DINKAR JOSHI

About Author

Birth Date : 30/06/1937


DINKAR JOSHI IS A GUJARATI LANGUAGE AUTHOR FROM INDIA. HE HAS WRITTEN MORE THAN 160 BOOKS INCLUDING NOVELS, SHORT STORY COLLECTIONS, ESSAY COLLECTIONS AND COLUMNS.

व्यवसाय - मुंबई येथील देना बँकेच्या स्टाफ ट्रेनिंग कॉलेजचे प्रिन्सिपॉल म्हणून निवृत्त. त्यांनी लहान वयात १९५४पासून लेखनास सुरूवात केली व अजून साहित्यसर्जन चालू आहे. आत्तापर्यंत त्यांची १४७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे या महान ग्रंथांचा सखोल अभ्यास करून त्यावर आधुनिक संदर्भात त्यांनी ग्रंथ लिहिले आहेत. याखेरीज ज्या व्यक्तींच्या कार्यामुळे भारतात व संपूर्ण जगातही महत्त्वाचे बदल घडून आले, त्यांच्या चरित्रांचा अभ्यास करून त्यांवर त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या आहेत. अशा कादंबऱ्यामध्ये महात्मा गांधी व त्यांचे ज्येष्ठ पुत्र हरिलाल गांधी, महमदअली जीना, रवीन्द्रनाथ टागोर, गौतम बुद्ध यांच्या जीवनावरील कादंबऱ्याचा समावेश होतो. गांधीजी व हरिलाल यांच्या संबंधांवर लिहिलेल्या प्रकाशनो पडछायो या कादंबरीचा इंग्रजी नाट्यरूपाने झालेला अनुवाद न्यूयॉर्कमध्ये रिचर्ड अ‍ॅटनबरोंच्या गांधी, श्याम बेनेगलच्या मेकिंग ऑफ महात्मा बरोबर दाखवला गेला व तीनही लेखक–दिग्दर्शकांचा सन्मान केला गेला. त्यांच्या अनेक पुस्तकांचे हिंदी, मराठी, बंगाली, कानडी, तेलगू, मल्याळी, ओरिया व तामिळ तसेच इंग्रजी व जर्मन अनुवाद झाले आहेत. एकाच वेळी ११ पुस्तके सहा भाषांमध्ये प्रकाशित होण्याच्या विक्रमाबद्दल त्यांचा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये समावेश झाला आहे. गुजराती साहित्य परिषद, गुजरात राज्य साहित्य अकादमी इ. सारख्या अनेक साहित्यिक संस्थांकडून त्यांच्या अनेक पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या कादंबऱ्यावर चित्रपट निर्माण झाले आहेत. त्यांनी भांडारकर ओरिएन्टल इन्स्टिट्यूटच्या महाभारताच्या संशोधित मूळ लेखनाचे गुजराती अनुवादाचे संपादन करण्याचे कामही पार पाडले आहे. या ग्रंथाच्या एकूण वीस पुस्तकांचा संच प्रकाशित झाला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 20 total
A-MRUT PANTHACHA YATRI Rating Star
Add To Cart INR 220
AMRUTYATRA Rating Star
Add To Cart INR 230
ANK RAHIT SHUNYACHI BERIJ Rating Star
Add To Cart INR 160
AYODHYECHA RAVAN ANI LANKECHA RAM Rating Star
Add To Cart INR 140
BHARTIY SANSKRITICHE SARJAK Rating Star
Add To Cart INR 250
CHAKRA TE CHARKHA Rating Star
Add To Cart INR 270
26 %
OFF
DINKAR JOSHI COMBO BOOKS - 19 BOOKS Rating Star
Add To Cart INR 4700 INR 3499
DWARKECHA SURYAST Rating Star
Add To Cart INR 160
ITHE KUNI NAHI Rating Star
Add To Cart INR 195
KAAL PURUSH Rating Star
Add To Cart INR 180
KRUSHNAM VANDE JAGADGURUM Rating Star
Add To Cart INR 180
MAHABHARATATIL PITRUVANDANA Rating Star
Add To Cart INR 170
12

Latest Reviews

KHUJABA
KHUJABA by DR.SANJAY DHOLE Rating Star
लोकसत्ता १६-०४-२०२३

आपलं जगणं सुसह्य करण्यासाठी माणसाने नेहमी विज्ञानाची मदत घेतलेली आहे. त्यामुळे माणूस सतत विज्ञानात संशोधन करत असतो. आज भौतिक, रसायन, वनस्पती, अंतराळ, हवामान शास्त्रासोबतच जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवभौतिकी, जैवरसायन, जैवमाहिती, जनुकीयसारख्या आंतरपरणाली शाखांमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत. या विविध प्रयोगांची दखल विज्ञान कथालेखक आपल्या कथांमध्ये घेताना दिसत आहेत. सशक्त विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर आधारित विज्ञान कथा लिहिणारे डॉ. संजय ढोले एक नावाजलेले विज्ञान कथालेखक आहेत. त्यांचा ‘खुजाबा’ हा सातवा विज्ञान कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या कथासंग्रहात विज्ञानाची परिभाषा करणाऱ्या व समाजातील विसंगतीवर बोट ठेवणाऱ्या अशा १२ कथांचा समावेश आहे. कथासंग्रहाच्या सुरुवातीला डॉ. संजय ढोले यांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे की, विज्ञान कथांमधले विज्ञान हे खरे असून, आज चालू असलेला प्रयोग कदाचित उद्या एक वेगळी तंत्रज्ञानक्रांती घडवून आणू शकतो. एखाद्या विज्ञान कथेतील विज्ञान हे पाच-दहा वर्षांनंतर खरे ठरू शकते. सध्या तंत्रज्ञान एवढं झपाटय़ानं विकसित होत आहे की कितीतरी अशक्य गोष्टी शक्य होताना आपल्याला दिसत आहेत. या बदललेल्या तंत्रज्ञानाचा माणूस चांगल्या कामांसाठी जसा उपयोग करू शकतो, तसाच तो स्वत:च्या फायद्यासाठी त्याचा दुरुपयोगही करू शकतो. या सगळय़ांचा विचार ‘खुजाबा’ संग्रहातील कथा लिहिताना लेखकाने केलेला दिसून येतो. गुन्हेगारांना शोधणे हे काम पोलिसांचे आहे. परंतु जेव्हा गुन्हेगार सापडत नाही, तेव्हा त्यांना शोधण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाचा व संशोधनाचा कसा उपयोग केला जाऊ शकतो हे ‘अपहरण’ व ‘साक्षीदार’ या कथांमधून दिसून येते. संशोधन करणारे काही शास्त्रज्ञ आपल्या संशोधनाचा दुरुपयोग करून देशाचे कसे शत्रू बनू शकतात, हे आपल्याला ‘आगंतुक’, ‘अंधार गुणिले अंधार’ या कथांमध्ये वाचायला मिळते.मासिक पाळीला अपवित्र मानणाऱ्या स्त्रीला त्याच मासिक पाळीमुळे दुर्धर आजारावर मात करायला कशी मदत होते व तिच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते हे ‘कलाटणी’ या कथेत वाचण्यासारखे आहे. जसे आपले शत्रू आपल्या पृथ्वीवर आहेत, तसेच ते परग्रहावरदेखील असतील अशी कल्पना माणसाच्या मनात नेहमी येत असते. हे परग्रहावरून येणारे आव्हान कसे असू शकेल याची झलक ‘अज्ञात जीवाणू’ व ‘संकेत’ या कथांमध्ये वाचायला मिळते.मानवाने आपल्याला मदत व्हावी म्हणून यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. पण यंत्रमानवात जर मानवासारख्या जाणिवा प्रगल्भ झाल्या तर तो स्वत: निर्णय घेऊन मानवाचा कसा घात करू शकतो हे ‘अपघात’ या कथेत वाचायला मिळते. हा यंत्रमानव जर नॅनो टेक्नोलॉजीने बनलेला, डोळय़ांनी न दिसणारा खुजाबा म्हणजे नॅनो यंत्रमानव असला तरी तो किती भयंकर उत्पात करू शकतो हे ‘खुजाबा’ कथेत वाचून आपण अवाक् होतो. कथासंग्रहाला दिलेल्या शीर्षकाची ही कथा तंत्रज्ञानापुढे माणूस हतबल होऊ शकतो हे दर्शविणारी आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे डोळे, किडनी, यकृत, हृदय, स्वादुपिंड, फुप्फुस या अवयवांचे प्रत्यारोपण करणे शक्य झाले आहे. पण जर मेंदूचे प्रत्यारोपण यशस्वी झाले तर काय होऊ शकते हे ‘कालचक्र’ या कथेत वाचायला मिळते. नाभिकीय क्षेत्राशी संबंधित असणारी ‘अगम्य’ कथा व जीवाणू, विषाणूंच्या डी.एन.ए.मध्ये परिवर्तन केल्यानंतर काय परिणाम होऊ शकतो हे दर्शविणारी ‘शिखंडी’ कथाही वाचण्यासारखी आहे. डॉ. संजय ढोले भौतिकशास्त्राचे प्राध्यापक व संशोधक असल्यामुळे त्यांच्या कथांमधून विज्ञानप्रसाराबरोबर प्रबोधनही होताना दिसते. प्रत्येक कथेचा बाज वेगळा असल्यामुळे वाचकाची कथा वाचत असताना उत्सुकता ताणली जाते. कथासंग्रहाची भाषा सामान्य वाचकाला समजेल अशी आहे. कथासंग्रहाचे मुखपृष्ठ आकर्षक व कथांना साजेसे आहे. लहानात लहान पेशींपासून माणसाने बनविलेला जीवाणू, जेव्हा माणसासारखा मेंदूचा वापर करू लागतो तेव्हा तो त्याला बनविणाऱ्या माणसालाच खुजं करून अगतिक होण्यास भाग पाडतो. हा आशय बोलका करणारं चंद्रमोहन कुलकर्णी यांचं मुखपृष्ठ वाचकांना आकर्षित करणारं आहे. २१ व्या शतकातील बदलत्या विज्ञान व तंत्रज्ञानाची साक्ष देणाऱ्या ‘खुजाबा’ कथासंग्रहातील विज्ञानकथा विज्ञान अभ्यासकांबरोबर सामान्य वाचकांनाही आवडतील अशा आहेत. ...Read more

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
डाॅ. बि.एन.जाजू, पुणे.

परवाच जी. बी. देशमुखांच "अ-अमिताभचा " हे पुस्तक वाचून झालं. खूप छान लिहिलंय त्यांनी. प्रत्येक चित्रपटाचा बारकाईनं केलेला अभ्यास, त्यातील प्रसंगांचं आणि अमिताभच्या अभिनयाचं समृद्ध भाषेत केलेलं लेखन आणि लिखाणाचा ओघ (flow) सर्वच अप्रतिम.