* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS NOVEL IS BASED ON THE EPIC MAHABHARATA BY MAHARISHI VYAS. ALL THE CHARACTERS IN THIS ARE DIVINE YET EACH REMEMBERS BEING HUMAN. THEY ALL HAVE THEIR FEET SET FIRMLY ON THIS SOIL. EACH ONE FACES LIFE DIFFERENTLY. EACH ONE STRUGGLES THROUGHOUT. EACH ONE HAS A DIFFERENT PERSONALITY. EACH ONE POSSESSES DIFFERENT INITIATIVES AND EACH ONE FACES DIFFERENT DESTINY. ALONG WITH THIS, WE SEE VARIOUS DIVINE MIRACLES, CURSES AND BLESSINGS. THIS STORY TAKES US TO LEVELS DIFFERENT THAN THAT OF A HUMAN. DR. S. L. BHAIRAPPA THE LEADING NOVELIST, THE PHILOSOPHER FROM KARNATAKA HAS TRIED TO GIVE A MEANING TO ALL THESE MARVELS, THESE CURSES AND BLESSINGS. HE REVEALS THE CHARACTERS HIDDEN BENEATH THEM. HE PICTURES THEM DIFFERENTLY IN THE LIGHT OF MODERN HUMAN SCIENCES, SOCIAL CONCEPTS GIVING THEM A NEW MEANING, PERSONALITY, MAKING THEM UNIQUE AND SENSATIONAL.
व्यासरचित महाभारतातील आभाळाएवढ्या उंचीची पात्रे; परंतु सगळ्यांचे पाय मातीचे. अवघी जीवनमूल्ये कसोटीला लावणारे समरप्रसंग. संघर्ष. प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व वेगळे. प्रत्येकाच्या प्रेरणा वेगळ्या. प्रत्येकाचे प्राक्तनही वेगळे. त्याचबरोबर अनेक चमत्कार; दैवी शाप; दैवी वर. मानवी पातळीपेक्षा वेगळ्या पातळीवर जाणारे कथानक. कर्नाटकमधील अग्रगण्य कादंबरीकार तत्त्वचिंतक डॉ. एस.एल. भैरप्पा यांनी या चमत्कारांच्या, शापांच्या आणि वरदानांच्या भरभक्कम पडद्याआड लपलेल्या माणसांचा शोध घेतला. आधुनिक मानववंशशास्त्रीय, समाजशास्त्रीय, संकल्पनांच्या प्रकाशझोतात महाभारतातल्या व्यक्तिरेखांच्या वर्तनाची संगती लावली. त्यामुळेच पर्व ही महाभारताची एक विलक्षण प्रत्ययकारी अनुभूती देणारी कलाकृती ठरली. तशीच खळबळजनकही. त्या महाकादंबरीचा हा रसपूर्ण मराठी अनुवाद. सहजसुंदर.
म.सा.प.-स.ह.मोडक पुरस्कार १९९२
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TADA #DR.S.L.BHYRAPPA #UMAKULKARNI #PARV #VANSHVRUKSHA #KAATH #AAVARAN #20JULY1931 #MANDRA #SAKSHI #UTTARKAND
Customer Reviews
  • Rating StarHrishikesh Vidar

    *पर्व* साधारण फेब्रुवारी - मार्च मध्ये मी रत्नाकर मतकरींची `ऍडम` ही कादंबरी वाचली होती. त्यानंतर मधले २ महिने कुठलेच नवीन पुस्तक वाचले नव्हते. काही दिवसांपूर्वी सहज चाळण्यासाठी `पर्व` हातात घेतली. डॉ.एस.एल. भैरप्पांनी लिहिलेली आणि उमा कुलकर्णींनी नुवाद केलेली ही मी वाचत असलेली पहिलीच कादंबरी. ८६७ पानांची ही कादंबरी `वाचून होईल की नाही` या साशंकतेसह वाचता वाचता ३ दिवसात संपली. मी कधीच कल्पना केली नव्हती अशी महाभारताची बाजू माझ्यासमोर `पर्व`मुळे आली. या कादंबरीचे मला सर्वात आवडलेले वैशिष्ट्य म्हणजे महाभारतातील सर्व पात्रे ही `माणसे` म्हणून आपल्या समोर येतात. कदाचित, त्यामुळेच कादंबरी जास्त जवळची वाटते. महाभारतातील कुंतीला मिळालेले मंत्र, भीष्माचे इच्छामरण, चिरंजीवत्वाची संकल्पना, शस्त्रास्त्रे इ. चमत्कृतीपूर्ण गोष्टींबद्दल प्रत्येकाला खूप कुतूहल असते. तसेच ते मलाही होते. पण ही कादंबरी वाचून मला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. या घटना अशाच घडल्या असतील किंवा नाही याबद्दल मला कल्पना नाही. परंतु अशा घडल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही हे नक्की. असे वाटण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे डॉ. भैरप्पांच्या लेखनातून समोर येणारे महाभारतकालीन भौगोलिक, सामाजिक, आर्थिक परिस्थितीविषयक संदर्भ. इसवी सन पूर्व बारावे शतक हा महाभारताचा काळ या कादंबरीत आहे. त्या काळात असणाऱ्या चालीरीती, राज्यांच्या सीमा, आचार-विचार, भौगोलिक रचना, नगररचना, सामाजिक उतरंड इथपासून ते अगदी प्रत्येक राज्यानुसार आहाराच्या सवयींमध्ये होणारा बदलही आपल्याला वाचायला मिळतो. इतका सूक्ष्म अभ्यास करून ही कादंबरी लिहिली असल्याने काही काळानंतर आपण खरा खुरा घडलेला इतिहास वाचत असल्याचे आपल्याला जाणवू लागते. मी वर उल्लेख केल्याप्रमाणे या कादंबरीतील सर्व पात्रे ही `माणसं` म्हणून वापरतात. म्हणूनच त्यांच्या पराक्रमाला, बुद्धीचातुर्याला, सहनशीलतेला, वयोमानाला मर्यादा जाणवतात. त्यामुळे महाभारताच्या या आवृत्तीचा कोणीच नायक नाही. बहुतेकांना खरं वाटणार नाही पण या कादंबरीत `देव` अशा कोणत्याही गोष्टीचा उल्लेख नाही. तसेच श्रीकृष्ण हा दैवी अवतार म्हणून नव्हे तर यादवांचा राजा म्हणून आपल्याला वावरताना दिसतो. हे पुस्तक वाचताना मला नरहर कुरुंदकरांच्या एका वाक्याची राहून राहून आठवण झाली. ते वाक्य काहीसं या अर्थाचं होतं की, `इतिहासातील पात्रांचे एकदा दैवतीकरण झाले की त्या काळाचा अभ्यास करणे शक्य होत नाही. कारण, इतिहासाचा अभ्यास हा त्या काळातील सर्व बऱ्या-वाईट गोष्टींचा अभ्यास असतो. ऐतिहासिक पात्रांना एकदा देव केले की असा अभ्यास करणे शक्य होत नाही.` भैरप्पांनी महाभारताची केलेली ही मांडणी यामुळेच तो काळ डोळ्यांसमोर उभा करून जाते. वाचताना प्रत्येक व्यक्तिरेखेचा भैरप्पांनी केलेला सखोल अभ्यास आपल्याला सहज दिसून येतो. भीष्म, द्रोण, कृष्णद्वैपायन, धृतराष्ट्र, युधिष्ठिर, भीम, दुर्योधन, कर्ण, कुंती, द्रौपदी अशा सर्व पात्रांची स्वभाव वैशिष्ट्ये भैरप्पांनी जबरदस्त रंगवली आहेत. त्यांवर वयोमान, गर्व, हट्ट, धर्म-अधर्माच्या तत्कालीन संकल्पना, मानापमानाचे अनुभव, लहानपणापासून मिळत आलेली वागणूक इ. सर्व गोष्टींचा प्रभाव जाणवतो. उमा कुलकर्णींनी या कादंबरीचा मराठीत अनुवाद करताना या सर्व गोष्टी विचारात घेतल्याचे दिसून येते. मराठीतच लिहिलेली कादंबरी वाटावी इतक्या सहजसुंदर भाषेत त्यांनी हा अनुवाद केला आहे. तसं पाहायला गेलं तर महाभारत ही खूप जुन्या काळापासून चालत आलेली गोष्ट आहे. मूळ कथेत काळानुरूप अनेक बदल होत गेले आहेत. स्थळ, काळानुसार त्यात फरकही जाणवतो. त्यामुळे महाभारताची कोणतीच आवृत्ती १००% सत्य आहे हे आपण सांगू शकत नाही. तरीही, मी महाभारतावर आजवर वाचलेल्या कादंबऱ्यांपैकी `पर्व` सर्वात वेगळा दृष्टिकोन देणारी आणि `ही बाजुदेखील असू शकते` हे सांगणारी ठरली आहे. - हृषिकेश विदार ...Read more

  • Rating StarMahendra Pangarkar

    `लॉकडाऊन`च्या कृपेने, `पर्व` ही जवळपास आठशे पानी कादंबरी सलग वाचण्याचा योग आला. या अनोख्या, गृहितांना धक्के देणाऱ्या, कादंबरीबद्दल.. `पर्व - एक वास्तववादी महाभारत` `महाभारत` या महाकाव्यास आत्तापर्यंत अनेक लेखकांनी आपापल्या परीने न्याय द्यायचा ्रयत्न केलाय. `अमर चित्र कथा` ते `मृत्युंजय` पर्यंत, महाभारत व त्यातील पात्रे अनेक वेळा आपल्याला भेटत आली आहेत. परंतु लेखक, तत्त्वचिंतक डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी `पर्व` मधून मांडलेलं `महाभारत` म्हणजे एकामाद्वितीय. याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यात कोणताही चमत्कार किंवा कोणत्याही पात्राचे दैवतीकरण नाही. सारं काही आहे ते मानवीय पातळीवर. बरं त्यांनी हे मनाला येईल तसं कल्पनारम्य लिहिलंय असंही काही नाही बरं. मी तर म्हणेन यापूर्वी कुणीही कधी महाभारत एवढं अभ्यासपूर्ण लिहिलेलं नसावं. चौदा वर्षे अभ्यास करून, महाभारतातील प्रत्येक स्थळांना भेटी देऊन, तिथल्या बारीकसारीक तपशिलांचा अभ्यास करून, महाभारतावर संशोधन करणाऱ्या अभ्यासकांशी चर्चा करून, त्यांनी हे महाभारत लिहिलंय. म्हणूनच हे महाभारत वाचल्यानंतर, आत्तापर्यंत महाभारतावर वाचलेल्या कादंबऱ्या आपल्याला बाल वाङ्मय न वाटल्या तर नवलच! यात महाभारताची कथा आहे, पण त्यात नाहीत कोणतेही चमत्कार, नाहीत कुणी देव वा नाहीत कुणी दानव.आहेत ते तुमच्या आमच्यासारखे हाडामासाचे माणसं, राजे, योद्धे इ. इ., प्रेम, राग, लोभ, मोह, मत्सर, मैथुन इ साऱ्या मानवीय गुण अवगुणासह. यातील `कृष्ण` कोणी देव नसून एक राजा आहे, जो चतुर आहे, बोलण्यात वाकबगार आहे, सगळ्या आर्यवर्ताची, आजूबाजूची माहिती ठेवणारा, पांडवांचा सखा आहे. इतकेच नव्हे तर `राक्षस` हे सुद्धा कोणी मायावी शक्ती असलेली दृष्ट प्रवृत्ती नसून ते जंगलात राहणारी, शरीराने धष्टपुष्ट, कच्चे मांस खाणारी, काहीशीे अप्रगत (तेंव्हाच्या इतरांच्या तुलनेत) असलेली जमात आहे. या महाभारताचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे महाभारतातील पात्रांचे तरल मनोविश्लेषण. यावितिरिक्त यात आहेत त्यावेळच्या भौगोलिक परिस्थितीचे अभ्यासपूर्ण वर्णन (त्यावेळच्या नकाशा सहित!) म्हणजे त्यावेळचे विविध राज्ये, त्याच्या सीमा, लगतचे प्रदेश, रस्ते, परिसर इत्यादी सारं तपशीलवार दिलेलं आहे. याबरोबरच त्यावेळची संस्कृती, चालीरीती, रूढी, आहार विहार, युद्धाची पद्धत, धार्मिक आचरण, आर्यांमधील पोटजाती, आर्येतर समाज, समाजांतील परस्पर विवाह आणि लैगिक संबंध, तत्कालीन अरण्य व कृषिभूमीचा तपशील याचीही जोड आहे. या साऱ्या गोष्टी कथेचाच एक भाग बनून येतात, त्यामुळे कथेची विश्वासार्हता नक्कीच वाढते. इथं आपण महाभारतातील आत्तापर्यंत वाचत आलेल्या प्रत्येक दैवी चमत्काराऐवजी तर्कसंगत, अभ्यासपूर्ण पर्याय दिलेले आहेत. उदाहरणार्थ, यात संजयला कोणतीही दिव्यदृष्टी नाही तर तो हस्तिनापूरहुन घोड्यावरन युद्धाच्या ठिकाणी जातो, व हालहवाला बघून धृतराष्ट्राला सांगायला येतो. यात हस्तिनापूरहून युद्धभूमीचं अंतर, तो निघून पोहचणे यासाठी लागणारी वेळ, तोपर्यंत धृतराष्टाची होणारी तगमग हे सारं इतकं अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडलं आहे की `दिव्यदृष्टी` आपल्याला विनोद वाटू लागते. आणि असे तर्कनिष्ठतेचे अधिष्ठान असल्यामुळेच द्रौपदीचे पांडवांशी नातेसंबंध, कुंतीची पुत्रप्राप्ती ह्या व इतर अनेक गोष्टी सरळ, परखडपणे, कोणताही आड पडदा न ठेवता, स्पष्टपणे मांडण्याची हिम्मत ते करतात. पुस्तक वाचायला घेतल्यावर, पुस्तकाची जातकुळी आपल्याला सुरवातीलाच लक्षात येते व मग पुढील कथेत आपण आत्तापर्यंत ऐलेल्या चमत्काराऐवजी कक्की के घडलं असेल, त्याचं कोणतं लॉजिक असेल, ती घटना म्हणजे नक्की काय असेल ही उत्सुकता पानागणिक वाढत जाते आणि ही जवळपास 800 पानी कादंबरी कधी हातावेगळी होती ते कळतसुद्धा नाही. `पर्व` मध्ये महाभारतातील `त्या` महायुद्धाचे अगदी तपशीलवार वर्णन तर आहेच, याशिवाय हे युद्ध सुरू होण्याआधी दोन्ही बाजुंनी केलेली सैन्याची जमवाजमव, त्यासाठी दूर दूर वेगवेगळ्या राज्यांत जाऊन, दूत पाठवून, आपली बाजू भक्कम करण्याचा केलेला प्रयत्न, यध्यमागची मानसिकता, नीतिशास्त्र, हे सारं तपशीलवार दिलंय. युद्धभूमी, त्यातील सहभागी सैन्य, त्यांची मनस्थिती, त्यांची व्यवस्था, युद्धभूमीवर जाणवणाऱ्या समस्या, दिवसागणिक बदलत जाणारी युद्धभूमी, युद्धान्तरची विदारक परिस्थिती, इत्यादी सारं बारीकसारीक तपशिलासह दिलंय. म्हणूनच आपण वाचताना फक्त वाचक न राहता प्रत्यक्ष युद्धभूमी अनुभवतो... आपणही सामील होतो युद्धाच्या तयारीत, आपणही अनुभतो तो संहार, अनुभवतो ती योध्यांमधली अपरिहार्यता... आपलेही पावले अडखळतात त्या पडलेल्या प्रेतांच्या खचामध्ये... ...आणि म्हणूनच हे महाभारत वाचून संपले तरी आपल्याला त्या काळातून, त्या मनस्थितीतून बाहेर यायला काही काळ जातो. - महेंद्र पांगारकर ...Read more

  • Rating StarVijay ingole

    फारच छान आणि उत्कृष्ट कादंबरी आहे

  • Rating StarVijay Saravate

    #पर्व लेखक - डॉ. एस. एल. #भैरप्पा अनुवाद : उमा कुलकर्णी व्यास लिखित महाभारत म्हणजे एक अद्भुत महाकाव्य, जे काही हजार वर्षांपूर्वी लिहून ठेवलं. नंतरच्या कालखंडात त्यात आणखीही काही श्लोकांची भर पडली. या महाकाव्यातली पात्रं इतकी भव्य नि भारदस्त कि अदी देवत्वाला पोहोचलेली. हल्ली तर त्यातील केवळ एकाद-दुसऱ्या पात्रावरही महान महान लेखकांनी ग्रंथनिर्मिती केली. तर या उदात्त आणि देवत्वाला पोहोचलेल्या पात्रांना पुन्हा साधारण माणसं भैरप्पांनी पर्व मध्ये केली. हे करताना त्यांनी शाप - वरदान वगैरे गोष्टींना फाटा मारला. त्यामुळं त्यातून त्याकाळचा समाज, समाजव्यवस्था, त्यांची नीतिमूल्ये वगैरे गोष्ठीवर चांगला प्रकाश पडतो. इतिहासाचार्य वि. का. #राजवाडे (#भारतीय #विवाहसंस्थेचा इतिहास) यांची विचारधारा पर्व मध्ये भैरप्पांनी अधोरेखित केली आहे. वानगीदाखल काही उदाहरणे द्यायची झाली तर पांडव जन्म, पंडूचा शाप, भीष्माचं शरपंजरी मरण वगैरे वगैरे. आता इथं गंमत अशी आहे की कालानुरूप सामाजिक व्यवस्था, नीतिमूल्ये बदलत गेली त्यामुळे पूर्वीच्या काही चालीरीती नंतरच्या पिढयांना कालबाह्य व नीतिभ्रष्ठ वाटू लागली, परिणाम व्यासांना ते काहीतरी मखलाशी करून लपवावंस वाटलं असावं. त्यातूनच कदाचित स्त्री-पुरुष संभोगाशिवाय मुलं जन्माला घालण्याची कथा दैवी गोष्ट मध्ये टाकून लपवून टाकली (पांडव जन्म कथा). दम ऋषी मृगीसोबत संग करताना पंडू राजाकडून मारला गेला आणि त्याने पंडुला शापदग्ध केलं, इथं हे लोक पशुसोबतही मैथुन करीत असं न लिहिता व्यासांनी ते रूप पालटून कामक्रीडा करीत होते असं लिहिलं अथवा पंडू राजाच्या सहमतीने कुंतीला ३ परपुरुषांपासून (विवाहापूर्वीचा पकडून ४) आणि माद्रीला २ परपुरुषांपासून पुत्रप्राप्ती झाली. हि काही शे वर्षांपूर्वीची उघडीनागडी कथा व्यासांना धर्म - नीतीला गौण आणणारी वाटली त्यामुळे त्यांनी हि पुत्रप्राप्ती देवांकडून झाली असे लिहिले. पण केवळ असे प्रथम व्यासांनीच केले असे वाटत नाही. कुमारी मेरीला कोना परपुरुषापासून ख्रिस्त झाला, पण यालाही यहुद्यांनी दडवून त्यालाही देवपुत्र केले. कारण, व्यास आणि हे ख्रिस्ती पंडित यांना हे धर्मबाह्य वर्तन वाटलं म्हणून त्यांचा हा आटापिटा. अतिशय उत्तम आहे, किमान एकदा तरी वाचलेच पाहिजे असे पुस्तक. विजय सरवते १०-११-२०२० ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
लोकमत २५.९.२०२३

शब्बीर रोमानी हे व्यवसायाने वकील. मातृभाषा अर्थात उर्दू आणि शिक्षण मराठी माध्यमातून झालेले. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या उर्दू पुस्तकाला, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या साहित्य अकादमी केंद्राचे पुरस्कार लाभले आहेत. आता मिर्झागालिबवरचे नवे पुस्तक, `मी गालिब बोलतोय...!` लक्ष वेधून घेत आहे. गालिबच्या एका शेरची पहिली ओळ घेऊन सांगायचे झाल्यास, जिक्र गालिबचा आणि खूबसूरत बयान लेखकाचे असे या पुरस्काराबद्दल म्हणता येईल. मिर्जा असदुल्ला खां,`गालिब` या श्रेष्ठ शायरची शायरी, त्याचे पत्रलेखन, चरित्र यावर आजवर शेकडो पुस्तक प्रसिद्ध आहेत. लेखकाने प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार गालिबवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. मराठी, हिंदी-उर्दू लेखकांची ते तपशील पाहून आचंबा वाटतो. शिवाय शब्बीर रोमानी यांनी इथे आपल्या लेखनाचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे, कि गालिबबद्दल अनेक उलट-सुलट प्रकारच्या कहाण्या, विनोद, (कसलेही शेर गालिबच्या नावाने सांगत राहणे) प्रचलित आहेत; त्यामुळे गालिबची कथा, त्याच्या पत्रांमधल्या मनोरंजक गप्पा-गोष्टी आणि त्याच्याशी निगडित आठवणी हे सगळं साध्या सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातल्या सर्व भावछटा गालिबच्या काव्यातून दिसत असतात. पुस्तक वाचताना गालिबची प्रकृती, त्याची विनोद बुद्धी, संवेदनशील वृत्ती हे आपल्याला जाणवत राहते, आणि लेखकाची तळमळसुद्धा. या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे, मोठी प्रकरण टाळून किस्से सांगावेत अशी रचना. शिवाय लेखकाची साधी-सरळ भाषा, यामुळे शायरीची आणि गालिबबद्दलची सर्वसाधारण माहिती आणि कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हे पुस्तक रंजक वाटेल. सहसा गालिबचे गाजलेले शेर, किस्से हे आपल्या वाचनात असतात. या पुस्तकात गालिबचे अनेक दुर्मिळ शेर, शिवाय फारसी रचनाही या पुस्तकात समाविष्ट असल्याने त्याला एक संदर्भ ग्रंथाचेही स्वरूप आलेले आहे. गालिबला आंबे फार आवडायचे, `मिर्झा गालिब` या गाजलेल्या चित्रपटातला तो प्रसंग आजही लक्षात आहे. आंबे खाताना एक मित्र गालिबला तुच्छतेने म्हणतो, `आम तो गधेभी नही खाते!` त्यावर गालिबने त्वरित उत्तर देतो. `सिर्फ गधेही नाही खाते!` शब्बीर रोमानी यांनी हा प्रसंग व विनोद म्हणून सांगितला नाही, तर त्याचे तपशिलाने वर्णन तर केलेच शिवाय आंब्यावरची गालिबची मोठी गजल त्यांनी दिलेली असल्याने त्या किश्श्याला एक गांभीर्य आलेले आहे. असाच एक किस्सा, ते कलकत्त्याला असताना साध्या चिकणी-सुपारीवर गालिबला कुणी छेडले होते, यावर तुमची शायरी होऊन जाऊ द्या! असे आवाहन केले. या सुपारीच्या दिसण्या-असण्यावरच्या अफलातून शायरीची भली मोठी झलकच गालिबने पेश केली! गालिबच्या एक महत्वाचा शेर आहे. जिक्र ऊस परी-वंश का और फार बयां अपना बन गया रिकीब आखिर, था जो राजदां अपना त्या परिच्या सौंदर्याचे वर्णन आणि तेही माझ्या भाषेतून, माझ्याकडून ऐकले आणि माझा जवळचा असा मित्र आता या प्रेमाच्या नात्यात माझा प्रतिस्पर्धी झाला (आता तो तिच्यावर प्रेम करायला लागला) कलकत्त्याला गालिब दीडेएक वर्ष राहिला होता. तिथल्या धनिकांनी मुशायरे, मुजरे आयोजित केलेले असायचे, गालिबचा तिथे सन्मानही व्हायचा. गालिबने या बद्दल फार जिव्हाळ्याने लिहिले आहे. या मुशायऱ्यामध्ये गालिबचे फारसीचे काव्यवाचन ऐकून फारसी भाषेचे तज्ञ त्याच्यावर नाराज झाल्याची आठवण आहे! गालिबच्या तोंडून फारसीचे कौतुक ऐकून लोकांनी आक्षेप घेतला! गालिब हा आपल्या दुःख, विवंचनेवर हसणारा अद्भुत असा कलावंत होता. हा शेर वाचल्यावर आपल्याला मुन्शी प्रेमचंद यांच्या `पूस कि रात` मधला हलकू आठवतो! मिर्झा गालिबच्या कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हा संग्रह आवडण्यासारखाच आहे. लेखनातल्या भाषिक काही त्रुटी वगळल्यास, गालिबचे किस्से, त्याची शायरी हे सगळे रोचक आहे. ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more