* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WARSAW TE HIROSHIMA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663914
  • Edition : 9
  • Publishing Year : NOVEMBER 1968
  • Weight : 450.00 gms
  • Pages : 632
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Available in Combos :V. S. WALIMBE COMBO SET- 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SECOND WORLD WAR WAS FOUGHT ON THE STAGE OF THE HISTORY. IT WAS A FRANTIC PALAVER. IT WAS STARTED WITH THE RANGING FORWARD OF HITLER`S BATTALION TOWARDS WARSAW AND CAME TO AN ABRUPT END WITH THE NUCLEAR BOMB DROPPED ON HIROSHIMA. FOR THE FIRST TIME, THE WORLD EXPERIENCED SUCH LENGTHY AND INTENSE WAR. THIS WAR CHANGED THE FACE OF THE WORLD AND HUMANITY DRASTICALLY, TOTALLY TO SUCH AN EXTENT THAT IT WAS BEYOND RECOGNITION. THIS BOOK PRESENTS THE BLOODY HELL OF 2163 DAYS, RIGHT FROM THE BEGINNING AT WARSAW TO THE END OF HIROSHIMA.
दुसऱ्या महायुद्धाच्या प्रचंड रणकंदनाचा चित्रदर्शी शब्दपट दुसरे महायुद्ध म्हणजे इतिहासाच्या विराट मंचावरचे एक महातांडवाच. हिटलरच्या फौजांनी वॉर्साच्या रोखाने धाव घेताच या रणसंघर्षाला प्रारंभ झाला; आणि हिरोशिमावरच्या अणुस्पोटाने त्यांची सांगता केली. एवढी प्रदीर्घ आणि इतकी प्रखर झुंज जगाने प्रथमच अनुभवली; ते पार बदलून गेले - न ओळखण्याएवढे. हे कर्तुत्व करून दाखवणारे वॉर्सापासून हिरोशिमापर्यंतचे २१६३ रक्तरंजित दिवस.
* सोव्हिएत लँडचा नेहरू पुरस्कार १९८४ * महाराष्ट्र राज्य ह. ना. आपटे पुरस्कार १९८४
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#NANI PALKHIWALA #V.S.SVALIMBE#WARSAWTEHIROSHIMA #WETHEPEOPLE #WETHENATION
Customer Reviews
  • Rating StarPranav Patwardhan

    वॉर्सा ते हिरोशिमा लेखक- वि. स. वाळिंबे पृष्ठ- ६२६ प्रकाशक- मेहता पब्लिशिंग हाऊस किंमत- ₹४००/- मानवाच्या इतिहासात अनेक घटना अजरामर आहेत. त्या प्रत्येक घटनेचे मोठे पडसाद काळावर उमटलेले दिसतात. फ्रेंच राज्यक्रांती, अमेरिकेचं स्वातंत्र्ययुध्द इ. घटांनी नवीन मुल्यांची भर माणसाचा सामाजिक संस्कृतीत घातली. या घटनांची दखल आजही घेतली जाते. पहिले आणि दुसरे महायुध्द हे याच शृंखलेतील. दोन्ही महायुध्दांनी अवघ्या दोन दशकांच्या अंतरात संपूर्ण मानवजातीला जबरदस्त धक्के दिले. प्रचंड उलथापालथ आपल्या सर्वच अंगांवर घडून आली. साहित्य, ललित कला आदींपासून ते अगदी खाद्य संस्कृतीपर्यंत सर्वच क्षेत्रात फार मोठे बदल युध्दांनी घडवले. १ सप्टेंबर १९३९ या दिवशी आपल्या पाशवी आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जर्मन फौजा पोलंडमध्ये घुसल्या, त्यानंतर ३ सप्टेंबर १९३९ रोजी इंग्लंड आणि फ्रान्स हे दोन्ही देश हिटलरच्या अमानुष इच्छेला आवर घालायला उभे ठाकले, आणि खऱ्या अर्थाने दुसऱ्या जागतिक युद्धाला सुरूवात झाली. तिथून पुढचे २१६३ चाललेल्या युध्दात कित्येकांचा बळी गेला, विनाशाचं अभूतपूर्व तांडव जगाने पाहिलं. चर्चिल पार्लमेंटमध्ये म्हणाले होते त्याप्रमाणे खरोखरच हे युध्द सागर, आकाश आणि जमीन तिनही ठिकाणी लढलं गेल्यानंतर, २ सप्टेंबर १९४५ रोजी टोकियो उपसागरातल्या मिसूरी युध्दनौकेवर जपानी नेत्यांनी शरणागतीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर युध्दाची समाप्ती झाली. मानवाच्या इतिहासावर अतिशय खोल, गंभीर परिणाम घडवणाऱ्या या घटनेचा अभ्यास आवश्यक आहे. कदाचित, स्वतः युध्दातल्या प्रमुख देशांपैकी एक असल्याने, इंग्रजीत याबाबत विपुल साहित्या उपलब्ध आहे. संपूर्ण तटस्थवृत्तीने वि.स. वाळिंबे यांनी लिहीलेलं हे पुस्तक या दृष्टीने अतिशय उपयोगी आहे. दुसऱ्या महायुध्दाच्या दोन्ही पक्षांकडे पाहण्याचा प्रत्येकाचा स्वतंत्र दृष्टिकोन असतो. असा कुठलाही पूर्वग्रह न बाळगता, उपलब्ध साधनांच्या आधारे, वाळिंबे यांचे लिखाण म्हणजे युध्दाचा साद्यंत वृत्तांत आहे. वृत्तांत म्हटलं, तरी ते कुठेही निरस होत नाही, आणि निरस होत नाही म्हटलं तरी कुठेही उथळही होत नाही. युध्दाच्या सुरूवातीची कारणे, त्यातल्या प्रत्येकाचं स्थानारुढ होत जाणं, हे एकएक करून घडत जाताना आपल्या लक्षात येतं. एकाच वेळी बर्लिन, पॅरिस, लंडन, वॉशिंग्टन आदी ठिकाणी घडणाऱ्या घटना, त्यांचा एकमेकांवर पडत असलेला प्रभाव आपल्या लक्षात जातो. युध्दाच्या सुरूवातीच्या धामधुमीचा काळ- ज्यात अनेक घटना एकत्र घडतात, त्याही वाळिंबे उत्तमपणे उलगडून सांगतात. ‘युध्दस्य कथा रम्याः’ म्हणतात, परंतू वाळिंबे यांचं लिखाण त्यात कोरडेपणाही येऊ देत नाही, की भावनेच्या भरात वाहून जात नाही. वाळिंबे यांच्या पुस्तकाची सगळ्यात चांगली बाब म्हणजे, पुस्तकात युद्धोत्तर जगाबद्दल चालू असलेले विचारविमर्श सुंदर पद्धतीने मांडले आहेत. चर्चिल, रुझवेल्ट, स्टॅलिन या तिन नेत्यांच्या विविध बैठका, त्यांचे आपापासातले वैयक्तिक संबंध याबद्दलही लिहीले आहे. त्यामुळे आधुनिक अथवा युद्धोत्तर जगाबाबत तिनही नेत्यांचे दृष्टीकोन, त्यांचं राजकारण, आपल्या देशाला असणारं स्थान हे आपल्या ध्यानात येतं. सध्याच्या काळातले बहुसंख्य लोक हे युद्धोत्तर जगात जन्माला आलेले, त्यामुळे युद्धाची भीषणता न जाणणारे. त्याचप्रमाणे युद्धोत्तर जगाची घडणही माहित नसलेले. त्या सर्व वाचकांसाठी हे उपयुक्त ठरते. मूळ युद्धइतकेच, आधुनिक जगावर अतिशय दूरगामी परिणाम करणारे निर्णय बड्या तिन देशांनी तेव्हा घेतले. पुस्तकात त्या चर्चांचा साद्यंत उल्लेख येतो, मात्र कुठेही त्यावरचं विवेचन येत नाही. पुस्तकाचं अजून एक सौंदर्य म्हणजे, एकाच वेळी विविध ठिकाणी घडणाऱ्या घटना त्याच क्रमाने येत राहतात. म्हणजे, युरोपमधील युद्ध एका ठराविक वर्षातल्या विशिष्ट वळणावर आलं, की आशियातल्या जपानी आक्रमणाबद्दल त्याच वर्षातल्या एखाद्या महत्त्वाच्या घटनेपर्यंत वाळिंबे आणतात. त्यामुळे युद्धाचा पट आपल्यासमोर सहजतेने, विस्तृतपणे उभा राहतो. युद्धातल्या विविध लढायांचं वर्णन कराताना, त्यांचं सामरिक महत्त्वदेखील आपल्याला ते जाणवून देतात. दुसऱ्या महायुध्दाचा इतिहास लिहीताना, त्यातही विशेषतः हिटलरसारख्या खलनायकाचा समावेश असताना, फार काळजीपूर्वक लिहावा लागतो. हिटलरबद्दलचा द्वेष अथवा ममत्व टाळून वस्तुनिष्ठ पद्धतीने लिखाण करणं आवश्यक आहे. ते न झाल्यास पुस्तक एकांगी होईल. संपूर्ण द्वितीय युद्धात असंख्य घडामोडी विविध ठिकाणी एकाच वेळेस घडत राहिल्या. त्या सर्वांचा वस्तुनिष्ठ तरीही आकर्षक असा परामर्श घेणे अवघड आहे. मात्र वि.स.वाळिंबे यांच्यासारख्या कसलेल्या लेखकांनी ते सहजतेने हाताळले आहे. दुसऱ्या महायुद्धाबद्दल कुतूहल असल्यास वाचनास अतिशय उपयुक्त असे पुस्तक आहे. ...Read more

  • Rating StarSharadchandra Sudhakar Potdar

    World war II che sagale details yaat dile aahet...chhan pustak aahe....

  • Rating StarHEMANT SUBHASH

    पहिल्या महायुद्धाच्या शेवटा पासून दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटा पर्यंतचा पट यात मांडला आहे . शेकडो वर्षाच्या मानवी इतिहासात हा कालखंड बघायला गेलं तर तसा छोटा वाटेल परंतु या काळात घडलेल्या घटना या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या आहेत . राष्ट्रप्रमुखांच्या महतवकांक्षा , त्याला दिलेला राष्ट्रीयत्वाचा मुखवटा , वेगवेगळ्या देशातील जनतेची तेव्हा असलेल्या भावना यांची विस्तृत मांडणी या ग्रंथात आहे . विचार केला तर अतिगुंतागुंतीचे समीकरण त्या काळात बनली .परंतु घटनांची मांडणी अशी काही ओघवती आहे कि वाचकांना ती खिळवून ठेवते . ...Read more

  • Rating StarNeha Nivasarkar-Ratnakar

    World War 2 cha bible

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more