* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: YAYATI
  • Availability : Available
  • ISBN : 9788171615889
  • Edition : 44
  • Publishing Year : JANUARY 1959
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 432
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
YAYATI IS THE STORY OF THE LUST OF A KING BY THE SAME NAME, WHO APPEARS IN THE MAHABHARATA, ONE OF THE TWO EPICS OF INDIA. THOUGH MARRIED TO BEAUTIFUL DEVYANI, HE FOUND THE FEMALE SERVANT, SHARMISHTHA, ENTICING. HE HAD FIVE CHILDREN FROM THESE WOMEN BUT HIS DESIRE FOR PLEASURE REMAINED UNSATISFIED. DID HIS QUEST FOR THE CARNAL END WITH HIS EXCHANGING HIS OLD AGE WITH HIS SON’S YOUTH? HOW LONG DID HE ENJOY THE SENSUAL PLEASURES? YAYATI STANDS FOR ONE WHO IS NEVER SATISFIED WITH EARTHLY PLEASURES. THOUGH THE STORY OF THE ANCIENT TIMES CENTERS ONLY AROUND DISSOLUTE DESIRES OF AN INDIVIDUAL, ONE CAN DRAW PARALLEL EXAMPLES FROM THE PRESENT DAYS OF CONSUMERISM WHERE THE INSATIABILITY TO HAVE MORE PLEASURES CONTINUES.
कै. विष्णु सखाराम तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या एकूण साहित्यकृतींच्या रत्नमाळेतील ‘ययाति’चे स्थान मेरुमण्यासारखे आहे. या कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापुरता संबंध नाही. एका प्रसिद्ध पौराणिक उपाख्यानाचे धागेदोरे घेऊन ते त्यांनी या कादंबरीत स्वतंत्र रीतीने गुंफले आहेत. आपल्या प्रतिभेची जात, तिची शक्ती आणि तिच्या मर्यादा यांची योग्य जाणीव झालेल्या खांडेकरांनी आत्माविष्काराला योग्य अशीच कथा निवडली. ती ज्या माध्यमातून त्यांना प्रगट व्हावीशी वाटली, त्याच्यावर त्यांचे प्रभुत्व होतेच. पुराणकथांत जे भव्यभीषण संघर्ष आढळतात, त्यांचे मंथन करण्याची अंगभूत शक्तीही त्यांच्या चिंतनात होती. जीवन जसे एका दृष्टीने क्षणभंगुर आहे, तसेच, ते दुस-या दृष्टीने चिरंतन आहे; ते जितके भौतिक आहे, तितकेच आत्मिक आहे, या कठोर सत्याचे आकलनही त्यांना पूर्णत्वाने झालेले होते. त्यामुळेच एका पौराणिक कथेच्या आधाराने एक सर्वाेत्तम ललितकृती कशी निर्माण करता येते, याचा आदर्श वस्तुपाठच ‘ययाति’च्या रूपाने श्री. खांडेकरांनी वाचकांपुढे ठेवला आहे. कामुक, लंपट, स्वप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही, असा ययाति; अहंकारी, महत्त्वाकांक्षी; मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी; स्वत:च्या सुखाच्या पलीकडे सहज पाहणारी आणि ययातीवर शरीरसुखाच्या, वासनातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभावधर्म होऊन बसला आहे, असा विचारी, संयमी व ध्येयवादी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्परप्रेमाची विविध स्वरूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झाली आहेत. ‘ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी,’ अशी अपेक्षा स्वत: खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार १९७६
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #हिरवा चाफा #दोन मने #दोन ध्रुव
Customer Reviews
  • Rating StarSankalp Patil

    महाराष्ट्र साहित्यात सर्वोत्कृष्ट १० किंवा ५ कादंबऱ्यांची नावे घेतली तर त्यात यायातीचे नाव अग्रक्रमाने येईल. तशी ही कादंबरी आहेच.कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी प्रकाशित केली आहे आणि मुखपृष्ठ देखील त्यांच्या तर्फेच रेखाटण्यात आले आहे. मुखपृष्ठ पाढऱ्या आश्वाच्या चित्राने रंगवले आहे. पुस्तक वाचून झालं की मग तुम्हाला त्यामागचा अर्थ कळेल की आश्वाचं चित्र का आहे ते ? ययाति ही खांडेकरांची सर्वोत्कृष्ट रचना. वाचल्यावर हे उमगेलच. कथा महाभारतकालीन आहे. ययाति या राजाच्या आयुष्याची कहाणी. पण फक्त ययातिच नाही तर कच , देवयानी , शर्मिष्ठा या पात्रांचीही ही गोष्ट आहे. कथा ही पौराणिक असून कथेचा जो गाभा पुराणात आहे तोच इथेही आहे पण खांडेकरांनी काही धागेदोरे स्वतंत्र रीतीने यात गुंफले आहे. फार ताकदीने लेखन केलंय खांडे करांनी. यातल्या मुख्य चार पात्रांना एकमेकांविषयी प्रेम वाटते पण ते पुढे असफल , क्षणिक आणि अपुरे राहते. कामवासना हा या कादंबरीचा गाभा ! मनुष्य शरीरसुखामागे / क्षणिक सुखामागे धावतो , त्याला आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान देतो आणि विनाशाकडे जात अनेकवेळा उपभोग घेऊनही अतृप्तच राहतो. हा या कादंबरीचा थोडक्यात सार . कथा जशी जशी पुढे जाते तसे तसे नवनवीन पात्र येत जातात. मुख्य चार पात्रे यात आहेत. जी शेवटपर्यंत राहतात. यातला कच हा आधुनिक काळातल्या आदर्श पुरुषाचा नेतृत्वकर्ता. महाभारतातला खरा कच वेगळाच आणि या कादंबरीतला खांडेकरांचा कच वेगळा. फारच उत्कृष्टपणे त्यांनी तो रेखाटलाय . तो ध्येयवादी आहे. आसपास तो वासना बळावू देत नाही. तो संयमी आहे. प्रत्येक प्राणीमात्रावर तो निरपेक्ष प्रेम करतो , त्याचे देवयानी वरचे प्रेम जरी असफल झाले असले तरी तो थांबला नाही तो निर्मळ सरितेसारखा अविरत वाहतच राहिला. एकेकाळची आपली प्रेयसी आता संसारी स्त्री बनली आहे हे ध्यानात धरून ज्याप्रकारे तो देवयानी सोबत संवाद साधतो ते वर्णन तर उत्कृष्टच आहे. देवयानी या पात्राचे तिच्या आयुष्यात ध्येय काहीच नव्हते. लाडात वाढलेली पोर ती. हे किती प्रातिनिधिक आहे बघा. आजच्या काळातही परिस्थिती एकदम अभिन्न. श्रीमंत घरात वाढलेली बहुतांश मुले ध्येयहिन असलेली दिसतात. बऱ्याचदा आंतरिक विचार त्यांच्या ठायी नसतो. इथेही तसच होतं. कुठलही योग्य निर्णय न घेता , पुरेसा विचार न करता फक्त शर्मिष्ठेचा बदला घेण्यासाठी - तिला आपली दासी बनवण्यासाठी देवयानीने यायातिशी लग्न केलं. त्यानंतर ती ययातिला ना प्रेम देऊ शकली ना शारीरिक - मानसिक सुख ! उलट आई झाल्यावर देखील तिच्यातली अवखळ , हट्टी आणि अविचारी लहान पोर दिसून येते. आणि कदाचित याच कारणामुळे ययाति शर्मिष्ठेवर प्रेम करू लागला. एका आदर्श पत्नीने जे पतीला द्यायचे असते ते सर्व शर्मिष्ठेने ययातिला दिले. श्रीमंत वडिलांची मुलगी असूनही स्वतः च्या एका चुकीमुळे ती आयुष्यभर दासी बनून राहते. सर्व समस्यांना तोंड देते. सुख - विलासाचा त्याग करते , हे धाडसच ! कादंबरीत भावनात्मकतेचा मजबूत स्पर्श आहे. खांडेकरांची भाषा , त्यांची कल्पनाशक्ती आणि अधून मधून येणारी जीवन आणि वासना यांच्यावर भाष्य करणारी मजबूत वाक्ये खूप भावतात. कादंबरीची मांडणी खरंच खूप सुरेख आहे. कादंबरी वाचताना अनेकदा व्यक्ती भावनातीत होऊन जातो. मीही झालो होतो. अनेक प्रसंग तर असे आहेत जे वाचल्यावर एखादा मर्मभेदी बाण काळजातून चर्र भेदून जावा असा धक्का लागून डोळ्यातून अश्रू येतात. कथेतल्या अलका आणि माधवी यांच्या प्रसंगात हे होईल ! वाचताना आपण प्रत्येक पात्राशी समरस होऊन जातो त्यामुळे एक एक प्रसंग जसा येतो तसं राग , द्वेष , मत्सर , अश्रू , दया , कणव , करुणा , आसुया या भावना अंतर्मनात युद्ध करतात. हरवून जायला होतं. खांडेकर जीवनाचं अंगभूत दर्शन घडवतात.कादंबरीतलं प्रत्येक पात्र आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतं. काही कादंबऱ्या मादक असतात. त्या भुरळ पडतात , ययाति - मृत्युंजय या कादंबऱ्या त्याच पट्टीतल्या. ययाति समजून घ्यावी लागते ! सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कादंबरी प्रातिनिधिक आहे. ती प्रातिनिधिक आहे आजच्या काळाशी - आजच्या समाजाशी. यातली सर्व प्रमुख पात्रे आजच्या पिढीतल्या मनुष्याचे प्रतिनिधी आहेत. लहान - सहान गोष्टींचा मनात दंश धरणारे. सतत शर्यतीत असणारे , दिखाऊगिरीच्या पक्षातले, जीवनाचं आकलन नसलेले , धैर्य आणि ध्येय यांच्या गावीही न गेलेले अशा असंतोषी प्रवृत्तीच्या माणसांची देवयानी ही प्रतिनिधी आहे. जगात अगदीच थोडे का असेना पण , इतरांवर निखळ प्रेम करणारे , चुका केल्यावर त्याची योग्य ती शिक्षा भोगणारे , परिस्थितीला समर्थपणे तोंड देणारे , त्याग करणारे , समर्पित होणारे , या प्रवृत्तींच्या लोकांची शर्मिष्ठा ही प्रतिनिधी आहे. जीवन म्हणजे काय हे कळलेले , निर्णयक्षम , अवघड परिस्थिती योग्य प्रकारे हाताळणारे , जीवनात वासनेला अती महत्त्व न देता , धैर्याच्या मार्गाने चालणारे , संयमी , विचारी , प्रेमाचा वेगळा अर्थ उमजलेले , समाजासाठी खऱ्या अर्थाने आदर्श असणारे , अशा व्यक्तींचा कच हा प्रतिनिधी आहे. भरकटलेले , जीवन सीमित समजणारे , कर्तृत्ववान परंतु चुकीच्या मार्गाला लागलेले. शरीराचे गुलाम झालेले , कामवासना हीच उच्च प्रकारचे सुख आहे असं समजणारे , दृष्टी अशुद्ध झालेले , बिघडलेले , मोहाला बळी पडलेले , अशा प्रकारच्या व्यक्तींचा ययाति हा प्रतिनिधी आहे. दुर्दैवाने आजच्या काळात ये ययातिच जास्त आहेत. कच कमी ! ही कथा तर वाचाच पण पुस्तकात कदाचित मुद्दाम दिलेली पार्श्वभूमी वाचाच वाचा. कादंबरी कशी जन्माला आली फक्त हेच नाही तर आजचा समाज , यातले व्यक्ती , भरकटलेली मानसिकता , पिसाळलेली कामवासना या सर्वांवर खांडेकरांनी अगदी आग ओकल्याप्रमाणे परखड भाष्य केलंय. चुकीच्या मार्गाने चालत असलेल्या समाजाबाबत त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे तर कामवासना ही एका विशिष्ट मर्यादेत असायला हवी असेही ते म्हणतात. जर तुम्ही ही पार्श्वभूमी वाचली नाही तर पुस्तक अर्धवट वाचल्या सारखं होईल. कादंबरी वाचल्यावर तुम्हाला अनेक गोष्टी कळतील , समजतील , नव्याने उमगतील. खऱ्या अर्थाने वाचकांना मोठं करणारी कादंबरी ! खांडेकरांच्या लेखणीला सलाम ! 🙌 #ययाती #विसखांडेकर ...Read more

  • Rating Starआकाश काशिनाथ साठे

    #ययाति_कुणाची..🐎 ..ययाति.. इंद्राला पराजित करुन स्वार्गावर विजय मिळवणाऱ्या एका शापित नहूषमहाराजांच्या वंशजाची.. ..ययाति.. एका शापित पित्याच्या दोन पुत्रांची,सुखा च्या शोधात भटकत असलेल्या यती आणि ययाति या दोन राज पुत्रांची.. ..ययाति.. एक राजकन्या असून पण आपल्या एका चुकी मूळ, आपल्या पित्याचे राज्य वाचवावे म्हणून जन्मतः दासी तत्व स्वीकार करणाऱ्या एका शर्मिष्ठा नावाच्या राजमातेची.. ..ययाति.. एका अहंकारी स्त्रीची, घमंडी महाराणीची, स्वतःच्या सुखात मग्न झालेल्या पत्नीची, एका तपसव्याच्या पुत्रीची.. हा त्या क्रूर देवयानीची.. ..ययाति.. त्या एका महान असलेल्या कचदेवाची, मित्रा साठी प्राणपणाला लावणाऱ्या त्या माधवाची, आपल्या बोबड्या बोलाणी मंत्र मुग्ध करणाऱ्या त्या तारकेची.. ..ययाति.. त्या सोनेरी लट असणाऱ्या काहीही गुन्हा नसतांना मरण पतकाराव लागणाऱ्या अल्केची.. वासनेने भरलेल्या ययातिची, दासी मुकुलकीची, ..ययाति.. एक अश्या ययाति राज्याची ज्याच्या आयुष्यात शरीर सुखा शिवाय त्याला आयुष्यात सुख म्हणजे काय याची जाणीवच नसतं.. तब्बल अठरा वर्ष नव-नवीन सुंदरी भेटून पण अतृप्त राहणाऱ्या त्या राजाची ही ययाति.. .. ययाति.. त्या आपल्या सारख्या प्रत्येक वाईट नजरेच्या पुरुषाची, ययाति आता च्या जगात जगत असणाऱ्या त्या प्रत्येक अहंकारी स्त्री ची.. .. शरीर सुख हेच आयुष्यात सर्व काही नसतं त्या पलीकडे पण जग असतं,वासनेच्या इतक्या पण आहारी जायला नको की आपलाचं उपशाप आपल्या प्रियंजनानवर आपण लादण्यास कुचराई करू नये, वासने साठी आपले वर्धाक्य आपल्या पुत्रा ला देतांना आपल्या मनात कोणताही विचार येऊ नये.. ..शेवटी ययाति मधीलचं काही ओळी जश्याच्या जश्या लिहावं वाटतं आहे.. 🔸शरीरसूख शेवटी दुःखालाच कारणीभूत होत.. मग ते सुख स्पर्शाचा असो, अथवा दृष्टीच असो.. शरीर हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे.. त्याच्या वर विजय मिळवण्याकरिता सतत धडपडत राहणं हेच या जगात मनुष्याच प्रमुख कर्तव्य आहे.. 🔸माणूस शरीरावर प्रेम करतो, त्या प्रेमाला अंत नसतो.. पण शरीर काही त्याच्यावर असे प्रेम करीत नाही.. प्रसंगी ते त्याचे वैर साधते.. ..वी.स.खांडेकरांची ही कादंबरी त्या प्रत्येकासाठी एक उत्तम मार्गदर्शन करते जे आयुष्यात शरीर सुख हेच सर्वस्व आहे असे मानून त्यांचे आयुष्य जगत आहे.. त्यांच्या शब्दांनी या सर्व पात्रांच्या बोलण्यात जिवंत पणा आणला आहे.. .. कचदेवाचे पात्र हे मनाला भिडून जाते जरी या कादंबरीत दोन नायिका आणि एक नायक आपल्याला दिसतं असला तरी कच देव सुद्धा त्यात दुसऱ्या नायकाची भूमिका पार पाडून जातोय.. ..थोडक्यता काही तरी घेऊ पाहणाऱ्यांसाठी अप्रतिम कादंबरी.. #जग_माणसाच्या_मनातल्या_दयेवर_चालत_नाही.. #ते_त्याच्या_मनगटातल्या_बळावर_चालत.. ( टीप :- मागील "मूकद्दर" या कांदंबरीची पोस्ट केली असता काही अपुऱ्या इतिहास अभ्यास करणाऱ्यांनी ज्या कमेंट केल्या त्यांची हुशारी बघण्यासाठी ही पोस्ट.. मेन्शन करू वाटतं नाही.. आपण समोरच्याचा गैरसमज दूर करू शकतोय पण त्याच्या डोळ्याला लागलेला गैरसमजचा चष्मा काढू शकत नाही.. ) . ...Read more

  • Rating StarSharad Kharde Patil

    आज वाचुन पुर्ण झाले. मानवी मनाचा व त्याच्या भावनांचा अनके छटाच सोप्या शब्दात परंतु खुप गहिऱ्या अर्थात गुंफले आहेत. वि. स. खांडेकर ना सलाम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम 🙏

  • Rating Starसामना २१-२-२०२१

    कादंबरी लिखाण हा एक जगमान्य साहित्य प्रकार आहे. त्यासाठी सशक्त कथानक व जबरदस्त मांडणीची गरज असतेही. अशातच वि. स. खांडेकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली `ययाती` ही कादंबरी ६० वर्षांपासून वाचकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. याच कादंबरीला मराठ राजभाषेतील पहिला सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार (१९७६) मिळाला. या घटनेला २६ फेब्रुवारी रोजी ४५ वर्षे पूर्ण होत आहेत. मराठी साहित्यातील सुवर्णाक्षरांनी अलंकारित नाव म्हणजे विष्णू सखाराम उपाख्य वि. स. खांडेकर होय. त्यांनी लिहिलेली अजरामर कादंबरी `ययाती` ही आज ६० वर्षाची ज्येष्ठ श्रेष्ठ झाली असली तरी आजही या कादंबरीचा केशरी गोडवा टवटवीत आहे. बेस्ट सेलर, बेस्ट भाषा, वाचकप्रिय असलेल्या या कादंबरीला आजही विक्रमी मागणी आहे. अस्सल भाषा वाचकांना खिळवून ठेवण्याची अमोघ शैली, अजोड कथेचा सुगंधी दर्प खांडेकरांच्या साहित्यात असल्यामुळे ते वाचकप्रिय लेखक ठरले आहेत. म्हणूनच इतर मराठी लेखकांच्या तुलनेने खांडेकर हे वरचढ ठरतात. खांडेकरांच्या लेखन प्रवासात जे काही लिखाण झाले, त्यातील `अमृतवेल व ययाती` या दोन कादंबऱ्या खास वाचकप्रिय ठरल्या. लघुकथा, विनोदी लेखन, ललित निबंध, स्फुट लेखन, कविता, नाट्य व्यक्तिचित्रण अशा अनेक साहित्य प्रकारातून त्यांनी लिखाणाची चुणूक दाखवली. तेवढी त्यांच्यात प्रतिभा होतीही. म्हणूनच ते खऱ्या अर्थाने कादंबरी व कथालेखनात विशेषत्वाने रमलेले दिसतात. यात त्यांच्या १५ पेक्षा अधिक कादंबऱ्या तर २७ पेक्षा अधिक कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. झपाटून लिहिताना दर्जेदारपणा व संयमितता पाळून वाचकांसमोर आदर्शवाद ठेवण्यावर त्यांनी त्यांनी भर दिला हे विशेष होय. कुठलेही साहित्य हे ध्येयावर प्रेरित असते साहित्यातील लेखनाची प्रतिभा आणि तिची वास्तविकता यावरून साहित्य निर्मितीची बैठक कळते. सर्वोत्तम लिखाणामागची प्रेरणा काहीही असली तरी त्यातील वस्तुपाठ नाकारता येत नाही. या तत्वाप्रमाणे वाचकांसाठी आदर्शवादाचा वस्तुपाठ वाचकांसमोर ठेवण्याची किमया खांडेकर करू शकले. सन १९६० हे वर्ष साहित्य क्षेत्रासाठी नवप्रतिभेचे ठरले. याच वर्षात खांडेकरांची `ययाती` प्रकाशित झाली आणि तिने सर्वच विक्रम प्रस्थापित केले. या विक्रमाची घोडदौड आजच्या डिजिटल युगातही अबाधित आहे. कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर अवघ्या १६ व्या वर्षी म्हणजे २६ फेब्रूवारी १९७६ मध्ये या कादंबरीस मराठी भाषेसाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. आज या गौरवशाली परंपरेला ४५ वर्षे झाली आहेत. येत्या ५ वर्षात या गौरवाची ५० वर्षे होणार आहेत. यापूर्वी राष्ट्रीय पातळीवर असा सन्मान मराठी राजभाषेला मिळालेला नव्हता. ही उणीव `ययाती` ने भरून काढली. अभिमानाची बाब म्हणजे खांडेकरांनंतर मराठीतील तीन लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला. खांडेकरांनंतर ११ वर्षांनी प्रसिद्ध कवी तथा ज्यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणू साजरा केला जातो ते वि. व शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज याना १९८७ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने गपूरविण्यात आले. पुरस्कार मिळविणारे ते मराठीतील दुसरे लेखक ठरले. यानंतरच्या १६ वर्षांनी म्हणजे २००३ मध्ये कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. याचप्रमाणे १४ वर्षांनी म्हणजेच २०१४ मध्ये समीक्षक भालचंद्र नेमाडे याना ज्ञानपीठ पूरसाकर मिळाला. ते मराठीतील चौथे मानकरी ठरतात. असाच राष्ट्रीय पुरस्काराचा वारसा स्वाभिमानाने पुढेही चालू राहणार आहे. वाग्देवीची मूर्ती, मानचिन्ह, प्रमाणपत्र, लाखांपेक्षा अधिक रोख रक्कम अशा स्वरूपाचा हा सर्वोच्च साहित्य पुरस्कार राष्टपतींच्या हस्ते प्रदान करण्याची परंपरा आहे. १९७६ मध्ये प्रदान ज्ञानपीठ पुरस्काराच्या वेळी भारतीय ज्ञानपीठचे अध्यक्ष शांतिप्रसाद जैन, उमाशंकर जोशी यांच्या सहीचे भव्य प्रशस्तीपत्र स्वीकारताना खांडेकर यांच्यासोबत तमाम मराठी भाषकांचा उर भरून येणे स्वाभाविकच होते. महाभारतातील रंजक कथानक म्हणजे ययाती शुक्राचार्यांची मुलगी देवयानी व दासी शर्मिष्ठा. देवयानी जरी ययातिची पत्नी असली तरी तिचे प्रेम कचावर असते, तर ययातीचे शर्मिष्ठावर प्रेम जडते. अहंकारातून अग्निज्वाला प्रकटतात त्यातून वानवा पेटतो...जिवाची लाही लाही होते. महत्वकांक्षेतून देवयानी ययातीशी लग्न करते, पण यात तिच्या वाट्याला दुःख येते. शर्मिष्ठा या दोन नायिकांना समजावून सांगता सांगता कथेत ययाती सुखाच्या गाद्यांवर लोळत असला तरी अतृप्त राहतो याउलट कचाचा स्वभाव असतो. विचारशील संयमी जीवन जगणारा कच निरपेक्ष प्रेम करतो. शुक्राचार्यांसारखीच विद्या कचाने प्राप्त केली होती. कृत्रिम वार्ध्याक्य दूर करण्याची सिद्धीविद्या त्याने प्राप्त केली होती. याच सिद्धीनुसार कचाने शर्मिष्ठेचा पुरुचे यौवन त्यास पुन्हा परत मिळवून दिले होते . याच पुरूने वडिलांचे म्हणजे ययातीचे वार्ध्यक्य घेऊन आपले यौवन ययातीला दिले होते. आपला भाऊ यदूसाठी त्याने राजसिंहासन नाकारले होते, पण पुढे तोच महाराजा होतो. अशी ढोबळमानाने `ययाती` कादंबरीची रचना असली तरी मानवी जीवनातील अक्षांश-रेखांशाचा आलेख आहे.कादंबरीतील ययाती हा सम्राट महाराजा आजच्या सामान्य व्यक्तीचा प्रतिनिधी आहे अशी स्वतःच कबुली खांडेकर देतात. यासंदर्भात `ययाती` कादंबरीच्या शेवटी २५ पानांची विस्तृत पाःर्वभूमी देऊन खांडेकरांनी कादंबरी लिखाणामागची प्रेरणा कथानुभव, कथाविष्करण याबाबत स्पष्टीकरण केले आहे. आज ६१ वर्षांच्या या कादंबरीने वाचकांची मने जिंकून निस्सीम प्रेम केलेले आहे. डिजिटल युगातही हि कादंबरी पुनः पुन्हा वाचाविशी वाटते. *दोन पिढ्यांचा संस्कार* खांडेकरांच्या `ययाती` कादंबरीचे पहिले प्रकाशन रेडबुक अँड कंपनीतर्फे १९५९ मध्ये झाले होते. सध्या या कादंबरीचे हक्क पुण्यातील मेहता पब्लिशिंग हाऊसकडे आहेत. कादंबरीची आज तब्बल ४१ वी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. यासंदर्भांत मेहता पब्लिशिंग हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांच्याशी थेट संपर्क केल्यानंतर त्यांनी मराठी राजभाषेचा गौरव आणि खांडेकरांविषयी आपुलकी व्यक्त केली. प्रचंड खपाची ही कादंबरी ६० वर्षात दोन पिढ्यांमधील संस्कार आहे. वाचकांनी कादंबरीवर प्रचंड प्रेम केल्याचे सुनील मेहता यांनी अभिमानाने सांगितले. २०१३-१४, २०१६ मध्ये `ययाती` च्या तब्बल दोन छोट्या आवृत्या काढाव्या लागल्या. `ययाती` ची दरवर्षी १० हजार प्रतींची विक्री होत असली तरी आज प्रकाशित पुस्तकांच्या आवृत्या छोट्या झाल्या आहेत. आज ६ ते ८ हजार प्रतींची आवृत्ती निघत असल्याची खंतही मेहता व्यक्त करतात. मराठीत ललित लेखनाला मोठी परंपरा आहे. मराठीचा राष्ट्रीय पातळीवर जेवढा गौरव व्हायला पाहिजे तेवढा होत नाही. अशा परिस्थितीत ७० च्या दशकात खांडेकरांना `ज्ञानपीठ` रूपाने मराठी राजभाषेसाठी राष्ट्रीय नामांकन मिळाले ही अभिमानाची गोष्ट आहे.`ययाती` मधील कथानक विलक्षण आणि एकमेवाद्वितीय आहे. महाकथात्मक स्वरूपातील `ययाती` दर्जेदार कादंबरी आहे असे सांगत मेहता यांनी जात जात आज घडीला दर्जेदार नवसाहित्य निर्माण व्हायला पाहिजे असा आशावादही व्यक्त केला. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more