BHARATI PANDE

About Author

Birth Date : 28/03/1944


BHARATI PANDE IS A FREE-LANCE WRITER & TRANSLATOR & EDITOR. HER SHORT STORIES, NOVELS & POEMS BOOKS ARE PUBLISHED & 27 TRANSLATED BOOKS ALSO PUBLISHED. SHE IS WORKING ON AN INDEPENDENT PROJECT. SHE IS M.A. IN MARATHI LINGUISTICS. HER THREE TRANSLATED BOOKS ARE IN LINE TO BE PUBLISHED….

शिक्षण : एम.ए., बी.जे., जपानी भाषेची पदविका. समुपदेशन अभ्यास वर्ग. भारती पांडे यांचे ‘अक्षरित’, ‘बिनमहत्त्वाच्या माणसांच्या गोष्टी’, नवलकथा असे कथासंग्रह, तसेच ‘मनवा’ हा कवितासंग्रह व ‘जाग’ ही एकांकिका असे साहित्य प्रकाशित झाले आहे. त्याचप्रमाणे ‘काळी, ‘व्यथित मनानं सांगावंसं वाटतं की..... ‘एक एक पाऊल’, ‘द वल्र्ड ऑफ फतवा’, ‘मजल-दरमजल’, ‘ब्लास्पेÂमी’, ‘इंटरप्रिटर ऑफ मॅलडीज’, ‘कहै कबीर दिवाना’, ‘कोर्टशिप अँड मॅरेज’,‘मर्यादा’, ‘गव्हर्नन्स’, ‘द स्पाय प्रिन्सेस’, ‘द रोड ऑफ लॉस्ट इनोसन्स’, ‘प्रिन्स ऑफ अयोध्या’ अशी पुस्तके त्यांनी अनुवादित केली आहेत. त्यांच्या माहेर, विपुलश्री, मेनका, प्रपंच, मिळून साNयाजणी इ. नियतकालिकांत कविता, लेख व कथा प्रकाशित झाल्या आहेत. तसेच ‘सकाळ’, ‘महाराष्ट्र टाईम्स’, ‘लोकसत्ता’, ‘पुढारी’ यांसारख्या दैनिकांमध्ये त्यांनी विपुल लेखन केले आहे. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या संशोधन विभागाच्या त्या माजी कार्याध्यक्ष आहेत. मंडळाच्या ‘स्त्री साहित्याचा मागोवा’ या त्रिखंडात्मक ग्रंथामध्ये शोधनिबंध व संपादनात साह्य केले आहे. ‘स्वाधार’ या स्वयंसेवी संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी समुपदेशनाचे कार्य त्यांनी केले आहे. आसपासच्या गोष्टी (कथासंग्रह) मतलय (कवितासंग्रह) ‘अ गोल्डन एज’,(अनु.) अ हाऊस (अनु.) डिव्हायडेंड, द मदर (अनु.) असे त्यांचे साहित्य प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 17 total
AAHE KATTAR TARI Rating Star
Add To Cart INR 395
BHAKTIT BHIJALA KABIR Rating Star
Add To Cart INR 160
BLASPHEMY Rating Star
Add To Cart INR 260
EK EK PAUL Rating Star
Add To Cart INR 250
GOVERNANCE Rating Star
Add To Cart INR 320
HA SHODH VEGALA Rating Star
Add To Cart INR 190
KALI Rating Star
Add To Cart INR 280
MAJAL DARMAJAL Rating Star
Add To Cart INR 140
MAYADA - IRAQCHI KANYA Rating Star
Add To Cart INR 290
TBC Classic Book
MAZE MAJAPASHI KAAHI NAAHI Rating Star
Add To Cart INR 160
MHANE KABIR DIWANA Rating Star
Add To Cart INR 195
34 %
OFF
OSHO COMBO SET - 34 BOOKS Rating Star
Add To Cart INR 6350 INR 4178
12

Latest Reviews

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more