* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788171611058
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 1991
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 392
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Sub Category : INDIAN
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE GREAT ERA. A NOVEL WRITTEN BY S.S. DESAI, MAHAPARVA IS ONE OF ITS OWN KIND, PRESENTING THE PICTURESQUE REPRESENTATION OF THE FIGHT FOR CONTINUED INDEPENDENCE BY THE MARATHA FOR THE KINGDOM ESTABLISHED BY THE GREAT CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ, THE HINDAVI SWARAJ. AFTER THE DEATH OF SHIVAJI MAHARAJ, HIS ELDER SON SAMBHAJI BECAME THE KING. A STRONG LEADER, SAMBHAJI WAS FEARLESS AND A TRUE LOVER OF HIS PEOPLE AND KINGDOM. AFTER THE TREACHEROUS DEATH OF SAMBHAJI, THE MUGHAL ARMY HAD STARTED CAPTIVATING EXTENSIVE STRETCHES OF THE ONCE HINDAVI SWARAJ LAND. EMPEROR AURANGAZEB HAD HIMSELF LEFT DELHI TO CRUSH THE MARATHA KINGDOM ONCE FOR ALL. WITH HIS HUGE ARMY OF 4-5 LACS OF SOLDIERS, HE HAD MADE THE DECCAN PLATEAU HIS HOME FOR MORE THAN 25 YEARS. APART FROM THE ARMY, THERE WAS AN EQUAL NUMBER OF NON-FIGHTING PEOPLE, REQUIRED TO LOOK AFTER THE DAILY NEEDS OF THE ARMY. THIS DID NOT DETER THE MARATHAS FROM PUTTING IN THEIR BEST FOOT WHILE DEFEATING THEIR OWN LAND. SHIVAJI MAHARAJS OTHER SON, RAJARAM, TOOK REIGN AFTER THE DEATH OF SAMBHAJI AND FOUGHT VALIANTLY WITH THE EMPEROR. HE WAS ACCOMPANIED BY THE MOST LOYAL SOLDIERS LIKE SANTAJI, DHANAJI AND MANY OTHERS. HIS WIFE TARABAI TOOK AHEAD THE FIGHT TO PROTECT THE MOTHERLAND. TO FIGHT THE MIGHTY ARMY OF THE EMPEROR, THE MARATHA WARRIORS MADE EXCELLENT USE OF GUERILLA WARFARE TECHNIQUES. THE PRESENT NOVEL PRESENTS THE ELABORATE PICTURE OF THIS FEARLESS FIGHT.
मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाचा सुसूत्र लेखाजोखा. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य संभाजी महाराजांच्या वधानंतर मोगल आपल्या घोड्यांच्या टापांखाली तुडवत होते. औरंगजेब आणि त्याचे प्रचंड सैन्य मराठ्यांना चिरडू पाहत होते. सुमारे पंचवीस वर्षांहून अधिक काळ औरंगजेब आणि त्याच्या सैन्याला झुंजवणाNया राजाराम महाराज, संताजी-धनाजी, ताराबाई आणि अन्य अनुभवी मराठी सरदारांची शौर्यगाथा.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
औरंगझेब#संताजीधनाजी#शिवाजीमहाराज#संभाजी#ताराबाई#राजाराम#अखेरचीलढाई #महापर्व#ऐतिहासिककादंबरी#सशंदेसाई#तुबकधारी#तैनापट्टन#कारवान#चंबळेच्यापलीकडे#पहिलेजागतिकमहायुद्ध#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक AURANGZEB#SANTAJIDHANAJI#SHIWAJIMAHARAJ#SAMBHAJI#TARABAI#RAJARAM#MAHAPARVA#AKHERCHILADHAI#SSDESAI #TUBAKDHARI #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more