* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WARSAW TE HIROSHIMA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663914
  • Edition : 10
  • Publishing Year : NOVEMBER 1968
  • Weight : 450.00 gms
  • Pages : 632
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Available in Combos :V. S. WALIMBE COMBO SET- 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SECOND WORLD WAR WAS FOUGHT ON THE STAGE OF THE HISTORY. IT WAS A FRANTIC PALAVER. IT WAS STARTED WITH THE RANGING FORWARD OF HITLER`S BATTALION TOWARDS WARSAW AND CAME TO AN ABRUPT END WITH THE NUCLEAR BOMB DROPPED ON HIROSHIMA. FOR THE FIRST TIME, THE WORLD EXPERIENCED SUCH LENGTHY AND INTENSE WAR. THIS WAR CHANGED THE FACE OF THE WORLD AND HUMANITY DRASTICALLY, TOTALLY TO SUCH AN EXTENT THAT IT WAS BEYOND RECOGNITION. THIS BOOK PRESENTS THE BLOODY HELL OF 2163 DAYS, RIGHT FROM THE BEGINNING AT WARSAW TO THE END OF HIROSHIMA.
दुसऱ्या महायुद्धाच्या प्रचंड रणकंदनाचा चित्रदर्शी शब्दपट दुसरे महायुद्ध म्हणजे इतिहासाच्या विराट मंचावरचे एक महातांडवाच. हिटलरच्या फौजांनी वॉर्साच्या रोखाने धाव घेताच या रणसंघर्षाला प्रारंभ झाला; आणि हिरोशिमावरच्या अणुस्पोटाने त्यांची सांगता केली. एवढी प्रदीर्घ आणि इतकी प्रखर झुंज जगाने प्रथमच अनुभवली; ते पार बदलून गेले - न ओळखण्याएवढे. हे कर्तुत्व करून दाखवणारे वॉर्सापासून हिरोशिमापर्यंतचे २१६३ रक्तरंजित दिवस.
* सोव्हिएत लँडचा नेहरू पुरस्कार १९८४ * महाराष्ट्र राज्य ह. ना. आपटे पुरस्कार १९८४
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#NANI PALKHIWALA #V.S.SVALIMBE#WARSAWTEHIROSHIMA #WETHEPEOPLE #WETHENATION
Customer Reviews
  • Rating StarPranav Patwardhan

    वॉर्सा ते हिरोशिमा लेखक- वि. स. वाळिंबे पृष्ठ- ६२६ प्रकाशक- मेहता पब्लिशिंग हाऊस किंमत- ₹४००/- मानवाच्या इतिहासात अनेक घटना अजरामर आहेत. त्या प्रत्येक घटनेचे मोठे पडसाद काळावर उमटलेले दिसतात. फ्रेंच राज्यक्रांती, अमेरिकेचं स्वातंत्र्ययुध्द इ. घटांनी नवीन मुल्यांची भर माणसाचा सामाजिक संस्कृतीत घातली. या घटनांची दखल आजही घेतली जाते. पहिले आणि दुसरे महायुध्द हे याच शृंखलेतील. दोन्ही महायुध्दांनी अवघ्या दोन दशकांच्या अंतरात संपूर्ण मानवजातीला जबरदस्त धक्के दिले. प्रचंड उलथापालथ आपल्या सर्वच अंगांवर घडून आली. साहित्य, ललित कला आदींपासून ते अगदी खाद्य संस्कृतीपर्यंत सर्वच क्षेत्रात फार मोठे बदल युध्दांनी घडवले. १ सप्टेंबर १९३९ या दिवशी आपल्या पाशवी आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जर्मन फौजा पोलंडमध्ये घुसल्या, त्यानंतर ३ सप्टेंबर १९३९ रोजी इंग्लंड आणि फ्रान्स हे दोन्ही देश हिटलरच्या अमानुष इच्छेला आवर घालायला उभे ठाकले, आणि खऱ्या अर्थाने दुसऱ्या जागतिक युद्धाला सुरूवात झाली. तिथून पुढचे २१६३ चाललेल्या युध्दात कित्येकांचा बळी गेला, विनाशाचं अभूतपूर्व तांडव जगाने पाहिलं. चर्चिल पार्लमेंटमध्ये म्हणाले होते त्याप्रमाणे खरोखरच हे युध्द सागर, आकाश आणि जमीन तिनही ठिकाणी लढलं गेल्यानंतर, २ सप्टेंबर १९४५ रोजी टोकियो उपसागरातल्या मिसूरी युध्दनौकेवर जपानी नेत्यांनी शरणागतीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर युध्दाची समाप्ती झाली. मानवाच्या इतिहासावर अतिशय खोल, गंभीर परिणाम घडवणाऱ्या या घटनेचा अभ्यास आवश्यक आहे. कदाचित, स्वतः युध्दातल्या प्रमुख देशांपैकी एक असल्याने, इंग्रजीत याबाबत विपुल साहित्या उपलब्ध आहे. संपूर्ण तटस्थवृत्तीने वि.स. वाळिंबे यांनी लिहीलेलं हे पुस्तक या दृष्टीने अतिशय उपयोगी आहे. दुसऱ्या महायुध्दाच्या दोन्ही पक्षांकडे पाहण्याचा प्रत्येकाचा स्वतंत्र दृष्टिकोन असतो. असा कुठलाही पूर्वग्रह न बाळगता, उपलब्ध साधनांच्या आधारे, वाळिंबे यांचे लिखाण म्हणजे युध्दाचा साद्यंत वृत्तांत आहे. वृत्तांत म्हटलं, तरी ते कुठेही निरस होत नाही, आणि निरस होत नाही म्हटलं तरी कुठेही उथळही होत नाही. युध्दाच्या सुरूवातीची कारणे, त्यातल्या प्रत्येकाचं स्थानारुढ होत जाणं, हे एकएक करून घडत जाताना आपल्या लक्षात येतं. एकाच वेळी बर्लिन, पॅरिस, लंडन, वॉशिंग्टन आदी ठिकाणी घडणाऱ्या घटना, त्यांचा एकमेकांवर पडत असलेला प्रभाव आपल्या लक्षात जातो. युध्दाच्या सुरूवातीच्या धामधुमीचा काळ- ज्यात अनेक घटना एकत्र घडतात, त्याही वाळिंबे उत्तमपणे उलगडून सांगतात. ‘युध्दस्य कथा रम्याः’ म्हणतात, परंतू वाळिंबे यांचं लिखाण त्यात कोरडेपणाही येऊ देत नाही, की भावनेच्या भरात वाहून जात नाही. वाळिंबे यांच्या पुस्तकाची सगळ्यात चांगली बाब म्हणजे, पुस्तकात युद्धोत्तर जगाबद्दल चालू असलेले विचारविमर्श सुंदर पद्धतीने मांडले आहेत. चर्चिल, रुझवेल्ट, स्टॅलिन या तिन नेत्यांच्या विविध बैठका, त्यांचे आपापासातले वैयक्तिक संबंध याबद्दलही लिहीले आहे. त्यामुळे आधुनिक अथवा युद्धोत्तर जगाबाबत तिनही नेत्यांचे दृष्टीकोन, त्यांचं राजकारण, आपल्या देशाला असणारं स्थान हे आपल्या ध्यानात येतं. सध्याच्या काळातले बहुसंख्य लोक हे युद्धोत्तर जगात जन्माला आलेले, त्यामुळे युद्धाची भीषणता न जाणणारे. त्याचप्रमाणे युद्धोत्तर जगाची घडणही माहित नसलेले. त्या सर्व वाचकांसाठी हे उपयुक्त ठरते. मूळ युद्धइतकेच, आधुनिक जगावर अतिशय दूरगामी परिणाम करणारे निर्णय बड्या तिन देशांनी तेव्हा घेतले. पुस्तकात त्या चर्चांचा साद्यंत उल्लेख येतो, मात्र कुठेही त्यावरचं विवेचन येत नाही. पुस्तकाचं अजून एक सौंदर्य म्हणजे, एकाच वेळी विविध ठिकाणी घडणाऱ्या घटना त्याच क्रमाने येत राहतात. म्हणजे, युरोपमधील युद्ध एका ठराविक वर्षातल्या विशिष्ट वळणावर आलं, की आशियातल्या जपानी आक्रमणाबद्दल त्याच वर्षातल्या एखाद्या महत्त्वाच्या घटनेपर्यंत वाळिंबे आणतात. त्यामुळे युद्धाचा पट आपल्यासमोर सहजतेने, विस्तृतपणे उभा राहतो. युद्धातल्या विविध लढायांचं वर्णन कराताना, त्यांचं सामरिक महत्त्वदेखील आपल्याला ते जाणवून देतात. दुसऱ्या महायुध्दाचा इतिहास लिहीताना, त्यातही विशेषतः हिटलरसारख्या खलनायकाचा समावेश असताना, फार काळजीपूर्वक लिहावा लागतो. हिटलरबद्दलचा द्वेष अथवा ममत्व टाळून वस्तुनिष्ठ पद्धतीने लिखाण करणं आवश्यक आहे. ते न झाल्यास पुस्तक एकांगी होईल. संपूर्ण द्वितीय युद्धात असंख्य घडामोडी विविध ठिकाणी एकाच वेळेस घडत राहिल्या. त्या सर्वांचा वस्तुनिष्ठ तरीही आकर्षक असा परामर्श घेणे अवघड आहे. मात्र वि.स.वाळिंबे यांच्यासारख्या कसलेल्या लेखकांनी ते सहजतेने हाताळले आहे. दुसऱ्या महायुद्धाबद्दल कुतूहल असल्यास वाचनास अतिशय उपयुक्त असे पुस्तक आहे. ...Read more

  • Rating StarSharadchandra Sudhakar Potdar

    World war II che sagale details yaat dile aahet...chhan pustak aahe....

  • Rating StarHEMANT SUBHASH

    पहिल्या महायुद्धाच्या शेवटा पासून दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटा पर्यंतचा पट यात मांडला आहे . शेकडो वर्षाच्या मानवी इतिहासात हा कालखंड बघायला गेलं तर तसा छोटा वाटेल परंतु या काळात घडलेल्या घटना या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या आहेत . राष्ट्रप्रमुखांच्या महतवकांक्षा , त्याला दिलेला राष्ट्रीयत्वाचा मुखवटा , वेगवेगळ्या देशातील जनतेची तेव्हा असलेल्या भावना यांची विस्तृत मांडणी या ग्रंथात आहे . विचार केला तर अतिगुंतागुंतीचे समीकरण त्या काळात बनली .परंतु घटनांची मांडणी अशी काही ओघवती आहे कि वाचकांना ती खिळवून ठेवते . ...Read more

  • Rating StarNeha Nivasarkar-Ratnakar

    World War 2 cha bible

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more