* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788171615889
  • Edition : 46
  • Publishing Year : JANUARY 1959
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 432
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
YAYATI IS THE STORY OF THE LUST OF A KING BY THE SAME NAME, WHO APPEARS IN THE MAHABHARATA, ONE OF THE TWO EPICS OF INDIA. THOUGH MARRIED TO BEAUTIFUL DEVYANI, HE FOUND THE FEMALE SERVANT, SHARMISHTHA, ENTICING. HE HAD FIVE CHILDREN FROM THESE WOMEN BUT HIS DESIRE FOR PLEASURE REMAINED UNSATISFIED. DID HIS QUEST FOR THE CARNAL END WITH HIS EXCHANGING HIS OLD AGE WITH HIS SON’S YOUTH? HOW LONG DID HE ENJOY THE SENSUAL PLEASURES? YAYATI STANDS FOR ONE WHO IS NEVER SATISFIED WITH EARTHLY PLEASURES. THOUGH THE STORY OF THE ANCIENT TIMES CENTERS ONLY AROUND DISSOLUTE DESIRES OF AN INDIVIDUAL, ONE CAN DRAW PARALLEL EXAMPLES FROM THE PRESENT DAYS OF CONSUMERISM WHERE THE INSATIABILITY TO HAVE MORE PLEASURES CONTINUES.
कै. विष्णु सखाराम तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या एकूण साहित्यकृतींच्या रत्नमाळेतील ‘ययाति’चे स्थान मेरुमण्यासारखे आहे. या कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापुरता संबंध नाही. एका प्रसिद्ध पौराणिक उपाख्यानाचे धागेदोरे घेऊन ते त्यांनी या कादंबरीत स्वतंत्र रीतीने गुंफले आहेत. आपल्या प्रतिभेची जात, तिची शक्ती आणि तिच्या मर्यादा यांची योग्य जाणीव झालेल्या खांडेकरांनी आत्माविष्काराला योग्य अशीच कथा निवडली. ती ज्या माध्यमातून त्यांना प्रगट व्हावीशी वाटली, त्याच्यावर त्यांचे प्रभुत्व होतेच. पुराणकथांत जे भव्यभीषण संघर्ष आढळतात, त्यांचे मंथन करण्याची अंगभूत शक्तीही त्यांच्या चिंतनात होती. जीवन जसे एका दृष्टीने क्षणभंगुर आहे, तसेच, ते दुस-या दृष्टीने चिरंतन आहे; ते जितके भौतिक आहे, तितकेच आत्मिक आहे, या कठोर सत्याचे आकलनही त्यांना पूर्णत्वाने झालेले होते. त्यामुळेच एका पौराणिक कथेच्या आधाराने एक सर्वाेत्तम ललितकृती कशी निर्माण करता येते, याचा आदर्श वस्तुपाठच ‘ययाति’च्या रूपाने श्री. खांडेकरांनी वाचकांपुढे ठेवला आहे. कामुक, लंपट, स्वप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही, असा ययाति; अहंकारी, महत्त्वाकांक्षी; मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी; स्वत:च्या सुखाच्या पलीकडे सहज पाहणारी आणि ययातीवर शरीरसुखाच्या, वासनातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभावधर्म होऊन बसला आहे, असा विचारी, संयमी व ध्येयवादी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्परप्रेमाची विविध स्वरूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झाली आहेत. ‘ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी,’ अशी अपेक्षा स्वत: खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार १९७६
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #हिरवा चाफा #दोन मने #दोन ध्रुव
Customer Reviews
  • Rating StarSankalp Patil

    महाराष्ट्र साहित्यात सर्वोत्कृष्ट १० किंवा ५ कादंबऱ्यांची नावे घेतली तर त्यात यायातीचे नाव अग्रक्रमाने येईल. तशी ही कादंबरी आहेच.कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी प्रकाशित केली आहे आणि मुखपृष्ठ देखील त्यांच्या तर्फेच रेखाटण्यात आले आहे. मुखपृष्ठ पाढऱ्या आश्वाच्या चित्राने रंगवले आहे. पुस्तक वाचून झालं की मग तुम्हाला त्यामागचा अर्थ कळेल की आश्वाचं चित्र का आहे ते ? ययाति ही खांडेकरांची सर्वोत्कृष्ट रचना. वाचल्यावर हे उमगेलच. कथा महाभारतकालीन आहे. ययाति या राजाच्या आयुष्याची कहाणी. पण फक्त ययातिच नाही तर कच , देवयानी , शर्मिष्ठा या पात्रांचीही ही गोष्ट आहे. कथा ही पौराणिक असून कथेचा जो गाभा पुराणात आहे तोच इथेही आहे पण खांडेकरांनी काही धागेदोरे स्वतंत्र रीतीने यात गुंफले आहे. फार ताकदीने लेखन केलंय खांडे करांनी. यातल्या मुख्य चार पात्रांना एकमेकांविषयी प्रेम वाटते पण ते पुढे असफल , क्षणिक आणि अपुरे राहते. कामवासना हा या कादंबरीचा गाभा ! मनुष्य शरीरसुखामागे / क्षणिक सुखामागे धावतो , त्याला आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान देतो आणि विनाशाकडे जात अनेकवेळा उपभोग घेऊनही अतृप्तच राहतो. हा या कादंबरीचा थोडक्यात सार . कथा जशी जशी पुढे जाते तसे तसे नवनवीन पात्र येत जातात. मुख्य चार पात्रे यात आहेत. जी शेवटपर्यंत राहतात. यातला कच हा आधुनिक काळातल्या आदर्श पुरुषाचा नेतृत्वकर्ता. महाभारतातला खरा कच वेगळाच आणि या कादंबरीतला खांडेकरांचा कच वेगळा. फारच उत्कृष्टपणे त्यांनी तो रेखाटलाय . तो ध्येयवादी आहे. आसपास तो वासना बळावू देत नाही. तो संयमी आहे. प्रत्येक प्राणीमात्रावर तो निरपेक्ष प्रेम करतो , त्याचे देवयानी वरचे प्रेम जरी असफल झाले असले तरी तो थांबला नाही तो निर्मळ सरितेसारखा अविरत वाहतच राहिला. एकेकाळची आपली प्रेयसी आता संसारी स्त्री बनली आहे हे ध्यानात धरून ज्याप्रकारे तो देवयानी सोबत संवाद साधतो ते वर्णन तर उत्कृष्टच आहे. देवयानी या पात्राचे तिच्या आयुष्यात ध्येय काहीच नव्हते. लाडात वाढलेली पोर ती. हे किती प्रातिनिधिक आहे बघा. आजच्या काळातही परिस्थिती एकदम अभिन्न. श्रीमंत घरात वाढलेली बहुतांश मुले ध्येयहिन असलेली दिसतात. बऱ्याचदा आंतरिक विचार त्यांच्या ठायी नसतो. इथेही तसच होतं. कुठलही योग्य निर्णय न घेता , पुरेसा विचार न करता फक्त शर्मिष्ठेचा बदला घेण्यासाठी - तिला आपली दासी बनवण्यासाठी देवयानीने यायातिशी लग्न केलं. त्यानंतर ती ययातिला ना प्रेम देऊ शकली ना शारीरिक - मानसिक सुख ! उलट आई झाल्यावर देखील तिच्यातली अवखळ , हट्टी आणि अविचारी लहान पोर दिसून येते. आणि कदाचित याच कारणामुळे ययाति शर्मिष्ठेवर प्रेम करू लागला. एका आदर्श पत्नीने जे पतीला द्यायचे असते ते सर्व शर्मिष्ठेने ययातिला दिले. श्रीमंत वडिलांची मुलगी असूनही स्वतः च्या एका चुकीमुळे ती आयुष्यभर दासी बनून राहते. सर्व समस्यांना तोंड देते. सुख - विलासाचा त्याग करते , हे धाडसच ! कादंबरीत भावनात्मकतेचा मजबूत स्पर्श आहे. खांडेकरांची भाषा , त्यांची कल्पनाशक्ती आणि अधून मधून येणारी जीवन आणि वासना यांच्यावर भाष्य करणारी मजबूत वाक्ये खूप भावतात. कादंबरीची मांडणी खरंच खूप सुरेख आहे. कादंबरी वाचताना अनेकदा व्यक्ती भावनातीत होऊन जातो. मीही झालो होतो. अनेक प्रसंग तर असे आहेत जे वाचल्यावर एखादा मर्मभेदी बाण काळजातून चर्र भेदून जावा असा धक्का लागून डोळ्यातून अश्रू येतात. कथेतल्या अलका आणि माधवी यांच्या प्रसंगात हे होईल ! वाचताना आपण प्रत्येक पात्राशी समरस होऊन जातो त्यामुळे एक एक प्रसंग जसा येतो तसं राग , द्वेष , मत्सर , अश्रू , दया , कणव , करुणा , आसुया या भावना अंतर्मनात युद्ध करतात. हरवून जायला होतं. खांडेकर जीवनाचं अंगभूत दर्शन घडवतात.कादंबरीतलं प्रत्येक पात्र आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतं. काही कादंबऱ्या मादक असतात. त्या भुरळ पडतात , ययाति - मृत्युंजय या कादंबऱ्या त्याच पट्टीतल्या. ययाति समजून घ्यावी लागते ! सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कादंबरी प्रातिनिधिक आहे. ती प्रातिनिधिक आहे आजच्या काळाशी - आजच्या समाजाशी. यातली सर्व प्रमुख पात्रे आजच्या पिढीतल्या मनुष्याचे प्रतिनिधी आहेत. लहान - सहान गोष्टींचा मनात दंश धरणारे. सतत शर्यतीत असणारे , दिखाऊगिरीच्या पक्षातले, जीवनाचं आकलन नसलेले , धैर्य आणि ध्येय यांच्या गावीही न गेलेले अशा असंतोषी प्रवृत्तीच्या माणसांची देवयानी ही प्रतिनिधी आहे. जगात अगदीच थोडे का असेना पण , इतरांवर निखळ प्रेम करणारे , चुका केल्यावर त्याची योग्य ती शिक्षा भोगणारे , परिस्थितीला समर्थपणे तोंड देणारे , त्याग करणारे , समर्पित होणारे , या प्रवृत्तींच्या लोकांची शर्मिष्ठा ही प्रतिनिधी आहे. जीवन म्हणजे काय हे कळलेले , निर्णयक्षम , अवघड परिस्थिती योग्य प्रकारे हाताळणारे , जीवनात वासनेला अती महत्त्व न देता , धैर्याच्या मार्गाने चालणारे , संयमी , विचारी , प्रेमाचा वेगळा अर्थ उमजलेले , समाजासाठी खऱ्या अर्थाने आदर्श असणारे , अशा व्यक्तींचा कच हा प्रतिनिधी आहे. भरकटलेले , जीवन सीमित समजणारे , कर्तृत्ववान परंतु चुकीच्या मार्गाला लागलेले. शरीराचे गुलाम झालेले , कामवासना हीच उच्च प्रकारचे सुख आहे असं समजणारे , दृष्टी अशुद्ध झालेले , बिघडलेले , मोहाला बळी पडलेले , अशा प्रकारच्या व्यक्तींचा ययाति हा प्रतिनिधी आहे. दुर्दैवाने आजच्या काळात ये ययातिच जास्त आहेत. कच कमी ! ही कथा तर वाचाच पण पुस्तकात कदाचित मुद्दाम दिलेली पार्श्वभूमी वाचाच वाचा. कादंबरी कशी जन्माला आली फक्त हेच नाही तर आजचा समाज , यातले व्यक्ती , भरकटलेली मानसिकता , पिसाळलेली कामवासना या सर्वांवर खांडेकरांनी अगदी आग ओकल्याप्रमाणे परखड भाष्य केलंय. चुकीच्या मार्गाने चालत असलेल्या समाजाबाबत त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे तर कामवासना ही एका विशिष्ट मर्यादेत असायला हवी असेही ते म्हणतात. जर तुम्ही ही पार्श्वभूमी वाचली नाही तर पुस्तक अर्धवट वाचल्या सारखं होईल. कादंबरी वाचल्यावर तुम्हाला अनेक गोष्टी कळतील , समजतील , नव्याने उमगतील. खऱ्या अर्थाने वाचकांना मोठं करणारी कादंबरी ! खांडेकरांच्या लेखणीला सलाम ! 🙌 #ययाती #विसखांडेकर ...Read more

  • Rating Starआकाश काशिनाथ साठे

    #ययाति_कुणाची..🐎 ..ययाति.. इंद्राला पराजित करुन स्वार्गावर विजय मिळवणाऱ्या एका शापित नहूषमहाराजांच्या वंशजाची.. ..ययाति.. एका शापित पित्याच्या दोन पुत्रांची,सुखा च्या शोधात भटकत असलेल्या यती आणि ययाति या दोन राज पुत्रांची.. ..ययाति.. एक राजकन्या असून पण आपल्या एका चुकी मूळ, आपल्या पित्याचे राज्य वाचवावे म्हणून जन्मतः दासी तत्व स्वीकार करणाऱ्या एका शर्मिष्ठा नावाच्या राजमातेची.. ..ययाति.. एका अहंकारी स्त्रीची, घमंडी महाराणीची, स्वतःच्या सुखात मग्न झालेल्या पत्नीची, एका तपसव्याच्या पुत्रीची.. हा त्या क्रूर देवयानीची.. ..ययाति.. त्या एका महान असलेल्या कचदेवाची, मित्रा साठी प्राणपणाला लावणाऱ्या त्या माधवाची, आपल्या बोबड्या बोलाणी मंत्र मुग्ध करणाऱ्या त्या तारकेची.. ..ययाति.. त्या सोनेरी लट असणाऱ्या काहीही गुन्हा नसतांना मरण पतकाराव लागणाऱ्या अल्केची.. वासनेने भरलेल्या ययातिची, दासी मुकुलकीची, ..ययाति.. एक अश्या ययाति राज्याची ज्याच्या आयुष्यात शरीर सुखा शिवाय त्याला आयुष्यात सुख म्हणजे काय याची जाणीवच नसतं.. तब्बल अठरा वर्ष नव-नवीन सुंदरी भेटून पण अतृप्त राहणाऱ्या त्या राजाची ही ययाति.. .. ययाति.. त्या आपल्या सारख्या प्रत्येक वाईट नजरेच्या पुरुषाची, ययाति आता च्या जगात जगत असणाऱ्या त्या प्रत्येक अहंकारी स्त्री ची.. .. शरीर सुख हेच आयुष्यात सर्व काही नसतं त्या पलीकडे पण जग असतं,वासनेच्या इतक्या पण आहारी जायला नको की आपलाचं उपशाप आपल्या प्रियंजनानवर आपण लादण्यास कुचराई करू नये, वासने साठी आपले वर्धाक्य आपल्या पुत्रा ला देतांना आपल्या मनात कोणताही विचार येऊ नये.. ..शेवटी ययाति मधीलचं काही ओळी जश्याच्या जश्या लिहावं वाटतं आहे.. 🔸शरीरसूख शेवटी दुःखालाच कारणीभूत होत.. मग ते सुख स्पर्शाचा असो, अथवा दृष्टीच असो.. शरीर हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे.. त्याच्या वर विजय मिळवण्याकरिता सतत धडपडत राहणं हेच या जगात मनुष्याच प्रमुख कर्तव्य आहे.. 🔸माणूस शरीरावर प्रेम करतो, त्या प्रेमाला अंत नसतो.. पण शरीर काही त्याच्यावर असे प्रेम करीत नाही.. प्रसंगी ते त्याचे वैर साधते.. ..वी.स.खांडेकरांची ही कादंबरी त्या प्रत्येकासाठी एक उत्तम मार्गदर्शन करते जे आयुष्यात शरीर सुख हेच सर्वस्व आहे असे मानून त्यांचे आयुष्य जगत आहे.. त्यांच्या शब्दांनी या सर्व पात्रांच्या बोलण्यात जिवंत पणा आणला आहे.. .. कचदेवाचे पात्र हे मनाला भिडून जाते जरी या कादंबरीत दोन नायिका आणि एक नायक आपल्याला दिसतं असला तरी कच देव सुद्धा त्यात दुसऱ्या नायकाची भूमिका पार पाडून जातोय.. ..थोडक्यता काही तरी घेऊ पाहणाऱ्यांसाठी अप्रतिम कादंबरी.. #जग_माणसाच्या_मनातल्या_दयेवर_चालत_नाही.. #ते_त्याच्या_मनगटातल्या_बळावर_चालत.. ( टीप :- मागील "मूकद्दर" या कांदंबरीची पोस्ट केली असता काही अपुऱ्या इतिहास अभ्यास करणाऱ्यांनी ज्या कमेंट केल्या त्यांची हुशारी बघण्यासाठी ही पोस्ट.. मेन्शन करू वाटतं नाही.. आपण समोरच्याचा गैरसमज दूर करू शकतोय पण त्याच्या डोळ्याला लागलेला गैरसमजचा चष्मा काढू शकत नाही.. ) . ...Read more

  • Rating StarSharad Kharde Patil

    आज वाचुन पुर्ण झाले. मानवी मनाचा व त्याच्या भावनांचा अनके छटाच सोप्या शब्दात परंतु खुप गहिऱ्या अर्थात गुंफले आहेत. वि. स. खांडेकर ना सलाम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम 🙏

  • Rating Starसामना २१-२-२०२१

    कादंबरी लिखाण हा एक जगमान्य साहित्य प्रकार आहे. त्यासाठी सशक्त कथानक व जबरदस्त मांडणीची गरज असतेही. अशातच वि. स. खांडेकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली `ययाती` ही कादंबरी ६० वर्षांपासून वाचकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. याच कादंबरीला मराठ राजभाषेतील पहिला सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार (१९७६) मिळाला. या घटनेला २६ फेब्रुवारी रोजी ४५ वर्षे पूर्ण होत आहेत. मराठी साहित्यातील सुवर्णाक्षरांनी अलंकारित नाव म्हणजे विष्णू सखाराम उपाख्य वि. स. खांडेकर होय. त्यांनी लिहिलेली अजरामर कादंबरी `ययाती` ही आज ६० वर्षाची ज्येष्ठ श्रेष्ठ झाली असली तरी आजही या कादंबरीचा केशरी गोडवा टवटवीत आहे. बेस्ट सेलर, बेस्ट भाषा, वाचकप्रिय असलेल्या या कादंबरीला आजही विक्रमी मागणी आहे. अस्सल भाषा वाचकांना खिळवून ठेवण्याची अमोघ शैली, अजोड कथेचा सुगंधी दर्प खांडेकरांच्या साहित्यात असल्यामुळे ते वाचकप्रिय लेखक ठरले आहेत. म्हणूनच इतर मराठी लेखकांच्या तुलनेने खांडेकर हे वरचढ ठरतात. खांडेकरांच्या लेखन प्रवासात जे काही लिखाण झाले, त्यातील `अमृतवेल व ययाती` या दोन कादंबऱ्या खास वाचकप्रिय ठरल्या. लघुकथा, विनोदी लेखन, ललित निबंध, स्फुट लेखन, कविता, नाट्य व्यक्तिचित्रण अशा अनेक साहित्य प्रकारातून त्यांनी लिखाणाची चुणूक दाखवली. तेवढी त्यांच्यात प्रतिभा होतीही. म्हणूनच ते खऱ्या अर्थाने कादंबरी व कथालेखनात विशेषत्वाने रमलेले दिसतात. यात त्यांच्या १५ पेक्षा अधिक कादंबऱ्या तर २७ पेक्षा अधिक कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. झपाटून लिहिताना दर्जेदारपणा व संयमितता पाळून वाचकांसमोर आदर्शवाद ठेवण्यावर त्यांनी त्यांनी भर दिला हे विशेष होय. कुठलेही साहित्य हे ध्येयावर प्रेरित असते साहित्यातील लेखनाची प्रतिभा आणि तिची वास्तविकता यावरून साहित्य निर्मितीची बैठक कळते. सर्वोत्तम लिखाणामागची प्रेरणा काहीही असली तरी त्यातील वस्तुपाठ नाकारता येत नाही. या तत्वाप्रमाणे वाचकांसाठी आदर्शवादाचा वस्तुपाठ वाचकांसमोर ठेवण्याची किमया खांडेकर करू शकले. सन १९६० हे वर्ष साहित्य क्षेत्रासाठी नवप्रतिभेचे ठरले. याच वर्षात खांडेकरांची `ययाती` प्रकाशित झाली आणि तिने सर्वच विक्रम प्रस्थापित केले. या विक्रमाची घोडदौड आजच्या डिजिटल युगातही अबाधित आहे. कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर अवघ्या १६ व्या वर्षी म्हणजे २६ फेब्रूवारी १९७६ मध्ये या कादंबरीस मराठी भाषेसाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. आज या गौरवशाली परंपरेला ४५ वर्षे झाली आहेत. येत्या ५ वर्षात या गौरवाची ५० वर्षे होणार आहेत. यापूर्वी राष्ट्रीय पातळीवर असा सन्मान मराठी राजभाषेला मिळालेला नव्हता. ही उणीव `ययाती` ने भरून काढली. अभिमानाची बाब म्हणजे खांडेकरांनंतर मराठीतील तीन लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला. खांडेकरांनंतर ११ वर्षांनी प्रसिद्ध कवी तथा ज्यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणू साजरा केला जातो ते वि. व शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज याना १९८७ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने गपूरविण्यात आले. पुरस्कार मिळविणारे ते मराठीतील दुसरे लेखक ठरले. यानंतरच्या १६ वर्षांनी म्हणजे २००३ मध्ये कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. याचप्रमाणे १४ वर्षांनी म्हणजेच २०१४ मध्ये समीक्षक भालचंद्र नेमाडे याना ज्ञानपीठ पूरसाकर मिळाला. ते मराठीतील चौथे मानकरी ठरतात. असाच राष्ट्रीय पुरस्काराचा वारसा स्वाभिमानाने पुढेही चालू राहणार आहे. वाग्देवीची मूर्ती, मानचिन्ह, प्रमाणपत्र, लाखांपेक्षा अधिक रोख रक्कम अशा स्वरूपाचा हा सर्वोच्च साहित्य पुरस्कार राष्टपतींच्या हस्ते प्रदान करण्याची परंपरा आहे. १९७६ मध्ये प्रदान ज्ञानपीठ पुरस्काराच्या वेळी भारतीय ज्ञानपीठचे अध्यक्ष शांतिप्रसाद जैन, उमाशंकर जोशी यांच्या सहीचे भव्य प्रशस्तीपत्र स्वीकारताना खांडेकर यांच्यासोबत तमाम मराठी भाषकांचा उर भरून येणे स्वाभाविकच होते. महाभारतातील रंजक कथानक म्हणजे ययाती शुक्राचार्यांची मुलगी देवयानी व दासी शर्मिष्ठा. देवयानी जरी ययातिची पत्नी असली तरी तिचे प्रेम कचावर असते, तर ययातीचे शर्मिष्ठावर प्रेम जडते. अहंकारातून अग्निज्वाला प्रकटतात त्यातून वानवा पेटतो...जिवाची लाही लाही होते. महत्वकांक्षेतून देवयानी ययातीशी लग्न करते, पण यात तिच्या वाट्याला दुःख येते. शर्मिष्ठा या दोन नायिकांना समजावून सांगता सांगता कथेत ययाती सुखाच्या गाद्यांवर लोळत असला तरी अतृप्त राहतो याउलट कचाचा स्वभाव असतो. विचारशील संयमी जीवन जगणारा कच निरपेक्ष प्रेम करतो. शुक्राचार्यांसारखीच विद्या कचाने प्राप्त केली होती. कृत्रिम वार्ध्याक्य दूर करण्याची सिद्धीविद्या त्याने प्राप्त केली होती. याच सिद्धीनुसार कचाने शर्मिष्ठेचा पुरुचे यौवन त्यास पुन्हा परत मिळवून दिले होते . याच पुरूने वडिलांचे म्हणजे ययातीचे वार्ध्यक्य घेऊन आपले यौवन ययातीला दिले होते. आपला भाऊ यदूसाठी त्याने राजसिंहासन नाकारले होते, पण पुढे तोच महाराजा होतो. अशी ढोबळमानाने `ययाती` कादंबरीची रचना असली तरी मानवी जीवनातील अक्षांश-रेखांशाचा आलेख आहे.कादंबरीतील ययाती हा सम्राट महाराजा आजच्या सामान्य व्यक्तीचा प्रतिनिधी आहे अशी स्वतःच कबुली खांडेकर देतात. यासंदर्भात `ययाती` कादंबरीच्या शेवटी २५ पानांची विस्तृत पाःर्वभूमी देऊन खांडेकरांनी कादंबरी लिखाणामागची प्रेरणा कथानुभव, कथाविष्करण याबाबत स्पष्टीकरण केले आहे. आज ६१ वर्षांच्या या कादंबरीने वाचकांची मने जिंकून निस्सीम प्रेम केलेले आहे. डिजिटल युगातही हि कादंबरी पुनः पुन्हा वाचाविशी वाटते. *दोन पिढ्यांचा संस्कार* खांडेकरांच्या `ययाती` कादंबरीचे पहिले प्रकाशन रेडबुक अँड कंपनीतर्फे १९५९ मध्ये झाले होते. सध्या या कादंबरीचे हक्क पुण्यातील मेहता पब्लिशिंग हाऊसकडे आहेत. कादंबरीची आज तब्बल ४१ वी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. यासंदर्भांत मेहता पब्लिशिंग हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांच्याशी थेट संपर्क केल्यानंतर त्यांनी मराठी राजभाषेचा गौरव आणि खांडेकरांविषयी आपुलकी व्यक्त केली. प्रचंड खपाची ही कादंबरी ६० वर्षात दोन पिढ्यांमधील संस्कार आहे. वाचकांनी कादंबरीवर प्रचंड प्रेम केल्याचे सुनील मेहता यांनी अभिमानाने सांगितले. २०१३-१४, २०१६ मध्ये `ययाती` च्या तब्बल दोन छोट्या आवृत्या काढाव्या लागल्या. `ययाती` ची दरवर्षी १० हजार प्रतींची विक्री होत असली तरी आज प्रकाशित पुस्तकांच्या आवृत्या छोट्या झाल्या आहेत. आज ६ ते ८ हजार प्रतींची आवृत्ती निघत असल्याची खंतही मेहता व्यक्त करतात. मराठीत ललित लेखनाला मोठी परंपरा आहे. मराठीचा राष्ट्रीय पातळीवर जेवढा गौरव व्हायला पाहिजे तेवढा होत नाही. अशा परिस्थितीत ७० च्या दशकात खांडेकरांना `ज्ञानपीठ` रूपाने मराठी राजभाषेसाठी राष्ट्रीय नामांकन मिळाले ही अभिमानाची गोष्ट आहे.`ययाती` मधील कथानक विलक्षण आणि एकमेवाद्वितीय आहे. महाकथात्मक स्वरूपातील `ययाती` दर्जेदार कादंबरी आहे असे सांगत मेहता यांनी जात जात आज घडीला दर्जेदार नवसाहित्य निर्माण व्हायला पाहिजे असा आशावादही व्यक्त केला. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more