DINKAR JOSHI

About Author

Birth Date : 30/06/1937


DINKAR JOSHI IS A GUJARATI LANGUAGE AUTHOR FROM INDIA. HE HAS WRITTEN MORE THAN 160 BOOKS INCLUDING NOVELS, SHORT STORY COLLECTIONS, ESSAY COLLECTIONS AND COLUMNS.

व्यवसाय - मुंबई येथील देना बँकेच्या स्टाफ ट्रेनिंग कॉलेजचे प्रिन्सिपॉल म्हणून निवृत्त. त्यांनी लहान वयात १९५४पासून लेखनास सुरूवात केली व अजून साहित्यसर्जन चालू आहे. आत्तापर्यंत त्यांची १४७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे या महान ग्रंथांचा सखोल अभ्यास करून त्यावर आधुनिक संदर्भात त्यांनी ग्रंथ लिहिले आहेत. याखेरीज ज्या व्यक्तींच्या कार्यामुळे भारतात व संपूर्ण जगातही महत्त्वाचे बदल घडून आले, त्यांच्या चरित्रांचा अभ्यास करून त्यांवर त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या आहेत. अशा कादंबऱ्यामध्ये महात्मा गांधी व त्यांचे ज्येष्ठ पुत्र हरिलाल गांधी, महमदअली जीना, रवीन्द्रनाथ टागोर, गौतम बुद्ध यांच्या जीवनावरील कादंबऱ्याचा समावेश होतो. गांधीजी व हरिलाल यांच्या संबंधांवर लिहिलेल्या प्रकाशनो पडछायो या कादंबरीचा इंग्रजी नाट्यरूपाने झालेला अनुवाद न्यूयॉर्कमध्ये रिचर्ड अ‍ॅटनबरोंच्या गांधी, श्याम बेनेगलच्या मेकिंग ऑफ महात्मा बरोबर दाखवला गेला व तीनही लेखक–दिग्दर्शकांचा सन्मान केला गेला. त्यांच्या अनेक पुस्तकांचे हिंदी, मराठी, बंगाली, कानडी, तेलगू, मल्याळी, ओरिया व तामिळ तसेच इंग्रजी व जर्मन अनुवाद झाले आहेत. एकाच वेळी ११ पुस्तके सहा भाषांमध्ये प्रकाशित होण्याच्या विक्रमाबद्दल त्यांचा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये समावेश झाला आहे. गुजराती साहित्य परिषद, गुजरात राज्य साहित्य अकादमी इ. सारख्या अनेक साहित्यिक संस्थांकडून त्यांच्या अनेक पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या कादंबऱ्यावर चित्रपट निर्माण झाले आहेत. त्यांनी भांडारकर ओरिएन्टल इन्स्टिट्यूटच्या महाभारताच्या संशोधित मूळ लेखनाचे गुजराती अनुवादाचे संपादन करण्याचे कामही पार पाडले आहे. या ग्रंथाच्या एकूण वीस पुस्तकांचा संच प्रकाशित झाला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 20 total
A-MRUT PANTHACHA YATRI Rating Star
Add To Cart INR 220
AMRUTYATRA Rating Star
Add To Cart INR 230
ANK RAHIT SHUNYACHI BERIJ Rating Star
Add To Cart INR 160
AYODHYECHA RAVAN ANI LANKECHA RAM Rating Star
Add To Cart INR 240
BHARTIYA SANSKRITICHE SARJAK Rating Star
Add To Cart INR 250
CHAKRA TE CHARAKHA Rating Star
Add To Cart INR 270
DINKAR JOSHI COMBO BOOKS - 19 BOOKS Rating Star
Add To Cart INR 4800
DWARKECHA SURYAST Rating Star
Add To Cart INR 160
ITHE KUNI NAHI Rating Star
Add To Cart INR 195
KAAL PURUSH Rating Star
Add To Cart INR 180
KRUSHNAM VANDE JAGADGURUM Rating Star
Add To Cart INR 180
MAHABHARATATIL PITRUVANDANA Rating Star
Add To Cart INR 170
12

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more