S. S. DESAI

About Author

Birth Date : 25/07/1917
Death Date : 31/05/1996


S. S. DESAI WAS BORN IN THE VILLAGE BALLI,(GOA). HE COMPLETED HIS PRIMARY EDUCATION IN BALLI & HIGHER EDUCATION DONE IN PORTUGUESE IN MARGOA AND PANJI. HE READ SEVERAL BOOKS IN MARATHI, POTUGUESE, FRENCH & ENGLISH. IN 1944 HE WENT TO PUNE TO BECOME A JOURNALIST HE WORK AS A SUB EDITOR FOR VARIOUS MARATHI DAILYS NAMELY; THE LOKSHAKTI, THE SAMACHAR, PRABHAT, THE SANYUKTIK MAHARASHTRA. HE LEFT JOURNALISM IN THE YEAR 1946 AND JOINED HANDS WITH `BHARATIYA SANSKRUTI KOSH’ COMMITE WHICH WAS RUN BY MAHADEVSHASTRI JOSHI, WHERE HE WORKED AS AN ASSISTANT. THEN HE WAS APPOINTED BY THE COMMITEE AS THE RESEARCH ASSISTANT. HE WAS THEN PROMOTED TO THE POST OF A FULL TIME RESEARCHER BY THE SAME COMMITTEE.

प्रा. स.शं. देसाई यांचा जन्म बाळ्ळी येथे झाला. शिक्षण मराठीतून. प्राथमिक शिक्षण बाळ्ळी व पाळोळे, लिसेव (पोर्तुगीज) मडगांव व पणजी येथे. लहानपणापासून वाचनाची आवड. जडणघडणीच्या काळात मराठी, पोर्तुगीज, फ्रेंच व इंग्रजी साहित्याचे भरपूर वाचन केले. १९४० साली पहिली कथा आयुष्याचा वसंत कला मासिकात प्रसिद्ध झाली. १९४४ साली पत्रकार होण्यासाठी पुण्याला प्रयाण. तेथे दै. लोकशक्ती, दै. समाचार, प्रभात, संयुक्त महाराष्ट्र इ. दैनिकात उपसंपादक म्हणून काम केले. १९५७ मध्ये पत्रकारिता सोडून पं. महादेवशास्त्रींच्या ‘भारतीय संस्कृती कोश’ मंडळात साहाय्यक म्हणून नेमणूक झाली. पुढे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींच्या भारतीय संस्कृती कोश मंडळात संशोधक साहाय्यक म्हणून नेमणूक झाली. पुढे पदोन्नती मिळून विश्वकोशात संशोधक म्हणून काम पाहिले. १९६४ च्या डिसेंबर महिन्यात शिवाजी विद्यापीठात इतिहास विभागात संशोधक सहकारी म्हणून निवड झाली. पुढे तिथेच संशोधक संचालक म्हणून पदोन्नती मिळाली. १९५२ साली प्रसिद्ध झालेल्या इभ्रत कादंबरीमुळे साहित्यक्षेत्रात नावलौकिक मिळाला. त्याच कादंबरीवर कुलदैवत हा चित्रपट निघाला. अब्बासअली, आहुती, चंबळेच्या पलीकडे, महापर्व, अखेरची लढाई या सामाजिक ऐतिहासिक कादंबऱ्यांमुळे प्रसिद्धी मिळाली. साहित्याचा व्यासंग व इतिहासाचा सखोल, वास्तव अभ्यास या गुणांमुळे पेशवेकालीन पत्रव्यवहाराचे संकलन पोर्तुगीज इतिहासाच्या साधनाचे मराठीत भाषांतर ही बहुमोल कामगिरी संपूर्ण जीवन इतिहासाचा व साहित्याचा व्यासंग याला वाहिले. प्रसिद्धीचा थोडाही हव्यास न बाळगता तर्कशुद्ध वास्तव लेखनाचे व्रत आयुष्याच्या अंतापर्यंत चालविले.
Sort by
Show per page
Items 1 to 5 of 5 total
AKHERCHI LADHAI Rating Star
Add To Cart INR 240
CHAMBALECHYA PALIKADE Rating Star
Add To Cart INR 720
DUSARE JAGTIK MAHAYUDDHA Rating Star
Add To Cart INR 200
MAHAPARVA Rating Star
Add To Cart INR 450
PAHILE JAGTIK MAHAYUDDHA Rating Star
Add To Cart INR 180

Latest Reviews

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
सुरेश काळे

कालपासून मानसीने भाषांतरित केलेलं आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केलेलं पेरुमाल मुरुगन् यांच्या मूळ तमिळ पुस्तकाचं मराठीत भाषांतर वाचायला घेतलं आणि काय सांगू? खालीच ठेववेना! त्याची ओघवती भाषा व आधुनिक कम्प्युटर आणि मोबाईल ह्यांनी घातलेला गोंधळ, रुण पिढीवर केलेली जादू यांनी भारावून गेलो. एक उत्तम पुस्तक वाचनात आलं, असं वाटू लागलं. ते बऱ्याच जणांच्या बाबतीत डोळ्यात अंजन घालणार ठरेल असं वाटलं. विशेषतः किरकिर करणाऱ्या, सतत रडत राहणाऱ्या लहान मुलांना मोबाईलची सवय लावणाऱ्या पालकांना हा मोठा झटकाच आहे. यातील नायक कुमारासुर हा असुर-संगणक नावाच्या राक्षसाच्या मायाजालाला म्हणजेच इंटरनेटपासून जेवढा स्वतःला दूर ठेवत जातो तसतसा तो त्यातच गुंतत जातो. त्याचा मुलगा हा संगणकतज्ज्ञ बनू पाहतो. त्याला म्हणजे नायक मेघासला कोणकोणत्या दिव्यातून प्रवास करावा लागतो याचे या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकात चित्रण केले आहे. भाषांतरकाराने पण त्याच्या ओघवत्या शैलीने त्याचे प्रामुख्याने वर्णन छान केलंय. विशेषतः कॉलेजची विद्यार्थी वर्गाप्रती आणि आपल्याच महाविद्यालयाने पहिल्या वर्गात यावे याची केलेली व्यवस्था अतिशय वास्तववादी झाली आहे. असे घडू शकते आणि सर्वसामान्य माणसाला ही मायावी महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस कुठल्या दर्जाचे विद्यार्थी घडवतात आणि त्यांच्या जीवाशी खेळतात हे कळून येईल इतके प्रभावी चित्रण ह्यात केले आहे. एका ज्वलंत विषयाला आपल्या सडेतोड भाषेने व लेखणीने जनतेपुढे आणण्याबद्दल अत्यंत आभार! ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
...ए.के.देशमुख, पेनसिल्वेनिया (यु.एस.ए.)

`छाटितो गप्पा` हे मी वाचलेलं जी.बी.देशमुखांचं पाचवं पुस्तक. अमेरिकेत मुलीकडे मुक्कामी आलो असता मिळालेल्या निवांत वेळेत मी हे पुस्तक वाचलं. पुस्तक वाचताना खुप मजा वाटली. लेखकापेक्षा मी वयाने ज्येष्ठ असल्यामुळे मला अमरावती शहराची रचना, तिथली संस्कती आणि इतर संदर्भात त्या काळी झालेला विकास लेखकाच्या आधी अनुभवण्याची संधी मिळाली होती. राजेंद्र कॉलनी अस्तित्वात आल्यापासूनच माझ्या परिचयाची होती आणि तिथल्या घर क्र. १० मधे काही काळ माझा निवास देखील होता. `छाटितो गप्पा` वाचताना अंबागेट ते राजेंद्र काॅलनी दरम्यान अनेक वेळा सायकल किंवा सायकल-रिक्षाने केलेल्या येरझारा आठवल्या. त्या वेळी अमरावतीचा बहुचर्चित रेल्वे पुल देखील बांधला गेला नव्हता. "छाटितो गप्पा " हे पुस्तक मला अमरावती मधील माझ्या महाविद्यालयातील मोरपंखी दिवसात घेऊन गेले. त्या दिवसात अनेक जागी दिलेल्या भेटिंची पुन्हा एकदा उजळणी झाली. तेव्हाची व आजची अमरावती नजरेसमोर तरळू लागली. आयुष्यात अशा लहान सहान गोष्टी आपण सर्वच अनुभवत असतो पण लेखकाने त्या पुस्तक रुपात अत्यंत खुमासदार पद्धतीने वाचकांसमोर आणल्या. म्हणून लेखकाचे विषेश अभिनंदन व आगामी लेखनाकरीता खुप खुप शुभेच्छा. ...Read more