* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WARSAW TE HIROSHIMA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663914
  • Edition : 10
  • Publishing Year : NOVEMBER 1968
  • Weight : 450.00 gms
  • Pages : 632
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Available in Combos :V. S. WALIMBE COMBO SET- 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SECOND WORLD WAR WAS FOUGHT ON THE STAGE OF THE HISTORY. IT WAS A FRANTIC PALAVER. IT WAS STARTED WITH THE RANGING FORWARD OF HITLER`S BATTALION TOWARDS WARSAW AND CAME TO AN ABRUPT END WITH THE NUCLEAR BOMB DROPPED ON HIROSHIMA. FOR THE FIRST TIME, THE WORLD EXPERIENCED SUCH LENGTHY AND INTENSE WAR. THIS WAR CHANGED THE FACE OF THE WORLD AND HUMANITY DRASTICALLY, TOTALLY TO SUCH AN EXTENT THAT IT WAS BEYOND RECOGNITION. THIS BOOK PRESENTS THE BLOODY HELL OF 2163 DAYS, RIGHT FROM THE BEGINNING AT WARSAW TO THE END OF HIROSHIMA.
दुसऱ्या महायुद्धाच्या प्रचंड रणकंदनाचा चित्रदर्शी शब्दपट दुसरे महायुद्ध म्हणजे इतिहासाच्या विराट मंचावरचे एक महातांडवाच. हिटलरच्या फौजांनी वॉर्साच्या रोखाने धाव घेताच या रणसंघर्षाला प्रारंभ झाला; आणि हिरोशिमावरच्या अणुस्पोटाने त्यांची सांगता केली. एवढी प्रदीर्घ आणि इतकी प्रखर झुंज जगाने प्रथमच अनुभवली; ते पार बदलून गेले - न ओळखण्याएवढे. हे कर्तुत्व करून दाखवणारे वॉर्सापासून हिरोशिमापर्यंतचे २१६३ रक्तरंजित दिवस.
* सोव्हिएत लँडचा नेहरू पुरस्कार १९८४ * महाराष्ट्र राज्य ह. ना. आपटे पुरस्कार १९८४
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#NANI PALKHIWALA #V.S.SVALIMBE#WARSAWTEHIROSHIMA #WETHEPEOPLE #WETHENATION
Customer Reviews
  • Rating StarPranav Patwardhan

    वॉर्सा ते हिरोशिमा लेखक- वि. स. वाळिंबे पृष्ठ- ६२६ प्रकाशक- मेहता पब्लिशिंग हाऊस किंमत- ₹४००/- मानवाच्या इतिहासात अनेक घटना अजरामर आहेत. त्या प्रत्येक घटनेचे मोठे पडसाद काळावर उमटलेले दिसतात. फ्रेंच राज्यक्रांती, अमेरिकेचं स्वातंत्र्ययुध्द इ. घटांनी नवीन मुल्यांची भर माणसाचा सामाजिक संस्कृतीत घातली. या घटनांची दखल आजही घेतली जाते. पहिले आणि दुसरे महायुध्द हे याच शृंखलेतील. दोन्ही महायुध्दांनी अवघ्या दोन दशकांच्या अंतरात संपूर्ण मानवजातीला जबरदस्त धक्के दिले. प्रचंड उलथापालथ आपल्या सर्वच अंगांवर घडून आली. साहित्य, ललित कला आदींपासून ते अगदी खाद्य संस्कृतीपर्यंत सर्वच क्षेत्रात फार मोठे बदल युध्दांनी घडवले. १ सप्टेंबर १९३९ या दिवशी आपल्या पाशवी आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जर्मन फौजा पोलंडमध्ये घुसल्या, त्यानंतर ३ सप्टेंबर १९३९ रोजी इंग्लंड आणि फ्रान्स हे दोन्ही देश हिटलरच्या अमानुष इच्छेला आवर घालायला उभे ठाकले, आणि खऱ्या अर्थाने दुसऱ्या जागतिक युद्धाला सुरूवात झाली. तिथून पुढचे २१६३ चाललेल्या युध्दात कित्येकांचा बळी गेला, विनाशाचं अभूतपूर्व तांडव जगाने पाहिलं. चर्चिल पार्लमेंटमध्ये म्हणाले होते त्याप्रमाणे खरोखरच हे युध्द सागर, आकाश आणि जमीन तिनही ठिकाणी लढलं गेल्यानंतर, २ सप्टेंबर १९४५ रोजी टोकियो उपसागरातल्या मिसूरी युध्दनौकेवर जपानी नेत्यांनी शरणागतीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर युध्दाची समाप्ती झाली. मानवाच्या इतिहासावर अतिशय खोल, गंभीर परिणाम घडवणाऱ्या या घटनेचा अभ्यास आवश्यक आहे. कदाचित, स्वतः युध्दातल्या प्रमुख देशांपैकी एक असल्याने, इंग्रजीत याबाबत विपुल साहित्या उपलब्ध आहे. संपूर्ण तटस्थवृत्तीने वि.स. वाळिंबे यांनी लिहीलेलं हे पुस्तक या दृष्टीने अतिशय उपयोगी आहे. दुसऱ्या महायुध्दाच्या दोन्ही पक्षांकडे पाहण्याचा प्रत्येकाचा स्वतंत्र दृष्टिकोन असतो. असा कुठलाही पूर्वग्रह न बाळगता, उपलब्ध साधनांच्या आधारे, वाळिंबे यांचे लिखाण म्हणजे युध्दाचा साद्यंत वृत्तांत आहे. वृत्तांत म्हटलं, तरी ते कुठेही निरस होत नाही, आणि निरस होत नाही म्हटलं तरी कुठेही उथळही होत नाही. युध्दाच्या सुरूवातीची कारणे, त्यातल्या प्रत्येकाचं स्थानारुढ होत जाणं, हे एकएक करून घडत जाताना आपल्या लक्षात येतं. एकाच वेळी बर्लिन, पॅरिस, लंडन, वॉशिंग्टन आदी ठिकाणी घडणाऱ्या घटना, त्यांचा एकमेकांवर पडत असलेला प्रभाव आपल्या लक्षात जातो. युध्दाच्या सुरूवातीच्या धामधुमीचा काळ- ज्यात अनेक घटना एकत्र घडतात, त्याही वाळिंबे उत्तमपणे उलगडून सांगतात. ‘युध्दस्य कथा रम्याः’ म्हणतात, परंतू वाळिंबे यांचं लिखाण त्यात कोरडेपणाही येऊ देत नाही, की भावनेच्या भरात वाहून जात नाही. वाळिंबे यांच्या पुस्तकाची सगळ्यात चांगली बाब म्हणजे, पुस्तकात युद्धोत्तर जगाबद्दल चालू असलेले विचारविमर्श सुंदर पद्धतीने मांडले आहेत. चर्चिल, रुझवेल्ट, स्टॅलिन या तिन नेत्यांच्या विविध बैठका, त्यांचे आपापासातले वैयक्तिक संबंध याबद्दलही लिहीले आहे. त्यामुळे आधुनिक अथवा युद्धोत्तर जगाबाबत तिनही नेत्यांचे दृष्टीकोन, त्यांचं राजकारण, आपल्या देशाला असणारं स्थान हे आपल्या ध्यानात येतं. सध्याच्या काळातले बहुसंख्य लोक हे युद्धोत्तर जगात जन्माला आलेले, त्यामुळे युद्धाची भीषणता न जाणणारे. त्याचप्रमाणे युद्धोत्तर जगाची घडणही माहित नसलेले. त्या सर्व वाचकांसाठी हे उपयुक्त ठरते. मूळ युद्धइतकेच, आधुनिक जगावर अतिशय दूरगामी परिणाम करणारे निर्णय बड्या तिन देशांनी तेव्हा घेतले. पुस्तकात त्या चर्चांचा साद्यंत उल्लेख येतो, मात्र कुठेही त्यावरचं विवेचन येत नाही. पुस्तकाचं अजून एक सौंदर्य म्हणजे, एकाच वेळी विविध ठिकाणी घडणाऱ्या घटना त्याच क्रमाने येत राहतात. म्हणजे, युरोपमधील युद्ध एका ठराविक वर्षातल्या विशिष्ट वळणावर आलं, की आशियातल्या जपानी आक्रमणाबद्दल त्याच वर्षातल्या एखाद्या महत्त्वाच्या घटनेपर्यंत वाळिंबे आणतात. त्यामुळे युद्धाचा पट आपल्यासमोर सहजतेने, विस्तृतपणे उभा राहतो. युद्धातल्या विविध लढायांचं वर्णन कराताना, त्यांचं सामरिक महत्त्वदेखील आपल्याला ते जाणवून देतात. दुसऱ्या महायुध्दाचा इतिहास लिहीताना, त्यातही विशेषतः हिटलरसारख्या खलनायकाचा समावेश असताना, फार काळजीपूर्वक लिहावा लागतो. हिटलरबद्दलचा द्वेष अथवा ममत्व टाळून वस्तुनिष्ठ पद्धतीने लिखाण करणं आवश्यक आहे. ते न झाल्यास पुस्तक एकांगी होईल. संपूर्ण द्वितीय युद्धात असंख्य घडामोडी विविध ठिकाणी एकाच वेळेस घडत राहिल्या. त्या सर्वांचा वस्तुनिष्ठ तरीही आकर्षक असा परामर्श घेणे अवघड आहे. मात्र वि.स.वाळिंबे यांच्यासारख्या कसलेल्या लेखकांनी ते सहजतेने हाताळले आहे. दुसऱ्या महायुद्धाबद्दल कुतूहल असल्यास वाचनास अतिशय उपयुक्त असे पुस्तक आहे. ...Read more

  • Rating StarSharadchandra Sudhakar Potdar

    World war II che sagale details yaat dile aahet...chhan pustak aahe....

  • Rating StarHEMANT SUBHASH

    पहिल्या महायुद्धाच्या शेवटा पासून दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटा पर्यंतचा पट यात मांडला आहे . शेकडो वर्षाच्या मानवी इतिहासात हा कालखंड बघायला गेलं तर तसा छोटा वाटेल परंतु या काळात घडलेल्या घटना या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या आहेत . राष्ट्रप्रमुखांच्या महतवकांक्षा , त्याला दिलेला राष्ट्रीयत्वाचा मुखवटा , वेगवेगळ्या देशातील जनतेची तेव्हा असलेल्या भावना यांची विस्तृत मांडणी या ग्रंथात आहे . विचार केला तर अतिगुंतागुंतीचे समीकरण त्या काळात बनली .परंतु घटनांची मांडणी अशी काही ओघवती आहे कि वाचकांना ती खिळवून ठेवते . ...Read more

  • Rating StarNeha Nivasarkar-Ratnakar

    World War 2 cha bible

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more