रंजना घर विकत घेते का? त्याचं शंकानिरसन होतं का? ‘मगरडोह’ या कथेत डॉ. कर्वे या मानसोपचारतज्ज्ञांच्या मुंबईतील क्लिनिकच्या रिनोव्हेशनच्या दरम्यान एक धबधब्याचं चित्र त्यांच्या केबिनमध्ये लावलं जातं. S.G. (संजय गिते) या त्यांच्या मित्राला त्या चित्रात काहीतरी विचित्र वाटत असतं. पौर्णिमेच्या दिवशी ते चित्र प्रकाशमान होत असतं. ते चित्र लावल्यापासून दोन-तीन वेळा कर्व्याच्या हाताला जखम झालेली असते आणि ज्या ज्या वेळेला त्यांच्या हाताला जखम झालेली असते, त्यावेळी अमावस्या असते. कर्व्याना त्याबाबतीत वेगळं काही वाटत नाही; पण S.G. आणि लेखक यांना मात्र त्या चित्राबाबत काहीतरी गूढ वाटत असतं. उकलतं का ते गूढ? तर ही आहे या कथासंग्रहातील काही कथांची झलक. अगदी साध्या निवेदनातून या कथा पुढे सरकत राहतात. गूढकथांप्रमाणे गूढ किंवा भयप्रद वातावरणनिर्मिती काळे करत नाहीत. सर्वसामान्य माणसाच्या भावभावनांना थोड्याशा गूढातून भिडतात; पण त्यांचं निवेदन वाचकाला खिळवून ठेवतं. तेव्हा रंजक अशा या कथा वाचकांनी आवर्जून वाचाव्या अशा आहेत. रत्नाकर मतकरींची प्रस्तावना नवोदितांसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे. -अंजली पटवर्धन ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more