BHARATI PANDE

About Author

Birth Date : 28/03/1944


BHARATI PANDE IS A FREE-LANCE WRITER & TRANSLATOR & EDITOR. HER SHORT STORIES, NOVELS & POEMS BOOKS ARE PUBLISHED & 27 TRANSLATED BOOKS ALSO PUBLISHED. SHE IS WORKING ON AN INDEPENDENT PROJECT. SHE IS M.A. IN MARATHI LINGUISTICS. HER THREE TRANSLATED BOOKS ARE IN LINE TO BE PUBLISHED….

शिक्षण : एम.ए., बी.जे., जपानी भाषेची पदविका. समुपदेशन अभ्यास वर्ग. भारती पांडे यांचे ‘अक्षरित’, ‘बिनमहत्त्वाच्या माणसांच्या गोष्टी’, नवलकथा असे कथासंग्रह, तसेच ‘मनवा’ हा कवितासंग्रह व ‘जाग’ ही एकांकिका असे साहित्य प्रकाशित झाले आहे. त्याचप्रमाणे ‘काळी, ‘व्यथित मनानं सांगावंसं वाटतं की..... ‘एक एक पाऊल’, ‘द वल्र्ड ऑफ फतवा’, ‘मजल-दरमजल’, ‘ब्लास्फेमी’, ‘इंटरप्रिटर ऑफ मॅलडीज’, ‘कहै कबीर दिवाना’, ‘कोर्टशिप अँड मॅरेज’,‘मर्यादा’, ‘गव्हर्नन्स’, ‘द स्पाय प्रिन्सेस’, ‘द रोड ऑफ लॉस्ट इनोसन्स’, ‘प्रिन्स ऑफ अयोध्या’ अशी पुस्तके त्यांनी अनुवादित केली आहेत. त्यांच्या माहेर, विपुलश्री, मेनका, प्रपंच, मिळून साऱ्याजणी इ. नियतकालिकांत कविता, लेख व कथा प्रकाशित झाल्या आहेत. तसेच ‘सकाळ’, ‘महाराष्ट्र टाईम्स’, ‘लोकसत्ता’, ‘पुढारी’ यांसारख्या दैनिकांमध्ये त्यांनी विपुल लेखन केले आहे. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या संशोधन विभागाच्या त्या माजी कार्याध्यक्ष आहेत. मंडळाच्या ‘स्त्री साहित्याचा मागोवा’ या त्रिखंडात्मक ग्रंथामध्ये शोधनिबंध व संपादनात साह्य केले आहे. ‘स्वाधार’ या स्वयंसेवी संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी समुपदेशनाचे कार्य त्यांनी केले आहे. आसपासच्या गोष्टी (कथासंग्रह) मतलय (कवितासंग्रह) ‘अ गोल्डन एज’,(अनु.) अ हाऊस (अनु.) डिव्हायडेंड, द मदर (अनु.) असे त्यांचे साहित्य प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 17 total
AAHE KATTAR TARI Rating Star
Add To Cart INR 395
BHAKTIT BHIJALA KABIR Rating Star
Add To Cart INR 160
BLASPHEMY Rating Star
Add To Cart INR 260
EK EK PAUL Rating Star
Add To Cart INR 250
GOVERNANCE Rating Star
Add To Cart INR 320
HA SHODH VEGALA Rating Star
Add To Cart INR 190
KALI Rating Star
Add To Cart INR 450
MAJAL DARMAJAL Rating Star
Add To Cart INR 140
MAYADA - IRAQCHI KANYA Rating Star
Add To Cart INR 290
TBC Classic Book
MAZE MAJAPASHI KAAHI NAAHI Rating Star
Add To Cart INR 160
MHANE KABIR DIWANA Rating Star
Add To Cart INR 195
34 %
OFF
OSHO COMBO SET - 37 BOOKS Rating Star
Add To Cart INR 8400 INR 5527
12

Latest Reviews

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more