* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: EXODUS
  • Availability : Available
  • Translators : BAL BHAGWAT
  • ISBN : 9788177662566
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2003
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 664
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
EXODUS IS AN INTERNATIONAL PUBLISHING PHENOMENON--THE TOWERING NOVEL OF THE TWENTIETH CENTURY`S MOST DRAMATIC GEOPOLITICAL EVENT. LEON URIS MAGNIFICENTLY PORTRAYS THE BIRTH OF A NEW NATION IN THE MIDST OF ENEMIES--THE BEGINNING OF AN EARTHSHAKING STRUGGLE FOR POWER. HERE IS THE TALE THAT SWEPT THE WORLD WITH ITS FURY: THE STORY OF AN AMERICAN NURSE, AN ISRAELI FREEDOM FIGHTER CAUGHT UP IN A GLORIOUS, HEARTBREAKING, TRIUMPHANT ERA. HERE IS EXODUS --ONE OF THE GREAT BEST-SELLING NOVELS OF ALL TIME.
रोमन सम्राट व्हेस्पासियन याने आपला सेनापती टायटस याला दोन साध्या आज्ञा दिल्या. ज्यूंचे देऊळ जमीनदोस्त करा. सर्व ज्यूंना ठार मारा. जेरुसलेमच्या पाडावानंतर त्याने या आज्ञांचे तंतोतंत पालन करायला सुरूवात करताच जिवाच्या आकांताने देशोधडीला लागलेले ज्यू जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचले. त्यांना स्वत:चा असा देशच राहिला नाही. ते जिथे जिथे पोचले, तिथे तिथे त्यांनी आपल्या देशाची स्मृती कायम मनात ठेवली. अपार कष्ट, हालअपेष्टा, जुलूम आणि कत्तली यांना तोंड देत आपला धर्म जिंवत ठेवला. दोन हजार वर्षे आपल्या ईश्‍वरदत्त पवित्र भूमीवर आपल्या प्राचीन राज्याची पुन्हा स्थापना करण्याचा ध्यास धरणार्‍या देशोदेशींच्या हद्दपार ज्यूंची - पासोव्हरची प्रार्थना संपत असे - ‘‘पुढल्या वर्षी जेरुसलेममध्ये’’ या शब्दांनीच. इतिहासाचा मागोवा घेत, जिद्दीने उभारलेल्या आपल्या देशाच्या स्वातंत्र्यसासाठी तेवढाच प्रखर लढा देणार्‍या ज्यूंची कथा सांगणार्‍या श्री. लिऑन युरिस यांच्या एक्झोडस् या पुस्तकाचा हा अनुवाद.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #EXODUS #EXODUS #एक्झोडस् #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BALBHAGWAT #बाळभागवत #LEONURIS "
Customer Reviews
  • Rating StarVaibhav Mahajan

    रोमन सम्राट व्हेस्पासियन याने आपला सेनापती टायटस याला दोन साध्या आज्ञा दिल्या. ज्यूंचे देऊळ जमीनदोस्त करा. सर्व ज्यूंना ठार मारा|जेरुसलेमच्या पाडावानंतर त्याने या आज्ञांचे तंतोतंत पालन करायला सुरूवात करताच जिवाच्या आकांताने देशोधडीला लागलेले ज्यू जगा्या कानाकोपर्‍यात पोहोचले| त्यांना स्वत:चा असा देशच राहिला नाही|ते जिथे जिथे पोचले, तिथे तिथे त्यांनी आपल्या देशाची स्मृती कायम मनात ठेवली. अपार कष्ट, हालअपेष्टा, जुलूम आणि कत्तली यांना तोंड देत आपला धर्म जिंवत ठेवला| दोन हजार वर्षे आपल्या ईश्‍वरदत्त पवित्र भूमीवर आपल्या प्राचीन राज्याची पुन्हा स्थापना करण्याचा ध्यास धरणार्‍या देशोदेशींच्या हद्दपार ज्यूंची - पासोव्हरची प्रार्थना संपत असे|- ‘‘पुढल्या वर्षी जेरुसलेममध्ये’’ या शब्दांनीच|इतिहासाचा मागोवा घेत, जिद्दीने उभारलेल्या आपल्या देशाच्या स्वातंत्र्यसासाठी तेवढाच प्रखर लढा देणार्‍या ज्यूंची कथा No automatic alt text available. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 29-06-2003

    इस्रायलच्या निर्मितीची रोमहर्षक कथा… इस्त्रायलची निर्मिती आणि त्यानंतर त्याने अस्तित्वासाठी केलेला संघर्ष याचा इतिहास जगातील कोणत्याही इतिहासापेक्षा अधिक रोमहर्षक आहे. केवळ प्राचीन धार्मिक पुस्तकांमध्ये अस्तित्वात असलेला देश आधुनिक काळात प्रत्यक्षातआणणे आणि त्यासाठी निसर्गाबरोबर राजकीय प्रतिकूलतेवर मात करणे यासाठी लागणारी प्रखर निष्ठा आणि आत्मविश्वास यांचे थक्क करणारे दर्शन इस्त्रायलींनी जगाला घडविले आहे. सहा दिवसांचे यु, असो की दूर युगांडातील एन्टेबीवरील आश्चर्यकारक छापा असो, या घटनांनी इस्त्रायल ही दंतकथाच बनली आहे. जगाच्या नकाशावर शोधताना कष्ट पडावेत, इतक्या चिमुकल्या आणि वाळवंटी भूभागासाठी हजारो वर्षे संघर्ष, हिंसाचार करण्याइतके असे कोणते सोने या भागाला लागतले आहे, हा प्रश्न ज्यू नसलेल्या इतरांना पडू शकतो. परंतु इस्त्रायल हे ज्यूंचे स्वप्नच नव्हे, तर त्यांच्या अस्तित्वाचेही कारण आहे. ज्यू आपला देश गमवणार, हे बायबलमध्ये म्हटले होते, पण देव त्यांना तो पुन्हा मिळवून देईल. असेही बायबलमध्ये लिहिले होते. बायबलच्या प्रत्येक अक्षरावर दृढ श्रद्धा बाळगणाऱ्या ज्यूंनी, एक ना एक दिवस आपली भूमी परत मिळवू. हे स्वप्न बघत दोन हजार वर्षे अनंत यातना, कल्पनातीत हालअपेष्टा आणि असंख्य कतली यांना तोंड दिले. पण स्वत:चे राज्य पुन्हा स्थापन करण्याचा ध्यास कधीही सोडला नाही. असंख्य अडचणी येऊनही इस्त्रायलची एकदा निर्मिती झाल्यावर त्याच्या शत्रूंनी चहुबाजूंनी त्याच्यावर हल्ला चढविला; पण धर्मावरील असीम आणि अढळ श्रद्धेनेच ज्यूंनी शत्रूंवर मात केली. एकदा नव्हे अनेकदा. शेकडो वर्षे देशोदेशी आश्रय घेतलेल्या आणि सर्वत्र अल्पसंख्य असलेल्या या समाजाकडे हे बळ आले कोठून? त्यांची प्रेरणा कोणती? इस्त्रायलच्या निर्मितीमागचा ध्येयवाद आणि वास्तव परिस्थिती यांचे जिवंत दर्शन लिऑन युरिस यांच्या ‘एक्झोडस्’ या कादंबरीत घडते काल्पनिकता आणि वास्तव घटना याचा सुरेख मिलाप घडवून युरिस यार्न इस्त्रायलचा जणू इतिहासच लिहिला आहे. बाळ भागवत यांनी या कादंबरीचा केलेला सहज सुंदर अनुवाद ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने देखण्या स्वरूपात प्रसिद्ध केला आहे. इजिप्तमधील ज्यूंना गुलामगिरीतून मुक्त करून मोझेस त्यांना इस्त्रायलमध्ये घेऊन आला. ते पहिले ‘एक्झोडस् - म्हणजे ज्यूंचे घाऊक स्थलांतर. त्यानंतर पण इस्त्रायलच्या निर्मितपूर्वी जगभरच्या ज्यूंनी तेथे जाण्याचा सपाटा लावला. तत्कालीन पॅलेस्टाईनमधील ज्यूंची संख्या वाढू लागल्यावर अरब देशांमध्ये असंतोष पसरला पॅलेस्टाईनवर ब्रिटिश सत्ता होती आणि ब्रिटन हे अरबांच्या बाजूने होते. ब्रिटिशांनी ज्यूंना पॅलेस्टाईनमध्ये जाण्यापासून रोखण्यास सुरुवात केली. जवळच्या सायप्रस बेटावर असंख्य ज्यूंना ब्रिटिशांनी बंदी बनवून ठेवले होते. यातील काही मुलांना इस़्त्रायलमध्ये बेकायदा घेऊन जाण्याची योजना ज्यूंची गुप्तचर संघटना - मोसाद आलिया आखते. या ढोबळ कथावास्तूव ‘एक्झोडस्’ आधारित आहे. या कथेच्या अनुषंगाने तत्कालीन पॅलेस्टाईनमधील राजकीय स्थिती आणि तेथे जाऊ इच्छिणाऱ्या ज्यूंची पार्श्वभूमी यांची गुंफण करीत युरिस यांनी ज्यू त्यांचं धर्मनिष्ठा, त्यांचे सणवार इस़्त्रायलनिर्मितीमागचे तत्त्वज्ञान यांचे विश्लेषण केले आहे. तब्ब्ल ६४५ पानांच्या या कादंबरीचे पाच भागात विभाजन केले आहे. तत्कालीन वास्तव राजकीय परिस्थिती आणि कादंबरीतील कथा यांची बेमालूम सांगड घातली गेल्यानं कादंबरीतील घटना खऱ्याच आहेत अशी शंकाही अधूनमधून येते प्रत्येक भागापूर्वी ज्या भागात ते कथानक घडते, त्याचा नकाशा आणि कथानकास अनुरूप असे बायबलमधील वचन देण्यात आले आहे. संपूर्ण कादंबरी वाचल्यावर (किंवा वाचतानाही) ज्यूंचा जगभर झालेला छळ आणि त्यांची ससेहोलपट आणि त्यातूनच आलेली त्यांची विजिगीषु वृत्ती यांचा प्रभाव वाचकावर पडल्याशिवाय राहत नाही. ज्यूमधील अतिरेकी विचारसणीच्या लोकांचीही ओळख घडते. मात्र कादंबरीचा प्रारंभ, तिच्या सुरुवातीस आलेल्या प्रमुख व्यक्तिरेखा कथेच्या ओघात हरवून जातात. एक घटना घडत असताना त्यात असलेल्या व्यक्तिरेखांचा इतिहास देताना मूळ कथा बाजूलाच पडते. यामुळे कादंबरी वाचताना एकसंघ कथा वाचल्याचा परिणाम जाणवत नाही. हा या कादंबरीचा दोष, असे असले, तरी कादंबरी वाचनीय झाली आहे. गेल्या काही वर्षात मराठीत इस्त्रायलविषयक पुस्तके प्रसिद्ध होऊ लागली आहेत. ‘एक्झोडस्’ ही त्यात मौलिक भर आहे. कादंबरीपेक्षा इस्त्रायलनिर्मितीचा जिवंत इतिहास असेच तिचे स्वरूप असल्याने संदर्भग्रंथ म्हणूनही तिचे स्थान अधिक टिकाऊ आहे. -राहुल बोरगावकर ...Read more

  • Rating StarThe New York Times

    "Passionate summary of the inhuman treatment of the Jewish people in Europe, of the exodus in the nineteenth and twentieth centuries to Palestine, and of the triumphant founding of the new Israel."

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more