* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WARSAW TE HIROSHIMA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663914
  • Edition : 9
  • Publishing Year : NOVEMBER 1968
  • Weight : 450.00 gms
  • Pages : 632
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Available in Combos :V. S. WALIMBE COMBO SET- 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SECOND WORLD WAR WAS FOUGHT ON THE STAGE OF THE HISTORY. IT WAS A FRANTIC PALAVER. IT WAS STARTED WITH THE RANGING FORWARD OF HITLER`S BATTALION TOWARDS WARSAW AND CAME TO AN ABRUPT END WITH THE NUCLEAR BOMB DROPPED ON HIROSHIMA. FOR THE FIRST TIME, THE WORLD EXPERIENCED SUCH LENGTHY AND INTENSE WAR. THIS WAR CHANGED THE FACE OF THE WORLD AND HUMANITY DRASTICALLY, TOTALLY TO SUCH AN EXTENT THAT IT WAS BEYOND RECOGNITION. THIS BOOK PRESENTS THE BLOODY HELL OF 2163 DAYS, RIGHT FROM THE BEGINNING AT WARSAW TO THE END OF HIROSHIMA.
दुसऱ्या महायुद्धाच्या प्रचंड रणकंदनाचा चित्रदर्शी शब्दपट दुसरे महायुद्ध म्हणजे इतिहासाच्या विराट मंचावरचे एक महातांडवाच. हिटलरच्या फौजांनी वॉर्साच्या रोखाने धाव घेताच या रणसंघर्षाला प्रारंभ झाला; आणि हिरोशिमावरच्या अणुस्पोटाने त्यांची सांगता केली. एवढी प्रदीर्घ आणि इतकी प्रखर झुंज जगाने प्रथमच अनुभवली; ते पार बदलून गेले - न ओळखण्याएवढे. हे कर्तुत्व करून दाखवणारे वॉर्सापासून हिरोशिमापर्यंतचे २१६३ रक्तरंजित दिवस.
* सोव्हिएत लँडचा नेहरू पुरस्कार १९८४ * महाराष्ट्र राज्य ह. ना. आपटे पुरस्कार १९८४
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#NANI PALKHIWALA #V.S.SVALIMBE#WARSAWTEHIROSHIMA #WETHEPEOPLE #WETHENATION
Customer Reviews
  • Rating StarPranav Patwardhan

    वॉर्सा ते हिरोशिमा लेखक- वि. स. वाळिंबे पृष्ठ- ६२६ प्रकाशक- मेहता पब्लिशिंग हाऊस किंमत- ₹४००/- मानवाच्या इतिहासात अनेक घटना अजरामर आहेत. त्या प्रत्येक घटनेचे मोठे पडसाद काळावर उमटलेले दिसतात. फ्रेंच राज्यक्रांती, अमेरिकेचं स्वातंत्र्ययुध्द इ. घटांनी नवीन मुल्यांची भर माणसाचा सामाजिक संस्कृतीत घातली. या घटनांची दखल आजही घेतली जाते. पहिले आणि दुसरे महायुध्द हे याच शृंखलेतील. दोन्ही महायुध्दांनी अवघ्या दोन दशकांच्या अंतरात संपूर्ण मानवजातीला जबरदस्त धक्के दिले. प्रचंड उलथापालथ आपल्या सर्वच अंगांवर घडून आली. साहित्य, ललित कला आदींपासून ते अगदी खाद्य संस्कृतीपर्यंत सर्वच क्षेत्रात फार मोठे बदल युध्दांनी घडवले. १ सप्टेंबर १९३९ या दिवशी आपल्या पाशवी आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जर्मन फौजा पोलंडमध्ये घुसल्या, त्यानंतर ३ सप्टेंबर १९३९ रोजी इंग्लंड आणि फ्रान्स हे दोन्ही देश हिटलरच्या अमानुष इच्छेला आवर घालायला उभे ठाकले, आणि खऱ्या अर्थाने दुसऱ्या जागतिक युद्धाला सुरूवात झाली. तिथून पुढचे २१६३ चाललेल्या युध्दात कित्येकांचा बळी गेला, विनाशाचं अभूतपूर्व तांडव जगाने पाहिलं. चर्चिल पार्लमेंटमध्ये म्हणाले होते त्याप्रमाणे खरोखरच हे युध्द सागर, आकाश आणि जमीन तिनही ठिकाणी लढलं गेल्यानंतर, २ सप्टेंबर १९४५ रोजी टोकियो उपसागरातल्या मिसूरी युध्दनौकेवर जपानी नेत्यांनी शरणागतीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर युध्दाची समाप्ती झाली. मानवाच्या इतिहासावर अतिशय खोल, गंभीर परिणाम घडवणाऱ्या या घटनेचा अभ्यास आवश्यक आहे. कदाचित, स्वतः युध्दातल्या प्रमुख देशांपैकी एक असल्याने, इंग्रजीत याबाबत विपुल साहित्या उपलब्ध आहे. संपूर्ण तटस्थवृत्तीने वि.स. वाळिंबे यांनी लिहीलेलं हे पुस्तक या दृष्टीने अतिशय उपयोगी आहे. दुसऱ्या महायुध्दाच्या दोन्ही पक्षांकडे पाहण्याचा प्रत्येकाचा स्वतंत्र दृष्टिकोन असतो. असा कुठलाही पूर्वग्रह न बाळगता, उपलब्ध साधनांच्या आधारे, वाळिंबे यांचे लिखाण म्हणजे युध्दाचा साद्यंत वृत्तांत आहे. वृत्तांत म्हटलं, तरी ते कुठेही निरस होत नाही, आणि निरस होत नाही म्हटलं तरी कुठेही उथळही होत नाही. युध्दाच्या सुरूवातीची कारणे, त्यातल्या प्रत्येकाचं स्थानारुढ होत जाणं, हे एकएक करून घडत जाताना आपल्या लक्षात येतं. एकाच वेळी बर्लिन, पॅरिस, लंडन, वॉशिंग्टन आदी ठिकाणी घडणाऱ्या घटना, त्यांचा एकमेकांवर पडत असलेला प्रभाव आपल्या लक्षात जातो. युध्दाच्या सुरूवातीच्या धामधुमीचा काळ- ज्यात अनेक घटना एकत्र घडतात, त्याही वाळिंबे उत्तमपणे उलगडून सांगतात. ‘युध्दस्य कथा रम्याः’ म्हणतात, परंतू वाळिंबे यांचं लिखाण त्यात कोरडेपणाही येऊ देत नाही, की भावनेच्या भरात वाहून जात नाही. वाळिंबे यांच्या पुस्तकाची सगळ्यात चांगली बाब म्हणजे, पुस्तकात युद्धोत्तर जगाबद्दल चालू असलेले विचारविमर्श सुंदर पद्धतीने मांडले आहेत. चर्चिल, रुझवेल्ट, स्टॅलिन या तिन नेत्यांच्या विविध बैठका, त्यांचे आपापासातले वैयक्तिक संबंध याबद्दलही लिहीले आहे. त्यामुळे आधुनिक अथवा युद्धोत्तर जगाबाबत तिनही नेत्यांचे दृष्टीकोन, त्यांचं राजकारण, आपल्या देशाला असणारं स्थान हे आपल्या ध्यानात येतं. सध्याच्या काळातले बहुसंख्य लोक हे युद्धोत्तर जगात जन्माला आलेले, त्यामुळे युद्धाची भीषणता न जाणणारे. त्याचप्रमाणे युद्धोत्तर जगाची घडणही माहित नसलेले. त्या सर्व वाचकांसाठी हे उपयुक्त ठरते. मूळ युद्धइतकेच, आधुनिक जगावर अतिशय दूरगामी परिणाम करणारे निर्णय बड्या तिन देशांनी तेव्हा घेतले. पुस्तकात त्या चर्चांचा साद्यंत उल्लेख येतो, मात्र कुठेही त्यावरचं विवेचन येत नाही. पुस्तकाचं अजून एक सौंदर्य म्हणजे, एकाच वेळी विविध ठिकाणी घडणाऱ्या घटना त्याच क्रमाने येत राहतात. म्हणजे, युरोपमधील युद्ध एका ठराविक वर्षातल्या विशिष्ट वळणावर आलं, की आशियातल्या जपानी आक्रमणाबद्दल त्याच वर्षातल्या एखाद्या महत्त्वाच्या घटनेपर्यंत वाळिंबे आणतात. त्यामुळे युद्धाचा पट आपल्यासमोर सहजतेने, विस्तृतपणे उभा राहतो. युद्धातल्या विविध लढायांचं वर्णन कराताना, त्यांचं सामरिक महत्त्वदेखील आपल्याला ते जाणवून देतात. दुसऱ्या महायुध्दाचा इतिहास लिहीताना, त्यातही विशेषतः हिटलरसारख्या खलनायकाचा समावेश असताना, फार काळजीपूर्वक लिहावा लागतो. हिटलरबद्दलचा द्वेष अथवा ममत्व टाळून वस्तुनिष्ठ पद्धतीने लिखाण करणं आवश्यक आहे. ते न झाल्यास पुस्तक एकांगी होईल. संपूर्ण द्वितीय युद्धात असंख्य घडामोडी विविध ठिकाणी एकाच वेळेस घडत राहिल्या. त्या सर्वांचा वस्तुनिष्ठ तरीही आकर्षक असा परामर्श घेणे अवघड आहे. मात्र वि.स.वाळिंबे यांच्यासारख्या कसलेल्या लेखकांनी ते सहजतेने हाताळले आहे. दुसऱ्या महायुद्धाबद्दल कुतूहल असल्यास वाचनास अतिशय उपयुक्त असे पुस्तक आहे. ...Read more

  • Rating StarSharadchandra Sudhakar Potdar

    World war II che sagale details yaat dile aahet...chhan pustak aahe....

  • Rating StarHEMANT SUBHASH

    पहिल्या महायुद्धाच्या शेवटा पासून दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटा पर्यंतचा पट यात मांडला आहे . शेकडो वर्षाच्या मानवी इतिहासात हा कालखंड बघायला गेलं तर तसा छोटा वाटेल परंतु या काळात घडलेल्या घटना या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या आहेत . राष्ट्रप्रमुखांच्या महतवकांक्षा , त्याला दिलेला राष्ट्रीयत्वाचा मुखवटा , वेगवेगळ्या देशातील जनतेची तेव्हा असलेल्या भावना यांची विस्तृत मांडणी या ग्रंथात आहे . विचार केला तर अतिगुंतागुंतीचे समीकरण त्या काळात बनली .परंतु घटनांची मांडणी अशी काही ओघवती आहे कि वाचकांना ती खिळवून ठेवते . ...Read more

  • Rating StarNeha Nivasarkar-Ratnakar

    World War 2 cha bible

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHASAMRAT RANKHAINDAL
MAHASAMRAT RANKHAINDAL by VISHWAS PATIL Rating Star
गंधार

नमस्ते सर, काल रात्री मी रणखैनदळ मध्ये आपण लिहलेला पावनखिंडीतील थरार वाचून काढला. कालची रात्र मी कधीच विसरणार नाही. जणू काही मीच महाराजांसोबत प्रवास करणारा एक मावळा आहे. महाराज थकल्यावर त्यांच्या तळपायांना राईचं तेल चोळून देतो आहे, त्यांच्यासह नाचणीच भाकर खातो आहे असं मला वाटतं होतं. सर, एखाद्या लहान मुलाला आकाशातल्या तारका दाखवाव्यात त्याचप्रमाणे आपण इतिहासाच्या नभांगणातील असंख्य तारकांचं दर्शन घडवून आणता आणि छत्रपती शिवराय हा अर्थातच ताऱ्यांमधील तारा असा ध्रुवतारा आहे ज्याचं अनोखं असं दर्शन महासम्राट मधून घडतंय. सर, माझी केवळ मागच्या जन्मीची पुण्याई म्हणून मी आपल्याला भेटू शकलो. ...Read more

FOUR SEASONS
FOUR SEASONS by SHARMILA PHADKE Rating Star
लोकसत्ता १०.९.२०२३ (लोकरंग) वंदना बोकील-कुलकर्णी

माणसांवाचून रिकामी गावं, रस्ते, घरं न पाहवणारी, अंजनमाळावरच्या नागदेवीच्या कातळावर रणरण उन्हात सर्वागाने उन्हं पिऊन घेणारी, आपली उन्हात तापून दग्ध तांबूस झालेली देहाकृती व्हिन्सेंटने (व्हान गॉग) पाहावी आत्ता या क्षणी आणि तिच्या मोहात पडून त्यानेती आपल्या कॅनव्हासवर रेखाटावी असं आसुसून वाटणारी एक अतिसंवेदनशील तरुणी कामायनी ही शर्मिला फडके यांच्या ‘फोर सीझन्स’ या कादंबरीची नायिका. या नायिकेची चार प्रदेशात, चार ऋतूंमध्ये, चार पुरुषांच्या सहवासात घडणारी कहाणी म्हणून तिचं शीर्षक ‘फोर सीझन्स’. ‘फोर सीझन्स’ ही खऱ्या अर्थाने आत्ताची कादंबरी आहे. कदाचित पहिली ब्लॉग कादंबरी. कारण लेखिकेने कादंबरीच्या नायिकेच्या नावाने ‘टय़ुलिप्स अॅण्ड ट्वायलाइट’ या ब्लॉगवर पोस्ट्स लिहिल्या. ‘कादंबरीने बऱ्यापैकी आकार घेतल्यावर, व्यक्तिरेखा सुस्पष्ट झाल्यावर’ मग हा ब्लॉग तिने बंद केला. ‘ब्लॉग अर्काइव्हमध्ये जमा झालेल्या शेकडो पोस्ट्सवरून मॅपिंग करत’ कादंबरीचा आत्ताचा आकार तिने सिद्ध केला. हिची निर्मितीप्रक्रिया आत्ताच्या तंत्रसाहाय्याने, समाजमाध्यमांचा शहाणा उपयोग करून घेऊन झाली आहे. या अर्थाने ही आत्ताची कादंबरी. अलीकडे म्हणजे साधारण गेल्या दहा वर्षांत नव्याने लिहू लागलेल्या लेखकांत हिरिरीने आपली भूमिकावाहक पात्रे निर्माण करण्याची जी वृत्ती दिसते तिच्यात न अडकता आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहत आणि तरी कथनात्म साहित्याच्या मागण्या नीट कळून घेत लेखन करणाऱ्यांमध्ये शर्मिला फडके ही लेखिका लक्ष वेधून घेते. मोजके लेखन आहे तिचे पण खरेच लक्षात राहणारे. गेल्या पाच-सहा वर्षांत विविध दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेल्या तिच्या कथा पाहिल्या तरी हे पटेल. ‘ये शहर बडा पुराना है’ ही कथा वाचकांना ताबडतोब आठवेल. याशिवाय विविध ठिकाणी कलाइतिहास, कलासमीक्षा, प्रवास याही विषयांवर तिचे लेखन सातत्याने चालू आहे. तिचे मूळ शिक्षण वनस्पतीशास्त्र या विषयातलं. नंतर पत्रकारिता आणि कलाइतिहास यांचेही पदव्युत्तर शिक्षण तिने घेतले. ही तिन्ही क्षेत्रं भटकंतीला पूरक. शर्मिला फडके यांना प्रवासाचीही आवड आहे. फॅशनेबल पर्यटन नव्हे, प्रवास. खरीखुरी हवा, माती, झाडंझुडं, पाणी, नद्या अंगावर घेत केलेला प्रवास. आणि हे करताना त्यांच्या संवेदना तल्लखपणे आजूबाजू टिपून घेत असतात. त्यामुळे त्यांच्या लेखनाचे विषय अनोखे आणि साहजिकपणे त्यांच्या अभ्यासविषयाशी आतून नातं सांगणारे असले तरी आजूबाजूला असलेलं वातावरण, सामाजिक-सांस्कृतिक घडामोडी यांचं भान असलेल्या एका डोळस कलाप्रेमी स्त्रीचं अनुभवविश्व त्यातून आकाराला येतं. ‘फोर सिझन्स’ ही त्यांची कादंबरी लेखक म्हणून त्यांचे जे वृत्तिविशेष आहेत त्यांचा प्रत्यय देणारी आहे. स्त्रियांनी लिहायचे ते खास त्यांच्याच रूढ अनुभवविश्वाविषयी असा जणू पायंडा पडलेला असताना ही लेखिका मात्र अशा विश्वाचा पसारा मांडते की जे खरंच अनवट आहे. या कथनाची नायिका कामायनी मुंबई, सुंदरबन, युरोप आणि माळरान अशा भूप्रदेशांमध्ये काही काळ वावरते. नुसती वावरत नाही तर जिवेभावे तिथे गुंतते. चार भूप्रदेश, तिथे भेटलेले चार पुरुष- तेही भिन्न विचारसरणीचे, प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे, त्यांच्या विचारांचा खोलवर परिणाम होऊन कच्च्या वयापासून वैचारिक, भावनिक आणि मानसिक गोंधळात वाढत गेलेली ही तीव्र बुद्धिमत्ता आणि कमालीची संवेदनशील असणारी मुलगी. मुंबईमध्ये वडिलांच्या वयाचा त्यांचा मित्र आणि तिला अगदी जन्मापासून ओळखणारा तिचा पालक म्हणावा असा जोसेफ, अनिर्बन बॅनर्जीच्या प्रभावाखाली सुंदरबनात दाखल, पण तिथे मनासारखे काहीच घडत नाही. उलट प्रेमात आणि कामात अपयश घेऊन पळून येणं. मग काही काळ पुन्हा मुंबई. मग जोसेफ तिला युरोपात पाठवतो. तिथे भेटतो इटालियन एरिक. तिथेही तेच घडते. विझून गेलेली, हरलेली आणि आत्मविश्वास गमावून बसलेली ती पुन्हा मुंबईत जोसेफच्या वळचणीला येते. तो तिला एक काम देऊन अंजनमाळ या माळरानावर पाठवतो. तिथे भेटतो विहान. माणूस आहे तिथे मतं आणि मतभेद आहेत, गुंतणं-गाठी बसणं आहे, संघर्ष तर आहेतच. पण या माळरानावर तेवढी ती तिची आहे. ती माळरानाच्याच प्रेमात पडते. कादंबरीत पात्रे म्हणाल तर कामायनीचे आईबाबा, त्यांच्याच बंगल्याच्या दुसऱ्या भागात राहणारे बानिदा, इरादी बॅनर्जी आणि त्यांचा मुलगा अनिर्बन, जोसेफ, एरिक, माळरानावर संशोधन करणारा विहान आणि त्याचे काका आस्ताद, रघु, मधोक हे मित्र आणि ती जिथे काम करते तिथले श्रीरंजन, निर्मल, नाडकर्णी वगैरे सहकारी. गेस्ट हाऊसची राखण करणारे राणू व लाखी आणि दहाबारा वर्षांची त्यांची मुलगी मणी. मरून गेलेली मार्गारेट फिलीप ग्रॅहम ही वनस्पतींची अभ्यासक, तिच्याशी एकनिष्ठ असलेला येशा हा तिचा मदतनीस पोरगा- ज्याची आता शंभरी उलटून गेली आहे. बस्स. माणसांचा आणि त्यांच्या नात्यांचा मोठा पसारा नाही मांडत लेखिका. या सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात जिवंत आहे तो निसर्ग. तोही तुमच्या आमच्या नेहमीच्या सवयीचा, चकचकीत, कॅमेरा किंवा तत्सदृश शब्दांतून दिसणारा, जणू काय आपलं मनोरंजन करण्याच्या डय़ुटीवर नेमलेला नव्हे. इथे त्याची जिवंत स्पंदनं आपल्याला जाणवतात. आपण उन्हात तापतो, आपल्याला उन्हाचा खरपूस वास येऊ लागतो. आपण सुंदरबनातल्या काळय़ा पाण्यात आणि दलदलीत पाय टाकायला कचरतो.. हा असा साक्षात अनुभव लेखिका तुम्हाला देते. अतिशय वैशिष्टय़पूर्ण रचना आहे या कादंबरीची. कधी प्रथमपुरुषी निवेदन, कधी तृतीयपुरुषी. कधी दैनंदिनीतल्या नोंदी. कधी नायिकेने स्वत:शीच केलेले विचार, कधी तिला पडणारी स्वप्नं तर कधी मार्गारेटच्या दैनंदिनीतल्या नोंदी. मुख्य प्रकरणं चार. ऋतू पहिला, ऋतू दुसरा.. अशा शीर्षकांची. त्यात उपशीर्षके असलेले लहान लहान परिच्छेद. कदाचित आधी ब्लॉग लिहून मग त्यातून कादंबरीचे कथानक रचल्यामुळे असेल, पण ही रचना एकाच वेळी अनेक पातळय़ांवर फिरते. त्यामुळे अनेक दिशीय, अनेक स्तरीय वास्तवाचा अनुभव वाचतावाचता येत राहतो. कादंबरीच्या आशयाशी इतकं थेट संलग्न असलेलं विविध पातळय़ांवर फिरणारं निवेदनतंत्र वाचकांच्या सवयीचे नाही. पण एकदा का तुम्ही या नायिकेबरोबर तिच्या पावलांनी चालू लागलात की.. आणि तसे चालताच तुम्ही.. की मात्र या निवेदनाची जादू आणि गंमत समजते. नायिकेची गोष्ट कधी ती सांगते तर कधी निवेदिका सांगते. निवेदनतंत्र इतक्या ताकदीने वापरणं आणि ते ‘वापरलं आहे’ याची जाणीव होऊ न देणं, यात या कादंबरीचं बरंच यश सामावलं आहे. उत्तम भाषाशैली आणि प्रतिमांचा फार नेमका वापर यांचाही त्यात वाटा आहेच. नायिका जशी जगते आहे, निसर्गाच्या चक्रातून स्वत:चे आयुष्य समजून घेते आहे तसं हे लेखन आहे. आखीव नाही, असं वाटणारं. तिची नजर जाते तो तो निसर्गाचा आविष्कार ती सांगते. नायिकेच्या रंग, गंध आणि स्पर्शाच्या संवेदना विशेष तल्लख आहेत. त्यामुळे तिच्या वर्णनांत चित्रकाराच्या पॅलेटवरचे रंग आणि त्यांच्या अगणित छटा येत-जात राहतात. व्हान गॉग, मोने वगैरे चित्रकारांच्या चित्रांचे संदर्भ येतात. सुंदरबन आणि युरोपातल्या आठवणी त्यात आपले धागे मिसळत राहतात. ती मनातले गोंधळ उघड करते. ते गोंधळ का निर्माण झाले, याचा वाचकांच्या साक्षीने शोध घेते. पहिल्याच मोठय़ा प्रकरणात आता लेखिका हे सारे कसे सोडवणार, म्हणून उत्सुकता आणि काळजीही वाटते कारण सरधोपट निवेदनाचा रस्ता तिने सोडून दिला आहे. या कादंबरीत आहे तसं रखरख माळरान कुणी कधी शब्दांतून क्वचितच मांडलं असेल. उन्हाच्या सुया डोळय़ांत घुसत असताना ही एका आंतरिक हट्टानं तिथे राहते. जगते. त्या उन्हात तिच्या आतले बर्फाचे गोठलेले प्रदेश वितळून वहाते होतात. तिची ती तिला सापडत जाते. ज्या प्रश्नांपासून ती पळत होती, त्या प्रश्नांना भिडण्याचे बळ ते ऊन तिला देते. अवघ्या तीस वर्षांच्या तिच्या आयुष्यात झालेले गुंते, गाठी हळूहळू सुटत जातात, सुरुवातीची ‘टय़ुलिपचे फूल वाटणारी ती अखेरीस एखादे रानफूल वाटू लागते.’ त्या प्रवासाची ही कहाणी आहे. या नायिकेला मिथक, लोककथा, झाडं-पानं-फुलं-पक्षी या सगळय़ांत रस आहे. नागदेवीच्या कातळाची कहाणी, आदिवासी तिथे करत असलेले विधी समजून घेण्याचा तिचा प्रयत्न आहे. राणू, त्याचा शंभरी पार केलेला वृद्ध बाप येशा, यांच्याशी संवाद साधण्याची, त्यांच्याकडून जुनी घटितं जाणून घेण्याची आणि ते ठिपके जोडत सलग चित्र पूर्ण करण्याची तिला निकड वाटते. मणी तर तिची छोटी मैत्रीण होऊन जाते. या कादंबरीच्या गाभ्याकडे अनेक वाटांनी जावं लागतं.. नायिकेच्या आई-वडिलांचं नातं विस्कटलेलं असणं, तिचं आईशिवाय मोठ होणं, वडिलांनी कामात बुडवून घेणं, अडनिडय़ा वयातल्या एकटेपणात बॅनर्जीकडे रमणं, त्यांच्या तरुण मुलाच्या प्रेमात पडणं. बाबांना दुखवायचं म्हणून वडीलधारेपण निभावणाऱ्या जोसेफकडे ओढा वाढणं, तरी त्याला जे नको वाटतं तेच तिनं निवडणं, अनिर्बनकडे जाणं. मग तिथून पळून युरोपात. तिथे एरिकच्या प्रेमात पडणं, करियरची वाट लागून, पूर्ण खचून मुंबई- पुन्हा जोसेफ आणि मग माळरान. हा सगळा प्रवास एका स्तरावर आहे. दुसऱ्या पातळीवर, माणसाचा जागतिक स्तरावरचा वावर, त्याला भेटणारी विविध देशीविदेशी माणसं, परदेशातील वास्तव्याची संधी, त्यामुळे होणारी भावनिक-शारीरिक जवळीक, त्यातून निर्माण होणाऱ्या वैयक्तिक जीवनातल्या समस्या आहेत. तिसऱ्या पातळीवर पर्यावरण आणि विकास यासंबंधीचे असंख्य स्थूल-सूक्ष्म धागे आहेत. नायिका जाहिरात क्षेत्रात करियर असणारी. ते क्षेत्र आणि पर्यावरण कायम विरोधी गटात. दोन्ही बाजू जनसामान्यांची करत असलेली अशुद्ध दिशाभूल, विस्थापितांचे पुनर्वसनाचे प्रश्न, ‘विस्थापितांचा प्रश्न केवळ जमिनी गमावण्याचा नसतो, तो मुळं उखडलं जाण्याचा असतो’, याविषयी असणारी कमालीची असंवेदनशीलता, प्रश्नांचा समग्र विचार न करता एकेका सुटय़ा घटकांचा विचार करून योजलेले तात्कालिक उपाय, हत्ती आणि सहा आंधळय़ांच्या प्राचीन गोष्टीतून आपण काहीच शिकलो नसल्याची चरचरीत जाणीव.. हे सगळं ही कादंबरी स्वत:त गुंफून घेते. म्हणजेच कालसमांतर आशय ती आपल्या पदरात घालते. नायिका ज्या जाहिरात क्षेत्रात काम करतेय तिथे येणारे कडवट अनुभव, स्वत:च केलेले सगळे नियम धाब्यावर बसवणाऱ्या सरकारी व्यवस्था, हिरव्या रंगाच्या ‘वॉश’खाली भयानक प्रदूषण करणाऱ्या उत्पादनांना मिळणाऱ्या परवानग्या आणि त्याविषयी उदासीन असणारी विविध पदांवरची माणसं. निकराने त्याला विरोध करणारे पर्यावरणस्नेही कार्यकर्ते आणि संस्था, याविषयी विचार करायला लावते ही कादंबरी. ही सगळी वीण गच्च विणली आहे. म्हणूनच ती वाचायला मजा येते. म्हणजे हिच्यात काही कमतरता वा त्रुटी नाहीत का? नाहीत कशा.. पण दुर्लक्ष कराव्यात अशा नक्कीच. उदा. जोसेफ, रघु, मधोक, आस्ताद, विहान यांच्या आयुष्यात कोणीच स्त्रिया कशा नाहीत? इतक्या जवळिकीच्या आणि प्रदीर्घ काळाच्या नात्यात कधीतरी त्या व नायिका आमनेसामने येऊ शकल्या असत्या. अशा तिढय़ांना सफाईने बगल दिली आहे. त्यामुळे समग्र चित्रात फटी राहिल्या आहेत. सहसा लेखिका ज्या तऱ्हेचं लेखन करत नाहीत तसं वाचायला मिळालं की सुखद वाटतं. स्त्री असण्याच्या परीघरेषा ओलांडून ही नायिका व्यक्ती म्हणून वेगळे आयुष्य जगते. सहजधर्मानं, अभिनिवेशानं नव्हे म्हणून आणखी बरं वाटतं. लेखिका, संपादक, संवादक, समीक्षक आणि कथा अभ्यासक अशा अनेक भूमिकांमध्ये सतत कार्यरत. ‘संवादसेतू’ या लक्षवेधी दिवाळी अंकाचे संपादन. कथक नृत्यांगना रोहिणी भाटे यांच्यावरील ‘रोहिणी निरंजनी’ हा गाजलेला ग्रंथ, ‘मंगला गोडबोले यांच्या निवडक कथां’ यासह अनेक पुस्तकांच्या संपादिका. ...Read more