* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS NOVEL IS BASED ON THE EPIC MAHABHARATA BY MAHARISHI VYAS. ALL THE CHARACTERS IN THIS ARE DIVINE YET EACH REMEMBERS BEING HUMAN. THEY ALL HAVE THEIR FEET SET FIRMLY ON THIS SOIL. EACH ONE FACES LIFE DIFFERENTLY. EACH ONE STRUGGLES THROUGHOUT. EACH ONE HAS A DIFFERENT PERSONALITY. EACH ONE POSSESSES DIFFERENT INITIATIVES AND EACH ONE FACES DIFFERENT DESTINY. ALONG WITH THIS, WE SEE VARIOUS DIVINE MIRACLES, CURSES AND BLESSINGS. THIS STORY TAKES US TO LEVELS DIFFERENT THAN THAT OF A HUMAN. DR. S. L. BHAIRAPPA THE LEADING NOVELIST, THE PHILOSOPHER FROM KARNATAKA HAS TRIED TO GIVE A MEANING TO ALL THESE MARVELS, THESE CURSES AND BLESSINGS. HE REVEALS THE CHARACTERS HIDDEN BENEATH THEM. HE PICTURES THEM DIFFERENTLY IN THE LIGHT OF MODERN HUMAN SCIENCES, SOCIAL CONCEPTS GIVING THEM A NEW MEANING, PERSONALITY, MAKING THEM UNIQUE AND SENSATIONAL.
व्यासरचित महाभारतातील आभाळाएवढ्या उंचीची पात्रे; परंतु सगळ्यांचे पाय मातीचे. अवघी जीवनमूल्ये कसोटीला लावणारे समरप्रसंग. संघर्ष. प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व वेगळे. प्रत्येकाच्या प्रेरणा वेगळ्या. प्रत्येकाचे प्राक्तनही वेगळे. त्याचबरोबर अनेक चमत्कार; दैवी शाप; दैवी वर. मानवी पातळीपेक्षा वेगळ्या पातळीवर जाणारे कथानक. कर्नाटकमधील अग्रगण्य कादंबरीकार तत्त्वचिंतक डॉ. एस.एल. भैरप्पा यांनी या चमत्कारांच्या, शापांच्या आणि वरदानांच्या भरभक्कम पडद्याआड लपलेल्या माणसांचा शोध घेतला. आधुनिक मानववंशशास्त्रीय, समाजशास्त्रीय, संकल्पनांच्या प्रकाशझोतात महाभारतातल्या व्यक्तिरेखांच्या वर्तनाची संगती लावली. त्यामुळेच पर्व ही महाभारताची एक विलक्षण प्रत्ययकारी अनुभूती देणारी कलाकृती ठरली. तशीच खळबळजनकही. त्या महाकादंबरीचा हा रसपूर्ण मराठी अनुवाद. सहजसुंदर.
म.सा.प.-स.ह.मोडक पुरस्कार १९९२
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TADA #DR.S.L.BHYRAPPA #UMAKULKARNI #PARV #VANSHVRUKSHA #KAATH #AAVARAN #20JULY1931 #MANDRA #SAKSHI #UTTARKAND
Customer Reviews
  • Rating StarHrishikesh Vidar

    *पर्व* साधारण फेब्रुवारी - मार्च मध्ये मी रत्नाकर मतकरींची `ऍडम` ही कादंबरी वाचली होती. त्यानंतर मधले २ महिने कुठलेच नवीन पुस्तक वाचले नव्हते. काही दिवसांपूर्वी सहज चाळण्यासाठी `पर्व` हातात घेतली. डॉ.एस.एल. भैरप्पांनी लिहिलेली आणि उमा कुलकर्णींनी नुवाद केलेली ही मी वाचत असलेली पहिलीच कादंबरी. ८६७ पानांची ही कादंबरी `वाचून होईल की नाही` या साशंकतेसह वाचता वाचता ३ दिवसात संपली. मी कधीच कल्पना केली नव्हती अशी महाभारताची बाजू माझ्यासमोर `पर्व`मुळे आली. या कादंबरीचे मला सर्वात आवडलेले वैशिष्ट्य म्हणजे महाभारतातील सर्व पात्रे ही `माणसे` म्हणून आपल्या समोर येतात. कदाचित, त्यामुळेच कादंबरी जास्त जवळची वाटते. महाभारतातील कुंतीला मिळालेले मंत्र, भीष्माचे इच्छामरण, चिरंजीवत्वाची संकल्पना, शस्त्रास्त्रे इ. चमत्कृतीपूर्ण गोष्टींबद्दल प्रत्येकाला खूप कुतूहल असते. तसेच ते मलाही होते. पण ही कादंबरी वाचून मला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. या घटना अशाच घडल्या असतील किंवा नाही याबद्दल मला कल्पना नाही. परंतु अशा घडल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही हे नक्की. असे वाटण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे डॉ. भैरप्पांच्या लेखनातून समोर येणारे महाभारतकालीन भौगोलिक, सामाजिक, आर्थिक परिस्थितीविषयक संदर्भ. इसवी सन पूर्व बारावे शतक हा महाभारताचा काळ या कादंबरीत आहे. त्या काळात असणाऱ्या चालीरीती, राज्यांच्या सीमा, आचार-विचार, भौगोलिक रचना, नगररचना, सामाजिक उतरंड इथपासून ते अगदी प्रत्येक राज्यानुसार आहाराच्या सवयींमध्ये होणारा बदलही आपल्याला वाचायला मिळतो. इतका सूक्ष्म अभ्यास करून ही कादंबरी लिहिली असल्याने काही काळानंतर आपण खरा खुरा घडलेला इतिहास वाचत असल्याचे आपल्याला जाणवू लागते. मी वर उल्लेख केल्याप्रमाणे या कादंबरीतील सर्व पात्रे ही `माणसं` म्हणून वापरतात. म्हणूनच त्यांच्या पराक्रमाला, बुद्धीचातुर्याला, सहनशीलतेला, वयोमानाला मर्यादा जाणवतात. त्यामुळे महाभारताच्या या आवृत्तीचा कोणीच नायक नाही. बहुतेकांना खरं वाटणार नाही पण या कादंबरीत `देव` अशा कोणत्याही गोष्टीचा उल्लेख नाही. तसेच श्रीकृष्ण हा दैवी अवतार म्हणून नव्हे तर यादवांचा राजा म्हणून आपल्याला वावरताना दिसतो. हे पुस्तक वाचताना मला नरहर कुरुंदकरांच्या एका वाक्याची राहून राहून आठवण झाली. ते वाक्य काहीसं या अर्थाचं होतं की, `इतिहासातील पात्रांचे एकदा दैवतीकरण झाले की त्या काळाचा अभ्यास करणे शक्य होत नाही. कारण, इतिहासाचा अभ्यास हा त्या काळातील सर्व बऱ्या-वाईट गोष्टींचा अभ्यास असतो. ऐतिहासिक पात्रांना एकदा देव केले की असा अभ्यास करणे शक्य होत नाही.` भैरप्पांनी महाभारताची केलेली ही मांडणी यामुळेच तो काळ डोळ्यांसमोर उभा करून जाते. वाचताना प्रत्येक व्यक्तिरेखेचा भैरप्पांनी केलेला सखोल अभ्यास आपल्याला सहज दिसून येतो. भीष्म, द्रोण, कृष्णद्वैपायन, धृतराष्ट्र, युधिष्ठिर, भीम, दुर्योधन, कर्ण, कुंती, द्रौपदी अशा सर्व पात्रांची स्वभाव वैशिष्ट्ये भैरप्पांनी जबरदस्त रंगवली आहेत. त्यांवर वयोमान, गर्व, हट्ट, धर्म-अधर्माच्या तत्कालीन संकल्पना, मानापमानाचे अनुभव, लहानपणापासून मिळत आलेली वागणूक इ. सर्व गोष्टींचा प्रभाव जाणवतो. उमा कुलकर्णींनी या कादंबरीचा मराठीत अनुवाद करताना या सर्व गोष्टी विचारात घेतल्याचे दिसून येते. मराठीतच लिहिलेली कादंबरी वाटावी इतक्या सहजसुंदर भाषेत त्यांनी हा अनुवाद केला आहे. तसं पाहायला गेलं तर महाभारत ही खूप जुन्या काळापासून चालत आलेली गोष्ट आहे. मूळ कथेत काळानुरूप अनेक बदल होत गेले आहेत. स्थळ, काळानुसार त्यात फरकही जाणवतो. त्यामुळे महाभारताची कोणतीच आवृत्ती १००% सत्य आहे हे आपण सांगू शकत नाही. तरीही, मी महाभारतावर आजवर वाचलेल्या कादंबऱ्यांपैकी `पर्व` सर्वात वेगळा दृष्टिकोन देणारी आणि `ही बाजुदेखील असू शकते` हे सांगणारी ठरली आहे. - हृषिकेश विदार ...Read more

  • Rating StarMahendra Pangarkar

    `लॉकडाऊन`च्या कृपेने, `पर्व` ही जवळपास आठशे पानी कादंबरी सलग वाचण्याचा योग आला. या अनोख्या, गृहितांना धक्के देणाऱ्या, कादंबरीबद्दल.. `पर्व - एक वास्तववादी महाभारत` `महाभारत` या महाकाव्यास आत्तापर्यंत अनेक लेखकांनी आपापल्या परीने न्याय द्यायचा ्रयत्न केलाय. `अमर चित्र कथा` ते `मृत्युंजय` पर्यंत, महाभारत व त्यातील पात्रे अनेक वेळा आपल्याला भेटत आली आहेत. परंतु लेखक, तत्त्वचिंतक डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी `पर्व` मधून मांडलेलं `महाभारत` म्हणजे एकामाद्वितीय. याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यात कोणताही चमत्कार किंवा कोणत्याही पात्राचे दैवतीकरण नाही. सारं काही आहे ते मानवीय पातळीवर. बरं त्यांनी हे मनाला येईल तसं कल्पनारम्य लिहिलंय असंही काही नाही बरं. मी तर म्हणेन यापूर्वी कुणीही कधी महाभारत एवढं अभ्यासपूर्ण लिहिलेलं नसावं. चौदा वर्षे अभ्यास करून, महाभारतातील प्रत्येक स्थळांना भेटी देऊन, तिथल्या बारीकसारीक तपशिलांचा अभ्यास करून, महाभारतावर संशोधन करणाऱ्या अभ्यासकांशी चर्चा करून, त्यांनी हे महाभारत लिहिलंय. म्हणूनच हे महाभारत वाचल्यानंतर, आत्तापर्यंत महाभारतावर वाचलेल्या कादंबऱ्या आपल्याला बाल वाङ्मय न वाटल्या तर नवलच! यात महाभारताची कथा आहे, पण त्यात नाहीत कोणतेही चमत्कार, नाहीत कुणी देव वा नाहीत कुणी दानव.आहेत ते तुमच्या आमच्यासारखे हाडामासाचे माणसं, राजे, योद्धे इ. इ., प्रेम, राग, लोभ, मोह, मत्सर, मैथुन इ साऱ्या मानवीय गुण अवगुणासह. यातील `कृष्ण` कोणी देव नसून एक राजा आहे, जो चतुर आहे, बोलण्यात वाकबगार आहे, सगळ्या आर्यवर्ताची, आजूबाजूची माहिती ठेवणारा, पांडवांचा सखा आहे. इतकेच नव्हे तर `राक्षस` हे सुद्धा कोणी मायावी शक्ती असलेली दृष्ट प्रवृत्ती नसून ते जंगलात राहणारी, शरीराने धष्टपुष्ट, कच्चे मांस खाणारी, काहीशीे अप्रगत (तेंव्हाच्या इतरांच्या तुलनेत) असलेली जमात आहे. या महाभारताचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे महाभारतातील पात्रांचे तरल मनोविश्लेषण. यावितिरिक्त यात आहेत त्यावेळच्या भौगोलिक परिस्थितीचे अभ्यासपूर्ण वर्णन (त्यावेळच्या नकाशा सहित!) म्हणजे त्यावेळचे विविध राज्ये, त्याच्या सीमा, लगतचे प्रदेश, रस्ते, परिसर इत्यादी सारं तपशीलवार दिलेलं आहे. याबरोबरच त्यावेळची संस्कृती, चालीरीती, रूढी, आहार विहार, युद्धाची पद्धत, धार्मिक आचरण, आर्यांमधील पोटजाती, आर्येतर समाज, समाजांतील परस्पर विवाह आणि लैगिक संबंध, तत्कालीन अरण्य व कृषिभूमीचा तपशील याचीही जोड आहे. या साऱ्या गोष्टी कथेचाच एक भाग बनून येतात, त्यामुळे कथेची विश्वासार्हता नक्कीच वाढते. इथं आपण महाभारतातील आत्तापर्यंत वाचत आलेल्या प्रत्येक दैवी चमत्काराऐवजी तर्कसंगत, अभ्यासपूर्ण पर्याय दिलेले आहेत. उदाहरणार्थ, यात संजयला कोणतीही दिव्यदृष्टी नाही तर तो हस्तिनापूरहुन घोड्यावरन युद्धाच्या ठिकाणी जातो, व हालहवाला बघून धृतराष्ट्राला सांगायला येतो. यात हस्तिनापूरहून युद्धभूमीचं अंतर, तो निघून पोहचणे यासाठी लागणारी वेळ, तोपर्यंत धृतराष्टाची होणारी तगमग हे सारं इतकं अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडलं आहे की `दिव्यदृष्टी` आपल्याला विनोद वाटू लागते. आणि असे तर्कनिष्ठतेचे अधिष्ठान असल्यामुळेच द्रौपदीचे पांडवांशी नातेसंबंध, कुंतीची पुत्रप्राप्ती ह्या व इतर अनेक गोष्टी सरळ, परखडपणे, कोणताही आड पडदा न ठेवता, स्पष्टपणे मांडण्याची हिम्मत ते करतात. पुस्तक वाचायला घेतल्यावर, पुस्तकाची जातकुळी आपल्याला सुरवातीलाच लक्षात येते व मग पुढील कथेत आपण आत्तापर्यंत ऐलेल्या चमत्काराऐवजी कक्की के घडलं असेल, त्याचं कोणतं लॉजिक असेल, ती घटना म्हणजे नक्की काय असेल ही उत्सुकता पानागणिक वाढत जाते आणि ही जवळपास 800 पानी कादंबरी कधी हातावेगळी होती ते कळतसुद्धा नाही. `पर्व` मध्ये महाभारतातील `त्या` महायुद्धाचे अगदी तपशीलवार वर्णन तर आहेच, याशिवाय हे युद्ध सुरू होण्याआधी दोन्ही बाजुंनी केलेली सैन्याची जमवाजमव, त्यासाठी दूर दूर वेगवेगळ्या राज्यांत जाऊन, दूत पाठवून, आपली बाजू भक्कम करण्याचा केलेला प्रयत्न, यध्यमागची मानसिकता, नीतिशास्त्र, हे सारं तपशीलवार दिलंय. युद्धभूमी, त्यातील सहभागी सैन्य, त्यांची मनस्थिती, त्यांची व्यवस्था, युद्धभूमीवर जाणवणाऱ्या समस्या, दिवसागणिक बदलत जाणारी युद्धभूमी, युद्धान्तरची विदारक परिस्थिती, इत्यादी सारं बारीकसारीक तपशिलासह दिलंय. म्हणूनच आपण वाचताना फक्त वाचक न राहता प्रत्यक्ष युद्धभूमी अनुभवतो... आपणही सामील होतो युद्धाच्या तयारीत, आपणही अनुभतो तो संहार, अनुभवतो ती योध्यांमधली अपरिहार्यता... आपलेही पावले अडखळतात त्या पडलेल्या प्रेतांच्या खचामध्ये... ...आणि म्हणूनच हे महाभारत वाचून संपले तरी आपल्याला त्या काळातून, त्या मनस्थितीतून बाहेर यायला काही काळ जातो. - महेंद्र पांगारकर ...Read more

  • Rating StarVijay ingole

    फारच छान आणि उत्कृष्ट कादंबरी आहे

  • Rating StarVijay Saravate

    #पर्व लेखक - डॉ. एस. एल. #भैरप्पा अनुवाद : उमा कुलकर्णी व्यास लिखित महाभारत म्हणजे एक अद्भुत महाकाव्य, जे काही हजार वर्षांपूर्वी लिहून ठेवलं. नंतरच्या कालखंडात त्यात आणखीही काही श्लोकांची भर पडली. या महाकाव्यातली पात्रं इतकी भव्य नि भारदस्त कि अदी देवत्वाला पोहोचलेली. हल्ली तर त्यातील केवळ एकाद-दुसऱ्या पात्रावरही महान महान लेखकांनी ग्रंथनिर्मिती केली. तर या उदात्त आणि देवत्वाला पोहोचलेल्या पात्रांना पुन्हा साधारण माणसं भैरप्पांनी पर्व मध्ये केली. हे करताना त्यांनी शाप - वरदान वगैरे गोष्टींना फाटा मारला. त्यामुळं त्यातून त्याकाळचा समाज, समाजव्यवस्था, त्यांची नीतिमूल्ये वगैरे गोष्ठीवर चांगला प्रकाश पडतो. इतिहासाचार्य वि. का. #राजवाडे (#भारतीय #विवाहसंस्थेचा इतिहास) यांची विचारधारा पर्व मध्ये भैरप्पांनी अधोरेखित केली आहे. वानगीदाखल काही उदाहरणे द्यायची झाली तर पांडव जन्म, पंडूचा शाप, भीष्माचं शरपंजरी मरण वगैरे वगैरे. आता इथं गंमत अशी आहे की कालानुरूप सामाजिक व्यवस्था, नीतिमूल्ये बदलत गेली त्यामुळे पूर्वीच्या काही चालीरीती नंतरच्या पिढयांना कालबाह्य व नीतिभ्रष्ठ वाटू लागली, परिणाम व्यासांना ते काहीतरी मखलाशी करून लपवावंस वाटलं असावं. त्यातूनच कदाचित स्त्री-पुरुष संभोगाशिवाय मुलं जन्माला घालण्याची कथा दैवी गोष्ट मध्ये टाकून लपवून टाकली (पांडव जन्म कथा). दम ऋषी मृगीसोबत संग करताना पंडू राजाकडून मारला गेला आणि त्याने पंडुला शापदग्ध केलं, इथं हे लोक पशुसोबतही मैथुन करीत असं न लिहिता व्यासांनी ते रूप पालटून कामक्रीडा करीत होते असं लिहिलं अथवा पंडू राजाच्या सहमतीने कुंतीला ३ परपुरुषांपासून (विवाहापूर्वीचा पकडून ४) आणि माद्रीला २ परपुरुषांपासून पुत्रप्राप्ती झाली. हि काही शे वर्षांपूर्वीची उघडीनागडी कथा व्यासांना धर्म - नीतीला गौण आणणारी वाटली त्यामुळे त्यांनी हि पुत्रप्राप्ती देवांकडून झाली असे लिहिले. पण केवळ असे प्रथम व्यासांनीच केले असे वाटत नाही. कुमारी मेरीला कोना परपुरुषापासून ख्रिस्त झाला, पण यालाही यहुद्यांनी दडवून त्यालाही देवपुत्र केले. कारण, व्यास आणि हे ख्रिस्ती पंडित यांना हे धर्मबाह्य वर्तन वाटलं म्हणून त्यांचा हा आटापिटा. अतिशय उत्तम आहे, किमान एकदा तरी वाचलेच पाहिजे असे पुस्तक. विजय सरवते १०-११-२०२० ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more