* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788171615889
  • Edition : 45
  • Publishing Year : JANUARY 1959
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 432
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
YAYATI IS THE STORY OF THE LUST OF A KING BY THE SAME NAME, WHO APPEARS IN THE MAHABHARATA, ONE OF THE TWO EPICS OF INDIA. THOUGH MARRIED TO BEAUTIFUL DEVYANI, HE FOUND THE FEMALE SERVANT, SHARMISHTHA, ENTICING. HE HAD FIVE CHILDREN FROM THESE WOMEN BUT HIS DESIRE FOR PLEASURE REMAINED UNSATISFIED. DID HIS QUEST FOR THE CARNAL END WITH HIS EXCHANGING HIS OLD AGE WITH HIS SON’S YOUTH? HOW LONG DID HE ENJOY THE SENSUAL PLEASURES? YAYATI STANDS FOR ONE WHO IS NEVER SATISFIED WITH EARTHLY PLEASURES. THOUGH THE STORY OF THE ANCIENT TIMES CENTERS ONLY AROUND DISSOLUTE DESIRES OF AN INDIVIDUAL, ONE CAN DRAW PARALLEL EXAMPLES FROM THE PRESENT DAYS OF CONSUMERISM WHERE THE INSATIABILITY TO HAVE MORE PLEASURES CONTINUES.
कै. विष्णु सखाराम तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या एकूण साहित्यकृतींच्या रत्नमाळेतील ‘ययाति’चे स्थान मेरुमण्यासारखे आहे. या कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापुरता संबंध नाही. एका प्रसिद्ध पौराणिक उपाख्यानाचे धागेदोरे घेऊन ते त्यांनी या कादंबरीत स्वतंत्र रीतीने गुंफले आहेत. आपल्या प्रतिभेची जात, तिची शक्ती आणि तिच्या मर्यादा यांची योग्य जाणीव झालेल्या खांडेकरांनी आत्माविष्काराला योग्य अशीच कथा निवडली. ती ज्या माध्यमातून त्यांना प्रगट व्हावीशी वाटली, त्याच्यावर त्यांचे प्रभुत्व होतेच. पुराणकथांत जे भव्यभीषण संघर्ष आढळतात, त्यांचे मंथन करण्याची अंगभूत शक्तीही त्यांच्या चिंतनात होती. जीवन जसे एका दृष्टीने क्षणभंगुर आहे, तसेच, ते दुस-या दृष्टीने चिरंतन आहे; ते जितके भौतिक आहे, तितकेच आत्मिक आहे, या कठोर सत्याचे आकलनही त्यांना पूर्णत्वाने झालेले होते. त्यामुळेच एका पौराणिक कथेच्या आधाराने एक सर्वाेत्तम ललितकृती कशी निर्माण करता येते, याचा आदर्श वस्तुपाठच ‘ययाति’च्या रूपाने श्री. खांडेकरांनी वाचकांपुढे ठेवला आहे. कामुक, लंपट, स्वप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही, असा ययाति; अहंकारी, महत्त्वाकांक्षी; मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी; स्वत:च्या सुखाच्या पलीकडे सहज पाहणारी आणि ययातीवर शरीरसुखाच्या, वासनातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभावधर्म होऊन बसला आहे, असा विचारी, संयमी व ध्येयवादी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्परप्रेमाची विविध स्वरूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झाली आहेत. ‘ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी,’ अशी अपेक्षा स्वत: खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार १९७६
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #हिरवा चाफा #दोन मने #दोन ध्रुव
Customer Reviews
  • Rating StarSankalp Patil

    महाराष्ट्र साहित्यात सर्वोत्कृष्ट १० किंवा ५ कादंबऱ्यांची नावे घेतली तर त्यात यायातीचे नाव अग्रक्रमाने येईल. तशी ही कादंबरी आहेच.कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी प्रकाशित केली आहे आणि मुखपृष्ठ देखील त्यांच्या तर्फेच रेखाटण्यात आले आहे. मुखपृष्ठ पाढऱ्या आश्वाच्या चित्राने रंगवले आहे. पुस्तक वाचून झालं की मग तुम्हाला त्यामागचा अर्थ कळेल की आश्वाचं चित्र का आहे ते ? ययाति ही खांडेकरांची सर्वोत्कृष्ट रचना. वाचल्यावर हे उमगेलच. कथा महाभारतकालीन आहे. ययाति या राजाच्या आयुष्याची कहाणी. पण फक्त ययातिच नाही तर कच , देवयानी , शर्मिष्ठा या पात्रांचीही ही गोष्ट आहे. कथा ही पौराणिक असून कथेचा जो गाभा पुराणात आहे तोच इथेही आहे पण खांडेकरांनी काही धागेदोरे स्वतंत्र रीतीने यात गुंफले आहे. फार ताकदीने लेखन केलंय खांडे करांनी. यातल्या मुख्य चार पात्रांना एकमेकांविषयी प्रेम वाटते पण ते पुढे असफल , क्षणिक आणि अपुरे राहते. कामवासना हा या कादंबरीचा गाभा ! मनुष्य शरीरसुखामागे / क्षणिक सुखामागे धावतो , त्याला आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान देतो आणि विनाशाकडे जात अनेकवेळा उपभोग घेऊनही अतृप्तच राहतो. हा या कादंबरीचा थोडक्यात सार . कथा जशी जशी पुढे जाते तसे तसे नवनवीन पात्र येत जातात. मुख्य चार पात्रे यात आहेत. जी शेवटपर्यंत राहतात. यातला कच हा आधुनिक काळातल्या आदर्श पुरुषाचा नेतृत्वकर्ता. महाभारतातला खरा कच वेगळाच आणि या कादंबरीतला खांडेकरांचा कच वेगळा. फारच उत्कृष्टपणे त्यांनी तो रेखाटलाय . तो ध्येयवादी आहे. आसपास तो वासना बळावू देत नाही. तो संयमी आहे. प्रत्येक प्राणीमात्रावर तो निरपेक्ष प्रेम करतो , त्याचे देवयानी वरचे प्रेम जरी असफल झाले असले तरी तो थांबला नाही तो निर्मळ सरितेसारखा अविरत वाहतच राहिला. एकेकाळची आपली प्रेयसी आता संसारी स्त्री बनली आहे हे ध्यानात धरून ज्याप्रकारे तो देवयानी सोबत संवाद साधतो ते वर्णन तर उत्कृष्टच आहे. देवयानी या पात्राचे तिच्या आयुष्यात ध्येय काहीच नव्हते. लाडात वाढलेली पोर ती. हे किती प्रातिनिधिक आहे बघा. आजच्या काळातही परिस्थिती एकदम अभिन्न. श्रीमंत घरात वाढलेली बहुतांश मुले ध्येयहिन असलेली दिसतात. बऱ्याचदा आंतरिक विचार त्यांच्या ठायी नसतो. इथेही तसच होतं. कुठलही योग्य निर्णय न घेता , पुरेसा विचार न करता फक्त शर्मिष्ठेचा बदला घेण्यासाठी - तिला आपली दासी बनवण्यासाठी देवयानीने यायातिशी लग्न केलं. त्यानंतर ती ययातिला ना प्रेम देऊ शकली ना शारीरिक - मानसिक सुख ! उलट आई झाल्यावर देखील तिच्यातली अवखळ , हट्टी आणि अविचारी लहान पोर दिसून येते. आणि कदाचित याच कारणामुळे ययाति शर्मिष्ठेवर प्रेम करू लागला. एका आदर्श पत्नीने जे पतीला द्यायचे असते ते सर्व शर्मिष्ठेने ययातिला दिले. श्रीमंत वडिलांची मुलगी असूनही स्वतः च्या एका चुकीमुळे ती आयुष्यभर दासी बनून राहते. सर्व समस्यांना तोंड देते. सुख - विलासाचा त्याग करते , हे धाडसच ! कादंबरीत भावनात्मकतेचा मजबूत स्पर्श आहे. खांडेकरांची भाषा , त्यांची कल्पनाशक्ती आणि अधून मधून येणारी जीवन आणि वासना यांच्यावर भाष्य करणारी मजबूत वाक्ये खूप भावतात. कादंबरीची मांडणी खरंच खूप सुरेख आहे. कादंबरी वाचताना अनेकदा व्यक्ती भावनातीत होऊन जातो. मीही झालो होतो. अनेक प्रसंग तर असे आहेत जे वाचल्यावर एखादा मर्मभेदी बाण काळजातून चर्र भेदून जावा असा धक्का लागून डोळ्यातून अश्रू येतात. कथेतल्या अलका आणि माधवी यांच्या प्रसंगात हे होईल ! वाचताना आपण प्रत्येक पात्राशी समरस होऊन जातो त्यामुळे एक एक प्रसंग जसा येतो तसं राग , द्वेष , मत्सर , अश्रू , दया , कणव , करुणा , आसुया या भावना अंतर्मनात युद्ध करतात. हरवून जायला होतं. खांडेकर जीवनाचं अंगभूत दर्शन घडवतात.कादंबरीतलं प्रत्येक पात्र आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतं. काही कादंबऱ्या मादक असतात. त्या भुरळ पडतात , ययाति - मृत्युंजय या कादंबऱ्या त्याच पट्टीतल्या. ययाति समजून घ्यावी लागते ! सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कादंबरी प्रातिनिधिक आहे. ती प्रातिनिधिक आहे आजच्या काळाशी - आजच्या समाजाशी. यातली सर्व प्रमुख पात्रे आजच्या पिढीतल्या मनुष्याचे प्रतिनिधी आहेत. लहान - सहान गोष्टींचा मनात दंश धरणारे. सतत शर्यतीत असणारे , दिखाऊगिरीच्या पक्षातले, जीवनाचं आकलन नसलेले , धैर्य आणि ध्येय यांच्या गावीही न गेलेले अशा असंतोषी प्रवृत्तीच्या माणसांची देवयानी ही प्रतिनिधी आहे. जगात अगदीच थोडे का असेना पण , इतरांवर निखळ प्रेम करणारे , चुका केल्यावर त्याची योग्य ती शिक्षा भोगणारे , परिस्थितीला समर्थपणे तोंड देणारे , त्याग करणारे , समर्पित होणारे , या प्रवृत्तींच्या लोकांची शर्मिष्ठा ही प्रतिनिधी आहे. जीवन म्हणजे काय हे कळलेले , निर्णयक्षम , अवघड परिस्थिती योग्य प्रकारे हाताळणारे , जीवनात वासनेला अती महत्त्व न देता , धैर्याच्या मार्गाने चालणारे , संयमी , विचारी , प्रेमाचा वेगळा अर्थ उमजलेले , समाजासाठी खऱ्या अर्थाने आदर्श असणारे , अशा व्यक्तींचा कच हा प्रतिनिधी आहे. भरकटलेले , जीवन सीमित समजणारे , कर्तृत्ववान परंतु चुकीच्या मार्गाला लागलेले. शरीराचे गुलाम झालेले , कामवासना हीच उच्च प्रकारचे सुख आहे असं समजणारे , दृष्टी अशुद्ध झालेले , बिघडलेले , मोहाला बळी पडलेले , अशा प्रकारच्या व्यक्तींचा ययाति हा प्रतिनिधी आहे. दुर्दैवाने आजच्या काळात ये ययातिच जास्त आहेत. कच कमी ! ही कथा तर वाचाच पण पुस्तकात कदाचित मुद्दाम दिलेली पार्श्वभूमी वाचाच वाचा. कादंबरी कशी जन्माला आली फक्त हेच नाही तर आजचा समाज , यातले व्यक्ती , भरकटलेली मानसिकता , पिसाळलेली कामवासना या सर्वांवर खांडेकरांनी अगदी आग ओकल्याप्रमाणे परखड भाष्य केलंय. चुकीच्या मार्गाने चालत असलेल्या समाजाबाबत त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे तर कामवासना ही एका विशिष्ट मर्यादेत असायला हवी असेही ते म्हणतात. जर तुम्ही ही पार्श्वभूमी वाचली नाही तर पुस्तक अर्धवट वाचल्या सारखं होईल. कादंबरी वाचल्यावर तुम्हाला अनेक गोष्टी कळतील , समजतील , नव्याने उमगतील. खऱ्या अर्थाने वाचकांना मोठं करणारी कादंबरी ! खांडेकरांच्या लेखणीला सलाम ! 🙌 #ययाती #विसखांडेकर ...Read more

  • Rating Starआकाश काशिनाथ साठे

    #ययाति_कुणाची..🐎 ..ययाति.. इंद्राला पराजित करुन स्वार्गावर विजय मिळवणाऱ्या एका शापित नहूषमहाराजांच्या वंशजाची.. ..ययाति.. एका शापित पित्याच्या दोन पुत्रांची,सुखा च्या शोधात भटकत असलेल्या यती आणि ययाति या दोन राज पुत्रांची.. ..ययाति.. एक राजकन्या असून पण आपल्या एका चुकी मूळ, आपल्या पित्याचे राज्य वाचवावे म्हणून जन्मतः दासी तत्व स्वीकार करणाऱ्या एका शर्मिष्ठा नावाच्या राजमातेची.. ..ययाति.. एका अहंकारी स्त्रीची, घमंडी महाराणीची, स्वतःच्या सुखात मग्न झालेल्या पत्नीची, एका तपसव्याच्या पुत्रीची.. हा त्या क्रूर देवयानीची.. ..ययाति.. त्या एका महान असलेल्या कचदेवाची, मित्रा साठी प्राणपणाला लावणाऱ्या त्या माधवाची, आपल्या बोबड्या बोलाणी मंत्र मुग्ध करणाऱ्या त्या तारकेची.. ..ययाति.. त्या सोनेरी लट असणाऱ्या काहीही गुन्हा नसतांना मरण पतकाराव लागणाऱ्या अल्केची.. वासनेने भरलेल्या ययातिची, दासी मुकुलकीची, ..ययाति.. एक अश्या ययाति राज्याची ज्याच्या आयुष्यात शरीर सुखा शिवाय त्याला आयुष्यात सुख म्हणजे काय याची जाणीवच नसतं.. तब्बल अठरा वर्ष नव-नवीन सुंदरी भेटून पण अतृप्त राहणाऱ्या त्या राजाची ही ययाति.. .. ययाति.. त्या आपल्या सारख्या प्रत्येक वाईट नजरेच्या पुरुषाची, ययाति आता च्या जगात जगत असणाऱ्या त्या प्रत्येक अहंकारी स्त्री ची.. .. शरीर सुख हेच आयुष्यात सर्व काही नसतं त्या पलीकडे पण जग असतं,वासनेच्या इतक्या पण आहारी जायला नको की आपलाचं उपशाप आपल्या प्रियंजनानवर आपण लादण्यास कुचराई करू नये, वासने साठी आपले वर्धाक्य आपल्या पुत्रा ला देतांना आपल्या मनात कोणताही विचार येऊ नये.. ..शेवटी ययाति मधीलचं काही ओळी जश्याच्या जश्या लिहावं वाटतं आहे.. 🔸शरीरसूख शेवटी दुःखालाच कारणीभूत होत.. मग ते सुख स्पर्शाचा असो, अथवा दृष्टीच असो.. शरीर हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे.. त्याच्या वर विजय मिळवण्याकरिता सतत धडपडत राहणं हेच या जगात मनुष्याच प्रमुख कर्तव्य आहे.. 🔸माणूस शरीरावर प्रेम करतो, त्या प्रेमाला अंत नसतो.. पण शरीर काही त्याच्यावर असे प्रेम करीत नाही.. प्रसंगी ते त्याचे वैर साधते.. ..वी.स.खांडेकरांची ही कादंबरी त्या प्रत्येकासाठी एक उत्तम मार्गदर्शन करते जे आयुष्यात शरीर सुख हेच सर्वस्व आहे असे मानून त्यांचे आयुष्य जगत आहे.. त्यांच्या शब्दांनी या सर्व पात्रांच्या बोलण्यात जिवंत पणा आणला आहे.. .. कचदेवाचे पात्र हे मनाला भिडून जाते जरी या कादंबरीत दोन नायिका आणि एक नायक आपल्याला दिसतं असला तरी कच देव सुद्धा त्यात दुसऱ्या नायकाची भूमिका पार पाडून जातोय.. ..थोडक्यता काही तरी घेऊ पाहणाऱ्यांसाठी अप्रतिम कादंबरी.. #जग_माणसाच्या_मनातल्या_दयेवर_चालत_नाही.. #ते_त्याच्या_मनगटातल्या_बळावर_चालत.. ( टीप :- मागील "मूकद्दर" या कांदंबरीची पोस्ट केली असता काही अपुऱ्या इतिहास अभ्यास करणाऱ्यांनी ज्या कमेंट केल्या त्यांची हुशारी बघण्यासाठी ही पोस्ट.. मेन्शन करू वाटतं नाही.. आपण समोरच्याचा गैरसमज दूर करू शकतोय पण त्याच्या डोळ्याला लागलेला गैरसमजचा चष्मा काढू शकत नाही.. ) . ...Read more

  • Rating StarSharad Kharde Patil

    आज वाचुन पुर्ण झाले. मानवी मनाचा व त्याच्या भावनांचा अनके छटाच सोप्या शब्दात परंतु खुप गहिऱ्या अर्थात गुंफले आहेत. वि. स. खांडेकर ना सलाम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम 🙏

  • Rating Starसामना २१-२-२०२१

    कादंबरी लिखाण हा एक जगमान्य साहित्य प्रकार आहे. त्यासाठी सशक्त कथानक व जबरदस्त मांडणीची गरज असतेही. अशातच वि. स. खांडेकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली `ययाती` ही कादंबरी ६० वर्षांपासून वाचकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. याच कादंबरीला मराठ राजभाषेतील पहिला सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार (१९७६) मिळाला. या घटनेला २६ फेब्रुवारी रोजी ४५ वर्षे पूर्ण होत आहेत. मराठी साहित्यातील सुवर्णाक्षरांनी अलंकारित नाव म्हणजे विष्णू सखाराम उपाख्य वि. स. खांडेकर होय. त्यांनी लिहिलेली अजरामर कादंबरी `ययाती` ही आज ६० वर्षाची ज्येष्ठ श्रेष्ठ झाली असली तरी आजही या कादंबरीचा केशरी गोडवा टवटवीत आहे. बेस्ट सेलर, बेस्ट भाषा, वाचकप्रिय असलेल्या या कादंबरीला आजही विक्रमी मागणी आहे. अस्सल भाषा वाचकांना खिळवून ठेवण्याची अमोघ शैली, अजोड कथेचा सुगंधी दर्प खांडेकरांच्या साहित्यात असल्यामुळे ते वाचकप्रिय लेखक ठरले आहेत. म्हणूनच इतर मराठी लेखकांच्या तुलनेने खांडेकर हे वरचढ ठरतात. खांडेकरांच्या लेखन प्रवासात जे काही लिखाण झाले, त्यातील `अमृतवेल व ययाती` या दोन कादंबऱ्या खास वाचकप्रिय ठरल्या. लघुकथा, विनोदी लेखन, ललित निबंध, स्फुट लेखन, कविता, नाट्य व्यक्तिचित्रण अशा अनेक साहित्य प्रकारातून त्यांनी लिखाणाची चुणूक दाखवली. तेवढी त्यांच्यात प्रतिभा होतीही. म्हणूनच ते खऱ्या अर्थाने कादंबरी व कथालेखनात विशेषत्वाने रमलेले दिसतात. यात त्यांच्या १५ पेक्षा अधिक कादंबऱ्या तर २७ पेक्षा अधिक कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. झपाटून लिहिताना दर्जेदारपणा व संयमितता पाळून वाचकांसमोर आदर्शवाद ठेवण्यावर त्यांनी त्यांनी भर दिला हे विशेष होय. कुठलेही साहित्य हे ध्येयावर प्रेरित असते साहित्यातील लेखनाची प्रतिभा आणि तिची वास्तविकता यावरून साहित्य निर्मितीची बैठक कळते. सर्वोत्तम लिखाणामागची प्रेरणा काहीही असली तरी त्यातील वस्तुपाठ नाकारता येत नाही. या तत्वाप्रमाणे वाचकांसाठी आदर्शवादाचा वस्तुपाठ वाचकांसमोर ठेवण्याची किमया खांडेकर करू शकले. सन १९६० हे वर्ष साहित्य क्षेत्रासाठी नवप्रतिभेचे ठरले. याच वर्षात खांडेकरांची `ययाती` प्रकाशित झाली आणि तिने सर्वच विक्रम प्रस्थापित केले. या विक्रमाची घोडदौड आजच्या डिजिटल युगातही अबाधित आहे. कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर अवघ्या १६ व्या वर्षी म्हणजे २६ फेब्रूवारी १९७६ मध्ये या कादंबरीस मराठी भाषेसाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. आज या गौरवशाली परंपरेला ४५ वर्षे झाली आहेत. येत्या ५ वर्षात या गौरवाची ५० वर्षे होणार आहेत. यापूर्वी राष्ट्रीय पातळीवर असा सन्मान मराठी राजभाषेला मिळालेला नव्हता. ही उणीव `ययाती` ने भरून काढली. अभिमानाची बाब म्हणजे खांडेकरांनंतर मराठीतील तीन लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला. खांडेकरांनंतर ११ वर्षांनी प्रसिद्ध कवी तथा ज्यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणू साजरा केला जातो ते वि. व शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज याना १९८७ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने गपूरविण्यात आले. पुरस्कार मिळविणारे ते मराठीतील दुसरे लेखक ठरले. यानंतरच्या १६ वर्षांनी म्हणजे २००३ मध्ये कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. याचप्रमाणे १४ वर्षांनी म्हणजेच २०१४ मध्ये समीक्षक भालचंद्र नेमाडे याना ज्ञानपीठ पूरसाकर मिळाला. ते मराठीतील चौथे मानकरी ठरतात. असाच राष्ट्रीय पुरस्काराचा वारसा स्वाभिमानाने पुढेही चालू राहणार आहे. वाग्देवीची मूर्ती, मानचिन्ह, प्रमाणपत्र, लाखांपेक्षा अधिक रोख रक्कम अशा स्वरूपाचा हा सर्वोच्च साहित्य पुरस्कार राष्टपतींच्या हस्ते प्रदान करण्याची परंपरा आहे. १९७६ मध्ये प्रदान ज्ञानपीठ पुरस्काराच्या वेळी भारतीय ज्ञानपीठचे अध्यक्ष शांतिप्रसाद जैन, उमाशंकर जोशी यांच्या सहीचे भव्य प्रशस्तीपत्र स्वीकारताना खांडेकर यांच्यासोबत तमाम मराठी भाषकांचा उर भरून येणे स्वाभाविकच होते. महाभारतातील रंजक कथानक म्हणजे ययाती शुक्राचार्यांची मुलगी देवयानी व दासी शर्मिष्ठा. देवयानी जरी ययातिची पत्नी असली तरी तिचे प्रेम कचावर असते, तर ययातीचे शर्मिष्ठावर प्रेम जडते. अहंकारातून अग्निज्वाला प्रकटतात त्यातून वानवा पेटतो...जिवाची लाही लाही होते. महत्वकांक्षेतून देवयानी ययातीशी लग्न करते, पण यात तिच्या वाट्याला दुःख येते. शर्मिष्ठा या दोन नायिकांना समजावून सांगता सांगता कथेत ययाती सुखाच्या गाद्यांवर लोळत असला तरी अतृप्त राहतो याउलट कचाचा स्वभाव असतो. विचारशील संयमी जीवन जगणारा कच निरपेक्ष प्रेम करतो. शुक्राचार्यांसारखीच विद्या कचाने प्राप्त केली होती. कृत्रिम वार्ध्याक्य दूर करण्याची सिद्धीविद्या त्याने प्राप्त केली होती. याच सिद्धीनुसार कचाने शर्मिष्ठेचा पुरुचे यौवन त्यास पुन्हा परत मिळवून दिले होते . याच पुरूने वडिलांचे म्हणजे ययातीचे वार्ध्यक्य घेऊन आपले यौवन ययातीला दिले होते. आपला भाऊ यदूसाठी त्याने राजसिंहासन नाकारले होते, पण पुढे तोच महाराजा होतो. अशी ढोबळमानाने `ययाती` कादंबरीची रचना असली तरी मानवी जीवनातील अक्षांश-रेखांशाचा आलेख आहे.कादंबरीतील ययाती हा सम्राट महाराजा आजच्या सामान्य व्यक्तीचा प्रतिनिधी आहे अशी स्वतःच कबुली खांडेकर देतात. यासंदर्भात `ययाती` कादंबरीच्या शेवटी २५ पानांची विस्तृत पाःर्वभूमी देऊन खांडेकरांनी कादंबरी लिखाणामागची प्रेरणा कथानुभव, कथाविष्करण याबाबत स्पष्टीकरण केले आहे. आज ६१ वर्षांच्या या कादंबरीने वाचकांची मने जिंकून निस्सीम प्रेम केलेले आहे. डिजिटल युगातही हि कादंबरी पुनः पुन्हा वाचाविशी वाटते. *दोन पिढ्यांचा संस्कार* खांडेकरांच्या `ययाती` कादंबरीचे पहिले प्रकाशन रेडबुक अँड कंपनीतर्फे १९५९ मध्ये झाले होते. सध्या या कादंबरीचे हक्क पुण्यातील मेहता पब्लिशिंग हाऊसकडे आहेत. कादंबरीची आज तब्बल ४१ वी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. यासंदर्भांत मेहता पब्लिशिंग हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांच्याशी थेट संपर्क केल्यानंतर त्यांनी मराठी राजभाषेचा गौरव आणि खांडेकरांविषयी आपुलकी व्यक्त केली. प्रचंड खपाची ही कादंबरी ६० वर्षात दोन पिढ्यांमधील संस्कार आहे. वाचकांनी कादंबरीवर प्रचंड प्रेम केल्याचे सुनील मेहता यांनी अभिमानाने सांगितले. २०१३-१४, २०१६ मध्ये `ययाती` च्या तब्बल दोन छोट्या आवृत्या काढाव्या लागल्या. `ययाती` ची दरवर्षी १० हजार प्रतींची विक्री होत असली तरी आज प्रकाशित पुस्तकांच्या आवृत्या छोट्या झाल्या आहेत. आज ६ ते ८ हजार प्रतींची आवृत्ती निघत असल्याची खंतही मेहता व्यक्त करतात. मराठीत ललित लेखनाला मोठी परंपरा आहे. मराठीचा राष्ट्रीय पातळीवर जेवढा गौरव व्हायला पाहिजे तेवढा होत नाही. अशा परिस्थितीत ७० च्या दशकात खांडेकरांना `ज्ञानपीठ` रूपाने मराठी राजभाषेसाठी राष्ट्रीय नामांकन मिळाले ही अभिमानाची गोष्ट आहे.`ययाती` मधील कथानक विलक्षण आणि एकमेवाद्वितीय आहे. महाकथात्मक स्वरूपातील `ययाती` दर्जेदार कादंबरी आहे असे सांगत मेहता यांनी जात जात आज घडीला दर्जेदार नवसाहित्य निर्माण व्हायला पाहिजे असा आशावादही व्यक्त केला. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more