* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MUKESH WAS LEADING A NORMAL LIFE, HAPPY, CONTENTED. SUDDENLY, THERE APPEARED A STORM IN HIS LIFE. THE STORM WAS LIKE A HURRICANE. IT SHATTERED EVERYTHING, IT CHANGED EVERYTHING RELATED TO HIS LIFE. IT ACTUALLY CHANGED HIS LIFE. TILL THEN HE WAS STRONGLY AND FIRMLY TIED UP TO HIS FAMILY. BUT THE STORM BROKE THE VERY CORD THAT HAD TIED HIM TO HIS FAMILY. WHO WAS HE? WHICH RELATIONS WERE REAL? THE BLOOD RELATIONS OR THE RELATIONS WHICH WERE BUILT UP? HE SET FOR A JOURNEY IN SEARCH OF ANSWERS TO THESE QUESTIONS, IN A WAY, HE WAS TRYING TO FIND OUT ANSWER TO HIS BEING ITSELF. A VERY LONGING, EXCITING NOVEL BY SUDHA MURTI, THE FAMOUS KANNADA AUTHOR, IN HER ELUCIDATING STYLE.
मुकेशचं आयुष्य तसं अगदी सुखासमाधानात चाललं होतं, अचानक एक वादळ उठलं. झंझावातासारख्या आलेल्या या वादळानं त्याचं आयुष्य पार बदलून गेलं. एक बळकट कौटुंबिक बंध अचानक तुटून गेला... कोण होता तो? मानलेली नाती खरी की, रक्ताची नाती श्रेष्ठ? अशा अनेक प्रश्नांचा शोध घेता घेता त्याचा स्वत:च्या अस्तित्वाचा शोध सुरू झाला. प्रख्यात कन्नड साहित्यिक सुधा मूर्ती यांच्या विवेचक लेखणीतून साकारलेली उत्कंठावर्धक कादंबरी

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating Starसौ. अपर्णा अनंत मिसे

    नमस्कार मंडळी, सुधा मूर्ती यांची *अस्तित्व* ही कादंबरी कन्नड भाषेत आहे. त्याचा अनुवाद प्रा. ए.आर.यार्दी यांनी केला. त्यांची मराठीतील ही पहिलीच कादंबरी आहे. सुधा मूर्ती यांचा जन्म १९५० साली कर्नाटक राज्यातल्या शिग्गाव येथे झाला. त्यांनी कॉम्प्युटर साय्स या विषयातील एम टेक ही पदवी प्राप्त केली आहे. पुणे येथे `टेल्को` कंपनीत निवडल्या गेलेल्या त्या पहिल्या स्त्री अभियंत्या होत्या. समाजोपयोगी कार्यासाठी त्या विख्यात आहेत.२००६ मध्ये भारत सरकार तर्फे `पद्मश्री` पुरस्काराने, तसेच २०२३ मध्ये `पदमभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. `पर्सन ऑफ द इयर` हा मानाचा पुरस्कारही त्यांना मिळाला. तर अशा या भारत भूषण सुधा मूर्तींची कन्नड ही मातृभाषा असली तरीही, मराठी भाषेची त्यांना जाण आहे. अस्तित्व ही कादंबरी बऱ्याच भाषेत वेगवेगळ्या नावाने भाषांतरित झाली आहे. १००पानी ही कादंबरी असून त्याचा सारांश लिहिण्याचा प्रयत्न करते.बघू जमते का? मुकेश व वासंती स्वित्झर्लंडला राहणारे भारतीय जोडपे. मुकेश चे वडील म्हणजे कृष्णराव, रावसाहेब म्हणून प्रसिद्ध. पण ते आपल्या मुलासोबत मित्रासारखे वागत.रावसाहेबांनी आपल्या मुलाला कोणत्याही बाबतीत कधी आग्रह केला नाही. वासंती मैसूरमधल्या ब्राह्मण वस्तीत सोवळेपणाच्या सावलीत लहान ची मोठी झाली. असे हे लव मॅरेज. घरातल्या कोणीच त्यांना नकार दिला नाही. कारण दोघेही एकमेकांना अनुरूप असेच होते. वधूपरीक्षेचे फक्त नाटक झाले. वासंती लग्न होऊन रावसाहेबांच्या घरात आली. ती सून म्हणून नव्हे तर मुलगी म्हणून. सून आल्याने तर सुमतीला आनंदाचे उधाण आले. वास्तविक मुकेश ला नोकरी करायची गरजच नव्हती. पण त्याला रावसाहेबांच्या उद्योगात रस नव्हता. पण त्याचा मेव्हणा सतीश (निरज चा नवरा)ला मात्र रस होता. मुकेश ला खूप शिकायची इच्छा होती .त्यामुळे रावसाहेबांनी त्याला नकार दिला नाही. त्या उलट आईचा म्हणजे सुमतीचा नकार होता .आई त्याला `मुन्ना` म्हणत असे आणि मुकेश आईला `अम्मा` म्हणत असे. जुन्या आठवणींना कवटाळून मुकेश उठून उभा झाला व तितक्यात समोरून वासंती स्केटिंग करत आली.तिचा तोल गेला आणि खाली पडली. तिच्या स्नायूंना दुखापत झाल्याने मुकेशने तिला दवाखान्यात अॅडमिट केले. स्नायू दुखावल्याने आठवडाभराची विश्रांती सांगितली.तिला अॅडमिट करून मुकेश घरी आला. तसा त्याला आपली बहीण नीरजाचा रडूनच फोन आला. "मुन्ना, बाबांना हार्ट अटॅक आलेला आहे लगेच निघून ये". मुन्नाने लगेच ट्रॅव्हल एजंटला सांगितले भारतात बेंगलोरला जायचे आहे एक तिकीट पाहिजे.त्याने लगेच कपडे चढवले व तडक हॉस्पिटलला निघाला. वासंतीच्या तब्येतीने तिला घेऊन जाणे अशक्य व तिला एकटीला ठेवणेही कठीण. अशा व्दिधा:मनस्थितीत असतांना वासंती म्हणाली,"माझी काळजी करू नका तुम्ही लगेच निघा. घरी आई व नीरजाची काय अवस्था असेल?"लाजऱ्या मुकेशला मित्र मोजकेच पण बडबड्या वासंतीला भरपूर ओळखी असल्यामुळे ती एकटी पडणार नाही याची खात्री मुकेशला होती. आणि म्हणून मुकेश बेंगलोर साठी रवाना झाला. रावसाहेब मोठे उद्योगपती ते लंडनला असून सुद्धा त्यांनी कधीही मांसाहार किंवा मद्यपान केले नाही. बाहेर कितीही मोठी पार्टी असली तरीही घरी येऊन ते सुमतीने केलेले परोठे खाणार व अम्माच्या हातच्या परोठ्याची चव फाइव स्टार हॉटेलला पण येणार नाही असे म्हणायचे .तेव्हा प्रेम असतं ते असं! वडिलांची तब्येत चांगली ठणठणीत होती. मागच्याच महिन्यात काही कामानिमित्त रावसाहेब लंडनला आले. जातांना त्यांनी दोन हजार पौंड रक्कमेचा चेक दिला." मुन्ना, तुझ्या वाढदिवसासाठी". एक जानेवारीला वाढदिवसासाठी दोन हजार पौंड पाठवले होते व आता परत हे कशासाठी ? " आई तुझा वाढदिवस बुद्ध पौर्णिमेला साजरा करते ना त्यासाठी आगाऊ रक्कम". असे मुकेशचे म्हणजे मुन्नाचे दोन वाढदिवस साजरा व्हायचे. रावसाहेबांच्या आठवणीने त्याचे डोळे पाणावले .`बाबांना काय झालं असेल`? आपण जाण्याच्या आत काही बरं वाईट झालं तर?..... या विचारांनी तो हादरला. त्याने गळ्यातल्या साखळी कडे हात नेले. प्रार्थना केली-`गुरुदेव वडिलांचं रक्षण करा`. तितक्यात एअर होस्टेस आली आणि तिने सांगितले बेंगलोर जवळ आलंय. विमानतळा बाहेर आल्याबरोबर मुकेशला गाडी घेऊन आलेला शफी ड्रायव्हर दिसला. गाडीत बसल्यावर शफीला विचारले,"शफी, बाबा कसे आहेत?" त्याने मान खाली घातली. "बाबा कसे आहेत, सांग ना!" आज पहाटे चार वाजता..... म्हणजे रावसाहेब आता नाहीत!......... त्याला कल्पनाच करवेना. वडील आपल्याला सोडून गेले. कोणतीही समस्या वडिलांसमोर ठेवल्याशिवाय मुकेशला चैन पडत नसे. ती समस्या चांगली असो या वाईट त्याच्यावर कधीच रागावले नाही. नेहमी म्हणायचे, "मुन्ना,माणूसच चूक करतो. त्यासाठी वाईट वाटून घेऊ नये". अशा या वटवृक्षाच्या छायेत मुन्ना व त्याची बहीण नीरजा दोघेही आरामात होती. आता तो वटवृक्ष कोसळला. गाडी दारापुढे उभी राहिली. खूप प्रथितयश, नामवंत लोकं आली होती‌ .मुकेश सरळ वडिलांच्या पायाशी जाऊन बसला. एकटक त्यांच्या देहाकडे बघू लागला. निश्चिंतपणे झोपल्यासारखे दिसत होते.` खरंच, बाबा गेले?........ "मुन्ना!"sssss म्हणून नीरजाने त्याला मिठी मारली. अम्मा रडलीच नाही. "मुन्ना, तू आल्यावर तरी....?" दोघेही आईच्या कुशीत शिरले ओक्साबोक्सी रडू लागले . अस्थी विसर्जनासाठी श्रीरंगपट्टण येथे मुकेश जायला निघाला, तेव्हा वडिलांचे मित्र व वकीलही असलेले श्री जोशी काका आले व म्हणाले," राव साहेबांनी मृत्युपत्र लिहिले तुम्ही केव्हा मोकळे आहात ?"आणि मला त्या संबंधात एक कागद हवा आहे. तेव्हा मुकेश म्हणाला, "सध्या तरी दोन दिवस वेळ नाही. नीरूला विचारा ती देईल तुम्हाला हवं ते कागदपत्र." आणि आपण दोन दिवसांनी भेटू काका. दोन दिवसांनंतर वकील आले. मृत्युपत्र वाचून दाखवू लागले. बँकेत ठेवलेल्या सर्व एफडी चा अर्धा वाटा नीरजला व उरलेला अम्माला शिवाय उरलेली सर्व संपत्ती म्हणजे जवळपास २० कोटी असावी ही मुकेशच्या नावावर .त्यावेळेस मुकेश वकिलाला म्हणाला, की माझ्या संपत्तीतला अर्धा वाटा मी ताईला देऊ शकेल का? तसा सतीश म्हणाला, "मुन्ना, अर्धा वाटा लिहून द्यायला तुला हक्क नाही .कारण तू या संपत्तीचा वारस नाही. म्हणजे तू सख्खा मुलगा नाहीस. पाळलेला मुलगा आहे पाळलेला..... नीरजा ही त्यांची मुलगी आहे. माझ्याजवळ पुरावा आहे. सतीश ने मुकेश समोर एक फोटो धरला. मुकेश व नीरजाचा लहानपणीचा फोटो. हा कसला पुरावा?... ज्यावेळेस जोशी काकांना कागदपत्र पाहिजे होते, त्यावेळेस नीरजानी वडिलांच्या कपाटात कागदपत्र शोधतांना तिला लहानपणीचा फोटो दिसला. म्हणून ती उत्सुकतेने मुन्ना व माझा फोटो म्हणून धावतच घेऊन आली. पण सुरज ने तो फोटो बघितला व त्या मागील तारीख बघितली .झालं ....त्याला असुरी आनंद झाला. फोटोच्या मागे २-२-१९७०अशी तारीख होती. पिक्चर पॅलेस, जालना, महाराष्ट्र असा पत्ता लिहिलेला होता. सतीश एखाद्या वकीलासारखा मुकेश ला प्रश्न विचारू लागला. मुन्ना,"निरुचा वाढदिवस कधी आहे?" "३१डिसेंबर ६७" म्हणजे "नीरु ,तुझ्यापेक्षा किती मोठी आहे?" "दोन वर्षे एक दिवस ". "तुझी जन्मतारीख १-१-१९७० आणि या फोटोच्या पाठीमागे २-२-१९७० असे लिहिले आहे. म्हणजे हा फोटो काढला तेव्हा तुझं वय फक्त एक महिना एक दिवस एवढंच असायला हवे ना?" मग यात तुझी किंवा नीरजाची जन्मतारीख चुकीची आहे. सतीश चे वकिली डोके तसे फार तल्लख .तो नीरु व मुन्ना यांच्या जन्मतारखेचा हिशोब करू लागला. मुले लहान असताना दोन वर्षांमधले आणि चार वर्षांमधले अंतर सहजपणे लक्षात येते. नंतर ती मोठी झाली की अठ्ठावीस आणि तिशीच्या दरम्यान काहीच फरक जाणवत नाही. त्यामुळे यांच्या जन्मतारीखेत काहीतरी रहस्य दडलेले आहे. सतीश विचार करू लागला ‌. सतीश ने अम्माकडे फोटो केला व विचारलं ,"अम्मा, खरं सांगा तुमचं अपत्य कोण? नीरजा की मुन्ना?" "अम्मा, तुम्ही खरं काय ते नाही सांगितलं तर नीरुचा संसार उध्वस्त होईल ." शांतपणाने पण अत्यंत दुःखाने, कष्टाने सुमती एक एक शब्द उच्चारू लागली. तिची नजर जमिनीशी बोलत होती. "नीरू, तू माझी मुलगी आहेस. मुन्ना हा माझा मानलेला मुलगा आहे .पण मी त्याच्यावर पोटच्या पोरापेक्षाही जास्त प्रेम केलंय." "अम्मा ,ही गोष्ट मला का सांगितली नाहीस?" मुकेशने विचारलं . "बाबा मला सगळं काही सांगत होते .मित्राप्रमाणे वागत होते मग त्यांनी सुद्धा मला का सांगितलं. नाही?"मुन्ना ,तुला खरी गोष्ट कळली तर, तू मोठा झाल्यावर जन्म दिलेल्या आईकडे जाशील. म्हणून मला भीती वाटत होती. तुझ्यावरच्या माझ्या मोहामुळे तुला सांगितलं नाहीस. तू आम्हाला सोडून गेला असता तर, मी नक्कीच जिवंत राहिले नसते. माझा जीव तुझ्यात होता." "अम्मा,मला जन्माला घातलेली आई जिवंत आहे का गं?" "आहे बाबा,आम्ही स्वतःहून अनाथाश्रमातून तुला आणलेलं नाही. तुझ्या आईने आपल्या हाताने तुला आमच्याकडे सुपूर्द केलं." आता ती कुठे आहे? आता ती अमृतसर मध्ये असून तिचं नाव रुपिंदर कौर आहे. मुकेशने आपल्या सामानाची बांधाबांध केली . सुमतीने त्याच्या केसातून हात फिरवत म्हटले," मुन्ना,रुपींदरला भेटल्यावर मला विसरणार का रे?" " माझ्यावर रागावलास ?".... "मुन्ना ,मी तुला माझ्या पोटात नऊ महिने वाढवलं नसेन; पण मी तुझी आईच आहे रे." अगदी दीन होऊन रडू लागली. मुकेशने प्रेमाने आपल्या आईचा हात हातात धरून सांगितले,"तू माझी आईच आहेस; पण एक कुतूहल म्हणून मला माझ्या जन्मदात्या आईनं असं का केलं? ती आता कशी आहे?" या प्रश्नांची उत्तर शोधायची आहे .म्हणून मी जात आहे. खूप ठिकाणी शोधा शोध केल्यानंतर रूपींदरचा पत्ता मुकेशला सापडला. रुपिंदरला मुकेश म्हणाला," मी तुम्हाला एक गोष्ट विचारायला आलोय? ". "कसली गोष्ट?" "आई -वडील आपल्या अपत्यांना कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्यांच्याकडं सोपवत नाहीत. कितीही गरिबी असली तरीही ते त्याचा सांभाळ करतात.मी माझ्या अम्माला खूपदा विचारलं. तुम्ही मला तिच्याकडे कसं सोपवलंत?" मला सोडून जायचं तुम्हाला धैर्य कसं झालं? "सुमती काय म्हणाली ?" परिस्थितीच तशी होती. तुमच्यासमोर दुसरा उपाय नव्हता असं तिने सांगितलं." "मुलगा अवलक्षणी असला तरी, वाईट पायगुणाचा असला तरी कोणतेही पालक आपला मुलगा दुसऱ्यांना देत नाहीत .माझ्या वडिलांना आपण केलेल्या चुकीबद्दल कधी पश्चाताप वाटला नाही का? आपल्या मुलाला परत घेऊन यावं असं कधी वाटलं नाही का?" रुपिंदर म्हणाली,"बेटा ,मला हजारदा वाटलं तसं. रात्री झोपलेली असतांना आकाशातल्या नक्षत्राकडे बघतांना मला वाटायचं, की माझा मुन्ना सुद्धा याच नक्षत्राकडे बघत असेल.आपण एकमेकांना पुन्हा भेटूच शकणार नाही,या कल्पनेने मी पूर्ण उद्ध्वस्त झाले. मुन्ना, मी अशिक्षित आहे. माझ्याकडं पैसा नाही. मी तर अशी परस्वाधीन . मग काय करू सांग?" " तू वडिलांना आग्रह का केला नाहीस?" तेव्हा शांतपणे रुपिंदर सांगू लागली "मुन्ना ,तू माझा आहेस. तू त्यांना त्यांचा मुलगा वाटत नव्हतास. हे खरं आहे. त्यामुळे तुला सोडून राहणं त्यांना कठीण गेलं नाही. पण माझं तसं झालं नाही." मुकेशच्या अंगावर वीज कोसळल्यासारखं वाटलं. म्हणजे आपण रुपिंदर सुरिंदर या जोडप्याला झालेला मुलगा नव्हे? तर मग आपला बाप कोण ?त्याचे मन चडफडू लागले. त्याने विचारले ,"माझे वडील कोण?" अश्या या वादळाने मुकेशचे आयुष्य पार बदलून गेलं..... कोण होता तो?????? वासंतीला कोणत्या शब्दात आणि काय सांगायचं? अश्या कितीतरी प्रश्नांनी त्याच्या मनात काहूर माजले होते. मानलेली नाती खरी की, रक्ताची नाती श्रेष्ठ ? अशा अनेक प्रश्नांचा शोध घेता घेता त्याचा स्वतःच्या *अस्तित्वाचा* शोध सुरू झाला. पुढे काय???........... अशी ही उत्कंठावर्धक कादंबरी नक्की वाचा. धन्यवाद! ...Read more

  • Rating StarVinayak Rajmane

    काल सुधा मूर्ती यांची "अस्तित्व" ही कादंबरी वाचली. ही कादंबरी म्हणण्यापेक्षा घराघरातील व्यक्तींच्या स्वभावांचे, घराघरातील घडणाऱ्या घटनांचे वास्तववादी चित्रणच वाटते. काही महिन्यांपूर्वी त्यांचे "गोष्टी माणसांच्या" हे पुस्तक वाचलं होतं, ते वाचूनच मानवीस्वभाव वैशिष्ट्य, किंवा नात्यांची हळुवार गुंफण वर्णन करणार त्यांचं हळवं, भावनिक मन दिसून येतं.. "अस्तित्व" मधील नायक मुकेश याच्या आयुष्यात अचानक आलेलं वादळ आणि त्यानंतर घडणाऱ्या घडामोडी यांच अतिशय सुंदर आणि भावोत्कट वर्णन सुधा मूर्ती यांनी केलं आहे. नाती मग ती रक्ताची असो किंवा मानलेली असो ती निस्वार्थपणे कशी निभवायची असतात याचा सुरेख वस्तुपाठ त्यांनी या कादंबरीत दाखवला आहे. आयुष्यात येणारी संकटे, येणारी वादळे किंवा वाईट दिवसांना कस खंबीरपणे तोंड द्यावं आणि यात आपलं अस्तित्व पण कस टिकवाव हे कादंबरी वाचताना लक्षात येतं. निस्वार्थपणा, त्याग, निर्मोही वृत्ती काय असते; नात्यांची गुंफण कशी असते, नात्यांमध्ये निर्माण झालेला तिढा कसा लीलया सोडवला पाहिजे हे सर्व ही कादंबरी वाचताना समजून येते. अतिशय उत्कंठावर्धक असणारी ही पहिली कादंबरी असेल जी मी वाचायला घेतल्यानंतर पूर्ण संपवूनच खाली ठेवली असेल, अगदी पाषाणहृदयी माणसाच्यापण डोळ्यात पाणी उभं करण्याचं सामर्थ्य या कादंबरीत दिसून येत... ...Read more

  • Rating StarSwapnaja Pawar

    अस्तित्व - सुधा मूर्ती प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात असंख्य नाती असतात. काही मानलेली तर काही खरी नाती असतात . वयाची 30 वर्षे तुम्ही ज्या आई - वडील सोबत राहता आणि अचानक एक दिवस तुम्हाला कळते की ते तुमचे खरे जन्मदाते नाहीत. असच कहीसं मुकेशचं झालं. मुकेशचं आयुष्य तस अगदी सुखासमाधानात चाललं होतं. झंझावातासारख्या आलेल्या या वादळानं त्याचं आयुष्य पार बदलून गेलं. मानलेली नाती खरी की, रक्ताची नाती श्रेष्ठ? अशा अनेक प्रश्नांचा शोध घेता घेता त्याचा स्वतःचा अस्तित्वाचा शोध सुरू झाला. हे पुस्तक वाचताना असे वाटले की, जन्म कोणी दिला ह्यापेक्षा ज्यांनी सांभाळ केला आणि आणि त्यांनी सांभाळ करताना काय संस्कार केले ह्यावरच आपल्या जीवनाचे अस्तित्व अवलंबून असते. कारण जर सुमती आणि रावसाहेब यांनी मुकेशवर चांगले संस्कार केले नसते तर ह्या अचानक येणाऱ्या वादळात कदाचित तो टिकुच शकला नसता. ...Read more

  • Rating StarSiddhi Joshi

    प्रत्येक लेखकांची एक वेगळीच शैली असते. आणि त्याच शैलीमुळे त्या पुस्तकाचं ही वेगळच अस्तित्व तयार होऊन वाचकांसाठी ते पुस्तकं स्वतःहूनच त्याची गोष्ट डोळ्यांसमोर उभी करतो आणि आपण बसल्याजागी त्या पुस्तकात असलेल्या ठिकाणी जाऊन त्या माणसांना प्रत्यक्ष पाहूनयेतो.असच आज झालं माझ्याबाबतीत. मी सकाळी एक पुस्तकं वाचायला घेतलं आणि बंगलोर ते लंडन ते अमृतसर असा प्रवास केला.सुधा मुर्ती ह्यांचे लेखन आणि प्रा. ए.आर.यार्दी ह्यांनी केलेला अनुवाद ह्या पुस्तकला एक अशी ताकद देऊन जातो आणि ती ताकद म्हणजे सहज सोप्प्या शब्दात केलेले वर्णन जे वाचकाचा आणि पात्रांचा थेट संवाद साधण्यात मदत करतो. एक मुकेश नावाचं पात्र ज्या पद्धतीने स्वतच्या अस्तित्त्वा बद्दल असलेला गुंता एक एक पाऊल टाकून सोडवतो. हे आपल्याला नकळत आपल्या आयुष्यात संयम हा किती महत्वाचा आहे हे शिकवून जातो. ह्या पुस्तकातला प्रत्येक शब्द एक वेगळाच उत्साह देऊन जातो आणि आपण हे पुस्तक शेवटपर्यंत वाचून मगच खाली ठेवतो. ह्या पुस्तकाने मला मी कशी असायला पहिजे हे शिकवलं. - सिद्धी🙂 ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more