* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MUKESH WAS LEADING A NORMAL LIFE, HAPPY, CONTENTED. SUDDENLY, THERE APPEARED A STORM IN HIS LIFE. THE STORM WAS LIKE A HURRICANE. IT SHATTERED EVERYTHING, IT CHANGED EVERYTHING RELATED TO HIS LIFE. IT ACTUALLY CHANGED HIS LIFE. TILL THEN HE WAS STRONGLY AND FIRMLY TIED UP TO HIS FAMILY. BUT THE STORM BROKE THE VERY CORD THAT HAD TIED HIM TO HIS FAMILY. WHO WAS HE? WHICH RELATIONS WERE REAL? THE BLOOD RELATIONS OR THE RELATIONS WHICH WERE BUILT UP? HE SET FOR A JOURNEY IN SEARCH OF ANSWERS TO THESE QUESTIONS, IN A WAY, HE WAS TRYING TO FIND OUT ANSWER TO HIS BEING ITSELF. A VERY LONGING, EXCITING NOVEL BY SUDHA MURTI, THE FAMOUS KANNADA AUTHOR, IN HER ELUCIDATING STYLE.
मुकेशचं आयुष्य तसं अगदी सुखासमाधानात चाललं होतं, अचानक एक वादळ उठलं. झंझावातासारख्या आलेल्या या वादळानं त्याचं आयुष्य पार बदलून गेलं. एक बळकट कौटुंबिक बंध अचानक तुटून गेला... कोण होता तो? मानलेली नाती खरी की, रक्ताची नाती श्रेष्ठ? अशा अनेक प्रश्नांचा शोध घेता घेता त्याचा स्वत:च्या अस्तित्वाचा शोध सुरू झाला. प्रख्यात कन्नड साहित्यिक सुधा मूर्ती यांच्या विवेचक लेखणीतून साकारलेली उत्कंठावर्धक कादंबरी

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating Starसौ. अपर्णा अनंत मिसे

    नमस्कार मंडळी, सुधा मूर्ती यांची *अस्तित्व* ही कादंबरी कन्नड भाषेत आहे. त्याचा अनुवाद प्रा. ए.आर.यार्दी यांनी केला. त्यांची मराठीतील ही पहिलीच कादंबरी आहे. सुधा मूर्ती यांचा जन्म १९५० साली कर्नाटक राज्यातल्या शिग्गाव येथे झाला. त्यांनी कॉम्प्युटर साय्स या विषयातील एम टेक ही पदवी प्राप्त केली आहे. पुणे येथे `टेल्को` कंपनीत निवडल्या गेलेल्या त्या पहिल्या स्त्री अभियंत्या होत्या. समाजोपयोगी कार्यासाठी त्या विख्यात आहेत.२००६ मध्ये भारत सरकार तर्फे `पद्मश्री` पुरस्काराने, तसेच २०२३ मध्ये `पदमभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. `पर्सन ऑफ द इयर` हा मानाचा पुरस्कारही त्यांना मिळाला. तर अशा या भारत भूषण सुधा मूर्तींची कन्नड ही मातृभाषा असली तरीही, मराठी भाषेची त्यांना जाण आहे. अस्तित्व ही कादंबरी बऱ्याच भाषेत वेगवेगळ्या नावाने भाषांतरित झाली आहे. १००पानी ही कादंबरी असून त्याचा सारांश लिहिण्याचा प्रयत्न करते.बघू जमते का? मुकेश व वासंती स्वित्झर्लंडला राहणारे भारतीय जोडपे. मुकेश चे वडील म्हणजे कृष्णराव, रावसाहेब म्हणून प्रसिद्ध. पण ते आपल्या मुलासोबत मित्रासारखे वागत.रावसाहेबांनी आपल्या मुलाला कोणत्याही बाबतीत कधी आग्रह केला नाही. वासंती मैसूरमधल्या ब्राह्मण वस्तीत सोवळेपणाच्या सावलीत लहान ची मोठी झाली. असे हे लव मॅरेज. घरातल्या कोणीच त्यांना नकार दिला नाही. कारण दोघेही एकमेकांना अनुरूप असेच होते. वधूपरीक्षेचे फक्त नाटक झाले. वासंती लग्न होऊन रावसाहेबांच्या घरात आली. ती सून म्हणून नव्हे तर मुलगी म्हणून. सून आल्याने तर सुमतीला आनंदाचे उधाण आले. वास्तविक मुकेश ला नोकरी करायची गरजच नव्हती. पण त्याला रावसाहेबांच्या उद्योगात रस नव्हता. पण त्याचा मेव्हणा सतीश (निरज चा नवरा)ला मात्र रस होता. मुकेश ला खूप शिकायची इच्छा होती .त्यामुळे रावसाहेबांनी त्याला नकार दिला नाही. त्या उलट आईचा म्हणजे सुमतीचा नकार होता .आई त्याला `मुन्ना` म्हणत असे आणि मुकेश आईला `अम्मा` म्हणत असे. जुन्या आठवणींना कवटाळून मुकेश उठून उभा झाला व तितक्यात समोरून वासंती स्केटिंग करत आली.तिचा तोल गेला आणि खाली पडली. तिच्या स्नायूंना दुखापत झाल्याने मुकेशने तिला दवाखान्यात अॅडमिट केले. स्नायू दुखावल्याने आठवडाभराची विश्रांती सांगितली.तिला अॅडमिट करून मुकेश घरी आला. तसा त्याला आपली बहीण नीरजाचा रडूनच फोन आला. "मुन्ना, बाबांना हार्ट अटॅक आलेला आहे लगेच निघून ये". मुन्नाने लगेच ट्रॅव्हल एजंटला सांगितले भारतात बेंगलोरला जायचे आहे एक तिकीट पाहिजे.त्याने लगेच कपडे चढवले व तडक हॉस्पिटलला निघाला. वासंतीच्या तब्येतीने तिला घेऊन जाणे अशक्य व तिला एकटीला ठेवणेही कठीण. अशा व्दिधा:मनस्थितीत असतांना वासंती म्हणाली,"माझी काळजी करू नका तुम्ही लगेच निघा. घरी आई व नीरजाची काय अवस्था असेल?"लाजऱ्या मुकेशला मित्र मोजकेच पण बडबड्या वासंतीला भरपूर ओळखी असल्यामुळे ती एकटी पडणार नाही याची खात्री मुकेशला होती. आणि म्हणून मुकेश बेंगलोर साठी रवाना झाला. रावसाहेब मोठे उद्योगपती ते लंडनला असून सुद्धा त्यांनी कधीही मांसाहार किंवा मद्यपान केले नाही. बाहेर कितीही मोठी पार्टी असली तरीही घरी येऊन ते सुमतीने केलेले परोठे खाणार व अम्माच्या हातच्या परोठ्याची चव फाइव स्टार हॉटेलला पण येणार नाही असे म्हणायचे .तेव्हा प्रेम असतं ते असं! वडिलांची तब्येत चांगली ठणठणीत होती. मागच्याच महिन्यात काही कामानिमित्त रावसाहेब लंडनला आले. जातांना त्यांनी दोन हजार पौंड रक्कमेचा चेक दिला." मुन्ना, तुझ्या वाढदिवसासाठी". एक जानेवारीला वाढदिवसासाठी दोन हजार पौंड पाठवले होते व आता परत हे कशासाठी ? " आई तुझा वाढदिवस बुद्ध पौर्णिमेला साजरा करते ना त्यासाठी आगाऊ रक्कम". असे मुकेशचे म्हणजे मुन्नाचे दोन वाढदिवस साजरा व्हायचे. रावसाहेबांच्या आठवणीने त्याचे डोळे पाणावले .`बाबांना काय झालं असेल`? आपण जाण्याच्या आत काही बरं वाईट झालं तर?..... या विचारांनी तो हादरला. त्याने गळ्यातल्या साखळी कडे हात नेले. प्रार्थना केली-`गुरुदेव वडिलांचं रक्षण करा`. तितक्यात एअर होस्टेस आली आणि तिने सांगितले बेंगलोर जवळ आलंय. विमानतळा बाहेर आल्याबरोबर मुकेशला गाडी घेऊन आलेला शफी ड्रायव्हर दिसला. गाडीत बसल्यावर शफीला विचारले,"शफी, बाबा कसे आहेत?" त्याने मान खाली घातली. "बाबा कसे आहेत, सांग ना!" आज पहाटे चार वाजता..... म्हणजे रावसाहेब आता नाहीत!......... त्याला कल्पनाच करवेना. वडील आपल्याला सोडून गेले. कोणतीही समस्या वडिलांसमोर ठेवल्याशिवाय मुकेशला चैन पडत नसे. ती समस्या चांगली असो या वाईट त्याच्यावर कधीच रागावले नाही. नेहमी म्हणायचे, "मुन्ना,माणूसच चूक करतो. त्यासाठी वाईट वाटून घेऊ नये". अशा या वटवृक्षाच्या छायेत मुन्ना व त्याची बहीण नीरजा दोघेही आरामात होती. आता तो वटवृक्ष कोसळला. गाडी दारापुढे उभी राहिली. खूप प्रथितयश, नामवंत लोकं आली होती‌ .मुकेश सरळ वडिलांच्या पायाशी जाऊन बसला. एकटक त्यांच्या देहाकडे बघू लागला. निश्चिंतपणे झोपल्यासारखे दिसत होते.` खरंच, बाबा गेले?........ "मुन्ना!"sssss म्हणून नीरजाने त्याला मिठी मारली. अम्मा रडलीच नाही. "मुन्ना, तू आल्यावर तरी....?" दोघेही आईच्या कुशीत शिरले ओक्साबोक्सी रडू लागले . अस्थी विसर्जनासाठी श्रीरंगपट्टण येथे मुकेश जायला निघाला, तेव्हा वडिलांचे मित्र व वकीलही असलेले श्री जोशी काका आले व म्हणाले," राव साहेबांनी मृत्युपत्र लिहिले तुम्ही केव्हा मोकळे आहात ?"आणि मला त्या संबंधात एक कागद हवा आहे. तेव्हा मुकेश म्हणाला, "सध्या तरी दोन दिवस वेळ नाही. नीरूला विचारा ती देईल तुम्हाला हवं ते कागदपत्र." आणि आपण दोन दिवसांनी भेटू काका. दोन दिवसांनंतर वकील आले. मृत्युपत्र वाचून दाखवू लागले. बँकेत ठेवलेल्या सर्व एफडी चा अर्धा वाटा नीरजला व उरलेला अम्माला शिवाय उरलेली सर्व संपत्ती म्हणजे जवळपास २० कोटी असावी ही मुकेशच्या नावावर .त्यावेळेस मुकेश वकिलाला म्हणाला, की माझ्या संपत्तीतला अर्धा वाटा मी ताईला देऊ शकेल का? तसा सतीश म्हणाला, "मुन्ना, अर्धा वाटा लिहून द्यायला तुला हक्क नाही .कारण तू या संपत्तीचा वारस नाही. म्हणजे तू सख्खा मुलगा नाहीस. पाळलेला मुलगा आहे पाळलेला..... नीरजा ही त्यांची मुलगी आहे. माझ्याजवळ पुरावा आहे. सतीश ने मुकेश समोर एक फोटो धरला. मुकेश व नीरजाचा लहानपणीचा फोटो. हा कसला पुरावा?... ज्यावेळेस जोशी काकांना कागदपत्र पाहिजे होते, त्यावेळेस नीरजानी वडिलांच्या कपाटात कागदपत्र शोधतांना तिला लहानपणीचा फोटो दिसला. म्हणून ती उत्सुकतेने मुन्ना व माझा फोटो म्हणून धावतच घेऊन आली. पण सुरज ने तो फोटो बघितला व त्या मागील तारीख बघितली .झालं ....त्याला असुरी आनंद झाला. फोटोच्या मागे २-२-१९७०अशी तारीख होती. पिक्चर पॅलेस, जालना, महाराष्ट्र असा पत्ता लिहिलेला होता. सतीश एखाद्या वकीलासारखा मुकेश ला प्रश्न विचारू लागला. मुन्ना,"निरुचा वाढदिवस कधी आहे?" "३१डिसेंबर ६७" म्हणजे "नीरु ,तुझ्यापेक्षा किती मोठी आहे?" "दोन वर्षे एक दिवस ". "तुझी जन्मतारीख १-१-१९७० आणि या फोटोच्या पाठीमागे २-२-१९७० असे लिहिले आहे. म्हणजे हा फोटो काढला तेव्हा तुझं वय फक्त एक महिना एक दिवस एवढंच असायला हवे ना?" मग यात तुझी किंवा नीरजाची जन्मतारीख चुकीची आहे. सतीश चे वकिली डोके तसे फार तल्लख .तो नीरु व मुन्ना यांच्या जन्मतारखेचा हिशोब करू लागला. मुले लहान असताना दोन वर्षांमधले आणि चार वर्षांमधले अंतर सहजपणे लक्षात येते. नंतर ती मोठी झाली की अठ्ठावीस आणि तिशीच्या दरम्यान काहीच फरक जाणवत नाही. त्यामुळे यांच्या जन्मतारीखेत काहीतरी रहस्य दडलेले आहे. सतीश विचार करू लागला ‌. सतीश ने अम्माकडे फोटो केला व विचारलं ,"अम्मा, खरं सांगा तुमचं अपत्य कोण? नीरजा की मुन्ना?" "अम्मा, तुम्ही खरं काय ते नाही सांगितलं तर नीरुचा संसार उध्वस्त होईल ." शांतपणाने पण अत्यंत दुःखाने, कष्टाने सुमती एक एक शब्द उच्चारू लागली. तिची नजर जमिनीशी बोलत होती. "नीरू, तू माझी मुलगी आहेस. मुन्ना हा माझा मानलेला मुलगा आहे .पण मी त्याच्यावर पोटच्या पोरापेक्षाही जास्त प्रेम केलंय." "अम्मा ,ही गोष्ट मला का सांगितली नाहीस?" मुकेशने विचारलं . "बाबा मला सगळं काही सांगत होते .मित्राप्रमाणे वागत होते मग त्यांनी सुद्धा मला का सांगितलं. नाही?"मुन्ना ,तुला खरी गोष्ट कळली तर, तू मोठा झाल्यावर जन्म दिलेल्या आईकडे जाशील. म्हणून मला भीती वाटत होती. तुझ्यावरच्या माझ्या मोहामुळे तुला सांगितलं नाहीस. तू आम्हाला सोडून गेला असता तर, मी नक्कीच जिवंत राहिले नसते. माझा जीव तुझ्यात होता." "अम्मा,मला जन्माला घातलेली आई जिवंत आहे का गं?" "आहे बाबा,आम्ही स्वतःहून अनाथाश्रमातून तुला आणलेलं नाही. तुझ्या आईने आपल्या हाताने तुला आमच्याकडे सुपूर्द केलं." आता ती कुठे आहे? आता ती अमृतसर मध्ये असून तिचं नाव रुपिंदर कौर आहे. मुकेशने आपल्या सामानाची बांधाबांध केली . सुमतीने त्याच्या केसातून हात फिरवत म्हटले," मुन्ना,रुपींदरला भेटल्यावर मला विसरणार का रे?" " माझ्यावर रागावलास ?".... "मुन्ना ,मी तुला माझ्या पोटात नऊ महिने वाढवलं नसेन; पण मी तुझी आईच आहे रे." अगदी दीन होऊन रडू लागली. मुकेशने प्रेमाने आपल्या आईचा हात हातात धरून सांगितले,"तू माझी आईच आहेस; पण एक कुतूहल म्हणून मला माझ्या जन्मदात्या आईनं असं का केलं? ती आता कशी आहे?" या प्रश्नांची उत्तर शोधायची आहे .म्हणून मी जात आहे. खूप ठिकाणी शोधा शोध केल्यानंतर रूपींदरचा पत्ता मुकेशला सापडला. रुपिंदरला मुकेश म्हणाला," मी तुम्हाला एक गोष्ट विचारायला आलोय? ". "कसली गोष्ट?" "आई -वडील आपल्या अपत्यांना कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्यांच्याकडं सोपवत नाहीत. कितीही गरिबी असली तरीही ते त्याचा सांभाळ करतात.मी माझ्या अम्माला खूपदा विचारलं. तुम्ही मला तिच्याकडे कसं सोपवलंत?" मला सोडून जायचं तुम्हाला धैर्य कसं झालं? "सुमती काय म्हणाली ?" परिस्थितीच तशी होती. तुमच्यासमोर दुसरा उपाय नव्हता असं तिने सांगितलं." "मुलगा अवलक्षणी असला तरी, वाईट पायगुणाचा असला तरी कोणतेही पालक आपला मुलगा दुसऱ्यांना देत नाहीत .माझ्या वडिलांना आपण केलेल्या चुकीबद्दल कधी पश्चाताप वाटला नाही का? आपल्या मुलाला परत घेऊन यावं असं कधी वाटलं नाही का?" रुपिंदर म्हणाली,"बेटा ,मला हजारदा वाटलं तसं. रात्री झोपलेली असतांना आकाशातल्या नक्षत्राकडे बघतांना मला वाटायचं, की माझा मुन्ना सुद्धा याच नक्षत्राकडे बघत असेल.आपण एकमेकांना पुन्हा भेटूच शकणार नाही,या कल्पनेने मी पूर्ण उद्ध्वस्त झाले. मुन्ना, मी अशिक्षित आहे. माझ्याकडं पैसा नाही. मी तर अशी परस्वाधीन . मग काय करू सांग?" " तू वडिलांना आग्रह का केला नाहीस?" तेव्हा शांतपणे रुपिंदर सांगू लागली "मुन्ना ,तू माझा आहेस. तू त्यांना त्यांचा मुलगा वाटत नव्हतास. हे खरं आहे. त्यामुळे तुला सोडून राहणं त्यांना कठीण गेलं नाही. पण माझं तसं झालं नाही." मुकेशच्या अंगावर वीज कोसळल्यासारखं वाटलं. म्हणजे आपण रुपिंदर सुरिंदर या जोडप्याला झालेला मुलगा नव्हे? तर मग आपला बाप कोण ?त्याचे मन चडफडू लागले. त्याने विचारले ,"माझे वडील कोण?" अश्या या वादळाने मुकेशचे आयुष्य पार बदलून गेलं..... कोण होता तो?????? वासंतीला कोणत्या शब्दात आणि काय सांगायचं? अश्या कितीतरी प्रश्नांनी त्याच्या मनात काहूर माजले होते. मानलेली नाती खरी की, रक्ताची नाती श्रेष्ठ ? अशा अनेक प्रश्नांचा शोध घेता घेता त्याचा स्वतःच्या *अस्तित्वाचा* शोध सुरू झाला. पुढे काय???........... अशी ही उत्कंठावर्धक कादंबरी नक्की वाचा. धन्यवाद! ...Read more

  • Rating StarVinayak Rajmane

    काल सुधा मूर्ती यांची "अस्तित्व" ही कादंबरी वाचली. ही कादंबरी म्हणण्यापेक्षा घराघरातील व्यक्तींच्या स्वभावांचे, घराघरातील घडणाऱ्या घटनांचे वास्तववादी चित्रणच वाटते. काही महिन्यांपूर्वी त्यांचे "गोष्टी माणसांच्या" हे पुस्तक वाचलं होतं, ते वाचूनच मानवीस्वभाव वैशिष्ट्य, किंवा नात्यांची हळुवार गुंफण वर्णन करणार त्यांचं हळवं, भावनिक मन दिसून येतं.. "अस्तित्व" मधील नायक मुकेश याच्या आयुष्यात अचानक आलेलं वादळ आणि त्यानंतर घडणाऱ्या घडामोडी यांच अतिशय सुंदर आणि भावोत्कट वर्णन सुधा मूर्ती यांनी केलं आहे. नाती मग ती रक्ताची असो किंवा मानलेली असो ती निस्वार्थपणे कशी निभवायची असतात याचा सुरेख वस्तुपाठ त्यांनी या कादंबरीत दाखवला आहे. आयुष्यात येणारी संकटे, येणारी वादळे किंवा वाईट दिवसांना कस खंबीरपणे तोंड द्यावं आणि यात आपलं अस्तित्व पण कस टिकवाव हे कादंबरी वाचताना लक्षात येतं. निस्वार्थपणा, त्याग, निर्मोही वृत्ती काय असते; नात्यांची गुंफण कशी असते, नात्यांमध्ये निर्माण झालेला तिढा कसा लीलया सोडवला पाहिजे हे सर्व ही कादंबरी वाचताना समजून येते. अतिशय उत्कंठावर्धक असणारी ही पहिली कादंबरी असेल जी मी वाचायला घेतल्यानंतर पूर्ण संपवूनच खाली ठेवली असेल, अगदी पाषाणहृदयी माणसाच्यापण डोळ्यात पाणी उभं करण्याचं सामर्थ्य या कादंबरीत दिसून येत... ...Read more

  • Rating StarSwapnaja Pawar

    अस्तित्व - सुधा मूर्ती प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात असंख्य नाती असतात. काही मानलेली तर काही खरी नाती असतात . वयाची 30 वर्षे तुम्ही ज्या आई - वडील सोबत राहता आणि अचानक एक दिवस तुम्हाला कळते की ते तुमचे खरे जन्मदाते नाहीत. असच कहीसं मुकेशचं झालं. मुकेशचं आयुष्य तस अगदी सुखासमाधानात चाललं होतं. झंझावातासारख्या आलेल्या या वादळानं त्याचं आयुष्य पार बदलून गेलं. मानलेली नाती खरी की, रक्ताची नाती श्रेष्ठ? अशा अनेक प्रश्नांचा शोध घेता घेता त्याचा स्वतःचा अस्तित्वाचा शोध सुरू झाला. हे पुस्तक वाचताना असे वाटले की, जन्म कोणी दिला ह्यापेक्षा ज्यांनी सांभाळ केला आणि आणि त्यांनी सांभाळ करताना काय संस्कार केले ह्यावरच आपल्या जीवनाचे अस्तित्व अवलंबून असते. कारण जर सुमती आणि रावसाहेब यांनी मुकेशवर चांगले संस्कार केले नसते तर ह्या अचानक येणाऱ्या वादळात कदाचित तो टिकुच शकला नसता. ...Read more

  • Rating StarSiddhi Joshi

    प्रत्येक लेखकांची एक वेगळीच शैली असते. आणि त्याच शैलीमुळे त्या पुस्तकाचं ही वेगळच अस्तित्व तयार होऊन वाचकांसाठी ते पुस्तकं स्वतःहूनच त्याची गोष्ट डोळ्यांसमोर उभी करतो आणि आपण बसल्याजागी त्या पुस्तकात असलेल्या ठिकाणी जाऊन त्या माणसांना प्रत्यक्ष पाहूनयेतो.असच आज झालं माझ्याबाबतीत. मी सकाळी एक पुस्तकं वाचायला घेतलं आणि बंगलोर ते लंडन ते अमृतसर असा प्रवास केला.सुधा मुर्ती ह्यांचे लेखन आणि प्रा. ए.आर.यार्दी ह्यांनी केलेला अनुवाद ह्या पुस्तकला एक अशी ताकद देऊन जातो आणि ती ताकद म्हणजे सहज सोप्प्या शब्दात केलेले वर्णन जे वाचकाचा आणि पात्रांचा थेट संवाद साधण्यात मदत करतो. एक मुकेश नावाचं पात्र ज्या पद्धतीने स्वतच्या अस्तित्त्वा बद्दल असलेला गुंता एक एक पाऊल टाकून सोडवतो. हे आपल्याला नकळत आपल्या आयुष्यात संयम हा किती महत्वाचा आहे हे शिकवून जातो. ह्या पुस्तकातला प्रत्येक शब्द एक वेगळाच उत्साह देऊन जातो आणि आपण हे पुस्तक शेवटपर्यंत वाचून मगच खाली ठेवतो. ह्या पुस्तकाने मला मी कशी असायला पहिजे हे शिकवलं. - सिद्धी🙂 ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more