S. S. DESAI

About Author

Birth Date : 25/07/1917
Death Date : 31/05/1996


S. S. DESAI WAS BORN IN THE VILLAGE BALLI,(GOA). HE COMPLETED HIS PRIMARY EDUCATION IN BALLI & HIGHER EDUCATION DONE IN PORTUGUESE IN MARGOA AND PANJI. HE READ SEVERAL BOOKS IN MARATHI, POTUGUESE, FRENCH & ENGLISH. IN 1944 HE WENT TO PUNE TO BECOME A JOURNALIST HE WORK AS A SUB EDITOR FOR VARIOUS MARATHI DAILYS NAMELY; THE LOKSHAKTI, THE SAMACHAR, PRABHAT, THE SANYUKTIK MAHARASHTRA. HE LEFT JOURNALISM IN THE YEAR 1946 AND JOINED HANDS WITH `BHARATIYA SANSKRUTI KOSH’ COMMITE WHICH WAS RUN BY MAHADEVSHASTRI JOSHI, WHERE HE WORKED AS AN ASSISTANT. THEN HE WAS APPOINTED BY THE COMMITEE AS THE RESEARCH ASSISTANT. HE WAS THEN PROMOTED TO THE POST OF A FULL TIME RESEARCHER BY THE SAME COMMITTEE.

प्रा. स.शं. देसाई यांचा जन्म बाळ्ळी येथे झाला. शिक्षण मराठीतून. प्राथमिक शिक्षण बाळ्ळी व पाळोळे, लिसेव (पोर्तुगीज) मडगांव व पणजी येथे. लहानपणापासून वाचनाची आवड. जडणघडणीच्या काळात मराठी, पोर्तुगीज, फ्रेंच व इंग्रजी साहित्याचे भरपूर वाचन केले. १९४० साली पहिली कथा आयुष्याचा वसंत कला मासिकात प्रसिद्ध झाली. १९४४ साली पत्रकार होण्यासाठी पुण्याला प्रयाण. तेथे दै. लोकशक्ती, दै. समाचार, प्रभात, संयुक्त महाराष्ट्र इ. दैनिकात उपसंपादक म्हणून काम केले. १९५७ मध्ये पत्रकारिता सोडून पं. महादेवशास्त्रींच्या ‘भारतीय संस्कृती कोश’ मंडळात साहाय्यक म्हणून नेमणूक झाली. पुढे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींच्या भारतीय संस्कृती कोश मंडळात संशोधक साहाय्यक म्हणून नेमणूक झाली. पुढे पदोन्नती मिळून विश्वकोशात संशोधक म्हणून काम पाहिले. १९६४ च्या डिसेंबर महिन्यात शिवाजी विद्यापीठात इतिहास विभागात संशोधक सहकारी म्हणून निवड झाली. पुढे तिथेच संशोधक संचालक म्हणून पदोन्नती मिळाली. १९५२ साली प्रसिद्ध झालेल्या इभ्रत कादंबरीमुळे साहित्यक्षेत्रात नावलौकिक मिळाला. त्याच कादंबरीवर कुलदैवत हा चित्रपट निघाला. अब्बासअली, आहुती, चंबळेच्या पलीकडे, महापर्व, अखेरची लढाई या सामाजिक ऐतिहासिक कादंबऱ्यांमुळे प्रसिद्धी मिळाली. साहित्याचा व्यासंग व इतिहासाचा सखोल, वास्तव अभ्यास या गुणांमुळे पेशवेकालीन पत्रव्यवहाराचे संकलन पोर्तुगीज इतिहासाच्या साधनाचे मराठीत भाषांतर ही बहुमोल कामगिरी संपूर्ण जीवन इतिहासाचा व साहित्याचा व्यासंग याला वाहिले. प्रसिद्धीचा थोडाही हव्यास न बाळगता तर्कशुद्ध वास्तव लेखनाचे व्रत आयुष्याच्या अंतापर्यंत चालविले.
Sort by
Show per page
Items 1 to 5 of 5 total
AKHERCHI LADHAI Rating Star
Add To Cart INR 240
CHAMBALECHYA PALIKADE Rating Star
Add To Cart INR 720
DUSARE JAGTIK MAHAYUDDHA Rating Star
Add To Cart INR 200
MAHAPARVA Rating Star
Add To Cart INR 450
PAHILE JAGTIK MAHAYUDDHA Rating Star
Add To Cart INR 180

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more