DINKAR JOSHI

About Author

Birth Date : 30/06/1937


DINKAR JOSHI IS A GUJARATI LANGUAGE AUTHOR FROM INDIA. HE HAS WRITTEN MORE THAN 160 BOOKS INCLUDING NOVELS, SHORT STORY COLLECTIONS, ESSAY COLLECTIONS AND COLUMNS.

व्यवसाय - मुंबई येथील देना बँकेच्या स्टाफ ट्रेनिंग कॉलेजचे प्रिन्सिपॉल म्हणून निवृत्त. त्यांनी लहान वयात १९५४पासून लेखनास सुरूवात केली व अजून साहित्यसर्जन चालू आहे. आत्तापर्यंत त्यांची १४७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे या महान ग्रंथांचा सखोल अभ्यास करून त्यावर आधुनिक संदर्भात त्यांनी ग्रंथ लिहिले आहेत. याखेरीज ज्या व्यक्तींच्या कार्यामुळे भारतात व संपूर्ण जगातही महत्त्वाचे बदल घडून आले, त्यांच्या चरित्रांचा अभ्यास करून त्यांवर त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या आहेत. अशा कादंबऱ्यामध्ये महात्मा गांधी व त्यांचे ज्येष्ठ पुत्र हरिलाल गांधी, महमदअली जीना, रवीन्द्रनाथ टागोर, गौतम बुद्ध यांच्या जीवनावरील कादंबऱ्याचा समावेश होतो. गांधीजी व हरिलाल यांच्या संबंधांवर लिहिलेल्या प्रकाशनो पडछायो या कादंबरीचा इंग्रजी नाट्यरूपाने झालेला अनुवाद न्यूयॉर्कमध्ये रिचर्ड अ‍ॅटनबरोंच्या गांधी, श्याम बेनेगलच्या मेकिंग ऑफ महात्मा बरोबर दाखवला गेला व तीनही लेखक–दिग्दर्शकांचा सन्मान केला गेला. त्यांच्या अनेक पुस्तकांचे हिंदी, मराठी, बंगाली, कानडी, तेलगू, मल्याळी, ओरिया व तामिळ तसेच इंग्रजी व जर्मन अनुवाद झाले आहेत. एकाच वेळी ११ पुस्तके सहा भाषांमध्ये प्रकाशित होण्याच्या विक्रमाबद्दल त्यांचा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये समावेश झाला आहे. गुजराती साहित्य परिषद, गुजरात राज्य साहित्य अकादमी इ. सारख्या अनेक साहित्यिक संस्थांकडून त्यांच्या अनेक पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या कादंबऱ्यावर चित्रपट निर्माण झाले आहेत. त्यांनी भांडारकर ओरिएन्टल इन्स्टिट्यूटच्या महाभारताच्या संशोधित मूळ लेखनाचे गुजराती अनुवादाचे संपादन करण्याचे कामही पार पाडले आहे. या ग्रंथाच्या एकूण वीस पुस्तकांचा संच प्रकाशित झाला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 20 total
A-MRUT PANTHACHA YATRI Rating Star
Add To Cart INR 220
AMRUTYATRA Rating Star
Add To Cart INR 230
ANK RAHIT SHUNYACHI BERIJ Rating Star
Add To Cart INR 160
AYODHYECHA RAVAN ANI LANKECHA RAM Rating Star
Add To Cart INR 240
BHARTIYA SANSKRITICHE SARJAK Rating Star
Add To Cart INR 250
CHAKRA TE CHARAKHA Rating Star
Add To Cart INR 270
DINKAR JOSHI COMBO BOOKS - 19 BOOKS Rating Star
Add To Cart INR 4800
DWARKECHA SURYAST Rating Star
Add To Cart INR 160
ITHE KUNI NAHI Rating Star
Add To Cart INR 195
KAAL PURUSH Rating Star
Add To Cart INR 180
KRUSHNAM VANDE JAGADGURUM Rating Star
Add To Cart INR 180
MAHABHARATATIL PITRUVANDANA Rating Star
Add To Cart INR 170
12

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.