* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"SWAMI (MASTER) THE MARATHA (NON MUSLIM) EMPIRE ESTABLISHED IN MAHARASHTRA BY CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ (D. 1680) AGAINST ALL ODDS LATER PASSED INTO THE HANDS OF THE PESHWAS (PRIME MINISTER) WHO BECAME THE SUPREME LORDS. THE MARATHA EMPIRE WHICH STRETCHED ACROSS A SIZEABLE PORTION OF WESTERN, CENTRAL AND NORTHERN INDIA SUFFERED A SEVERE SETBACK WHEN THE MARATHAS LOST THE (THIRD) BATTLE OF PANIPAT IN 1761. IT WAS AN IMMENSE LOSS OF MEN, MONEY, AND MATERIAL. THE THEN PESHWA NANASAHEB COULD NOT BEAR THE BRUNT OF THE CASUALTIES WHICH INCLUDED HIS ELDEST SON AND YOUNGER BROTHER, AND SOON PASSED AWAY. FOR THE SIXTEEN YEAR OLD MADHAVRAO WHO SUCCEEDED NANASAHEB, IT WAS NOT A PIECE OF CAKE. THE COFFERS WERE EMPTY, THE ROYAL COURT WAS FRAUGHT WITH INTERNAL DISSENSIONS. MADHAVRAO COULD NOT GO ALONG WITH HIS UNCLE, RAGHUNATHRAO, WHO WANTED TO BE THE PESHWA, AND WENT TO ANY EXTENT INCLUDING LOOTING HIS OWN SUBJECTS. THE NIZAM, HYDER, AND THE BRITISH HAD SET THEIR EYES ON THE MARATHA EMPIRE. SWAMI IS BASED ON THE LIFE AND CHARACTER OF MADHAVRAO WHO RESURRECTED THE MARATHA EMPIRE. HE REVIVED THE LOST GLORY AND PRIDE. THE EXTENT OF THE EMPIRE WAS NOW WIDER THAN BEFORE. HE CONTAINED THE ENEMY. SWAMI SKETCHES THE PERSONAL LIFE OF THE PESHWA AND SPECIALLY POIGNANT ARE THE PARTS COVERING THE DISCOMFORT HE FEELS WHEN RAGHUNATHRAO IS A THORN IN HIS FLESH, AND HIS UNTIMELY DEATH. THE NOVEL THROWS LIGHT ON THE POLITICAL, SOCIAL AND CULTURAL HISTORY OF THE MID PESHWA ERA. THE PORTRAYAL OF THE BOND BETWEEN MADHAVRAO AND HIS WIFE, RAMABAI, IS A SPECIAL FEATURE. RANJIT DESAI (1928-1992) TACKLED THE GENRE OF NOVELS WITH SUCH EASE THAT HIS COLLECTION INCLUDES ALL TYPES OF NOVELS: HISTORICAL, SOCIAL, MYTHOLOGICAL, AND BIOGRAPHICAL. HE WAS ALSO A PLAYWRIGHT AND HAS TO HIS CREDIT SHORT STORIES. "
"""महाराष्ट्रातल्या जनतेला जिने मंत्रमुग्ध केले, अशी मराठी सारस्वतातील अजरामर साहित्यकृती. रणजित देसाई : मराठी साहित्याला समृद्ध करणारे थोर साहित्यिक. १९४६ साली `भैरव` या कथेला लघुकथास्पर्धेत वाचकांकडून एकमुखाने पहिले पारितोषिक. १९५२ मध्ये `रुपमहाल` हा पहिला कथासंग्रह प्रकाशित. त्यानंतर सातत्याने कथालेखन. ग्रामीण जीवनावरील व ऐतिहासिक व्यक्तिरेखांवरील लेखन अधिक रसरशीत.`स्वामी`ला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त. मराठीमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली व रसिकमान्यता पावलेली रणजित देसाई यांची कादंबरी. थोरले माधवराव पेशवे यांचे राजकीय जीवन, कर्तृत्व आणि त्यांचे वैयक्तिक करुणगंभीर जीवन याचे अतिशय उदात्त व प्रभावी चित्रण स्वामीत केलेले आहे. इतिहास आणि साहित्य ह्याचे एवढे उर्जस्वल नि रोमहर्षक रसायन मराठी भाषेत आजतागायत कोणी निर्माण करू शकलेले नाही.कादंबरीतील अतिशय उठावदार आणि कलात्मक व्यक्तिरेखा आहेत, माधवराव, रमाबाई आणि राघोबादादा यांच्या. सद्गुणी आणि तेजस्वी कर्तव्यदक्ष माधवराव, स्वार्थी, भोळसट, राजद्रोही राघोबा आणि सोशिक, त्यागी, साध्वी रमाबाई या तिन्ही चरित्ररेखा वाचकांच्या मनांवर विलक्षण परिणाम करतात. थोरल्या माधवराव पेशव्यांची ही चरित्रगंगा वाचताना करुणेने मन भरून येते. उदात्ततेने भारावून जाते आणि पूर्वजांच्या अभिमानाने मान ताठही होते. स्वामी वाचून वाचक दिपून जातो. दिग्मूढ होतो. इतिहास आणि ललितकृती या दृष्टींनी रसोत्कट असलेली शोकात्मिक कादंबरी."
* राज्य पुरस्कार १९६२. * ह.ना.आपटे पुरस्कार १९६३. * साहित्य अकादमी पुरस्कार १९६४.

Adaptation TypeTitleLink
TV SerialSWAMI
Original LanguageTranslated LanguageTranslated ByWebsite
MARATHIENGLISHEka
MARATHIGUJARATIMehta
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating Starप्र. सु. येतावडेकर

    नाबाद ६०--- स्वामी -मराठी साहित्यातील एक अजरामर असं अक्षरलेणं. कादंबरीचा भाषेचा बाज हा अभिजात मराठीची महत्ता अधोरेखित करणारा आहे. माधवराव पेशवा या मध्ययुगीन ऐतिहासिक व्यक्तीमत्वाच्या मध्यवर्ती भूमिकेवर बेतलेली कादंबरी, उण्यापुऱ्या चारशे सोळा पाना एक मोठा असा कालपट चित्रित करते. मराठेशाहीच्या राजकीय इतिहासातील मोठा काळ पेशवाईच्या राजकारणाने व्यापलेला आपल्याला पाहायला मिळतो. थोरले बाजीराव पेशवा ते अगदी सवाई माधवराव पेशवा यातील प्रत्येक व्यक्तीने पेशवा म्हणून पद भूषवत असताना मराठ्यांचे राज्य विस्तार कसे पावेल यासाठीच योगदान दिलेले पाहायला मिळेल. त्याच पेशवाईच्या कोंदणातील एक अस्सल रत्न म्हणजे माधवराव पेशवा हे होय. माधवराव पेशवा यांनी पेशवाईची वस्त्रे स्विकारल्यापासून ते थेऊर मुक्कामी अंतकाळ होईपर्यंतचा काळ यामध्ये चित्रित होताना आपल्याला पाहायला मिळतो. पेशवाईतील राजकारण, मोहिमा, राजकीय डावपेच याबरोबरच गृहकलह अशा विविध घटना यात येत राहतात. अल्पवयीन असताना पेशवाईची वस्त्रे प्राप्त झाल्यामुळे वाढलेली जबाबदारी, राज्यशकट हाकताना लागणारी सरदारमंडळी व त्यांची कुमक, शहरसुधारणा त्याच प्रकारे प्रजाहित लक्षात घेऊन राबवावे लागणारे प्रकल्प यात लागणारा कस यावर काम करत असताना एक प्रजाहित दक्ष राज्यकर्ता म्हणून माधवराव मनाला भावून जातात. निजामासोबतचा लढा, कर्नाटक स्वारीत हैदराचा केलेला बंदोबस्त याबरोबरीनेच अंतर्गत गृहकलह यात लागलेला माधवरावांचा कस याचे सम्यक वर्णन आपल्याला कादंबरीत पानोपानी दिसून येते. खुशमस्कऱ्या हुजऱ्यांच्या गर्दीत हरवलेले राघोबादादा, महत्वाकांक्षी आनंदीबाई, राजकीय सल्लागार सखारामबापू बोकील, नाना फडणीस,न्यायाधीश रामशास्त्री,माधवरावांचा सेवक श्रीपती त्याचबरोबरीने पेशवाईला साथ लाभलेली मराठा सरदार मंडळी ग्वाल्हेरकर शिंदे, इंदोरचे होळकर यांची राजनिष्ठा, करारी गोपिकाबाई, अल्लड नारायणराव, पतीबद्दल आपली निष्ठा ठेवून त्याला हरप्रसंगात साथ देणाऱ्या रमाबाई इ.या व्यक्तीरेखा आपल्याला भेटत असतात. पेशवाई राजकारणातील पेचप्रसंग, डावपेच, लढाया, पेशवाई थाट म्हणून आज वापरात असलेला शब्द त्या थाटाला साजेसं दरबारी वर्णन ही आपल्याला यात वाचायला मिळते. या वर्षी, २०२२ साली कादंबरीला प्रकाशित होऊन ६० वर्षे झाली आहेत.आजही वाचकांच्या पहिल्या पसंतीच्या अग्रक्रमात `स्वामी` आपलं अढळपद राखून आहे. ...Read more

  • Rating StarSharad Kharde Patil

    आज वाचुन पुर्ण झाली.. अगदी सहज सोप्या शब्दात कालखंड उभा करणे ही तर रणजित देसाई सरांची अफाट शक्ती च... श्रीमंत बाजीराव पेशवे वा पानिपत युद्धा नंतर मराठा साम्राज्यस लयाला नेण्यास नंतर चे पेशवे कारणीभूत या माझ्या अविचारी बुद्धीला छेद देणारी कांदाबरी.. "वाचाल तरच वाचाल " ...Read more

  • Rating StarAnkush Naik

    आजच कादंबरी वाचून पूर्ण झाली. राज्यकारभार सांभाळताना व गृहक्लेशातून जात असतानाही आपल्या पत्नीवर माधवरावांनी किती निस्सीम प्रेम केलं होतं, ह्याची माहिती झाली. माधवरावांचे आणि रमाबाईंचे शेवटी-शेवटी असलेले संवाद तर खरे प्रेम काय असते, याची जाणीव करून देात. कादंबरी वाचून पूर्ण झाल्यावर, मन खूप सुन्न झालं. प्रेमावरचे आज पर्यंत खूप चित्रपट बघितले आणि ते आवडले देखील, पण ही कादंबरी वाचून पूर्ण झाल्यावर वाटलं, की ह्या सारखी दुसरी प्रेमकथा असूच शकत नाही.. एवढंच म्हणेन, अप्रतिम !!!!!!!! अप्रतिम !!!!!!!! अप्रतिम !!!!!!!! रणजित देसाई सरांचे खूप आभार, त्यांच्या लेखनामुळेच एवढा छान इतिहास मनाला स्पर्शून गेला. 🙏🙏 ...Read more

  • Rating StarMahendra Dhalape

    "ती जागा फार सुंदर आहे, प्रशस्त घाट आहे. त्या घाटाच्या जरा वरच्या बाजूला जाऊन उभे राहिले व पहिले की काळ्या फत्तरानी रेखत गेलेला नदीकाठ डोळ्यात भरतो.नदीच्या पात्रावरून वाऱ्याबरोबर सळसळत येणाऱ्या लाटा मनाचे तरंग उठवतात... माधवरांवांचे मस्तक आपल्या मांडवर घेऊन रमाबाई चितेवरूनच दूरवर दिसणारा नदीचा पट्टा नजरेत भरत उराशी साठवत होत्या. अचानक दृश्य धुरकट होऊ लागले,ज्वाला वर चढत होत्या, फुटणाऱ्या लाकडाखेरीज काही आवाज आवाज कानांवर येत नव्हता.. क्षणभर दर्शन झाले ते ज्वालांच्या सोबतीने फडफडणाऱ्या रेशमी श्वेत-पदराचे.... रमाबाईंचे माधवरावांवर असलेलं निस्सीम प्रेम, कधीही एकमेकां कडे काहीही न मागणारे दोन्ही उभयतां, अत्यंत कमी वयात आलेल्या जबाबदारी स्वकर्तुत्वाने सिद्ध करणारे स्वामी...शब्दाच अपुरे आहेत पुढील वर्णनास.. शेवटची ३० पाने म्हणजे अगदी डोळ्या समोर सगळं दृश्य दिसत आहे असा भास आणि त्यातून होणारी मनाची घुसमट.. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more