* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: LESSONS IN FORGETTING
  • Availability : Available
  • Translators : SMITA LIMAYE
  • ISBN : 9788184984132
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 313
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHEN WE FIRST SEE MEERA, SHE IS A CAREFULLY GROOMED CORPORATE WIFE WITH A SUCCESSFUL CAREER AS A WRITER OF COOKBOOKS. THEN ONE DAY HER HUSBAND FAILS TO COME HOME AFTER A PARTY AND SHE BECOMES RESPONSIBLE NOT JUST FOR HER CHILDREN BUT HER MOTHER AND GRANDMOTHER, AND THE RUNNING OF LILAC HOUSE, THEIR RAMBLING OLD FAMILY HOME IN BANGALORE. ENTER PROFESSOR J.A. KRISHNAMURTHY, OR JAK, A RENOWNED CYCLONE STUDIES EXPERT, ON A VERY DIFFERENT TRAJECTORY IN LIFE. IN A BEDROOM IN HIS HOUSE LIES HIS NINETEEN-YEAR-OLD DAUGHTER SMRITI, LEFT COMATOSE AFTER A VICIOUS ATTACK ON HER WHILE SHE WAS ON HOLIDAY AT A BEACHSIDE TOWN. A WALL OF SILENCE AND FEAR SURROUNDS THE INCIDENT THE GRIEVING FATHER IS HELPED NEITHER BY THE LOCAL POLICE, NOR BY HER BOYFRIEND IN HIS SEARCH FOR THE TRUTH. THROUGH A SERIES OF COINCIDENCES, MEERA AND JAK FIND THEIR LIVES TURNING AND TWISTING TOGETHER, WITH THE UNPREDICTABILITY AND SHEER INEVITABILITY OF A CYCLONE. AND AS THE DAYS PASS, FRESH BEGINNINGS APPEAR WHERE THERE SEEMED TO BE ONLY ENDINGS.
मीरा, सुंदर मीरा, हंसिनी मीरा, कॉर्पोरेट पत्नी आणि पाकशास्त्राच्या पुस्तकांची लेखिका या दोन भूमिकांमध्ये बुडून गेलीये. मग एक दिवस तिचा नवरा घरी परतत नाही. एका रात्रीत मीरा, उद्ध्वस्त मीरा, भावनाप्रधान हळवी मीरा— तिची मुलं- नयनतारा आणि निखिल- एवढंच नव्हे, तर तिची आई सारो, तिची आजी लिली आणि त्यांच्या बंगळुरूमधल्या मोडकळीला आलेल्या गुलबक्षी घराचा कारभार— या सर्वांची जबाबदारी घेते. काही रस्ते पलीकडे राहणा-या प्रोफेसर जे. ए. कृष्णमूर्ती ऊर्फ जॅक– एक हवामान व वादळ-तज्ज्ञ, घटस्फोटित आणि अनेक बाकीच्या संबंधांतून बाहेर पडलेला, नुकताच फ्लोरिडाहून परतलाय. त्याच्या घरातल्या बेडरूममध्ये त्याची एकोणीस वर्षीय मुलगी स्मृती एका आठवणींच्या आणि गतकाळातल्या बलात्काराच्या मूर्तिमंत दु:खद रूपात लोळागोळा होऊन पडली आहे. तामीळनाडूच्या समुद्रकाठच्या एका छोट्या गावात तिच्यावर अशी वेळ यावी, असं काय घडलं? पोलीस मदत करत नाहीत, स्मृतीचे मित्र-मैत्रिणी नाहीसे झालेत आणि एक स्तब्धता आणि भयाची भिंत या घटनेला घेरून आहे; पण जॅक सत्य शोधून काढेपर्यंत विश्रांती घेऊ शकत नाही. योगायोगांच्या साखळीमुळे मीरा आणि जॅकची आयुष्यं एकमेकांत गुंतली, गुंफली जातात; वादळाच्या अनिश्चिततेसारखी आणि अटळपणे आणि जसे दिवस सरतात, तशी नवीन सुरुवात प्रकटते, जिथे फक्त अंतच असावा, असं वाटतं तिथे. वादळाच्या स्थितींना प्रतिध्वनित करत रेखलेली ‘लेसन्स इन फरगेटिंग’ ही कादंबरी एक मुक्ततेची, क्षमाशीलतेची आणि पुनर्संधीची हृदयस्पर्शी कहाणी आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #VISMARNATACHASARVAKAHI #LESSONSINFORGETTING #विस्मरणातचसर्वकाही #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SMITALIMAYE #ANITANAIR "
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA - JANUARY 2017

    एक हृदयस्पर्शी कहाणी... कुठलीही पूर्वसूचना न देता, एखादा शकुन किंवा लक्षणसुद्धा न दाखवता हे अगदी शक्य आहे. बंद पडली असं वाटणाऱ्या एका प्रणालीतून एखादी मूक लाट जन्माला येतेय. एक ओहोळ कार्यरत झालाय. ही लाट उलटल्यावर फिरते ती तिच्या शिरावर सर्व समजून आि कळून फिरते, ज्यामुळे एक खोल, तीव्र आणि अस्थिर वातावरण निर्माण होतं. जेव्हा निराशा धडकते, तेव्हा ती तशीच असते... असं निराशेचं सायक्लोजेनेसिस सुरुवातीलाच ध्वनित करून, वादळाच्या अनिश्चिततेला प्रतिध्वनित करत रेखलेली ही कादंबरी– ‘विस्मरणातच सर्व काही’. अनिता नायर यांनी ‘लेसन्स इन फर्गेटिंग’ ही इंग्रजीत लिहिलेली कादंबरी स्मिता लिमये यांनी मराठीत अनुवादित केली आहे. एक घटस्फोटित हवामान आणि वादळतज्ज्ञ जे. ए. कृष्णमूर्ती उर्फ जॅक नुकताच फ्लोरिडाहून भारतात परतलाय. त्याच्या घरातल्या बेडरूममध्ये त्याची एकोणीस वर्षांची मुलगी, स्मृती, आठवणींच्या मूर्तिमंत दु:खद रूपात लोळागोळा होऊन पडली आहे. तामिळनाडूमधल्या समुद्राकाठच्या एका लहान आणि अनोळखी गावात तिच्याबद्दल नेमकं काय घडलं? ‘मुलगी वाचवा’ मोहिमेत सहभागी झालेली आपल्या मुलीवर ही वेळ यावी नेमकं असं काय घडलं? पोलीस मदत करत नाहीत, स्मृतीचे मित्रमैत्रिणी नाहीसे झालेत. एक स्तब्धता आणि भयाची भिंत त्या घटनेला घेरून आहे. हवामान आणि वादळतज्ज्ञ असलेल्या जॅकच्या लेकीच्या आयुष्यात असं नेमकं कुठलं वादळ आलं, याचा मागोवा घेण्यासाठी जॅक स्वत:च प्रयत्न सुरू करतो. या शोधादरम्यान कौटुंबिक वादाळाच्या तडाख्यात अडकलेली त्याची कॉर्पोरेट मीरा गिरिधर योगायोगाने त्याच्या आयुष्यात येते. या दोघांचीही आयुष्यं एकमेकांत गुंतली जातात, वादळाच्या अनिश्चिततेसारखी आणि अटळपणे. कादंबरीच्या प्रत्येक टप्प्यावर काही चित्रांच्या रेखाटनांचा वेध घेत वादळ आणि मानवी आयुष्यातल्या अनिश्चिततेला अधोरेखित करणारे साम्य-भेद जॅकच्या लेखणीतून व्यक्त होतात. त्या अनुषंगाने कादंबरीचं कथानक प्रत्येक टप्प्यावर उलगडत जातं. कथानकाचा विचार करता अनिता नायर यांची स्त्री चित्रणातली हातोटी प्रकर्षाने जाणवते. मध्यमवयीन कॉर्पोरेट पत्नी मीरा, गतवैभवात रमलेल्या म्हाताऱ्या सारे आणि लिली, तरुणपणातली आणि वय झालेली कलाचित्ती, नयनतारा आणि स्मृती या दोन तरुणी, या वेगवेगळ्या वयाच्या स्त्रिया बारकाईने आणि खुबीने रंगवल्या आहेत. कादंबरीत उल्लेखलेली स्थळं, वातावरणही समर्पक रेखाटलेली आहेत. अनिश्चितता आणि अस्वस्थता या मूळ गाभ्याभोवती रचलेलं हे कथानक मराठीत वाचताना काही ठिकाणी, अनुवाद न वाटता, इंग्रजी वाक्यांचा शब्दश: भाषांतर केल्यासारख्या वाक्यरचनांमुळे रसभंग होतो. कादंबरीच्या सुरुवातीलाच ध्वनित केलेली वादळाच्या आणि मानवी आयुष्यांच्या बाबतीत असलेली अनिश्चितता कथानकातही जाणवते, आणि समोर येते, ती या अनिश्चिततेमुळे निर्माण होणारी खळबळ. मीरा, जॅक या आणि कादंबरीतल्या प्रत्येक पात्राच्या आयुष्याचा भाग आहे ही अनिश्चितता आणि खळबळ. म्हणूनच ‘विस्मरणातच सर्व काही’ ही कादंबरी एक मुक्ततेची, क्षमाशीलतेची आणि पुनर्संधीची हृदयस्पर्शी कहाणी आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more